➖➖➖➖✍️⚜️✍️➖➖➖➖
*🚦मंगळवारीय 'बाल काव्यस्पर्धा*🚦
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*✍️परीक्षणीय मनोगत*
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*🌹गुलाबाचे रान तुडवणारी.. सुंदर, 'हरणाची जोडी'; शर्मिला देशमुख*
*🔰आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण*
गोरी गोरी पान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण...
वहिणीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची जोडी तुडवी गुलाबाचे रान..
दादा मला एक वहिनी आण...
*💐किती सुंदर कल्पना अन् किती सुंदर गीत! हे बालगीत लहानपणी ऐकतांना कितीतरी वेळा चांदोबाच्या गाडीत, हरणाच्या जोडीसोबत गुलाबाच्या बागेत फेरफटका मारला असेल. आजही विषय वाचताच पुन्हा परत त्याच बालविश्वास रमण्याचा आनंद घेतला, हा आनंद अवर्णनीयच ! निसर्गाचे सौंदर्य खरंच अनमोल अन अप्रतिम! कितीही मोठे झालो तरी या निसर्गसौंदर्यात हरवताना मिळणारा आनंद मात्र अमूल्यच !पहिल्या काळामध्ये अगदी रामायणातील सीतेला आवडलेल्या हरणांपासून मनाला ओढ लावणारा हा प्राणी लहानपणी कितीतरी वेळा ते टुणटून उड्या मारायला की आमचेही बालपण त्यांच्याबरोबर उड्या मारत असे.*
*🌹किती तरी दूर दूर त्यांच्या मागे धावण्याचा असफल प्रयत्न आठवला की आता स्वतःचेच स्वतःच्या मनाला हसू येते. ज्या ठिकाणी हरिण पाहिले त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाऊन ते आले असतील का याची वाट पाहणे आणि सोबत्यांना आपण पाहिलेले दृश्य सांगणे यामध्ये किती हरपून जायचो. आज काळ बदलला तसे वृक्षतोडीमुळे निसर्गात प्रत्यक्षात हरीण दिसणे दुर्मिळ झाले आणि मोबाईलच्या या काळात मुलेही जास्तीत जास्त व्हिडिओ गेम ऑनलाइन गेमिंग सोशल मीडियामध्ये अडकल्यामुळे या दुर्मिळ आनंदापासून वंचितच राहिली आहेत. झाडे ,पक्षी ,घरटे त्यांची अंडी, कुत्रे त्यांची पिल्ले ,मोर त्यांची घरटे, अंडे सापडण्यासाठी अडीअडचणीत केलेला प्रवास.. एक ना अनेक आठवणी. पण खरंच आजच्या बालकांबद्दल मनातून वाईट वाटते कारण निसर्गाचा निर्भेळ आनंद त्यांच्या जीवनात राहिलाच नाही.*
*🦌प्राणी संग्रहालयात जाऊन हरणांची जोडी पाहणारी आजची पिढी. त्यांना तो काय आनंद मिळणार! लहानपणीच्या आठवणी जर त्यांना सांगितल्या तर ऐकताना त्यांच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसतील. त्यांनाही निसर्गाचे प्रेम मिळवून देण्यासाठी पालकांनीच प्रयत्न करायला हवेत. शहरात राहत असलो तरी सुट्टीच्या दिवशी त्यांना आपल्या शेतात घेऊन जा. त्यांना मोबाईल मधील दृष्टी काढून सुंदर सृष्टी दाखवा . त्यांना सुद्धा ते नक्कीच आवडेल. पर्यावरणाचे ,सृष्टीचे संरक्षण कसे करायचे याची जाणीव त्यांना करून द्या. प्रत्यक्षात निसर्गात रममान झाल्याशिवाय निसर्गाचे ,पर्यावरणाचे महत्त्व त्यांना समजणार नाही. प्राणी पक्षी यांचे संरक्षण, वृक्षवेली यांचे जतन करणे हे मानवासाठी किती आवश्यक आहे हे त्यांना प्रत्यक्षात समजू द्या आणि सर्वात महत्त्वाचे त्यांना मिळणारा निसर्गातील निर्भेळ आनंद!*
*🦌आज मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय राहूल दादांनी 'हरणाची जोडी' दिला आणि बालकवी समूहात निर्भेळ आनंद घेतलेले बालमन जंगल, आकाश, प्राण्या पक्षांची सोबत घेऊन सृष्टीच्या सौंदर्यात नकळत हुंदडून आले. बालकवींनी निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. इतक्या सुंदर अनुभूतींचे श्रेय राहूल दादांना जाते. सर्व बालमानाच्या माझ्या शिलेदार बंधू-भगिनींनी जो आनंद घेतला तो आनंद आपले पाल्य व विद्यार्थ्यांना द्यावा. भेटूया पुन्हा अशाच निसर्ग सौंदर्याने भरलेल्या बालकवितांनी .मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण .धन्यवाद...!!*
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.शर्मीला देशमुख घुमरे*
*ता.केज,जि.बीड*
*संकलक/सहप्रशासक/परीक्षक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
https://pratilipi.app.link/53ijd14Zu0b #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍मराठी साहित्य
➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