फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,129
पोस्ट
7,025
फॉलोअर्स
Amar kokate Patil
526 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_फेब्रुवारी_१६५८ ( माघ शुद्ध द्वादशी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी शुक्रवार ) स्वराज्य विस्तारण्याचे कार्य सुरू! राजांनी कांगोरी, भोरप, तुंग, तिकोना हे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची सीमा वाढवण्यास सुरवात केली, तसेच परिसरातील तरुणांची सैन्यभरती सुरू केली. [संदर्भ: सभासद पृ ६९] 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_फेब्रुवारी_१६६४ आबासाहेब शहाजीराजांच्या समाधीवर छत्री! कर्नाटक, होदेगिरी च्या जंगलात अपघाती निधन पावल्यानंतर आजच्या दिवशी महाराजांनी शहाजीराजांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. संदर्भ: सभासद पृ ६७ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_फेब्रुवारी_१६७० बलाढ्य असा कोंढाणा किल्ला स्वराज्यात आला दुसऱ्या दिवशी महाराज कोंढाणा गडावर पोहोचले, त्यांना ही बातमी समजली तेव्हा महाराजांना खूप दुःख झाले. "#गड_आला_पण_सिंह_गेला" अशा शब्दात राजांनी गौरवोद्गार काढले, सिंहगडाच्या युद्धात शेलारमामा ह्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला. हे सगळं पाहून शिवराय खरंच भारावले आणि शेलरमामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी काकांना सिंहगडाची सुभेदारी दिली गडदुर्गांच्या तटबुरुजांच्या चिर्यांशी इमान वाहीलेले आम्ही धुळीकण मात्र तो पराक्रम विसरलो नाही, विसरणार नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_फेब्रुवारी_ते_१०_मार्च_१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांचे भागानगर (हैद्राबाद) येथे आगमन. शिवाजीराजांची व कुतुबशाहाची ऐतिहासिक भेट. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_फेब्रुवारी_१६६४ नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान :- नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. इ.स.१६६४ तिनही जुमले लोहोगडीहून नेतोजीच्या सरनोबतीचे वेळेस सुरतेहून आलियावर लोहगडी लष्कर राहीले. तो वडगांवजवळ वडीखाले मुकुंदसिंह रजपूत होता त्यांसी गांठ पडली ते वेऴेस चिमणाजी पुढे लुटीस गेला. नारो बापूजीस तीर थनतरीस लागला तो घोडा गजरत्न आसनको होता, त्यावरी जीव गेला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
10.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 ४ फेब्रुवारी १६७० नरवीर तानाजी मालुसरे बलिदान दिवस...🙌🚩
Amar kokate Patil
608 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_फेब्रुवारी_१६१६ सन १६१५ व १६१६ मधे ह्या मोहिमेतील महत्वाची युद्धे झाली. निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याने डिसेंबर १६१५ मधे जालन्याजवळ दोन्ही सैन्य एकत्र केली. मुघलांकडून असफखान, शाहनवाझखान, मानसिंह व इतर मातब्बर सरदार होते. जालन्याजवळच्या रोशनगाव इथे हे युद्ध झाले. दख्खनी सैन्याला माघार घ्यावी लागली. मुघलांनी खडकी पर्यंत धडक मारली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_फेब्रुवारी_१६६० कोकणातील दाभोळ बंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_फेब्रुवारी_१६७० 🔥"गड आला पण सिंह गेला"🔥 नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे लढता लढता धारातीर्थी पडले ते किल्ले कोंढाण्यावर भगवा फडकवूनच🚩 ४ फेब्रुवारीला संध्याकाळी तानाजीनी सर्व मावळ्यांसह राजगड सोडला व सर्वजण खिंडीत येऊन पोचले. मध्यरात्रीनंतर सारे द्रोणागिरीच्या कड्याजवळ आले, मावळ्यांना तो कडा त्याच्या खाचाखोचासहीत माहीत होता. "हर हर महादेव" चा एल्गार झाला व मराठे गनिमांवर तुटून पडले. उदयभान व तानाजी यांच्यात जोरदार युद्ध झाले, त्यात वार झेलत असताना तानाजींची ढाल तुटली व मर्मस्थानी लार बसून तानाजी धारातीर्थी पडले. तानाजीराव पडल्यावर मराठी सैन्यात चलबीचल झाली पण त्याच वेळी सुर्याजींनी मावळ्यांना धीर दिला मग त्वेषाने मराठे तुटून पडले व "शेलार मामा" नी उदयभान राठोड ला संपवला. मराठ्यांची फत्ते झाली, गड ताब्यात आला पण तानाजीसारखा सिंह मात्र गेला. तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_फेब्रुवारी_१६७५ छत्रपती शंभूराजांचे रायगडावर उपनयन (मुंज) झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_फेब्रुवारी_१७०३ ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले शेवटी ४ फेब्रुवारी १७०४ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
