⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १९ मार्च इ.स.१६४७
छत्रपती शिवाजी महाराजांनी व आईसाहेब जिजाबाई यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला.
पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची "प्रतिपच्चंद्र" ही राजमुद्रा तसेच अखेरीस "मोर्तब" म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे. या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते. शिवाजीमहाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिपव्यवस्थेकरीता असे..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/_h4AcV94QgU
📜 १९ मार्च इ.स.१६७४
(फाल्गुन वद्य अष्टमी शके १५९५ प्रमादी वार गुरुवार)
शिवराज्ञी काशीबाईसाहेब यांना देवाज्ञा!
महाराजांच्या अष्टराज्ञींपैकी एक काशीबाघसाहेब यांचा रायगडावर मृत्यू झाला. राज्याभिषेकाच्या अगदी तोंडावर काशीबाईसाहेब यांचे निर्वाण महाराजांना चटका लावून गेला. काशीबाईसाहेब जश्या महाराजांच्या जिवनात आल्या तश्या त्या निघुन गेल्या. काशीबाईसाहेब अगदी काही अबोलपणे कायमच्या निघून गेल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १९ मार्च इ.स.१६८०
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ मार्च इ.स.१६८२
मुक्काम कानोरी येथे शहजादा आज्जमने औरंगजेब बादशहाची भेट घेतली. "१८ फेब्रुवारी इ.स.१६८२, रोजी औरंगजेब बादशहाने बुर्हानपुर सोडले." "औरंगजेब बादशहा ३ ते ४ महिने बुर्हानपुर येथे आनंदाने राहीला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ मार्च इ.स.१७५५
तुळाजी आंग्रे वर स्वारी करण्यापूर्वी इंग्रज व पेशवे यांचा सात कलमी करार झाला (१९ मार्च १७५५). त्यात संयुक्त आरमार इंग्रजांच्या हुकमतीखाली रहावयाचे, इंग्रजांनी समुद्रावरून मोहिम सुरू करावयाची. व जी जहाजे घेण्यात येतील ती इंग्रज व पेशवे यांनी निम्मे निम्मे वाटून घ्यावयाची. आंग्र्यांच्या किल्ल्यात जी लूट मिळेल ती पेशव्यांनी घ्यावयाची. तुळाजी विरुद्धचे पेशव्यांचे आरोप तीन होते- (१) पेशवे हे धनी व आंग्रे त्यांचे नोकर हे नाते तुळाजीने ओळखले नाही; (२) मराठी सत्तेच्या इतर महत्त्वाच्या घटकांशी ते “सौरस्ये वर्तत नसत”, (३) मराठी सत्तेच्या विरुद्ध गोवेकर फिरंग्याची त्याचप्रमाणे मुंबईकर इंग्रजांची त्यांनी मदत मागितली. तुळाजी आंग्रे याजवरील संयुक्त मोहिमेची प्रत्यक्ष सुरूवात दिनांक २६ मार्च १७५५ पासून झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ मार्च इ.स.१७७२
आनंदवल्लीहून पुण्यात परत आलेल्या रघुनाथराव पेशव्यांची दि. १९ मार्च १७७२ रोजी नजरकैदेतून सुटका करण्यात आली. त्यापूर्वी कटकारस्थाने करणार नाही, फितुरी करून राज्याचे तुकडे करणार नाही अशा अटी रघुनाथरावांना मान्य कराव्या लागल्या होत्या. परंतु, त्या बदल्यात आपले दत्तक पुत्र अमृतराव यांना सात लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर शिवाय स्वतः रघुनाथरावांना बारा लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर मिळावी, अशी त्यांनी माधवराव पेशव्यांकडे मागणी केली. माधवरावांनीही काकांना जास्त अपमानीत करू नये, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य केल्या.
