Follow
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,080
Posts
7,201
Followers
Amar kokate Patil
2.5K views
16 hours ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_ऑगस्ट_१६६६ शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे नकली दस्तक दाखवून ओलांडले. ह्या ठिकाणी ठाणेदार होता लतीफखान. आग्र्याहून सुटल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले. तिकडे रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार आग्र्यामध्ये फुलादखनास सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२०_ऑगस्ट_१६६६ औरंगजेब बादशहाने "मिर्झाराजे जयसिंग" यांना फर्मान पाठवून आग्रा कैदेतून छत्रपती शिवराय निसटण्यामागे "कुंवर रामसिंग" जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_ऑगस्ट_१६८४ शहजादा अकबराने कवी कलशाला पत्र पाठवून त्याच्या तब्येतीची, भिमगडाच्या तहाची, मुहम्मद अज्जमच्या वकीलासोबत काय ठरले इ. गोष्टींची चौकशी केली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.5K views
1 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_ऑगस्ट_१६०० बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१९_ऑगस्ट_१६६६ शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटले आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि. १९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेतोजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१९_ऑगस्ट_१६७५ शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_ऑगस्ट_१६८९ राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१९_ऑगस्ट_१७५३ नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली १६५१ च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले. तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला. अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला, पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले. यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले, युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली आणि त्या बदल्यात मराठ्यांना १ कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले. रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले ती तारीख होती १९ ऑगस्ट १७५३ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
2.6K views
2 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_ऑगस्ट_१६६६ आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते. तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१८_ऑगस्ट_१६६६ आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली,त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकीशन, जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत, त्रंबकपंत व इतर दोन चाकर(बहुतेक हिरोजी व मदारी) हेही फौलादखानाच्या हाती सापडले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_ऑगस्ट_१६८३ मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१८_ऑगस्ट_१६८३ मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला. पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ घेऊन जून १६८३ मध्ये चौलवर हल्ला केला. (१० ते १८ ऑगस्ट) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_ऑगस्ट_१७०० महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती. असा धुरंदर की ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी पेशवा झालेल्या या वीराने ४० वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. आपल्या अद्वितीय पराक्रमाने सर्वांना गर्भगळीत करून, दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे बाजीराव पेशवे. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Amar kokate Patil
1.6K views
3 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_ऑगस्ट_१६६० आदिलशहाने शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #१७_ऑगस्ट_१६६६ #आग्र्याहून_सुटका 🔥 रक्ताचा एक थेंबही न सांडता मुघल सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभूमीत केलेला दारुण व अब्रूचे धिंडवडे काढणारा पराभव म्हणजेच शिवराय आणि शंभूराजे यांची आग्र्यातून सुखरूप सुटका तो दिवस म्हणजेच १७ ऑगस्ट १६६६ जुलै १६६६ पर्यंत काही मराठा सैनिक व अधिकारी आग्र्याबाहेर पडले होते. राजांना मारण्याची अशी सुवर्णसंधी औरंगजेबही वाया घालवणार नव्हता. त्याने १८ ऑगस्ट १६६६ रोजी शिवरायांना फिदाईखानाकडे द्यायचे ठरवले होते. औरंगजेबाने शिवाजीराजांच्या भोवती चौकी-पहारे कडक केले. राजांनी आग्र्यातून निसटण्याचा निर्णय घेतला व १७ ऑगस्टला त्यांनी कैदेचा पिंजरा फोडला. शिद्दी फौलादखानाच्या सैनिकांचा पहारा होता, मुंगीलाही प्रवेश करणे कठीण अशा चौकी-पहा-यातून महाराज निसटले, पण कसे? पेटा-यांचा पहिला उल्लेख येतो राजस्थानी पत्रांत:- हे पत्र परकालदासचे आहे आणि मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा यावेळी औरंगाबादेस होता, तो तारीखे दिल्कुशा या आपल्या आत्मचरित्रात लिहितो👇 "देवाचा प्रसाद म्हणून राजे दर गुरूवारी मिठाईचे मोठमोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला व मिठाई वाटण्याच्या वेळी राजांच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली. फौलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीराजांनी अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले आणि मग एक दिवशी राजांनी एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले त्यांनी मिठाईचे दोन पेटारे रिकामे केले आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले" त्यांनी तडक मथुरेची वाट धरली. परंतु ती माहिती तर्काधारित आहे☝ आलमगिरनामा हा औरंगजेबाच्या कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांचा अधिकृत इतिहास, त्याचा लेखक महंमद काजम हा औरंगजेबाचा अधिकारी होता आणि हा ग्रंथ त्याने औरंगजेबाच्या देखरेखीखाली लिहिला. या ग्रंथात महाराज पेटा-यात बसून पळाले असा उल्लेख नाही☝️ सेतुमाधवराव सांगतात तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा. पेटा-यांची ये-जा होती ते पाहणा-यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले. शंभूराजेना पेटा-यात बसविले असणे शक्य आहे शिवराय स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटा-यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावाने आणि सावधगिरीवरून शक्य वाटत नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
2K views
4 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_ऑगस्ट_१६६२ अनाजी दत्तो प्रभुनीकर हे वाकनिशी करीत होते त्यांना शिवाजी राजांनी सुरनिशीचा हुद्दा दिला. महाराजांनी एप्रिल महिन्यात राजगडावर आल्यावर आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत मोरोपंत पिंगळे याना पेशवेपद दिले तर निळोपंतांना मुजुमदारी दिली तर पावसाळ्याच्या मध्यावर आणखी एक बदल करत अनाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिशी दिली. अनाजीपंत स्वराज्याचे नूतन सुरनिस झाले ती तारीख होती भाद्रपद शुद्ध १२ म्हणजे १६ ऑगस्ट १६६२ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_ऑगस्ट_१६६६ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून निसटण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले. मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करीन. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता. कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सलतनतीस अनपेक्षितच होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_ऑगस्ट_१६८१ आतापर्यंत केवळ मराठी मुलखाचीच नासधूस करणारा सिद्दी १६ ऑगस्ट पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. त्याने इंग्रज दलालाकडून पैशाची मागणी करून तसेच मुंबईच्या वखारीची नासधूस केली. मुंबईकरांनी हि तक्रार सुरतकरांना कळविताच त्यांनी कोणाही इंग्रज नागरिकाने सिद्दीच्या नोकरीत जाऊ नये असा हुकुम काढला. मुंबईकरांनी हा हुकुम ताबडतोब अमलात आणला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_ऑगस्ट_१७०० बादशहाचे हाल पाहून मराठ्यांना जास्तच चेव चढला. सभोवार घिरट्या घालून त्यांनी शक्य तितक्या उच्छाद चालवला. हनुमंतराव निंबाळकरानी १६ ऑगस्ट रोजी “खटाव” ठाणे काबीज केले व तेथे मोगलांच्या बाजूने असणार्या मराठी अधिकार्याला ठार मारले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_ऑगस्ट_१७८३ शके १७०५ श्रावण व.४ फिरंगी दि.१६ ऑगस्ट इ.स.१७८३ या दिवशी पानिपतच्या संग्रामात धारातीर्थी पडलेले सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई निधन पहिल्या.सवाई माधवराव यांच्या बालपणात यांनीच त्यांची काळजी घेतली होती. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #१६_ऑगस्ट_१७८९ शके १७११ श्रावण व.१० दि. रोजी१६ ऑगस्ट १७८९ रोजी नागपूरकर मुघोजी भोसल्यांचे चिरंजीव खंडोजी उर्फ चिमणाजी भोसले यांचे निधन झाले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
2.1K views
6 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र "मुरादबक्ष" याचे पत्र. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६५७ मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली पण "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६६० जून १६६० रोजी शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
3.5K views
7 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१६५७ विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना किल्ले सिंहगड आदिलशहाला द्यावा लागला होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे कुंवर रामसिंग हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले. आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ २ महिने झाले होते. कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे. जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता. महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही. याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती, या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता. महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच. महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१७९५ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩 पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या, प्रचंड आत्मविश्वास, धाडस , दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा महेश्वर येथे १३ ऑगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन झाले. 🙏 "अशा थोर ,कर्तबगार, पराक्रमी "पुण्यश्लोक अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Amar kokate Patil
2.6K views
8 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_ऑगस्ट_१६५७ शिवरायांनी तत्कालिन बारा मावळ आणि भोर तालुक्यातील खेडेबारे हा मुलुख जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_ऑगस्ट_१६८३ अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते. औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१२_ऑगस्ट_१७६५ प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगलचा नवाब बनवले होते, नंतर त्याच्या जागी मीर कासीमची नेमणूक केली गेली. पण इंग्रज आणि कासीमचे संबंध बिघडले गेल्याने त्यांच्यात लढाई झाली, त्यात मीर कासीमने १५० इंग्रजाची कत्तल केली. नंतरच्या काळात बक्सर येथे झालेल्या लढाईत मुघल बादशाह, शुजाउद्दोला आणि मीर कासीम यांच्या फौजांचा पराभव झाला आणि इंग्रजाची बंगाल आणि बिहारवर पकड मजबूत झाली. कोरा येथे झालेल्या लढाईत इंग्रजानी मल्हारराव होळकर यांचाही पराभव केला. याच सुमारास रॉबर्ट क्लाइव्ह यांची कंपनी सरकारच्या गव्हर्नर पदी निवड झाली, त्याने आपले कसब पणाला लावून हतबल झालेल्या मुघल बादशहा आणि शुजाउद्दोला याची बनारस येथे भेट घेतली आणि त्यांच्याकडून बंगाल आणि बिहार प्रांताचे दिवाणी हक्क मिळवले. त्याबदल्यात इंग्रजानी बादशहाला दरवर्षी २६ लाख रुपये तनखा देण्याचे ठरले. बादशहा आणि शुजाउद्दोला यांनी आपण इंग्रजाशी कधीही युद्ध करणार नाही असेही लिहून दिले. बादशहकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले ती तारीख होती १२ ऑगस्ट १७६५. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.3K views
9 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१६७८ शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची एक वर्षानंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. हे स्वराज्य व्हावे हि तो श्रीं ची इच्छा हेच विचार मनात ठेऊन शिवरायांनी भगवा रोवत जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली. आता लक्ष दक्षिणेकडे, आपले स्वराज्य दक्षिणेत हि वाढवले पाहिजे म्हणून छत्रपती श्री शिवरायांनी आपले बंधू व्यंकोजी राजे यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१८०३ शके १७२५ श्रावण व .नवमी फिरंगी दि.११ ऑगस्ट इ.स.१८०३ रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती. शिंदे-होळकर आदी मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले होते. अहमदनगर चा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता. इंग्रजांची राजनीती मोठी धूर्त पणाची होती. श्रावण व.५ रोजी वेढया चे काम सुरू झाल्यावर जनरल वेलस्ली याने जाहीरनामा प्रसिद्ध केला की शिंदे-भोसले यांच्याविरुद्ध आमना सामना होणार आहे, प्रजेविरुद्ध नाही. जणू प्रजा आणि शिंदे-भोसले वेगळेच होते! दुसऱ्या दिवशी वेढ्याचे काम जोरात सुरू झाले. किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील काही लोक होते. थोडे घोडेस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते.या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याच्या तटास वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही. परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले. तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व वेलस्ली हा इंग्रज करत होता. किल्ल्याची तट व्यवस्था मजबूत असल्या कारणाने किल्ला मिळवणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने भिंगार गावा जवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले आणि त्याला चार हजार रुपये लांचं देऊ केली.त्याबरोबर हल्ला कोठे करावा याचे ज्ञान इंग्रजांना मिळाले श्रावण व. नवमी रोजी सहजा सहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१९०८ भारतातील सर्वात तरूण वयाचे तसेच सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.4K views
10 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१६६० "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१६६६ "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_आॕगस्ट_१७४९ चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१७५५ थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_ऑगस्ट_१७६० सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