Follow
Mr. Vik@s
@36832142
36,260
Posts
91,448
Followers
Mr. Vik@s
926 views
5 days ago
#👣गजानन महाराज🌺 #👣गजानन महाराज🌺 एप्रिल❗️ ‼️जय गजानन माऊली‼️ 🌹प्रवचनाचा विषय🌹 🟧🟥🟧खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो.🟧🟥🟧 ❄असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही.❄ ⭕जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो.⭕ 🔸️‘आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार,’ अशी तळमळ लागली, तरच संतसहवास लाभेल.🔸️ 🔹️सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण मागतो मात्र ‘असत्’; मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल❓🔹️ 💢स्वत:ला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण.💢 💮वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही, म्हणून काळजी करतो; पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये❓ आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण, असा विचार करतो का❓💮 🌀विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार❓ रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे❓🌀 🏵मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना, ‘कर्ता मी नव्हे’ ही भावना सांभाळणे जरूर आहे.🏵 ❄जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल; तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाइलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा.❄ ♦️कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात.परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. ♦️ 🏵जो जगाला फसविणार नाही आणि स्वत:ही फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल.🏵 💢कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्यादेखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही.💢 ❄एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की, ‘मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार; आणि तो लांबचा पोर, त्याचे मात्र लाड !’ पण तो मारच आपल्या हितासाठी असतो, हे त्याला नाही समजत❗❄ 🛟साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्येसुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत नि:स्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे.🛟 🪞संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल.🪞 🌷#बोधवचन : संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले.🌷 🎄#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🎄 🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
Mr. Vik@s
2.9K views
1 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 पाडवा 2026 मुहूर्त🌹💐 गुढी पाडवा: गुरुवार, 19 मार्च 2026 मुख्य तिथी चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू: 19 मार्च 2026 सकाळी 6:52 am चैत्र शुक्ल प्रतिपदा समाप्त: 20 मार्च 2026 पहाटे 4:52 am गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तरीही गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो. सर्वोत्तम वेळ (सकाळी): सूर्योदयानंतर ते सुमारे 10:30 वाजेपर्यंत साधारण 6:35 AM ते 10:30 AM गुढी पाडवा पूजा विधी (सोप्या पद्धतीने) सकाळची तयारी लवकर उठून अभ्यंग स्नान करा घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढा घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची/कडुलिंबाची तोरण लावा देवघर स्वच्छ करून दिवा लावा गुढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बांबूची काठी स्वच्छ रेशीम/नवीन कापड (पिवळे, केशरी, हिरवे चालते) साखरेच्या गाठी / गाठी कडुलिंबाची पाने आंब्याची पाने फुलांचा हार तांब्या/चांदी/स्टीलचा लोटा (उलटा ठेवण्यासाठी) हळद-कुंकू, अक्षता अगरबत्ती, दिवा, नैवेद्य गुढी कशी उभारावी बांबूला स्वच्छ कापड बांधा त्यावर फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंब-आंब्याची पाने लावा वरती उलटा तांब्या/लोटा ठेवा घराच्या उजव्या बाजूला / खिडकीत / गॅलरीत उंच ठिकाणी गुढी उभारा गुढीला हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा 2) पूजा करताना म्हणायचे मंत्र सूर्य प्रार्थना ॐ सूर्याय नमः। शुभारंभ मंत्र ॐ श्री गणेशाय नमः। गुढी पूजनासाठी ॐ ब्रह्मध्वजाय नमः। ॐ विजयध्वजाय नमः। समृद्धीसाठी ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः। नववर्ष मंगल मंत्र सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥ 3) गुढी पाडव्याचा खास प्रसाद कडुलिंब + गूळ खाणे शुभ मानतात याचा अर्थ: जीवनात गोड-तिखट-कडू सर्व अनुभव स्वीकारून पुढे जाणे #shreedattarajgurumauli #spirituality #spiritualgrowth #blessings
Mr. Vik@s
3.2K views
1 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नृसिंहवाडी हिला दत्तगुरूंची राजधानी का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या ह्या लेखात...🌹💐 कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. 'श्रीपादश्रीवल्लभ' हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर 'नृसिंहसरस्वती' हा 'दुसरा अवतार' समजला जातो. दत्त महाराजांनी या ठिकाणी 12 वर्षे अर्थात एक तप तपश्चर्या केली आणि आपल्या पादुका स्थापन केल्या. त्यामुळेच या स्थानास महाराजांची तपोभूमी मानली जाते. याठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप..असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो.. संथ वाहणार्‍या कृष्णा नदीच्या एक्कावन्न पायर्‍यांच्या घाटावर, मध्यभागी औदुंबराच्या शीतल छायेखाली दत्ताचे मंदिर आहे. येथे श्रीदत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू श्यामसुंदर मनोहर पादुकांच्या स्वरूपाने वास्तव्य केले आहे.