Follow
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,151
Posts
7,084
Followers
Amar kokate Patil
714 views
4 hours ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #१९_एप्रिल_१६७३ छत्रपती शिवाजीराजे ससैन्य कर्नाटकतील हुबळी प्रांताच्या मोहिमेवर चालून गेले.🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_एप्रिल_१७९७ रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा गलेफ तयार केला. छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_एप्रिल_१८१८ दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १९ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_एप्रिल_१९१० क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली. अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला, त्याला अटक करण्यात आली. कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला, २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
935 views
2 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१६७५ फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१६८२ कारवारचे बंदर शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी अंजदिव नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनाऱ्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझना शह देण्यासाठी हे ठिकाण सोयीचे होते हे जाणून संभाजीराजेंनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरू केली त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदिव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१७२० बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१७३९ छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Amar kokate Patil
1.1K views
3 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #१६_एप्रिल_१६६८ ( वैशाख पौर्णिमा, शके १५९०, किलक, गुरूवार ) छत्रपती शिवाजी महाराजांनी मरळ देशमुख यांस अभय दिले. 🚩🏇🚩 #१६_एप्रिल_१६७३ प्रतापराव गुजर काकांची हुबळीवर स्वारी! अत्यंत आक्रमकपणे इंग्रजांची हुबळीची वखार पुरुषभर खणत्या लावून लुटली. इंग्रज रेकॉर्डनुसार ७८९४ होणाचे नुकसान इंग्रजांचे झाले. नुसती लुटली नाही तर खोल खड्डा करून खणत्या लावून लुटली. 🚩🏇🚩#१६_एप्रिल_१७७५ आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किलेदाराने मारून टाकले. 🚩🏇🚩
Amar kokate Patil
821 views
6 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१६६३ नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले व ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१६६५ किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१७०० छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यांनी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१७०४ संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकड़े निघाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१७३१ छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
794 views
8 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१७३८ वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१८२७ जोतीराव गोविंदराव फुले जन्म. कटगुण, सातारा,महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
873 views
9 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६० राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता, परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती. माऱ्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी, तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा. ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे. दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६२ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६९३ १६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली. याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१७५८ 🔥सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम🔥 सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
888 views
9 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६० राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता, परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती. माऱ्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी, तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा. ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे. दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६२ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६९३ १६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली. याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१७५८ 🔥सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम🔥 सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
623 views
10 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६३३ स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६६९ उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात. सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला, या पाशवी हुकुमाने जणू निसर्ग थरारला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६६० पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तेशामखान हा मेला; यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६७० औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा हीचे ९ एप्रिल १६७० ला निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६८२ मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार "रामजी" व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
841 views
11 days ago
🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६५७ २७ वर्षीय शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला. शिवाजीराजांनी मातब्बर घराण्यांबरोबर तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाईसाहेब यांचा महाराजांच्या बरोबर विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६६३ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून (औरंगाबादला ) सध्याच्या छत्रपती संभाजी नगर येथे जाण्याच्या तयारीस लागला. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवाजी राजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर थोड्याच दिवसात दिनांक ८ एप्रिल १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते तळबीडकर यांना "हंबीरराव” या किताबतीसह "सरनौबतकीची” वस्त्रे दिली गेली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७५ छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७८ दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन, पुढील प्रवास किल्ले रायगड. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६८३ मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #🙏शिवदिनविशेष📜
Amar kokate Patil
2.3K views
14 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१६६३ सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी ची घटना. घरात घुसुन मारणं कशाला म्हणतात माहीतीये का..? दिनांक ५ एप्रिल १६६३🔥 मध्यरात्र 🔥 लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जीवलग घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शहिस्तेखानाची बोटे छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!.. जास्तित जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने..कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव......🚩 हो पुर्ण पराभव......⚔️ 👉आज बोटं गेलीयेत, उद्या मुंडकं जाईल या भितीनं शहिस्ताखान याने पुण्यातुन अक्षरशः पळाला..🏇 ☝याला म्हणतात घरात घुसुन मारणं..!. खान कसाबसा पसार मात्र खानाची बोटे महाराजांनी कापली. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद ) जाउन थांबला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१७१८ मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही." 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