Follow
नीलकंठ
@5401380
13,939
Posts
34,551
Followers
नीलकंठ
828 views
13 days ago
📘📕📗📘📗📕📘 *" महामंगल सुत्त "* मी असे ऐकले . एकदा तथागत अनाथपिंण्डकाच्या जेतवनात राहत होते . त्यावेळी एक सत्पुरुष पहाटे भगवान बुद्ध जिथे होते , तिथे आला आणि भगवंतांना अभिवादन करून एकिकडे उभा राहून म्हणाला " आपण माणसं कल्याणासाठी बरेच मंगल कार्ये करतात . पण मला आपण सांगा की , सर्वात उत्तम मंगल काय आहे ?" * तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले , "मूर्खाची संगती करू नका, सज्जनांची संगती करावी. पूज्यनियांची पूजा करावी हे उत्तम मंगल आहे. * अनुकूल जागी निवास करावा . सत्कार्य करीतच सन्मार्गाला लागावे हेच उत्तम मंगल आहे, * बहुश्रुत होणे, शिल्प शिकणे , सुशिक्षित -विनयशील होणे आणि गोड बोलणे उत्तम मंगल आहे. * आई -वडिलांची सेवाकरणे , पत्नी आणि मुलाबाळांचे योग्य संगोपन करणे उत्तम मंगल आहे. * दान देणे,धम्माचरण करणे,बंधू-बांधवांचा आदरसत्कार करणे व निर्दोष कार्य करणे उत्तम मंगल आहे. * काया वाचा व मनाने पापाचा त्याग करणे, मद्यपान न करणे उत्तम मंगल आहे. * गौरव करणे, नम्र होणे , संतुष्ट राहणे , कृतज्ञ होणे, आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे उत्तम मंगल आहे. * क्षमाशील होणे, आज्ञाकारी होणे, श्रमणाचे दर्शन करणे आणि वेळोवेळी धम्म चर्चा करणे उत्तम मंगल आहे." '' ब्रम्हचर्याच्या पालनाचा प्रयत्न करणे, आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षात्कार उत्तम मंगल आहे. ज्याचे चित्त लोकधर्मात विचलित होत नाही तो मनुष्य शोकरहित , निर्मळ आणि निर्भीड असतो . हेच उत्तम मंगल आहे. अशा प्रकारचे कार्य करून, सगळीकडे अपराजित होऊन जे लोक कल्याणाचे कार्य करतात, हे त्यांच्यासाठी उतम मंगल आहे." !!!सर्वांचे मंगल होवो!!! *नमो बुद्धाय !!!* 📘📕📗📘📗📕📘 #बुद्ध पौर्णिमा #बुद्ध पौर्णिमा #बुद्ध #तथागत गौतम बुद्ध #🙂 शुभेच्छा
नीलकंठ
594 views
20 days ago
*(वाचाल तर वाचाल👇)* डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या आणि प्रगतीच्या महामेरुला नाकारणे आता आवाक्याच्या बाहेर गेल्याने त्यांच्या पासून दोन हात लांब राहणाऱ्या संघटना, व्यक्ती, समाज नाईलाजाने जयंतीत घुसखोरी करून आज त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या समाजाला बदनाम करण्याचे अजंडे राबवत आहेत. सर्व व्यापक होत जाणाऱ्या भीम उत्सवात अनुयायांनी जागृत असणे गरजेचे आहे. नारळ फोडणे, दुग्ध अभिषेक करणे, DJ वर फिल्मि वा थिल्लर गाणी वाजवणे, अशा महाभागांना वेळीच आवरले पाहिजे. कर्ण कर्कश आवाजात कानात बोट घालून मिरवणुकीत लहान मुले, वयस्कर लोक जर सामील होत असतील तर आपण चुकतोय आणि ती चूक आपण सुधारली पाहिजे हे नक्की मनी यायलाच हवे. डॉ.