या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा अर्थात घुमटाघुमटांचा आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरूचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक याठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. 'श्री नरसिंह सरस्वती' हा दत्तावतार संन्यासी स्वरूपाचा मानला जातो त्यामुळे येथील भक्तगण संन्याशी लोकांचे पूजन करून त्यांचे आदरातिथ्य करतात. श्रीजनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी याठिकाणी घाट बांधला आहे. हा घाट पाहण्याजोगा आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे केवळ त्रिकाळपुजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते.इतरवेळी‍ ही वाद्ये वाजवायची नाहीत असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे.पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तजयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्वान आलेच, त्याचप्रमाणेच याठिकाणीही श्वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात. @shree_dattguru 🙏🙏🙏🙏 #shreedattarajgurumauli #spiritualgrowth #spirituality #blessings
Mr. Vik@s
1.8K views
1 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 .गोदवलेकर महाराजांच एक वाक्य आहे वेळ आली की गोष्ट घडायची थांबत नाही.पण तो पर्यंत वाट पाहावी लागते. परमार्थाचे मर्म असे आहे की जे आपल्या वाट्याला आलं आहे ना ते शांतपणे भोगावे. ही ज्याची तयारी आहे ना त्याला जीवन थोडे तरी कळलं.अध्यात्म थोडं तरी कळलं. हे सोपं नाही. बनारसला पु.श्री.तैलंगस्वामी नावाचे एक सत्पुरुष भैरवनाथाच्या मंदिरात रहायचे. एका मुलीचे वाकडे पाऊल पडले.तीला दिवस राहिले. तिच्या बापाने विचारलं याचा बाप कोण तर त्या मुलीने तैलंगस्वामीचं नाव सांगितले. ते मूल झाल्यावर त्या बापाने ते मूल तैलंगस्वामीना आणून दिले. त्यांनी मग चार लोकांकडून कपडे आणले, त्याला दूध पाजले. ती मुलगी रोज येऊन मुलाला पाहून जायची. चार महिन्यांनी त्या मुलीने आपल्या बापाला त्या मुलाच्या खऱ्या बापाचे नाव सांगितलं.तो स्वामींकडे आला त्याने क्षमा मागितली आणि ते मूल परत घेतलं. ते म्हणाले " हरकत नाही ". हे फार कठीण आहे. मनासारखं झालं तरी हरकत नाही मनाविरुद्ध झालं तरी हरकत नाही. हे तितक्या समतेने म्हटलं पाहिजे. हे आपल्याला प्रत्येक गोष्टीत शिकता येईल. प्रपंच धड नाही हरकत नाही भगवंताचे स्मरण आहे ना. मग उत्तम . म्हणून श्री.तुकाराम महाराज म्हणाले "भागा आले ते करितो | तुझे नाम उच्चारितो ||" ही जी दृष्टी आहे पाहण्याची ही दृष्टी येणं हे खरं अध्यात्माचे मर्म आहे.
Mr. Vik@s
1.3K views
1 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 मार्च❗ ‼जय हरि विठ्ठल‼ 🚩🚩पापमोचनी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🚩🚩 🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹 🟧🟥🟧उपाधीरहित 'मी' म्हणजेच भगवंत.🟧🟥🟧 🛟ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही, काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते.🛟 ⭕खोटयावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. पण मी मायारूपच जर झालो तर ती कशी ओळखावी बरे❓सत्यावर छाया पडली तीच माया झाली.⭕ 💢वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर, सत्य आणि परमात्मस्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार❓💢 💠जी जगते मरते ती माया. म्हणजे माया ही नासणारी आहे, भंगणारी आहे. शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया. म्हणूनच, ज्याने शाश्वत सुख मिळते, जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते, तेच खरे तत्त्वज्ञान होय.💠 ❄एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे; त्याच्यासाठी जे जे करणे ते सत्य होय. 'मी देवाचा आहे' हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय; म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक, उपाधिरहित जो 'मी' तोच भगवंत आहे. उपाधिरहित राहणे म्हणजे भगवदरूप होणे.❄ 💮किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की, तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते, ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय. इथे 'मी ब्रह्म आहे' अशी जाणीव राहते.💮 🏵निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी सांखळी असेल तर तो ॐकार होय. म्हणून, परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निरास करता करता शेवटी ॐकारापर्यंत येऊन थांबावे लागेल; म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल.🏵 ♦️दहा माणसे उभी केली, त्यांतली नऊ 'ही नव्हेत' म्हणून बाजूला सारली, दहावा राहिला तोच खरा. त्याप्रमाणे 'हे नाही, ते नाही' झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय.♦️ 🔸️भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, "तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस; आणि कोणाचे तरी, म्हणजे अर्थात्‌ ज्ञानी माणसाचे, ऐक आणि त्याप्रमाणे वाग." याचा साधा अर्थ असा की, आपण संतांना शरण गेले पाहिजे.🔸️ 🔹️सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्‍न कःपदार्थ आहे; म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्तमात्र आहोत. म्हणून आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे.🔹️ 🌲#बोधवचन:वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही 🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
Mr. Vik@s
12K views
2 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी ? बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून !* *केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली; त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला.* *परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही.
