फॉलो करा
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
6,499
पोस्ट
6,015
फॉलोअर्स
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
223 जणांनी पाहिले
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ 🌻 *VDN AGRO TECH* 🌻 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *विनोद धोंगडे मो.नं.9923132233* *मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)* ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ *🙏🏻नमस्कार🙏🏻* *रब्बी कांदा उत्पादन वाढीची सूत्रे* राज्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते. या हंगामाचे उत्पादन तसेच कांद्याची साठवण क्षमता उत्कृष्ट असते. या कांद्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी "एन-2-4-1' ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी (350-450 क्विं/हे.) तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी (6-8 महिने) चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावाने ओळखतात. शेतकरी स्वतःच या जातीचे बीजोत्पादन करतात. *व्यवस्थापनाची सूत्रे* 1) नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दर्जेदार रोपांची लागवड करावी. लागवड 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. 2) लागवड करताना उत्तम निचऱ्याची, मध्यम खोल जमिनीची निवड करावी. विशेषतः सपाट वाफ्यात रोपांची कोरड्यात 15x10 सें.मी. अंतरावर दाट लागवड करावी. त्यानंतर हळवेपणाने पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणी करताना न चुकता नांगे भरावेत. 3) लागवडीनंतर एक आठवड्यानंतर शिफारशीत तणनाशक फवारून गरजेनुसार एक महिन्यानंतर हात खुरपणी करून नत्रखताचा वर हप्ता द्यावा. 4) लागवडीनंतर 10, 25, 40 व 55 दिवसांनी नियमितपणे कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या द्याव्यात. 5) लागवडीनंतर 55 दिवसांपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावे. लागवडीनंतर 90 दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे. 6) लागवडीनंतर 110 दिवसांनंतर या जातीची पात नैसर्गिकपणे पडावयास सुरवात होते. कांद्याच्या माना 50 टक्के नैसर्गिकरीत्या पडल्यानंतर कांद्याची काढणी करावी. कांद्याची पात न कापता, पातीसकट कांदा वाफ्यात अशा रीतीने पसरवून ठेवावा की एका कांद्याचा गोट दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल. कांद्याची पात शेतामध्ये 3 ते 5 दिवसांकरिता वाळवावी. त्यानंतर वाळलेली कांद्याची पात गोटापासून एक इंच अंतराची मान ठेवून पिळा देऊन कापावी. त्यानंतर कांदा हा झाडाच्या अथवा छपराच्या सावलीत तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी पातळ थरात (1-2 फूट) वाळवावा. या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेरून पत्ती सुटते, आकर्षक रंग येतो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून, सडलेले व मोड आलेले कांदे निवडून फेकून द्यावेत. 7) साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. 8) साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्‍यक आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा 6 ते 8 महिने उत्तम टिकतो. बीजोत्पादन करताना ... 1) 15 नोव्हेंबरपर्यंत अजिबात मोड न आलेल्या कांद्याचे गोट निवडून, लाल कांद्याच्या बीजोत्पादन क्षेत्रापासून सुरक्षित विलगीकरण अंतरावर (साधारण 1.5 कि. मी. दूर) घ्यावे. जेणेकरून कांद्याची जैविक शुद्धता कायम राखली जाईल. 2) साधारण दर तीन वर्षांनंतर कांद्याची उत्पादकता, विकृतीची प्रतिकार क्षमता तसेच साठवणूक क्षमतेने घट झाल्यास कृषी विद्यापीठातून एन-2-4-1 या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे. अ) कांदा उत्पादनातील समस्या कमी उत्पादकता - 1) रोपांची लागवड ओल्यात व दीर्घ अंतरावर केली जाते. रोपांची लागवड उशिरा (15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत) होते. लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांदरम्यान ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. 2) कांदा पोसण्याच्या काळात (लागवडीनंतर 60 ते 90 दिवस) नियमितपणे 8-10 दिवसांदरम्यान पाणी दिले जात नाही. पाण्याचा ताण बसल्यानंतर एकदम भरपूर पाणी दिले जाते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान शीत लहरीमुळे मोठ्या प्रमाणावर डेंगळे येतात. अल्प दर्जाचे उत्पादन व साठवणूक क्षमता 1) निचरा न होणाऱ्या भारी जमिनीत लागवड, असंतुलित रासायनिक खतांचा वापर, भरखते देताना नत्रखतांचा अतिप्रमाणात वापर, लागवडीनंतर 60 दिवसांच्या नंतर कांदा पोसण्याच्या कालावधीत नत्र खतांचा वापर, कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी न तोडणे, कांदा काढणीनंतर लगेच कांद्याची पात कापून ढीग लावून कांदे वाळविणे. 