फॉलो करा
Shree Krishna
@454683695
1,956
पोस्ट
2,319
फॉलोअर्स
Shree Krishna
456 जणांनी पाहिले
महा शिवरात्रीं...... शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु, माघ महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीीचा. महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा करावी असा संकेत आहे त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याची दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्‍ती होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्‍त होतो अशी श्रद्धा आहे. भारतात अनेल शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरात यात्रा भारतात. अन्य कोणतेही उपास न पाळाणारे हिंदू पुरुष आश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादशांना आणि महाशिवरात्रीला उपवास करतात. महाशिवरात्री’ म्हणजे काय ? पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे ? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. व्रत आचरण्याची पद्धत व विधी उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. शिवपूजेची वैशिष्ट्ये १) शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. २) शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३) शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. ४ ) शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५ ) शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवाचा नामजपचे महत्त्व महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा || नम: शिवाय || या शिवाचा पंचाक्षरी मंत्राचा जास्तीतजास्त करावा. माघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नमः शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंगे किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात. ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे इ. गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो. महाशिवरात्रीची कथा. शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, ह्या बद्दल ‘शिवलिलामृत’ मध्ये एक कथा आहे ती अशी की : असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एक ही प्राणी त्या जलाशयाकडे आला ही नाही अन्‌ शिकार मिळालीही नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.” हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता रात्र कशी काढायची. तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हटले. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरिण आले आणि म्हणाले, “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे. एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन्‌ पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.... स्त्रोत आंतरजाल....... #श्रीगुरुदेवदत्त #🙂Positive Thought #😎देसी जुगाड #📲व्हायरल व्हिडिओ #मालवण 😍❤
Shree Krishna
496 जणांनी पाहिले
पूर्ण वाचावे 🙏🏼 निदान कोल्हापूर करांनी, भक्तांनी तरी जागरूक राहून *करवीर निवासिनी श्री. अंबाबाई* असेंच म्हणावे, रोजचे फोटो स्टेटस ला ठेवताना, नेसेज पुढे पाठवताना, बोलताना पण कृपया शब्दात दुरुस्ती करावी... भान ठेवावे.. *जी मुळ ओळख श्री अंबाबाई आहे तीच ठेवा..* ही विनंती 🙏🏼 नाहीतर आला मेसेज,कर फॉरवर्ड, दुसरे म्हणतात म्हणून आपण असा🙏🏼 मूर्खपणा करू नये ही विनंती.. .... एक करवीर प्रेमी 🙏🏼 जय अंबे....🚩 उद ग अंबे उदे... 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩 करा फॉरवर्ड 😊 *महालक्ष्मी नव्हे कोल्हापूरची अंबाबाईच..!