614 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१६६१ कारतलबखानाचा उंबरखिंडीत सणसणीत पराभव करून शिवरायांनी प्रथम राजगडाकडे आणि राजगडावरून कोकणाकडे प्रस्थान केले. स्वराज्य गिळंकृत करण्याचा शाहिस्त्याचा डाव पुन्हा फसला, कारतलबखानाचा इतका मोठा पराभव औरंग्याच्या जिव्हारी लागला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१६७० कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली. शिवछत्रपतींचा आणि माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे, शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी तयारीनिशी बाहेर पडले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१६८९ १ फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे कैद झाले, मुघल सरदार मुकर्रबखान संगमेश्वरला पोहोचला आणि संगमेश्वर च्या सर्व सीमा मुघलांच्या घोड्यांच्या टापाणी स्थिरावल्या गेल्या. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_फेब्रुवारी_१८३२ स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे उमाजी नाईक खोमणे यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले. १८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजींचे प्रेत इतरांना दहशत बसावी म्हणून कचेरीच्या बाहेर ३ दिवस पिंपळाच्या झाडाला लटकवत ठेवले होते. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या आद्धक्रांतिकारकाला विनम्र वंदन 🙌 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
903 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 १ फेब्रुवारी इ.स‌.१६८९ छत्रपती संभाजी महाराज कोकणातील महत्वाची बैठक आटोपून महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने कैद केले.
Amar kokate Patil
1.6K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_फेब्रुवारी_१६८९ #माँसाहेबांचा_छत्रपती_शंभूबाळ, #शिवरायांचा_छावा_कैद_झाला...🚩 मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. आजच्याच दिवशी वाडा संगमेश्वर येथे मुघलांनी छत्रपती संभाजीराजांना कैद केली आणि इथूनच सुरू झाला , काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास. मराठा सरनौबत म्हाळोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा छत्रपति संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार मुकर्रबखानाच्या तावडीत सापडले, या लढाईमध्ये म्हाळोजी घोरपडे धारातीर्थी पडले🙏 इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला. श्री शिवपुत्र छत्रपति संभाजी महाराजांना कसबा-संगमेश्वर येथे फितुर झालेल्या धर्मद्रोह्यांकरवी मोगलांनी पकडले, ते सरदेसायांच्या वाड्यापासून शास्त्री नदी पर्यंतची ती झटापट ,स्वराज्यरक्षणाच्या योजना आखत असताना मोगलांनी त्यांना जेरबंद केले“तो दिवस महाराष्ट्र धर्माच्या दुर्दैवाची परिसीमा होती! लाखांचा पोशिंदा, स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर शंभूराजे. छत्रपती श्री.संभाजी महाराज यांना संगमेश्वरला औरंगजेबाच्या सरदाराने फितुरीने दगाफटका करून पकडले होते ते ठिकाण संगमेश्वर म्हणून ज्ञात आहे. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_फेब्रुवारी_१६८९ स्वराज्याचे पाचवे सरलष्कर म्हणजेच धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "म्हाळोजी घोरपडे" हे संभाजीराजेंना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी "म्हाळोजी घोरपडे" यांकडे सरसेनापती पद सोपवले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
911 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २९ जानेवारी इ.स.१६७० मराठ्यांच्या २० हजार फौजेचा सुलतान गडावर हल्ला आणि मुघल सरदार फतहुल्ला खान यांस ठार केले.
Amar kokate Patil
927 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २८ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपती शिवाजी महाराजांनी राझे गावच्या पाटलांचा चौरंगा केला. महाराजांना अश्या संतापलेले उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले..!
See other profiles for amazing content