Mr. Vik@s
1.3K views
2 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 मार्च - प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ? 🌷🌷 सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते, हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल ? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग ! एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्या वेळी तो शुद्धीवर येतो. आणि त्याला आपल्या बायकोमुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुनः इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो; आणि अशा रीतीने तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते, आणि म्हणून, आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुनः जोराने प्रपंच करू लागतो, आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल; पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार ? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही ? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच ! असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये ? याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे; आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला. तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे. ६१. जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.
Mr. Vik@s
777 views
2 months ago
#🌹देवी देवता🙏 म्हणजे मातकट ,हा रंग भगवा नाही . संन्यासी जन घेतात ती छाटी मातकट किंवा गेरू रंगाची का ? तर हा मातकट रंग वैराग्याचा दर्शक आहे . छाटी हि मातकट रंगात तयार केली जाते आणि त्यासाठी गेरू ,तुरटी आणि लिंबाचा वापर केला जातो . आता तुरटी का तर हा मातकट रंग पक्का व्हावा किंवा उत्तम रीतीने बसावा म्हणून . नृसिंहवाडीच्या रविवारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीत एक उल्लेख आहे , काषायांबर खंडन निर्मित कौपीनम् ll श्रीगुरुमहाराजांनी छाटी फाडून लंगोट्या तयार केल्या . कौपीन म्हणजे लंगोटी . लंगोटी देखील तयार स्वरूपात नाही ,ती छाटी फाडून तयार केलेली .वस्त्र आणि उपवस्त्र ह्या प्रकारात ह्या लंगोटी आणि छाटी ह्या गुरुमहाराजांच्या दोन वस्त्रांचा अनेकदा उल्लेख आहे . नित्य म्हटल्या जाणाऱ्या आरत्यात तर अनेकवार हे आले आहे . शनिवारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीत काषायांबर युग्म करिचर्म वसन l दंड कमंडलू भस्म लेपन ll युग्म अर्थात दोन ,गुरुमहाराजांनी दोन वस्त्रे परिधान करून हत्तीच्या कातड्याचे आसन घेतले आहे . श्रीकृष्णा तट निकटे यत्पाद युगलं --- या नृसिंहवाडीतील नित्य पदात काय उल्लेख आहे ? वामेदक्षिण भागेदण्डपात्र स्थितीः l काषायांबर युग्म परितो दधाति ॥ ७ ॥ डाव्या हाताला दंड तर उजव्या हाताला कमंडलू आहे ,दोन काषाय वस्त्रे धारण केली आहेत . हे सर्व झाले छाटी आणि कौपीन बद्दल पण सप्तशती गुरुचरित्रात थोरल्या महाराजांनी दत्त महाराजांना काय म्हटले आहे ,नमः श्रीदत्त गुरवे हृव्दासोधौतिकारवे ll दत्त महाराज हे हृदयरुपी वस्त्र धुवून स्वच्छ करणारे ---- . लज्जारक्षणार्थ धारण केलेले वस्त्र स्वच्छ आहे अथवा कसे ? यापेक्षा आपले हृदयरुपी वस्त्र स्वच्छ असणे गरजेचे नाही का ??? .श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
Mr. Vik@s
1.1K views
2 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 … आजीने तिच्या गुरुंच्या समाधी दर्शनाला घेऊन जाण्याचा फतवा काढला आणि दोन दिवसांनी आम्ही तिला घेऊन श्री क्षेत्र गोंदवले इथे निघालो. आजीचा तिच्या गुरूंवर आभाळाएवढा विश्वास आणि श्रद्धा.मी आणि सौ दोघेही तसे देव देव न करणाऱ्यातले. केवळ आजीच्या श्रद्धेखातर आम्ही निघालो होतो.