Follow
Tushar
@4599014
2,010
Posts
9,429
Followers
Tushar
335 views
1 hours ago
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴 *🔸भारताची फाळणी.🔸* *आपल्यापैकी किती जणांना भारताच्या विभाजनाबद्दल माहिती आहे?* *भारताची फाळणी किती वेळा झाली?* *ब्रिटिश राजवटिने 61 वर्षांत सात वेळा*. *1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.* *2) 1904 मध्ये नेपाळ* *3) 1906 मध्ये भूतान* *4) 1907 मध्ये तिबेट* *5) 1935 मध्ये श्रीलंका* *6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.* *आणि ...* *7) 1947 मध्ये पाकिस्तान* *अखंड भारताची फाळणी:* *पुर्वी अखंड भारत हिमालया पासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.* *1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.* *वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.* *पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:* *1)1876 मध्ये अफगाणिस्तान,* *2) 1904 मध्ये नेपाळ,* *3) 1906 मध्ये भूतान,* *4)1907 मध्ये तिबेट,* *5)1935 मध्ये श्रीलंका,* *6)1937 मध्ये म्यानमार आणि* *7)1947 मध्ये पाकिस्तान.* *श्रीलंका*: *ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.* *श्रीलंकेचे जुने नाव* *सिंहलदीप होते.* *सिंहलदीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले. सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव तामपर्णी होते.* *सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.* *अफगाणिस्तान*: *अफगाणिस्तानचे प्राचीन नाव पाली भाषेत उपगणस्थान होते आणि* *अफगाणिस्तान हा एक बौद्ध देश होता.* *तो भारताचा एक भाग होता.* *1876 ​​मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.* *करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.* *म्यानमार (बर्मा):* *म्यानमार चे (बर्मा) प्राचीन पाली शब्दात होते.* *1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.* *प्राचीन काळी बौद्ध राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.* *नेपाळ*: *नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.* *भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला नेपाळमध्ये आहे.* *1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.* *काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.नेपाळमध्ये 81 टक्के बौद्ध आणि 9% हिंदू आहेत.* *सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.* *1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण* *जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.* *थायलंड*: *थायलंडला 1393 पर्यंत* *स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.* *स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.* *आजही या देशात अनेक विहार व स्तूप आहेत.* *थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो बुद्धाची विहार आहेत.* *कंबोडिया*: *कंबोडिया पाली नाव कंबोज पासून आले आहे,* *हा अखंड भारताचा भाग होता.* *भारतीय वंशाच्या कौंडिन्य शाक्य वंशाने पहिल्या* *शतकापासूनच येथे राज्य केले.* *येथील लोक बुद्ध यांची पूजा करायचे.* *राष्ट्रभाषा पाली होती.* *कंबोडियामध्ये आजही चेत,* *विशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.* *जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान बुद्धाला समर्पित आहे, हे बोध्द राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.* *अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.* *व्हिएतनाम*: *व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.* *अनेक बोद्ध विहार आजही इथे सापडतील.* *लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ बोद्ध होते.* *मलेशिया*: *मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.* *हा एक पाली शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.* *मलय देशात बुद्ध धर्म पाळला जात होता.* *बुद्धाच्या मूर्तीची पूजा करण्यात यायची.येथील मुख्य लिपी पाली होती आणि पाली ही मुख्य भाषा होती.* *इंडोनेशिया*: *इंडोनेशियाचे प्राचीन नाव पाली शब्दात दीपंतर भारत आहे* *इंडोनेशियाच्या अग्रगण्य संस्थांची नावे किंवा मोटो अजूनही पालीमध्ये आहेत.* *इंडोनेशियन पोलीस अकादमी - धर्म बिजाक्षणा बुद्धा* *इंडोनेशिया राष्ट्रीय सशस्त्र दल - त्रिधर्म एक कर्म* *इंडोनेशिया एअरलाइन्स - गरुड एअरलाइन्स* *इंडोनेशिया गृह मंत्रालय - चरक भुवन* *इंडोनेशिया वित्त मंत्रालय - नगर धन रक्षा* *इंडोनेशिया सर्वोच्च न्यायालय - धर्मायुक्ती* *तिबेट*: *तिबेटचे प्राचीन नाव पाली या *"त्रिविष्ठम" नावाने होते आणी ते दोन भागांमध्ये विभागले गेले होते.* *1907 मध्ये चिनी आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या करारानंतर एक भाग चीनला आणि दुसरा भाग लामाला देण्यात आला.* *1954 मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिबेटला चीनचा एक भाग म्हणून स्वीकारले जेणेकरून चिनी लोकांना एकता दाखवता येईल.* *पुढे चिनी राजवटीने तो भाग सुध्धा बळजबरीने ताब्यात घेतला.* *भूतान*: *1906 मध्ये ब्रिटिशांनी भूतानला भारतापासून वेगळे केले आणि एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली.* *भूतान हा पाली शब्द भू-उत्थान या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ उंच जमीन आहे.* *पाकिस्तान*: *14 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आला.* *मोहम्मद अली जिना 1940 पासून धर्माच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी करत होते जे नंतर पाकिस्तान बनले.* *1971 मध्ये भारताच्या सहकार्याने पाकिस्तानचे पुन्हा विभाजन झाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला.* *पाकिस्तान आणि बांगलादेश पुर्वीच्या भारताचे भाग ऊरले आहेत.* *सेवकराम राऊत यांच्या वाँलवरुन साभार.* ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️ #भारत
Tushar
528 views
1 days ago
#राजकारण #सध्याचं राजकारण #महाराष्ट्रातील राजकारण यासाठी लागणारे पैसे जनतेकडून वसुल होईल, जनतेवर महागाई लादून.*
Tushar
4.6K views
2 days ago
*बेशर्म गोदी मीडिया और उसके दलाल अँकर* #दलाल मीडिया और राजकारण 😷
Tushar
560 views
2 days ago
#राजकारण देशातील सर्वात मोठ्या परीक्षांची: एका आयआयटीयनची डोळे उघडणारी डायरी,* विचार करा, जर देशातील सर्वात हुशार मेंदू घडवणाऱ्या परीक्षाच केवळ पाठांतराचा खेळ बनल्या, तर आपल्या देशाचे भविष्य कसे असेल? आपण विज्ञानात जागतिक क्रांती करण्याचे स्वप्न पाहत असताना, आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पायाच आतून पोखरला जातोय का? सध्या NEET परीक्षेच्या पेपर फुटीमुळे संपूर्ण देशात गदारोळ माजला आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक काळेबेरे आणि गैरव्यवहार समोर येत आहेत. पण हा बिघाड फक्त आजचा नाही, तर याची पाळेमुळे खूप खोलवर रुजली आहेत. नेमका हाच धक्कादायक अनुभव मला माझ्या आयआयटी (IIT) मधील दिवसांची आठवण करून देतो. १९७८ साली आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्या काळात आयआयटीची प्रवेश परीक्षा अत्यंत कठीण असायची. पण त्यात एक मेख होती. तिथे पाठांतराला कवडीचीही किंमत नव्हती. परीक्षा देताना प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पाठांतर केलेले फॉर्म्युले चालत नसत, तर मूलभूत तत्त्वे (basic principles) वापरून तिथेच ऑन द स्पॉट फॉर्म्युला सिद्ध करावा लागायचा. म्हणजेच ज्याचे डोके चालणार, तोच पुढे जाणार पण मग पुढे असे काय घडले की आयआयटीचा हा जागतिक दर्जाचा पायाच हलवून सोडण्यात आला? नंतरच्या काळात आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत एक मोठा बदल करण्यात आला. ही परीक्षा दोन भागात विभागली गेली. यातला पहिला भाग म्हणजे केवळ ऑब्जेक्टिव्ह (पर्यायी) प्रश्नांचा. इथे विद्यार्थ्याला विषयाचे किती सखोल ज्ञान आहे, हे तपासण्याऐवजी फक्त पाठांतर करून प्रश्न सोडवता येऊ लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पहिल्या पाठांतराच्या भागात पास झालात, तरच तुम्हाला खऱ्या ज्ञानाची कसोटी पाहणाऱ्या दुसऱ्या भागाच्या परीक्षेला बसता येऊ लागले. *पण हा अनाकलनीय बदल नक्की केला कोणी आणि का?