2) सावलीत तीन आठवडे कांदे न वाळविता, प्रतवारी न करता, उष्ण व दमट कांदे साठवणगृहात भरणे, कांदा साठवणगृह कांदे भरण्याआधी व भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी न करणे, साठवणगृहाची रुंदी 4 फुटांपेक्षा तर उंची 5 फुटांपेक्षा जास्त ठेवणे. साठवणगृहाच्या छपरांची उंची साठवलेल्या कांद्यापेक्षा तीन फुटांपेक्षा कमी अंतरावर असणे, साठवणगृह उंच जागेवर नसणे व त्याचा पाया सिमेंटच्या अथवा कडक जमिनीवर नसणे, साठवण गृहाच्या कप्प्याची उंची जमिनीपासून दोन फूट नसल्यामुळे, तळाला हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसणे. कांदा शेतीमधील आव्हाने कांदा हे वातावरणास संवेदनशील पीक असल्याने, हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. 1. वाढीव तापमान, पाणीटंचाई, गारपीट व वादळी पाऊस यांच्यापासून बचाव करून जास्त उत्पादन घेण्यासाठी, रब्बी हंगामात कांद्याची लागवड तसेच बीजोत्पादनासाठी गोट लागवड 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीतच पूर्ण करावी. 2. हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी लवकर तयार होणारी, कमी कालावधीची रब्बी कांद्याची जात (90-100 दिवस) तयार करावी लागणार आहे. 3. राज्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. पूर्व हंगामी उसाच्या पट्टा पद्धतीत पांढऱ्या कांद्याचे रांगडा हंगामात उत्पादन झाल्यास, कांद्याचे निर्जलीकरणाचे प्रक्रिया केंद्रे विकसित करणे शक्‍य आहे. त्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला "फुले सफेद' ही जात योग्य आहे. मात्र रब्बी हंगामातील उसाचे व कांद्याचे योग्य पीक नियोजन करणे अत्यावश्‍यक आहे. 4. सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक किंपर सूक्ष्म तुषार) वापर करावा. सुधारित कांदा चाळीचा वापर करावा. कांद्याचे बाजारभाव वर्षभर नियंत्रित ठेवण्यासाठी 1) प्रत्येक हंगामात रोपांच्या पुनर्लागवडीनंतर लागवडीची नोंद एका महिन्यात कृषी विभागातर्फे इंटरनेटवर झाल्यास राज्यातील तालुकानिहाय कांदा लागवडीची स्थिती लक्षात येईल, त्यानुसार बाजारपेठेचे नियोजन शक्‍य आहे. 1) प्रामुख्याने रब्बी हंगामातील कांद्याच्या साठवणुकीची नोंद करणे शेतकऱ्यांना सक्तीची करावी. 2) कांदा शेतकऱ्यांचे गट स्थापून त्यांना देशातील बाजार भावाची माहिती देण्याचे प्रशिक्षण द्यावे. 3) कांदा निर्यातीसाठी दीर्घकाळ धोरण आखावे. मुख्यतः जानेवारी ते मे महिन्यापर्यंत निर्यात चालू ठेवल्यास कांदा उत्पादकास योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल. भारतातील कांद्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे 1) भारतात वापरल्या जाणाऱ्या जाती कमी दिवसांत तयार होणाऱ्या आहेत (90 ते 120 दिवस), तर युरोप अमेरिकन देशांत जास्त दिवस असणाऱ्या (160 - 180 दिवस) जाती आहेत. 2) भारतात प्रामुख्याने रब्बी हंगामातील कांदा लागवडीची उत्पादकता अधिक आहे. त्याचप्रमाणे साठवणक्षमतासुद्धा उत्कृष्ट असते; परंतु खरीप हंगामात ढगाळ वातावरण, उष्ण व दमट हवामान अनियमित पाऊस, तण व रोग-किडींचा प्रादुर्भाव यामुळे खरीप कांद्याची उत्पादकता लक्षणीयपणे घटते. रांगडा हंगामात वातावरण कांदा वाढीसाठी प्रतिकूल असल्यामुळे कांद्यापेक्षा कांद्याची पात जोमाने वाढते. त्यामुळे 20 ते 30 दिवसांचा कालावधी वाढल्यामुळे मोठ्या आकाराचे जाड मानेचे कांदे, जोड कांदे, डेंगळे, काढणीनंतर 15 दिवसांत कांद्यांना मोड येणे इत्यादीमुळे उत्पादनाचा दर्जा मोठ्या प्रमाणावर खालावतो. 3) हंगामनिहाय शिफारस केलेल्या सुधारित जातींचा अत्यल्प वापर (उदा. खरीप ः फुले समर्थ/ बसवंत 780, रांगडा, फुले समर्थ आणि रब्बी एन-2-4-1). 4) अनियमित बीजोत्पादन - हंगामनिहाय जरी वेगवेगळ्या जाती विकसित केलेल्या आहेत तरी या सर्वांकरिता बीजोत्पादन फक्त रब्बी हंगामातच घ्यावे लागते आणि फुलांचे परागीकरण हे केवळ मधमाश्‍यांमार्फत होत असल्या कारणाने जर 1.5 किलोमीटर लांबीचे "विलगीकरण अंतर' उपलब्ध न झाल्याने स्थानिक बीजोत्पादनामध्ये जैविक शुद्धता मोठ्या प्रमाणावर घटते. 