फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
1,980
पोस्ट
6,798
फॉलोअर्स
Amar kokate Patil
601 जणांनी पाहिले
4 तासांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_ऑक्टोबर_१६५७ #मराठा_आरमार_दिन #२४_ऑक्टोबर_१६५७ याच दिवशी शिवरायांनी कल्याण, भिवंडी काबीज केली आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. दीड शतकाहून जास्त काळ आपले सागरी स्वातंत्र्य हरपून बसलेल्या भारतात, स्वतःचे आरमार उभारणारे, व सागरावर पाश्चात्यांशी दोन हात करू पाहणारे फक्त मराठेच. म्हणून हा दिवस #मराठा_आरमार_दिन म्हणून साजरा केला जातो. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_ऑक्टोबर_१६६२ फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड व मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता. किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला. स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले. संतापलेले ३०० पायदळ आणि ६ मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_ऑक्टोबर_१६६६ आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. २४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.3K जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२२_ऑक्टोबर_१६७९ ( अश्विन शुद्ध त्रयोदशी, शके १६०१, संवत्सर सिद्धर्ती, बुधवार ) मराठ्यांचा खांदेरीला रसद पुरविण्याचा मार्ग मोकळा!। राजापूरहून आलेल्या ३७ मराठी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुरवली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. आता खांदेरीवर रसद पोहोचल्याने खांदेरी सुरक्षित होती मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते. पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते. 🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१७६४ मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. 🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१९०० महान भारतीय क्रांतिकारी अशफाक उल्ला खान जयंती. अशफाक उल्ला खान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक प्रमुख क्रांतिकारक होते. काकोरी घटनेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर खटला चालविला आणि १९ डिसेंबर १९२६ रोजी त्याला फैजाबाद तुरूंगात फाशी देण्यात आली. 🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१९४३ राणी झांशी रेजिमेंटची स्थापना २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजींनी 'आझाद हिंद सरकार' या नावाने स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. नेताजी स्वत: या सरकारचे अध्यक्ष आणि पंतप्रधान होते. या सरकारला नऊ देशांनी मान्यता दिली. २२ ऑक्टोबर १९४३ रोजी राणी झांशी रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. आझाद हिंद सैन्याला संघटित करुन त्यांना शस्त्रास्त्र आणि इतर मदत मिळायला सुरुवात झाली. ब्रह्मदेशामधून सरकार काम करत होते. नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे नेताजींकडे सुपूर्द केली. अंदमान आणि निकोबार या बेटावरुन नव्या सरकारचे कामकाज सुरु झाले. 🚩🏇🚩
Amar kokate Patil
799 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 २१ ऑक्टोबर इ.स.१६७९ मराठ्यांचे खांदेरी बेटावर कोट बांधण्याचे काम चालू असताना इंग्रजांनी काही जहाजे सैन्यासह मुंबईहून खांदेरीकडे रवाना केले.
Amar kokate Patil
1.8K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_ऑक्टोंबर_१६५९ अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी! या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाचे भेट जवळपास नक्की होणार होती. वाटाघाटी अंतिम टप्यात आल्या . 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_ऑक्टोबर_१६६० पावनखिंडीतील संघर्षातुन बाजीप्रभू धारातीर्थ पडले. महाराज विशाळगडानंतर राजगडावर परतले. परंतु सिद्दी जौहरचा वेढा आणखी पन्हाळगडावर चालुच होता. महाराज पन्हाळगडावर आले व त्यांनी पन्हाळा सिद्दी जौहर यास देऊन टाकला पण पुन्हा काबीज करण्याच्या युक्तीनेच☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_ऑक्टोबर_१६६१ मुघलांच्या ताब्यातील किल्ले शिवनेरी व पायथ्याच्या जुन्नर भागावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_ऑक्टोबर_१६७९ मुंबई बेटाजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आपली माणसे उतरवून कोटाचे बांधकाम सुरू केले होते. मुंबई जवळ शिवाजीराजांचे आरमार असणे इंग्रजांना धोकादायक असल्याने त्यांनी या बांधकामाला विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. पण मराठ्यांचे चपळ आरमार त्यांना मात देत खांदेरीवर रसद पोहोचवत असे. त्यामुळे इंग्रजानी मुंबईहून ८ तोफा, १४ इंग्रज सैन्याच्या ५ फायली आणि ३० खलाशी देऊन फोर्टून नावाचे जहाज कॅप्टन स्टीफन अंडरटन याच्या नेतृत्वाखाली खान्देरीच्या नाकेबंदीला पाठवले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #२१_ऑक्टोबर_१६८३ मुघल आरमाराला पोर्तुगीज मदत करत असल्याच्या कारणावरून संभाजीराजेंनी त्यांच्या उत्तर कोकणातील प्रांतावर स्वारी केली‌ होती. या हल्ल्याने पोर्तुगीजांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे गोव्याचा‌ पोर्तुगीज विजरईने मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील प्रांतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. फोंडा किल्ला हा मराठी पोर्तुगीज सरहद्दीवर होता. त्यामुळे मुलखाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्वाचा होता. या किल्ल्यावर पोर्तुगीज विजरई हल्ला करणार असल्याची बातमी समजताच छत्रपती संभाजी महाराज आपले सैन्य घेऊन ते फोंडयाच्या मदतीसाठी गेले होते. याबाबत इंग्रजांची नोंद अशी, आम्हाला असे वाटते की संभाजीराजेंचे सैन्य काही काळ तरी तुमच्या भागाला त्रास देणार नाही. कारण आम्हाला खात्री आहे की, संभाजीराजे स्वतः जातीने पंधरा हजार लोकांसह गोव्याजवळील फोंडा घाटाकडे गेले आहेत. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Amar kokate Patil
1.9K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 १९ ऑक्टोबर इ.स. १६५९ छत्रपती शिवाजी महाराजांचे वकिल पंताजी गोपीनाथ पुन्हा एकदा अफझलखाना कडे गेले..!
Amar kokate Patil
738 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१९_ऑक्टोबर_१६५९ ( कार्तिक शुद्ध चतुर्दशी, शके १५८१, संवत्सर विकारी, बुधवार ) पंताजी काका गोपीनाथ पुन्हा अफझल खानाकडे! महाराज प्रचंड सावध पावले टाकत होते. उघड्या मैदानापेक्षा संपत्तीला लालचावलेला खान कसाही करून जावळीत यायला हवा हे गोपीनाथ काकांच्या वकिलीवर अवलंबून होते. पंतांना जे हवे होते ते सर्व देऊन व खानासाठी भारी नजराणा देऊन पुन्हा एकदा पंत काका खानाच्या छावणीत बोलणी करण्यासाठी आले. संदर्भ: शिव दिग्विजय पृ १६२ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_ऑक्टोबर_१६८० स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी पुणे व वाई प्रांताचे देशाधिकारी "वासुदेव गोसावी" आणि "येसाजी मल्हारी" यांस हुकुम केला की "स्वराज्यातील काही रूके जमीन ही शेतकरी कुणब्यास करावयास द्यावी." 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१९_ऑक्टोबर_१६७९ १९ व २० ऑक्टोबर इ.स.१६७९ इंग्रज नौका दल आता खांदेरी आणि मराठे यांच्या मार्गात उभे राहिले. १९-२० ऑक्टोबरच्या रात्री मराठे वारा पडला की रिव्हेंजच्या आजूबाजूला घुटमळत असत. या हालचालींमुळे केग्वीन चिंतीत झाला व जहाजावरील इतरही लोक घाबरले. केग्वीन ने मुंबईला कळवले की अश्या परिस्थितीत जर मराठ्यांनी रिव्हेंजचे नांगर कापले तर ते आपण जहाज गमावू. पुढील काही दिवस वारा अनुकूल नसल्याने काही मचव्यांनी रिव्हेंजला ओढून खांदेरी पासून जरा अंतरावर आणून ठेवले. मराठ्यांना रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी पुन्हा खांदेरीला रसद पुरवठा सुरु केला. या दरम्यान मुंबईहून ’Fortune‘ नावाचे ३ डोलकाठ्यांचे जहाज आणि २ आणखी शिबाडे नौका दलात सामील झाली. फोर्च्युनचा कॅप्टन होता स्टीफन अडरटन. ही जहाजे इंग्रजांनी गोव्याला भाड्याने दिली होती व ती परत येताच त्यांना खांदेरीच्या मोहिमेकरिता रवाना करण्यात आले होते. मुंबईला मराठ्यांचा धोका होताच आणि मराठ्यांचे प्रयत्न पोर्तुगीज मुलुखातून मुंबईत शिरण्याचे असे सुरूच होते. मुंबईत या वेळी बंदुकीची ५३२ पिंप भरून दारू होती व यातील ३०० पिंप पोर्तुगीझाना विकून टाकावी असे पूर्वी सुरतेने मुंबईला कळवले होते. परंतु मराठ्यांचा संभाव्य धोका लक्षात ठेवून जर पोर्तुगीजांनी त्यांना मार्ग दिला तर आपली तयारी असावी म्हणून इंग्रज दारू विकण्याचे टाळत होते. तसेच नौका दलातून शक्य असल्यास २ शिबाडे मुंबईला पाठवावी अशीही त्यांनी केग्वीनकडे मागणी केली परंतु केग्विनला ते शक्य नव्हते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩
Amar kokate Patil
919 जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 १५ ऑक्टोबर इ.स.१६५९ छत्रपती शिवाजी महाराज आणि पंताजी गोपीनाथ यांची एकांतात भेट झाली..!
Amar kokate Patil
1.8K जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑक्टोबर_१६४३ बहादुरशाह (पहिला) मोगल सम्राटचा जन्म 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑक्टोबर_१६७३ छत्रपती शिवाजी महाराज सातारा येथे मुक्कामी. मराठ्यांनी वाई जवळचा "पांडवगड" जिंकल्यानंतर, पांडवगडाची पाहणी झाली, या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या "बाळाजी आवजी" यांचा सातारा छत्रपती शिवरायांनी पालखी देऊन गौरव केला. पछत्रपती शिवरायांनी इसवी सन १६७३ हा गड स्वराज्यात आणला. त्यानंतर औरंगजेबाच्या वावटळीत १७०१ मध्ये तो मुघलांकडे गेला, यातून त्याची सुटका केली ती छत्रपती शाहूंनी. मराठ्यांकडील हा वारसा अखेर एप्रिल १८१८ मध्ये मेजर थॅचरने हिसकावून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑक्टोबर_१७४० पोर्तुगीज व्हाईसरॉय व पेशवे यांच्यात तह झाला 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑक्टोबर_१८०४ दिल्लीवर यशवंतरावानी बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले. दिनांक १४ ऑक्टोबरला सर्व फौजेनिशी मोठा हल्ला चढविला. हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे तर इंग्रज सेनापती लांब लांब मजला मारून दिल्लीनजीक आल्याची खबर यशवंतरावांच्या कानी आली. तेव्हा त्यांनी दिल्लीचा नाद सोडला, ते यमुना ओलांडून दुआबांत घुसले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑक्टोबर_१८४७ महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होते. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.(जन्म: १८ जानेवारी १७९३) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
See other profiles for amazing content