:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
ब्रम्हज्ञान नसताना उपदेशाचा जर बलात्कार म्हणजे बळजबरी केली तर, तो प्रकार म्हणजे गारुडयाने वानराला नाचवल्या सारखा होईल. जरी कोणी सांगितले धन धान्य मिळवावे, राज्य संपादन करावे, तर हे बोल ऐकण्यास जरी समाधानकारक असले तरी ते फोलफटा प्रमाणेच आहे. आणि अधिकार नसताना ब्रम्हज्ञानाचा जो उपदेश करतो तो प्रकार म्हणजे जमिनीत ओल असताना बीज पेरणे असा होतो आणि जो जमिनीत ओल नसताना बीज पेरतो त्याला मूर्खच म्हणावे. श्रेष्ठ लोक हे वेदाने सांगितल्याप्रमाणे आचरण करतात व जगाला तसे आचरण करायला लावतात कारण त्यांच्या ठिकाणी त्याला अनुभवाचा भक्कम आधार असतो. आणि आपल्या पदरात पाप बांधले जाईल असे काही वर्तन करू नये. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला मेघवृष्टीने उपदेश करत आहे तो तुम्ही ऐका व्यर्थ अभिमान धरून कोणाला काही सांगणे या मध्ये फार मोठा धोका असून सहज रीतीने मी जे काही सांगत आहे ते चांगले सांगत आहे व ते उत्तम आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२१/०२/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