https://youtu.be/_h4AcV94QgU
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ मार्च इ.स.१७७९
गायकवाड इंग्रजास सामील झाल्यामुळे इंग्रजांची शक्ति द्विगुणीत झाली. अशा शक्तिशी गुजरातेत लांब ठिकाणी सामना देणे सोपे नव्हते. कारण ह्याच सुमारास खानदेशात गुलजारखानाचे खूळ माजले होते. तो गुलजारखान व दादासाहेबांचा कारकून केसो कृष्ण या उभयतांनी मोठी फौज जमवून दंगा सुरू केला होता. अशा कठीण प्रसंगी नाना फडणिसांची विशाल बुद्धी आणि शहाणपणा उपयोगी आला. नानानी धूर्तपणा दाखवून इंग्रजांविरुद्ध एतद्देशीय सत्ताधिशांची एकजूट घडवून आणिली. ह्या संघात चार सत्ताधिश सामील झाले. पेशवे, निजाम, हैदरअल्ली आणि नागपूरकर भोसले हे चार सत्ताधिश जरी इंग्रजांविरुद्ध एकत्र आले तरी इंग्रजांविरुद्ध सबंध हिंदुस्थानात सर्व एतद्देशिय सत्ताधिशांमध्ये एक प्रकारची उद्वेगाची भावना पसरलेली होती. कारण ह्या सर्व सत्ताधिशांबरोबर कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव लबाडी करून त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कृत्य हेस्टिंग्जने केले होते. अयोध्येचा नबाव, बनारसचा राजा, बंगालचा नबाब इत्यादि सत्ताधाऱ्यांना मांडलिक बनवून त्यांच्या संरक्षणाची हमी घेऊन त्याजकडून कित्येक लाख रुपये नजराण्यादाखल उपटले होते. त्यामुळे हे सर्व सत्ताधिश कफल्लक होऊन देशोधडीस मिळाले. ह्यांनाही इंग्रजांचे जू नको होते. नाना फडणिसास या वैफल्याचा उपयोग इंग्रजांबरोबर लढताना झाला. याचवेळी इंग्रज-फ्रेंचांचे युद्ध चालू असून फ्रेंचांचे माहे बंदर कर्नल ब्रेट वेटच्या हाताखालील ब्रिटिश नाविक काफिल्याने १९ मार्च १७७९ मध्ये काबीज केले. ह्याच बंदरातून हैदरास फ्रेंचांकडून युद्धोपयोगी सामुग्री मिळत असे ती त्यामुळे बंद झाली. त्यामुळे हैदर इंग्रजांचा कट्टर दुष्मन बनला. ही गोष्ट जेव्हा पुण्यातील कारभारी मंडळाच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी हैदराशी चालू असलेले युद्ध बंद करून त्याजला इंग्रजांशी युद्ध पुकारण्यास प्रवृत्त केले. नाना व महादजींनी हैदराशी सलोखा करून त्याजबरोबर संरक्षणात्मक तह इंग्रजांविरुद्ध घडवून आणण्यासाठी वाकबगार व हुशार वकील कृष्णाजी जोशी यास त्याजकडे पाठविले. हैदराशी झालेल्या तहात असे ठरले की, तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील जो मराठी मुलूख हैदराने जिंकला होता तो त्याजकडे रहावा आणि त्याने अर्काट व महमदअल्लीच्या ताब्यातील कर्नाटक हा प्रदेश उध्वस्त करावा. या अटी हैदरास कळविल्या. रास्ते आणि महादजी शिंदे हे मराठ्यांचे दोन सरदार ह्या सलूखाच्या तारणास जामीन राहिले. हा तह होताच पेशवे व म्हैसुरकर यांजमध्ये आज अनेक वर्षे जो युद्ध प्रसंग सुरू होता तो बंद पडून दिनांक २० फेब्रुवारी १७८० रोजी तह होऊन एकोपा झाला. या एकोप्याच्या पायावर एक प्रचंड कारस्थान उभारले गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ मार्च इ.स.१७९२
टिपू सुलतान पकडला
टिपू सुलतानाच्या विरुद्धच्या चढाईत पटवर्धन कुटुंबीयांनी जबाबदारीचा मोठाच हिस्सा उचलला. त्यांच्या पैकी तीन संस्थानिक लढाईत उतरले अन वेगवेगळ्या दिशांना दबा धरून बसले.चिंतामणराव मिरजेतचं राहिले, कारण ते मुख्य केंद्र होते. परशुरामभाऊ तासगावला जाऊन राहिले, तर रघुनाथराव नीलकंठ कुरुंदवाडला. एखादी लढाई करून नामोहरम होणाऱ्यांपैकी टिपू सुलतान नव्हता, हे सर्वानाच माहिती होतं पण तो तब्बल दोन वर्ष टिकाव धरेल, याचीही कल्पना कुणी केली नव्हती त्यानं दोन वर्ष या तिन्ही फौजांना चकवलं पण शेवटी १९ मार्च १७९२ रोजी तो पकडला गेला. एक मोठी लढाई परशुरामभाऊ अन चिंतामणराव यांच्या सहाय्याने जिंकली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
![🚩शिवराय - 1 M4247'14 02RR ! 0R 1ಬ1 SHNDINSHESHCREATED BY Rainul Borse शadl शिवदिनविशेष १९ मार्च इ.स. १६४७ छत्रपती शिवाजी महाराजांनी व जिजाऊसाहेब यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला. the great marathauarriors] the_great_marathawarriors] the great maratha warriors 1 M4247'14 02RR ! 0R 1ಬ1 SHNDINSHESHCREATED BY Rainul Borse शadl शिवदिनविशेष १९ मार्च इ.स. १६४७ छत्रपती शिवाजी महाराजांनी व जिजाऊसाहेब यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला. the great marathauarriors] the_great_marathawarriors] the great maratha warriors - ShareChat 🚩शिवराय - 1 M4247'14 02RR ! 0R 1ಬ1 SHNDINSHESHCREATED BY Rainul Borse शadl शिवदिनविशेष १९ मार्च इ.स. १६४७ छत्रपती शिवाजी महाराजांनी व जिजाऊसाहेब यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला. the great marathauarriors] the_great_marathawarriors] the great maratha warriors 1 M4247'14 02RR ! 0R 1ಬ1 SHNDINSHESHCREATED BY Rainul Borse शadl शिवदिनविशेष १९ मार्च इ.स. १६४७ छत्रपती शिवाजी महाराजांनी व जिजाऊसाहेब यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला. the great marathauarriors] the_great_marathawarriors] the great maratha warriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_799548_39fea442_1773889793149_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=149_sc.jpg)

