भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर व अप्रतिम अभिनयाने जनमानसाच्या मनात घर करणारे सिने-अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. साधेपणा, अढळ मेहनत, विनम्र स्वभाव आणि अभिनयातील विलक्षण दैदिप्यमानता यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्वांच्या आदराचे मानकरी होते.
माझे धर्मेंद्रजींचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते. धर्मेंद्रजींच्या जाण्याने भारतीय सिनेमाचे एक सुवर्णयुग संपल्याची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची कलाकृती, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कुटुंबवत्सल स्वभाव येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या दुःखद प्रसंगी धैर्य मिळो — हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली…!
#DharmendraDeol #भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐💐