#🌹महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जागतिक महिला दिन निमित्त – ‘कोणत्याही समाजाची प्रगती ही,त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून मी मोजतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे.’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
धर्म संस्थापकांनी क्वचित महिलांच्या उन्नती प्रगती आणि स्वातंत्र्यासाठी असे उद्गार काढले असावेत.
स्त्रीयांच्या गुलामगिरीचा इतिहास:-
स्वांतञपुर्व भारतातील वर्णव्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय स्त्री असो की शुद्र व अस्पृश्य स्त्री यांना धर्म, कर्मकांड, अनिष्ठ रूढी व पंरपरेच्या जोखडात अडकवुन, तिला मानवी गुलाम बनवुन, तिचे मुलभुत हक्क व मानव अधिकार नाकारण्यात आलेले होते. स्त्री ही या पितृसत्ता व्यवस्थेतील चुल आणि मुल साभांळणारी एक भोग वस्तु होवुन गेली होती. स्त्रियांकरीता शिक्षणाच्या सोयी असुनही फार तोकड्या प्रमाणातच स्त्री शिक्षण घेत होती. त्यातच अस्पृश्य स्त्रीयांच्या शिक्षणाचे प्रमाण नगन्यच होते.तिच्यावर लग्नसंस्थेच्या नावाखाली अनेक बंधने लादली गेली होती. लहान वयात होणारे बालविवाह, सतत होणारे बाळंतपण, बीजवरां सोबत होणारे विवाह, संपत्तीत नसलेले अधिकार, बहुपत्नी प्रथा असल्यामुळे व स्त्रीया स्वत: आर्थिक सक्षम नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जुळवुन घेत स्व:ताच्या अंताची वाट पाहणारे जीवन भारतीय स्त्रीया जगत होत्या.
प्राचीन काळातील मातृवंशक किंवा स्त्रीप्रधान प्रथा भारतापासून इजिप्तपर्यंत प्रचलित होती आणि ती नागवंशीय लोकांची संस्कृती होती.आईच्या नावावरून मुलांची नावे ठेवलेली आढळून येतील सातवाहन गौतमिपुत्र सातकर्णी हे एका राजाचे त्यावेळचे नाव उदाहरण म्हणून पाहता येईल.बुद्ध धम्मात तथागथाच्या उपदेशाने स्त्रिया अर्हतपदाला पोहोचल्या. तथागथाने स्त्रियांना दीक्षा दिली, ज्ञानार्जनाचे धडे देत संघात स्थान दिले. तथागथाच्या आचार-विचारातून आदर्श जीवनपद्धती स्त्रीजीवनाला पोषक होती.अडीच हजार वर्षापूर्वीच आपल्या संघात स्त्रियांना स्थान देणारे भगवान बुद्ध म्हणूनच स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी प्रगती उन्नतीसाठी आग्रही होते.
जागतिक महिला दिन
आज स्त्रियांना हक्क अधिकार मिळत आहेत त्यामागे ज्या दोन गोष्टी आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात केलेल्या तरतुदी आणि हिंदू कोड बिल सारखे विधेयक आग्रहाने मांडले या दोन गोष्टी महत्वाच्या.भारताचे पहिले कायदेमंत्री असतांना 1948 मध्ये बाबासाहेबांनी संसदेत ‘हिन्दु कोड बील’ सादर केले होते,दुर्दैव असे की त्यावेळी हे बिल संमत होऊ शकले नव्हते त्याला खूप मोठा विरोध झाला.
भारतीय स्त्रीयांना वडीलांच्या संपत्तीत अधिकार, आंतरजातीय विवाहाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, मुल दत्तक घेण्याचा अधिकार, पोटगी मिळण्याचा अधिकार असे अनेक अधिकार प्राप्त होणार होते. परंतु या बीलाचा तेव्हा विरोधकांकडुन प्रचंड विरोध झाला. विरोध करणा-यात काही उच्चवर्णीय महिलाही होत्या. डाॅ. बाबासाहेबांवर प्रचंड टिका केली गेली त्यांना धमक्याही दिल्या गेल्या. मात्र नंतर संसदेला त्यातील प्रत्येक गोष्ट समाविष्ट करून घ्यावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा हा विजय होता