5) कांदा पिकात काढणीपूर्व व काढणीनंतरच्या सुधारित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून अत्यल्प वापर त्यामुळे उत्पादन व साठवणुकीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 6) अनियमित बाजारभाव, अनियंत्रित लागवड व साठवण, अनियमित कांदा निर्यात धोरण. 7) बदलत्या हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. लागवड क्षेत्र 1) कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर. 2) देशाचे 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात. नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर. महाराष्ट्रातील 37 टक्के, तर देशातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात. 3) कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रतिहेक्‍टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. 4) भारतात खरीप हंगामातील उत्पादकता प्रतिहेक्‍टरी 8 टन आहे, तर रब्बी हंगामाची उत्पादकता प्रतिहेक्‍टर 16 टन आहे. इतर प्रगत देशांत उदा. अमेरिका (42.9 टन), नेदरलॅंड (39.1 टन), चीन (22.2 टन) मध्ये कांद्याची उत्पादकता आपल्यापेक्षा अधिक आहे. *धन्यवाद....🙏🏻* *शेतकरी हितार्थ* *शेअर करा....* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *शेती व शेतीपुरक विषयक माहितीसाठी 9923132233 या नंबरवर Add लिहा किंवा टेलीग्राम लिंक चा वापर करा* https://t.me/joinchat/HPLYNxc6T9zsH8rPA48oeQ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
230 जणांनी पाहिले
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी 🧅_* *_रांगड्या कांद्याचे उभे पीक -_* _नत्राचा पहिला हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी._ *_🧅पीक संरक्षण_* _◆काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)_ _बेनोमिल २ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २ ग्रॅम_ _◆जांभळा व तपकिरी करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)_ _ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्‍साकोनॅझोल १ मिलि_ _◆फुलकीड नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)_ _कार्बोसल्फान २ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि_
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
317 जणांनी पाहिले
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ बिजोत्पादन तंत्रज्ञान🌾_* _संकलन : प्रविण सरवदे, कराड_ *_🍅🍇🦜🐓🐟🐄🌾🥦🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* _कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रति हेक्‍टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. भारतात कांद्याच्या जवळजवळ ३३ जाती विकसित झाल्या आहेत. परंतु ३-५ जाती प्रामुख्याने लागवडीसाठी वापरल्या जातात. एकूण क्षेत्राचा विचार केला तर शिफारस केलेल्या सुधारित जातींखाली फक्त ३० टक्के क्षेत्र येते. बाकी क्षेत्रावर शेतक-यांनी स्वत: तयार केलेल्या बियाणांची लागवड केली जाते. स्वत:चे बी तयार करीत असताना बीजोत्पादनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या वाणामध्ये नकळत निकृष्टपणा येत असतो. शिफारस केलेल्या सुधारित जातीचे बी वाजवी दरात आणि वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च बी तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर शेतक-याकडे असणारे बी वापरतो._ _कांदा पिकाचे बियाणे अल्पायुषी असते व त्याची उगवण क्षमता ही एक वर्षापुरतीच टिकून राहते त्यामुळे कांदा बियाणाचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते. कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करावीत. नंतर दुस-या वर्षी या मातृकंदापासून बियाणे उत्पादन कार्यक्रम घ्यावा._ *_👉कांद्याच्या बिजोत्पादानाची पद्धत :_* *_१) कंदापासून बियाण्याची पद्धत :_* _या पद्धतीमध्ये कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्या रीतीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात. यामुळे कंदाची योग्य निवड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्नदेखील जास्त प्रमाणत येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळ देखील जास्त लागतो. तथापि, बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे._ *_२) एकवर्षीय पद्धत :_* _या पद्धतीमध्ये मे-जून महिन्यात पेरणी करून रोप लावणी जुलै-ऑगस्टमध्ये करतात. नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात. कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदांची १०-१५ दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एक वर्षात बियाणे तयार झाल्याने यास एकवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीने खरीप कांद्याच्या प्रजातींचे बिजोत्पादन घेतात._ *_३) द्वीवर्षीय पद्धत :_* _या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे. मेपर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडून चांगल्या कंदांची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड वर्ष वेळ लागतो. म्हणून यास द्वीवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीत रब्बी कांद्याच्या वाणांचे बिजोत्पादन करतात._ *_👉जातींची निवड :_* _महाराष्ट्रात बिजोत्पादानासाठी नाशिक लाल, नाशिक-२४१ (गावरान), पूना फुरसुंगी, फुले समर्थ, प्रशांत, पंचगंगा, गाजनन, ईस्ट वेस्ट, इ. जातींची निवड करतात. पुणे-फुरसुंगी जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेता बीजोत्पादनातून फायदा मिळतो. पुणे-फुरसुंगी जातीमध्ये कांदे काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता असल्याने त्या जातीची निवड करतात. या कांद्याला दर चांगला मिळत असल्यामुळे बियाण्याचीही किंमतही अधिक असते. रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी नाशिक-२४१ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावानेही ओळखतात. कृषी विद्यापीठातून या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे._ *_👉उत्पादन :_* _कांद्याचे बियाण्यासाठी एकरी ३-५ क्‍विंटल इतके उत्पादन निघते. साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्‍यक आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा ६ ते ८ महिने उत्तम टिकतो. जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण : कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते._ *_👉विलगीकरण अंतर :_* _●पायाभूत बियाणे- १००० मीटर_ _●प्रमाणित बियाणे- ५०० मीटर_ _शासनाच्या अधिकृत यादीमध्ये हे पीक नसल्याने या पिकाला कोणताही हमीभाव ठरवून दिलेला नाही. त्यामुळे उत्पादनाच्या आणि मागणीच्या प्रमाणावर या बियाण्याचे दर निश्‍चित होत असतात. निराशेच्या गर्तेतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीचे बेगड झुगारून कांदा बीजोत्पादनासाररख्या व्यावसायिक व फायदेशीर पीक पद्धतीची कास धरली तर आजच्या परिस्थितीत बदल होईल. शेतक-यांनी एकत्रित येऊन एका शिवारात किंवा गावात ठराव करून एकाच सुधारित जातीचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवून लागणारे बी तयार केले तर बाजारपेठ शोधणे सोपे होईल._ *_┅━•●◑◑▣◆★✹❂✺✧✺❂✹★◆▣◑◑●•━┅_*
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
250 जणांनी पाहिले
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी आणि शेतकरी टिकायाचा असेल तर खालील बाबीवर काम झालेच पाहिजेअन्यथा हे टिकणेअवघड आहेत . शंभर शेतकऱ्या पैकी एक दोनच शेतकरी नफ्यात आसतात म्हणजे शेतीत यशस्वी होतात सर्व शेतकरी नफ्यात यावी म्हणून काळजी घ्यावी लागेल. शेतीच्या यशस्वीतेचा टक्का खूपच कमी होण्याची काही कारणे आहेत * अति प्रमाणात पाऊसमान * कमी प्रमाणात पावसाळा . * कीड रोगांचा प्रादुर्भाव व त्यासाठीच लागणारे ज्ञान आणि कौशल्य आणि पैसा कमी असणे. * अभ्यासपूर्वक कष्ट करणारे चे प्रमाण कमी आहे * कधी पिक भरपूर येतं पण दर कोसळतात तर कधी दोन्ही जमतं अन व्यापारी गंडा घालून पसार होतात. यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल? 1) जमीन धारणा कमी असणे. लहान लहान तुकडे असणे. यावर उपाय योजना करावी लागेल अन्यथा अवघड होईल सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की त् भविष्यात समूह शेतीशिवाय शेतकर्यांना पर्यायच नाही.समूह शेतीमुळे शेतीवरील खर्च जवळपास निम्म्याने कमी होतो अन उत्पन्नही वाढतं. त्यामुळे आधी या पर्यायाचा विचार झाला पाहिजे. 