गाडीत बसल्या पासून आजीच्या हातातल्या जपमाळेचे मणी सरकू लागले होते. काही वेळा मला ह्या बाबतीत आजीची चेष्टा करायची लहर येई. “ आजी, तुझी गुरु माउली तुझ्या बरोबर असतील तर आज आपल्याला दर्शन देतील का ?” मी गमतीने विचारलं. सौ चे डोळे मोठे झाले आणि मी गप्प. आजीने डोळे मिटले आणि म्हणाली “ मिळेल ना दर्शन. माझी श्रद्धा आहे, तुलाही अनुभव येईल.” कुठलंसं गाव मागे पडलं होतं. श्री क्षेत्र गुरु स्थान अजून 18-20 किलोमीटर दूर होतं. दुपारची वेळ . रस्त्यावर कडकडीत उन्हामुळे चिटपाखरूही नव्हतं. मधूनच एखादं वाहन जात होतं… बाकी शांतता आणि उन्हाच्या झळा. अचानक मला पुढे एक माणूस उभा दिसला. धनगराचा वेष आणि बरोबर दोन भरलेली पोती. त्या माणसाने हात करून थांबायला सांगितलं. मी थांबलो. “ मालक … अहो एवढी दोन पोती जरा गोंदवल्यात पोचवाल कां ? कधी पासून यष्टीची वाट बगतुया. गाडीचा पत्याचं न्हाई बगा.” मी गाडीच्या बाहेर आलो, मागची डिकी उघडली आणि ती दोन पोती आत ठेवली. त्या धनगराने मला नमस्कार केला आणि तो मागे फिरून चालू लागला. मी डिकी बंद करून मागे बघितलं. तो माणूस कुठल्या दिशेला गेला हे मला समजलंच नाही. त्या पोत्यांत तांदूळ आणि वांगी होती. आम्ही मुक्कामी पोचलो. सौ, आजीला घेऊन समाधी मंदिरात दर्शनाला गेली. मी त्या संस्थानाच्या ऑफिस मध्ये जाऊन वाटेत भेटलेल्या माणसाने दिलेल्या गोणीबद्दल सांगितलं. तो समोर बसलेला माणूस आश्चर्याने माझ्याकडे पहात राहिला. बाजूलाच बसलेला कोठी घराचा व्यवस्थापक ताड्कन उभा राहिला. म्हणाला “ आपल्या महाराजांनी आज लाज राखली. सर्व भक्तांच्या रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ पुरेसा नव्हता आणि भाजीही सगळी संपली होती. भाऊ… अहो तुमच्या बरोबर माउलींनी धान्य पाठवलं बरं कां.. त्या धनगराच्या रूपात प्रत्यक्ष महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं. धन्य आहात हो तुम्ही.” माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि आजीचे बोल आठवले. मला अनुभव आला होता. एक श्रीमंत समृद्ध अनुभव… मी आजीला आणि सौ ला झाला प्रकार सांगितला. आजी प्रसन्न हसली. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा समाधी दर्शन घेऊन परत निघालो. काल घडलेला प्रसंग .. मिळालेली अनुभूती सगळंच विलक्षण होतं. घरी आलो. डिकीत ठेवलेल्या बॅगा काढायला म्हणून डिकी उघडली … समोर त्या पोत्यातून सांडलेले पसाभर तांदूळ आणि दोन वांगी दिसली. गुरूंचा प्रसाद मिळाला होता … यात्रेची सांगता झाली होती. मिळालेला अनुभव श्रीमंत होता. केवळ आजीच्या गुरुंवरील नितांत श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आम्ही दोघे श्रीमंत अनुभवाचे साक्षीदार झालो होतो..
Mr. Vik@s
1.4K views
2 months ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. 🌺🍀🌺 'आमच्या हातून वारंवार चुका होतात' असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो. त्याचे आईबापांना कौतुकच वाटते, त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्‍नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरूने एकदा सांगितले की, 'तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस,' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्येसुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब, सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. एखादा मुलगा 'मी विहिरीत उडी घेणार' म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा, का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे ? त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या सधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना ! अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला 'मी' चा विसर पडत जातो. 'मी नसून तूच आहेस' ही भावना दृढ होत जाते. शेवटी 'मी' नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो. आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की, 'भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे.' यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला, म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. ५५. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावे.