फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,126
पोस्ट
7,021
फॉलोअर्स
Amar kokate Patil
555 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१६६१ कारतलबखानाचा उंबरखिंडीत सणसणीत पराभव करून शिवरायांनी प्रथम राजगडाकडे आणि राजगडावरून कोकणाकडे प्रस्थान केले. स्वराज्य गिळंकृत करण्याचा शाहिस्त्याचा डाव पुन्हा फसला, कारतलबखानाचा इतका मोठा पराभव औरंग्याच्या जिव्हारी लागला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१६७० कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली. शिवछत्रपतींचा आणि माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे, शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी तयारीनिशी बाहेर पडले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१६८९ १ फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे कैद झाले, मुघल सरदार मुकर्रबखान संगमेश्वरला पोहोचला आणि संगमेश्वर च्या सर्व सीमा मुघलांच्या घोड्यांच्या टापाणी स्थिरावल्या गेल्या. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१८३२ स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे उमाजी नाईक खोमणे यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले. १८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजींचे प्रेत इतरांना दहशत बसावी म्हणून कचेरीच्या बाहेर ३ दिवस पिंपळाच्या झाडाला लटकवत ठेवले होते. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या आद्धक्रांतिकारकाला विनम्र वंदन 🙌 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
549 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २ फेब्रुवारी इ.स.१६६१ छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार कारतलब खानाचा उंबरखिंडित मोठ्या फौजेनिशी पराभव केला.
Amar kokate Patil
872 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 १ फेब्रुवारी इ.स‌.१६८९ छत्रपती संभाजी महाराज कोकणातील महत्वाची बैठक आटोपून महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने कैद केले.
Amar kokate Patil
1.5K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_फेब्रुवारी_१६८९ #माँसाहेबांचा_छत्रपती_शंभूबाळ, #शिवरायांचा_छावा_कैद_झाला...🚩 मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. आजच्याच दिवशी वाडा संगमेश्वर येथे मुघलांनी छत्रपती संभाजीराजांना कैद केली आणि इथूनच सुरू झाला , काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास. मराठा सरनौबत म्हाळोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा छत्रपति संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार मुकर्रबखानाच्या तावडीत सापडले, या लढाईमध्ये म्हाळोजी घोरपडे धारातीर्थी पडले🙏 इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला. श्री शिवपुत्र छत्रपति संभाजी महाराजांना कसबा-संगमेश्वर येथे फितुर झालेल्या धर्मद्रोह्यांकरवी मोगलांनी पकडले, ते सरदेसायांच्या वाड्यापासून शास्त्री नदी पर्यंतची ती झटापट ,स्वराज्यरक्षणाच्या योजना आखत असताना मोगलांनी त्यांना जेरबंद केले“तो दिवस महाराष्ट्र धर्माच्या दुर्दैवाची परिसीमा होती! लाखांचा पोशिंदा, स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर शंभूराजे. छत्रपती श्री.संभाजी महाराज यांना संगमेश्वरला औरंगजेबाच्या सरदाराने फितुरीने दगाफटका करून पकडले होते ते ठिकाण संगमेश्वर म्हणून ज्ञात आहे. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_फेब्रुवारी_१६८९ स्वराज्याचे पाचवे सरलष्कर म्हणजेच धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "म्हाळोजी घोरपडे" हे संभाजीराजेंना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी "म्हाळोजी घोरपडे" यांकडे सरसेनापती पद सोपवले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
889 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २९ जानेवारी इ.स.१६७० मराठ्यांच्या २० हजार फौजेचा सुलतान गडावर हल्ला आणि मुघल सरदार फतहुल्ला खान यांस ठार केले.
Amar kokate Patil
886 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २८ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपती शिवाजी महाराजांनी राझे गावच्या पाटलांचा चौरंगा केला. महाराजांना अश्या संतापलेले उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले..!
Amar kokate Patil
1.2K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७१ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यस्त मोहिमेमुळे जिजाऊसाहेब सर्व राज्यकारभार सांभाळत पण आता जिजाऊसाहेब वृद्ध झाल्यामुळे त्यांच्या मदतीने आजच्या दिवशी युवराज बाळशंभुराजेंना राज्यकारभार चालवण्यास दिला☝️ #मध्ययुगीन_कालखंडातील १६ व्या शतकात #स्वराज्याचे_संस्थापक म्हणून आपण #छत्रपती शिवरायांना ओळखतो. अत्यंत प्रतीकूल परिस्थितीत #बळ आणि #बुद्धीच्या साह्याने शिवरायांनी आठरापगड जातीतील मावळ्यांच्या साह्याने #स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचा आदर्श घेऊन #संभाजी_महाराजांनी २६ जानेवारी १६७१ रोजी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी #राज्यकारभारास_सुरुवात केली. #शिवरायांचा शिवराज्याभिषेक आणि भारतात #लोकशाहीची सुरुवात ह्या तिन्ही घटनांमध्ये साधर्म्य आहे. #जुलमी_रक्तपिपासू, #मुघली आणि #ब्रिटिशशाही बुडून पुन्हा भारतात #लोकशाही आमलात आली. म्हणजेच परत एकदा #स्वराज्य_स्थापन_झाले. भारतीय स्वराज्य स्थापनेच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शिवमय शुभेच्छा🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७४ शिवाजी महाराज २६ जानेवारी रोजी पहाटे उंदेरीच्या आरमार जवळ आले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७४ "शहजादा अकबर" २६ जानेवारी रोजी आसदखाना बरोबर काबुलच्या स्वारीवर गेला . 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६६२ शास्ताखान सोबत आलेल्या मोगली फौजेचे पवन मावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या परिसरात चढाया 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
9K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२५_जानेवारी_१६६५ शिवाजी राजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन. सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६६४ सुरतेच्या छाप्यामुळे शिवाजीराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या मोहिमेचे खरे फलित हेच आहे. संपत्ती किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee. 'हे वाक्य बर्‍याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते, 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्‍याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले पत्र:- "Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche.He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees." मुघलांनी सुरतेच्या या मोहिमेची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६७३ शिवरायांनी इंग्रज कैद्यांची सुटका केली. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६८४ छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते. २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो:- "आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल, मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत, विश्वासू अधिकारी नाहीत, किल्ले निरुपयोगी झालेत, गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई आहेच, हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
See other profiles for amazing content