Vaibhav Mhatre
544 views
15 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१६६३ सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक हल्ला चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या रात्रीची घटना 🔥 घरात घुसुन मारणं कशाला म्हणतात माहीतीये का..? दिनांक ५ एप्रिल १६६३🔥 मध्यरात्र 🔥 लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जीवलग घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शहिस्तेखानाची बोटे छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!.. जास्तित जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने..कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव......🚩 हो पुर्ण पराभव......⚔️ 👉आज बोटं गेलीयेत, उद्या मुंडकं जाईल या भितीनं शहिस्ताखान याने पुण्यातुन अक्षरशः पळाला..🏇 ☝याला म्हणतात घरात घुसुन मारणं..!. खान कसाबसा पसार मात्र खानाची बोटे महाराजांनी कापली. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद ) जाउन थांबला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१७१८ मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही." 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