1680 ला #छत्रपती शिवाजी राजेंचा मृत्यू झाला
1869 ला महात्मा फुलेंना समाधीचा शोध लावला
म्हणजे तब्बल 189 वर्ष कोणाला माहीत सुद्धा नव्हते की शिवाजी नावाचा #राजा होता...आणि जर माहीत होते तर 189 वर्ष इतका कालावधी का कोणी बोलला नाही का कोणाला #समाधीचा शोध लागला नाही ?
राजेंचा पहिला पुतळा उभा करायला 1928 इतका कालावधी उजाडावा लागला
म्हणजे पहिला पुतळा उभा करायला किमान 248 वर्ष लागली...
मला एक म्हणायचं आहे ...वरील आकडेवारी पाहता जे आजकाल स्वताला वंशज म्हणून म्हणवून घेतात. किंवा जे स्वतःला मावळा म्हणून घेतात. हिंदुस्थान महासत्ता, महागुरु म्हणतात ते व त्यांची पिढी 189 वर्ष किंवा 248 वर्ष भांग मारून पडले होते का ?
189 वर्ष कोणाला शिवाजी महाराजांची समाधी असेल अशी कल्पना सुद्धा नसावी का?? महात्मा फुल्यांचे उपकारच म्हणावेत की... ज्यांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जरणौद्धार करून ज्यांना वाटत होते की इतिहासातून शिवाजी महाराज संपवले किंवा ज्यांना वाटत होते की पुन्हा शिवाजी महाराज वर येऊच नये... त्यांच्या छाताडावर बसून फुल्यांनी शिवाजीं महाराजांना तो सन्मान मिळवून दिला... आता जगाला महाराज कळाले म्हणून ते आमचेच असणाऱ्यांची स्पर्धा करणारे किती ढोंगी असतील. इतकेच काय तर ते मराठा म्हणून आमचेच आहेत म्हणणार्यांनाही काय म्हणावे....??? तेव्हा शिवाजी महाराज हे अठरापगड जातींचे दैवत आहे व हे दैवत आधुनिक काळातील लबाडांना वापरु न देणे हे अठरापगड जातींचे महा कर्तव्य समजावे. !!!
ब्रिटिश शासन कालीन काळात एखादया संस्थान प्रमुख किंवा स्वताला राजा म्हणवून घेणाऱ्या संस्थान वंशजांना का वाटले नसावे?
की शिवाजी राजेंची समाधी शोधून जर्णौद्धार करावा... व पुन्हा शिवाजी राजेंचा विचार जिवंत करावा असं का वाटले नसेल?
189 वर्षापर्यंत "शिवाजी महाराज" का नको होते ? या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल...?
सौजन्य सतीश वाघमारे
#सत्य
#शिवाजी महाराजांचे विचार #छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩 #🚩🚩🚩🚩शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