#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_ऑक्टोबर_१६५७
#मराठा_आरमार_दिन
#२४_ऑक्टोबर_१६५७ याच दिवशी
शिवरायांनी कल्याण, भिवंडी काबीज केली आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली.
अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस.
ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले.
महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला.
याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. दीड शतकाहून जास्त काळ आपले सागरी स्वातंत्र्य हरपून बसलेल्या भारतात, स्वतःचे आरमार उभारणारे, व सागरावर पाश्चात्यांशी दोन हात करू पाहणारे फक्त मराठेच.
म्हणून हा दिवस
#मराठा_आरमार_दिन म्हणून साजरा केला जातो.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_ऑक्टोबर_१६६२
फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड व मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता.
किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला.
स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले.
संतापलेले ३०० पायदळ आणि ६ मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_ऑक्टोबर_१६६६
आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते.
नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.
२४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली.
दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