Follow
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
6,227
Posts
10,556
Followers
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
502 views
1 days ago
*@ ३० मे @* *गोवा राज्य स्थापना दिन* ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गोव्यावर आदिलशाही राज्य होते. पोर्तुगीज समुद्र मार्गे सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकात गोव्यात आले. त्यांनी १५१० मध्ये यूसुफ आदिल शाह याचा पराभव करुन वेल्हा मध्ये पहिली वसाहत स्थापन केली. अल्पावधीत त्यांनी पूर्ण गोव्यावर अंमल बसवला. तब्बल ४५० वर्षे पोर्तुगिजांची सत्ता गोव्यावर होती. इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव, गोवा हा प्रदेश 'ऑपरेशन विजय' अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव, गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला, पण दमण, दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात. आजच्या या खास दिवसा निमित्त गोवेकरांना गोवा राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. ➖➖➖➖➖➖➖➖ *समाधान ही अंत:करणाची, सर्वात सुंदर संपत्ती आहे !* *ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगातील सर्वात सुखी मनुष्य !* जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र #🎭Whatsapp status
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
625 views
2 days ago
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩२९ मे इ.स.१६७४ शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न. राजांची तुला करण्यासाठी १६००० होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे तर डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो हाच दिवस होता.* *🚩२९ मे इ.स.१६५८ औरंगजेबाला दिल्ली चे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली . या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता . त्याचे नाव शेख मीर . हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला . या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले . ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे . त्या लढाईची तारीख होती.* *🚩२९ मे इ.स.१६८० शिवरायांच्या मृत्यूनंतर व्हॉईस रॉयने शंभूराजेंना पत्र पाठवून पुर्वीचा तह कायम राखण्याबाबत स्पष्ट केले.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
647 views
2 days ago
*🚩२९ मे इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकासाठी रायगडावर मुंज झाली..!🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
477 views
2 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *🚩२९ मे इ.स.१६५८ औरंगजेबाला दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली. या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता. त्याचे नाव शेख मीर. हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला. या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले. ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.* *🚩दि. २९ मे इ.स.१६७४ यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ‘ बटु ‘ स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