ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे ३१ मे २०२६ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसंगीत आणि मराठी संगीतविश्वातील एक महत्त्वाचा स्वर कायमचा हरपला आहे.
१९५० च्या दशकात त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. त्या काळात लता मंगेशकर यांचे वर्चस्व असतानाही सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजाचे लतादीदींच्या आवाजाशी साधर्म्य असल्याची चर्चा होत असे, मात्र त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे संगीतविश्वात वेगळे स्थान मिळवले.
मराठी संगीतविश्वातही त्यांचे योगदान मोठे आहे. जिथे सागरा धरणी मिळते, केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात आणि शब्दा शब्द जपेन ठेवून यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. ओमकार प्रधान रूप गणेशाचे या गीताने त्यांना घराघरात पोहोचवले.
त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीची दखल घेत भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. अनेक दशकांपर्यंत आपल्या मधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमन कल्याणपूर आज आपल्यात नसल्या, तरी त्यांची गाणी आणि त्यांचा आवाज संगीतप्रेमींच्या आठवणीत कायम जिवंत राहतील. भारतीय संगीतविश्वातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. 💐🙏🏻
#जेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच निधन💐