फॉलो करा
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
3,006
पोस्ट
4,133
फॉलोअर्स
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
564 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३४१ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- सतीचे वाण घेणे परिणामी खूप कठीण आहे. कारण त्यासाठी जिवावर उदार व्हावे लागते व तसे केल्यानेच गौरव प्राप्त होतो जर वरवर केवळ दांभिकपणाचे सोंग आणले तर त्यांना गौरव प्राप्त होत नाही. ज्याची दृष्टी युद्ध पाहून व युद्ध करून दृढावलेली आहे त्यानेच युद्धाच्या गोष्टी कराव्यात नाहीतर करू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात कितीही बिकट प्रसंग अंगावर आला तरी आपल्या अंगामध्ये धैर्य पाहिजे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२३/०१/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
586 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३४० -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवाशी अनन्य असलेली भक्त स्री म्हणते की हे सखयानों जश्या तुम्ही आता माझ्यापासून दूर आहात तशाच दूर रहा. माझ्या अंगी गोपाळ जडला आहे व त्याच्याशी व्याभिचार केल्याचा आळ माझ्यावर आला आहे तसा आळ तुमच्यावर येऊ देऊ नका. तुमच्या भोवती मृत्यू रुपी विक्राळ काळ आहे त्याच्या पासूनच तुमचे तुम्ही रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर माझ्यासारख्या देव वेड्या झालात तर तुम्ही ही माझ्यासारख्या जगात निंदेला पात्र व्हाल (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी सामान्य कोटीतील स्त्रियांना उपरोधिक भाषेमध्ये परमार्थाचा उपदेश केला आहे.) :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२२/०१/२०२६ वार-गुरुवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
592 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३३९ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- एक भक्त स्री देवाशी अनन्य झालेली असते व ती आपल्या मैत्रिणींना म्हणते हे, सख्यानों तुम्हाला बोलायचं असेल तर ते आपल्यापुरतेच मर्यादित बोला माझ्याशी बोलू नका कारण या आनंताने मला त्याच्यात गुंतून टाकले आहे. त्याने माझा पदर धरला आहे त्याला कितीही हिसका दिला तरी तो काही त्याच्या हातून माझा पदर सोडत नाही. तो त्याच्या जवळ जाणाऱ्या माणसाला वेधून टाकून माझा ही जीव त्याने वेधून टाकला असून त्याचेच वेध मला त्याने लावले आहे. अहो तुम्ही जे काही बोलता ते शब्द माझ्यासाठी केवळ कोरड्या गप्पा आहेत मला तर प्रत्यक्ष देवानेच मिठी मारली असून त्याचा अंग संग मला झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हालाही या भक्त स्री प्रमाणे होईल, जेव्हा तुम्हाला देवाचा अनुभव येईल त्यावेळेस तुमची देखील अशीच स्थिती होईल. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२१/०१/२०२६ वार-बुधवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
560 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३३८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- मी जे काव्य केले आहे ते सहज रीतीने लीला रुपी काव्य केले आहे परंतु ते मी केले नसून केवळ मी त्याचा साक्षी आहे व त्याचा त्याग ही मी करू शकत नाही इतका मला त्या काव्याचा हेवा जडला आहे. हा जो माझ्या वाणीतुन काव्य रुपी उपक्रम चालू आहे तो पहिल्यापासून जे निशब्द असे ब्रम्ह आहे हे त्याचेच निरूपण करीत आहे व कोणत्याही माइक पदार्थाचे वर्णन करण्याच्या बंधनात माझी वाणी पडत नाही. सर्व अंधाराचा नाश सूर्य करतो व त्या सूऱ्याच्या उजडा मध्ये सर्व लोक आपापले व्यवहार करत असतात परंतु सर्वांच्या व्यवहारापासून सूर्य वेगळा राहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काव्य केले आहे त्याविषयी "मी काव्य केले" असा अभिमान माझा केव्हाच गेला आहे आता तो अभिमान केव्हाच परत येणार नाही. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२०/०१/२०२६ वार-मंगळवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
659 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३३६ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- आता माझ्या अंतःकरणात कपट राहू नये आणि जर कपटच राहिले नाही तर काकुळतीला कोणाला जाण्याची गरज आहे? सत्य काऱ्यामध्ये कधीही अडचण येत नाही आणि सत्य काऱ्यात नारायण सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोड, प्रसन्न असतो. जे सत्य कर्म करत असतात त्यांच्यावर केव्हाही कोणत्याही विटाळाचा आघात होत नाही आणि सत्य कर्म केल्याने सत्यच पदरात पडते व सत्य हळूहळू वाढत चालते. कोणत्याही मार्गाने आपण चाललो असोत आपल्याला जिथे जायचे असेल तो मार्ग आपण विचारून घेऊन त्या मार्गाने गेलो तर आपण योग्य मुक्कामाला पोहचु त्यामुळे आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होईल आणि बुद्धीच्या पुढे शारीरिक बळ हे गवताप्रमाणे असते. अन्न सेवन करताना आपण घासा घासाने शांततेने जेवण केले तर ते पचुन व्यवस्थित जिरतेही आणि पुन्हा आपल्याला जेवणाची इच्छा उर्वरित राहते. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे तु माझी जननी आहे त्यामुळे माझ्या बोलण्यास योग्य मऱ्यादा घाल. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१८/०१/२०२६ वार-रविवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
1.1K जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३३५ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- चित्त शुद्ध करून भक्तीभावाने हरीचे गीत गावे. जर तुला देव हवा असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी हा सुलभ उपाय आहे. इतर लोकांचे गुणदोष कानावर तर काय मनात देखील येऊ देऊ नकोस. संतांच्या चरणावर मस्तक वाकून ठेव. नेहमी असे बोलत जावे की ज्यामुळे सर्वांना समाधान प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात थोडा, फार तरी परोपकार करत जा हे सर्व उपाय मी देवाच्या प्राप्ती करता सांगितले आहेत. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१७/०१/२०२६ वार-शनिवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
355 जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३३४ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवा विष्णुदासांना विविध प्रकारचे भोग त्रास आणि रोग होऊ लागलेत, देवा तुमचे वागने हे लाजिरवाणे दिसेल आणि हे तुम्हाला सांगावे लागेल काय? आम्हाला काळाने खावे आणि आम्ही बोललेले वाया जावे तर, तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमचे दास असून देखील आम्ही गर्भवास तर भोगू परंतु तुम्हाला हे चांगले दिसणार नाही. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१६/०१/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
617 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३३३ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवा तुझ्या कडे मोक्षाचे अनेक प्रकार आहेत ते तुझ्याकडेच असू दे त्याच्यासाठी मी व्यर्थ कष्ट करत का राहावे. आमचे स्वहित आम्ही जाणतो अन तुझ्या प्राप्तीचे खरे वर्म तुझ्या नामातच आहे हे देखील आम्हाला समजले आहे. तुझ्या नामा वाचून दुसरा कोणताही विचार करत बसलो की आयुष्य वाया जाऊन रोज नुकसानच होते. यामुळे मी तुझे पाया आठवून निश्चिंत राहील व दुसरे काहीही मनात येऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुला कीर्तनाचे फार मोठे वेड आहे त्यामुळेच तुला कीर्तनाला कोणी बोलावले जरी नाही तरी तु तेथे आवर्जून येतोस. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१५/०१/२०२६ वार-गुरुवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🌻आध्यात्म 🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
See other profiles for amazing content