फॉलो करा
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
6,736
पोस्ट
6,329
फॉलोअर्स
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
457 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती पोषणात मॅंगेनीज (मंगल) महत्त्वाचे* पिकांना परिपूर्ण वाढीसाठी आवश्‍यक सात सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी मॅंगेनीज (मंगल) हे एक महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. पिकांना याची अत्यंत कमी प्रमाणात गरज असते. पिकांमधील प्रकाशसंश्‍लेषण व विविध जैवरासायनिक क्रिया व्यवस्थितरीत्या होण्यासाठी मॅंगेनीज अन्नद्रव्य गरजेचे असते. *डॉ. हरिहर कौसडीकर* मॅंगेनीजसाठी संवेदनशील पिके सोयाबीन, गहू, मुळा, पालक व कांदा इत्यादी पिके मॅंगेनीज कमतरतेस संवेदनशील आहेत; तर टोमॅटो, काकडी, वाटाणा, बटाटा, मका व फळझाडे पिके मध्यम संवेदनशील आहेत. *जमिनीतील मॅंगेनीजची उपलब्धता* ज्या जमिनीत उपलब्ध मॅंगेनीजचे प्रमाण दोन दशलक्ष भागापेक्षा कमी असते अशा जमिनीस मॅंगेनीज कमतरतेची जमीन असे संबोधतात. जमिनीत मॅंगेनीज योग्य प्रमाणात उपलब्ध असले तरीही जमिनीच्या विविध रासायनिक गुणधर्मांमुळे पिकांद्वारे शोषले जात नाही. मॅंगेनीज पिकांना जमिनीत Mn 2+ या स्वरूपात उपलब्ध होते, कारण ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 इतका असतो, त्या जमिनीत Mn 2+ या स्वरूपात उपलब्ध असते. मॅंगेनीजचे उपलब्ध स्वरूप हे सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यावरदेखील अवलंबून असते. सूक्ष्म जिवाणूंचे कार्य जमिनीच्या सामूवर व सेंद्रिय कर्बावर आधारित असते. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंमुळे अनुपलब्ध मॅंगेनीजचे रूपांतरण उपलब्ध स्वरूपात होऊन पिकांना मिळू शकते. तसेच, मॅंगेनीजचे विविध स्वरूपांतील रूपांतरण होण्याचे प्रमाण पिकांच्या मुळांद्वारे बाहेर पडणाऱ्या पदार्थांवरदेखील अवलंबून असते. मुळांद्वारे बाहेर पडणाऱ्या मॅलिक आम्लामुळे मॅंगेनीजची जमिनीत विद्राव्यता वाढते व पिकांना अन्नद्रव्य सहज उपलब्ध होते. जमिनीत मॅंगेनीजचे जास्त प्रमाणात वहन होत नाही, त्यामुळे मॅंगेनीजयुक्त खते ज्या ठिकाणी जमिनीत पडतात त्याच ठिकाणी उपलब्ध व स्थिर होतात. म्हणून मॅंगेनीज पिकांच्या मुळांच्या सान्निध्यात पडणे महत्त्वाचे ठरते, जेणेकरून मुळांद्वारे मॅंगेनीजचे शोषण सहज व जास्त प्रमाणात होईल. *पिकांतील मॅंगेनीजचे वहन* पिकांमध्ये पाणी वाहून नेणाऱ्या नलिका पाण्यासोबत विद्राव्य झालेल्या अन्नद्रव्यांचे वनस्पतीच्या मुळापासून ते खोडापर्यंत वरच्या दिशेने वहन करण्याचे काम करतात, तर अन्न वाहून नेणाऱ्या नलिका पाणी, खनिजद्रव्य आणि क्षार यांचे वनस्पतीच्या सर्व भागांत वहन करण्याचे कार्य करतात. अशा प्रक्रियेमध्ये मंगलचे वहन होते. *पिकांमध्ये मॅंगेनीजचे कार्य* पिकांमध्ये घडून येणाऱ्या प्रकाशसंश्‍लेषण, श्‍वसन आणि विविध सेंद्रिय पदार्थ रूपांतरण यासाठी मंगल किंवा मॅंगेनीज अन्नद्रव्य कार्य करते. विविध जैवरासायनिक प्रक्रिया व अभिक्रिया यांना चालना देणे तसेच विकरांना प्रवृत्त करणे हे काम मॅंगेनीज (मंगल) अन्नद्रव्यामार्फत केले जाते. कर्बोदके व प्रथिने तयार करणे अशा प्रक्रियेमध्येदेखील मंगलचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. *पिकांमधील मॅंगेनीज कमतरतेची लक्षणे* *सोयाबीन* नवीन पानांचा रंग फिकट पिवळा पडतो व पानांच्या शिरा हिरव्याच राहतात, पिकांची वाढ खुंटते व पाने पक्व होण्याआधीच गळतात. *मका* पिकांची वाढ खुंटते किंवा पीक लहान राहते, पानांच्या शिरांतील भाग पिवळा पडतो. *ऊस* पानांचा रंग फिकट हिरवा व पिवळसर दिसतो, पानांच्या कडेवर पिवळ्या व पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात. *भुईमूग* नवीन पाने पिवळसर दिसतात, पानांच्या कडेवर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात. *सूर्यफूल* नवीन पाने बारीक राहतात व प्रथम पिवळी नंतर पांढरी पडतात, पानांच्या शिरांतील भागावर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात. त्यानंतर पिकांच्या मधल्या भागातील व खालच्या भागातील पानांवर पसरतात. *टोमॅटो* पानांचा आकार लहान राहतो व शिरांतील भागावर नारंगी पिवळसर रंग दिसतो व तो कडांवरही पसरतो तद्‌नंतर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात. *गहू* पिकांच्या शेंड्याकडील पाने पिवळी दिसतात. पानांच्या टोकापर्यंत पिवळ्या रेषा दिसतात, तसेच पिकांच्या पानांवर पिवळे ठिपके पडतात. *आंबा* पाने प्रथम फिकट हिरवी नंतर पिवळी दिसतात परंतु शिरा हिरव्याच राहतात. नंतरच्या काळात पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. *पेरू* शेंड्याकडील पानांचा रंग पिवळा पडतो व फुलधारणेवरही परिणाम होतो. *लिंबूवर्गीय पिके* जास्त कॅल्शिअमचे प्रमाण असणाऱ्या जमिनीत मॅंगेनीज कमतरता आढळते, पानांच्या शिरांतील भाग जस्त व लोहाप्रमाणचे पिवळा पडतो परंतु पानांच्या आकारावर काहीही परिणाम होत नाही. *मँगनीज चे पिकातील कार्य* प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते. हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते. मँगनीज स्निग्ध पदार्थ (फॅटस्) तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या एन्झाईम्स च्या अक्टिवेहशनसाठी गरजेचे आहे. राबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे. मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे घटक *जमिनीचा सामु*– मातीचा जास्त सामु (पीएच) मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते. *सेंद्रिय पदार्थ*– जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते. *मँगनीज फेरस संबंध*- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते. *मँगनीज सिलिकॉन संबंध* सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते. नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते. *मँगनीज चे विविध स्रोत* प्रकार मँगनीजचे प्रमाण मँगनीज सल्फेट 23-28% मँगनीज ऑक्साईड 41-68% चिलेटेड मँगनीज 5-12%. स्रोत:ऍग्रोवन 🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
429 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ मँगनीज चे पिकातील कार्य – प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते. हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते. मँगनीज स्निग्ध पदार्थ (फॅटस्) तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या एन्झाईम्स च्या अक्टिवेहशनसाठी गरजेचे आहे. राबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे. मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे घटक – जमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच) मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते. सेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते. मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते. मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते. नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते. मँगनीज चे विविध स्रोत – प्रकार मँगनीजचे प्रमाण मँगनीज सल्फेट 23-28% मँगनीज ऑक्साईड 41-68% चिलेटेड मँगनीज 5-12%.