2) जूनी सिंचन पद्धतीचा अवलंब कमी करुन ठिबक सिंचनाने चांगलं पिक येतं. पण पैशाअभावी शेतकरी इकडे वळत नाहीत. अनुदानित ठिबक सिंचन प्रत्येकाला मिळत नाही त्यामुळे सरकारनेच ठिबक सिंचनसाठी अनुदान दिलं पाहिजे. जेणेकरून बहुतांश शेतकरी याकडे वळतील. कोट्यावधी लिटर पाण्याची नासाडीही थांबेल. 3)सरकारने प्रत्येक पिकाला हमीभाव बांधून दिलाय. पण त्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. त्यावर सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत. उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव हा शेतकर्याचा हक्क आहे अन तो त्याला मिळालाच पाहिजे. *4)अल्पभुधारक शेतकर्यांनी आपण पिकवलेला भाजीपाला/फळे आणि अन्नधान्य शक्यतो स्वत: ग्राहकाला विकला पाहिजे. तो मार्केटमधे लिलावाला गेला की खूप कमी पैसे मिळतात. *5)थोडी अधिक शेती असणार्या शेतकर्यांनी इतर पिकं घेत असतानाच एखादा मुरमाड निचर्याच्या जमीनीचा तुकडा असेल तर त्या ठिकाणी सागवान, चंदन, बांबू अशी बहुवार्षिक अन पैसा देणारी झाडं लावावीत. 15 वर्षांनी याचे चांगले पैसे होतील. म्हणजे आपले पेन्शन मिळत राहील. *6)रासायनिक खतांचा योग्य वापर करून तो निम्मा केल्यास खर्च निम्मा कमी करुन जैविक अन सेंद्रीय खतांचाही वापर झाला पाहिजे. जसे काडी कचरा न जळता खत तयार करावे. 7) आपण पिकविलेल्या कृषी मालाचे ग्रेडिंग पॅकिंग करून लेबल लावून विक्री करावी लागेल तसेच आपल्याला त्यांचे प्रक्रिया करून value addition करावी लागेल. *8) फक्त एक च पिक करू नये सर्व प्रकारची पिके घ्यावीत जसे फळे आणि अन्नधान्य भाजीपाला कापूस तूर हरभरा गहू बाजरी ज्वारी अशी व्यवस्था असावी. 9) कृषिवर आधारित जोडधंदा करणे आवश्यक आहे जसे दूध उत्पादन प्रक्रिया व्यवस्था. कोंबडी पालन करणे. शेळी मेंढी पालन करणे. 10) आपल्याला लागणारी खते बियाणे औषधे सेंद्रीय उपलब्ध झाडा झुडपाच्या आधारित घरीच तयार करणे. आणखीही बरेच मुद्दे आहेत, जे मित्र यादीत असलेले कृषी तज्ञ तसेच आदर्श शेती करणारे शेतकरी मित्र माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे मांडू शकतील. त्यांच्याही ज्ञानाचा वापर करून घ्या ही विनंती. जीवराज आमले श्री लाभ ऍग्रो सोळूषण कृषी औजारे ट्रॅक्टर विडर टिलर विक्रेते पाचोरा जळगाव 9423186979.
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
277 जणांनी पाहिले
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓 *🍇भविष्यात शेतीसाठी मोठा धोका-जमीनीची उत्पादकता कमी होणे🍇* *🌽दरवर्षी जमीनीची उत्पादकता सतत कमी होत आहे.व त्यामुळे आपण सतत रासायनिक खतांचा वापर वाढवत आहोत.त्यामुळे आपला रासायनिक खतांचा खर्च वाढत आहे.आता तर रासायनिक खतांच्या किंमती जास्त वाढल्याने आपल्या उत्पादन खर्चात जास्त वाढ झाली आहे.✅😢😢रासायनिक खतांच्या असंतुलीत वापरामुळे व जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने रासायनिक खतांची उपलब्धता फारच कमी होत आहे.त्यामुळे जास्त खर्च करूनही उत्पादन वाढत नाही.याउलट रासायनिक खते पिकांना उपलब्ध न झाल्याने जमिनीत अन् उपलब्ध स्वरुपात पडुन आहेत.त्यामुळे आपली जमिनीची प्रत खराब होत आहे.जमीन कडक होत आहे,जमिनीचा पाण्याचा निचरा कमी होत आहे.जमिनीचा सा मु वाढत आहे.शेतीचा उत्पादन खर्च वाढुन उत्पादन कमी होत आहे,"उत्पन्न"कमी होत आहे.जमिन खराब होत आहे.असा सर्व बाजुंनी शेतकऱ्यांना नुकसान होत आहे.त्यावर उपाय योजना करण्यापेक्षा जास्त उत्पादन घेणेसाठी स्पर्धा लागली आहे.याबाबत शेतकरी जागृत नाही.इतकेच काय शासन,कृषी विद्यापीठे,कृषी शास्त्रज्ञ जागृत नाहीत.जमिनीचा महत्वाचा घटक असलेली जमिनीची माती,त्याची प्रत यावर सर्वांचे दुर्लक्ष आहे.व शेतकरी दिवसेंदिवस जास्त उत्पादन घेणेसाठी या दुष्टचक्रात फसत आहे.बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही.किंबहुना बाहेर पडण्याचा विचारही करत नाही.🌻* *🌾जमिनीत पिके घेतांना कोणतेच पिक, आपण दिलेली रासायनिक खते,सेंद्रिय खते अन्न म्हणुन घेत नाहीत.त्याचे रुपांतर झाले तरच ती खते पिक घेऊ शकते.जसे आपण गहु,ज्यारी, बाजरी, तांदुळ, भाजीपाला पिकवितो,तो आपण सरळ खाऊ शकत नाहीत.ज्यारी बाजरी,गहु दळुन भाकर, पोळी बनवावी लागते.भाता पासुन तांदुळ तयार करुन भात,खिचडी तयार करुन आपण खाऊ शकतो.भाजीपाला पासुन भाजी तयार करुन,आपण जेवन करतो.तसाच प्रकार पिकांचा आहे.जमिनीत आपण दिलेली सर्व प्रकारची खते पिकांना उपलब्ध करुन ध्यावयाचे काम जमिनीत असलेली जिवाणु करतात.ते पिकांचे स्वयंपाकी आहेत.त्यांनी जेवन तयार करुन दिले,तरच पिके खाऊ शकतील.अन्यथा आपण दिलेली खते जमिनीतच पडुन राहुन आपले नुकसान करत राहतात.🌻* *🌾जमीनीत जिवाणुंची उपलब्धता ही जमीनीच्या"सेंद्रिय कर्बावर"अवलंबुन आहे.व नेमका आपला सेंद्रिय कर्ब दरवर्षी कमी होत आहे.जिवाणुंचे खाद्य सेंद्रिय कर्ब आहे.ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त आहे (१%पेक्षा जास्त),त्या जमिनीत जिवाणुंची संख्या जास्त असते.व त्या जमिनीची सुपीकता जास्त.ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी,त्या जमिनीत जिवाणुंची संख्या कमी व त्यामुळे त्या जमिनीची सुपीकता कमी.