#🎭Whatsapp status मराठा समाजाचा आरक्षण विषय निघाला की लगेच काही लोकांच मूळव्याध दुखायला लागत.....
गावगाड्यात आम्ही सर्वसामान्य गुण्यागोविंदाने नांदत आहोत किती दिवस मोठा भाऊ म्हणुन आम्ही बहुजनांच्या अन्यायाविरोधात लढत राहायच....आमची लेकरं उपाशीतापाशी राहून आपल्या फाटक्या कुटुंबाच्या व्यथा वेदना सहन करून,आर्थिक अडचणीचा सामना करून शिक्षण घेतात.....आत्ता परिस्थिती अशी आहे सर्वसामान्य मराठा समाजाची उदरनिर्वाह करण्यासाठी उपजीविकेची साधन शोधावी लागतात....पण कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाहीत.... उद्देश एकच कुटुंब सुरक्षित सुशिक्षित राहाव....पण शैक्षणिक खर्च येवढा वाढलाय की लेकरांना शिक्षण द्यायच कस.....तरुण पिढी नोकरी मिळत नाही म्हणुन हताश आहे.....मराठा समाजातील लेकरांना आर्ट्स, कॉमर्स,सायन्स म्हणजेच अकरावी,बारावी,ग्रॅज्युएशन मग शिकून सवरून लेकरं मोठी होणार आणि सुशिक्षित बेरोजगार म्हणुन गावभर हिंडणार.....त्यातून लायकी नसलेले राजकारणी लेकरांची माथी भडकावणे,राजकिय फायद्यासाठी त्यांचा उपयोग करणार.....आणि उपयोग झाला की बाजूला फेकून देणार......आजही मराठा समाजाला हक्काच आरक्षण लागू होत नाही....आणि त्यातून झेंडा उचलणाऱ्या लोकांची संख्या वाढणार.....आमच आयुष्य गेल नेत्यांची लाचारी करण्यात....आमची भावी पिढी ही अशीच घडवणार का? आमच्या लेकरांना आरक्षणाची त्यातून शिक्षण,आरोग्य, नोकरी यांची उपलब्धता नाहीच....मग आम्ही काय करणार....आमचे पूर्वज श्रीमंत होते आम्ही सर्वसामान्य मराठे श्रीमंत नाही...आम्ही काय जन्माला यायच.....आणि कुटुंबाच्या कर्तव्यात असच मारायच....
🚩🚩🚩