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
497 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं* त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत. * *बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत. * *पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात)* *पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)* , *पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ खबदाड, भागदाड असा होतो. म्हणजे काय तर हा पाऊस इतक्या ताकदीने पडतो की घरच्या माळवदाला भगदाडे पडावीत. एकंदर मतीतार्थ असा की आर्द्राचा पाऊस पडझड करून जातो.* *पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं), * *आता आश्लेषा नक्षत्र सुरु आहे त्यासाठीची म्हण अशी आहे - मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा. म्हणजे काय ? आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत ! * *पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख ( असं का म्हटलंय - पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं )* *पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा. (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे) * *पडता हस्ती कोसळतील भिंती ही साधी सुलभ म्हण आहे. हस्त नक्षत्रातला पाऊस दिवसभर जरी कोसळला नाही तरी त्याचा मारा इतका ताकदवान असतो की भिंती कोसळाव्यात. खेड्यापाड्यातली माय मराठी निसर्गाच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं मत नोंदवते मग ते फटकळ असो वा काहीसं अश्लील, त्यात वास्तव झळकतंच *! *गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो. शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लेहजा ढंगदार आणि न्यारा आहे. गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही...*
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
460 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ (झिंक)चे कार्य* सर्वसाधारण पिकांमध्ये जस्ताचे प्रमाण २७ ते १५० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम एवढे असणे योग्य असते. *कार्य/महत्त्व-* - जस्तामुळे झाडांना प्रथिने निर्मितीस चालना मिळते व संजीवके तयार होतात. प्रामुख्याने इंडॉल असेटिक (आयएए) असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते. - प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे. - झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. - झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. - झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. - पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते. *झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-* *जमिनीचा सामु-* मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते. *झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस)चे गुणोत्तर -* जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो. *सेंद्रीय पदार्थ -* जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते. जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते. *झिंक व तांबे (कॉपर)चे गुणोत्तर -* पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते. *झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर -* मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते. *कमतरतेची लक्षणे -* - फळझाडांना पाने कमी लागतात व झाडांची वाढ खुंटते. - गहू या पिकात पानांवर कथिया रंगाचे डाग पडतात. - मका या पिकामध्ये पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत. - जस्ताची कमतरता विशेषतः धान्य पिकांमध्ये (मका, ज्वारी, सोयाबीन) व भाजीपाल्यामध्ये टोमॅटोत अधिक असते. पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. *विविध स्त्रोत -* _*उत्पादन -- रासायनिक फॉर्म्युला -- सर्वसाधारण झिंकचे प्रमाण*_ झिंक सल्फेट -- ZnSO4-H2O -- 36% झिंक ऑक्झि सल्फेट -- Zn0-Zn SO4 -- 38-50% झिंक ऑक्साईड -- ZnO -- 50-80% झिंक क्लोराईड -- ZnCl2 -- 50% झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट -- ZnEDTA -- 6-14% झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट -- ZnHEDTA -- 6-10% माती परीक्षणानुसार हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा अर्धा ते १ किलो झिंक सल्फेट प्रति १०० लिटर पाण्यातून पिकावर फवारावे. स्रोत:ऍग्रोवन 🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
537 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती (झिंक)चे कार्य* सर्वसाधारण पिकांमध्ये जस्ताचे प्रमाण २७ ते १५० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम एवढे असणे योग्य असते. *कार्य/महत्त्व-* - जस्तामुळे झाडांना प्रथिने निर्मितीस चालना मिळते व संजीवके तयार होतात. प्रामुख्याने इंडॉल असेटिक (आयएए) असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते. - प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे. - झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. - झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. - झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. - पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते. *झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-* *जमिनीचा सामु-* मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते. *झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस)चे गुणोत्तर -* जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो. *सेंद्रीय पदार्थ -* जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते. जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते. *झिंक व तांबे (कॉपर)चे गुणोत्तर -* पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते. *झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर -* मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते. *कमतरतेची लक्षणे -* - फळझाडांना पाने कमी लागतात व झाडांची वाढ खुंटते. - गहू या पिकात पानांवर कथिया रंगाचे डाग पडतात. - मका या पिकामध्ये पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत. - जस्ताची कमतरता विशेषतः धान्य पिकांमध्ये (मका, ज्वारी, सोयाबीन) व भाजीपाल्यामध्ये टोमॅटोत अधिक असते. पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. *विविध स्त्रोत -* _*उत्पादन -- रासायनिक फॉर्म्युला -- सर्वसाधारण झिंकचे प्रमाण*_ झिंक सल्फेट -- ZnSO4-H2O -- 36% झिंक ऑक्झि सल्फेट -- Zn0-Zn SO4 -- 38-50% झिंक ऑक्साईड -- ZnO -- 50-80% झिंक क्लोराईड -- ZnCl2 -- 50% झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट -- ZnEDTA -- 6-14% झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट -- ZnHEDTA -- 6-10% माती परीक्षणानुसार हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा अर्धा ते १ किलो झिंक सल्फेट प्रति १०० लिटर पाण्यातून पिकावर फवारावे. स्रोत:ऍग्रोवन 🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
