jaybhim

Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
7.6K views
4 months ago
#मालेगाव_येथे_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या #पुतळ्याला_अभिवादन_करताना_मुस्लिम_बांधव.. ही आहे भारताची एकता ही ताकत आहे भारतीय संविधान मध्ये सर्व धर्मीय सर्व धर्म समभाव हे स्वातंत्र्य दिलेले आहे संविधानाने #malegaon #ramzan #babasahebambedkar #bhimshahi #babasaheb #drbabasahebambedkar #jaybhim #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
775 views
4 months ago
*जाती अंताचा लढा...* *डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. 1927 च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे कारण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. 4 ऑगस्ट 1923 रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रायबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बकालेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शान्य, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करुन घेतला. रावबहादुर बोले यांनी 5 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या तरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला, या उरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ आंबेडकरांनी 19 मार्च व 20 मार्च 1927 रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि 20 मार्च 1927 रोजी महाड येथे आंदोलन सुरु करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. डॉ आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.* *20 मार्च 1927 रोजी डॉ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. बाबासाहेबांनी सर्वप्रथम चवदार तळ्‌यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी डॉ आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठीच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने वेत दलितांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ले केले. डॉ आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार तळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करुन त्यांच्यावर खटला चालू केला. या आंदोलनाद्वारे डॉ आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे रे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंत सहस्त्रबुध्दे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे डॉ आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते...* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #jaybhim #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
1.3K views
4 months ago
#महाड_सत्याग्रह_परिषद #महाड #महाडसत्याग्रह महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याकरिता येथे मोठ्या प्रमाणावर अस्पृश्य समाज स्वोन्नतीचा प्रयत्न करीत असता. त्यांच्याविरुद्ध मराठे आहेत अशा कंड्या काही परजातीचे बेजबावदार लोक उठवीत आहेत. त्या सर्वस्वी निराधार आहेत. आम्ही महाडचे मराठे, मराठा समाजाचे पुढारी हक्क मिळवावेत. त्यांच्या आड येण्यास मराठा समाज तयार नाही. उलट अस्पृश्यांच्या प्रयत्नाबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती ारी म्हणून कळवीत आहोत की, अस्पृश्यांनी आपले मनुष्यपणाचे वाटत आहे. मात्र हे प्रयत्न करीत असता अस्पृश्य समाजाने सनदशीर मार्गाने प्रयत्न केल्रूास अस्पृश्य समाजाचे कल्याण त्वरित होईल असे आमचे मत आहे. सत्याग्रहाच्या बाबतीत आम्ही तटस्थ राहणार असा ठराव ता. २१/२२/२७ रोजी पासही केला आहे. हल्ली जो अस्पृश्यांविरुद्ध तळ्यांसंबंधी कोर्टात दावा लागला आहे, त्यात जे ९ स्पृश्य आहेत त्यापैकी जो एकच मराठा गृहस्थ आहे त्याने या बाबतीत मराठा समाजाचे मत घेतलेले नाही व त्यांना मराठा