फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,150
पोस्ट
7,043
फॉलोअर्स
Amar kokate Patil
604 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६० छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला.
Amar kokate Patil
644 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 १९ फेब्रुवारी इ.स.१६३० हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरूषोत्तम, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरी जन्म झाला..!
Amar kokate Patil
1.3K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_फेब्रुवारी_१६३०⚔ #समस्त_हिंदू_बांधवांच्या_दैवताचा_जन्मदिन #श्री_शिवछत्रपती_महाराज_जन्मदिवस #किल्ले_शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )🚩 शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० साली "बाळ शिवबा राजांचा जन्म झाला." भीमाशंकराच्या जठात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उष्:काल झाला, शिवरायांचा जन्म झाला, पुत्र जिजाऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजीराजेंना झाला, पुत्र सहयाद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला....! १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका मराठा वतनदाराच्या घरात शिवाजी नामक एक पुत्र जन्मला❤️ ही गोष्ट तत्कालीन कालखंडात खास नोंद व्हावी किंवा अगदीच कृष्ण रामासारखा अवतारी पुरुष जन्माला यावा इतकीही खास नाही🙌 पण ह्या देवमाणसाने अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात जो काही कर्तृत्ववान तेजस्वी आणि ओजस्वी असा इतिहास घडवला😍 त्या इतिहासाने आजही जनसामान्यात प्रेरणा निर्माण होते🚩 आजही त्यांचे नाव घेता अंगावर काटा उभा राहतो🚩 आजही त्याचा त्याग, निष्ठा अन् स्वातंत्र्यप्रेम पाहून डोळ्यात अश्रू उभे राहतात🚩 आणि आजही त्याच्या गडकोटांची उंची पाहताना उर फुलतो🔥 छाती दोन इंच फुगते 🚩मुजरा राजं मुजरा 🚩 ✍️ शिवछत्रपतींच्या जन्म तारखेवर वादविवाद होते परंतु महाराष्ट्र सरकारने २००१ साली इतिहासकारांची समिती बनवुन संशोधन करत १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून जाहीर केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
3.7K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #१८_फेब्रुवारी_१५७६ महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध:- महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खान सुरी (हा दिल्ली चा एकेकाळ चा बादशाह शेरशाह सुरी चा वंशज) या अफगाणी मुस्लिम सेनानी कडे होते, तर बादशहा अकबराकडून मोगलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह (जयपूर चा राजा, मिर्झाराजा जयसिंह चे आजोबा) हे हिंदू राजा करत होते. १८ फेब्रुवारी १५७६ साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध लढत होते. 🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१६५३ छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाल भटास वर्षासन दिले. ( फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, शके १५७४, संवत्सर नंदन, शुक्रवार ) महाराजांनी गोपाळ भटांना वर्षासन नेमून दिले! श्री क्षेत्र महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधर भट हे ' सुर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते ' होते. आजच्या दिवशी महाराजांनी गोपाळ भटांना पत्र लिहून " स्वामींनी सुर्यानुष्ठाण करावे " ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले. 🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१६६६ मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले. 🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१७५५ तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशव्यांनी करवीरकरांशीहि कारस्थान आरंभिले तेव्हां करवीरकर यांनी तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारात दिला. 🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१७५६ दिनांक १८ फेब्रुवारी १७५६ रोजी समशेर बहाद्दर यांनी रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला. उत्तर हिंदुस्थानातील राघोबादादांच्या मोहीमेत समशेर बहाद्दर सामील होते मात्र कोकणातील मोहीमेवर जाण्याकरीता उत्तरेकडील मोहीम सोडून समशेर बहाद्दर सन १७५५ च्या मे महिन्यात कोकण मोहीमेवर रवाना झाले. कोकणातील मोहीमेनंतर समशेर बहाद्दर यांना पून्हा उत्तरेत राजपुताना मोहीमेवर पाठविण्यात आले. 🚩🏇🚩
Amar kokate Patil
952 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #१७_फेब्रुवारी_१६६३ छत्रपती श्री शिवरायांनी "केळशी" जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६८९ छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा "संभाजी" कशासच बधत नाहीत, हे पाहून किमान शंभूराजे पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार शंभूराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३८ पोर्तुगीजांनी धारावी जिंकला. १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. "यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ नारायणराव पेशव्यांच्या नंतर "रघुनाथराव" पेशवे झाले. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३९ मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८१ सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे) 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८३ क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू. 🚩 #संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड #सहयाद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य @history_maharashtra🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #१७_फेब्रुवारी_१६६३ छत्रपती श्री शिवरायांनी "केळशी" जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६८९ छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा "संभाजी" कशासच बधत नाहीत, हे पाहून किमान शंभूराजे पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार शंभूराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३८ पोर्तुगीजांनी धारावी जिंकला. १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. "यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३ नारायणराव पेशव्यांच्या नंतर "रघुनाथराव" पेशवे झाले. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३९ मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८१ सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे) 🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८३ क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू. 🚩
Amar kokate Patil
1.4K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_फेब्रुवारी_१६३५ मुघल सरदार शाहिस्तेखान हा वीस हजाराची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निःघाला 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #१६_फेब्रुवारी_१६५९ छत्रपती शिवाजी महाराजांनी चाफळ जिंकून स्वराज्यात सामील केले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #१६_फेब्रुवारी_१६८१ राजाभिषेक सोहळ्याच्या अवघ्या एका महिन्या नंतर १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #१६_फेब्रुवारी_१७०४ औरंगजेबने राजगड़ जिंकून त्याचे नाव नबिशाहगड़ ठेवले. येथून तो पुढे किल्ले तोरण्याकडे निघाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_फेब्रुवारी_१७१९ मराठ्यांची दिल्लीला धडक फर्रुखसियर आणि सय्यद अब्दुल्लाखान यांच्यातील तणाव वाढत गेला. सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले. त्याच्याकडे ५० हजार फौज होती. शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजीपंतांना ५० हजार फौजेनिशी त्याच्या मदतीला दिले. बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे ५० हजार रुपये याप्रमाणे दरमहा १५ लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर, बिदर, वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद आणि हैद्राबाद अश्या ६ प्रांतांची चौथाई-सरदेशमुखी देण्याचेही आश्वासन दिले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोहीमेच्या यशानंतर साक्षात येसूबाईसाहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले. सर्व बाजूंनी लाभदायी अश्या या मोहीमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते. त्यांचे वय त्यावेळी अगदीच १८-१९ वर्षांचे असेल परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केलेली होती. अश्या या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी १६ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीदरवाजावर धडक दिली. सय्यद बंधू आणि बाळाजीपंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतया उभा करुन त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या. २८ फेब्रुवारीला जराश्या वादाचे निमित्त होऊन हुसैनअलीने बादशाहचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्याजागी रफ़िउद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले. जवळजवळ ३० वर्षांनंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
692 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१६५८ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबला पाठवलेल्या पत्राचे उत्तर औरंगजेबकडून आले. १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही जिंकल्यावर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. “मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे”, असे त्यास कळविले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१६६५ दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१६७१ ( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९२, संवत्सर साधारण, मंगळवार ) दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली! होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवूनच साजरा करीत असत. या वेळेची शिकार होती मेहेरूफ - ए - जंजिरा! याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिऱ्यातच गुंतले होते. जंजिऱ्याच्या आजूबाजूचा दंडाराजापुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम, सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत यांनीसुद्धा दंडाराजापुरी मराठ्यांकडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्रमार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली. या दिवशी दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१७५५ रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८) नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१७५७ इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र:- “आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
973 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६३० मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६५९ छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.....☝️ " शिवाजी हिंदुसेनाधिपति " 🚩 म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपतिआहेत. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६६० शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली व या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा सर्व माल सोडून दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१७१२ कान्होजी आणि इंग्रजांत तह:- कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१७२३ श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी माळव्यात बोलशा येथे दुसरी भेट झाली. मोगली सुभेदार दयाबहादूर मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्यास विरोध करू लागला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी त्याच्याकडे वकीलही पाठवीला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१७३९ कर्नालची लढाई:- पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला, या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
See other profiles for amazing content