529 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ (जस्त) झिंकचे पिका मधिल कार्य - ऑक्झिन्स च्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते. प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे. झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते. झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक- जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते. झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस) चे गुणोत्तर - जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो. सेंद्रीय पदार्थ - जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते. जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते. झिंक व कॉपर चे गुणोत्तर - पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते. झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर - मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते. जस्त (झिंक) Zn चे विविध स्त्रोत उत्पादन रासायनिक फॉर्म्युला सर्वसाधारण झिंकचे प्रमाण झिंक सल्फेट ZnSO4-H2O 36% झिंक ऑक्झि सल्फेट Zn0-Zn SO4 38-50% झिंक ऑक्साईड ZnO 50-80% झिंक क्लोराईड ZnCl2 50% झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट ZnEDTA 6-14% झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट ZnHEDTA 6-10%
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
6K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती अन्नद्रव्यांकडे लक्ष द्यायलाच हवे-* पीक पोषण होणे म्हणजे पिकास मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय अथवा रासायनिक खतांद्वारे पुरवठा करणे. पीक पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनाच अधिक प्राधान्य दिले जाते. त्या तुलनेत दुय्यम अन्नद्रव्यांकडे (कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक) आवश्‍यक त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही; तसेच लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द, बोरॉन, क्‍लोरिन ही सात मूलद्रव्येही पीक पोषणात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात; परंतु त्यांचा वापरही अतिशय मर्यादित स्वरूपात होत आहे. सध्याच्या परिस्थितीतही त्याकडे म्हणावे तसे लक्ष पुरविले जात नाही. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते; परंतु सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्यांशी संबंधित असल्याने त्यांच्या वापराकडेही तितकेच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वनस्पती शास्त्रज्ञांना रासायनिक परीक्षणात आढळून आले आहे, की कोणती पोषणद्रव्ये महत्त्वाची आहेत ते तीन मुख्य तत्त्वांवर ठरते - 1) पोषणद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी व प्रजननासाठी उपयुक्त असली पाहिजेत, ती नसल्यास वाढ चांगली होत नाही व प्रजनन थांबते. 2) जरूर त्या पोषणद्रव्यांची उणीव अन्य कुठल्याही अन्नद्रव्यांचा वापर करून भरून काढली जाता येऊ नये. 3) वनस्पतींच्या----- प्राथमिक स्वरूपाची कामगिरी असली पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे प्रतिकूल परिणाम ताबडतोब दृश्‍य स्वरूपात नसतात. मात्र, त्यांची कमतरता खूपच नुकसानकारक ठरू शकते. कारण अल्प प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक पोषणातील कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्वाचे आहे. नत्र, स्फुरद व पालाश योग्य प्रमाणात वापरून देखील पिकांपासून पूर्ण क्षमतेएवढे उत्पादन मिळत नाही, कारण प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य विशिष्ट प्रकारचे असते. या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीतच पिके नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही. *लक्षात ठेवू या लोह- जस्त- बोरॉन* योग्य प्रमाणात व कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरासाठी पीक नियोजन व व्यवस्थापन आवश्‍यक आहे. उदा. तृणधान्य, टोमॅटो, भुईमूग, ऊस, मका व लिंबूवर्गीय फळझाडे ही लोह या अन्नद्रव्यास जास्त संवेदनशील असल्यामुळे लोहाच्या कमतरतेचा अनिष्ट परिणाम या पिकांवर लवकर होतो. जस्ताची कमतरता असेल तर तृणधान्य, कापूस, सोयाबीन व लिंबूवर्गीय फळझाडांचे जास्त नुकसान होते. 2) बोरॉनच्या कमतरतेमुळे सूर्यफूल, कापूस, हरभरा, भाजीपाला व लिंबूवर्गीय फळझाडांची योग्य वाढ होत नाही. ही अन्नद्रव्ये फवारणीद्वारे दिल्याने उत्पादन चांगले येते. वनस्पतींना मातीतून योग्य प्रमाणात बोरॉन मिळाल्यास कॅल्शिअम -पोटॅशिअम मॅग्नेशिअम यांचे कार्य व्यवस्थित सुरू राहते. काही प्रमाणात किडींना दूर ठेवण्यास बोरॉनची मदत होते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील जमिनींमध्ये 35.4 टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, 25.7 टक्के जमिनीत उपलब्ध लोह व 25.7 टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली आहे. मात्र उपलब्ध मॅंगनीज, तांबे व मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता महाराष्ट्रातील जमिनीमध्ये आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाची व शेतीमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चाळीस वर्षांपूर्वी एकाच अन्नद्रव्याची कमतरता (नत्र) जाणवत होती, आज त्याच मातीमध्ये सहा अन्नद्रव्यांची (नत्र, स्फुरद, गंधक, लोह, जस्त, बोरॉन) कमतरता दिसून येत आहे. यापुढे योग्य काळजी घेतली नाही, तर सहा अन्नद्रव्यांच्या या यादीत वाढ होईल हे निश्‍चित आहे. पिकांना लागणारी अन्नद्रव्ये आणि त्यांचे प्रमाण योग्य असेल तरच पिकांची चांगली वाढ होत असते. *सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे* 1) अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांचा वापर. 2) भरखते/ सेंद्रिय खतांचा कमी वापर. 3) रासायनिक खतांचा असंतुलित वापर. 4) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा नगण्य वापर. 5) वर्षातून सतत एकापेक्षा जास्त पिके घेणे म्हणजे बहुपीक पद्धतीचा वापर. 6) पिकांची योग्य अशी फेरपालट न करणे. 7) संयुक्त किंवा अतिशुद्ध अशा सूक्ष्म अन्नद्रव्येविरहित रासायनिक खतांचा वापर. 8) सतत बागायती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण घटणे. 9) पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध. 10) जमिनीचे उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांशी संबंधित गुणधर्म, उदा. जमिनीत पाण्याच्या निचऱ्याचा अभाव, मुक्त चुन्याचे प्रमाण, क्षारवट व चोपण जमीन, जमिनीचा सामू जास्त असणे आणि अल्कधर्मी व खडकाळ जमीन.
