Follow
किरण जाधव {महाराज}
@58252107
4,128
Posts
7,406
Followers
किरण जाधव {महाराज}
583 views
19 hours ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* अक्षय तृतीयेला लामाईसाच्या क्रियेचा स्वीकार (१६८ उत्तरार्ध) एके दिवशी अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीया आली लखाबाईसाने सर्वज्ञांना विनंती केली "जी जी मी सर्वज्ञच्या ठिकाणी अक्षय तृतीया करीन" सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली "करा" म्हणून सांगितले. तिने उपाहार तयार केला. सर्वज्ञांना तेल, उठणे लावून अंघोळ घातली पूजा अवसर केला. मग ताट केले‌. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुळुणा केला. पानाचा विडा‌ घेतला. सर्वज्ञांना घागरीत काही वेगवेगळे पदार्थ भरून दिले ते पाहून लाहामाइसा दुःख करू लागली. "ही लखुबाईसा दैवा भाग्याची हिने सर्वज्ञाच्या ठाई अक्षयतृतीया केली. मी निर्दैवी माझ्याजवळ काहीच नाही. "सर्वज्ञांनी लामाईसाला विचारले "बाई हिने आमच्या ठायी अक्षयतृतीया केली तुम्ही का करत नाही?" "जी जी मज जवळ तर काहीच नाही"मग सर्वज्ञांनी सांगितले "ही घागर घेऊन जा आतबाहेर धुवा. खोल पाण्यात बुडवुन भरा व आम्हाला द्या मग आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ करू" तिने म्हटले "हो जी" मग घागर घेऊन गंगेला गेली. आत बाहेर घासून स्वच्छ धुतली मग खोल पाण्यात बुडवुन भरून आणली व सर्वज्ञांना समर्पित केली. सर्वज्ञांनी त्या क्रियेचा स्वीकार केला व म्हटले. "बाई आम्ही तुमची अक्षय तृतीया संपूर्ण चरित्रार्थ केली हो" सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय..!!✍🏻 संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻 🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल्या दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #अक्षय तृतीया
किरण जाधव {महाराज}
799 views
12 days ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🧘🏻‍♂️विचारधन📜* *🕰️वेळ ही वाहत्या नदीसारखी असते.🏝️* 🌹 प्रत्येकाने वेळीच आत्मपरीक्षण करीत राहणे आवश्यक आहे, आत्मपरीक्षण हाच यशाचा मार्ग, हाच सफल होण्याचा मार्ग आहे. माझ्या आयुष्यात जे काही होईल, त्यासाठी माझे कर्म किंवा नशीब, यापेक्षा मी स्वतः जबाबदार असेन. अशावेळी नशिबाला, कर्माला दोष देण्यापेक्षा स्वतः कसा बदल घडवून आणता येईल, याकडे जास्त समजून विश्वासाने पाहिले पाहिजे. 🧘🏻‍♂️स्वतःत बदल घडवून आणणे ही परिवर्तनाची प्रक्रिया असते. ही प्रक्रियासुद्धा बाहेरून आणि अंतर्गत घडत असते. बाहेरून होणारे परिवर्तन हे सत्ता, भय, संपत्ती, मोह, लोभ यातून होऊ शकतात. पण, त्या परिवर्तनामध्ये स्थिरता किंवा खोली नसते. परिवर्तन जर घडवून आणायचे असेल, तर त्यासाठी आपली स्वप्ने कशी आहेत, हे फार महत्त्वाचे आहे. ज्या वेळी आपण आपले स्वप्न, ध्येय बदलतो तेव्हाच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येतेच.. 🎉परिवर्तन पण हे सहजा सहजी घडवून येत नाही. का. त्याकरिता एखाद्या गोष्टीविषयी खूप आधी प्रेम उत्पन्न व्हावे लागते. आणि प्रेम निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, मगच त्यादृष्टीने आपण आचरण करू लागतो. ☺️आपण आपल्यासोबत जेव्हा एखाद्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी त्याच्यावर ती स्वप्ने, ती ध्येये किंवा ते आचरण लादून उपयोग नाही. एखादी गोष्ट करताना किंवा बदल घडवून आणताना, जसे प्रेम उत्पन्न होणे गरजेचे आहे. तसेच आपली स्वप्ने, ध्येये बदलली की आपली जीवनाची दिशाही बदलत जाते. जेव्हा एकत्रित कार्य करायचे असेल, तर स्वप्ने एक व्हायला हवीत तरच ध्येयनिश्चिती एक होते. 