*#डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांचे_विविध_दर्शन..*
*बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम मी १९३२ साली माझ्या जन्मस्थळी साठगाव खेड्यात वडिलांच्या तोंडून ऐकले. दिवाळीच्या दिवशी महारपुऱ्यात सभा आयोजित केली होती. त्याप्रसंगी त्यांनी बाबासाहेबांविषयी माहिती दिली. ऐकणारे गरीब, अशिक्षित, काबाडकष्ट करणारे लोक अशा तन्हेने सण साजरा करण्याची प्रथा सुरू करत होते. भारतामधला सर्वात मागासलेला चांदा (चंद्रपूर) जिल्हा त्यावेळी निबिड जंगलांनी व हिंस्र वन्य प्राण्यांनी व्यापलेला होता. अस्पृश्यांची परिस्थिती सर्वात हलाखीची होती. सभेला आलेली मंडळी मलीन व अपुऱ्या कपडचात कसंबसं अंग झाकून बसली होती. स्त्रियांना वस्त्रं जेमतेमच. मी लंगोटीतच होतो. त्यावेळी गुरं राखणे हा माझा धंदा झाला होता. बाबासाहेबांचा उपदेश माझे वडील मारोतराव सर्वांना पटवून सांगत होते.*
*'मेलेल्या गाईबैलांचे मांस खाऊ नका. पाडव्याच्या सणाला टोपली घेऊन कुणबीपुऱ्यात उरलेले अन्न मागण्यास जाऊ नका. मुला-मुलींना शाळेत पाठवा, अशी बाबासाहेबांची शिकवण आहे.' वडिलांचे चार शब्द बोलून झाल्यावर माझे आजोबा बुधाजी म्हणाले, 'आणखी कोणीतरी पुढे या न् बोला.' कोणीच उभा राहिला नाही म्हणून ते माझ्याकडे पाहून म्हणाले, 'नामदेव, बोल रे काहीतरी. चारचौघात उभा तर राहून पाहा!' मी हिमत करून पुढे झालो व बोलू लागलो. 'आपण सर्वांनी बाबासाहेब सांगतात तसे वागले पाहिजे.' सर्वांनी शाबासकी दिली. माझी हिमत वाढली.*
*१९३३ मधे माझे नाव 'कोल्हारी' गावी प्रायमरी शाळेत टाकले. तो गाव माझ्या गावापासून ३ मैल लांब आहे. शाळेच्या आत बसता येत नव्हते. कोणा स्पृश्यास माझा हात लागला तर त्याला स्नान करावे लागे. नंतर १९३६ ला उमरेड ह्या शहरातील जोगीठाणा प्रायमरी शाळेत नाव टाकले व राहण्यासाठी गावाबाहेरील पडीक जागेमधे वडिलांनी झोपडे बांधून दिले. तिथे मी आजी सगुणाबाई, भाऊ अंकुश व बहीण रुक्मिणी यांसह राहू लागलो. १९३८ मध्ये चवथा व १९४२ ला आठवा वर्ग पास झाल्यावर समाधान लाभले. 'पब्लिक हायस्कूल' मधे शिकत असताना जुलै १८,१९,२० ला १९४२ साली नागपूरला 'अखिल भारतीय डिप्रेड क्लासेस कॉन्फरन्स' करिता बाबासाहेब आले होते. त्यावेळी त्यांचे दर्शन झाले. पण त्याकरिता मी आधीच उमरेडमधे सव्वा रुपयाचे प्रवेशतिकीट घेतले होते. ते पैसे मी शेतात २ पैसे रोजाने काम करून शिल्लक ठेवले होते. तिकीट तर घेतले प्रवेशाचे; पण नागपूरला जावे कसे? माझ्याजवळ फक्त १० पैसेच उरले होते, साठगाववरून नागपूरला जवळपास ५० मैल पायीच गेलो,*
*नागपूरला बाबुराव मेश्राम शाहिरांकडे राहिलो. त्यांच्याच कृपेने माझा बाबासाहेबांच्या नागपूरमधील परिषदेच्या जवळच्या विश्रामगृहात समता सैनिक दलातर्फे अंगरक्षक असलेल्या तुकडीत समावेश झाला. त्यावेळी मला किती धन्यता बाटली म्हणून सांगू! परिषदेचे अध्यक्ष* *बाबासाहेबांऐवजी रावबहादूर एन. शिवराज होते. बाबासाहेबांना व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून घेतले होते, त्यामुळे बाबासाहेबांनीच श्री. एन. शिवराजचे नाव सुचविले होते. ही सभा नागपूरच्या इतिहासामधील सर्वात मोठी सभा होती. स्वागताच्या वेळी बाबासाहेबांना उद्देशून श्री. बाबूराव मेश्रामांनी गीत गायले, त्यावेळी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय' चा व टाळ्यांचा गजर होत होता.*
*'आंबेडकर, क्या कहूँ शान और शौकत तेरी।*
*और बस गई है भीमराव, दिलमें सूरत तेरी.....'*
*ह्याच अधिवेशनात डिप्रेस्ड क्लासेसचे नामांतर 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' असे झाले. स्त्रियांच्या अधिवेशनाची अध्यक्षा श्रीमती डोंगरे व समता सैनिक दलाचे अध्यक्ष पंजाबचे 'गोपालसिंग' होते.*
*त्यादिवशी बाबासाहेब फार आनंदात होते. ३० हजारांपेक्षा जास्त स्त्रिया हजर होत्या. अस्पृश्यांच्या सर्व जातींना एकत्र, एका सूत्रात बांधण्याकरिता शेडयूल्ड कास्ट फेडरेशन समर्थ होईल अशी आशा बाबासाहेब व्यक्त करत होते. अधिवेशन आटोपल्यावर संध्याकाळी लाला जयनारायणनी आयोजित केलेल्या स्वागत पार्टीला जावयास बाबासाहेब निघाले. सोबत बरीच कार्यकर्ती मंडळी होती. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक होते. आम्ही बाबासाहेबांना रस्ता मोकळा करून देत होतो. मंडपाबाहेर आल्यावर आम्हाला दिसले की ३-४ स्त्रिया फाटक्या कपड्यांत असलेल्या, थकलेल्या नजरेने वाट पहात उभ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकर सर्वांपुढे असल्यामुळे त्यांनी त्यांनाच विचारले, 'आंबेडकर कोठे आहेत?' बाबासाहेबांना फार नवल वाटले. त्यांनी सांगितले की, 'मीच आंबेडकर आहे. आपले काय काम आहे?'*
*तेव्हा त्या माउल्या अति आनंदाने पुढे आल्या व आपल्या फाटक्या लुगडयाच्या ओट्यातून झेंडूच्या फुलांचे हार काढून बाबासाहेबांच्या गळ्यात टाकू लागल्या. त्यांच्या मानाने बाबासाहेब फार उंच होते. म्हणून बाबांनी मान खाली बाकविली व सर्व बायांनी त्यांच्या गळ्यात हार टाकले. त्या बाया बाबासाहेबांस सांगू लागल्या, 'आम्ही गरीब दुबळ्या, आमच्याजवळ मंडपाच्या आत जाण्याची तिकीट घेवाले पैसे नोयते बापा, मनून आमी तुमची वाट पाहात उभ्या होतो. कवातरी तुमी बाहार यालय, तवाच दर्शन घेऊ. आमी तुमाले पायले नोयते, आमच्याजवळ तुमचा फोटूबी नाई, तं मग वळखावं तं कायच्या भरोश्यावर? मनून चूक झाली बापा, तुमालेच पुसलो आंबेडकर कोण हाय मनून.'*
*हे त्यांचे अगाध प्रेम पाहून बाबासाहेबांनी त्यांना विचारले, 'मग हे हार कसे घेतले? तुमच्याजवळ तर पैसे नव्हते.' तेव्हा त्या भोळ्याभाबड्या ग्रामीण बाया बाबांना सांगू लागल्या. एक म्हणाली, 'आज मी गवताचा भारा आणला खेडपातून, तो विकला य त्या पैशातून हार घेतला.' दुसरीने सांगितले, 'मी काट्यांची मोळी आणली, ती विकली व त्या पैशाचा हार घेतला.' त्यांचे ते निर्मळ प्रेम पाहून बाबासाहेब आंबेडकरांच्या भावना उचंबळून आल्या. त्यांचे डोळे अश्रृंनी दाटले व ते द्रवलेल्या कंठाने त्या माउल्यांना सांगू लागले, 'माझी आई मी लहान असतानाच वारली. ती कशी होती ते मला आठवत नाही, ती तुमच्यासारखीच दयाळू असली पाहिजे. म्हणून माउल्यांनो, मी ठामपणे सांगतो, जसा मी शिकून मोठा झालो, तसाच तुमच्या लेकरांनासुद्धा मोठा करीन व तुम्हाला सुखाचे दिवस दाखवीन. तसे करण्यात जर मी यशस्वी झालो नाही तर मी आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून घेईन.'*
*बाबासाहेबांना त्यादिवशी बरेच पुष्पहार मिळाले होते, फार मोठमोठे व निरनिराळ्या फुलांचे, गुलाब, झेंडू, मोगरा इत्यादी हजारो हार बाबांच्या गळ्यात पडले होते. परंतु त्या गरीब बायांच्या हारांमुळे बाबासाहेबांचे हृदय द्रवले. आम्हाला फार नवल वाटले त्यांचे अश्रू पाहून. त्यांचे अंतःकरण फार कोमल होते. कार्यकर्त्यांना ताबडतोब बोलावून बाबासाहेबांनी आदेश दिला, की 'कोणालाही मंडपाबाहेर राहू देऊ नये. ज्यांची भाषण ऐकायची इच्छा आहे त्यांच्याजवळ पैसे असोत वा नसोत, त्यांना आतमध्ये प्रवेश द्यावा.'*
*मुक्तीदाता विशेषांक*
*लेखक डॉ ना मा. निमगडे*
*संदर्भ डॉ बाबासाहेब* *आंबेडकरांच्या आठवणी*
#🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