Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
855 views
कधी नव्हे ते निवडणूकीत आज शाई ऐवजी मार्कर वापरल्या जातोय, तो मार्कर कसा पुसायचा यासाठी वेगवेगळे पर्याय अगोदरच सर्वांना माहिती आहेत, त्यामुळे एका मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर दूबार मतदार बोटावरील शाई नेलपेंट रिमुव्हर, विनेगर यांसारख्या वस्तूंचा वापर करून मिटवताहेत आणि पुन्हा दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी उभे राहताहेत, ही खरेतर लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल. आपल्या संविधानाने मतदानाचा समान अधिकार सर्वांना दिलेला आहे. कोणी उद्योगपती असो, पंतप्रधान असो की सामान्य नागरिक त्याला एकच मत देता येतं. पण आज खुलेआम दुबार तिबार मतदान होत असतील तर हा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान नाही का ? आज निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने उघडपणे दूबार तिबार मतदान घडवून आणत असेल तर या निवडणूकांना अर्थ तो काय उरतो, या निवडणूका घेतल्या तरी का जात आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आला तर ते काही चूक नाही. #लोकशाही #मतदान #महापालिकानिवडणुक #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🤦वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ👆 #📢मनपा निवडणूक राज्यभरात जोरात👆 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण