:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२५३९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
बसताना, झोपताना, जेवताना सारखे गोविंदाचे चिंतन चालू असते त्यामुळे त्रिभूवनात आनंद समवलेला मला दिसतोय. काळाने माझा आणि इतरांचा संबंधाचा ताडातोड केला असून माझ्या चित्तात गोविंदाचे स्मरण सारखे चालू असते व यामुळेच मला कोणाचेही स्मरण करण्यास अवसरच पडत नाही. माझ्या शरीराचे भाग पंचमहाभूतांच्या ठिकाणी वाटणीला घातले असून व्दैतभावच मी खंडीत केला आहे. माझ्या आवडीचा आहार तो म्हणजे हरीची भक्ती हा मला पुष्कळ भेटत आहे त्यामुळे इतर सर्व व्यर्थ संकल्प मावळून गेले आहेत. काम, क्रोध, बुध्दी देणारे विविध निश्चय आणि हे सर्व ज्या ठिकाणी तयार होते असे मन नाहीसे झाले असून आता केवळ आत्मज्ञान झाल्यामुळे शांती निर्माण झाली असून भ्रमाचे सर्व ओळसे नाहीसे झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, "माझ्या मनामध्ये श्रीरंगाचा रंग अभंग व एकनिष्ठ म्हणजे कधीही न भंगणारा बसला आहे."
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०९/०८/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