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
576 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा. पिकाच्या परिपूर्ण वाढीसाठी 50 पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणाऱ्या या अन्नद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हंटले जाते. या अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी याबद्द्ल पुढे माहिती देण्यात आली आहे. 1.मॉलिब्डेनियम : मॉलिब्डेनियमचे पिकातील कार्य : ∙मॉलिब्डेनियम पिकामध्ये नायट्रेटचे रूपांतर अमिनो ॲसिड मध्ये होण्यात कार्य करते. ∙सहजीवी नत्र स्थिरीकरणामध्ये गरजेचे आहे. मॉलिब्डेनियम च्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक : ∙जमिनीचा सामू : मॉलिब्डेनियम हे एकमेव सूक्ष्म अन्‍नद्रव्य आहे जे की जास्त सामु असलेल्या मातीत सहज   उपलब्ध होते. ∙जास्त प्रमाणात पाणी वाहून जाणाऱ्या जमिनीत मॉलिब्डेनियमची कमतरता जाणवते. मॉलिब्डेनियमचे विविध स्त्रोत आणि त्यांचे प्रमाण : 1.सोडीयम मॉलिब्डेट : 396- 2.मॉलिब्डेनियम ट्रायऑक्साईड :- 66% 3.अमोनियम मॉलिब्डेनियम :- 54% 2.फेरस (लोह) : फेरस (लोह) चे पिकातील कार्य :- ∙हरित लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे असते. ∙पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे. ∙काही एन्झाईम्स व प्रोटीन्सचा घटक आहे. ∙पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत गरजेचे आहे. ∙सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत गरजेचे आहे. फेरस (लोह) उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक : ∙जमिनीचा सामू : जास्त सामू असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखील फेरसची उपलब्धता कमी होते. ∙फेरस स्फुरद संबंध : जास्त प्रमाणातील स्फुरदामुळे फेरसची उपलब्धता कमी होते. ∙नायट्रेट नत्राच्या वापरामुळे पिकातील धन -ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होऊन फेरसची कमतरता निर्माण होते. ∙फेरस मँगनीज संबंध : दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुसऱ्याची उपल्बधता कमी करते. ∙फेरस मॉलिब्डेनियम : जास्त प्रमाणातील मॉलिब्डेनम मुळे पिकाच्य मुळांवर आयर्न मॉल्बडेट चा थर तयार होतो. फेरस चे विविध स्त्रोत व प्रमाण : 1.फेरस सल्फेट :- 20% 2.फेरस अमोनियम सल्फेट :- 14% 3.आयर्न डीटीपीए चिलेट :-10% 4.आयर्न एचईडीटीए चिलेट :- 5-12% 3.मँगनीज : मँगनीज चे पिकातील कार्य : ∙प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते. ∙हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट ॲसिमिलेशन मध्ये कार्य करते. ∙मॅगनीज स्निग्ध पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या एन्झाईम्स च्या ॲक्टिवेशनसाठी गरजेचे आहे. ∙राबोफ्लॅविन, ॲस्कोर्बीक ॲसिड आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे. ∙प्रकाश संश्लेषण क्रियेत इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे. मँगनीज पिकाला मिळाले की परिणाम करणारे घटक : ∙जमिनीचा सामू : मातीचा सामू जास्त असल्यास मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामू उपलब्धता   वाढवते. ∙सेंद्रीय पदार्थ : जास्त प्रमाणात सेंद्रीय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थासोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते. ∙मँगनीज फेरस संबंध : जास्त प्रमाणातील फेरस मँगनीजची उपलब्धता कमी करते. ∙मँगनीज सिलीकॉन संबंध : सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते. ∙नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते. मँगनीजचे विविध स्त्रोत व त्यातील मँगनीजचे प्रमाण : 1.मँगनीज सल्फेट :- 23-28% 2.मँगनीज ऑक्साईड :- 41-68% 3.चिलेटेड मँगनीज :- 5-12% 4.बोरॉन : ∙बोरॉन पिकास शर्करा आणि स्टार्च यात संतुलन साधते. ∙पिकातील शर्केरेच्या आणि कर्बोदकांच्या वहनात गरजेचे आहे. ∙परागीभवन आणि बीज निर्मितीत गरजेचे आहे. ∙नियमित पेशी विभाजन नत्राच्या चयापचयाच्या आणि प्रथिनांच्या चयापचयात गरजेचे आहे. ∙नियमित पेशीभित्तीका तयार होण्यात गरजेचे आहे. ∙पिकांतर्गत जल व्यवस्थापनात गरजेचे आहे. बोरॅानच्या कमतरतेवर परिणाम करणारे घटक : ∙सामु : जास्त सामु बोरॉन ची कमतरता निर्माण करते. ∙जास्त प्रमाणात जमिनीत पाणी झाल्यास बोरॉन वाहून जाते व बोरॉन ची कमतरता जाणवते. बोरॉनचे विविध स्त्रोत व त्याचे प्रमाण : 1.बोरॅक्स :- 11% 2.बोरीक ॲसिड :- 17% 3.सोडीयम टेट्राबोरेट :- 10-20% 4.सोल्युबोर :- 20% 5.कॉपर : कॉपरचे पिकातील कार्य : ∙कॉपर पिकामधील प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि श्वसनाच्या क्रियेत उत्तेजक म्हणून कार्य करते. ∙अमिनो ॲसिडचे रूपांतर प्रोटीन्स मध्ये करणाऱ्या काही एन्झाईम्स चा घटक आहे. ∙कॉपर कर्बोदके आणि प्रथिनांच्या पचनात गरजेचे आहे. ∙पिकाच्या पेशीला ताकद आणि सुरक्षा प्रदान करणाऱ्या लिग्निनच्या निर्मितीसाठी कॉपर अत्यंत गरजेचे आहे. ∙कॉपर पिकांच्या टिकाऊ क्षमतेवर चव आणि शर्करेच्या प्रमाणांवर देखील नियंत्रण करते. ∙पिकांवर कॉपर युक्त बुरशीनाशकाची सतत फवारणी होत असते त्यामुळे देखील कॉपर ची गरज भागुन निघते. कॉपरचे विविध स्त्रोत आणि त्यातील कॉपरचे प्रमाण : 1.कॉपर सल्फेट मोनो हायड्रेट :- 35% 2.कॉपर सल्फेट पेटाहायड्रेट :- 25% 3.क्युप्रिक ऑक्साईड :- 75% 4.कॉपर क्लोराईड :- 17% 5.कॉपर चिलेटस :- 8-13% 6.झिंक : झिंकचे पिकामधील कार्य : 1.ऑक्झिन्सच्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य प्रामुख्याने इंडॉल ॲसेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते. ज्यामुळे पिकाची शेंड्याची वाढ जोमदार होण्यात मदत मिळते. 2.प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते तसेच पिकामधील शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे. 