1️⃣महाराष्ट्र अपडेट्स

164K Posts • 678M views
#🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती🤚 मराठी माणसाच्या अस्मितेचा अमर दीप..c/p संदीप जाधव. आज १४ एप्रिल... संपूर्ण भारतभूमीवर, विशेषतः मराठी हृदयात एक पवित्र ज्योत प्रज्वलित झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तो दिवस जेव्हा सूर्योदय होतो, तेव्हा एका महान संघर्षाची, एका अमर संकल्पाची आठवण होते. बाबासाहेबांनी फक्त दलितोद्धार केला नाही, त्यांना फक्त दलितांचे कैवारी म्हणून बांधू नका.. ते गोबरपट्ट्यातील आयटी सेल छत्रपती ते बाबासाहेब या सर्वांचीच बदनामी करत असतात. लाखो ने सैनिक लढले तरीही विजयाच श्रेय राजाच असतं.. कितीही अंध भक्त जिंकले तरी श्रेय फेकूच असतं.. अगदी तसंच राज्यघटना लिहिण्याचे सर्व श्रेय हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचेच आहे. तर मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आवाज उठवला. म्हणून ते माझ्यासाठी सगळ्या महाराष्ट्राच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सुरुवातीच्या काळात ज्या साताऱ्यांच्या भूमीत झालं तिथेच मी सुद्धा शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.आज या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो. १९४८ च्या धार आयोगापासून ते १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीपर्यंत... बाबासाहेबांचा संघर्ष मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका होती. धार आयोगासमोर त्यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्र अ‍ॅज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स’ या ऐतिहासिक दस्तऐवजात त्यांनी मुंबईला महाराष्ट्राचा अविभाज्य भाग म्हणून सिद्ध केले. “मुंबई हे महाराष्ट्रीयनांचे घर आहे, दुसऱ्यांचे नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले. काँग्रेसच्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या योजनेविरुद्ध ते उभे राहिले. त्यांच्या अनुयायांनी मुंबई महापालिकेत पहिला ठराव मांडला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र... १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेते एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, दांगे दिल्लीत बाबासाहेबांच्या घरी गेले. तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “माझी अनुसूचित जाती फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीला ‘जिब्राल्टरच्या खडकाप्रमाणे’ साथ देईल” त्यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानात समितीच्या बैठका होऊ लागल्या. त्यांच्या पक्षाने समितीशी युती केली, निवडणुकीत काँग्रेसला पराभूत केले. शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, सत्याग्रह केले, जेल भोगल्या. बाबासाहेबांच्या स्वरात मराठी माणसाची व्यथा होती तो शेतकरी, तो कामगार, तो दलित, तो मागासलेला... सर्वांना एकत्र करून एक मजबूत, लोकशाही महाराष्ट्र घडवण्याची त्यांची स्वप्ने होती. बाबासाहेब शेवटपर्यंत लढले. आजारी असतानाही, शरीर थकलेले असतानाही त्यांचा आवाज मरला नाही. त्यांनी ‘Thoughts on Linguistic States’ या ग्रंथात भाषिक राज्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि प्रगती कशी साधता येईल, याचे मार्गदर्शन दिले. त्यांना माहीत होते की, फक्त भाषा एकत्र करून चालणार नाही; त्या भाषिक राज्यात दलित, शोषित, कष्टकरी यांना शिक्षण, संघटन आणि संघर्षाची शक्ती मिळाली पाहिजे. त्यांचे ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हे मंत्र आजही मराठी माणसासाठी मार्गदर्शक आहे. आज भीम अनुयायी आणि इतर सर्व मराठी बांधव-भगिनींना बाबासाहेब सांगत आहेत एक होऊन उठा.. जात-पात, पक्ष-विभाग यांच्या भिंती तोडा. स्वतः शिका, आपल्या मुलांना शिकवा. शिक्षण हेच शस्त्र आहे ज्याने बाबासाहेबांनी स्वतःला आणि लाखो दलितांना गुलामीतून मुक्त केले. आज मराठी माणूस शिकला तरच तो मुंबईत, शेतीत, उद्योगात, राजकारणात प्रगती करू शकेल. भीम अनुयायांनी आंबेडकरी विचाराला मराठी अस्मितेशी जोडले पाहिजे. आणि इतर मराठी बांधवांनीही बाबासाहेबांच्या न्याय आणि समतेच्या विचाराला हृदयात बसवले पाहिजे. एकत्रितपणे शिक्षण घ्या, उद्योग उभार, शेती सुधार, तरुणांना संधी द्या. मराठी भाषेचा, संस्कृतीचा, परंपरेचा अभिमान बाळगा, पण तो कोणावरही लादू नका. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात सर्वांना स्थान आहे – ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी, महिला, शेतकरी... सर्...त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नात फक्त एकच माणूस होता.. ‘मराठी माणूस’, जो कष्टाळू, स्वाभिमानी आणि न्यायप्रिय आहे. आज जयंतीच्या दिवशी आम्ही भीम अनुयायी आणि सर्व मराठी हृदय एकत्र येऊन म्हणतो.. बाबासाहेब, तुमच्या संघर्षामुळे आज महाराष्ट्र अस्तित्वात आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. तुम्ही शेवटपर्यंत मराठी माणसासाठी लढलात, आम्हीही तसेच लढू. तुमच्या विचाराने आम्ही प्रगती करू, एकत्रित होऊ, शिक्षित होऊ आणि मराठी संस्कृतीला विश्वात उंचीवर नेऊ.बाबासाहेब, तुम्हाला कोट्यवधी प्रणाम.. तुमचे स्वप्न आमचे ध्येय आहे. मराठी माणूस जागृत होईल, प्रगती करील आणि तुमच्या नावाने इतिहास घडवील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.. 🙏🙏 #maharashtra #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #👌हृदयस्पर्शी फोटो
6 likes
17 shares