फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,125
पोस्ट
7,021
फॉलोअर्स
Amar kokate Patil
298 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २ फेब्रुवारी इ.स.१६६१ छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कारतलब खानाचा उंबरखिंडित मोठ्या फौजेनिशी पराभव केला.
Amar kokate Patil
840 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 १ फेब्रुवारी इ.स‌.१६८९ छत्रपती संभाजी महाराज कोकणातील महत्वाची बैठक आटोपून महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने कैद केले.
Amar kokate Patil
1.5K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_फेब्रुवारी_१६८९ #माँसाहेबांचा_छत्रपती_शंभूबाळ, #शिवरायांचा_छावा_कैद_झाला...🚩 मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. आजच्याच दिवशी वाडा संगमेश्वर येथे मुघलांनी छत्रपती संभाजीराजांना कैद केली आणि इथूनच सुरू झाला , काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास. मराठा सरनौबत म्हाळोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा छत्रपति संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार मुकर्रबखानाच्या तावडीत सापडले, या लढाईमध्ये म्हाळोजी घोरपडे धारातीर्थी पडले🙏 इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला. श्री शिवपुत्र छत्रपति संभाजी महाराजांना कसबा-संगमेश्वर येथे फितुर झालेल्या धर्मद्रोह्यांकरवी मोगलांनी पकडले, ते सरदेसायांच्या वाड्यापासून शास्त्री नदी पर्यंतची ती झटापट ,स्वराज्यरक्षणाच्या योजना आखत असताना मोगलांनी त्यांना जेरबंद केले“तो दिवस महाराष्ट्र धर्माच्या दुर्दैवाची परिसीमा होती! लाखांचा पोशिंदा, स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर शंभूराजे. छत्रपती श्री.संभाजी महाराज यांना संगमेश्वरला औरंगजेबाच्या सरदाराने फितुरीने दगाफटका करून पकडले होते ते ठिकाण संगमेश्वर म्हणून ज्ञात आहे. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_फेब्रुवारी_१६८९ स्वराज्याचे पाचवे सरलष्कर म्हणजेच धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "म्हाळोजी घोरपडे" हे संभाजीराजेंना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी "म्हाळोजी घोरपडे" यांकडे सरसेनापती पद सोपवले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
726 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६४२ शहाजी राजे कर्नाटकास जातात. माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले, त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले, त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शहाजीराजांना लिहीले आहे. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८० छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या, इंग्रजांच्या तोफा आग् ओतत होत्या, आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला ठणकावून सांगत होते. अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८१ छत्रपती संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे यातून अलोट संपत्ती मिळविली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #३०_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुक्काम रत्नागिरी च्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये , मोजक्या सैन्यासोबतचा हा मुक्काम काही दिवसात हलणार होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१७१५ कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह:- सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
851 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २८ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपती शिवाजी महाराजांनी राझे गावच्या पाटलांचा चौरंगा केला. महाराजांना अश्या संतापलेले उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले..!
Amar kokate Patil
942 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६४५ शिवरायांचा निकाल उभ्या दक्खन देशातील लोकांनी पाहिला 'हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापुर्वीच स्वराज्याचा कडक नियम काय आहे हे लोकांना कळले. बालशिवबा संतापले ! त्याना ते सहनच झालं नाही. पुण्यातील खेड-शिवापुराजवळच्या रांझाच्या पाटलाने बदअमल केला ! बदअमल म्हणजे एका परस्त्रीवर बलात्कार केला ! त्या पाटलाचे नाव बाबाजी भिकाजी गुजर आणि शिवबांना हें समजलें ! परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलखांत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्यांने हा रावणशाही गुन्हा केलेला समजतांच शिवबा संतापले, स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर मग काय काय करतील ? स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीजातीला आहे, ती आई आहे ! शिवबानी ताबडतोब ढालाईत हशम रांझ्यावर रवाना केले, हुकूम केला, बाबाजी पाटलाला जेरबंद करा ! पाटील गिरफ्तार झाला, लोकांना लाल महालातल्या न्यायी सदरेची ओळख पटली, पाटलाला शिवबाच्या पुढे हाजीर करण्यांत आलें शिवबाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली, गुन्हा शाबीत झाला आणि शिवबाने कडकडून हुकूम सोडला , 'कोपरांपासून पाटलाचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका , याची पाटीलकी जप्त करा !!' तो दिवस होता.. २८ जानेवारी १६४५☝️ यावेळी शिवबाराजांचे वय होते फक्त १५ वर्षे☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६८१ छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरावर छापा टाकला. उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजे मुघलांची सर्वात वैभवसंपन्न नगरे, होय राजांनी राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात हा छापा टाकला. रायगड ते बुऱ्हाणपूर हे अंतर त्यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसात कापून, छापा टाकून मोठी दौलत स्वराज्यात आणली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
9K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२५_जानेवारी_१६६५ शिवाजी राजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन. सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६६४ सुरतेच्या छाप्यामुळे शिवाजीराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या मोहिमेचे खरे फलित हेच आहे. संपत्ती किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee. 'हे वाक्य बर्‍याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते, 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्‍याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले पत्र:- "Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche.He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees." मुघलांनी सुरतेच्या या मोहिमेची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६७३ शिवरायांनी इंग्रज कैद्यांची सुटका केली. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६८४ छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते. २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो:- "आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल, मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत, विश्वासू अधिकारी नाहीत, किल्ले निरुपयोगी झालेत, गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई आहेच, हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.4K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २४ जानेवारी इ.स.१६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत आऊसाहेबांनी कानदखोरे वतनाचा तंटा सोडवला.
See other profiles for amazing content