*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🧘🏻♂️विचारधन📜*
*🕰️वेळ ही वाहत्या नदीसारखी असते.🏝️*
🌹 प्रत्येकाने वेळीच आत्मपरीक्षण करीत राहणे आवश्यक आहे, आत्मपरीक्षण हाच यशाचा मार्ग, हाच सफल होण्याचा मार्ग आहे. माझ्या आयुष्यात जे काही होईल, त्यासाठी माझे कर्म किंवा नशीब, यापेक्षा मी स्वतः जबाबदार असेन. अशावेळी नशिबाला, कर्माला दोष देण्यापेक्षा स्वतः कसा बदल घडवून आणता येईल, याकडे जास्त समजून विश्वासाने पाहिले पाहिजे.
🧘🏻♂️स्वतःत बदल घडवून आणणे ही परिवर्तनाची प्रक्रिया असते. ही प्रक्रियासुद्धा बाहेरून आणि अंतर्गत घडत असते. बाहेरून होणारे परिवर्तन हे सत्ता, भय, संपत्ती, मोह, लोभ यातून होऊ शकतात. पण, त्या परिवर्तनामध्ये स्थिरता किंवा खोली नसते. परिवर्तन जर घडवून आणायचे असेल, तर त्यासाठी आपली स्वप्ने कशी आहेत, हे फार महत्त्वाचे आहे. ज्या वेळी आपण आपले स्वप्न, ध्येय बदलतो तेव्हाच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येतेच..
🎉परिवर्तन पण हे सहजा सहजी घडवून येत नाही. का. त्याकरिता एखाद्या गोष्टीविषयी खूप आधी प्रेम उत्पन्न व्हावे लागते. आणि प्रेम निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, मगच त्यादृष्टीने आपण आचरण करू लागतो.
☺️आपण आपल्यासोबत जेव्हा एखाद्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी त्याच्यावर ती स्वप्ने, ती ध्येये किंवा ते आचरण लादून उपयोग नाही. एखादी गोष्ट करताना किंवा बदल घडवून आणताना, जसे प्रेम उत्पन्न होणे गरजेचे आहे. तसेच आपली स्वप्ने, ध्येये बदलली की आपली जीवनाची दिशाही बदलत जाते. जेव्हा एकत्रित कार्य करायचे असेल, तर स्वप्ने एक व्हायला हवीत तरच ध्येयनिश्चिती एक होते.
👉🏻याकरिता समोरच्या व्यक्तीचे भाव समजून घेता यायला हवे, त्याच्या मनातील हेतू, भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकाल, त्याच वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या मनाच्या तळाशी जाऊ शकाल. दुसऱ्याच्या जीवनात जेव्हा आपण बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही प्रेयत्न करता, त्याप्रमाणे त्याला जाणून त्याचे दुःख समजून घेता यायला हवे, सुख-दुःखात सहभागी होता यायला हवे. दुःखी झालेल्या या मनावर हळुवार फुंकर घालता यायला हवी.
🎊याचाच अर्थ स्वतःच्या जीवनाबरोबरच इतरांच्याही स्वप्नांचे आपल्याला सारथी बनता यायला हवे.
🙂↕️ वाहत्या पाण्याला एकदा स्पर्श केला, त्याला पुन्हा स्पर्श करता येत नाही, कारण प्रवाहासोबत गेलेले पाणी कधीच परत येत नाही.
🕰️तसेच वेळेचही आहे "एकदा निघून गेलेला क्षण पुन्हा हातात येत नाही". म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण जपा, आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#शुभ सकाळ #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