Follow
किरण जाधव {महाराज}
@58252107
4,120
Posts
7,412
Followers
किरण जाधव {महाराज}
798 views
1 days ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* 👏🏻हात जोडण्याची ताकद🙏🏻 🤚🏻"सोडलेल्या" दोन हातांपेक्षा "जोडलेल्या" दोन हातांमध्ये खूप मोठे सामर्थ्य असते. कारण सोडलेले हात हार मानण्याचे प्रतीक असतात, तर जोडलेले हात आशा, विश्वास, नम्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक असता. 🙂‍↕️जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही अडचणी येतात. कधी आर्थिक संकट, कधी नातेसंबंधातील तणाव, कधी व्यवसायातील अपयश, तर कधी मनाला खचवणारे प्रसंग. अशा वेळी अनेक जण परिस्थितीसमोर हात टेकतात. "आता काही होऊ शकत नाही" असा विचार मनात येतो. पण खरा प्रश्न परिस्थितीचा नसतो, तर त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचा असतो. 🧐जेव्हा आपण हात जोडतो, तेव्हा केवळ प्रार्थना करत नसतो; आपण आपल्या मनाला एक संदेश देत असतो की, "मी अजूनही लढण्यासाठी तयार आहे. मी अजूनही आशावादी आहे."हात जोडणे म्हणजे स्वतःच्या मर्यादा मान्य करून नव्या शक्तीचा शोध घेणे. ते अहंकाराला बाजूला ठेवून संयम, श्रद्धा आणि धैर्य स्वीकारण्याचे प्रतीक आहे.. 🙂‍↔️परिस्थिती नेहमी आपल्या नियंत्रणात नसते. पाऊस कधी पडेल, संकट कधी येईल, लोक कसे वागतील किंवा आयुष्यात कोणती आव्हाने उभी राहतील हे आपण ठरवू शकत नाही. पण त्या प्रत्येक प्रसंगाला कसा प्रतिसाद द्यायचा, हे मात्र आपण ठरवू शकतो. म्हणूनच परिस्थितीपेक्षा मनःस्थिती अधिक महत्त्वाची असते. 📜इतिहास साक्षी आहे की, अनेक महान व्यक्तींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही. त्यांनी परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःची मनःस्थिती बदलली. त्यांनी अडचणींना संधी मानले, अपयशाला अनुभव मानले आणि संघर्षाला यशाचा मार्ग बनवला. 🫠जेव्हा मनात विश्वास असतो, तेव्हा अंधारातही प्रकाश दिसतो. जेव्हा मनात सकारात्मकता असते, तेव्हा बंद दरवाज्यांमागेही नवीन संधी दिसू लागतात. आणि जेव्हा मन शांत, स्थिर आणि दृढता असते, तेव्हा कितीही मोठे संकट असले तरी त्यावर मात करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून आयुष्यात कधी परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटली, तर निराश होऊन हात सोडू नका. हात जोडा, मन शांत करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न सुरू करा. कारण परिस्थिती बदलण्याची सुरुवात मनःस्थिती बदलण्यापासूनच होते. लक्षात ठेवा, हात जोडल्याने केवळ प्रार्थना होत नाही, तर मनाला नवी दिशा, नवसंजीवनी आणि संघर्ष करण्याची ताकद मिळते. मन जिंकले की परिस्थितीही जिंकता येते..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल्या दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #☀️गुड मॉर्निंग☀️ #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏
किरण जाधव {महाराज}
1K views
