फॉलो करा
Amar kokate Patil
@amarkokatepatil
2,120
पोस्ट
7,017
फॉलोअर्स
Amar kokate Patil
617 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २८ जानेवारी इ.स.१६४५ छत्रपती शिवाजी महाराजांनी राझे गावच्या पाटलांचा चौरंगा केला. महाराजांना अश्या संतापलेले उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले..!
Amar kokate Patil
772 जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६४५ शिवरायांचा निकाल उभ्या दक्खन देशातील लोकांनी पाहिला 'हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापुर्वीच स्वराज्याचा कडक नियम काय आहे हे लोकांना कळले. बालशिवबा संतापले ! त्याना ते सहनच झालं नाही. पुण्यातील खेड-शिवापुराजवळच्या रांझाच्या पाटलाने बदअमल केला ! बदअमल म्हणजे एका परस्त्रीवर बलात्कार केला ! त्या पाटलाचे नाव बाबाजी भिकाजी गुजर आणि शिवबांना हें समजलें ! परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलखांत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्यांने हा रावणशाही गुन्हा केलेला समजतांच शिवबा संतापले, स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर मग काय काय करतील ? स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीजातीला आहे, ती आई आहे ! शिवबानी ताबडतोब ढालाईत हशम रांझ्यावर रवाना केले, हुकूम केला, बाबाजी पाटलाला जेरबंद करा ! पाटील गिरफ्तार झाला, लोकांना लाल महालातल्या न्यायी सदरेची ओळख पटली, पाटलाला शिवबाच्या पुढे हाजीर करण्यांत आलें शिवबाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली, गुन्हा शाबीत झाला आणि शिवबाने कडकडून हुकूम सोडला , 'कोपरांपासून पाटलाचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका , याची पाटीलकी जप्त करा !!' तो दिवस होता.. २८ जानेवारी १६४५☝️ यावेळी शिवबाराजांचे वय होते फक्त १५ वर्षे☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१६८१ छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरावर छापा टाकला. उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजे मुघलांची सर्वात वैभवसंपन्न नगरे, होय राजांनी राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात हा छापा टाकला. रायगड ते बुऱ्हाणपूर हे अंतर त्यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसात कापून, छापा टाकून मोठी दौलत स्वराज्यात आणली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२८_जानेवारी_१८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७१ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यस्त मोहिमेमुळे जिजाऊसाहेब सर्व राज्यकारभार सांभाळत पण आता जिजाऊसाहेब वृद्ध झाल्यामुळे त्यांच्या मदतीने आजच्या दिवशी युवराज बाळशंभुराजेंना राज्यकारभार चालवण्यास दिला☝️ #मध्ययुगीन_कालखंडातील १६ व्या शतकात #स्वराज्याचे_संस्थापक म्हणून आपण #छत्रपती शिवरायांना ओळखतो. अत्यंत प्रतीकूल परिस्थितीत #बळ आणि #बुद्धीच्या साह्याने शिवरायांनी आठरापगड जातीतील मावळ्यांच्या साह्याने #स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचा आदर्श घेऊन #संभाजी_महाराजांनी २६ जानेवारी १६७१ रोजी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी #राज्यकारभारास_सुरुवात केली. #शिवरायांचा शिवराज्याभिषेक आणि भारतात #लोकशाहीची सुरुवात ह्या तिन्ही घटनांमध्ये साधर्म्य आहे. #जुलमी_रक्तपिपासू, #मुघली आणि #ब्रिटिशशाही बुडून पुन्हा भारतात #लोकशाही आमलात आली. म्हणजेच परत एकदा #स्वराज्य_स्थापन_झाले. भारतीय स्वराज्य स्थापनेच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शिवमय शुभेच्छा🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७४ शिवाजी महाराज २६ जानेवारी रोजी पहाटे उंदेरीच्या आरमार जवळ आले 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६७४ "शहजादा अकबर" २६ जानेवारी रोजी आसदखाना बरोबर काबुलच्या स्वारीवर गेला . 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२६_जानेवारी_१६६२ शास्ताखान सोबत आलेल्या मोगली फौजेचे पवन मावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या परिसरात चढाया 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
9K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #२५_जानेवारी_१६६५ शिवाजी राजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन. सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६६४ सुरतेच्या छाप्यामुळे शिवाजीराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या मोहिमेचे खरे फलित हेच आहे. संपत्ती किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee. 'हे वाक्य बर्‍याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते, 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्‍याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले पत्र:- "Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche.He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees." मुघलांनी सुरतेच्या या मोहिमेची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६७३ शिवरायांनी इंग्रज कैद्यांची सुटका केली. 🚩🏇🚩 #२५_जानेवारी_१६८४ छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते. २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो:- "आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल, मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत, विश्वासू अधिकारी नाहीत, किल्ले निरुपयोगी झालेत, गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई आहेच, हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६१ शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६७ आऊसाहेबांचे न्यायदान :- महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता. कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६८० सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:- पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:- शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, (हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.) कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन, तो लिहितो:✍️ (महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१७३९ अशेरीगड मराठ्यांनी जिंकला संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.5K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२३_जानेवारी_१६६४ (शालिवाहन शके १५८५, माघ शु.५) !! हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या एक मराठी झंजावाती वादळाचा अपघाती अस्त !! !! ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्यांचे फर्जंद महाराजा शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरले महाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले. महाबली शहाजी महाराज यांचा भातवडीचा पराक्रम, त्यानंतर आदिलशाहीवर केलेले आक्रमण, एक वेळा नाहीतर तब्बल तीन वेळा स्वतंत्र होण्याचे प्रयत्न असोत, त्याच बरोबर प्रतिनिजामशाही स्थापन करत स्वतःकडे राज्यकारभार ठेवण्याचा प्रयत्न, आदिलशाही आणि मोगलांशी दिलेला लढा यावरून सरलष्कर शहाजी महाराज यांचा पराक्रम, संघटन कौशल्य, राजकीय मुस्तद्दीपणा आणि कर्तृत्व हे अतिउच्च पातळीचे होते हे दिसून येते. १६३६ साली दक्षिणेत गेल्यानंतर स्वतंत्र दरबारातून केलेला कारभार, बालशिवाजी राजेंच्या शिक्षणाची केलेली व्यवस्था आणि शिवाजी महाराज बेंगलूर येथून परतताना त्यांच्या सोबत दिलेली आपली विश्वासू माणसे, ध्वज आणि मुद्रा हे पाहता शहाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची कल्पना आपल्याला स्पष्टपणे येऊ शकते. पराक्रम, युध्दप्रसंगाची बुध्दिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे, अनंत संकटावर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारे स्वराज्य संकल्पक महाबली महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरू " शहाजीराजे भोसले " यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२३_जानेवारी_१८९७ #नेताजी_सुभाषचंद्र_बोस_यांचा_जन्म (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान) भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता. नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती. अश्या या भारताच्या महान क्रांतिकारकाची आज जयंती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Amar kokate Patil
1.1K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 २१ जानेवारी इ.स.१६६२ छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकण काबीज करून तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
Amar kokate Patil
2.6K जणांनी पाहिले
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१६६२ विजापूर आदिलशाही च्या ताब्यात असलेली कोकण किनारपट्टी स्वराज्यात पुन्हा सामील करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी कोकण मोहिमेस प्रारंभ केला. कोकणचा बराच भाग चिपळूण राजापूर कुडाळ ताब्यात घेऊन राजे व त्यांची फौज मालवणला आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१६७५ शिवाजी महाराजांनी कुतुबखानाचा पराभव केला. शिवरायांनी बुऱ्हाणपूर, धरणगाव ठाण्यावर छापा टाकून रायगडाकडे परतत असताना कुतुब खान महाराजांना रोखण्यासाठी त्यांच्यावर चालून आला पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता. कुतुब खानाचे चारशे सैनिक ठार झाले या वास्तवासोबत कुतुब खान आणि मोघली सैन्य औरंगाबादकडे पळून गेले. प्रचंड धन संपत्ती घेऊन शिवराय रायगडी परतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१७४० स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या गुणांची पुरेपूर जाणीव होती म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त) " राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये "! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१७६१ थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_जानेवारी_१८०५ होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
See other profiles for amazing content