#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१५७६
महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध:-
महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खान सुरी
(हा दिल्ली चा एकेकाळ चा बादशाह शेरशाह सुरी चा वंशज) या अफगाणी मुस्लिम सेनानी कडे होते, तर बादशहा अकबराकडून मोगलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह
(जयपूर चा राजा, मिर्झाराजा जयसिंह चे आजोबा)
हे हिंदू राजा करत होते.
१८ फेब्रुवारी १५७६ साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध लढत होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१६५३
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाल भटास वर्षासन दिले.
( फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, शके १५७४, संवत्सर नंदन, शुक्रवार )
महाराजांनी गोपाळ भटांना वर्षासन नेमून दिले!
श्री क्षेत्र महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधर भट हे ' सुर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते ' होते.
आजच्या दिवशी महाराजांनी गोपाळ भटांना पत्र लिहून " स्वामींनी सुर्यानुष्ठाण करावे " ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१६६६
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१७५५
तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशव्यांनी करवीरकरांशीहि कारस्थान आरंभिले तेव्हां करवीरकर यांनी तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारात दिला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१७५६
दिनांक १८ फेब्रुवारी १७५६ रोजी समशेर बहाद्दर यांनी
रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला.
उत्तर हिंदुस्थानातील राघोबादादांच्या मोहीमेत समशेर बहाद्दर सामील होते मात्र कोकणातील मोहीमेवर जाण्याकरीता उत्तरेकडील मोहीम सोडून समशेर बहाद्दर सन १७५५ च्या मे महिन्यात कोकण मोहीमेवर रवाना झाले.
कोकणातील मोहीमेनंतर समशेर बहाद्दर यांना पून्हा उत्तरेत राजपुताना मोहीमेवर पाठविण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