Dr Ramdas Athawale
6.6K views
1 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *रहिमतपुर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* *रहिमतपुर परिषदेच्या शताब्दी वर्ष सोहळयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन* सातारा दि. 05 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा जिल्हयातील रहिमतपुर येथे 5 मे 1926 रोजी तत्कालीन महार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रहिमतपुर येथे आले होते. रहिमतपूर मध्ये ते ज्या ठिकाणी थांबले होते तेथे भव्य समता स्तंभ उभारण्यात आलेला आहे. तेथे आज ना. रामदास आठवले यांनी भेट दिली. 5 मे 1926 रोजी रहिमतपुर येथे ही परिषद महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी जनजागृतीचा मानवमुक्तीचा लढा सुरु केला, त्याचा भाग म्हणून महार परिषद रहिमतपुर येथे 5 मे 1926 रोजी घेण्यात आली होती. त्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दीपूर्ती महोत्सव आज रहिमतपुर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहिमतपुरच्या या समता स्तंभाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिले. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापु गायकवाड, भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रलेखा माने, रहिमतपुरच्या नगराध्यक्ष वैशाली माने ; मयुर बनसोडे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची आहे. त्यानुसार रहिमतपुरमधील महार परिषदेच्या शताब्दी वर्षानिमीत्त रहिमतपुरच्या समता स्तंभाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडुन मदत मिळवून देऊ. याठिकाणी भव्य भिम स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले दिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारताचे संविधान जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. सर्व जाती धर्मियांचे संविधान आहे. सर्वाना न्याय देणारे संविधान आहे. या संविधानाला ज्यांनी कोणी बदलण्याचा विचार करू शकत नाही. जर बदलण्याचा कोणी विचार केला तर त्यांना आमची आंबेडकरी जनता फाडुन टाकल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा देशभर मी पोहचवला आहे, नागालॅन्ड आणि मणिपुरमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेचा दर्जा मिळेल. सध्या देशात भाजप, कॉग्रेस, बसपा आणि आम आदमी पार्टी हे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. पाचवा राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला अधिकृत मान्यता मिळेल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. सता-यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भिमाई यांचे स्मारक सातारा येथे आहे.. सातारा जिल्हा आंबेडकरी चळवळीसाठी ऐतिहासिक आहे. 5 मे 1926 ला रहिमतपूर येथे आयोजित केलेल्या महार पषिदेला आज शंभर वर्ष होत आहेत. या शताब्दी वर्षानिमीत्त रहिमतपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीची चळवळ उभी केली, त्यांना दलित सवर्ण हा जातीभेद मिटवायचा होता. जातीभेद मिटवुन सामाजिक ऐक्य साधणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्दीष्ट होते. जातीभेद निर्मुलन करुन समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तीच प्रेरणा घेऊन आपणही काम करीत आहोत, समाजात जातीभेद नष्ट करुन सामाजिक समता, दलित सवर्ण हा भेद मिटवुन सामाजिक एकजुट उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #Politics.... ###Politics ##Breakingnews #follow