Failed to fetch language order
Failed to fetch language order
Failed to fetch language order
🙏शिवदिनविशेष📜
62K Posts • 319M views
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜२० ऑक्टोबर इ.स‌.१६७६ विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांच्या बरोबर तह करून त्यांना आपल्या बाजूला घेऊन दक्षिणेतून मुघल सत्तेची पाळेमुळे उखडून टाकायची व या संघटित शक्तीच्या जोरावर मुघल सत्तेशी निर्णायक लढा देण्यासाठी सिद्ध राहायचे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण मोहिमेचे नियोजन केले होते. त्यानुसार महाराज सप्टेंबर ऑक्टोबर १६७६ मध्ये मोठ्या तयारीनिशी आपल्या सैन्यासह या मोहिमेवर रवाना झाले. या मोहिमेत त्यांच्या संभाव्य मार्गाबाबत मतभिन्नता असली तरी वाईच्या यादीप्रमाणे रायगडावरून निघून महाराजांनी १६ ऑक्टोबरला वाईचा कोट जिंकला होता. तर पेशवे दप्तराच्या नोंदीनुसार चार दिवसांनी शिवाजी महाराजांनी खटाव वर आक्रमण केले व तेथे आपले सैन्य प्रस्थापित केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/W8W1ZdJNOoY?feature=share 📜२० ऑक्टोबर इ.स.१६८२ छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल शहजादा अकबर यांची प्रथम भेट नोव्हेंबर इ.स.१६८१ मध्ये झाली. या भेटीनंतर काही दिवसानी अकबर शंभुराजेंच्या बरोबर जंजिऱ्याच्या वेढ्यात सामील झाला. जंजिरा हाती येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या असतानाच मुघलांच्या संभाव्य आक्रमणाची चाहूल शंभुराजेंना लागली त्यामुळे राजे माघारी रायगडाकडे वळले.‌ मुघल एकाचवेळी जमिनीवरून व समुद्रमार्गे स्वराज्यावर हल्ला करणार होते. मुघल स्वराज्यावर चालून आले आरमार सुरतेत अडकून पडावे म्हणून संभाजीराजे व अकबर यांचे ३० हजाराचे संयुक्त सैन्य मुघल पातशहावर चालून गेले. शहजादा अकबराचा सल्लागार आणि सहकारी दुर्गादास राठोड यांच्या बरोबर १२ हजार स्वार व २० हजार पायदळ होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२० ऑक्टोबर इ स. १६८२ इंग्रजांच्या पाठिंब्यावर सिद्दी उंदेरीवर राहून मराठ्यांस त्रास देतो तेव्हा उंदेरी काबीज करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवून त्यासाठी अरब आरमाराशी संगनमत केले. उदेरी बेट काबीज केले व तेथे कोट बांधण्यास सुरुवात केली व स्वतः जंजिऱ्यास जाऊन वेढा दिला. त्याचवेळी धान्यासाठी गेलेल्या इंग्रजांच्या तीन होड्या पकडल्या. मुंबईकरांनी संभाजी महाराजांचा वकील सुंदरजी बाजी याची अजिजी करून त्यांस इ.स. १६८२ च्या सुरुवातीस सोडवून नेल्या. १९ जानेवारी १६८२ च्या पत्राने मुंबईकर इंग्रजांनी सुरत इंग्रजांस कळविले की जर सिद्दीने मराठ्यांस त्रास देण्याचे थांबविले नाही तर इंग्रजांशी संभाजी महाराज कोणत्याही क्षणी लढाई करतील व इंग्रजांस त्यांचा हल्ला परतविणे जड जाईल. "तेव्हा सुरतकर इंग्रजांनी कळविले की संभाजी महाराजांशी गोडी गुलाबीने वागा, मैत्रीने राहा, सिदीला दुखवू नका. सुरतकरांनी औरंगजेबाच्या भीतीने सिदीबाबत भंद्ध राहण्याचे ठरविले होते. संभाजी महाराजांनी इंग्रजाकडे जाणारा अन्नधान्य पुरवठा बंद केला आणि पोर्तुगिजांनी कोणाही इंग्रजांना धान्य देऊ नये म्हणून जाहीरनामा काढला. तेव्हा मुंबईकरानी सुरतकराकडे आरमाराची मदत मागितली. सुरतकरांनी १६ ऑक्टोबर १६८२ ला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. तेव्हा संभाजी महाराजांशी