समाजाची या बाबतीत मुळीच संमती नाही. सह्या नारायण मामा मांगडे, पेन्टर कोंडीराम पांडुरंग शिंदे किसन बाबा धुमाल तुकाराम सावळाराम पानसरे कृष्णाजी ग्यानूबा पवार बाबाजीराव माधवराव दळवी सीताराम गोपाळ चौधरी यावरून तुम्हास दिसेल की, मराठा वर्ग तुम्हाविरुद्ध नाही. तथापि ब्राह्मणेतर पक्षाचे असे सांगणे आहे की फिर्यादीचा निकाल होईपर्यंत सत्याग्रह थांबविणे इष्ट आहे. कलेक्टर साहेबांचेही तेच मत आहे. या उभयपक्षांचे म्हणणे तुम्ही ऐकावे, हे बरे असे मला वाटते. नंतर सुभेदार घाटगे म्हणाले, 'मला देखील तसेच वाटते. मी स्वतः पेन्शनर सुभेदार आहे. सत्याग्रहात भाग घेता तर माझ्या पेन्शनला धक्का पोहोचेल. याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीपण सत्याग्रह करण्याच्या निश्चयाने येथे पुण्याहून आलो. परंतु मला एक गोष्ट सांगणे प्राप्त आहे, ती ही की, मी स्पृश्य लोकांविरुद्ध सत्याग्रह करण्यास आलो होतो. परंतु हे लोक सरकारच्या आड लपून आपली व सरकारची झुंज लावून देऊपाहात आहेत. तेव्हा ही झुंज खेळताना आपण पुरता विचार करावयास पाहिजे. सरकारचा दुराग्रह असता तर आपण ही झुंज घेणे अवश्य झाले असते. पण कलेक्टर साहेबांच्या भाषणावरून तसे दिसत नाही. त्यांची आपणास पूर्ण सहानुभूती आहे. मग विनाकारण सरकारशी वाद का करावा? आपण जो उत्साह आज दाखविला तो फार अपूर्व आहे. त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. इतका उत्साह असल्यावर आपल्याला जयप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण बदललेल्या परिस्थितीचा विचार करून सबूर करावे अशी माझी विनंती आहे.' नंतर कलेक्टर साहेब यांना लौकर जावयाचे असल्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी त्यांचे आभार मापनले व त्यांना पोहोचविले. कलेक्टर साहेबांच्या भाषणाचा काहीच परिणाम झाल्याचे दिसले ानही. कारण कलेक्टर साहेब गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या भाषणावर वक्ते बोलू लागले तेव्हा सत्याग्रहाच्या विरुद्ध बोलणाऱ्या वक्त्यांचे ऐकून घेण्यास लोकांची तयारी नाही असे दिसले. परंतु रा. कृष्णाजी दावणे व कु. शांताबाई शिंदे यांच्याासारख्या सत्याग्रहस अनुकूल असणाऱ्या वक्त्यांस टाळ्या पडत होत्या. हीचर्चा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालली होती. तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी सांगितले की, आज रात्री पुनः बसून याचा विचार करण्यात येईल, व उद्या सकाळी नक्की काय ते ठरवू. असे सांगून आताची बैठक संपली आहे असे जाहीर केले. दिवस तिसरा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परिषदेची बैठक संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे सत्याग्रह करावा किंवा न करावा याचा निकाल करण्याकरिता पुन्हा रात्री काही निवडक मंडळींची बैठक भरविण्यात आली व व त्यात पुष्कळ भवति न भवति होऊन सत्याग्रह तहकूब करून तूर्त गावातून मिरवणूक काढून तळ्याभोवतालून न्यावी ही तडजोड बहुमताने मान्य झाली व त्याप्रमाणे रात्री कलेक्टर साहेबास ही कळविण्यात आले. परंतु तहकुबीचा ठराव सभेपुढे कोणी मांडावा हा मोठाच प्रश्न येऊन पडला. डॉ आंबेडकरांनी मांडला तरच त्याला पाठिंबा मिळण्याचा संभव होता. कारण सभा जर कोणाचे ऐकेल तर एकट्या डॉ. आंबेडकरांचे ऐकेल, दुसऱ्या कोणाचे ऐकणार नाही. हे सर्वांना ठाऊक होते. त्याप्रमाणे डॉ आंबेडकरांनी ठराव मांडावा असा सर्वांचा आग्रह पडला व ती जबाबदारी डॉ आंबेडकरांनी आपल्या अंगावर घेतली. तद्नुसार तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा परिषदेस सुरुवात झाली तेव्हा त्यांनी खालील ठराव सभेपुढे मांडला. ठराव :- जे स्पृश्य हिंदू लोक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांस घेऊ देत नाहीत त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करण्याकरिता ही सभा बोलावण्यात