गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
923 views
1 days ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२४१८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- संसाराचे सुख सोहळे सर्व लोक भोगतात परंतु भक्तांना केवळ एका विठोबाचे बळ असते. भक्तांचा सांभाळ चक्रपाणि करत असतो त्यामुळे भक्तांच्या मनात कोणत्याही प्रकारचे भय नसते आणि चित्तात कोणत्याही प्रकारचा धाक नसतो. श्रीरंग च भक्तासाठी सर्वकाही असतो त्यामुळे भक्तांच्या अंगाला पाप पुण्य केव्हाही धरू शकत नाहीत. काही भक्त संसारातून मुक्त झालेले नसतात त्यांना संसार आवडतो व अशा भक्तांच्या संसाराचा ही सर्व भार देव वहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात वेळप्रसंगी देवभक्तांची सर्व कामे करतो त्याची काळजी घेतो त्यांना मदत करतो त्या योगाने भक्त निश्चिंत असतात. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१०/०४/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