कट्टर भिम सैनिक

Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
549 views
10 hours ago
बाबासाहेबांचे विविध भाषणातून विचार... भाग 2 विकल्या गेलेल्या नेत्यांना ओळखायला शिका हे समाजात राहून समाजाला दिशाहीन करण्याचे काम खूप अलगत करत असतात त्यांच्या पासून सावधान रहा हे स्वतःचा फायदा करून समाजाचे आणि चळवळीचे नुकसान करत असतात... तुम्ही स्वतःच स्वतःची गुलामगिरी संपवली पाहिजे. ती नष्ट करण्यासाठी कोण्या देवावर किंवा कोण्या महापुरुषावर अजिबात विसंबुन राहू नका. लक्षात ठेवा की लोक नुसते आकडेवारीने बहुसंख्य असणे पुरेसे नाही. यश मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी लोकांनी सजग, सक्षम आणि स्वाभिमानी असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आपले मार्ग स्वतःच आखले पाहिजेत आणि स्वतःच त्या मार्गावरुन चालले पाहिजे... अस्पृश्यता ही अस्पृश्यांसाठी जीवन सुधारण्याच्या सर्व प्रकारच्या संधींची दारे बंद करून टाकते. ती अस्पृश्याला समाजात मोकळेपणाने फिरण्याची संधी देत नाही, तर ती त्याला कैदेत आणि विजनवासात जगण्यास भाग पाडते; ती त्याला स्वतःला सुशिक्षित करण्यापासून व त्याच्या निवडीचा व्यवसाय करण्यापासून रोखते... अस्पृश्यतेने अस्पृश्य, हिन्दू व अंतिमतः देशाचाही विनाश केला आहे. उपेक्षित वर्गाला जर त्याचा आत्मसन्मान प्राप्त झाला तर ते केवळ स्वतःच्याच प्रगती व समृद्धीमध्ये सहभागी होतील असे नाही तर त्यांची व्यावसायिक कौशल्ये आणि निर्धारामुळे ते देशाच्या शक्ती व समृद्धीमध्ये देखील योगदान देतील. अस्पृश्यतेच्या अवमानकारक जिण्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी अस्पृश्यांना जी काही महाकाय शक्ती खर्च करावी लागते आहे, ती जर वाचवली तर तीच शक्ती त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि संपूर्ण देशातील संसाधनांचा विकास यासाठी वापरली असती.... या देशात अनेक महात्मे होऊन गेले ज्यांचे एकमेव उद्दिष्ट अस्पृश्यतेला नष्ट करून उपेक्षित वर्गाचे जिणे उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेणे हे होते, पण कुणालाही त्यांच्या कार्यात यश आले नाही. महात्मे आले आणि महात्मे गेले, परंतु अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले... जातीप्रथेचे संपूर्णतः निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून संतांच्या संघर्षाचा समाजावर काही परिणाम झालेला नाही. व्यक्तीचे मूल्य हे स्वयंभू व स्वस्थापित असते; ते त्याच्याकडे भक्तीच्या मुलाम्यामुळे येत नाही. संतांनी हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला नाही. याउलट, उपेक्षित वर्गावर त्यांच्या संघर्षाचा अयोग्य परिणाम झालेला आहे. यांमुळे ब्राह्मणांना अस्पृश्यांच्या तोंडावर फेकून त्यांची तोंडे बंद करायला एक तर्क मिळाला की तुम्ही जर चोखामेळा सारखे व्हाल तरच तुम्हाला आदर मिळेल नाहीतर नाही... हिंदू संहितांमधून खोडसाळपणे असा प्रचार केला गेला की उच्च वर्णीयांची सेवा करण्यातच शुद्रांची मुक्ती सामावलेली आहे. अस्पृश्यता ही गुलामगिरीचेच दुसरे नावरूप आहे. कोणताही वंश त्याचा आत्मसन्मान नष्ट करून वाढूच शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला खरोखरच अस्पृश्यांचे उत्थान करायचे असेल, तर तुम्ही सामाजिक स्तरावर त्यांना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मुक्त असे स्वतंत्र नागरिक म्हणूनच वागवले पाहिजे... मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