👉🏻याकरिता समोरच्या व्यक्तीचे भाव समजून घेता यायला हवे, त्याच्या मनातील हेतू, भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकाल, त्याच वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या मनाच्या तळाशी जाऊ शकाल. दुसऱ्याच्या जीवनात जेव्हा आपण बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही प्रेयत्न करता, त्याप्रमाणे त्याला जाणून त्याचे दुःख समजून घेता यायला हवे, सुख-दुःखात सहभागी होता यायला हवे. दुःखी झालेल्या या मनावर हळुवार फुंकर घालता यायला हवी. 🎊याचाच अर्थ स्वतःच्या जीवनाबरोबरच इतरांच्याही स्वप्नांचे आपल्याला सारथी बनता यायला हवे. 🙂‍↕️ वाहत्या पाण्याला एकदा स्पर्श केला, त्याला पुन्हा स्पर्श करता येत नाही, कारण प्रवाहासोबत गेलेले पाणी कधीच परत येत नाही. 🕰️तसेच वेळेचही आहे "एकदा निघून गेलेला क्षण पुन्हा हातात येत नाही". म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण जपा, आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या..!!✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #शुभ सकाळ #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏
किरण जाधव {महाराज}
2K views
27 days ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🙇🏻‍♂️त्रास मनाचा😌* 🙂‍↕️जसे ऑपरेशनच्या वेळी शरीराला भूल दिली जाते, तसेच आयुष्यात कधी कधी मनालाही एखाद्या औषधाची गरज असते. कारण शरीराला होणाऱ्या वेदना क्षणिक असतात, पण मनाला झालेला त्रास खोलवर रुजतो, न दिसणारा, न सांगता येणारा.. 🧖🏻‍♂️शरीर जखमी झाले की औषध, डॉक्टर, काळजी सगळे मिळते. पण मन जखमी झाले की लोक म्हणतात, “वेळ येईल सगळे ठीक होईल." मात्र त्या वेळेपर्यंत मन किती तुटते, किती थकते, याची कल्पनाच कुणाला नसते.. 🙂‍↔️आयुष्यात अनेकदा आपण हसत राहतो, सगळे ठीक आहे असे दाखवत राहतो, पण आतमध्ये मात्र विचारांचा गोंधळ, आठवणींचा त्रास आणि न बोललेली वेदना असते.. 🫀मनाला त्रास होतो तेव्हा शब्द अपुरे पडतात आणि शांतता अधिक बोचरी वाटते. म्हणूनच कधी कधी मनालाही ‘भूल’ हवी असते— थोडा विसावा, थोडे समजून घेणे, आणि कुणीतरी फक्त ऐकून घेणे. कारण शरीर बरे होऊ शकते, पण मनाची जखम भरायला, फक्त औषध नाही तर आपलच माणुस लागत..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदित मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ
किरण जाधव {महाराज}
1.3K views
1 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🥳🎊📜गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा🌳☘️🙏🏻* *चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.! हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण वसंत ऋतूच्या आगमनासोबतच निसर्गात होणारे बदल आणि झाडांना फुटलेली 'चैत्र पालवी' मनाला उभारी देते. गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून तो विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. दारी उभारलेली उंच गुढी, कडुलिंबाचा प्रसाद आणि साखरेच्या गाठी यातून जीवनातील सुख-दुःखाचा समतोल राखण्याचा संदेश मिळतो.. संकटावर मात करून गुढी उभारू नवे संकल्प मनात आता धरू नूतन वर्षाचे स्वागत करताना माणुसकीचे नाते अधिक घट्ट होऊ दे. कडू चव त्या कडूनिंबाची गोड चव त्या साखरेची अशीच गुंफण असते आयुष्याची सुख आणि दुःखाच्या सावलीची, जशी उंच गुढी विजयाचे प्रतीक, तसे, तुमच्या आयुष्य व्हावे कौतुक, प्रत्येक पाऊल यशाकडे वळू दे सण हा आनंदाचा कायम स्मरणात राहू दे.. आयुष्याच्या वाटेवर फुले उमलू दे, सौख्याचा पाऊस तुमच्यावर पडू दे, गुढीपाडवा हा केवळ सण न राहता नव्या आयुष्याची नवी पहाट होऊ दे.. जुन्या जखमांना देऊनी निरोप कायमचा नवीन स्वप्नांना गुढीशी जोडूया, टाकूनी एक पाऊल प्रगतीच्या वाटेवर स्वतःला पुन्हा नव्याने घडवूया.! तुम्हाला या दिवशाच्या खास शुभेच्छा, तुमचे हे नवीन वर्ष आनंदाने उजळून टाकेल. यशाची गुढी आणि समृद्धीची नववर्षावात, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभेच्छा
किरण जाधव {महाराज}
1.4K views
1 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿🌹💞* *"विचारधन* 🙂‍↕️मनुष्याच्या जीवनात अनेक गुण असतात, पण काही उणिवाही असतात. अनेकदा या उणिवा स्वीकारण्याऐवजी माणूस इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या मर्यादा मान्य करण्यापेक्षा आपण वेगळे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला की मनुष्य हळूहळू सत्यापासून दूर जातो. पण खरे ज्ञान हे केवळ बोलण्यात किंवा दिखाव्यात नसते, ते अनुभवातून जन्माला येते. अनुभव हा जीवनाचा खरा शिक्षक आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यातील घटना पाहून थोडेफार शिकता येते, पण त्या प्रसंगाचे खरे आकलन ते स्वतः अनुभवल्या नेच होते. जीवनातील आनंद, वेदना, संघर्ष आणि समाधान या सगळ्या गोष्टी माणसाला घडवत असतात. म्हणूनच पैशाने सुखसोयी विकत घेता येतात, पण अनुभव आणि शहाणपण कधीच विकत घेता येत नाही. 😌आपले जीवन चार पुरूषार्थांवर उभे आहे—कर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चारही गोष्टींचा समतोल साधला की जीवन समृद्ध होते. लहानपणी शिक्षकांकडून शिक्षण, तरुणपणी वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रौढपणी संत- सद्गुरू ज्ञानी जनांचा सहवास आणि वार्धक्यात समर्पणाची भावना, या प्रत्येक टप्प्यावर मिळणारे संस्कार जीवनाला परिपूर्णतेकडे नेतात. जीवनात एखादी गोष्ट टाळणे आणि ती नाकारणे यातही मोठा फरक आहे. जे समजत नाही ते टाळले जाते, पण जे चुकीचे आहे ते धैर्याने नाकारले जाते. मात्र अहंकार, लोभ आणि दिखावा यामुळे माणूस योग्य मार्गापासून दूर जातो. 🧘🏻‍♂️संतांचे विचार आपल्याला नेहमी सांगतात की लोभ आणि अहंकार सोडून सद्गुरूंच्या मार्गावर चाललो तरच जीवनात खरी शांतता आणि समाधान मिळते. अनुभवी वडीलधाऱ्यांचा सल्ला, संतांचा मार्ग आणि स्वतःचे प्रामाणिक कर्म—यांच्यातूनच जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ सकाळ
किरण जाधव {महाराज}
475 views
1 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🫟🪂🎨“होळी, रंगपंचमी आणि प्रेम – मनांना जोडणारा सण”🫟🎊🌈* *🌈रंगात रंगून साऱ्यांना सुखात चिंब न्हाऊ दे,🎨* *🪂सौख्याचे आनंद तरंग जीवनात राहू दे.!!🎊* होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर तो प्रेमाचा, आनंदाचा आणि मनातील सर्व भिंती तोडणारा सण आहे. या दिवशी प्रत्येक रंग एक भावना घेऊन येतो. लाल रंग प्रेमाची उब देतो, पिवळा रंग मैत्रीची गोडी वाढवतो, हिरवा रंग नव्या नात्यांची सुरुवात दर्शवतो, तर निळा रंग विश्वासाची खोली दाखवतो. जेव्हा हे सर्व रंग एकत्र येतात, तेव्हा आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण बनते. प्रेमही होळीच्या रंगांसारखंच असते. कधी गडद, कधी हलके, कधी शांत, तर कधी उत्साहाने भरलेले. जसे होळीमध्ये आपण एकमेकांना रंग लावतो, तसेच प्रेमातही आपण एकमेकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत असतो. प्रेमात अहंकार नसावा, फक्त जिव्हाळा आपुलकी असावी. रंगाचा सण शिकवते की मनातील राग, द्वेष आणि गैरसमज दूर करून आदराने, प्रेमाने एकमेकांना आपलेसे करावे. होळी पासून सुरू होणारा रंगोत्सव खरा अर्थ म्हणजे मन मोकळे करून प्रेम व्यक्त करणे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर प्रेमाचा रंग लावते, तेव्हा तो रंग फक्त चेहऱ्यावर राहत नाही, तर मनातही कायमचा बसतो. जसे होळी आपल्याला सांगते की आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण प्रेमाने, आनंदाने आणि रंगांनी भरून जगावे. शेवटी, होळी, रंगपंचमी हा सण आपल्याला एक सुंदर संदेश देतो~ *“🪂प्रेमाचे रंग जितके जास्त उधळाल, तितके आयुष्य अधिक रंगीत आणि आनंदी होईल.”🎨* संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻 *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल्या आयुष्य विविध रंगाने भरलेल्या सृष्टी प्रमाणे सुखमय व आनंदी होऊन आपला दिवस रंगोत्सात थांबून जावो शुभेच्छा🌈🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #रंगपंचमी
किरण जाधव {महाराज}
2.7K views
1 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *||जागतिक महिला दिन शुभेच्छा||* 👩🏻‍🚀👩🏻‍🎤🕵🏻‍♀️👷🏻‍♀️👩🏻‍🎓🤵🏻‍♀️👸🏻💃🏻 ८ मार्च हा दिवस जगभरातील महिलांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि त्यांच्या यशाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. स्त्री ही केवळ घराची आधारस्तंभ नाही तर ती समाजाची आणि देशाच्या प्रगतीचीही महत्त्वाची शक्ती आहे. मुलगी, आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, वहिनी, काकी, मामी, नणंद, भावजय, महिला सहकारी, आज्जी, पणजी अशा अनेक नात्यांमध्ये ती प्रेम, त्याग आणि सामर्थ्याचे उदाहरण दाखवते. महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. स्त्री कर्तृत्वाला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा आणि मनःपूर्वक शुभेच्छा..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जागतिक महिला दिन
किरण जाधव {महाराज}
1.3K views
1 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *अति-आसक्ती, अहंकार आणि बदला* 📖महाभारत हे केवळ युद्धाचे वर्णन करणारे महाकाव्य नाही, तर मानवी जीवनाचे आरसाप्रमाणे सत्य दर्शन घडवणारे ग्रंथरत्न आहे. “यतो धर्मस्ततो जय:” हा त्याचा मूलमंत्र आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. धर्म म्हणजे केवळ आचार-विचार नव्हे, तर सत्य, न्याय आणि आपल्या कर्तव्याची प्रामाणिक जाणीव होय. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी धर्माची साथ सोडू नये, हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. कुरुक्षेत्रावर भगवद्गीता मधून श्रीकृष्णांनी दिलेला कर्मयोगाचा सिद्धांत जीवनाला दिशा देतो.. 📜“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.” फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करत राहणे, हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. धृतराष्ट्राचा मोह, दुर्योधनाचा अहंकार, शकुनीचा सूड आणि कर्णाचा नैतिक संघर्ष आपल्याला शिकवतात की अति-आसक्ती, अहंकार आणि बदला हे विनाशाकडे नेतात. क्षमा, संयम आणि विवेक हेच खरे शस्त्र आहेत. महाभारत सांगते—नियतीवर विश्वास ठेवा, पण प्रयत्न कधीही सोडू नका. योग्य निर्णय घेण्याचे धैर्य ठेवा, कारण जीवनात प्रत्येक क्षणी धर्म आणि अधर्म यांचा संघर्ष चालू असतो. आजच्या दैनंदिन जीवनातही या विचारांचा स्वीकार केला, तर आपले प्रत्येक पाऊल अधिक सजग, संतुलित आणि यशस्वी ठरेल..!!✍🏻 *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞 जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ सकाळ
किरण जाधव {महाराज}
1.4K views
1 months ago
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *"स्व: चिंतन"* *🕴🏻चांगले व्यक्तिमत्त्व फक्त दिसण्याबद्दल नसते, तर ते आपल्या वागण्याबद्दल आणि सवयींबद्दल असते, कधीकधी आपण नकळत अशा चुका करतो ज्या आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. आपण अनेकदा असे विचार करतो की चांगले व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त चांगले कपडे किंवा दिसणे, परंतु मानसशास्त्र सुचवते आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे ते जे त्यांच्या कुतूहलाने, संभाषण कौशल्याने आणि भावनिक बुद्धिमत्तेने इतरांचे मन जिकल्या जाते..* *🙇🏻‍♂️आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी स्वतः मध्ये बदल करावा लागतो. बघा मनोरंजक असणे हा जन्मजात गुण नाही, मग लोक अशा व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात ज्यांना स्वतः बद्दल आरामदायी पणा जोपासता येतो..* *😇मानसशास्त्रज्ञांच्या मते, जे नेहमी हसतमुख व आनंदी असतात, इतरांबद्दल त्यांच्या मनात व्देष, राग नसतो. दुसर्यांचे दुःख कमी करण्यातही ते नेहमीच चर्चेत असतात. जर दुसर्यांनी तुमचे ऐकावे आणि तुमचा आदर करावा असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतः मध्ये छोट्या छोट्या सवईचे बदल अवलंबयाला आवश्यक आहे..* *🙋🏻‍♂️लोक स्वतः ला चांगले दाखवण्यासाठी अनेकदा बर्याच चुका करून बोलतात. मग तुम्ही दुसर्यांसाठी व स्वतः साठी अधिक विनाशक दिसता. आपण योग्य बोलण्याने, प्रेमाने वागल्याणे, आदराने विचारल्याणे आणि लक्षपूर्वक स्वतःच्या चुका समजून घेतल्याने जिवनात आनंद निर्माण होतोच..* *🧘🏻‍♂️मानसशास्त्र असे सुचवते की जेव्हा तुम्ही दुसर्या व्यक्तीमध्ये रस दाखवता ते तुमच्या मध्ये पण आस्ते पण आपण स्वतःला बदलत नाही, चांगले ऐकल्याने समजून घेतल्याने एक बुद्धिमान प्रतिमा तयार करण्यास मदत होऊ शकते..* *🤗प्रेमाने प्रेम मिळते, तर रागाने, द्वेषाने स्वाचे नुकसान होते. "जे जसे आपण जमीनीत धान्य पेरतो ते तसेच अधिक प्रमाणात उगवते", त्याच प्रमाणे आयुष्य आपल्याला बरेच अनुभव मिळतात. यातच समजनार्याला सर्व काही कळते..!!✍🏻* *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ सकाळ