Suersh Remulkar
527 views
10 hours ago
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं,,, की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो... सहवासातील माणसाचं देखील असंच असतं... काही माणसं काही क्षणासाठीच सहवासात येतात, आणि मनावर कब्जा करून जातात.. कायमची आपली होऊन जातात ... तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच.. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं . शरीराची सुंदरता वया बरोबर संपते ,तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते...शरीराला वय असतं ....मनाला ते कधीच नसतं... शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो... शरीर तर निमित्त मात्र असतं... माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता,प्रामाणिकपणा असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं..🥰 शुभ सकाळ 🌹🌹🌹🌹🌹 #सुंदर विचारधारा