📜इतिहास शिवरायांचा
156K Posts • 1134M views
‘राजाराम चरितम्’ या संस्कृत ग्रंथाचा रचेता केशव पुरोहित संभाजी महाराजांना सकलशात्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्रकोविंद म्हणतो, या काळाचा ब्राह्मणपंडित काशीचा गागाभट्ट आपल्या “समयनय" या संस्कृत या ग्रंथात संभाजी महाराजांचे वर्णन करताना संस्कृत भाषाही फिकी पडते हे नम्रपणे नमूद करतो व हा समयनय ग्रंथ संभाजीराजांना सविनय सादर करून तो संभाजीराजांच्या आनंदासाठी लिहिला असे म्हणतो... संभाजीराजांची शास्त्रपारंगतता त्याकाळी जनमानसात देखील ज्ञात होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहाजी पंतविरूध्दचे निवाड्याचे प्रकरण. हे प्रकरण राजांनी न्यायाधीश प्रल्हाद निराजी याच्याकडे सोपवले होते. यावर याचिकाकर्ता संभाजी राजांना लिहितो, 'साहेब सर्वज्ञ शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऐसा करिताती' ऐसे असून आमचे पारिपत्य होत नाही...।। अर्थात हा निर्णय नायाधीशाकडे देण्यापेक्षा साहेब (संभाजीराजे) तुम्ही शास्त्रार्थात अधिक जाणते आहात तेव्हा तो तुम्हीच द्या. असा तो आग्रह करतो. सारांश पाहता पराक्रमाला ज्ञानाची जोड देणारे संभाजीराजांचे शास्त्रपारंगत, ज्ञानकोविंद व्यक्तिमत्व ठळकपणे उठून येते यात शंका राहत नाही...! छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा...🚩 १६ जानेवारी आयोजक : छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक सोहळा ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
16 likes
20 shares
Dr Amol Melage
1K views
#🙏शिवदिनविशेष📜 🚩🚩🚩*शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६७०* *(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार शनिवार)* *मराठ्यांनी किल्ले सुलतानगड सर केला.* *औरांगजेबाच्या धर्माधतेच्या रोज वेगवेगळ्या कहाण्या छत्रपती शिवरायांच्या कानावर येत होत्या. संपूर्ण हिंदुस्तान औरांगजेबाच्या धर्मांधतेच्या विखारी मांडवाखाळून जात असता, मराठी मनगटे शिवशिवली नसती तर नवल होते. महाराजांनी याच सुमारास मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीमच उघडली... याच वेळेस मराठ्यांच्या २० हजार सैन्याने बागलाणात येऊन, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. औरंगजेबास हे चोख प्रत्युत्तर होते. याच वेळी मराठ्यांनी सुलतान गडाला वेढा घालून किल्लेदार फतहुल्लाखान याला ठार मारले आणि गड जिंकून घेतला. मराठी मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबास आला!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६५७* *बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१७८८* *वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह! "वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये ९१ कलमी मैत्रीचा करार होऊन वाडीकर सावंतांने पोर्तुगिजांचे मांडलिकत्व पत्करले."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
42 likes
55 shares