आली असता, त्याच स्पृश्य हिंदूंनी सरकारची पाठ फिरून आयत्या वेळी दिवाणी कोर्टाचा तात्पुरता मनाई हुकूम अस्पृश्य वर्गाच्या विरुद्ध मिळविल्यामुळे या सभेस सरकारविरुद्ध सत्याग्रह करण्याचा प्रसंग आणला ही गोष्ट ध्यानात घेऊन आणि मे. कलेक्टर साहेबांनी आपल्या भाषणात या बाबीत सरकारचा दुराग्रह नसून, समान हकांकरिता अस्पृश्यांनी चालविलेल्या झगड्यात त्याला सरकारची पूर्ण सहानुभूती आहे असे भर सभेत दिलेले आश्वासन याचा विचार करून ही परिषद दिवाणी दाव्याचा निकाल होईपर्यंत सत्याग्रह तहकूब करीत आहे. ठराव मांडताना डॉ. आंबेडकर म्हणाले "सत्याग्रह करा असा ठराव मी काल मांडला आणि सत्याग्रह तूर्त करू नका असा ठराव आज मीच मांडीत ओह हे पाहून आपल्याला मी चंचल वृत्तीचा माणूस आहे असे वाटेल. पण तसे काही नाही. दोनही गोष्टी पूर्ण विचारांतीच मी करीत आहे. काल आपल्यात निश्चय किती आहे याचा मला अंदाज पाहावयाचा होता. तो अंदाज मिळाला. आपला पूर्ण निश्चय असल्याबद्दल आता कोणालाही शंका उरली नाही. इतक्याने माझे समाधान झाले आहे. आपल्यात निश्चयाचे बळ नव्हते हीच आपल्यातील मोठी उणीव होती. ती उणीव तुम्ही भरून काढली आहे. आपण सत्याग्रह करू नये असे जे मी आपणास सांगत आहे ते देखील मी पूर्ण विचारांतीच सांगत आहे. शक्ती अंगात आली म्हणून तिचा उपयोग लगेच केला पाहिजे अशातला काही भाग नाही. शक्तीचा उपयोग करणे तो काळ वेळ पाहून करणे प्राप्त आहे. विचारांती मलाही पटले आहे की आज या शक्तीचा आपण उपयोग करू नये. आज सत्याग्रह केला तर, तो सरकारविरुद्ध होणार आहे. सरकारचा दुराग्रह असेल तर सरकारविरुद्धही सत्याग्रह करावयाला हरकत नाही. पण सरकारचा दुराग्रह आहे का? याचा विचार करा. सरकारची आपल्याला सहानुभूती आहे. मग विनाकारण सरकारला पेचात का टाकावे? दुसरे असे की आपल्या सत्याग्रहाला स्पृश्य लोकांची मुळीच सहानुभूती नाही, हे तुम्ही पाहाता आहा. स्पृश्य लोक सर्वस्वी आपल्याशी असहकारिता करीत आहेत. व्यापारी लोकांनी बाजार बंद केला आहे, खोतांनी शेती काढून घेण्याचा सपाटा लावला आहे व कुणबी लोकांनी गुरे कोंडवाड्यात घालण्याचे सत्र सुरु केले आहे. या जोर जुलूमातून आपल्याला निभावून जावयाचे आहे. तशाप्रकारे निभावून जाण्यास सरकारचे सहाय्य अवश्य आहे. ते मिळविण्याचे आश्वासन सरकार देत असताना आम्ही सरकारविरुद्ध सत्याग्रह करणे अनुचित आहे असे जर काही लोक म्हणाले तर ते वावगे आहे असे कोणाला म्हणता येणार नाही. तेव्हा तुम्ही याप्रसंगी, माझे ऐका आणि या ठरावास संमती द्या. तुम्हाला लोक हसू शकत नाहीत, खुद्द कलेक्टर साहेब तुमची विनवणी करीत आहेत, तेव्हा तुम्ही भ्याड म्हणून सत्याग्रह तहकूब करीत आहात असे कोणीही म्हणू शकणार नाही, फार तर तुमच्या पुढाऱ्यांनी माघार घेतली म्हणून हिणवतील. पण त्यांची खंती वाटावयाला नको. मला तरी वाटत नाही. कारण मी माघार घेतो ती तुमच्या हिताकरिताच. माझे अनुयायी माझ्यापुढे चार पावले गले ही मोठ्या आनंदाची नव्हे अभिमानाची गोष्ट आहे असे मी समजतो. आज हा सत्याग्रह तहकूब करा असे जरी मी म्हणतो तरी तळे काबीज केल्याशिवाय राहू नये हा जसा तुमचा निश्चय आहे तसा माझा पण आहे. तो तडीस नेल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही हे पक्के ध्यानात असू द्या. वरील प्रकारचे भाषण ऐकून सत्याग्रह मंडळी फार निराश झाली. तरी पण सगळ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सांगण्यास मान देऊन त्यांच्या ठरावास मुकाट्याने रुकार दिला. प्रतिनिधींची प्रचंड मिरवणूक नंतर जमलेल्या प्रतिनिधींची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रथमारंभी मुंबईहून आलेले ५० व्हालंटियर होते. त्यानंतर सभेस आलेल्या ५० स्त्रिया होत्या. त्यानंतर एकापाठी एक चार चारांच्या रांगेत सगळे प्रतिनिधी चालले होते. मधून मधून अंतरावर ब्रीदवाक्य लिहिलेल्या पताका धरलेले लोक होते. गेल्या मार्च