मिळते घेण्यासाठी इंग्रजांनी २० ऑक्टोबर १६८२ ला प्रल्हाद निराजीस आणण्यासाठी "बलून” जहाज पाठविले. प्रल्हाद निराजींनी मुंबईकरांशी बोलणी करताना सिद्दीच्या बंदोबस्तासंबंधी इंग्रज काय उपाययोजना करतात याबद्दल विचारले. त्याचा खुलासा निःसंगधिपणे न करता त्याबाबत ते सुरतकरांच्या सांगण्यावरून टोलवाटोलवीची उत्तरे द्यायला लागले. यावरून मराठ्यांना कळून चुकले की, इंग्रज सिदीला सुरतेस घालवू शकत नाही. म्हणून संभाजी महाराजांनी जाहीरनामा काढला की आपल्या मुलखातून इंग्रजांस अन्नधान्य नेण्यास देऊ नये. इंग्रजानी मराठ्यांच्या वकिलास २ महिने रखडून ठेविले. २० डिसेंबरला मराठ्यांच्या वकिलास इंग्रजांनी निरोप दिला. संभाजी महाराजांनाही रायगडावर भेटीस आलेल्या स्मिथ नावाच्या वकिलासही गोड बोलून काहीही न देता परत पाठविले. इ. स. १६८३ च्या फेब्रुवारीपूर्वी संभाजी महाराजांच्या आरमाराची व इंग्रज जहाज "प्रेसिडेंट" यामध्ये महागिरीची लढाई झाली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२० ऑक्टोबर इ.स.१६९३ शहाजादा मुअज्जनचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर, १६९२ त पन्हाळगडाविरुद्ध लढण्यासाठी रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला. पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर १६९३ मध्ये रामचंद्रपंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. २० ऑक्टोबर १६९३ पासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठयांनी किल्यात रसद आणि कुमक पोहचविली. याच वर्षी बारामतीचे, मोगलांतर्फ असलेला ठाणेदार हणमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इ. स. १७०४ मध्ये यांचा मृत्यू होईपर्यंत यांनी मोगलांस सलो की पळो करून सोडले. इ. स. १६९४ त पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने ७ मार्च १६९४ रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी ६ हजार सैन्याची कुमक पाठविली. पण ती पोहचण्यापूर्वी शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून ८ मार्च १६९४ रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर बादशहाने शहाजादा आज्जमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढयासाठी पाठविले. तरीही मोगलास पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेब ने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यांस ३१ ऑक्टोबर १६९९ धमकी वजापत्र लिहिले, ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक यांनी भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी यांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला. ता. २१ जानेवारी १७०१ रोजी धनाजींची व समस्त मोगल फौजेची पन्हाळ्याच्या जवळ मोठी लढाई झाली. तशाच आणखी लढाया वारंवार चालूच होत्या. शेवटी २८ मे १७०१ रोजी औरंगजेब ने तर्बीयत खानातर्फ किल्लेदारास द्रव ५५ हजार रुपये देऊन किल्ला आपलासा केला. पन्हाळगड पुढे सन १७०५ साली मराठयांकडे आला. त्यानंतर महाराणी ताराबाई व दुसरे शिवाजी महाराज यांचे वास्तव्य तिथे झाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२० ऑक्टोबर इ.स.