:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३३९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
एक भक्त स्री देवाशी अनन्य झालेली असते व ती आपल्या मैत्रिणींना म्हणते हे, सख्यानों तुम्हाला बोलायचं असेल तर ते आपल्यापुरतेच मर्यादित बोला माझ्याशी बोलू नका कारण या आनंताने मला त्याच्यात गुंतून टाकले आहे. त्याने माझा पदर धरला आहे त्याला कितीही हिसका दिला तरी तो काही त्याच्या हातून माझा पदर सोडत नाही. तो त्याच्या जवळ जाणाऱ्या माणसाला वेधून टाकून माझा ही जीव त्याने वेधून टाकला असून त्याचेच वेध मला त्याने लावले आहे. अहो तुम्ही जे काही बोलता ते शब्द माझ्यासाठी केवळ कोरड्या गप्पा आहेत मला तर प्रत्यक्ष देवानेच मिठी मारली असून त्याचा अंग संग मला झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हालाही या भक्त स्री प्रमाणे होईल, जेव्हा तुम्हाला देवाचा अनुभव येईल त्यावेळेस तुमची देखील अशीच स्थिती होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२१/०१/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव