Follow
कैलास किसन बोंबले
@884574
4,272
Posts
3,233
Followers
कैलास किसन बोंबले
529 views
13 hours ago
#श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. (वरळी) महिलेचा आक्रोश भाजपला 'खाक' करेल.* *बेताल, मस्तवाल राज्यकर्ते, निगरगठ्ठ पोलीस आणि लाचार प्रशासन यंत्रनेला जोरदार थप्पड..* भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली वरळीत (मुंबई) काढण्यात आलेल्या मोर्चामुळे भयंकर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीने एका आईचा, एका महिलेच्या संतापाचा उद्रेक झाला. तिने अक्षरश: रौद्र रूप धारण करत महाजन यांच्यासह पोलीस अधिकारी, मोर्चेकरी महिला यांना जाब विचारला. ही धाडसी महिला पोलिसांना खडसावत असतानाच्या क्लिप्स सर्वत्र व्हायरल झाल्या आहेत. *'या भूमंडळी' आपल्याला कोण अडवणार,* असा भाजपचा समज असावा. मात्र हा मनसुबा, त्या खवळलेल्या वाघिणीने धुळीस मिळवला. त्या महिलेचा लहान मुलगा शाळेत होता. शाळा सुटण्याची वेळ झाली होती. मात्र भाजपच्या मोर्चेकऱ्यांनी रस्ता अडवला होता. भर रस्त्यात मंत्री गिरीश महाजन चॅनेलला मुलाखती देत होते. दीड तास रस्ता अडवला होता. आपला लहान मुलगा शाळा सुटल्यावर काय करेल, या धास्तीने ती महिला कासावीस झाली. अखेर तिच्या ममतेचा बांध फुटला आणि ती हिम्मत करून मोर्चेकऱ्यांच्या अंगावर धावली. आवेशाने ती ओरडून सांगत होती.. *Get out.. चालते व्हा..* महिलांची दिशाभूल करण्यासाठी मुंबईत भाजपने महिलांचाच मोर्चा काढला होता. ‘मतदारसंघ विधेयक पारित झाले नाही‘ असे न म्हणता, ‘महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही‘ अशी आवई उठवत सत्तेतील लोकांनीच जनतेमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे काढले आहेत. वरळीत निघालेला मोर्चा त्याचसाठी होता. या मोर्चाच्या अनुषंगाने आणि या महिलेच्या संतापाच्या उद्रेकामुळे काही प्रश्न विचारावेसे वाटतात - पोलिसांकडे किमान सहा ते सात दिवस आधी अर्ज करूनही मोर्चे, आंदोलकांना परवानगी दिली जात नाही.. इथे मात्र लगेच परवानगी कशी दिली? वरळी येथे कोस्टल रोडचे काम सुरु असल्याने आधीच त्या भागात वाहतुकीवर खूप मोठा ताण पडतोय आणि सातत्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत, हे या परिसरातील नागरिकांना आणि अर्थातच पोलिसांनाही ठाऊक आहे. मग ज्या भागात आधीच वाहतूक कोंडी होतेय तिथे मोर्चाची परवानगी कशी काय देण्यात आली? अशा प्रकारचे मोर्चे निघतात तेव्हा, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने वाहतुकीच्या मार्गात बदल करत असल्याचे महितीवजा निवेदन प्रसिद्धीस दिले जाते. असे काही निवेदन मुंबई पोलिसांनी दिले होते का? दिले नसेल तर का दिले नव्हते? अखेरचा प्रश्न - असा क्रोधावतार एखाद्या खेडूत वा ग्रामीण भागातील मराठी महिलेने पोलिसांच्यासमोर धारण केला असता तर महिला पोलिसांनी तिच्या केसांना धरून फरफटत नेले असते. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तिच्यावर गुन्हे दाखल केले असते. काल असे काही घडले नाही. नेमकी कशाची आणि कुणाची भीती वाटली? की याचे कव्हरेज करणारे बरेच कॅमेरे तिथे होते त्यामुळे हे सर्वजण मुकाट राहिले का? काहीही असो. महिना दीड हजारांची लाडकी लाच घेऊन आपला स्वाभिमान आणि लढण्याचा हक्क गमावून बसलेल्या स्त्रियांपेक्षा खमकेपणाने जाब विचारणारी ही महिला खूप शक्तिशाली वाटली! किंबहुना स्त्रियांनी आपल्याला जाब विचारू नये, त्यांनी अनुदानाची लाच घेऊन मेंढरासारखे बसून राहावे असे भाजपला वाटते. याला सुरुंग लावण्याचे काम या महिलेने केले. लोकशाही आणि संविधानाने हे अधिकार आपल्याला दिले आहेत याचा विसर अनेकांना पडला होता, त्यांना जागे करण्याचे काम या घटनेने केले आहे. एकाही वृत्तवाहिनीने वा प्रमुख दैनिकाच्या वर्तमानपत्राने या घटनेबद्दल प्रश्न उपस्थित केले नाहीत किंवा ही घटना दाखवली नाही. पत्रकार इतके गर्भगळीत झाले आहेत का?
कैलास किसन बोंबले
11.9K views
5 days ago
🚨 “संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?” 🚨 देशाचा राजकीय नकाशा बदलतोय… पण हा नकाशा फक्त सत्तेच्या सीमा रेखा बदलत नाही — भारताच्या लोकशाहीच्या आत्म्यालाच नव्याने घडवण्याचा एक शांत, सूक्ष्म आणि भयावह प्रयत्न तर नाही ना? आज जे घडत आहे, ते निवडणुका जिंकण्याचे साधे गणित नाही. हे आहे — संख्या, सत्ता, संरचना आणि संविधानावर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्याची रणनीती! 🤔शांतपणे घडणारा हा ‘मोठा खेळ’… एकामागून एक राज्यांत एकाच पक्षाचे मुख्यमंत्री… केंद्रात भक्कम सत्ता… राज्यसभेत हळूहळू वाढता प्रभाव… हे सगळे एकत्र जोडले तर एकच प्रश्न उभा राहतो — हा फक्त राजकीय विस्तार आहे, की संविधान बदलण्यासाठी आखलेले ‘परफेक्ट पॉलिटिकल ब्ल्यूप्रिंट’? ⚖️ संविधान — कागद नव्हे, देशाचा प्राण आहे! भारतीय संविधान म्हणजे: ✔️ स्वातंत्र्याची हमी ✔️ समानतेचा पाया ✔️ न्यायव्यवस्थेचा कणा पण… या संविधानात बदल करण्यासाठी एक शक्तिशाली ‘दार’ उघडे आहे — कलम ३६८ ! 📌 कलम ३६८: बदलाचा दरवाजा (अधिकृत प्रक्रिया) संविधान दुरुस्ती करण्यासाठी: - लोकसभा + राज्यसभा — प्रत्येकी एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्यांपैकी २/३ बहुमत - विशेष प्रकरणांत (फेडरल रचना, न्यायपालिका, राष्ट्रपती निवड, केंद्र-राज्य शक्ती वाटणी) — किमान अर्ध्या राज्यांच्या विधानसभांची मंजुरी म्हणजे, फक्त दिल्लीत सत्ता पुरेशी नाही… राज्यांवरही पूर्ण नियंत्रण हवे! 🧠 खरी रणनीती कुठे दडली आहे? - राज्यांमध्ये वाढते एकपक्षीय वर्चस्व - विरोधकांची सतत मोडतोड - स्वतंत्र संस्थांवर वाढता प्रभाव हे सगळे मिळून तयार होत आहे संविधान बदलण्यासाठी लागणारी ‘परफेक्ट मशीन’! 📜 कोणत्या कलमांवर घाला पडू शकतो? (संविधानाच्या अभ्यासानुसार स्पष्ट उल्लेख) १. मूलभूत हक्क (कलम १२ ते ३५) - कलम १४: समानतेचा अधिकार - कलम १९: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण, लेखन, संघटनेचा अधिकार - कलम २१: जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार - कलम ३२: न्याय मिळवण्याचा हक्क (सर्वोच्च न्यायालयात थेट दाद मागण्याचा अधिकार) जर इथे बदल झाला तर… नागरिक ‘हक्कधारक’ राहणार नाहीत, तर ‘सरकारच्या अनुमतीवर जगणारे’ बनतील! २. संविधानाची मूलभूत रचना (Basic Structure Doctrine — सर्वोच्च न्यायालयाने १९७३ केसवानंद भारती खटल्यात स्थापित) लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्य, न्यायिक स्वातंत्र्य — यावर कोणताही सरकार आक्रमण करू शकत नाही. पण… जर या संकल्पनांना वाकवण्याचा प्रयत्न झाला तर? ३. संघराज्य व्यवस्था (कलम २४६ + सातवी अनुसूची) केंद्र आणि राज्यांच्या शक्तींचे संतुलन. जर राज्यांवर एकाच पक्षाचे वर्चस्व आले तर हे संतुलन कोसळेल! ४. स्वतंत्र संस्था निवडणूक आयोग, न्यायपालिका, CBI, ED — या ‘रक्षक’ संस्थांवर नियंत्रण आले तर लोकशाही फक्त ‘नावापुरती’ उरेल. 🔥 योगायोग की सुनियोजित खेळ? एकामागून एक राज्ये… विरोधकांवर कारवाई… केंद्रीय यंत्रणांचा वापर… ही लोकशाही आहे की नियंत्रणाची नवी, आधुनिक पद्धत? 🚨 धोक्याचे चित्र किती भीषण आहे? जर संविधान बदलले तर — ❌ तुमचे मूलभूत हक्क (कलम १४, १९, २१) बदलतील ❌ स्वातंत्र्य मर्यादित होईल ❌ सत्तेचे केंद्रीकरण वाढेल ❌ लोकशाही ‘व्यवस्था’ राहणार नाही — ती ‘नियंत्रित प्रणाली’ बनेल! ✊ इतिहास काय सांगतो? जेव्हा नागरिक गप्प बसतात… सत्ता मनमानी करते. जेव्हा प्रश्न विचारले जात नाहीत… उत्तरंही मिळत नाहीत! ⚡ अंतिम सत्य… संविधान कोणत्याही सरकारचे नाही — ते जनतेचे आहे! जर ते बदलायचे असेल, तर आवाजही जनतेचाच उठला पाहिजे! 📢 आता निर्णय तुमचा आहे… फक्त प्रेक्षक राहणार? की विचार करणार, प्रश्न विचारणार आणि आवाज उठवणार? 🔥 जागा हो, भारत जागा हो! ही वेळ आहे विचार करण्याची… आणि लढण्याची!! #SaveConstitution #लोकशाही_धोक्यात #संविधान_वाचवा #कलम३६८ #मूलभूत_हक्क #भारत_जागा_हो (शेअर करा… चर्चा करा… जागृत व्हा! 🇮🇳) #🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कैलास किसन बोंबले
1.4K views
5 days ago
महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य अर्पण करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समाजपरिवर्तनाची नवी दिशा दिली. स्त्री सन्मान आणि समानतेचा विचार रुजवण्यासाठी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरते. महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे #थोर_समाजसुधारक_महर्षी_धोंडो_केशव_कर्वे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार
कैलास किसन बोंबले
546 views
5 days ago
आज जागतिक वारसा दिन. इतिहासाचा सन्मान आणि संस्कृतीचा अभिमान जपत आपला वारसा जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्या परंपरेचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
कैलास किसन बोंबले
495 views
5 days ago
महिलांना 33 टक्के आरक्षण लोकसभा व विधानसभेत असावे हे विधेयक 23 मध्येच पास झालेले आहे. 29 ला हे आरक्षण द्यावेच लागेल. संसदेत असलेल्या 543 पैकी 33 टक्के म्हणजे 179 जागा महिलांना सोडव्या लागतील. आता गाय पट्ट्यातील म्हणजे उत्तर प्रदेश,राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरात येथील संसदेच्या जागा वाढवून सतत आपली सत्ता राखण्याचा भाजपचा प्लॅन फेल झाला. विरोधकांकडे असलेल्या 230 सदस्यांपैकी 54 सदस्यांची मते भाजप फोडू शकलं नाही इतकंच..! यात अजून एक मुद्दा असा आहे की मनुस्मृती मानणाऱ्या सरकारला महिलांच्या जागा नुसत्या वाढवायच्या नाहीत तर त्याच बरोबर पुरुषांच्या कमी झालेल्या खपणार नाही..! 33 टक्के आरक्षण महिलांना दिल्यास पुरुषांच्या जागा कमी होणार. हे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या दोन देशातील नागरिकत्वाचा मुद्दा बाहेर काढण्यात आला...! आता लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की 1 ली पासून हिंदी का शिकायची ते...! #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कैलास किसन बोंबले
534 views
9 days ago
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समतेचा विचार मांडणारे #महामानव_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार विनम्र अभिवादन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मी असे एक पुस्तक लिहिणार ज्यात सगळी माणसं समान असतील' हा जो संकल्प केला होता, तो त्यांनी #भारतीय_संविधानाच्या रूपाने प्रत्यक्षात उतरवला.... श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कैलास किसन बोंबले
557 views
18 days ago
क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जो सन्मान राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केला. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत." "माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?" 1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती.आईनस्टाईन नम्रपणे म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!” ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी 2006 मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हणाले,“आमच्या कुटुंबात बालपण गरिबीत गेले. आईची कमाई वाचवण्यासाठी आम्हाला खूप गणिती पद्धतीने व्यवस्थापन करावे लागले. कदाचित त्यामुळेच मला लहानपणापासूनच गणितात थोडे कौशल्य विकसित करता आले. गरिबीचा तो टप्पा आता माझ्या आयुष्यात नसल्यामुळे मी इतक्या पैशाचे काय करू?” या लोकांची नम्रता पाहून मान खाली घालावी लागते. हे विनम्र आणि डाउन टू अर्थ लोक आपल्याला वारंवार आठवण करून देतात की नम्र असण्याचा अर्थ समाजाच्या नजरेत कमी प्रतिष्ठेचा होतो असे नाही, तर ते त्यांच्यामध्ये जीवनापेक्षा खूप मोठे चित्रण करते. एक म्हण आहे की 'आकाश ही नम्रतेची मर्यादा आहे आणि कोणत्याही स्तरावर खाली झुकण्याची कोणतीही मर्यादा नाही' #राहुल_द्रविड ❣️ श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🏏राहुल द्रविड द वॉल
कैलास किसन बोंबले
863 views
20 days ago
३ एप्रिल १६८०… तो दिवस फक्त इतिहासात नाही, तर प्रत्येक मराठी मनात कोरलेला आहे… ज्या हातांनी स्वराज्य घडवलं, ज्या धैर्याने मुघलांना थरारलं, ज्या बुद्धीने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं… तेच हात आज शांत झाले… रायगडावर आजही तो क्षण जिवंत आहे, जिथे प्रत्येक दगड रडतो, प्रत्येक वारा “राजे…” असं हाक मारतो… महाराज गेले नाहीत, ते प्रत्येक मराठी रक्तात जिवंत आहेत, प्रत्येक स्वाभिमानात, प्रत्येक लढ्यात… छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त नाव नाही, तो एक विचार आहे… एक ज्वाला आहे… जी कधीच विझणार नाही… राजे, तुमची उणीव आजही जाणवते… पण तुमचा अभिमान आम्हाला जगायला शिकवतो… #छत्रपती_शिवाजी_महाराजांना_विनम्र_अभिवादन श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
कैलास किसन बोंबले
839 views
21 days ago
🚩 हनुमान पाळणा 🚩 झोका दे रे मारुतीराया, अंजनीच्या लाडक्या बाळा । झोका दे रे वायुपुत्रा, रामदूत बलवंत बाळा ॥ डोंगर उचलून आणणारा, सीतेचा तू शोध लावणारा । लंकाधीशाला धडा शिकवणारा, रामनाम गाणारा बाळा ॥ झोका दे रे बजरंगबळा, भक्तांच्या तू धावून आला । संकट मोचन नाव तुझे, रक्षण कर आम्हा सगळ्यांचे ॥ जय जय हनुमंता, जय बजरंगबळा । अंजनीच्या लाडक्या बाळा, झोका दे रे मारुतीराया ॥ 🚩 श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #राम
कैलास किसन बोंबले
596 views
28 days ago
*उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥* *शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥* *मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थीर ॥३॥* *धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशी चक्रपाणी ॥४॥* *सुशोभित दाही दिशा । आनंद नर नारी शेषा ॥५॥* *नाही कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥६॥* *अयोनी संभव । प्रगटला हा राघव ॥७॥* *नामा म्हणे डोळां । पाहीन भुवनत्रयपाळा ॥८॥* *-श्री संत शिरोमणी प्रेममुर्ती नामदेव महाराज* *अखिलकोटी ब्रह्मांडनायक, रघुकुलवंत, अयोध्याधीश, मर्यादा पुरुषोत्तम, कौशल्या दशरथनंदन, जानकीपती, भक्तवत्सल भगवान प्रभू श्रीराम जन्मोत्सव. *चैत्र शुद्ध नवमी, रामनवमी* 🚩 श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #राम