🌻* *🌾पुर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे जास्त प्रमाणात होते.त्यामुळे शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर होता.सहसा वर्षातुन एकच पिक घेतले जावयाचे.जमिन पडीत ठेवली जावयाची.यामुळे जमीनीचा सेंद्रिय कर्ब जास्त राहावयाचा.जमिनीची उत्पादकता चांगली राहावयाची.आता सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी झाले आहे.वर्षातुन दोन,तीन पिके घेतली जातात.जास्त उत्पादनाची संकरीत पिके घेतली जातात,जमीनीला विश्रांती नाही.यामुळे जमीनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे.व हे उलटे चक्र सतत सुरू आहे.याचे विपरीत परिणाम आपल्याला मिळत आहेत.व हे प्रमाण भविष्यात कमी होण्याऐवजी जास्त होणार आहे.😢😢* *🌾जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढविणयाचा उपाय मी एक वर्षापुर्वी टाकलेल्या पोस्ट मध्ये दिलेला होता.तो सोबत जोडलेल्या लिंक नुसार आहे.* https://m.facebook.com/story.php?story_fbid=750897505875474&id=100028656939266 #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
525 जणांनी पाहिले
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ !! पिकांच्या संतुलित पोषणातील महत्त्वाचे घटक व विद्राव्य खतांचा योग्य वापर !! :- अन्नद्रव्ये पिकांना पुरेशी आहे‏त किंवा नाहीत हे‏ पाह‏ण्यासाठी मातीचे रासायनिक पृथ:करण गरजेचे आहे‏. पानांचे, खोडांचे किंवा मुळांचे पृथ:करण करून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेविषयी माहि‏ती मिळ‎वता येते. या माहि‏तीच्या आधारे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्याने पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जाऊ शकतात. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास संतुलित पीक पोषण करता येते. वनस्पती, पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण केवळ मुळांद्वारे करते. मोठ्या मुळांचा उपयोग झाडाला आधार देण्यासाठी तसेच झाडाने तयार केलेल्या अन्नाचा आणि पाण्याचा साठा करण्यासाठी होतो. जमिनीच्या गुणमधर्मानुसार अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमध्ये बदल होत असतो. प्रामुख्याने अन्नद्रव्यांचे वर्गीकरण मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या दोन विभागांमध्ये केले जाते. अ) मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये :- A) मुख्य अन्नद्रव्ये :- १) कर्ब २) नत्र ३) स्फुरद ४) पालाश ५) कॅल्शिअम ६) मॅग्नेशिअम ७) गंधक B) सूक्ष्म अन्नद्रव्ये :- १) लोह २) मँगनीज ३) जस्त ४) तांबे ५) बोरॉन ६) क्लोरीन ७) मोलाब्द ८) निकेल ब) अन्नद्रव्यांचे संतुलन :- १) पिके निरोगी राह‏ण्यासाठी १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एखादे जरी अन्नद्रव कमी असले तरी पिकांची वाढ निरोगीपणे होऊ शकत नाही. पिकांना सर्व अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होत असेल, पुरेसा सूर्यप्रकाश आणि जमिनीमध्ये योग्य ओलावा असेल तर पिकांची वाढ पूर्णत: होऊन पिके हि‏रवीगार दिसतात. २) पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांमधून (कंपोस्ट, गांडूळ‎ खत, हि‏रवळीचे खत, वेगवेळ्या प्रकारच्या पेंडी, मासळीचे खत इ.) आणि असेंद्रिय/रासायनिक खतांद्वारे केला जातो. रासायनिक खतांमध्ये मोजकेच (एक, दोन, तीन) अन्नद्रव्ये असतात. परंतु त्यांचे प्रमाण जास्त असते. ३) सेंद्रिय खते जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये चांगले परिणाम घडवून आणतात. ४) रासायनिक खते खरेदी करताना खतांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण पिकांच्या अवस्थेमध्ये गरज असलेले अन्नद्रव्ये आणि किंमत यांचा विचार करावा. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खते उपलब्ध असतात. त्यामध्ये १७:१७:१७ किंवा २०:२०:२० किंवा १९:१९:१९ असे अंक असतात. हे‏ अंक अन्नद्रव्यांचे खतामध्ये असलेले शेकडा प्रमाण दर्शवितात, म्ह‏णजे अनुक्रमे १७ टक्के नत्र, १७ टक्के स्फुरद व १७ टक्के पालाश किंवा २० टक्के नत्र, २० टक्के स्फुरद व शून्य टक्के पालाश. त्याचप्रमाणे इतरही बरीच रासायनिक खते बाजारामध्ये उपलब्ध आहे‏त. ५) विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे किंवा तुषार सिंचन किंवा पाण्यासोबत विरघळून दिली जातात. भाजीपाल्यासाठी पूर्वलागवडीच्या वेळेस विद्राव्य खतांच्या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लावली