671 views
1 days ago
*#डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांचे_विविध_दर्शन..* *बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम मी १९३२ साली माझ्या जन्मस्थळी साठगाव खेड्यात वडिलांच्या तोंडून ऐकले. दिवाळीच्या दिवशी महारपुऱ्यात सभा आयोजित केली होती. त्याप्रसंगी त्यांनी बाबासाहेबांविषयी माहिती दिली. ऐकणारे गरीब, अशिक्षित, काबाडकष्ट करणारे लोक अशा तन्हेने सण साजरा करण्याची प्रथा सुरू करत होते. भारतामधला सर्वात मागासलेला चांदा (चंद्रपूर) जिल्हा त्यावेळी निबिड जंगलांनी व हिंस्र वन्य प्राण्यांनी व्यापलेला होता. अस्पृश्यांची परिस्थिती सर्वात हलाखीची होती. सभेला आलेली मंडळी मलीन व अपुऱ्या कपडचात कसंबसं अंग झाकून बसली होती. स्त्रियांना वस्त्रं जेमतेमच. मी लंगोटीतच होतो. त्यावेळी गुरं राखणे हा माझा धंदा झाला होता. बाबासाहेबांचा उपदेश माझे वडील मारोतराव सर्वांना पटवून सांगत होते.* *'मेलेल्या गाईबैलांचे मांस खाऊ नका. पाडव्याच्या सणाला टोपली घेऊन कुणबीपुऱ्यात उरलेले अन्न मागण्यास जाऊ नका. मुला-मुलींना शाळेत पाठवा, अशी बाबासाहेबांची शिकवण आहे.' वडिलांचे चार शब्द बोलून झाल्यावर माझे आजोबा बुधाजी म्हणाले, 'आणखी कोणीतरी पुढे या न् बोला.' कोणीच उभा राहिला नाही म्हणून ते माझ्याकडे पाहून म्हणाले, 'नामदेव, बोल रे काहीतरी. चारचौघात उभा तर राहून पाहा!' मी हिमत करून पुढे झालो व बोलू लागलो. 'आपण सर्वांनी बाबासाहेब सांगतात तसे वागले पाहिजे.' सर्वांनी शाबासकी दिली. माझी हिमत वाढली.* *१९३३ मधे माझे नाव 'कोल्हारी' गावी प्रायमरी शाळेत टाकले. तो गाव माझ्या गावापासून ३ मैल लांब आहे. शाळेच्या आत बसता येत नव्हते. कोणा स्पृश्यास माझा हात लागला तर त्याला स्नान करावे लागे. नंतर १९३६ ला उमरेड ह्या शहरातील जोगीठाणा प्रायमरी शाळेत नाव टाकले व राहण्यासाठी गावाबाहेरील पडीक जागेमधे वडिलांनी झोपडे बांधून दिले. तिथे मी आजी सगुणाबाई, भाऊ अंकुश व बहीण रुक्मिणी यांसह राहू लागलो. १९३८ मध्ये चवथा व १९४२ ला आठवा वर्ग पास झाल्यावर समाधान लाभले. 'पब्लिक हायस्कूल' मधे शिकत असताना जुलै १८,१९,२० ला १९४२ साली नागपूरला 'अखिल भारतीय डिप्रेड क्लासेस कॉन्फरन्स' करिता बाबासाहेब आले होते. त्यावेळी त्यांचे दर्शन झाले. पण त्याकरिता मी आधीच उमरेडमधे सव्वा रुपयाचे प्रवेशतिकीट घेतले होते. ते पैसे मी शेतात २ पैसे रोजाने काम करून शिल्लक ठेवले होते. तिकीट तर घेतले प्रवेशाचे; पण नागपूरला जावे कसे? माझ्याजवळ फक्त १० पैसेच उरले होते, साठगाववरून नागपूरला जवळपास ५० मैल पायीच गेलो,* *नागपूरला बाबुराव मेश्राम शाहिरांकडे राहिलो. त्यांच्याच कृपेने माझा बाबासाहेबांच्या नागपूरमधील परिषदेच्या जवळच्या विश्रामगृहात समता सैनिक दलातर्फे अंगरक्षक असलेल्या तुकडीत समावेश झाला. त्यावेळी मला किती धन्यता बाटली म्हणून सांगू! परिषदेचे अध्यक्ष* *बाबासाहेबांऐवजी रावबहादूर एन. शिवराज होते. बाबासाहेबांना व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून घेतले होते, त्यामुळे बाबासाहेबांनीच श्री. एन. शिवराजचे नाव सुचविले होते. ही सभा नागपूरच्या इतिहासामधील सर्वात मोठी सभा होती. स्वागताच्या वेळी बाबासाहेबांना उद्देशून श्री. बाबूराव मेश्रामांनी गीत गायले, त्यावेळी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय' चा व टाळ्यांचा गजर होत होता.* *'आंबेडकर, क्या कहूँ शान और शौकत तेरी।* *और बस गई है भीमराव, दिलमें सूरत तेरी.....'* *ह्याच अधिवेशनात डिप्रेस्ड क्लासेसचे नामांतर 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' असे झाले. स्त्रियांच्या अधिवेशनाची अध्यक्षा श्रीमती डोंगरे व समता सैनिक दलाचे अध्यक्ष पंजाबचे 'गोपालसिंग' होते.* *त्यादिवशी बाबासाहेब फार आनंदात होते. ३० हजारांपेक्षा जास्त स्त्रिया हजर होत्या. अस्पृश्यांच्या सर्व जातींना एकत्र, एका सूत्रात बांधण्याकरिता शेडयूल्ड कास्ट फेडरेशन समर्थ होईल अशी आशा बाबासाहेब व्यक्त करत होते. अधिवेशन आटोपल्यावर संध्याकाळी लाला जयनारायणनी आयोजित केलेल्या स्वागत पार्टीला जावयास बाबासाहेब निघाले. सोबत बरीच कार्यकर्ती मंडळी होती. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक होते. आम्ही बाबासाहेबांना रस्ता मोकळा करून देत होतो. मंडपाबाहेर आल्यावर आम्हाला दिसले की ३-४ स्त्रिया फाटक्या कपड्यांत असलेल्या, थकलेल्या नजरेने वाट पहात उभ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकर सर्वांपुढे असल्यामुळे त्यांनी त्यांनाच विचारले, 'आंबेडकर कोठे आहेत?' बाबासाहेबांना फार नवल वाटले. त्यांनी सांगितले की, 'मीच आंबेडकर आहे. आपले काय काम आहे?'* *तेव्हा त्या माउल्या अति आनंदाने पुढे आल्या व आपल्या फाटक्या लुगडयाच्या ओट्यातून झेंडूच्या फुलांचे हार काढून बाबासाहेबांच्या गळ्यात टाकू लागल्या. त्यांच्या मानाने बाबासाहेब फार उंच होते. म्हणून बाबांनी मान खाली बाकविली व सर्व बायांनी त्यांच्या गळ्यात हार टाकले. त्या बाया बाबासाहेबांस सांगू लागल्या, 'आम्ही गरीब दुबळ्या, आमच्याजवळ मंडपाच्या आत जाण्याची तिकीट घेवाले पैसे नोयते बापा, मनून आमी तुमची वाट पाहात उभ्या होतो. कवातरी तुमी बाहार यालय, तवाच दर्शन घेऊ. आमी तुमाले पायले नोयते, आमच्याजवळ तुमचा फोटूबी नाई, तं मग वळखावं तं कायच्या भरोश्यावर? मनून चूक झाली बापा, तुमालेच पुसलो आंबेडकर कोण हाय मनून.'* *हे त्यांचे अगाध प्रेम पाहून बाबासाहेबांनी त्यांना विचारले, 'मग हे हार कसे घेतले? तुमच्याजवळ तर पैसे नव्हते.' तेव्हा त्या भोळ्याभाबड्या ग्रामीण बाया बाबांना सांगू लागल्या. एक म्हणाली, 'आज मी गवताचा भारा आणला खेडपातून, तो विकला य त्या पैशातून हार घेतला.' दुसरीने सांगितले, 'मी काट्यांची मोळी आणली, ती विकली व त्या पैशाचा हार घेतला.' त्यांचे ते निर्मळ प्रेम पाहून बाबासाहेब आंबेडकरांच्या भावना उचंबळून आल्या. त्यांचे डोळे अश्रृंनी दाटले व ते द्रवलेल्या कंठाने त्या माउल्यांना सांगू लागले, 'माझी आई मी लहान असतानाच वारली. ती कशी होती ते मला आठवत नाही, ती तुमच्यासारखीच दयाळू असली पाहिजे. म्हणून माउल्यांनो, मी ठामपणे सांगतो, जसा मी शिकून मोठा झालो, तसाच तुमच्या लेकरांनासुद्धा मोठा करीन व तुम्हाला सुखाचे दिवस दाखवीन. तसे करण्यात जर मी यशस्वी झालो नाही तर मी आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून घेईन.'* *बाबासाहेबांना त्यादिवशी बरेच पुष्पहार मिळाले होते, फार मोठमोठे व निरनिराळ्या फुलांचे, गुलाब, झेंडू, मोगरा इत्यादी हजारो हार बाबांच्या गळ्यात पडले होते. परंतु त्या गरीब बायांच्या हारांमुळे बाबासाहेबांचे हृदय द्रवले. आम्हाला फार नवल वाटले त्यांचे अश्रू पाहून. त्यांचे अंतःकरण फार कोमल होते. कार्यकर्त्यांना ताबडतोब बोलावून बाबासाहेबांनी आदेश दिला, की 'कोणालाही मंडपाबाहेर राहू देऊ नये. ज्यांची भाषण ऐकायची इच्छा आहे त्यांच्याजवळ पैसे असोत वा नसोत, त्यांना आतमध्ये प्रवेश द्यावा.'* *मुक्तीदाता विशेषांक* *लेखक डॉ ना मा. निमगडे* *संदर्भ डॉ बाबासाहेब* *आंबेडकरांच्या आठवणी* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
618 views
2 days ago
*लवकरच भिमजन्मोत्सव 2026* *Coming soon 14 April* *नगरमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही* *तर अवघ्या १०० वरून अधिक देशात साजरी होणारी जयंती म्हणजे* *भीम जयंती* *10X60* *BIGGEST BANNER* *BHIM JAYANTI 20K6* *NANDED* *The first 10X 60 graphics design hoarding was put up in Srinagar, Nanded city, on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's 135th birth anniversary.* *संघर्षाच्या आगीतून जन्मलेला समाज) विद्रोह आमच्या शब्दात आणि जगन्यात आहे सर भीमसैनिक प्रभात नगर नांदेड* #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
553 views
4 days ago
*शिक्षणाच्या उच्च टोकावर पोहचल्यानेच समाजाचा दर्जा उंचावेल* *८ ऑगस्ट १९३० साली, नागपूर येथे अखिल भारतीय दलित कॉग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालिन भारतातील राजकीय चळवळीप्रती दलित वर्गाचे धोरण ठरविणे हा या परिषदेचा उद्देश होता. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रदीर्घ भाषण म्हणजे दलितांच्या राजकीय हक्कांचा जाहीरनामाच होय.* *परिवर्तनाकरिता "राजकीय सत्ता प्राप्त केलीच पाहिजे," हे या भाषणातून बाबासाहेबांनी पटवून दिले. प्रस्तुत उतारा हा या भाषणातील शेवटचा समारोपाचा उतारा होय. राजकीय सत्ता साध्य नसून साधन होय हे सांगून अस्पृश्यांची मुक्ती सामाजिक उन्नतीमध्ये आहे हे त्यांनी स्पष्ट केले. ही उन्नती उच्च व उच्चतम शिक्षणाच्या माध्यमाने प्राप्त होईल हे त्यांनी या उताऱ्यात कथन केले आहे. संपादक.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण* *सद्‌गृहस्थांनो, आपण राजकीय सत्ता हस्तगत केली पाहिजे, याबद्दल वाजवीपेक्षा बराच वेळपर्यंत बोलून मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगितले. परंतु दलित वर्गाच्या सर्व रोगांवर राजकीय सत्ता हे औषध लागू होऊ शकत नाही, हेही मी तुम्हास सांगितलेच पाहिजे.* *त्यांची मुक्ती सामाजिक उन्नतीमध्ये आहे. दलित वर्गाने आपल्या वाईट चालीरीतीचा त्याग केला पाहिजे. त्यांच्या जीवन निर्वाहाचे जे वाईट मार्ग आहेत ते त्यांनी सोडले पाहिजेत. जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे तुमची राहणी इतकी उत्कृष्ट झाली पाहिजे की इतरांना तुमच्याबद्दल आदर-तुमची मैत्री हवी हवीशी वाटली पाहिजे. तुम्ही सुशिक्षित झाले पाहिजे. केवळ* *लिहिण्यावाचण्याचे ज्ञान पुरेसे ठरणार नाही; तर आपणापैकी काही शिक्षणांच्या उच्च टोकापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे त्यांच्याबरोबर वाटचाल करून संपूर्ण समाजाचा दर्जा उंचावेल, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या उदासीन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. कारण आहे त्या स्थितीत समाधानी न होण्याच्या वृत्तीतूनच समाजाची उन्नती होत असते आणि शेवटची परंतु कमी महत्त्वाची नसलेली बाब म्हणजे दलित वर्गात स्फूतर्ती व उत्साह निर्माण केला पाहिजे. म्हणजे त्यांच्या मनातील भीती नष्ट होऊन इतरांच्या बरोबरीने आपल्या मानवी हक्काच्या वहिवाटीस ते सुरुवात करतील.* *आपल्या हातात केवळ राजकीय सत्ता येण्याने हे परिणाम घडून येणार नाहीत, उद्दिष्ट साध्य करण्याचे ते फक्त एक साधन आहे, हे आपण ओळखले पाहिजे. मी धोक्याची सूचना देण्याचे कारण म्हणजे केवळ दलित वर्गातील काही लोकांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाल्याने दलित वर्गाच्या यातना नष्ट होतील,* *असा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. हे सर्व कार्य सामाजिक उन्नतीचे आहे. कै. गोखल्यांच्या* *'सव्र्वांटस् ऑफ इंडिया' किंवा कै. लाला लजपतराय यांच्या 'सव्र्व्हटस् ऑफ पिपल' या संस्थेच्या धर्तीवर दलित वर्गाची एक संस्था स्थापून तिच्यावर ही जबाबदारी सोपविली पाहिजे.* *समारोप* *सद्‌गृहस्थांनो, वाजवीपेक्षा जास्त लांब भाषणाने मी तुम्हास त्रस्त केले, याबद्दल मला खेद वाटतो. परंतु संक्षिप्तता नेहमीच अपेक्षित असली तरी राजकारणाबद्दल परिचित नसलेले लोक जेथे प्रथमच एकत्र झालेले आहेत, अशासारख्या आजच्या सभेत आपल्या प्रश्नांच्या सर्व बाजूंचा विचार करणे मला योग्य वाटले. तुम्हाला शक्य तितके अधिक मार्गदर्शन करावे, असा माझा हेतू होता. त्यामुळे लांब भाषणाबद्दल क्षमेला मी पात्र आहे, असे वाटते. ही आपली सभा शेवटची ठरणार नाही, तर आपल्या भव्य चळवळीची ती केवळ सुरुवात ठरावी आणि तिच्याद्वारा आपल्या लोकांना मुक्ती मिळून या देशात प्रत्येक व्यक्ती हे एक मूल्य-राजकीय, सामाजिक व आर्थिक मूल्य-मानण्यात येईल, अशी समाजरचना निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरेल, अशी मी आशा व्यक्त करतो.* *आपण मला जो बहुमान दिला आणि माझे भाषण ऐकून घेतले याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे...* *कार्यसंपादक* *मुक्तीदाता विशेषांक* *संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड २ संपादक मा. फ. गांजरे,* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
580 views
5 days ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भाग 3 युवाशक्ती प्रबोधन नवीन हक्क, मोठ्या नोकऱ्या वगैरे मिळवावयाच्या तर त्याला स्वतःची लायकी लागत असते. ती लायकी वाढविण्याचे मुख्य काम विद्यार्थिदशेत करीत असताना, तुम्ही इतर कोणत्याही चळवळीत पडणे चुकीचे होईल. (ठाणे, २ एप्रिल १९३३) मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे, पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. (मनमाड, १२ फेब्रुवारी १९३८) माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे, पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल, ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत? या सर्व गोष्टींचा विचार केला, की मी माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले, असे वाटू लागते. (मुंबई, २० जुलै १९५२) विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. (महाड, २ मे १९५४) महिला प्रबोधन घराप्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष मिळून सोडवितात त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्रीपुरुषांनी मिळून सोडवावयास पाहिजे आहेत. पुरुषांनी हे काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाही. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले, तर त्या, त्या कामात लवकर यशप्राप्ती करून घेतील. (महाड, १९२७) स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा, त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा, त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. (नागपूर २० जुलै १९४२) मुक्तीदाता विशेषांक #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
3.6K views
6 days ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कायदा-संविधानविषयक भाषणांतून कायदा समाजातील दोषांचे निर्मूलन करणे हाच कायदा करण्याचा हेतू असतो. दुर्दैवाने, प्राचीन समाजांनी समाजातील दोष काढून टाकण्यासाठी कायद्याचा उपयोग केला नाही. त्यामुळे त्यांचा नाश झाला. (केंद्रीय विधिमंडळ, नवी दिल्ली, फेब्रुवारी १९४८) कायदा सर्व जनतेला आश्रय घेता येईल असा माफक व सुबोध असला पाहिजे. आपले हक्क काय आहेत हे दरेक नागरिकास समजले पाहिजे. हरघडी त्याने वकिलावरच विसंबिले पाहिजे असा कायदा अमू नये. (नवी दिल्ली, ११ जानेवारी १९५०) येतात ते दूर करण्याचा प्रयत्न महिलांच्या सामाजिक उत्कर्षामध्ये कायद्याचे हिंदू कोड बिलात करण्यात आला आहे हे धनीवर अवलंबून असते आणि प्रत्येक महिलेने आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याती आपली धनसंपत्ती आणि अधिकार यांची काळजीपूर्वक जपणूक केली पाहिजे. (बेळगाव, २६ डिसेंबर १९५०) वारंवार संविधानदुरुस्ती केल्याने भविष्यात घटनेचे आजचे रूप वेगाने बदलावयाला वेळ लागणार नाही, म्हणून संविधान बनवितानाच त्यात वारंवार दुरुस्त्या कराव्या लागणार नाहीत इतके ते उत्कृष्ट बनवले आहे. (केंद्रीय विधिमंडळ, नवी दिल्ली, १५ सप्टेंबर १९५४) मुंबई