4 days ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *"ठेच" लागल्यावर* 🪻जेथे आपल्याला ठेच लागते, तिथूनच सवय लावून घ्यावा सांभाळून चालायची..! मग ती पायाला लागलेली असो किंवा मनाला...आयुष्य हा सरळ रस्ता नसतो. प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी ठेच येतेच. काही ठेचा पायाला लागतात, तर काही मनाला. फरक एवढाच असतो की पायाला लागलेली जखम काही दिवसांत भरून येते; पण मनाला लागलेली ठेच अनेकदा खूप काही शिकवण देऊन जाते. 🥴लहानपणी पडलो की पुढच्या वेळी त्या ठिकाणी अधिक सावधपणे चालायला शिकतो. कारण वेदना आपल्याला सावध राहायला शिकवतात. अगदी तसेच नात्यांमध्येही घडते. विश्वासघात, अपमान, दुर्लक्ष किंवा अपेक्षाभंग यामुळे मनाला ठेच लागते. त्या वेदना आपल्याला प्रत्येकावर सहज विश्वास न ठेवण्याची, स्वतःचा स्वाभिमान जपण्याची आणि नात्यांची योग्य निवड करण्याची शिकवण देतात. 🧍🏻खर तर प्रत्येक ठेच ही आपल्याला थांबवण्यासाठी नसते, तर अधिक शहाणे बनवण्यासाठी असते. अपयश आपल्याला तयारी शिकवत, चुका आपल्याला सुधारायला शिकवतात आणि वेदना आपल्याला मजबूत बनवतात. म्हणून प्रत्येक अनुभवाकडे शिक्षा म्हणून नाही, तर शिकवण म्हणून पाहायला शिकले पाहिजे. 👬आयुष्यात काही लोक भेटतात, जे आपल्याला आनंद देतात; तर काही लोक वेदना देतात. पण दोघांचेही योगदान महत्त्वाचे असते. आनंद देणारे लोक जगायला शिकवतात, तर वेदना देणारे लोक स्वतःला जपायला शिकवतात. 🚶🏻‍♂️अनुभवा, मनाला लागलेल्या प्रत्येक ठेचेनंतर कठोर होण्याची गरज नसते; समजूतदार होण्याची गरज असते. कारण कटुता माणसाला एकट करते, पण अनुभव त्याला परिपक्व बनवतो. 💆🏻‍♂️आज जर एखाद्या प्रसंगाने तुम्हाला दुखावल असेल, तर निराश होऊ नका. कदाचित आयुष्य तुम्हाला आणखी मजबूत, संयमी आणि शहाणा बनवत असेल. प्रत्येक ठेच ही नव्या जाणीवेची सुरुवात असते. 💁🏻‍♂️कारण.. जिथे ठेच लागते, तिथूनच सवय लागते सांभाळून चालण्याची. आयुष्यात एखाद्या अनुभवाने मोठी शिकवण मिळते..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️
किरण जाधव {महाराज}
9.3K views
5 days ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* 🌀जीवन केवळ एक प्रवास नाही, ती ईश्वराची अनंत रूपांतून प्रकटणारी एक दिव्य लीला आहे. जेव्हा ते आपल्याला काही देतं, तेव्हा तो उपकार नसतो, तर ती कृपेचा वर्षाव असतो; आणि जेव्हा काही हिरावून घेत, तेव्हा तो संहार नसून, नवे उगम शोधण्याचा एक संकेत असतो. या विश्वरूपात भगवंताने मानवाला दोन अमूल्य देणग्या दिल्या आहेत—'निःस्वार्थ प्रेम' आणि 'अटूट विश्वास'. 🌀ही दोन्ही तत्त्वे म्हणजे दोन कमळे, जी अंतःकरणात रुजल्यावर कधीही कोमेजत नाहीत. कारण ती केवळ मानवी भावना नसून, परब्रह्माच्या चैतन्याचेच अंश आहेत. हीच कमळे आत्म्याला मोक्षमार्गावर नेणारी दिशा दाखवतात, आणि जीवनाच्या गूढतेतून साक्षात् भगवंताशी एकरूप होण्याचा अनुभव देतात. या दोन्ही तत्त्वांमध्ये जीवनाचा खरा अर्थ, आत्म्याचा शाश्वत आधार आणि ईश्वरी कृपेचा सुगंध सामावलेला आहे.. आयुष्यात असे काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही..!!✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿 🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️
किरण जाधव {महाराज}
1.3K views
2 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *"नामस्मरण"* उद्याच्या भविष्याची अनावश्यक चिंता आपण करतो. पण समोरचा वर्तमान आनंदाने जगण्याची परिस्थिती असताना आपण त्या वर्तमानाला दुर्लक्षित करतो. यामुळेच समाधानाची जागा असमाधान घेते.. भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टीही मिळते. नामस्मरणात विज्ञानही आहे आणि अध्यात्मसुद्धा. नामस्मरण हे अध्यात्म आणि विज्ञानाचे सार आहे, म्हणूनच अत्यंत साधा वाटणारा. पण, मोठ्या अधिकाराला नेऊन पोहचविणारा तो अव्दितीय मार्ग आहे. प्रचिती घ्यायचीच असेल तर अनुभव घेण्याला पर्याय नाही.. नवविधा भक्तीमधील नामस्मरण भक्ती वर्तमान कलियुगात सहज, सोपी उपासना