जातात. जस्त व लोह पानाद्वारे शोषली जातात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिल्यास लगेचच फवारणी केल्यास विद्राव्य खते प्रभावीपणे कार्य करतात. रासायनिक खते प्रामुख्याणे दाणेदार आणि द्रवरूप स्वरूपात मिळ‎तात. ६) दाणेदार खते जमिनीमध्ये दिली जातात. खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे‏त, उदा. बांगडी पद्धत, ओळीतून किंवा फेकुनही दिली जातात. खते दिल्याबरोबर ती जमिनीमध्ये मिसळ‎ली गेली पाहि‏जेत, त्यावेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा अन्यथा खतांची उपयोगीता कमी होते. ७) दाणेदार खतामधील काही खते पूर्णत: पाण्यात विद्राव्य असतात, उदा. युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इ. अशी खते ठिबक संचाद्वारे दिली जातात. ८) काही खते अविद्राव्य असतात. अशी खते ठिबक सिंचनाद्वारे देऊ नयेत. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त खते देऊ नयेत. पिकांच्या उत्तम वाढीसाठी विद्राव्य खतांचा योग्य वापर :- पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात. विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत. पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात. भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात. अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. A) प्रमुख विद्राव्य खते :- १) १९:१९:१९ व २०:२०:२० :- वरील ग्रेडच्या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. २) १२:६१:०० :- वरील ग्रेडच्या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढ, फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो. ३) ००:५२:३८ :- वरील ग्रेडच्या खतास मोनो पोेटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापुर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. ४) १३:००:४५ :- वरील ग्रेडच्या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात. ५) ००:००:५०:१८ :- वरील ग्रेडच्या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरुपातील गंधकही असतो. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते. ६) १३:४०:१३ :- पिकांला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फूलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते. ७) कॅल्शियम नायट्रेट :- मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो. ८) २४:२८:०० :- यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो. ​ B) फर्टिगेशनचे फायदे :- १) मजूर, यंत्रसामग्री, इंधन, वीज, पाणी व खतांची बचत होते. २) पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते. ३) विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम व क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते. ४) विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरीत्या होते. ५) पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशकावरील खर्च कमी होतो. ६) पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते. ७) खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात. ८) विद्राव्य खते ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे देता येतात. C) विद्राव्य खतांची फवारणी :- १) पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी करता येतो. साधारणत: पानांत असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पानांतील अन्नद्रव्याची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीकवाढीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे गरजेचे आहे. २) शिफारशीत मात्रेत फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पन्नातही वाढ होते. ३) विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असून त्यांची वाहतूक, साठवणूक आणि वापर सोयीचा आहे. D) फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा उद्देश :- १) पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते. २) अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणी मधून खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात. ३) जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात. ४) किडी-रोगांमुळे पाने कुरतडली, खाल्ली जातात. पानांची जाळी होते. अशा वेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात. ५) फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढतात. ६) फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यसाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागातात अशावेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. E) फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी :- १) पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे. २) कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियमयुक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके, खते वापरण्याचे टाळावे. ३) बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये. ४) फवारणी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत करावी. F) फळबागेमध्ये विद्राव्य खते वापरण्याचे फायदे :- १) तीन ते चार वर्षे वयाच्या झाडांना वर्षभरात दोन वेळा (डिसेंबर-जानेवारी किंवा मे-जून) त्यांच्या वयानुसार (१० ते ४० किलो) तर त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना वर्षात एकदा बहारानुसार ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति झाड द्यावे. तसेच एक किलो निंबोळी पेंड प्रति झाड दरवर्षी फळ बागेस देण्यात यावी. २) ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी गरजेपुरतेच पाणी दिले जाईल अशी व्यवस्था करावी, अति पाण्याचा वापर टाळावा. ३) खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे फळ पिकाचे अधिक उत्पादन आणि गुणवत्ताही वाढते. ४) ब­ऱ्याच वेळा अन्नद्रव्यांची फळपिकांसाठी उपलब्धता ही जमिनीचे तापमान, ओलावा, हवामानातील बदल, सामू, चुनखडीचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते. 🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
463 जणांनी पाहिले
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा*. 1. दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०) 2. स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट 3. डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट 4. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा. 5. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया). 6. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात. 7. साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा. *रासायनिक खते कशी द्यावीत::-* 1. साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत. 2. नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत. 3. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत. 4. नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत. 5. पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
510 जणांनी पाहिले
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी बागेची लागवड व निगा* भाज्यांचे ३ हंगामात वर्गीकरण करण्यात येते. 1.पावसाळी किंवा खरीप हंगाम - जून ते सप्टेंबर - सर्व पालेभाज्या, वाटाणा, श्रावण घेवडा, वाल, चवळी, तांबडा भोपळा, दुधीभोपळा, दोडका, पडवळ, कारली, गवार, घोसाळी, वांगी, टोमेटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, मुळा, गाजर, बटाटा 2.हिवाळी किंवा रब्बी हंगाम - ऑक्टोबर ते जानेवारी - कोबी, फ्लॉवर, नवलकोल, गाजर, पालक, टोमेटो, कोथिंबीर, मेथी, चाकवत, कांदा, लसूण, वाटाणा, मुळा, भेंडी, बटाटा 3.उन्हाळी हंगाम - फेब्रुवारी ते जून - भेंडी, गवार, कांदा, गाजर, मुळा, वांगी, मिरची, टोमेटो, घेवडा, दुधीभोपळा, तांबडा भोपळा, कारली, दोडका, काकडी, पालक, मेथी, कोथिंबीर, ढेमसे काही भाज्यांची लागवड रोपे तयार झाल्यावर कायम जागी स्थानांतरीत (transplant) करून केली जाते. साधारणपणे अश्या भाज्यांचे बी खूप बारीक असते उदा. वांगी, टोमेटो, मिरची, कांदा, कोबी, फ्लॉवर, मुळा, नवलकोल. पालेभाज्यांचे बी ओळीने पातळ पेरावे. कोथिंबीर बी पेरण्यापूर्वी १२ तास पाण्यात भिजवावे, नंतर काढून १२ तास उबदार जागेत ठेवावे म्हणजे उगवण चांगली व लवकर होते. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची वरचेवर खुडणी करून बरेच दिवस पीक घेता येते. एका वाफ्यातून पालेभाजी संपूर्ण काढून घेतल्यावर परत खणून ८-१० दिवसांनी पुन्हा पालेभाजी घेता येईल. अशा वेळी मेथीशिवाय कोणत्याही प्रकारची भाजी काढून घेतल्यावर तेथे मेथी घ्यावी. मेथीच्या मुळावर हवेतील नायट्रोजन शोसून घेण्याच्या गाठी येत असल्याने जमिनीचा पोस सुधारण्याच्या कामी फार चांगला उपयोग होतो. धन्यवाद. 🙏🙏
See other profiles for amazing content