महिन्यात अस्पृश्य लोकांनी तळे भ्रष्ट केले म्हणून महाडातील स्पृश्य लोक सारे धर्मवीर बनले होते व नंगा नाच करून तुरुंगात गेले. आता तर कोर्टाचा मनाई हुकूम मिळविला असल्यामुळे त्यांनी तर छाती काढून चालावयास पाहिजे होते. परंतु सर्वांनी दारे लावून घेतलेली. बायकापोरे तर काय पण पुरुषसुद्धा रस्त्यावर फिरावयाचे बंद झाले होते. पुढारी लोक तर जीव घेऊन गाव सोडून पळून गेले होते. एकजण गावात असेल तर हराम. कोर्टाचा मनाई हुकूम सुटला असल्यामुळे सरकार घडीपुरते त्यांच्या बाजुचे असता महाडची प्रजा इतकी दीनवाणी कशी झाली, याचे सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. सिंहाचे छावे सगळी मांजराची पिल्ली कशी झाली हे एक कोडे होते. आधीच घाबरून गेलेल्या या लोकांनी ही प्रचंड मिरवणूक बाजारपेठेतून चाललेली पाहून सर्व महाड शहग गांगरून गेले. असल्याप्रकारची मिरवणूक पाहण्याचा महाडा शहराला हा पहिलाच प्रसंग होय. पंचम जार्ज की जय, महाड सत्याग्रह की जय, गांधी की जय, आगर की जय, लोकहितवादी की जय, एकनाथ महाराज की जय वगैरे जयघोषाने सर्व शहर दणाणून गेले होते. मिरवणूक बाजारपेठेतून निघून चवदार तळ्याच्या कोपऱ्यावर आली व तेथे मिरवणूक उभी फोडण्यात येउन अर्धी मिरवणूक तळ्याच्या एका बाजूने व अर्धी मिरवणूक तळ्याच्या दुसऱ्या बाजूने नेऊन तळ्याच्या एका कोपऱ्यावर दोहीची मिळणी करून पुढे एक होऊन मंडपाजवळ आली. अशारीतीने तळ्याच्या चारही बाजूला वेढा देण्यात आला होता. हा विलक्षण देखावा पाहून आता तळे घ्यावयाचे बाकी काय राहिले. असे केविलवाणे उद्‌गार गावातील लोकांनी काढल्याचे ऐकू येत होते आणि तसे उद्‌गार निघणे अगदी शक्य होते. कारण खांद्यावर काठ्या घेऊन चालत येत असलेल्या या मिरवणकीचा देखावा शिवाजीच्या काळच्या मावळ्यांच्या सैन्याची आठवण करून देत होता. मिरवणूक इतकी मोठी होती की आघाडीचे लोक मंडपाजवळ परत आले तरी पिछाडीचे लोक मंडपाजवळच होते. मिरवणूक काही मंद गतीने चालत नव्हती. तरी पण साडेदहा वाजता निघालेली मिरवणूक संपण्यास १२ वाजले. यावरून मिरवणूक किती मोठी होती याची कल्पना करता येईल. मिरवणूक संपूण मंडळी परत आल्यानंतर पुन्हा परिषदेस सुरवात झाली व रा. शिवतरकर यांनी खालील ठराव सभेपुढे मांडला : ही परिषद यशस्वी करण्याचे कामी ज्या अस्पृश्यतेवर सद्‌गृहस्थांनी मदत केली त्यांचे व विशेषतः खालील सद्गृहस्थांचे ही सभा कृतज्ञतापूर्वक आभार मानीत आहे. (१) अ.वि. चित्रे (२) सुरेंद्रनाथ टिपणीस (३) फत्तेखानसाहेब मुठोलीकर (४) शांताराम रघुनाथ पोतनीय (५) केशवराव देशपांडे, (६) ग.नि. सहस्रबुद्धे. या ठरावावर श्रीयुत पांडुरंग नाथूजी राजभोज, श्रीयुत मोरे, श्रीयुत वनमाळी वगैरे मंडळींनी चरित्रात्मक भाषणे केली. व हा आभार प्रदर्शनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात पास झाला. त्यावर रा. अनंतराव चित्रे व सहस्रबुद्धे यांनी उत्तरादाखल भाषणे केल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी सांगितले की, 'जरी सभेचा कार्यक्रम आता संपला आहे तरी इतर काही महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करणे राहिले आहे व त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याकारणाने त्याचा विचार केल्याशिवाय ही परिषद शेवटास गेली असे मला म्हणता यावयाचे नाही. आता बराच वेळ झाला असल्याकारणाने या विषयाची चर्चा आज संध्याकाळवर ढकलणे मला प्राप्त झाले आहे. म्हणून आपण सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण घरी न जाता संध्याकाळच्या परिषदेच्या बैठकीस हजेरी द्यावी. वरील प्रकारचे अध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर सभेचे काम एक वाजता संपविण्यात आले... संदर्भ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर समग्र भाषण संग्रह #🙂Positive Thought #jaybhim #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