* *कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिर आहे याची नोंद इतिहासात आहे.. अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे ..शंकराची पत्नी आहे.. या नात्याने कोल्हापुरातील मंदिर हे शैव मंदिर आहे.* पण अचानक 1980 सालापासून बालाजी वरून साडी चुडी अंबाबाईला पाठवू लागले यावरून असा प्रसार सुरू झाला की बालाजी आपल्या पत्नीला म्हणजे महालक्ष्मीला साडी चोळी पाठवतो.. नंतर अशी प्रथा रूढ झाली की बालाजीला दर्शनासाठी गेलेले कोल्हापूर महालक्ष्मी करूनच परत यावे.. कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी कशी झाली यावर संशोधन होणे गरजेचे आहे.. हे एकच मंदिर नाही *भारतात असे बहुतांश मंदिर आहेत जे शैव मंदिर असून सुद्धा त्यांना वैष्णव मंदिर बनवण्याचा प्रयत्न होत आहे..!* आणि असे प्रयत्न का होत आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे गेल्या काही काळापासून अंबाबाईचे पार्वती हे मूळ रूप बदलून तिचे लक्ष्मीकरण करण्याचा घाट घातला जात आहे . करवीर निवासिनी अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून अंबाबाई ही लक्ष्मीचे रूप असल्याचे सांगून काही लोकांकडून चुकीचा इतिहास रचला जात असल्याच्या तक्रारी अंबाबाईसंदर्भात मूर्ती व प्राचीन इतिहास संशोधकामार्फत केल्या जात होत्या. अंबाबाई ही तिरूपती बालाजीची पत्नी असून ती रूसून करवीरात आली आहे आणि आपल्या पत्नीसाठी दरवर्षी बालाजी महावस्त्र पाठवतो अशी आख्यायिकाही जोडली जात होती. मात्र *तिरूपती बालाजीची पत्नी ही अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे अभ्यासकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.* *अंबाबाई मूर्तीची झीज झाल्यामुळे काही महिन्यांपूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मूर्तीची अंबाबाई असल्याची ओळख दाखवणारी मस्तकावरील नागमुद्रा घडवलीच नसल्याचे उघड झाले. नागमुद्रा हे प्रतीक पार्वती अर्थात अंबा असल्याची खूण असताना नागमुद्रा न घडवल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.* त्यामुळे अंबाबाई की महालक्ष्मी असा मतप्रवाहदेखील चर्चेत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दोन महिने आधीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चेला उधाण आल्यामुळे नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानकडून येणारा मानाचा शालू कोणत्या नात्याने स्वीकारला जाणार याबाबतही उत्सुकता होती, या पार्श्वभूमीवर हा मानाचा शालू *‘विष्णूमाता’* या नात्याने स्वीकारला जात असल्याचे देवस्थान समितीतर्फे सदस्या संगीता खाडे यांनी जाहीर केले. *अंबाबाई ही शक्तिरूप असून तिच्या मूर्तीमध्ये घडवण्यात आलेली आयुधे, नाग, सिंह, म्हाळुंग यामध्येच ती पार्वतीचे रूप असल्याचे दाखले असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले होते.* ही व्याख्यानमालिका कोल्हापुरात अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबाईला जाणीवपूर्वक महालक्ष्मी असे नामकरण करण्याचा डाव काही लोकांनी मांडला आहे. अंबाबाईचा इतिहास वाचला तर ही गोष्ट चुकीची आहे हे लक्षात येते. अंबाबाईला महालक्ष्मी बनवून तिरूपती बालाजीशी पत्नीचा संबंध लावत श्रीपूजकांनी आपली झोळी भरून घेतली आहे. आजपर्यंत देवीची नेमकी ओळख पुराव्यांमधून उजेडात न आल्यामुळे बालाजीची पत्नी म्हणून शालू स्वीकारला जात होता. मात्र, अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यानुसार अंबाबाई ही पार्वतीचे रूप असल्याची भूमिका देवस्थानने घेतली असून *मुलाकडून आईसाठी* महावस्त्र भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाणार आहे *🌸अंबाबाईच का*🌸 #कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नसून '#अंबाबाई' आहे. १) कोल्हापूरची देवीचे नाव हे 'अंबाबाई' आहे. तिचे महालक्ष्मी नाव कधीच नव्हते. भारतामध्ये देवी आदिशक्ती सतीची ५२ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे ३ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापुरची भवानी माता, माहुरगडाची रेणुका माता, कोल्हापूर ची अंबाबाई, आणि अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. जर कोल्हापूरची अंबाबाई शक्तीपीठ म्हटलं तर ती कधीच विष्णू पत्नी होणार नाही. कारण सतीची कलेची ५२ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ५२ शक्तीपीठ तयार झाले. अंबाबाई ही शिवपत्नी आहे. २) अंबाबाई च्या देवळात अंबाबाई च्या गाभाऱ्यावर पहिल्या मजल्यावर शिवमंदिर आहे. तिने शिवाची मातृका पिंड धारण केली आहे. अंबाबाई च्या मूर्तीचा अभ्यास केल्यास तिने कोणत्याही प्रकारे विष्णू चिन्ह परिधान केलं नाही आहे. उलट अंबाबाई मूर्ती जवळ वाहन सिंह आहे. सगळी शिवचिन्ह आहेत. ३) आता मुद्दा तिरुपती- अंबाबाई ह्या गैरसमज बद्दल. काही वर्षपूर्वी काही तिरुपती भक्त आई अंबाबाई च्या ट्रस्ट च्या अधिकार कक्षेत आल्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या प्रथा पाडण्यास सुरवात केली. आपण डोळसपणे पाहिल्यास असे लक्षात येईल की तिरुपती देवस्थान कडून शालू भेट देण्याची प्रथा सुरू केली. ही मागील २० वर्षातच चालू आहे (या अगोदर अशी कोणतीही प्रथा नव्हती), हे कमी की काय, तिरुपती देवस्थान सारखे लाडू चा प्रसाद देण्याची सुरवात केली, ( या आधी लाह्या आणि बत्तासे चा प्रसाद मिळत असे). अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी नाव पुढे केलं गेलं (२००० सालाच्या अगोदर एकही सरकारी कागदपत्रात महालक्ष्मी म्हणून कुठेही उल्लेख नाही. अगदी इंग्रजांच्या काळातली सुद्धा कागद पत्रात 'अंबाबाई' च उल्लेख आहे. ४) सर्वात महत्वाचे कोणत्याही दानव, राक्षस अधर्मी वृत्ती यांचा संहार माता पार्वती करते कारण ती आदिमाया जगदंबा आहे. तिने शस्त्र धारण केले आहेत. अंबाबाई ने या कारणास्तव कोल्हासुरचा वध केला आहे. लक्ष्मी माता ही संहारक नाही. ती धन पूरक देवता आहे. ती कोणाचा वध करत नाही. ५) शेवटचा मुद्दा श्रीविष्णू (तिरुपती) यांची पत्नी लक्ष्मी (पद्मावती) यांचे मंदिर तिरुपती पासून ५ किलोमीटर वर च आहे. सारांश- *काही लोक माता पार्वतीच्या शक्तीपीठ ला उगाच विष्णुपत्नीचे रूप देत आहेत.* 🙏🙏🙏🚩 रत्नासुराला मारण्यासाठी अंबाबाईने केदारनाथ जोतिबाला मदतीसाठी बोलावले होते . विष्णुला नाही . केदारनाथ शिवाला युद्धानंतर इथेच थांबण्याची विनंती केली .. ती मान्य केले . जोतिबा हे शिवाचेच रूप आहे . #🙂Positive Thought #😎देसी जुगाड #🇮🇳आम्ही भारतीय🫡 #मालवण 😍❤ #📲व्हायरल व्हिडिओ
Shree Krishna
354 जणांनी पाहिले
पूर्ण वाचावे 🙏🏼 निदान कोल्हापूर करांनी, भक्तांनी तरी जागरूक राहून *करवीर निवासिनी श्री. अंबाबाई* असेंच म्हणावे, रोजचे फोटो स्टेटस ला ठेवताना, नेसेज पुढे पाठवताना, बोलताना पण कृपया शब्दात दुरुस्ती करावी... भान ठेवावे.. *जी मुळ ओळख श्री अंबाबाई आहे तीच ठेवा..* ही विनंती 🙏🏼 नाहीतर आला मेसेज,कर फॉरवर्ड, दुसरे म्हणतात म्हणून आपण असा🙏🏼 मूर्खपणा करू नये ही विनंती.. .... एक करवीर प्रेमी 🙏🏼 जय अंबे....🚩 उद ग अंबे उदे... 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩 करा फॉरवर्ड 😊 *महालक्ष्मी नव्हे कोल्हापूरची अंबाबाईच..!* *कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिर आहे याची नोंद इतिहासात आहे.. अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे ..शंकराची पत्नी आहे.. या नात्याने कोल्हापुरातील मंदिर हे शैव मंदिर आहे.