फॉलो करा
Mr. Vik@s
@36832142
36,280
पोस्ट
91,387
फॉलोअर्स
Mr. Vik@s
755 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
जानेवारी❗ ‼️श्री गुरुदेव दत्त‼️ परमपूज्य कलावती आईंच्या ४८ व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सर्व साधक वर्गास हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या चरणी कोटी-कोटी दंडवत. 🙏 🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹 🟩🟫🟩नाम व प्रारब्धभोग.🟩🟫🟩 💠नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात. हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे.💠 🛟बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदु:ख हे माझेच सुखदु:ख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दु:खी तर मी दु:खी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते.🛟 💢बरे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसे करावे❓इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते; म्हणून ज्याची देहबुध्दी कमी झाली तो देहाच्या सुखदु:खाने सुखी वा दु:खी होत नाही. नामाने देहबुध्दी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहात नाही.💢 💮नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे.💮 🔹️आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य नामाने लाभते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते.🔹️ 🔸️सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे.🔸️ 🌀नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरूपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही. खरोखर किती प्रकारांनी तुम्हांला मी सांगू❗अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.🌀 ⭕अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात. नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझे एवढे ऐका: नामाला कदापिही विसरू नका.⭕ 💢प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका.💢 ❄नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुध्दी कमी होणे हेच पुण्य होय, आणि ते नामाने प्राप्त होते.❄ 🏵नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नाम धारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही.🏵 🪞नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो.🪞 🔸देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.🔸 🌷#बोधवचन :भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे.🌷 🌲#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌲 🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
Mr. Vik@s
928 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
#🙏श्री स्वामी समर्थ📿 आजोबांच्या भुमध्यात स्पर्श केला. ते कूटस्थ चैतन्याचे स्थान आहे. त्याना कांही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. ते कांही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले. ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलिन झाले. त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले. त्यांना बापनार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापनार्यांना दिसले. मातेच्या मांडीवरील बाळ पहाता पहाता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरीत झाले. त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहुब बापनार्या सारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती. दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले. तो संन्यासी बापनार्यांकडे वळून म्हणाला "मी कोण आहे या विचारात असल्या सारखे दिसत आहात. मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे" असे म्हटल्यावर कांही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले. तेथील कर्दळीवनातील महापुरुषांनी, महा योग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी, महाप्रभूनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतका पासून तप केले होते. प्रभूच्या दर्शनाने ते धन्य झाले होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपीनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनार्युलुवर रोखून धरली. ते पुढे म्हणाले "ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोडया वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ति वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला. महापवित्र अत्यंत शक्तीवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरात आवाज आला "बापनार्या ! तू धन्य आहेस. अनंत, केवल अज्ञान स्वरूप, अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ति योगामुळे सूर्य मंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो. या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि अध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे." असे शब्द बापनार्याना ऐकू आले. या प्रसंगाने बापनार्युलु स्तब्धच झाले. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll दत्तरुप ll
Mr. Vik@s
813 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 - एक मेडिटेशन पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची. माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत. सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव. फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात. एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात. तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव. खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो. चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की. तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं. खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी. मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी. हळूहळू तुमच्यातला 'अहं' विसरायला लावणारी.... अशी ही रोजची पूजा. ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का? या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का? यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का? पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे. ...तिला एक 'ऊरकायचं काम' बनवलं तर मात्र त्यातला ऊद्देशच जाईल. 🙏🙏🙏🙏 शुभम भवतु।।।।
Mr. Vik@s
995 जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 आपल्याला अंतिम सुख दाखवितात.* एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. ‘ ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो ’ असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, ‘ तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील. ’ तरी पण तो ऐकेना, एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ? ” असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरू तरी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरूने सांगितले ‘ लग्न करू नकोस ’, तर आपण ‘ लग्न कधी होईल ’ म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर ‘गुरूला समजतच नाही’ असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान् माणसाची विद्वता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे, त्याचप्रमाणे, संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे, ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते.