१६९३ इ. स. १६९३ च्या ऑक्टोबर महिन्यात मातबरखानाने आपले लक्ष माहुली गडापासून बारा कोसांवरील सिद्धगड जिंकून केंद्रित केले. मराठे सैनिकांनी सिद्धगडावर आपले बस्तान बसविले होते आणि त्याच्या आश्रयाने माहुलीवर हल्ला करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांपासून मोगल सैनिक सिद्धगड हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होते. २० ऑक्टोबर १६९३ रोजी मोगल लष्करातील लोमाणजी मावळा याने आणि इतर सैनिकांनी संधी साधली. रात्रीच्या सरत्या प्रहारात त्यांनी सिद्धगडाच्या तटाच्या भिंतीवर दोर फेकले आणि ते किल्ल्याच्या भिंती चढून गेले. तेव्हा गडावर तुंबळ युद्ध झाले. त्या चकमकीत सिद्धगडाचा किल्लेदार जखमी झाले आणि मोगलांच्या हाती लागले. सिद्धगड जिंकून घेण्यास मोगल सैनिक यशस्वी झाले. मोगलांनी सिद्धगड जिंकून घेतला हे कळल्याबरोबर प्रचंड सैन्य सांगाती घेऊन खंडोजी कदम आणि दामू नारायण हे मराठी सेनानी राजमाचीहून निघाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२० ऑक्टोबर इ.स.१७५५ सावनूर स्वारी (२० ऑक्टोबर १७५५ ते १९ जुलै १७५६) मुजफरजंगाची चिथावणी सावनुरकर नवाबास मिळाल्यावर त्याने मुरारराव घोरपडे यास आपल्या पक्षात ओढले. कर्नाटकातून पेशव्यांची सत्ता उखडून टाकणे हा यांचा डाव पेशव्यास कळताच स्वता पेशवे सदाशिवराव भाऊसह २० ऑक्टोबर १७५५ सावनूरवर जाण्यास निघाले. वानबडी बेतगीवरून मराठी सैन्य जानेवारी १७५६ त बागलकोटास आले. बागलकोटचा किल्ला घेतल्यावर पेशवे तारीख १२ जानेवारी १७५६ ला होस्केरीस आले. पेशवे आपल्याच दिशेने चालून येत आहेत हे सावनूर नवाबास ठावूक असल्यामुळे त्यानेही पेशव्यांशी झुंज देण्याची जय्यत तयारी केली. पेशव्यानी मुजफरजंगाचा तोफखाना आपल्या विरुद्ध बाजूस आहे ह्याची जाणीव ठेवून आपल्याकडेही फ्रेंचांच्या मदतीने तोफखाना उभारला व तोफखान्याची मुखत्यारी पानसे यास दिली. उत्तरेकडून आपले सैन्य बोलाविले. निजामास मदतीस येण्यास पत्र पाठविले. सावनूरच्या नबाबाचा निजामासहि राग होताच. सावनूरकर नवाव दक्षिण सुभेदाराथा मांडलीक न समजता आपण दिल्लीच्या बादशहाचे मांडलीक आहोत, असे सांगून त्याने निजामास खंडणी देण्याचे नाकारले म्हणून निजामाने आपले सैन्य पेशव्यांच्या मदतीस पाठविले (फेब्रुवारी १७५६). पेशव्यांनी जय्यत तयारीनिशी सावनूरवर हल्ला चढविला. सावनूर किल्ला जिंकण्याचे उदिष्ट ठेवून किल्ल्यास वेढा दिला. शत्रू मोठया हिंमतीचा, त्याचा पराभव होण्यास वेळ लागेल हे ओळखून पेशव्यांनी होळकर व विठ्ठलराव विंचुरकर यांना किल्ला जिंकून घेण्याचे काम दिले. विंचूरकर, होळकर या सर्वानी किल्ल्यावर जोराचा हल्ला केला. इतक्यात बुसी निजामाच्या सैन्यासह येऊन पेशव्यांस मिळाला. त्यावेळी बुसीच्या तोफखान्याने सावनूर किल्ल्यावर आग ओकावयास सुरवात केली. सावनूरकर नबाब हैराण होऊन त्याने सलुखाची बोलणी लावली. तारीख २० एप्रिल १७५६ रोजी सावनूरकरांचा पेशव्यांशी तह झाला. तहात ठरलेली ११ लाख रुपयाची खंडणी पेशव्यास मिळाली शिवाय सव्वा आठ लक्षाचा मुलूख सावनूरकरांकडून पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे मराठी राज्याची हद्द कृष्णेवरून तुंगभद्रेस पोंचली. सर्व सरदारांस शाबासकी देऊन पेशव्यांनी सावनूर सोडून कंचनी या गांवी २ मे १७५६ रोजी मुक्काम केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
46 likes
70 shares
Amar kokate Patil
947 views 16 hours ago
#🙏शिवदिनविशेष📜 २० ऑक्टोबर इ.स.१६८२ जंजिरा हाती येण्याची शक्यता निर्माण झाली तेवढ्यात मुघलांच्या संभाव्य आक्रमणाची चाहूल छत्रपती संभाजीराजेंना लागली त्यामुळे संभाजीराजे माघारी रायगडाकडे वळले.‌
36 likes
27 shares