* सुमारे वीस वर्षांपूर्वी मी याविषयी आयआयटीमधील आमच्या काही जुन्या प्राध्यापकांशी बोललो होतो. त्यांनी सांगितलेले कारण ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या मते, दिल्लीत बसलेल्या उत्तर भारतातील काही सचिवांच्या अट्टाहासामुळे हा बदल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, तिथल्या मोठ्या कोचिंग क्लासेसना थेट फायदा पोहोचवण्यासाठी तर हा उद्योग केला गेला नव्हता ना? असा संशय निर्माण झाला. फक्त प्रवेश परीक्षाच नाही, तर आयआयटीच्या आतल्या शिक्षणाचा दर्जाही अशाच प्रकारे खालावला गेला. आम्ही आयआयटीमध्ये असताना 'कंटिन्युअस इव्हॅल्युएशन' (continuous evaluation) म्हणजे सततचे मूल्यांकन हा आमच्या शिक्षण पद्धतीचा मुख्य कणा होता. आमच्या प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी टेस्ट्स असायच्या. कधी १७ गुणांच्या तीन, तर कधी १७ गुणांच्या दोन आणि ८ गुणांच्या दोन, असे त्याचे साधारण वर्गीकरण असायचे. या छोट्या टेस्ट्सचे ५० टक्के गुण आणि सेमिस्टरच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेचे ५० टक्के गुण मिळून अंतिम निकाल लागायचा. *या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा काय होता माहीत आहे?* या सततच्या परीक्षांमुळे आमच्यावर कधीच परीक्षेचे मोठे दडपण (tension) आले नाही. एखाद्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले, तर पुढच्या टेस्टमध्ये ते भरून काढण्याची सुवर्णसंधी असायची. त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त असायचो. मला आठवतेय, या टेस्टच्या आदल्या दिवशीसुद्धा मी अनेक इतर सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये (extra-curricular activities) उत्साहाने भाग घ्यायचो. पण मग अचानक असे काय झाले की, हा अत्यंत सुंदर आणि यशस्वी ढाचाच मोडून काढण्यात आला? काही वर्षांपूर्वी आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. यावर उपाय सुचवण्यासाठी प्रशासनाने काही बाह्य संस्थांना (external agencies) पाचारण केले. आता या संस्थांना शिक्षण क्षेत्रातील बारकावे किंवा शिक्षणाचा दर्जा कशाशी खातात, याची साधी कल्पनाही नसावी. त्यांनी एक अजब आणि बिनडोक निष्कर्ष काढला. त्यांच्या मते, दर आठवड्याला होणाऱ्या या छोट्या टेस्ट्समुळे विद्यार्थ्यांवर सतत ताण पडतो आणि त्यामुळे या आत्महत्या होतात. या तथाकथित तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून आयआयटीने आपली उत्तम चाललेली पद्धत बंद केली. त्याऐवजी सेमिस्टरच्या मध्ये एकच मोठी 'मिड-सेमिस्टर' परीक्षा (५० टक्के गुण) आणि शेवटी एक 'एंड-सेमिस्टर' परीक्षा (५० टक्के गुण) असा पॅटर्न सुरू केला. *पण या बदलामुळे खरच विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला का?* आमच्या अनुभवानुसार आणि तर्काप्रमाणे, या नवीन पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांवर उलट अधिक प्रचंड ताण येऊ लागला आहे. कारण आता एकाच परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर त्यांचे भवितव्य अवलंबून असते. पण या बाह्य सल्लागारांना आणि त्यांचे अंधळेपणानं ऐकणाऱ्या आयआयटी प्रशासनाला हे समजावून सांगणार कोण? आज आयआयटीचा शैक्षणिक दर्जा खालावण्यामागे अशा अनेक चुकीच्या धोरणांचा हात आहे. जर देशातील सर्वोच्च संस्थांमध्येच असे निर्णय घेतले जात असतील, तर सामान्य शिक्षण व्यवस्थेकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर आपल्या शास्त्रज्ञांनी आणि शिक्षकांनी उभी केलेली ही व्यवस्था वाचवणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटते, परीक्षांमधील वाढते गैरव्यवहार आणि कोचिंग क्लासेसच्या फायद्यासाठी बदलले जाणारे नियम आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहेत का? *🔍 93 26 36 53 96 🔎*