Mr. Vik@s
3.7K जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 जानेवारी❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🪁मकर संक्रांती सणाच्या सर्व साधक वर्गास हार्दिक शुभेच्छा🪁 🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹 🟧🟥🟧नाम घेण्याला काहीही आड येत नाही.🟧🟥🟧 🛟आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने, सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून, जरूर तर बळजबरीनेसुद्धा घेत राहणे हे सुलभ.🛟 💮समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत, आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल. त्याप्रमाणे, नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून, हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे.💮 ⭕नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच. मग नाम घेण्याचा निश्चय केला तर का नाही होणार❓⭕ 💠काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही; तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे❓ म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंकाकुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम; म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चात्तापाची वेळ येणार नाही.💠 🏵जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात; आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्‍न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की, 'देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण होवो, आणि त्याचीच मला गोडी लागो.🏵 ♦️प्रल्हाद द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले❓ तेच आपण मागावे, आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते, तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्‍न करावा.♦️ 🔸️प्रयत्‍न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा. 'देवा, मी फार दोषी, अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच.🔸️ 🔹️मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, आणि अंत:करणात समाधान ठेवावे.🔹️ 🌷#बोधवचन:जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते.🌷 🎄#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🎄 🚩श्री राम जय राम जय जय राम🚩
Mr. Vik@s
825 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 यस्य स्मरणमात्रतः ॥ दूरादेव पलायत्ने दत्तात्रेय नमामि तम् ॥१॥ अर्थ :- भूत-प्रेत-पिशाच्च वगैरे अनेक दुर्गतीला गेलेले जीव आपल्या कर्मांची फळे भोगत असतात व त्यांचे सामर्थ्यही मोठे असते. त्यांच्याशी काहीतरी संबंध असल्याशिवाय ते सहसा पीडा देत नाहीत. भूतप्रेतादिपीडा अतिशय घातक असते. त्यामुळे मनु-ष्याचा जन्म फुकट वाया जातो. अशी अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत. श्रीक्षेत्र नरसोबावाडी, श्रीक्षेत्र गाणगापूर, श्रीक्षेत्र औदुंबर वगैरे श्रीदत्तमहाराजांच्या स्थानात हे पाहावयास मिळते. भूतप्रेतादि जीव श्रीदत्तमहाराजांच्या गुणांपैकी आहेत. मालकाच्या ताब्यात असलेल्या कुत्र्याला दुसऱ्याच्या अंगावर सोडणे अथवा आवरणे हे जसे मालक सहज करतो, तसे भूतादिगणांना दुसऱ्याच्या अंगावर सोडणे अथवा आवरणे श्रीदत्तमहाराजांच्या हाती आहे. भूतप्रेतपिशाच्चसमंधादि काढणारा श्रीदत्तमहाराजांहून दुसरा देव जगात नाही अशी प्रसिद्धी आहे; कारण हे सर्व गण श्रीदत्तमहा-राजांचे सैनिक आहेत. श्रीगुरुचरित्रादिकांवरून हे सर्व स्पष्ट कळून येते. भूतप्रेतपिशाचादिगण ज्या श्रीदत्तमहाराजांच्या स्मरणमात्राने त्या स्मरणकर्त्यापासून अतिशय दूर पळून जातात व पुनः त्याच्याकडे येत नाहीत, अशा श्रीदत्तमहाराजांना मी नमस्कार करतो. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll दत्तरुप ll
Mr. Vik@s
1.1K जणांनी पाहिले
11 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 जानेवारी❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹 🟠🟤🟠नामाचे सूक्ष्म स्वरूप.🟠🟤🟠 🛟नुसते 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो, आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य 'नोकरी नोकरी' असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का❓वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा, आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. 'रामनाम' आणि 'नोकरी' यांचे परिणाम एकमेकांविरूद्ध आहेत.🛟 🔹️'राम राम' म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा 'राम राम' म्हणण्याचा परिणाम.🔹️ 🔸️परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरूद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर, ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा, आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण 'राम राम' म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते.🔸️ ❄दुसरी गोष्ट म्हणजे 'नोकरी नोकरी' असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण 'राम राम' म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले.❄ 💠तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे.💠 ⭕'राम राम' म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे.⭕ ♦️तेव्हा 'नोकरी नोकरी' म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच 'राम राम' म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता 'राम राम' जपावे.♦️ 🏵मनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच; प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे.🏵 💮'मी' पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.💮 🌷#बोधवचन:जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदु:खाची जाणीव राहणार नाही. तो आनंदात राहील.🌷 🌲#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌲 🍁श्री राम जय राम जय जय राम🍁
Mr. Vik@s
8.2K जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 जानेवारी❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹 🟧🟫🟧नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल.🟧🟫🟧 🛟नामात प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच बघा. मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होते अन्न गोड लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात. थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते. नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वत:कडूनच मिळण्यासारखे आहे.🛟 🏵नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलो आणि तद्‌रूपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्यच नाही.🏵 🌀प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खर्‍या आस्थेने घेत नाही. ह्या सर्वांवर उपाय म्हणजे घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल.🌀 🪞परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही.🪞 ⭕नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येते. नामात राहावे म्हणजे अंत:करणाची शुध्दता होईल आणि अंत:करण शुध्द झाले की भगवंताचे प्रेम येईल.⭕ 💢नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे. खरे म्हटले म्हणजे नामांतच नामाचे प्रेम आहे.💢 ❄ताकात लोणी असतेच, फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते.❄ 💠साध्या शब्दांचादेखील आपल्या वृत्तिवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही❓💠 🔹️आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा.🔹️ ♦️पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना❓प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल.♦️ 🔸️उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या आधीन जातो.🔸️ 🪷अफूचे पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अफू लागते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे.🪷 💮कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच; पण अगदी थोडया श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे.💮 🌲#बोधवचन:नामाचे प्रेम यायला एक गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे.🌲 🍁#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🍁 🌷श्री राम जय राम जय जय राम🌷
See other profiles for amazing content