महाराष्ट्राला देण्यात कुणाला काय हरकत असावी? मद्रास तमिळींना आणि कलकत्ता बंगाल्यांना मिळू शकतो, तर मुंबई महाराष्ट्रात का नाही? (राज्यसभा, नवी दिल्ली, १ मे १९५६) संविधान आपली राज्यघटना म्हणजे संसदीय लोकशाही स्थापित करण्यासाठी केलेली यंत्रणा आहे. संसदीय लोकशाहीचा अर्थ आहे एक व्यक्ती एक मत. याचाच अर्थ असा की शासनकर्ते सतत दक्ष असावेत, जेव्हा ते मतदात्यांपुढे जातील तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचा जनता आढावा घेऊ शकेल. (संविधान सभा, दिल्ली, १९ नोव्हेंबर १९४८) समान संधीचा सिद्धांत आणि ज्यांना आतापर्यंत प्रशासनात कधी संधी मिळालीच नाही त्यांची मागणी या दोन्ही बाबींचा मेळ घालावयाचा असेल तर 'मागासर्गीय' सारखा काहीतरी शब्दप्रयोग करणे भाग आहे. अन्यथा आरक्षणासाठी केलेला अपवाद मूळ नियमालाच बाधा आणेल. (संविधान सभा, दिल्ली, ३० नोव्हेंबर १९४८) संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. (संविधान सभा, दिल्ली, २५ नोव्हेंबर १९४९) (क) संकीर्ण (कायदा) भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम हिंदी, नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीयाच्या पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी. (मुंबई, १ एप्रिल १९३८) मुक्तीदाता विशेषांक #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
5.5K views
7 days ago
दि. १० जानेवारी १९३८ च्या मोर्चातील मागण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १० जनेवारी १९३८ रोजी मुंबई विधान मंडळावर २०-२५ हजार शेतकरी शेतमजूरांचा मोर्चा नेला. त्यांच्या हिताच्या मागण्या मुंबई सरकारपुढे सादर केल्या. त्या खालीलप्रमाणे आहेत. मुलभूत मागण्या : (१) शेतकरी वर्गाला स्वतंत्रपणे व सुखा-समाधानाने राहता यावे म्हणून जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणाऱ्यालाच त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे. (२) जमिनीची मशागत करून तीवरच जगणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल व त्यांच्या आर्थिक हिताची व्यवस्था असेल तर खोत-इनामदारासारखे मध्यस्थ नसले पाहिजेत. (३) जमिन कसणान्या शेतकन्यावर कर अगर पट्टी बसविण्यापुर्वी त्याला चरितार्धापुरती योग्य ती सोय करुन देणे हे सरकरने आपले कर्तव्य मानले पाहिजे. (४) ह्याच प्रमाणे शेतकऱ्यांना किमान मजूरी देण्याची कायद्याने सोय करून त्यांच्या हिताला जपणे, हेही लोकमतवादी सरकारचे कर्तव्य आहे. तातडीच्या मागण्या (१) ज्याप्रमाणे थकलेल्या शेतसारावाक्या माफ करण्यात आल्या त्याचप्रमाणे आज पर्यंत थकलेल्या खंडाच्या वाक्याही ताबडतोब माफ करण्यात याव्यात. (२) जमिनीचे किमान उत्पन्न ठरवून त्यापेक्षा कमी उत्पन्नावर सारा अजिबाद माफ करावा व किमान उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या जमिनीवर वाढत्या मानाने सान्याची आकारणी करण्याच्या दृष्टीने जमीन महसूल कायद्यात दुरूस्ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बाजारभाव उतरले असल्यामुळे ही दुरूस्ती होईपर्यंतच्या मुदतीत ज्यांना सालिना ७५ रु. अगर त्यापेक्षा कमी शेतसारा द्यावा लागतो त्यांचा सारा ताबडतोब ५० टक्क्यांनी कमी केला पाहिजे. (३) खोती पद्धती व इनामदारी पद्धती या आर्थिकदृष्ट्या नुकसान-कारक व सामाजिकदृष्ट्या जुलमी असल्यामुळे या पद्धती भरपाईसह अगर भरपाई शिवाय नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे. त्याच कुळांकडून वसूल करण्यासाठी व त्यांना छळण्यासाठी जमीनदार जे जे मुदती दाव्यासारखे जुलमी उपाय योजतील अगर योजनाचा बेत करतील ते ते सर्व ताबडतोब बंद पाडले पाहिजेत; व सरकारने यासाठी योग्य ती व्यवस्था करावयास पाहिजे. (४) १) तीन वर्षे जमीन कसणाऱ्या कुळाला कायम कुळ समजले जावे, असा कायदा सर्व जमीनदारांच्या कुळांना लागू केला पाहिजे. या कायद्याला बगल देण्याची कारवाई जमीनदारांना करता येऊ नये म्हणून एक लैंड कमीशन नेमण्यात यावे; व या कमिशनच्या परवानगीशिवाय कुळाच्या अंगाखालील जमीन काढून घेतली जाता कामा नये. कुळे जोपर्यंत खंड देत आहे तोपर्यंत त्याजकड़े तीन वर्षे असलेली जमीन कोणत्याही सबबीवर काढून घेतली जाता कामा नये. २) साऱ्याच्या मानाने फक्त तिसरा हिस्सा अधिक खंड घ्यावा. जास्त खंड कुळाकडून घेता कामा नये. (५) लहान शेतकऱ्यांची पाणीपट्टी ५० टक्यांनी कमी केली पाहिजे. बहुसंख्य लहान लहान शेतकरी व कुळे यांना फायदेशीर होईल असे धोरण इरिगेशन खात्याने चालविण्याच्या दृष्टीने इरिगेशन कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. (६) सर्व खेड्यांना मोफत चराई राने असावीत. (७) कर्ज निवारणाचा योग्य तो कायदा सर्वत्र लागू होईपर्यंत कर्ज तहकुबी जाहीर करावी. (८) शेतकऱ्याच्या हातून सावकराच्या हाती जमीन जाऊ नये, यादृष्टीने सावकारावर बंधन घालावे. (९) शेतकऱ्याच्या निर्वाहासाठी लागणारी किमान जमीन व त्याच्या चरितार्थाला लागणाऱ्या वस्तूवर सावकारी जप्ती आणण्यास बंदी झाली पाहिजे. (१०) वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांस मताधिकार, (११) वेठबिगार करुन घेणे व बेकायदेशीर रितीने पैसे उकळणे, हे फौजदारी गुन्हे ठरविले पाहिजेत. (१२) जमीन महसूल खात्यातील सर्व मॅजिस्ट्रेटी अधिकार काढून घ्यावेत. (१३) कसता येण्याजोगी सर्व पडीत जमीन उपरी शेतमजूरांना मोफत वाढून द्यावी.... #🙂Positive Thought #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
847 views
7 days ago
*तू धरलास हात वादळाचा अन संसार झाला माझ्या भीमाचा हा साज आज आमच्या जिंदगीचा आहे रमाई तुझ्या त्यागाचा* *४ एप्रिल १९०६ रोजी रमाई आणि बाबासाहेबांचा विवाह सोहळा भायखळा भाजी मार्केट मध्ये पार पडला. सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
5.5K views
20 days ago
#मालेगाव_येथे_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या #पुतळ्याला_अभिवादन_करताना_मुस्लिम_बांधव.. ही आहे भारताची एकता ही ताकत आहे भारतीय संविधान मध्ये सर्व धर्मीय सर्व धर्म समभाव हे स्वातंत्र्य दिलेले आहे संविधानाने #malegaon #ramzan #babasahebambedkar #bhimshahi #babasaheb #drbabasahebambedkar #jaybhim #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought