Follow
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,117
Posts
7,192
Followers
Amar kokate Patil
966 views
11 hours ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१६६० "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१६६६ "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_आॕगस्ट_१७४९ चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१७५५ थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१७६० सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
5.5K views
1 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१६५४ शिवाजीराजांनी निळोपंताना पुरंदरसाठी इनामपत्र दिले. हे पत्र खालील प्रमाणे मसरूल हजरत अखंडित लक्ष्मी राजमान्य नीळकंठराऊ प्रती राजेश्री सिवाजी राजे दंडवत ।। उपरी ।। तुम्ही राजेश्री बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिल्याप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले व कित्येक मुखवचने नाईक माइले हाती सांगोन पाठविले तिही सविस्तर सांगितले व नाईक बोलिले की आम्ही त्यांसी तह केला आहे की जैसे काही राऊ गोसावी साहेबांसी वर्तत होते तैसेची हेही साहेबांसी वर्ततील व साहेब जैसे राजश्री राऊ गोसावी यांचे चालवत होते तैसेच यांचेही चालवावे ऐसा निश्चय करून आपण आलो असो म्हणऊन बोलिले ।। तरी जे काही बाबाजी नाईक तुम्हासी निश्चय केला तोच आमचा निश्चय आहे ।। जैसे काही राऊ गोसावी आम्हासी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हास वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राऊ गोसावी यांचे चालवित होतो तैसेच तुमचे चालऊन ।। एविशई आम्हास श्रीची व राजश्री साहेबांच्या पायांची व सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायांची आण असे व ये विशयी श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमान वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तोन ।। तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही ।।छ ६ सौवाल सु।। खमस खमसैन अलफ ।। हे पत्र पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले दिसते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१९४२ #ऑगस्ट_क्रांती_दिन इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे #९_आॅगस्ट अर्थात #क्रांती_दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी #९_आॅगस्ट_१९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. #जय_हिंद🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.6K views
3 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #७_ऑगस्ट_१६७५ आजच्या दिवशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळागड जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #७_ऑगस्ट_१६७९ किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #७_ऑगस्ट_१७९० पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती.महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलम ला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले. पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही, त्यांनी एकत्र येऊन २९ जुलै ला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला. यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले. महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलम ला गादीवर बसवले.शहाआलम ने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #७_ऑगस्ट_१९१४ रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. रवींद्रनाथ टागोर हे थोर साहित्यिक, कवी, नाटककार , संगीतकार व चित्रकार होते, त्यांचे साहित्यक्षेत्रातील नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व होते. तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे, सृजन साहित्यिक म्हणून ते ओळखले जात. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
3.9K views
4 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #६_आॅगस्ट_१६४८ किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #६_ऑगस्ट_१६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #६_ऑगस्ट_१६५९ ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #६_ऑगस्ट_१६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्ती ला आले. या मुक्कामात महाराजाना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते. डच मंडळींना पायदळाचे सैनिक महाराजांच्या नाजूक अल्कटिव्ह असणाऱ्या तोरणपट्टानी सजवलेल्या महाराजांच्या तंबूत घेऊन गेले.डच मंडळी तंबूत बसल्यावर शिवराय तंबूत आले. त्यांच्यासोबत जनार्दन व रघुनाथ पंडित होते. शिवराय आपल्या आसनावर बसल्यावर जनार्दन पंडित त्यांच्यासमोर तर रघुनाथ पंडित महाराजांच्या जवळ उजवीकडे बसले. शिवराय जेंव्हा तंबूत आले तेंव्हा तंबूत असणारे सारे उठून उभे राहिले. महाराजानी यावेळी सोनेरी नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात मुठीला सोन्याचा वर्ख लावलेला पट्टा होता. भेटीत महाराजांनी डचाना कौल दिला व त्यांचा अधिकारी निकोलस क्लेमेंट यांच्याशी मैत्रीपूर्ण बोलनी केली. यावेळी डचानी महाराजाना चंदेरी कपडा, ८ रुंद तलवारी, ३३ पौंड चंदन, २ पेट्या गुलाबपाणी, ३ हरणाची कातडी, ४८ पौंड लवंग, जायफळ, १ चांदीचा पानपुडा, ३ छोट्या सोनसाखळ्या या भेटवस्तू दिल्या. महाराजांनी डचानाही भेटवस्तू देऊन निरोप दिला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Amar kokate Patil
2.7K views
5 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_ऑगस्ट_१६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील "खोपडे देशमुख" हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच "खोपडे देशमुख" घराण्यात नेहमीच भाऊबंदकीचा वाद व्हायचा पण शिवरायांच्या मध्यस्तीने व सामंजस्याने हा वाद पूर्णपणे मिटवला गेला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #५_ऑगस्ट_१६७७ छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #५_ऑगस्ट_१६८९ नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती पद मिळाले. रणझुंजार सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मानाचा मुजरा. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.2K views
6 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_ऑगस्ट_१६६८ शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले. शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी तह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रीत केले. धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी महाराजांनी आपली मोहिम‌ उघडली व त्यात जैतापूरवर हल्ला करून ते जिंकुन घेतले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #४_ऑगस्ट_१७३० भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म. भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर, दि. ४ ऑगस्ट १७३० रोजी चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला. शनिवारवाड्यावर चौघडा वाजू लागला. पुण्यात साखरा वाटल्या गेल्या. सदाशिवचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई रखमाबाईंची तब्येत ढासळली. औषधोपचार चालु झाले मात्र त्याचा उपयोग न होऊन ३१ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाई निधन पावल्या. सदाशिवराव त्यावेळी केवळ २७ दिवसांचे होते. इस १७४० मधे चुलत बंधु नानासाहेबांना पेशवाई मिळाल्यानंतर भाऊंचे सातार्याच्या दरबारात काही वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांना राजकारणाचा बराच अनुभव मिळाला. १७४६ मधील कर्नाटक मोहिम, १७४७ मधे तिथेच झालेली आजर्याची लढाई, बहादूरभेंड्याचा किल्ला जिंकणे, तुंगभद्रा किनारी जाऊन बंडखोर नवाब व देसायांना जरब बसवणे इत्यादी मोहिमा त्यांच्या नावावर होत्या. त्याचबरोबर सावनूरच्या नवाबांकडून भाऊंनी ३६ परगणे काबीज करून मराठा साम्राज्याला जोडले. १७५० मधे सांगोल्याला यमाजी शिवदेवाचे बंड मोडले. त्याच वर्षी छत्रपती राजारामांनी (दुसरे) त्यांना मराठा राज्याची कायमची मुखत्यारी दिली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_ऑगस्ट_१७३३ कान्होजी आंग्रेंचे बाजीरावाना पत्र प्रतिनिधी जोपर्यंत कोकणात आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. खुद्द सरखेल सेखोजी आंग्रे ४ ऑगस्ट १७३३ रोजी बाजीरावांना कळवतात, “प्रतिनिधीचा विचार घालमेलीचा व शामलाचे (सिद्दी) ममतेचा पहिल्यापासून आहे तो आपणास अवगतच आहे. या कोकणच्या मानसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत. आपणाजवळ (पेशव्यांजवळ) आम्ही (आंग्रे) स्वच्छंदे अथवा आपले आज्ञेने वर्तणूक करू. तैसी त्याजपासी होणे दुरापास्त. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार(ही) नाही, आपले बेत, गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रय आपल्या पदरी पडेल. आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? प्रतिनिधीकडील वेध चुकलियावरी अंजनवेलीस मोर्चे देतो. गोवळकोट घेतो. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
971 views
7 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_ऑगस्ट_१६७७ छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_ऑगस्ट_१९०० स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. 🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.2K views
8 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_ऑगस्ट_१६४८ स्वराज्य स्थापनेच्या शपथेनंतर अवघ्या तीन वर्षात शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_ऑगस्ट_१६७७ #दक्षिण_दिग्विजय_मोहीम दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला. आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लवाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगुंडाडपुरम ला आले. ३० जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला व या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगुंडापुरम सोडून तुंदुमगुर्त ला आले व तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या वेलवान्सोर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_ऑगस्ट_१६८० मे १६८० च्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती, शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गावात छापा टाकून तेथील तीन माणसांना पकडले होते. डिचोलीच्या मराठी सुभेदारानी सिओलिम गावात छापा टाकण्याची तारीख होती २ ऑगस्ट १६८० 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२_ऑगस्ट_१७६० २ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
Amar kokate Patil
3.2K views
9 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_ऑगस्ट_१६७८ शिवरायांनी पनवेल प्रांत जिंकून घेतला. छत्रपती शिवाजीराजांनी राजांनी कल्याण, भिवंडी, पनवेल जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत समुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरती केली, तसेच वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_ऑगस्ट_१७६० मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.... अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा. म्हणूनच म्हंटले जाते... दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_ऑगस्ट_१९२० #लोकमान्य_टिळक_पुण्यतिथी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असं हे बहुमूल्य रत्न. मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना शतशः प्रणाम. #जय_हिंद ! #जय_महाराष्ट्र ! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_आॅगस्ट_१९२० मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे" यांची आज जयंती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
814 views
11 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जुलै_१६७७ #दक्षिण_दीग्विजय_मोहीम छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटळूर" चा हवालदार नेमले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जुलै_१६८२ छत्रपती संभाजीराजेंनी नाशिक येथील किल्ले रामशेजला १००० मावळ्यांची तुकडी पाठवली. गडाखाली मुघलांसोबत जोरदार लढाई. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