फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,121
पोस्ट
7,018
फॉलोअर्स
Amar kokate Patil
604 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २९ जानेवारी इ.स.१६७० मराठ्यांच्या २० हजार फौजेचा सुलतान गडावर हल्ला आणि मुघल सरदार फतहुल्ला खान यांस ठार केले.
Amar kokate Patil
652 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २८ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपती शिवाजी महाराजांनी राझे गावच्या पाटलांचा चौरंगा केला. महाराजांना अश्या संतापलेले उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले..!
Amar kokate Patil
878 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६४५ शिवरायांचा निकाल उभ्या दक्खन देशातील लोकांनी पाहिला 'हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापुर्वीच स्वराज्याचा कडक नियम काय आहे हे लोकांना कळले. बालशिवबा संतापले ! त्याना ते सहनच झालं नाही. पुण्यातील खेड-शिवापुराजवळच्या रांझाच्या पाटलाने बदअमल केला ! बदअमल म्हणजे एका परस्त्रीवर बलात्कार केला ! त्या पाटलाचे नाव बाबाजी भिकाजी गुजर आणि शिवबांना हें समजलें ! परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलखांत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्यांने हा रावणशाही गुन्हा केलेला समजतांच शिवबा संतापले, स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर मग काय काय करतील ? स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीजातीला आहे, ती आई आहे ! शिवबानी ताबडतोब ढालाईत हशम रांझ्यावर रवाना केले, हुकूम केला, बाबाजी पाटलाला जेरबंद करा ! पाटील गिरफ्तार झाला, लोकांना लाल महालातल्या न्यायी सदरेची ओळख पटली, पाटलाला शिवबाच्या पुढे हाजीर करण्यांत आलें शिवबाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली, गुन्हा शाबीत झाला आणि शिवबाने कडकडून हुकूम सोडला , 'कोपरांपासून पाटलाचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका , याची पाटीलकी जप्त करा !!' तो दिवस होता.. २८ जानेवारी १६४५☝️ यावेळी शिवबाराजांचे वय होते फक्त १५ वर्षे☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६८१ छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरावर छापा टाकला. उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजे मुघलांची सर्वात वैभवसंपन्न नगरे, होय राजांनी राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात हा छापा टाकला. रायगड ते बुऱ्हाणपूर हे अंतर त्यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसात कापून, छापा टाकून मोठी दौलत स्वराज्यात आणली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७१ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यस्त मोहिमेमुळे जिजाऊसाहेब सर्व राज्यकारभार सांभाळत पण आता जिजाऊसाहेब वृद्ध झाल्यामुळे त्यांच्या मदतीने आजच्या दिवशी युवराज बाळशंभुराजेंना राज्यकारभार चालवण्यास दिला☝️ #मध्ययुगीन_कालखंडातील १६ व्या शतकात #स्वराज्याचे_संस्थापक म्हणून आपण #छत्रपती शिवरायांना ओळखतो. अत्यंत प्रतीकूल परिस्थितीत #बळ आणि #बुद्धीच्या साह्याने शिवरायांनी आठरापगड जातीतील मावळ्यांच्या साह्याने #स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचा आदर्श घेऊन #संभाजी_महाराजांनी २६ जानेवारी १६७१ रोजी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी #राज्यकारभारास_सुरुवात केली. #शिवरायांचा शिवराज्याभिषेक आणि भारतात #लोकशाहीची सुरुवात ह्या तिन्ही घटनांमध्ये साधर्म्य आहे. #जुलमी_रक्तपिपासू, #मुघली आणि #ब्रिटिशशाही बुडून पुन्हा भारतात #लोकशाही आमलात आली. म्हणजेच परत एकदा #स्वराज्य_स्थापन_झाले. भारतीय स्वराज्य स्थापनेच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शिवमय शुभेच्छा🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७४ शिवाजी महाराज २६ जानेवारी रोजी पहाटे उंदेरीच्या आरमार जवळ आले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७४ "शहजादा अकबर" २६ जानेवारी रोजी आसदखाना बरोबर काबुलच्या स्वारीवर गेला . 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६६२ शास्ताखान सोबत आलेल्या मोगली फौजेचे पवन मावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या परिसरात चढाया 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.3K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २४ जानेवारी इ.स.१६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत आऊसाहेबांनी कानदखोरे वतनाचा तंटा सोडवला.
Amar kokate Patil
1.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६१ शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६७ आऊसाहेबांचे न्यायदान :- महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता. कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६८० सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:- पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:- शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, (हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.) कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन, तो लिहितो:✍️ (महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१७३९ अशेरीगड मराठ्यांनी जिंकला संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
2.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_जानेवारी_१६६६ आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेतच १० वर्षानंतर शहाजहानचा मृत्यू. बापाला कैदेत घालून त्याची बादशाही आपल्या ताब्यात घेणे आणि नंतर त्याला मारणे हा मुघली कार्यक्रम औरंगजेबाने सुद्धा यथोचित पार पाडला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_जानेवारी_१६७७ कर्नाटक स्वारीवेळी शिवरायांनी सेनापती हंबीरराव मोहिते यांना हुसेनखानावर चालून जाण्याचा आदेश दिला. हुसेनखान मियाना, पठाण, जणू दुसरा बहलोलखान आशा जुलमी अधिकारी - मियाना बंधूंच्या अमलाने गांजलेल्या कोप्पळ प्रांतातील रयतेची हाक शिवरायांच्या कानी आली, सरनोबत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली. गदग प्रांतात येलबुर्गा गावाजवळ हे युद्ध झाले, त्यात हुसेनखान आणि अब्दुल रहीम मियानाचा दणदणीत पराभव झाला, पण या युद्धात नागोजी काका जेधे धारातीर्थी पडले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_जानेवारी_१६९३ जुल्फिकार खानचा पराभव स्वातंत्र्य लढा संताजी-धनाजीने बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला, नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे, त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते, त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२२_जानेवारी_१७३९ मराठ्यांनी शिरगावचा किल्ला जिंकला नोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २१ जानेवारी इ.स.१६६२ छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकण काबीज करून तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
See other profiles for amazing content