3.झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. 4.झिंक बिज आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. 5.झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. 6.पिकाच्या पेशीमधील योग्य प्रमाणातील झिंकच्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखील तग धरुन राहते. झिंकच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक : ∙जमिनीचा सामू : मातीचा सामू जास्त असल्यास झिंकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही. अतिरिक्त ॲसिडीक स्वरूपातील झिंकचा वापर करुन ही कमतरता दुर करता येते. ∙झिंक आणि स्फुरद चे गुणोत्तर : जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. ∙नत्राची कमी प्रमाणातील उपलब्धता पिकाच्या वाढीवर करीत असलेल्या दुष्परिणामामुळे इतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. हाच परिणाम झिंक वर देखील लागु पडतो. ∙सेंद्रीय पदार्थ : जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात. तसेच जमिनीतील सेंद्रीय पदार्थामुळे इन ऑरगॅनिक स्वरूपातील जस्ताचे चिलेशन होऊन त्याची पिकास उपलब्धता वाढते. ∙जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपलब्धता कमी होते. ∙झिंक व कॉपर चे गुणोत्तर : पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषून घेत असल्याकारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुसऱ्याची कमतरता जाणवते. ∙झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर : मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकांद्वारा शोषण वाढते. झिंकचे विविध स्त्रोत व त्यातील झिंकचे सर्वसाधारण प्रमाण : 1.झिंक सल्फेट :- 36% 2.झिंक ऑक्झिसल्फेट :- 38-50% 3.झिंक ऑक्साईड :- 50-80% 4.झिंक क्लोराईड :-50% 5.झिंक चिलेट :- 6 ते 14% द्राक्ष पिकांतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्ये व कमतरता लक्षणे द्राक्षबागेत अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षाच्या दर्जेदार व शाश्वत उत्पादनात अडचणी निर्माण होत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी द्राक्ष पिकांकरिता सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये, त्यांची कार्य आणि कमरतेची लक्षणे याबाबत सदर लेखात विवेचन केले आहे. द्राक्षबागेत योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे ठरत आहे, कारण विशिष्ट सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षाच्या दर्जेदार व शाश्वत उत्पादनात अडचणी निर्माण होत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी द्राक्ष पिकांकरिता सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये, त्यांची कार्य आणि कमरतेची लक्षणे याबाबत सदर लेखात विवेचन केले आहे. आयर्न (लोह) अन्नद्रव्यांचे प्रमुख कार्य : 1)वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्ये तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी लोहाची आवश्यकता असते. हरितद्रव्ये तयार करण्याच्या कार्यात लोह प्रत्यक्ष भाग घेत नाही, परंतु ते विकराचे काम करते.  2)लोह वनस्पतीच्या शरीरात अप्रवाही स्वरूपात असल्यामुळे खालच्या भागातून वरच्या भागाकडे ते स्थलांतरित होत नाही. 3)लोहाच्या प्रमाणावर नत्राची आणि स्फुरदाची उपलब्धता, तसेच शोषणक्षमता अवलंबून असते. आयर्न (लोह कमतरतेची लक्षणे) 1)ज्या जमिनीत चुनखडीचे (कॅल्शियम कार्बोनेटचे) प्रमाण असते, अशा जमिनीचा सामूदेखील नेहमी जास्तच (8च्या पुढे) असतो. त्यामुळे अशाप्रकारच्या जमिनीत लोह अविद्राव्य बनते आणि हे अविद्राव्य लोह वनस्पतीची मुळे शोषण करू शकत नाहीत. 2)लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रथम द्राक्षवेलीच्या नवीन पानांवर व शेंड्यावर दिसून येतात. पानांचा हिरवा रंग जाऊन ती पांढरट दिसतात, कमतरता जास्तच जाणवल्यास शेंडा, तर कधीकधी नवीन फूटदेखील पूर्णपणे मरते. यात अगोदर पाने फिकट पिवळी पडतात. नंतर पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, परंतु शिरा मात्र हिरव्याच राहतात. यानंतर शिरांसह संपूर्ण पानेच पिवळी पडतात.  3)बर्‍याचवेळा लोह जमिनीत असूनही वनस्पतीस मात्र उपलब्ध होत नाही. यामुळे कर्बसंश्लेषण क्रियेत अडथळा येतो व लोहाच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात.  4)लोहाच्या कमतरतेची लक्षणे ऋतुमानाप्रमाणे कमी जास्त होतात. कोरड्या आणि उष्ण हवामानात लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. द्राक्षवेलीची खरड छाटणी होऊन नेहमी उन्हाळ्यात नवीन फूट येते. अशा नवीन फुटीवर विशेषत: चुनखडीमिश्रित जमिनीतील वेलीवर ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात. 5)फलधारणेच्या छाटणीनंतर येणार्‍या कोवळ्या फुटीवर लोहाच्या कमतरतेची लक्षणे उन्हाळ्यातील लक्षणांपेक्षा थोडी कमी तीव्र असतात. कारण या छाटणीनंतर तापमान जरी थोड्या प्रमाणात वाढत असले तरी हवा मात्र आर्द्र असते. 6)लोहाची कमतरता फार दिवसांपर्यंत पडल्यास वेलींवरील पाने पांढरट तपकिरी रंगाची बनून क्षमता कमी होते. द्राक्षवेलीच्या नवीन फुटीवर सूक्ष्म अवस्थेत घड तयार होण्याच्या कालावधीत जर लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी झाल्यामुळे अन्न कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे व काडी व्यवस्थित पक्व न झाल्यामुळे अशा वेलींवर घड कमी प्रमाणात लागतात. जे काही घड लागलेले असतात त्यातील द्राक्षमण्यांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन ते आकाराने लहान राहतात.  मंगल (मँगनीज) अन्नद्रव्याचे प्रमुख कार्य 1)पानाच्या श्वसनक्रियेत, तसेच नत्राच्या वितरणात जडण-घडण क्रियेत मँगनीज मदत करते.  2)हरितद्रव्ये तयार करण्यासाठी आणि जमिनीतील हवेचे संवहन सुयोग्य नसल्यास वेलीवर जे दुष्परिणाम होतात ते नाहीसे करण्यासाठी याची मदत होते. 3)वनस्पतीच्या जैविकदृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशीजालामध्ये मँगनीजचे प्रमाण जास्त असते.  4)मँगनीजचे वाजवीपेक्षा जास्त शोषण झाल्यास लोहाची कमतरता भासते. मंगल (मँगनीज) कमतरतेची लक्षणे 1)मँगनीजच्या कमतरतेची लक्षणे प्रथम शेंड्याकडील पानांवर दिसू लागतात. जी पाने कार्यक्षम असून मँगनीजच्या कमतरतेमुळे व्यवस्थित कार्य करू शकत नाहीत. अशाच पानांवर कमतरतेची लक्षणे दिसू लागतात.  2)हंगामानुसार कमतरतेची लक्षणे कमी-जास्त प्रमाणात दिसतात. जून महिन्यात ज्यावेळी फलधारक डोळ्यांचा भेद दिसून येतो त्यावेळी मँगनीजची आवश्यकता असल्याचे दिसून आले. 3)थंडीच्या काळात मुळाचे कार्य मंदावते. त्याचबरोबर जमिनीचा सामू 7 पेक्षा जास्त असेल तर अशावेळी कोवळ्या पानांवर मँगनीजच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. यामुळे पानांचा हिरवा रंग जाऊन ती पांढरट दिसतात. नवीन येणारी फूट फिकट पांढरी दिसते.  4)पानांच्या शिरांमधील भाग पांढरट पिवळा पडतो. पाने पांढरी किंवा पिवळी पडणे हे बर्‍याच वेळा लोहाच्या कमतरतेसारखे असते, तसेच थंडीमुळे पानांचे होणारे नुकसान, विषाणूजन्य रोग आणि मँगनीजची कमतरता या सर्वांची लक्षणे प्रथमदर्शनी सारखीच वाटतात. जस्त (झिंक) अन्नद्रव्यांची प्रमुख कार्य 1)या अन्नद्रव्यांचा आणि संजीवकांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण कार्बोनिक आम्लाचे रूपांतर कर्बवायू आणि पाणी यामध्ये होण्यासाठी याचा उपयोग होतो. 2)स्फुरदाचे वितरण आणि प्रथिने तयार होण्यासाठी जी विकरे लागतात त्यासाठी जस्ताची मदत होते. 3)फुले उमलण्यास, फळधारणा होण्यास आणि सर्व द्राक्षमण्यांची एकसारखी वाढ होण्यास नैसर्गिक संजीवकांचा सहभाग असतो, परंतु जस्ताची जर कमतरता भासली, तर त्याचा संजीवकांच्या कार्यावर विपरित परिणाम होऊन त्याचे दुष्परिणाम फुले आणि द्राक्षमण्यांच्या वाढीवर होतो. 4)जस्तामुळे जिबरेलिक आम्लाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. याकरिता ज्यावेळेस जिबरेलिक आम्लाचा वापर करावयाचा असतो, अशा ठिकाणी जिबरेलिक आम्ल वापरण्यापूर्वीच्या फवारण्या ताम्रयुक्त बुरशीनाशकाऐवजी जस्तयुक्त बुरशीनाशकाच्या केल्यास चांगले परिणाम घडून येण्याची शक्यता असते.  5)जमिनीत जस्ताचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झाले, तर त्याचे वनस्पतीवर दुष्परिणाम होतात.  6)हलक्या आणि रेताड जमिनीत जस्ताची कमतरता जास्त प्रमाणात दिसते. 7)जस्ताचे प्रमाण वाढल्यास लोहाची कमतरता भासते.  8)जस्त (झिंक) कमतरतेची लक्षणे 1)द्राक्षवेलीच्या शेंड्यांची वाढ खुंटते. शेंड्याकडील आणि बगल फुटीची पाने नेहमीपेक्षा लहान राहतात. 2)बगल फुटीची पाने पिवळी पडतात. त्यांच्या देठाचा शेंडा पसरट होते. हा पिवळेपणा शेंड्याकडून बुडाकडे वाढत जातो, तसेच काड्याची लांबी कमी होते. 3)जस्ताप्रमाणेच मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणेही दिसतात, परंतु फरक असा की मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या बुडाकडील पानावर प्रथम दिसतात तर जस्ताच्या कमतरतेची लक्षणे बगलफुटीच्या शेंड्याकडील पानांवर प्रथम दिसतात. तांबे (ताम्र) अन्नद्रव्याचे प्रमुख कार्य 1.द्राक्षवेलीमध्ये प्रथिने तयार होण्यासाठी, हरितद्रव्ये तयार होण्यासाठी आणि लोहाचा योग्य प्रकारे वापर घडवून आणण्यासाठी ताम्राची मदत होते.  2.तांबे (ताम्र) अन्नद्रव्य श्वसनक्रियेचे नियमन करते. 3.वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी ताम्राचा चांगला उपयोग होतो.  4.ताम्राचे प्रमाण जर जमिनीत जास्त झाल्यास वेलीची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून शेवटी पांढरी होतात, फांद्याची संख्या कमी होते. तांबे (ताम्र) कमतरतेची लक्षणे 1)ताम्राची कमतरता भासल्यास वेलीवरील कोवळ्या पानांचा शेंडा वाळतो व नंतर पानांच्या कडा वाळतात. पानं सुरकुतल्यासारखी दिसून काही वेळेस संपूर्ण पानेच कोमेजल्यासारखी दिसतात.  2)द्राक्षमण्यांचा रंग बदलून वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचप्रमाणे द्राक्षमण्यांची प्रतही खालावते. 3)कोरडे हवामान, प्रखर सूर्यप्रकाश, जमिनीचा सामू 8 पेक्षा जास्त झाल्यास ताम्राची कमतरता जाणवते.  4)नत्रखताचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाल्यास ताम्राची कमतरता जाणवते.  बोरान अन्नद्रव्याचे प्रमुख कार्य  1)बोरान एक अधातू सूक्ष्म द्रव्यांपैकी असून त्याची द्राक्ष पिकास अत्यंत आवश्यकता असते. 2)द्राक्षवेलींत कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत होते. 3)पाण्याचे शोषण आणि वहन यासारख्या क्रियेत बोरानची मदत होते. 4)बोरान वनस्पती पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत करते. 5)बोरान हे चयापचयाच्या क्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नसले, तरी पानांत तयार झालेली साखर फळात नेण्याचे कार्य बोरानमुळे होते. 6)पुंकेसराचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी बोरानची मदत होते. 7)नत्राचे शोषण, तसेच साखरेचे स्थलांतर घडवून आणण्यास बोरानची मदत होते. 8)बोरानमुळे शेंड्याकडील वाढ होण्यास आणि तेथे असलेल्या संजीवकांचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते. 9)बोरान कमतरतेमुळे पेशींची वाढ होण्यास व त्यांची लांबी वाढण्यास कारणीभूत असलेली संजीवके कार्य करत नाहीत. त्यामुळे शेंड्यांची वाढ खुंटणे, फांद्याची लांबी कमी होणे यासारखे प्रकार उद्भवतात. बोरान कमतरतेची लक्षणे 1)बोरानच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या फुटीवरील शेंड्याकडील पानांवर दिसतात. पाने एकमेकांत दुमडल्यासारखी दिसतात, त्यांची वाढ खुंटते, शेवटी शेंडा मरतो आणि त्यामुळे बगल फूट जास्त प्रमाणात वाढते.  2)बोरानच्या कमतरतेमुळे पाने प्रथम पांढरट दिसतात आणि नंतर लालसर विटकरी रंगाची होतात. 3)बोरानच्या कमतरतेमुळे मुळांची वाढ खुंटते. पेशींचा लांबटपणा आणि त्यांची वाढ खुंटते. 4)द्राक्षवेलींवर फळधारणेच्या वेळी बोरानची कमतरता भासल्यास फळधारणा कमी होते. 5)फळवाढीच्या काळात बोरानची कमतरता भासल्यास फळांची वाढ मंदावते व त्यामुळे द्राक्षमण्यांचा आकार नेहमीप्रमाणे मोठा होत नाही. 6)कधीकधी जिबरेलिक आम्लाचा योग्य प्रमाणात वापर करूनदेखील द्राक्षमण्याची लांबी आणि आकार यामध्ये वाढ होत नाही. अशावेळी बोरानची कमतरता असण्याची शक्यता जास्त जाणवते.  7)जमिनीत ओल जर कम ी असेल तर त्याचादेखील बोरानची कमतरता वाढवण्यास मदत होते.  8)अतिपावसाच्या भागातील जमिनी त्याचप्रमाणे वाजवीपेक्षा जास्त आणि लवकर निचरा होणार्‍या व हलक्या जमिनीत बोरानच्या कमतरतेची लक्षणे आढळतात. 9)ज्या जमिनीत चुना घातलेला आहे आणि सामू 7 पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत बोरानची कमतरता आढळून येते. मॉलिब्डेनम (मोलाब्द) अन्नद्रव्यांचे प्रमुख कार्य 1)द्राक्षवेलीस मोलाब्दची आवश्यकता ताम्र आणि जस्तापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा जास्त झाले तर वनस्पतीवर प्रतिकूल परिणामही होतो. 2)नत्राचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी आणि लोह जास्त प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी मॉलिब्डेनमची मदत होते. 3)तसेच ताम्र, बोरान, मँगनीज, जस्त इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल मॉलिब्डेनममुळे राखला जातो. 4)यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. 5)वनस्पतीमध्ये अ‍ॅस्कॉर्बिक आम्ल तयार होण्यासाठी मॉलिब्डेन आवश्यक असते. मॉलिब्डेनम (मोलाब्द) कमतरतेची लक्षणे 1)द्राक्षवेलीवरील जुनी पक्व पाने हिरवट पिवळसर दिसतात. पानाच्या कडा गुंडाळल्या जाऊन त्या गुलाबी, नारंगी रंगाच्या दिसतात. 2)जुनी पक्व पाने नंतर सुरकुतल्यासारखी होऊन त्यांच्या कडा चुरगळतात आणि शेवटी ती वाळतात. 3)कमतरतेची अशी लक्षणे पक्व पानांवरून हळूहळू कोवळ्या पानांवरही दिसू लागतात. अशा कोवळ्या फुटीचा शेंडा वाळतो आणि नंतर त्यावरील पाने वाळून जातात.  4)फुलांची व द्राक्षमण्यांची गळ जास्त प्रमाणात होऊन त्याचा फळांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. 5)जमिनीचा सामू कमी असल्यास (आम्लयुक्त) आणि ज्या जमिनीत लोह जास्त प्रमाणात असते अशा ठिकाणी मॉलिब्डेनमची कमतरता जास्त भासते आणि उपलब्धता कमी होते.  विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षबागेत होणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद, पालाश, मॉलिब्डेनम, जस्त आणि मँगनीज यांच्या कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे जुन्या पानांवर व फुटीवर आढळतात. लोह, ताम्र, गंधक आणि मॅग्नेशियम यांच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या मधील पानांवर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची लक्षणे शेंड्याकडील पानांवर आढळतात. वरील सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षबागेत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांकरता कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता कारणीभूत असते याबद्दल खालील तक्त्यात माहिती दिली आहे. क्र. 1) द्राक्षबागेत आढळणार्‍या समस्या  1)मुख्य ओलांड्यावरील डोळे अयोग्य प्रकारे आणि उशिरा फुटणे 2)दुय्यम आणि त्रितीय ओलांड्यावरील डोळे उशिरा आणि अयोग्य प्रकारे फुटणे. 3)काड्या एकसारख्या पक्व न होणे. 4)केवडा व भुरी रोग पडणे. 5)एकसारखे द्राक्षमणी लागत नाहीत व डोळे योग्य प्रकारे न फुटणे. 6)मण्यांची गळ होणे. 7)मणी लागत नाहीत, ते पानचट होणे व शेवटी सुकू लागणे. 8)मण्याची एकसारखी पक्वता न होणे व त्याचा अयोग्य रंग बदल होतो. 9)निकृष्ट दर्जा, आंबट रुची, जाड साल होणे. 10)काडी लवकर पक्व न होणे. कारणीभूत घटक : अन्नद्रव्याची कमतरता 1)कॅल्शियम, बोरान व नत्र 2)नत्र, बोरान न कॅल्शियम 3)ताम्र, बोरान व कॅल्शियम 4)मॉलेब्डेनम, मॅग्नेशियम व बोरान 5)बोरान, जस्त, स्फुरद व ताम्र 6)बोरान व ताम्र 7)जस्त, मँगनीज, कॅल्शियम व बोरान 8)लोह, मँगनीज, कॅल्शियम व मॅग्नेशियम  9)मँगनीज, बोरान व पालाश 10)पालाश  द्राक्षबागेत अन्नद्रव्याच्या उपलब्धतेबाबत काही विशिष्ट बाबी 1)जमिनीचा सामू 7 पेक्षा जास्त असतो अशावेळी लोह, जस्त मँगनीज व बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासते. 2)ज्यावेळेस सामू 7 पेक्षा कमी असतो तेव्हा नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही, तर मँगनीज याची उपलब्धता वाढते. 3)जमिनीचा सामू 7च्या आसपास असल्यास अन्नद्रव्याचा योग्य तो समतोल राखला जाऊन त्यांची उपलब्धता व्यवस्थित होण्यास मदत होते. 4)नत्राचा वापर वाढल्यास इतर अन्नद्रव्याचादेखील वापर वाढतो. हलक्या रेताड जमिनीतून नत्राचा पुरवठा कमी होतो. नत्रपुरवठा वाढला तर पालाशचा वापर वाढतो.  5)जमिनीत कॅल्शियम जास्त असले तर स्फुरदाची उपलब्धता कमी होते. कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यास लोह, मँगनीज व जस्ताची उपलब्धता कमी होते. 6)स्फुरदाच्या जास्त वापराबरोबर मॅग्नेशियमची गरज वाढत जाते. 7)गंधकाचा वापर कॅल्शियम आणि पालाश यांच्याबरोबर त्याच्या सहगमनामार्फत होत असतो आणि म्हणूनच गंधकाची उपलब्धता वरील दोन्ही अन्नद्रव्यांवर अवलंबून असते. 8)जेथे कॅल्शियम, मँगनीज जस्त आणि ताम्र जास्त प्रमाणात असते तेथे लोहाची कमतरता भासते. 9)तापमानात घट झाल्यास किंवा स्फुरदाचा वापर वाढल्यासही लोहाची कमतरता भासते. 10) स्फुरद आणि कॅल्शियम यांचे प्रमाण वाढल्यास जस्ताची कमतरता भासते. 11)उष्ण व कोरड्या हवामानात, तसेच हलक्या जमिनीत बोरानची कमतरता भासतो 12 )चोपण व चुनखडीयुक्त जमिनीत मॉलिब्डेनमची कमतरता भासते, तेथे इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य व्यवस्थित होण्यास अडथळे येतात.  डॉ. हरिहर कौसडीकर संशोधन संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुण
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
579 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती गंधक कमतरतेची लक्षणे* *१) केळी* केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात. झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडतात. *२) वांगी* गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व फुले गळतात, उत्पादनात घट होते. *३) कोबी* कमतरतेमुळे नवीन पानाचे काठ पिवळे पडतात. नवीन पानांचा आकार चमच्याच्या किंवा कपासारखे होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही. ४) फ्लॉवर* फुलकोबी गंधकाच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील आहे. लागवडीपासून एक महिन्याच्या आत पानाच्या कडात पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात. गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते. *५) हरभरा* पानांची टोके पिवळसर हिरव्या रंगाची होतात. कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो. नवीन अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात. *६) मिरची* गंधकाच्या कमतरता असल्यामुळे झाडांना फुलधारणा उशिरा होऊन फुलांच्या संख्या कमी होते व उत्पादनात घट होते. नवीन कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळसर ठिपके दिसून येतात. *७) कापूस* जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने पिवळी पात्याचा रंग लालसर दिसतो. *८) भुईमूग* गंधकाची कमतरता असल्यामुळे सर्वसाधारण झाडापेक्षा लहान झालेले आढळतात. शेंगा व नत्रासाठी यांची वाढ खुंटते व परिपक्व होण्यास वेळ लागतो. *९) मका* नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व पानांच्या कडा लालसर दिसतात. पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर होताना पिवळी पडतात. *१०) कांदा* गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानाचा आकार लहान होतो. पाने पिवळी पडतात. पानांची शेंडे पिवळसर पडून वाळतात. *११) तांदूळ* पाने पिवळसर होतात. झाडांची वाढ खुंटते व लोंब्यांच्या संख्येत घट होते. *१२) ज्वारी* झाडांची जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होतात. जुनी पाने हिरवीच राहतात. झाडांची नवीन पाने लहान होऊन निमुळतात. *१३) सोयाबीन* नवीन पाने हिरवट पिवळसर होतात व पानांची लोळी कमी होते. गंधकाची जास्त कमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा कमी होते. *१४) ऊस* नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो. गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात व वाढतात. *१५)गहू* सर्वसाधारण पूर्ण झाड पिवळे पडते._ गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते. लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते व फुले कमी दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. गंधकामुळे तेलबियाणे पिकांमध्ये तेलाचे प्रमाण तसेच उत्पादनात वाढ होते. शेंगवर्गीय पिकामध्ये जैविक नत्र स्थिर करण्यासाठी गंधकाची मदत होते. उदा. सोयाबीनमध्ये गंधकाच्या उपयोगाने शेंगांच्या संख्येत व त्यांच्या वजनात वाढ होते. गंधकामुळे कडधान्य पिकांची प्रतीमध्ये वाढ होते. उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. *जिप्सम मध्ये गंधकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते.* साधारणतः 13% ते 27% एवढे असते. तसेच जिप्सम मध्ये कॅल्शियम सल्फेट - ६५% ते ७०%, कॅल्शिअम- 14% ते 16%, सल्फर 14% ते 20% एवढे आहे.
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
669 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ (सल्फर)चे कार्य* पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे. गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये गंधकाचे प्रमाण दहा टक्के असते. शंभर टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे. गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यास मदत होते. कृषिमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनाची भरीव वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन वाढण्यास व प्रत सुधारण्यास मदत होते. *गंधकाचे पिकांमधील कार्य -* 1) गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते. 2) गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्‍यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे. 3) गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते. 4) भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा 80 टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो. 5) गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्‍लेषणामध्ये वाढ होते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते. *जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे -* 1) मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याद्वारे होणारी गंधकाची कमी. 2) गंधकविरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर. 3) जमिनीतून पिकांद्वारे सातत्याने, गंधकाचे होणारी उचल. 4) शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर. *गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारी लक्षणे -* 1) पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते. नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात. 2) द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते. तृणधान्य वर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो. फळे पूर्णपणे पिकत नाहीत. 🙏🙏