* पण अचानक 1980 सालापासून बालाजी वरून साडी चुडी अंबाबाईला पाठवू लागले यावरून असा प्रसार सुरू झाला की बालाजी आपल्या पत्नीला म्हणजे महालक्ष्मीला साडी चोळी पाठवतो.. नंतर अशी प्रथा रूढ झाली की बालाजीला दर्शनासाठी गेलेले कोल्हापूर महालक्ष्मी करूनच परत यावे.. कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी कशी झाली यावर संशोधन होणे गरजेचे आहे.. हे एकच मंदिर नाही *भारतात असे बहुतांश मंदिर आहेत जे शैव मंदिर असून सुद्धा त्यांना वैष्णव मंदिर बनवण्याचा प्रयत्न होत आहे..!* आणि असे प्रयत्न का होत आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे गेल्या काही काळापासून अंबाबाईचे पार्वती हे मूळ रूप बदलून तिचे लक्ष्मीकरण करण्याचा घाट घातला जात आहे . करवीर निवासिनी अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून अंबाबाई ही लक्ष्मीचे रूप असल्याचे सांगून काही लोकांकडून चुकीचा इतिहास रचला जात असल्याच्या तक्रारी अंबाबाईसंदर्भात मूर्ती व प्राचीन इतिहास संशोधकामार्फत केल्या जात होत्या. अंबाबाई ही तिरूपती बालाजीची पत्नी असून ती रूसून करवीरात आली आहे आणि आपल्या पत्नीसाठी दरवर्षी बालाजी महावस्त्र पाठवतो अशी आख्यायिकाही जोडली जात होती. मात्र *तिरूपती बालाजीची पत्नी ही अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे अभ्यासकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.* *अंबाबाई मूर्तीची झीज झाल्यामुळे काही महिन्यांपूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मूर्तीची अंबाबाई असल्याची ओळख दाखवणारी मस्तकावरील नागमुद्रा घडवलीच नसल्याचे उघड झाले. नागमुद्रा हे प्रतीक पार्वती अर्थात अंबा असल्याची खूण असताना नागमुद्रा न घडवल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.* त्यामुळे अंबाबाई की महालक्ष्मी असा मतप्रवाहदेखील चर्चेत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दोन महिने आधीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चेला उधाण आल्यामुळे नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानकडून येणारा मानाचा शालू कोणत्या नात्याने स्वीकारला जाणार याबाबतही उत्सुकता होती, या पार्श्वभूमीवर हा मानाचा शालू *‘विष्णूमाता’* या नात्याने स्वीकारला जात असल्याचे देवस्थान समितीतर्फे सदस्या संगीता खाडे यांनी जाहीर केले. *अंबाबाई ही शक्तिरूप असून तिच्या मूर्तीमध्ये घडवण्यात आलेली आयुधे, नाग, सिंह, म्हाळुंग यामध्येच ती पार्वतीचे रूप असल्याचे दाखले असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले होते.* ही व्याख्यानमालिका कोल्हापुरात अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबाईला जाणीवपूर्वक महालक्ष्मी असे नामकरण करण्याचा डाव काही लोकांनी मांडला आहे. अंबाबाईचा इतिहास वाचला तर ही गोष्ट चुकीची आहे हे लक्षात येते. अंबाबाईला महालक्ष्मी बनवून तिरूपती बालाजीशी पत्नीचा संबंध लावत श्रीपूजकांनी आपली झोळी भरून घेतली आहे. आजपर्यंत देवीची नेमकी ओळख पुराव्यांमधून उजेडात न आल्यामुळे बालाजीची पत्नी म्हणून शालू स्वीकारला जात होता. मात्र, अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यानुसार अंबाबाई ही पार्वतीचे रूप असल्याची भूमिका देवस्थानने घेतली असून *मुलाकडून आईसाठी* महावस्त्र भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाणार आहे *🌸अंबाबाईच का*🌸 #कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नसून '#अंबाबाई' आहे. १) कोल्हापूरची देवीचे नाव हे 'अंबाबाई' आहे. तिचे महालक्ष्मी नाव कधीच नव्हते. भारतामध्ये देवी आदिशक्ती सतीची ५२ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे ३ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापुरची भवानी माता, माहुरगडाची रेणुका माता, कोल्हापूर ची अंबाबाई, आणि अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. जर कोल्हापूरची अंबाबाई शक्तीपीठ म्हटलं तर ती कधीच विष्णू पत्नी होणार नाही. कारण सतीची कलेची ५२ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ५२ शक्तीपीठ तयार झाले. अंबाबाई ही शिवपत्नी आहे. २) अंबाबाई च्या देवळात अंबाबाई च्या गाभाऱ्यावर पहिल्या मजल्यावर शिवमंदिर आहे. तिने शिवाची मातृका पिंड धारण केली आहे. अंबाबाई च्या मूर्तीचा अभ्यास केल्यास तिने कोणत्याही प्रकारे विष्णू चिन्ह परिधान केलं नाही आहे. उलट अंबाबाई मूर्ती जवळ वाहन सिंह आहे. सगळी शिवचिन्ह आहेत. ३) आता मुद्दा तिरुपती- अंबाबाई ह्या गैरसमज बद्दल. काही वर्षपूर्वी काही तिरुपती भक्त आई अंबाबाई च्या ट्रस्ट च्या अधिकार कक्षेत आल्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या प्रथा पाडण्यास सुरवात केली. आपण डोळसपणे पाहिल्यास असे लक्षात येईल की तिरुपती देवस्थान कडून शालू भेट देण्याची प्रथा सुरू केली. ही मागील २० वर्षातच चालू आहे (या अगोदर अशी कोणतीही प्रथा नव्हती), हे कमी की काय, तिरुपती देवस्थान सारखे लाडू चा प्रसाद देण्याची सुरवात केली, ( या आधी लाह्या आणि बत्तासे चा प्रसाद मिळत असे). अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी नाव पुढे केलं गेलं (२००० सालाच्या अगोदर एकही सरकारी कागदपत्रात महालक्ष्मी म्हणून कुठेही उल्लेख नाही. अगदी इंग्रजांच्या काळातली सुद्धा कागद पत्रात 'अंबाबाई' च उल्लेख आहे. ४) सर्वात महत्वाचे कोणत्याही दानव, राक्षस अधर्मी वृत्ती यांचा संहार माता पार्वती करते कारण ती आदिमाया जगदंबा आहे. तिने शस्त्र धारण केले आहेत. अंबाबाई ने या कारणास्तव कोल्हासुरचा वध केला आहे. लक्ष्मी माता ही संहारक नाही. ती धन पूरक देवता आहे. ती कोणाचा वध करत नाही. ५) शेवटचा मुद्दा श्रीविष्णू (तिरुपती) यांची पत्नी लक्ष्मी (पद्मावती) यांचे मंदिर तिरुपती पासून ५ किलोमीटर वर च आहे. सारांश- *काही लोक माता पार्वतीच्या शक्तीपीठ ला उगाच विष्णुपत्नीचे रूप देत आहेत.* 🙏🙏🙏🚩 रत्नासुराला मारण्यासाठी अंबाबाईने केदारनाथ जोतिबाला मदतीसाठी बोलावले होते . विष्णुला नाही . केदारनाथ शिवाला युद्धानंतर इथेच थांबण्याची विनंती केली .. ती मान्य केले . जोतिबा हे शिवाचेच रूप आहे . #वरिष्ठनागरिक #मनमौजी #श्रीगुरुदेवदत्त
Shree Krishna
616 जणांनी पाहिले
रामदास नवमी माघ कृष्ण नवमी शके १६०३ देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी ॥ समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० मठांचे जाळे स्थापन करून तेथे स्वराज्यासाठी कामी येतील असे बलोपासक तरुण घडवले, राष्ट्रकारणात महत्त्वाचे योगदान दिले, परमार्थ साधनेसोबतच प्रपंचही उत्तमपणे आचरावा, असे कटाक्षाने सांगितले समर्थ रामदास स्वामी यांना समाधीदिनी सादर प्रणिपात ! #मनमौजी #वरिष्ठनागरिक #📲व्हायरल व्हिडिओ
Shree Krishna
753 जणांनी पाहिले
श्री रामदास नवमी माघ कृष्ण नवमी शके १६०३ देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी ॥ समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० मठांचे जाळे स्थापन करून तेथे स्वराज्यासाठी कामी येतील असे बलोपासक तरुण घडवले, राष्ट्रकारणात महत्त्वाचे योगदान दिले, परमार्थ साधनेसोबतच प्रपंचही उत्तमपणे आचरावा, असे कटाक्षाने सांगितले समर्थ रामदास स्वामी यांना समाधीदिनी सादर प्रणिपात ! #श्रीगुरुदेवदत्त #वरिष्ठनागरिक #मनमौजी #🇮🇳आम्ही भारतीय🫡 #मालवण 😍❤
See other profiles for amazing content