#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_जानेवारी_१६४२
शहाजी राजे कर्नाटकास जातात.
माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले, त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली.
लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले,
त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शहाजीराजांना लिहीले आहे.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#३०_जानेवारी_१६८०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या, इंग्रजांच्या तोफा आग् ओतत होत्या,
आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला ठणकावून सांगत होते.
अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#३०_जानेवारी_१६८१
छत्रपती संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे यातून अलोट संपत्ती मिळविली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#३०_जानेवारी_१६८९
छत्रपती संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुक्काम रत्नागिरी च्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये , मोजक्या सैन्यासोबतचा हा मुक्काम काही दिवसात हलणार होता.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_जानेवारी_१७१५
कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह:-
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.
मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला,
असे समाधान शाहू छत्रपतींना झाले.
३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात
१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला.
तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.
२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