आहे. याबाबत संत म्हणतात: स्मरण देवाचे करावे। अखंड नाम जपत जावे। नामस्मरणे पावावे। समाधान।। देवाचे स्मरण करा, यासाठी चिंता सोडा चिंतन करा नामात रहा, म्हणजे मुखात व मनात ईश्वराचे नाव स्मरण करा, यातून तुम्हाला समाधान मिळेल. सहज, सोपी, कोणत्याही वेळी, कुणालाही, कुठेही करता येणारी बिनखर्चाची उपासना म्हणजे 'नामस्मरण; हेच या उपासनेचे वैशिष्ट्य आहे. श्रीमद्भगवद्गीतामध्ये श्री कृष्ण भगवंताने अर्जुनाला ‘यज्ञानां जप यज्ञोस्मि’ म्हणजे सर्व यज्ञांमध्ये जप अर्थात नामस्मरण यज्ञच श्रेष्ठ सांगितला आहे. अखंड नामस्मरणाचे श्रेष्ठत्वच धर्मग्रंथाने सांगितले आहे. *क्रोध वह अग्निकुंड जो आपके हाँथो स्वयं आपकी आहूति करवा देता है..!* ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामस्मरणात राहणे यालाच मोक्ष म्हणतात..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम📿🙏🏻* *आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #शुभ सकाळ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏
किरण जाधव {महाराज}
1.7K views
2 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🧠 तणावमुक्त आयुष्याची प्रभावी गोष्ट🧘🏻‍♂️* 🏃🏻🏃🏻‍♀️आजच्या धावपळीत, प्रत्येकजण काहीतरी साध्य करण्यासाठी झटत असतो. पण हाच संघर्ष अनेकदा तणाव, चिंता आणि मानसिक भार वाढवतो.. 😇शहाण्या लोकांशी गहन चर्चा करणे ही गोष्ट महत्त्वाची असते, पण त्यात बराच वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च होते. प्रत्येक चर्चेमध्ये तर्क, विचारसरणी, आणि निर्णय घेण्याची जबाबदारी येते, जी आपल्याला थकवते आणि तणाव वाढवते.. 🤗त्याऐवजी, हितोशी मित्रांशी बिनकामाच्या गप्पा मारणे, हसणे, आठवणींचा हळूहळू स्मरण करणे, मन मोकळं करणे – हे खूप सोपे पण प्रभावी उपाय आहेत. मित्रांशी गप्पा फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास देतात.. 🗣️जिथे तणाव वाढतो, तिथे वेळ मर्यादित ठेवा. खास मित्रांशी आनंदी, मन मोकळे गप्पा मारा. स्वतःच्या भावना व्यक्त करा, आणि मन हालके करा. जीवनात थोडा हसून आनंद घ्या, मनसोक्त गप्पा अन विश्रांती हिच खरी संपत्ती आहे.. 🧘🏻‍♂️तणावमुक्त आयुष्य म्हणजे फक्त मोठे निर्णय घेणे नाही, तर मन हलके ठेवणे, आनंद शोधणे, आणि साध्या गोष्टींमध्ये समाधान मिळवणे..! "आयुष्याच्या प्रवासात काही नाती मूक असतात, पण त्यांची नि:शब्द साथ आयुष्यच बदलून टाकते. शब्दांशिवाय समजणे आणि काहीही न मागता सर्व काही देणे, ही नाती ना आश्वासनांवर टिकलेली असतात, ना अपेक्षांवर.. ती टिकतात फक्त विश्वासावर आणि शुद्ध भावनेवर.. *😊मनुष्याच्या जीवनात आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे सकारात्मक विचाराने व समाधानी मनाने स्वत: आनंदी रहा व इतरांच्या आनंदात सदैव सहभागी व्हा, हेच आयुष्यातील प्रमुख सत्कर्म आहे हाच यशस्वी, आनंदी व समाधानी जीवनाचा खरा गुरु मंत्र आहे..!!✍🏻* *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदित मंगलमय् हो📿🙏🏻* #शुभ सकाळ #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏
किरण जाधव {महाराज}
1.5K views