बाबासाहेबांवर अफाट सुंदर आणि प्रेरणादायी गाणी असताना सुद्धा काही मंडळानी DJ वर थिल्लर गाणी वाजताना दुःख होतेच. जयती उत्सव समितीने आप आपल्या मंडळात येणाऱ्या काळात याचे परीक्षण करून DJ ला पहिलीच सक्त ताकीद केली पाहिजे की गाणी ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचीच वाजली पाहिजेत. भिमराया बरोबरच तथागत गौतम बुद्धा पासून ते संत गाडगेबाबा पर्यंत सर्व महापुरुष ज्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजसुधारक लढ्यात मदत केली तेच महापुरुष लोकांना समजले पाहिजेत ( भामशेब,बहुजन समाज पार्टी व इतर संघटनांनी थोपवलेले नव्हेत त्यांना राजकारणात यश मिळावे म्हणून केलेले प्रोपोगँडे आहेत) जयंती झाल्यावर प्रत्येक अनुयायांनी जयंतीचे अवलोकन आणि समीक्षा करून झालेल्या चूका सुधारत आणि चांगले कृती कार्यक्रम वृद्धिंगत करत पुढील उत्सव साजरा केला पाहिजे. बाकी भीम अनुयायांचे कौतुकच आहे की तुम्हीच काही नसताना सुद्धा हा देखणा सोहळा दरवर्षी गेल्या 100 वर्षात जीवावर उदार होऊन साजरा करत आता कुठे या 30- 35 वर्षात तो व्यापक होत आला आहे. हे तुमच्या अथकपणे केलेला परिश्रमातून, शैक्षणिक प्रगतीमुळे, अविरत प्रबोधनात्मक कार्यक्रमातून आणि बदलत्या आर्थिक कारणातून अधिक व्यापक करत आहात. जागृतीचा अग्नी तेवत ठेवताना महिनाभर अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम चालू असतात. तुमच्यामुळेच बंदिस्त करून ठेवलेला आंबेडकरी विचार आज सर्वत्र झिरपत आहे. बाबासाहेबांचे प्रत्येक घटकांसाठी केलेले कार्य त्यांच्यापर्यंत पोहचत आहे आणि बाबासाहेब हे आपले सुद्धा मुक्तिदाते आहेत हे सर्वांना समजत आहेत. जिथे शिक्षणाचा स्तर सुधारत आहे तिथे बाबासाहेब अजून मजबुत होत आहेत. २१ वी सदी ही आंबेडकरी सदी आहे हे मात्र निश्चित आहे. स्वतःचे आत्मपरीक्षण करून आता 364 दिवस कामाला लागा. एकमेका सहाय्य करत, मोक्याच्या जागा काबीज करत , शैक्षणिक प्रगती करत पुढे चालत राहू म्हणजे येणारा 365 वा दिवस अजून गोड साजरा होत राहील सर्व भीम अनुयायांना क्रांतिकारी जय भीम --- #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम #🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती स्टेट्स🩵 #🙏महामानव डॉ. आंबेडकर
नीलकंठ
602 views
24 days ago
"तुझी लायकी नाहीये इथं बसायची, चल मागे जा!" लग्नमंडपात सासूने माझ्या आई-वडिलांना उठवलं... पण जेव्हा मी हातात माईक घेतला, तेव्हा नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला सिक्युरिटी गार्डने धक्के मारून बाहेर काढलं! माझं नाव 'स्वराली'. मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत 'फायनान्शिअल ॲडव्हायझर' म्हणून मोठ्या पदावर काम करते. माझे बाबा, 'माधवराव' हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि नुकतेच निवृत्त झाले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची ३५ वर्षांची पुंजी, म्हणजे जवळपास ४० लाख रुपये, माझ्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते. माझे लग्न 'समीर' नावाच्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी ठरले होते. समीरचे कुटुंब अत्यंत श्रीमंत होते. लग्नाआधीच समीरच्या आईने (माझ्या होणाऱ्या सासूने) एक अट ठेवली होती- *"आम्हाला हुंडा नकोय, पण आमच्या स्टेटसप्रमाणे लग्न लोणावळ्याच्या 'फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्येच' झाले पाहिजे."