Follow
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
6,360
Posts
10,848
Followers
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
502 views
3 hours ago
❗९ ऑगस्ट ❗ ‼श्री स्वामी समर्थ‼ 🚩कामिका एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩 प्रवचनाचा विषय ज्याला समाधान तो भाग्यवान. ज्याचे 'हवेपण' जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते, त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा; तो आज आहे अन उद्या नाही. पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असा होऊ नये, याची श्रीमंतानी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य, आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त, तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देवू शकत नाही. खरोखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारले तर तो म्हणाला, "अहो, मला मधुमेह झाला आहे; मी आतून पोखरला गेलो आहे त्यापेक्षा तुम्ही बरे." खरोखर, त्याच प्रमाणे पैशापासून प्राप्त होणार्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल.असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत. पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही.खरोखर, प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते; आणि सुख तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख❗राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की, जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का याचे उत्तर 'नाही' असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धिचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे, भगवंताचा आनंद हा उपाधीरहीत आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन नामात राहणे हा एकच उपाय आहे. बोधवचन ;नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. #कामिका एकादशी 💐
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
572 views
12 hours ago
“चला… मनापासून म्हणूया… हरी हरी विठ्ठल! जय जय विठ्ठल! विठ्ठलाच्या नामात मनाला शांती, आणि विश्वासात आयुष्याला नवी दिशा… सर्वांना कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! विठ्ठल रखुमाई! तुमच्या मनातही आज एकदा म्हणा — हरी हरी विठ्ठल! #कामिका एकादशी 💐
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
1.2K views
13 hours ago
दिल से जो कृष्णा का नाम लेता है, कान्हा उसी का हर काम सँवार देता है।सुप्रभात #शुभ सकाळ
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
1.1K views
1 days ago
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩८ आँगस्ट १६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहीली लढाई. पुरंदर-सासवड येथे अदिलशाही सरदार हैबतराव यांच्याशी लढताना "बाजी पासलकर" यांना विरमरण आले.* *🚩८ ऑगस्ट इ.स.१६४८ छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि छत्रपती शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ? पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता. राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.* *हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती. मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.* *🚩८ ऑगस्ट इ.स.१६७६ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र. ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, "रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना रहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊद्या. या कामात कसलीही हयगय होऊ देउ नका !! असंच पत्र, याच तारखेचं महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिलंय.* *🚩८ ऑगस्ट इ.स.१६८३ संभाजीराजांनी ही पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला. चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला.* *🚩८ ऑगस्ट इ.स.१९४२ भारताला स्वातंत्र्य मिळणे हे केवळ भारतासाठीच नाही तर जगाच्या शांतीसाठी गरजेचे आहे.शके १८६४ आषाढ व.१२ फिरंगी दि.* *🚩८ ऑगस्ट इ.स.१९४२ या दिवशी रात्री दहा वाजता प्रसिद्ध असा "चले जाव" ठराव पास झाला. 'चले जाव'ची घोषणा केली गेली आणि 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे', असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
376 views
1 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *८ ऑगस्ट इ.स.१६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहिली लढाई. पुरंदर खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवरायांनकडून सपशेल पराभव. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द छत्रपती शिवराय चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.* *🚩८ ऑगस्ट इ.स.१६८३ चौलच्या वेध्याचे काम निळोपंत पेशवे यांच्याकडे होते त्यांनी ते स्थळ हस्तगत करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले असता चौलच्या तटावर मराठ्यांनी निकराचा हल्ला केला, त्या प्रसंगात पोर्तुगीझांनी पुष्कळ मराठे कापून काढले. जवळच कोरलाइचा किल्लाही पोर्तुगीझांच्या ताब्यात होता त्यावरसुद्धा मारात्र्ह्यांनी छापा घातला. पुष्कळ मराठे धारातीर्थ पडले पण स्थळ हाती आले नाही.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
630 views
1 days ago
#माझा कट्टा वयाच्या सुरकुत्या, अंगावर कष्टाने आणि चिखलाने मळलेले कपडे.. हा स्वाभिमानी कष्टाचा पुरावा सांगून जातो की प्रामाणिकपणे जगलेलं आयुष्य कधीच मलीन होत नाही.! 🙂शुभ 💖सकाळ 🌿
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
8.1K views
5 days ago
_*स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो, कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!*_ #शुभ रात्री
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
673 views
6 days ago
*क्रांतिसिंह नाना पाटील यांना १२५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन * प्रतिसरकारचे जनक, तुफानी क्रांतिकारक नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मराठामार्गने त्याचे जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश.. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांनी नाही तर आपणच स्वतःचे राज्य चालविले पाहिजे असे म्हणत महाराष्ट्राच्या मातीत 'जनतेचे राज्य' प्रत्यक्ष साकारणारा, अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकून उभा ठाकणारा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण देशसेवेसाठी समर्पित करणारा हा तुफानी योद्धा कसा होता, त्यांचा जीवनपट, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे विचार तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील बहे या गावी (त्यांचे आजोळ) झाला. त्यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र (ता. वाळवा, जि. सांगली). घरात वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने बालपणीच त्यांच्या गळ्यात विठ्ठलाची तुळशीमाळ आली. त्या काळात गावात फक्त तिसरी-चौथीपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी नानांनी इस्लामपूर, नागराळे, पुणदी अशा विविध ठिकाणी दुसऱ्यांच्या घरी राहून, खडतर परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तलाठी म्हणून नोकरी स्वीकारली. परंतु, केवळ कागदपत्रे हाताळण्यात आणि ब्रिटिशांचे हुकूम पाळण्यात त्यांचा स्वाभिमानी आत्मा रमणार नव्हता. तलाठी म्हणून काम करत असतानाच त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा खोल प्रभाव पडला. नाना पाटील फक्त बोलणारी नव्हते तर ते स्वतःच्या आचरणातून क्रांती घडवणारे कृतीशील पुरुष होते: १९२० च्या दशकात, जेव्हा समाजात कर्मठपणा ठासून भरला होता, तेव्हा नानांनी स्वतःचा विवाह अत्यंत कमी खर्चात, कोणत्याही भटजीशिवाय, स्वतः मंगलाष्टका म्हणाव्या अशा 'सत्यशोधक' पद्धतीने केला. समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध डावलून त्यांनी आपल्या पत्नीला सुशिक्षित केले. आपल्या बहिणीचे व मुलीचे (हौसा आक्का) विवाहही याच पुरोगामी पद्धतीने घडवून आणले. त्यांनी ग्रामीण भागात फिरून प्रौढ साक्षरता, दारूबंदी, अस्पृश्यता निर्मूलन आणि हुंडाबंदीसाठी मोठे प्रबोधन केले. त्यांनी लावलेल्या या विवाहांची साताऱ्यात 'गांधी लग्न' म्हणून ओळख निर्माण झाली. सरकारी नोकरीत असतानाही नाना पाटील उघडपणे स्वातंत्र्यलढ्याचा आणि सत्यशोधक विचारांचा प्रचार करत असत. हे इंग्रज अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले. > *ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "माफी मागा, तुम्हाला नोकरीवर परत घेतले जाईल" अशी ऑफर दिली. पण, स्वाभिमानी बाणा असलेल्या नानांनी जुलमी सत्तेची गुलामी स्वीकारण्याऐवजी नोकरीवर लाथ मारली आणि पूर्णवेळ स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले.* नोकरी सुटल्यानंतर काही काळातच त्यांच्या आजी, वडील आणि पत्नींचे निधन झाले. त्यावेळी नानांचे वय अवघे ३० वर्षे होते. परंतु, वैयक्तिक दुःखात खचून न जाता बहुपत्नीत्वाची पद्धत असताना दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नाही. आपली जमीन-जुमला भावांच्या नावे करून आणि चिमुकल्या मुलीला नातेवाइकांकडे सुपूर्द करून त्यांनी संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. १९३०च्या सविनय कायदेभंग आंदोलनात गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देत नानांनी कायदेभंगाच्या आंदोलनात उडी घेतली. १९३२ ते १९४२ या काळात त्यांनी तब्बल ८ वेळा तुरुंगवास भोगला. एकदा तुरुंगातून पॅरोलवर सुटल्यावर, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्यांना काही दिवस इस्लामपूर परिसरात 'पोतेबुवा' बनून भिकाऱ्यासारखे जगणे भाग पडले होते. पण त्यांनी हार मानली नाही. आणि इंग्रजांची माफीही मागितली नाही. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी 'भारत छोडो'चा नारा दिला. देशभरात मोठे नेते अटकेत गेले त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचे मनोबल खचले आणि आंदोलन काहीसे थंडावले. परंतु, साताऱ्याच्या भूमीत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिगत राहून एक ऐतिहासिक चमत्कार घडवला! वारणा नदीच्या उत्तरेपासून नीरा नदीच्या दक्षिणेपर्यंतच्या सुमारे १५०० गावांमध्ये ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आणून नानांनी ब्रिटिशांच्या छातीवर धडधडणारे प्रतिसरकार (समांतर सरकार) स्थापन केले. या गावांत ब्रिटिशांचे कायदे चालत नसत. सावकार, दरोडेखोर आणि इंग्रजांच्या बातमीदारांना धरून त्यांच्या पायावर काठ्या मारून शिक्षा दिली जाई, म्हणूनच याला 'पत्री सरकार' असेही म्हटले गेले. आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी, जुलमी सावकारांवर व ब्रिटिशांच्या खजिन्यावर छापे मारण्यासाठी त्यांनी तरुण क्रांतिकारकांची तुफान सेना उभारली. क्रांतिसिंह नाना पाटील स्वतःचा एक तारा निर्माण केला होता. ब्रिटिश संसदेत (House of Commons) तत्कालीन पंतप्रधान आणि विरोधी नेत्यांमध्ये खडाजंगी झाली होती की, "साताऱ्यात सरकार कोणाचे चालते? ब्रिटिशांचे की नाना पाटलांचे?". त्यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी ५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते (त्या काळातील प्रचंड मोठी रक्कम). तेव्हा नाना पाटील ४४ महिने भूमिगत होते. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला, पण नाना पाटलांचा संघर्ष संपला नव्हता. सत्ता आणि पदाच्या मोहात न पडता त्यांनी आपले उरलेले आयुष्य पुन्हा जनता, शेतकरी आणि कामगारांसाठीच वेचले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या लढ्यात नानांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या अमोघ वक्तृत्वाने ढवळून काढला. गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलनात थेट भाग घेतला. १९५७ मध्ये ते सातारा लोकसभा मतदारसंघातून तर १९६७ मध्ये बीड मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आले. संसदेमध्ये पहिल्यांदा मराठीतून भाषण करून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा आणि शेतकऱ्यांचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहात बुलंद केला. कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या माध्यमातून त्यांनी खंडकरी शेतकरी, धरणग्रस्त आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. दोन-दोन वेळा देशाचे खासदार राहिलेल्या या महान नेत्याने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी एक गुंठा जमीन किंवा घर बनवले नाही. सर्व काही देशाच्या आणि जनतेच्या कामासाठी अर्पण केले. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते पंढरपुरातील रामबागेत राहिले. ६ डिसेंबर १९७६ रोजी जेव्हा या महान क्रांतिसिंहाने जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांच्या मागे संपत्तीच्या नावाखाली काय उरले होते? तर एक लोखंडी पेटी, पायातील एक चपलांची जोडी, एक घोंगडे आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारने दिलेला ताम्रपटाचा एक बिल्ला! नाना म्हणत, > 💬 *"देशाकरता थोडं कार्य करण्याची नियतीने मला संधी दिली, यातच मी कृतार्थ आहे, तृप्त आहे. सगळेजण मला विसरले, पण अर्धनग्न शेतकरी-माझा बळीराजा मला विसरला नाही. कारण आपल्या मातीचा गुणच तसा आहे!"* त्यांची शेवटची इच्छा होती, > 💬 *"मी तिकडे वाळव्याला मेलो तर हुतात्मा किसन अहिरच्या पुतळ्यासमोर क्रांतीचा एक शिपाई म्हणून मला जाळा, आणि पंढरपुरात मेलो तर तिथल्या वाळवंटात वारकरी म्हणून मला जाळा. मी मेल्यावर माझ्या प्रेतावर फक्त एक फूल वाहा आणि म्हणा— नाना पाटील: देशभक्त रयत सेवक!* > 💬 *"अन्याय सहन करणे हे पाप आहे; आणि स्वतःच्या हक्कासाठी संघटित होऊन लढा देणे हाच खरा पराक्रम आहे!"* क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, महात्मा फुलेंची सामाजिक दृष्टी, छत्रपती शाहू महाराजांचा बहुजन-कल्याणकारी विचार आणि महात्मा गांधींचे राष्ट्रप्रेम यांचा जिवंत संगम होते. आज राजकारणाचा आणि समाजकारणाचा दर्जा घसरलेला असताना, नाना पाटलांचे शुद्ध चारित्र्य, त्याग, निष्ठा आणि निर्भयता हा आजच्या तरुण पिढीसाठी मोठा दीपस्तंभ आहे. या महान युगपुरुषाला, सह्याद्रीच्या क्रांतीसिंहाला, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या पाठीराख्याला, खऱ्या स्वातंत्र्यवीराला १२५ व्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम! #माझा कट्टा