*तुम्ही थोडं सद्गुरूंवर प्रेम करा; ते तुम्हाला प्रेमाचं घबाड देतील !!*
*एका गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलेलं एक वाक्य मी हृदयात कोरून ठेवलेलं आहे - "तुम्ही कसं जगावं हा आमचा विषय आहे!". काय सद्गुरुचं तेज आहे! तू कसं जगावस हे मी ठरवणार. मला नेहमी वाटतं, भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचे लगाम आपल्या हातात ठेवले. तसं तुम्हाला तुमचा गुरू नाकात वेसण घालून ठेवतो. तुम्ही दरवेशीचे अस्वल आहात. हे ज्याला पटलं ना तो म्हणेल, Lord thy will be done!*
*तो परमार्थी खरा आहे. तो कायम साधनामध्येच आहे. त्याला वेगळं साधन करायला नको. माझी विद्या, माझं घरदार, माझी संपत्ती, माझी मुलंबाळं, माझं आयुष्य सगळं तुझ्या हातात आहे. तू करशील तसं होईल. त्याला भय नाहीच !*
*परमात्मा कसा आहे तर त्याला अतिशय करुणा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात म्हटलेलं आहे, "दयार्द्रायै निरंतरम्". त्याचा फायदा करून घ्यावा.*
*एक सांगतो, गाईच्या आचळाला आधी थोडं दूध किंवा ओशट लावलं की ती दूध देते. तसं तुम्ही थोडं त्यांच्यावर प्रेम करा; ते तुम्हाला प्रेमाचं घबाड देतील!!!*
#एक like तर बनतोच ना .. 👍