2 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *"जैसे~ज्याचे~कर्म"* 🌳खर तर प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास हा कधी कुठल्या वळणावर नेऊन उभा करेल, हे कोणालाच माहीत नसते. कालपर्यंत ऐश्वर्यात, वैभवात आणि प्रतिष्ठेत जगणारा एखादा माणूस एका क्षणात परिस्थितीच्या कठोर वास्तवासमोर उभा ठाकतो आणि तेव्हा जाणवते की, आपल्या हातात खरच काहीच नव्हते. ही केवळ एखाद्या व्यक्तीची गोष्ट नसते, तर ती काळाच्या न्यायाची जाणीव करून देणारी शिकवण असते. ☘️पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता, दिखावा हे सगळ क्षणभंगुर आहे, 'आपले कर्म हेच मात्र कायमचे असतात'. एकेकाळी सुखसोयींच्या शिखरावर असलेले आयुष्य, वेळ बदलताच साध्या वास्तवात येऊन उभे राहत. 😓“वाईट वेळ आली की आपण कोणीही ती टाळू शकत नाही,” हे आपण कितेदा ऐकतो, पण ते प्रत्यक्ष अनुभवतांना मात्र मनाची खरी कसोटी सुरू होते. त्या वेळी आपल्या आजूबाजूची माणस शब्दांनी आधार देतात, सहानुभूती व्यक्त करतात; पण दुःखाचा भार मात्र स्वतःलाच उचलावा लागतो. कारण प्रत्येकाचे दु:ख हे शेवटी त्याच स्वतःचेच असत. 🧐आपण आयुष्यभर काय कमावतो, किती कमावतो, आणि कुणासाठी कमावतो, हे प्रश्न आपण फार क्वचितच स्वतःला विचारतो. पैसा कमावताना आपण माणुसकी हरवून बसतो का? कोणाला दुखावतो का? कोणाच्या हक्कावर गदा आणतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केलेली कमाई कधीच समाधान देत नाही आणि वेळ आली की तीच कमाई आपल्या उपयोगीही पडत नाही. कारण “जसे कर्म, तसे फळ” हा निसर्गाचा नियम आहे. 🧘🏻‍♂️ आपल्या पूर्वजांनी, गुरू साधु-संतांनी दिलेली कर्माची शिकवण ही फक्त ऐकण्यासाठी नव्हे, तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात आपण ही मूलभूत मूल्यं विसरत चाललो आहोत. आपल्या कृतींचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही, तर आपल्या कुटुंबावर, समाजावर आणि पुढच्या पिढ्यांवरही होतो. म्हणूनच प्रत्येक कृतीपूर्वी थोडा विचार करणे आवश्यक आहे. 🤗“जगा आणि जगू द्या” हा केवळ एक विचार नाही, तर आयुष्य जगण्याचा सुंदर मार्ग आहे. दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेण्यात काहीच मोठेपण नाही, तेच जर एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर ती खरी श्रीमंती आहे. माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तर माणुसकी जपणे हीच खरी जबाबदारी आहे. प्रेम, दया, माया, संयम आणि सहानुभूती हीच खरी संपत्ती आहे, जी कोणत्याही वाईट काळात आपल्याला उभे राहण्याची ताकद देते. आजची वेळ आपल्याला एकच गोष्ट शिकवते. उद्या काय होईल, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे आजचे आयुष्य प्रामाणिकपणे, संवेदनशीलतेने आणि चांगल्या कर्मांनी जगणे अत्यंत गरजेचे आहे. 👫दुसऱ्यांसाठी काही चांगले करता आले, तर तेच खऱ्या अर्थाने आयुष्याचे यश ठरेल. शेवटी, या अनिश्चित प्रवासात एक गोष्ट मात्र नक्की आहे.. "जैसे ज्याचे कर्म,तसे फळ देतो रे ईश्वर" म्हणून आपल्या प्रत्येक कृतीत माणुसकी असू द्या... कारण वेळ बदलते, पण कर्माच फल कधीच चुकत नाही..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #शुभ सकाळ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏
किरण जाधव {महाराज}
1.6K views
2 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* अक्षय तृतीयेला लामाईसाच्या क्रियेचा स्वीकार (१६८ उत्तरार्ध) एके दिवशी अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीया आली लखाबाईसाने सर्वज्ञांना विनंती केली "जी जी मी सर्वज्ञच्या ठिकाणी अक्षय तृतीया करीन" सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली "करा" म्हणून सांगितले. तिने उपाहार तयार केला. सर्वज्ञांना तेल, उठणे लावून अंघोळ घातली पूजा अवसर केला. मग ताट केले‌. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुळुणा केला. पानाचा विडा‌ घेतला. सर्वज्ञांना घागरीत काही वेगवेगळे पदार्थ भरून दिले ते पाहून लाहामाइसा दुःख करू लागली. "ही लखुबाईसा दैवा भाग्याची हिने सर्वज्ञाच्या ठाई अक्षयतृतीया केली. मी निर्दैवी माझ्याजवळ काहीच नाही. "सर्वज्ञांनी लामाईसाला विचारले "बाई हिने आमच्या ठायी अक्षयतृतीया केली तुम्ही का करत नाही?" "जी जी मज जवळ तर काहीच नाही"मग सर्वज्ञांनी सांगितले "ही घागर घेऊन जा आतबाहेर धुवा. खोल पाण्यात बुडवुन भरा व आम्हाला द्या मग आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ करू" तिने म्हटले "हो जी" मग घागर घेऊन गंगेला गेली. आत बाहेर घासून स्वच्छ धुतली मग खोल पाण्यात बुडवुन भरून आणली व सर्वज्ञांना समर्पित केली. सर्वज्ञांनी त्या क्रियेचा स्वीकार केला व म्हटले. "बाई आम्ही तुमची अक्षय तृतीया संपूर्ण चरित्रार्थ केली हो" सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय..!!✍🏻 संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻 🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल्या दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #अक्षय तृतीया
किरण जाधव {महाराज}
1.4K views
3 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🧘🏻‍♂️विचारधन📜* *🕰️वेळ ही वाहत्या नदीसारखी असते.🏝️* 🌹 प्रत्येकाने वेळीच आत्मपरीक्षण करीत राहणे आवश्यक आहे, आत्मपरीक्षण हाच यशाचा मार्ग, हाच सफल होण्याचा मार्ग आहे. माझ्या आयुष्यात जे काही होईल, त्यासाठी माझे कर्म किंवा नशीब, यापेक्षा मी स्वतः जबाबदार असेन. अशावेळी नशिबाला, कर्माला दोष देण्यापेक्षा स्वतः कसा बदल घडवून आणता येईल, याकडे जास्त समजून विश्वासाने पाहिले पाहिजे. 🧘🏻‍♂️स्वतःत बदल घडवून आणणे ही परिवर्तनाची प्रक्रिया असते. ही प्रक्रियासुद्धा बाहेरून आणि अंतर्गत घडत असते. बाहेरून होणारे परिवर्तन हे सत्ता, भय, संपत्ती, मोह, लोभ यातून होऊ शकतात. पण, त्या परिवर्तनामध्ये स्थिरता किंवा खोली नसते. परिवर्तन जर घडवून आणायचे असेल, तर त्यासाठी आपली स्वप्ने कशी आहेत, हे फार महत्त्वाचे आहे. ज्या वेळी आपण आपले स्वप्न, ध्येय बदलतो तेव्हाच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येतेच.. 🎉परिवर्तन पण हे सहजा सहजी घडवून येत नाही. का. त्याकरिता एखाद्या गोष्टीविषयी खूप आधी प्रेम उत्पन्न व्हावे लागते. आणि प्रेम निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, मगच त्यादृष्टीने आपण आचरण करू लागतो. ☺️आपण आपल्यासोबत जेव्हा एखाद्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी त्याच्यावर ती स्वप्ने, ती ध्येये किंवा ते आचरण लादून उपयोग नाही. एखादी गोष्ट करताना किंवा बदल घडवून आणताना, जसे प्रेम उत्पन्न होणे गरजेचे आहे. तसेच आपली स्वप्ने, ध्येये बदलली की आपली जीवनाची दिशाही बदलत जाते. जेव्हा एकत्रित कार्य करायचे असेल, तर स्वप्ने एक व्हायला हवीत तरच ध्येयनिश्चिती एक होते. 👉🏻याकरिता समोरच्या व्यक्तीचे भाव समजून घेता यायला हवे, त्याच्या मनातील हेतू, भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकाल, त्याच वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या मनाच्या तळाशी जाऊ शकाल. दुसऱ्याच्या जीवनात जेव्हा आपण बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही प्रेयत्न करता, त्याप्रमाणे त्याला जाणून त्याचे दुःख समजून घेता यायला हवे, सुख-दुःखात सहभागी होता यायला हवे. दुःखी झालेल्या या मनावर हळुवार फुंकर घालता यायला हवी. 🎊याचाच अर्थ स्वतःच्या जीवनाबरोबरच इतरांच्याही स्वप्नांचे आपल्याला सारथी बनता यायला हवे. 🙂‍↕️ वाहत्या पाण्याला एकदा स्पर्श केला, त्याला पुन्हा स्पर्श करता येत नाही, कारण प्रवाहासोबत गेलेले पाणी कधीच परत येत नाही. 🕰️तसेच वेळेचही आहे "एकदा निघून गेलेला क्षण पुन्हा हातात येत नाही". म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण जपा, आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या..!!✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #शुभ सकाळ #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏
किरण जाधव {महाराज}
2.2K views
3 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🙇🏻‍♂️त्रास मनाचा😌* 🙂‍↕️जसे ऑपरेशनच्या वेळी शरीराला भूल दिली जाते, तसेच आयुष्यात कधी कधी मनालाही एखाद्या औषधाची गरज असते. कारण शरीराला होणाऱ्या वेदना क्षणिक असतात, पण मनाला झालेला त्रास खोलवर रुजतो, न दिसणारा, न सांगता येणारा.. 🧖🏻‍♂️शरीर जखमी झाले की औषध, डॉक्टर, काळजी सगळे मिळते. पण मन जखमी झाले की लोक म्हणतात, “वेळ येईल सगळे ठीक होईल." मात्र त्या वेळेपर्यंत मन किती तुटते, किती थकते, याची कल्पनाच कुणाला नसते.. 🙂‍↔️आयुष्यात अनेकदा आपण हसत राहतो, सगळे ठीक आहे असे दाखवत राहतो, पण आतमध्ये मात्र विचारांचा गोंधळ, आठवणींचा त्रास आणि न बोललेली वेदना असते.. 🫀मनाला त्रास होतो तेव्हा शब्द अपुरे पडतात आणि शांतता अधिक बोचरी वाटते. म्हणूनच कधी कधी मनालाही ‘भूल’ हवी असते— थोडा विसावा, थोडे समजून घेणे, आणि कुणीतरी फक्त ऐकून घेणे. कारण शरीर बरे होऊ शकते, पण मनाची जखम भरायला, फक्त औषध नाही तर आपलच माणुस लागत..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदित मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ
किरण जाधव {महाराज}
1.4K views
3 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🥳🎊📜गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा🌳☘️🙏🏻* *चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.! हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण वसंत ऋतूच्या आगमनासोबतच निसर्गात होणारे बदल आणि झाडांना फुटलेली 'चैत्र पालवी' मनाला उभारी देते. गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून तो विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. दारी उभारलेली उंच गुढी, कडुलिंबाचा प्रसाद आणि साखरेच्या गाठी यातून जीवनातील सुख-दुःखाचा समतोल राखण्याचा संदेश मिळतो.. संकटावर मात करून गुढी उभारू नवे संकल्प मनात आता धरू नूतन वर्षाचे स्वागत करताना माणुसकीचे नाते अधिक घट्ट होऊ दे. कडू चव त्या कडूनिंबाची गोड चव त्या साखरेची अशीच गुंफण असते आयुष्याची सुख आणि दुःखाच्या सावलीची, जशी उंच गुढी विजयाचे प्रतीक, तसे, तुमच्या आयुष्य व्हावे कौतुक, प्रत्येक पाऊल यशाकडे वळू दे सण हा आनंदाचा कायम स्मरणात राहू दे.. आयुष्याच्या वाटेवर फुले उमलू दे, सौख्याचा पाऊस तुमच्यावर पडू दे, गुढीपाडवा हा केवळ सण न राहता नव्या आयुष्याची नवी पहाट होऊ दे.. जुन्या जखमांना देऊनी निरोप कायमचा नवीन स्वप्नांना गुढीशी जोडूया, टाकूनी एक पाऊल प्रगतीच्या वाटेवर स्वतःला पुन्हा नव्याने घडवूया.! तुम्हाला या दिवशाच्या खास शुभेच्छा, तुमचे हे नवीन वर्ष आनंदाने उजळून टाकेल. यशाची गुढी आणि समृद्धीची नववर्षावात, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभेच्छा