🔴 जयंती विशेष | गुरुदेवांना वंदन 🔴
नमस्कार, जनतेचा कर्णधार न्यूज मधून...
"चित्त जेथे भयशून्य, मस्तक जेथे उन्नत..." ✨🙏
7 मे - विश्ववंद्य गुरुदेव
रवींद्रनाथ टागोर जयंती
भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन' चे रचयिता,
नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय,
महान कवी, लेखक, चित्रकार, तत्त्वज्ञानी
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर*
यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
गीतांजली' सारखी अजरामर साहित्यकृती
जगाला देणारे टागोर केवळ कवी नव्हते,
तर ते शिक्षणतज्ञही होते. त्यांनी स्थापन
केलेले 'शांतीनिकेतन' आजही
निसर्गाच्या सान्निध्यातील शिक्षणाचे
आदर्श केंद्र म्हणून ओळखले जाते.
भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि
बांगलादेशाचे राष्ट्रगीत 'आमार सोनार बांगला'
ही दोन्ही राष्ट्रगीते एकाच महामानवाने
लिहिली, हा जागतिक इतिहासातील
एकमेव मान टागोरांना मिळाला आहे.
लक्ष्मण लटपटे, प्रदेशाध्यक्ष OBC फाउंडेशन यांचे मनोगत:
"गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे ज्ञानाचा महासागर होते. त्यांच्या लेखणीतून देशभक्ती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. 'जिथे ज्ञानाचा प्रकाश मुक्त आहे' असे राष्ट्र त्यांना अपेक्षित होते. आजच्या तरुण पिढीने टागोरांचे साहित्य वाचावे, शांतीनिकेतनचे विचार आत्मसात करावेत. शिक्षण, कला आणि संस्कृतीचा संगम म्हणजे टागोर. अशा युगपुरुषाच्या चरणी त्रिवार नमन!"
#RabindranathTagore #TagoreJayanti #7May #Gurudev #JanaGanaMana #NobelLaureate #Shantiniketan #LaxmanLatpate #JanatechaKarnadhar
🙏 गुरुदेवांच्या विचारांचा जागर करूया 🙏
जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 सबस्क्राईब करा🔔