Follow
Dr Ramdas Athawale
@rathawale
2,714
Posts
1,747
Followers
Dr Ramdas Athawale
593 views
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *अंधेरीतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली सदिच्छा भेट* मुंबई दि. 28 - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. विजय जाधव यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र ही संस्था स्थापन केली. ही संस्था त्यांनी मोठया कष्टाने मोठी केली. या संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी निमीत्त जन्मशताब्दी भवन म्हणून चांगली इमारत म्हणून अंधेरीत सातबंगला येथे उभारण्यात आलेली आहे. त्यात अनेक हॉल आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. आंबेडकरी चळवळीतील हे अग्रगण्य संस्था आहे. विजय जाधव यांनी ही संस्था वाढवली आहे. विजय जाधव यांची वयोमानाने प्रकृती अस्वस्थ असल्याचे कळल्यानंतर आज ना. रामदास आठवले यांनी विजय जाधव यांची सदिच्छा भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्र आणि विजय जाधव यांच्या पाठीशी आपण आणि आपला रिपब्लिकन पक्ष कायम राहील. असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी विजय जाधव यांना दिले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #Politics.... #follow ##Breakingnews
Dr Ramdas Athawale
577 views
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 28 - येत्या एप्रिल मे महिन्यात आसाम, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडु, आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक यंदाच्या वर्षी होत आहेत.या आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणुक आयोगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाला गन्ना किसान ( ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह दिले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष नोंदणीकृत असल्याने निवडणुका लढणे हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या निवडणुक चिन्हावर आपले उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजपला रिपब्लिकन पक्षाचे समर्थन राहणार आहे. मात्र काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार गन्ना किसान या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढतील अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा, नगरपालिका, सर्व स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 80 पेक्षा जास्त उमेदवार राज्यात निवडुन आलेले आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षाचे कुठेही नाव या निकालांमध्ये दिसले नाही. त्याचे कारण असे आहे की, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांच्या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढविल्याने, निवडणुक निकालामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नांव आढळुन आले नाही. महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मित्रपक्षाच्या निवडणूक चिन्हांवर निवडुन आलेले आहेत. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा मित्र पक्षाला पाठिंबा निश्चित देईल. मात्र मित्र पक्षाशी युती करुन निवडणुका लढतांना मित्रपक्षाचे निवडणुक चिन्ह रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वापरु नये, असा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय आहे. मी स्वत लोकसभेच्या 3 निवडणुका लढलो. तीन्ही निवडणुका हया कॉग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करुन लढलो. मात्र त्या तीनही निवडणुकामध्ये मी कॉग्रेस किवा राष्ट्रवादी कॉग्रेस मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह कधीच वापरले नव्हते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्यांनी मित्र पक्षांशी युती करुन निवडणुका लढतांना मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह वापरु नये, रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वासाठी रिपब्लिकन पक्षाच्याच गन्ना किसान या चिन्हांवर निवडणुक लढली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुक चिन्हांवरच रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निवडणुक लढावी हाच रिपब्लिकन पक्षाचा निर्णय असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यापूर्वी भारतीय दलित पँथरच्या काळात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडुन येत होते. नुकतीच पुर्णा शहराला भेट दिली. त्या शहरात भारतीय दलित पँथरचे 7 नगरसेवक निवडुन येत होते. नंतरच्या काळातही रिपब्लिकन पक्षाचेही नगरसेवक निवडुन येत होते. मात्र जेव्हापासुन राज्यात प्रभाग पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होवु लागल्या तेव्हापासुन रिपब्लिकन पक्षा सारख्या छोटया पक्षांचे नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडुन येणे कठीण झालेले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दतीने येणारी निवडणुक ही छोटया पक्षांवर अन्याय करणारी पध्दत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दतीने निवडणुक ही तात्काळ रद्द झाली पाहिजे. या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यापूढे प्रभाग पध्दतीने निवडणुक घेणे बंद केले पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #🙏महामानव डॉ. आंबेडकर #Politics.... #follow ##Breakingnews
Dr Ramdas Athawale
612 views
छत्रपती संभाजी नगर विमानतळावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे आज सकाळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. ##Breakingnews #RAMDASATHAWALE #Politics.... #follow ###Politics
See other profiles for amazing content