* मुलीच्या सुखासाठी माझ्या बाबांनी हसत हसत स्वतःचा सर्व 'पीएफ' (PF) आणि रिटायरमेंट फंड मोडून त्या ५-स्टार लग्नाचा सर्व खर्च उचलला. **तो अपमानाचा प्रसंग आणि माझ्या बापाचे डोळे:** लोणावळ्याच्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नाचा दिवस उजाडला. हॉल फुलांनी सजला होता. मी नवरीच्या वेशात स्टेजवर बसले होते आणि समीर माझ्या बाजूला होता. ५०० पाहुणे आले होते. स्टेजच्या अगदी समोर पहिल्या रांगेत 'व्हीआयपी (VIP) सोफे' लावले होते. माझे बाबा आणि आई तिथे जाऊन बसले, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीचे 'लग्न आणि फेरे' जवळून बघता येतील. तितक्यात समीरची आई (सासूबाई) त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींना घेऊन तिथे आल्या. त्यांनी माझ्या बाबांना बघितले आणि अत्यंत तुच्छतेने व मोठ्या आवाजात म्हणाल्या, *"अहो माधवराव, हे 'व्हीआयपी' लोकांसाठी आणि आमच्या खास पाहुण्यांसाठी सोफे आहेत. तुम्ही मुलीवाले आहात, त्यात तुमचे हे साधे कपडे या सोफ्यांना मॅच होत नाहीत. जा, तुम्ही तिथे मागच्या रांगेत जेवणाच्या काऊंटर जवळ जाऊन बसा!"* माझ्या काळजात धस्स झालं. ज्या बापाने या लग्नासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला स्टेजसमोरून कुत्र्यासारखं हाकललं जात होतं! माझ्या बाबांनी कोणताही तमाशा केला नाही... त्यांनी मान खाली घातली, हात जोडले आणि ते शांतपणे आईला घेऊन एकदम शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. मी समीरला म्हणाले, *"समीर, बघ तुझ्या आईने माझ्या बाबांचा किती मोठा अपमान केलाय. त्यांना पुढे बोलाव."* पण समीर अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणाला, *"अगं स्वराली, रिलॅक्स! आईला स्टेटस मेंटेन करावं लागतं यार. तुझे बाबा जुन्या विचारांचे आणि गरीब दिसतात, ते तिथे मागेच ठीक आहेत. तू फक्त स्माईल कर, फोटोग्राफर बघतोय!"* **तो संतापाचा स्फोट आणि माझा 'भयंकर' निर्णय:** समीरचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यांतले अश्रू अचानक आटले. तिथे प्रचंड संतापाची आग पेटली. जो नवरा माझ्या बापाच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो आयुष्यभर माझी काय इज्जत करणार? मी एक सेकंदही विचार केला नाही. मी नवरीचा तो जड शालू सावरला आणि स्टेजवरून थेट खाली उतरले. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. मी चालत थेट डीजे (DJ) च्या माणसाकडे गेले आणि त्याच्या हातातला **'माईक' (Mic)** खेचून घेतला! *"सगळ्यांनी लक्ष द्या!"* माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. मी माईकवर अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, *"समीर आणि त्याच्या घरच्यांना वाटतंय की ते खूप उच्च दर्जाचे लोक आहेत आणि माझे बाबा भिकारी आहेत. बरोबर ना सासूबाई? तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठवून मागे पाठवलं... कारण त्यांची 'लायकी' नाहीये. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका...* *हा जो ५-स्टार रिसॉर्ट आहे, हे जे ५०० लोकांचे ५६ भोग ताटात वाढले आहेत आणि ज्या व्हीआयपी सोफ्यांवर तुम्ही तुमचा 'माज' घेऊन बसला आहात... त्या सगळ्याचे '४० लाख रुपये' माझ्या याच गरीब बापाने भरले आहेत! तुम्ही मुलावाले म्हणून एक रुपयाचाही खर्च केला नाहीये. माझ्या बापाच्या पैशांवर फुकटची मज्जा मारायला आलात आणि माझ्याच बापाला लायकी काढताय?"* हे ऐकताच समीरच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला! समीर धावत खाली आला. *"स्वराली, काय वेडेपणा लावलाय हा? माईक खाली ठेव, आमची इज्जत जातेय!"* तो ओरडला. मी थेट समीरच्या श्रीमुखात अशी एक सणसणीत चपराक मारली की त्याचा माईकवर मोठा आवाज आला! *"तुझी इज्जत? भिकाऱ्यांची कसली आलीये इज्जत?"* मी गरजले. *"तू आणि तुझी आई माझ्या पैशावर विकले गेलेले भिकारी आहात! आणि मी माझ्या बापाच्या पैशातून तुमच्यासारखा 'कचरा' विकत घेणार नाहीये. मी हे लग्न आत्ता याच क्षणी मोडत आहे!"* **पायाखालची जमीन सरकवणारा तो 'मास्टरस्ट्रोक':** समीरचे वडील रागाने पुढे आले आणि म्हणाले, *"तुझी एवढी हिंमत? आता बघ आम्ही काय करतो. एकदा नवरी मंडपातून परत गेली ना, की कोणताच मुलगा तुझ्याशी लग्न करणार नाही! तू आयुष्यभर कुंवारी राहशील आणि हे ४० लाख पाण्यात जातील."* मी एक अत्यंत भेदक स्माईल दिली. मी रिसॉर्टच्या जनरल मॅनेजरला हाक मारली. *"मॅनेजर साहेब, या रिसॉर्टचे पूर्ण बुकिंग कुणाच्या नावावर आहे आणि पेमेंट कोणी केलंय?"* मॅनेजरने माईकवर सांगितले, *"मॅडम, सर्व ४० लाखांचे बुकिंग तुमच्या (स्वरालीच्या) अकाउंटमधून आणि तुमच्या नावावर झाले आहे."* मी समीरच्या बापाकडे बघून हसले आणि म्हणाले, *"ऐकलंत सासरेबुवा? या रिसॉर्टची मालकीण आजच्या दिवसापुरती 'मी' आहे! मॅनेजर साहेब... हे समीर आणि त्याचे नातेवाईक आता माझे पाहुणे नाहीत, ते 'घुसखोर' (Trespassers) आहेत. तुमच्या सिक्युरिटी गार्ड्सना बोलवा आणि या समीरच्या खानदानाला पुढच्या १० मिनिटांत गेटच्या बाहेर काढा! यांच्या ताटातलं जेवणही काढून घ्या!"* पुढच्या ५ मिनिटांत जे घडलं, ते बघून सगळ्या पाहुण्यांचे डोळे विस्फारले! रिसॉर्टच्या ८-१० बाऊन्सर आणि सिक्युरिटी गार्ड्सनी समीरच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या त्या गर्विष्ठ नातेवाईकांना अक्षरशः धक्के मारत, त्यांचे सामान अंगावर फेकत त्यांना रिसॉर्टच्या बाहेर हाकलून दिले! जो माज ते दाखवत होते, तो माज रस्त्यावरच्या धुळीत मिळाला होता! तो सुवर्णक्षण आणि बापाचा सन्मान:** मी धावत गेले आणि माझ्या बाबांना घट्ट मिठी मारली. ते ढसाढसा रडत होते. मी आई-बाबांचा हात पकडला, त्यांना अत्यंत सन्मानाने घेऊन आले आणि स्टेजवरच्या त्या दोन राजेशाही खुर्च्यांवर बसवले. मी माईकवरून माझ्या घरच्या आणि ऑफिसच्या पाहुण्यांना म्हणाले, "हे ४० लाख रुपये पाण्यात गेले नाहीत! आजपासून हे माझे लग्न नाहीये... तर आज माझ्या बाबांच्या *'निवृत्तीचा (Retirement) भव्य सत्कार समारंभ'आहे!* *ज्या बापाने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, आज हा पूर्ण उत्सव फक्त त्यांच्या सन्मानासाठी आहे! तुम्ही सर्वांनी पोटभर जेवण करा आणि माझ्या आई-बाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या!"* पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की त्याच्या आवाजाने रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या समीर आणि त्याच्या कुटुंबाचे कान फाटले असतील! जेव्हा एखादी मुलगी रडत बसण्यापेक्षा किंवा समाजाला घाबरून अपमान सहन करण्यापेक्षा, आपल्या आई-वडिलांसाठी 'रणचंडी' बनते... *तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला एक 'कडक' मेसेज जातो. आज मी कुंवारी असले, तरी मी अभिमानाने जगतेय... कारण मी एक नवरा गमावला, पण माझ्या बापाचा *'स्वाभिमान' जिंकला होता! खोट्या प्रतिष्ठेसाठी झुकण्यापेक्षा, मुलीने दाखवलेला हा *'कडक ॲटिट्यूड'* *आणि आई-वडिलांचा केलेला सन्मान ....* सोशल मीडियावरून साभार🙏 *मिलिंद वानखडे* #🙂Positive Thought #🙂Motivation #☺️सकारात्मक विचार #👧Girls status
नीलकंठ
664 views
26 days ago
😢*झोपेचं सोंग*😪 तुम्ही फक्त नाच गाणं करा उपवर्गीकरण आम्ही लागु करु..!! तुम्ही फक्त बाबासाहेब डोक्यावर घ्या आम्ही मात्र त्यांचे विचार डोक्यात घेऊ..!! तुम्ही फक्त धार्मिक समारंभ करीत राहा आम्ही षडयंत्र घट्ट करु..!! तुम्ही बुध्द तत्वज्ञान फक्त पाठ करा आम्ही मात्र आचरणात आणु..!! तुम्ही फक्त झोपेचं सोंग घ्या आम्ही जागृत राहून संविधान यावर घाला घालु..!! तुम्ही तटागटात विभागले राहा आम्ही त्याचा फायदा घेऊन तुमचे हक्क अधिकार संपवू..!! तुम्ही फक्त साडी माडी गाडी हेवे दावे यातच गुरफटून राहा आम्ही तुमच्यावर राज्य करु..!! तुम्ही सुशिक्षित असुन सुध्दा त्याचा वापर करु नका आम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण बंद करु..!! तुम्ही फक्त राषण आणि भाषण द्या आम्ही तुमच्या भावी पीढीला गुलामी आणि भीकेला लावु..!! विकलेला आणि विभागलेला समाज कधीही प्रगती करु शकत नाही आणि म्हणून म्हणावसं वाटतं विखुरलेले भीम सैनीकांनो नीळ्या नीशाणाखाली एक व्हारे..! घरट्यात परतण्याची वेळ ती आता झाली रे..!! *नमो बुध्दाय जयभीम* 🙏 ✍️✍️*आयु.वनमाला कापसीकर यवतमाळ* #☸️जय भीम #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #राजकारण #राजकारण #राजकारण
नीलकंठ
530 views
29 days ago
#🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती स्टेट्स🩵 #🙂 शुभेच्छा म्हणजे गुलामगिरीची साखळी तोडणे नव्हे तर ती साखळी पुन्हा निर्माण होऊ नये याची व्यवस्था करणे!” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर त्या अन्यायाची मुळेच उपटून टाकण्यासाठी संविधान, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी केली… वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाला मान, हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! जय भीम! जय संविधान!