Follow
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,196
Posts
7,082
Followers
Amar kokate Patil
736 views
1 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१६६३ नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले व ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१६६५ किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१७०० छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यांनी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१७०४ संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकड़े निघाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_एप्रिल_१७३१ छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
751 views
3 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१७३८ वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१८२७ जोतीराव गोविंदराव फुले जन्म. कटगुण, सातारा,महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
819 views
4 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६० राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता, परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती. माऱ्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी, तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा. ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे. दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६२ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६९३ १६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली. याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१७५८ 🔥सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम🔥 सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
841 views
4 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६० राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता, परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती. माऱ्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी, तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा. ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे. दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६२ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६९३ १६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली. याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१७५८ 🔥सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम🔥 सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
590 views
5 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६३३ स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६६९ उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात. सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला, या पाशवी हुकुमाने जणू निसर्ग थरारला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६६० पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तेशामखान हा मेला; यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६७० औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा हीचे ९ एप्रिल १६७० ला निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६८२ मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार "रामजी" व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
817 views
6 days ago
🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६५७ २७ वर्षीय शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला. शिवाजीराजांनी मातब्बर घराण्यांबरोबर तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाईसाहेब यांचा महाराजांच्या बरोबर विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६६३ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून (औरंगाबादला ) सध्याच्या छत्रपती संभाजी नगर येथे जाण्याच्या तयारीस लागला. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवाजी राजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर थोड्याच दिवसात दिनांक ८ एप्रिल १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते तळबीडकर यांना "हंबीरराव” या किताबतीसह "सरनौबतकीची” वस्त्रे दिली गेली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७५ छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७८ दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन, पुढील प्रवास किल्ले रायगड. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६८३ मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #🙏शिवदिनविशेष📜
Amar kokate Patil
2.3K views
9 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१६६३ सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी ची घटना. घरात घुसुन मारणं कशाला म्हणतात माहीतीये का..? दिनांक ५ एप्रिल १६६३🔥 मध्यरात्र 🔥 लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जीवलग घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शहिस्तेखानाची बोटे छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!.. जास्तित जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने..कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव......🚩 हो पुर्ण पराभव......⚔️ 👉आज बोटं गेलीयेत, उद्या मुंडकं जाईल या भितीनं शहिस्ताखान याने पुण्यातुन अक्षरशः पळाला..🏇 ☝याला म्हणतात घरात घुसुन मारणं..!. खान कसाबसा पसार मात्र खानाची बोटे महाराजांनी कापली. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद ) जाउन थांबला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१७१८ मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही." 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.1K views
10 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते. ३ वर्ष पुण्यातील जनतेला त्रस्त करून सोडणाऱ्या औरंग्याच्या मामाचा , त्या शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती. राजांनी शाहिस्तेखानाची शिकस्त कशी करायची याबद्दल योजना आखल्या गेल्या, झाली तयारी, आता फक्त प्रतीक्षा होती उद्याच्या मध्य रात्रीची........⚔️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६७० मराठे नगरमध्ये घुसलेले पाहून ‘दाऊदखान कुरेशी’ हा खानदेशातून ७००० स्वारांसह नगरला आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात माघारी परतले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते निघून गेले, मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६७९ छत्रपती शिवाजी महाराजांची विजापुरजवळील शहापूर येथे स्वारी 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६८३ शिवाजीराजांच्या पासून स्वराज्यात असलेला मुन्शी काझी हैदर फितूर झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.7K views
14 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #३१_मार्च_१६५९ ( ५८-५९ ) राजे शिवरायांनी इ.स.१६५९ मध्ये किल्ले खेळणा जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड🚩 विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे छत्रपती महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे मूठभर मावळे घेऊन कित्येक तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु आणि बांदल देशमुखांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले म्हणूनच आज आपल्याला विशाळगड हा किल्ला दिसत आहे. (पण आजची विशाळगडाची दुर्दशा पाहवत नाही. किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामे पाहून मनात अतीव वेदना होतात व संताप सहन होत नाही 🙇) 🚩🏇🚩 #३१_मार्च_१६६५ मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु. मिर्झाराजे जयसिंह या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही बरोबर दिला. जयसिंह आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही, हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी आपले वयोवृद्ध पण अनुभवी सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांस ८० हजाराची फौज आणि दिलेरखान पठाणास पाच हजार पठाणांची फौज देऊन महाराष्ट्रात पाठविले आणि मिर्झाराजांनी ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. 🚩🏇🚩 #३१_मार्च_१६८४ १६८४ च्या सुरुवातीस मोगल सरदार मामूरखान याने सुपे, बारामती आणि इंदापूर येथे मुघली ठाणी स्थापन केली. १३ फेब्रुवारी १६८४ रोजी शहाजादा आलम आणि त्याचा मुलगा बेदारबख्त यांना बादशहाने बहादूरगडाकडे रवाना केले. ३१ मार्च रोजी शहाबुद्दीन ऊर्फ गाजिउद्दीन हा पुणे आणि करडे निमोणे या प्रदेशाकडे रवाना झाला. 🚩🏇🚩
Amar kokate Patil
913 views
15 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_मार्च_१६६३ सरसेनापती नेतोजी पालकर जखमी. मोघली मुलुखात छापा टाकण्यासाठी नेतोजी पालकर गेले होते पण दैव प्रतिकूल होते, परंतु मोगली मूलखातच मुघल फौजेन त्यांना गाठले व चकमक झाली, त्यांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु बळ कमी पडल्याने मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच नेतोजींना दुखापत होऊन ते जायबंदी झाले. परंतु मराठी सैन्याचा पाठलाग करत मुघल सैनिक विजापुरात दाखल झाले यावेळी रुस्तुम ए जमान याने मोगलांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले व पूढे दर्याखोऱ्यांचा अनवट मुलुख आणि जंगले असल्याने नेतोजींचा पाठलाग करू नये असू सांगून मुघल सैन्य माघारी वळवले, रुस्तुम ए जमान आणि शिवरायांचा अंतस्थ स्नेह अशा प्रकारे उपयोगास आला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_मार्च_१७२९ थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतापुर इथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत. त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले. बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले. त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ ✍️ जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।। ✍️ सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे. अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