सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ShareChat
00:23
#🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - ShareChat
00:15
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 ३ मार्च इ.स.१६६५ (फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५८६, क्रोधी संवत्सर, वार शुक्रवार) मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते. त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/7hT0iKA9GUY 📜 ३ मार्च इ.स.१६८९ (फाल्गुन वद्य ७, सप्तमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार) छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का! औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला, कारण हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे ३२, बत्तीसवे वर्षे होते. आजच औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. योगायोग हा की ३ मार्च इ.स.१६८९ रोजी बरोबर ३२ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला. औरंगजेबाने भिमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना "फतवा" काढला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ मार्च इ.स.१७०० छत्रपती राजाराम महाराज जिंजी च्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोंगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोंगल अगदी हैराण होऊन गेले होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोंगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर आले. महाराष्ट्राची ही 'शिवलंका' अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या, श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच 'शिवराजेश्वर' मंदिराची निर्मिती केली. यानंतर दुर्दैवाने केवळ दोनच वर्षात, गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दि. ३ मार्च १७०० या दिवशी या तरुण राजाचा, वयाच्या केवळ २९ व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ मार्च इ.स.१७१९ दिल्लीच्या लालकिल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर हसनअली सय्यदाने लहानग्या रफिउदौरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात झाली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहूमहाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफिउदौरजत बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या सनदा जाहीरपणे शाहूमहाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजीपंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व सनदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजीपंतांच्या मनात काय आले असेल? 'हे सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज त्याच सिंहासनावर हे परके तुराणी बसलेत. हा मुजरा या बादशहाला नसून अजातशत्रू युधिष्ठिराला आहे, भगवान श्रीकृष्णाला आहे, प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे ते स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल.' इतर लहान-मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दि. १५ मार्च रोजी परत दरबार भरवून सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या. यानंतर लगेचच पाच दिवसांनी दि. २० मार्च १७१९ रोजी ५० हजार मराठी फौज राजमाता येसूबाईसाहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवरपाशी आल्यानंतर बाळाजीपंत आपले थोरले पुत्र व अंबाजीपंतांना सोबत घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ मार्च इ.स.१७३९ सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दिनांक ३ मार्च सन १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ मार्च इ.स.१७८९ दिल्लीवर मराठा भगवा झेंडा गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्यांच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणेखान, जिवबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले... एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लुट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते..... गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला त्याच्या घोसगडा कडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठयांना तो जिवंत पाहिजे होता.... गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोझा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या... अखेर गुलामाचे डोळे काढून बादशाहाकडे पाठविण्यात आले ३ मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शाहआलम ला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लुट महादजींनी दिल्लीला पाठवली.... "मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशाहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किलल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्ष म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता"... https://youtu.be/7hT0iKA9GUY 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ मार्च इ.स.१७९३ श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ मार्च इ.स.१८१८ सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले गेले. ६ पौंडी अथवा १२ पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज र्न मारा होत होताच. १ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करायला प्रिट्झलर काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर ३ तासांत गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरु केला गेला. शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat
*असत्य आणि दुष्ट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पौर्णिमा आपल्याला श्रद्धा, संयम आणि सदाचाराची शिकवण देते. होळीच्या दहनातून नकारात्मक विचारांचा त्याग करून नैतिकता आणि नवचैतन्याचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया..!🙏😊💞* *माझ्या सर्व मित्र परिवाराला होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊* 🎨🧡❤️💛💚🩷💙💜 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• सचिन दादा पानसरे मित्र परिवार शिरवळ शहर https://www.instagram.com/p/DVXzVuLDHTs/?igsh=MXJ0d214OWZxOTJtbg== #✨सोमवार स्पेशल✨ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹प्रेमरंग #🃏रंगीत नेम आर्ट
✨सोमवार स्पेशल✨ - ShareChat
Sachin Dada Pansare on Instagram: "*असत्य आणि दुष्ट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पौर्णिमा आपल्याला श्रद्धा, संयम आणि सदाचाराची शिकवण देते. होळीच्या दहनातून नकारात्मक विचारांचा त्याग करून नैतिकता आणि नवचैतन्याचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया..!🙏😊💞* *माझ्या सर्व मित्र परिवाराला होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊* 🎨🧡❤️💛💚🩷💙💜 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• सचिन दादा पानसरे मित्र परिवार शिरवळ शहर"
0 likes, 0 comments - sachindadapansare007 on March 1, 2026: "*असत्य आणि दुष्ट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पौर्णिमा आपल्याला श्रद्धा, संयम आणि सदाचाराची शिकवण देते. होळीच्या दहनातून नकारात्मक विचारांचा त्याग करून नैतिकता आणि नवचैतन्याचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया..!🙏😊💞* *माझ्या सर्व मित्र परिवाराला होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊* 🎨🧡❤️💛💚🩷💙💜 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• सचिन दादा पानसरे मित्र परिवार शिरवळ शहर".
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ShareChat
00:23
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 २ मार्च इ.स.१६६० (चैत्र प्रतिपदा, शके १५८२, संवत्सर, शार्वरी, वार शुक्रवार) महाराज पन्हाळगडास आश्रयास! अफजलखानाच्या (३२, दातांच्या राक्षसी बोकडाच्या वधानंतर) महाराजांनी अफजलखान मुलखात त्राही माजविली. आदिलशहाकडून महाराजांच्यावर पुन्हा एकदा सिद्धी जौहर हा कसलेला पठाण, आक्रमणासाठी निघाला. मात्र, त्याचा धोकाओळखून महाराजांनी सिद्धी जौहर जास्त पुढे सरकता कामा नये म्हणून पन्हाळगडावर महाराज आश्रयास आले. जेणेकरून, जौहरचे आगमण थेट स्वराज्यात न येता कोल्हापुरच्या पन्हाळगडापर्यंत सीमित राहिल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/2tAV70R4QqE 📜 २ मार्च इ.स.१६८७ औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मार्च इ.स.१७५६ इ.स. १७५६ सुमारास , गुजरात प्रांताच्या दक्षिण सीमाभागातील 'वासदे'/'बासदा' ह्या संस्थानच्या राजपरिवारात गृहकलह होता. त्यामुळे राज्याच्या 'गादीवर' बसण्याच्या अधिकाराबाबत पेच/वाद निर्माण झाला होता. ह्या कारणास्तव राजपरिवारातील दावेदार श्री राऊल उदयसिंह यांनी पुण्याला येऊन श्रीमंत पेशव्यांच्या दरबारी ही व्यथा मांडली व त्यावर धर्मशास्त्र व न्यायशास्त्र अनुसार निर्णय देण्यास विनंती केली. त्यावेळी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे 'कारभारी' त्र्यंबकराव मामा पेठे यांनी हे प्रकरण हाताळले व स्वतः लक्ष घालून, धर्म - न्यायशास्त्र अनुसार योग्यता जाणून घेऊन, पेशव्यांच्या संमतीने , श्री राऊल उदयसिंह यांची स्थापना वासदे संस्थानच्या गादीवर केली. परिणामी, राजे राऊल उदयसिंह यांनी पेच सुटल्याबद्दल व त्र्यंबकराव पेठे यांनी केलेल्या कार्याची उतराई म्हणून व पेशव्यांशी स्नेहसंबंध कायम राहावे ह्याकरिता , स्वतःच्या खुशालीने आपल्या राज्यातील मौजे 'माणकुन्या' हे गाव दरोबस्त वंशपरंपरागत इ.स. २ मार्च १७५६ रोजी त्र्यंबकरावांना इनाम करून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मार्च इ.स.१७८१ आपल्या इतिहासामध्ये जिजाऊमाँसाहेब आपल्याला माहीत होत्याच, त्यानंतर ताराराणीसाहेब आम्हाला माहीत आहेत. परंतु मराठा राज्याचे रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या शाहू महाराजांच्या आईसाहेब आणि संभाजी महाराजांच्या पत्नी "त्यागमूर्ती येसूबाईसाहेब" आमच्या लोकांना माहीत नव्हत्या ज्या आत्ता कुठे माहीत झाल्या. अहिल्याबाई होळकर आहेत, दुसऱ्या जिजाबाई साहेब आहेत अशा अनेक पराक्रमी स्त्रिया ज्यांनी इतिहासाला कलाटणी देणारे कार्य केले. परंतु अशा अनेक स्त्रिया अजूनही आहेत ज्यांचा इतिहास आम्हा सामान्य माणसाला माहीत नाही. अशाच एक पराक्रमी स्त्रीची ओळख (इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना नक्कीच माहीत असेल ) त्या पराक्रमी स्त्रीचे नाव म्हणजे "श्रीमंत महाराणी, बाकाबाईसाहेब भोसले" यांचा जन्मदिन. दुसरा रघुजीराजे भोसले यांची पत्नी. मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे. नागपूरचे राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजीराजे भोसले. ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली. दुसरे रघुजी भोसले (इ.स. १७८८ ते इ.स. १८१६) यांच्या काळात १८०३ पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मार्च इ.स.१७९५ खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते https://youtu.be/2tAV70R4QqE 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ मार्च इ.स.१८१८ इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - n l l' (uII  V/ೊrlOn  THE GRBAT MARATHA WARRORS SHIVDINVISHESH CREATED BY Rqhu[ Borse Ptit शिवदिनविशेष मार्च इ.स.१६६० २ सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून छत्रपती शिवाजी महाराज मिरजेचा वेढा ঠনুন ' कोल्हापूरातील पन्हाळगडावर आश्रयास आले. अर्धवट the qreat maratha warriors the great marathawarriors the great marathawarriors n l l' (uII  V/ೊrlOn  THE GRBAT MARATHA WARRORS SHIVDINVISHESH CREATED BY Rqhu[ Borse Ptit शिवदिनविशेष मार्च इ.स.१६६० २ सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून छत्रपती शिवाजी महाराज मिरजेचा वेढा ঠনুন ' कोल्हापूरातील पन्हाळगडावर आश्रयास आले. अर्धवट the qreat maratha warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १ मार्च इ.स.१५७२ प्रतापसिंह महाराणा झाला प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/WNzkjcKEXPg 📜 १ मार्च इ.स.१६३० मुघल बादशहा "शाहजहान" हा मोठ्या फौजेसह "बुऱ्हानपूर" येथे येऊन दाखल झाला, यावेळी थोरले महाराज "शहाजीराजे" हे आदीलशाहीत सरदार होते. त्यांना ही बातमी समजताच ते "राजमाता जिजाऊ" व १० दिवसाच्या बाल शिवबाला सोडून "किल्ले शिवनेरी" वरून निघाले व आदीलशाही दरबारात हजर झाले. खानजहान लोदी व निजामशाहीविरूद्ध मोहिमेसाठी शाहजहानने १४ डिसेंबर १६२९ ला आग्रा सोडले. बुऱ्हाणपूरजवळच्या असीरगढला त्याचा तळ होता. दख्खनचासुभेदार इरादतखानकडे त्याने पन्नास हजारांचे सैन्य दिले, त्याला आझमखान हाकिताब देण्यात आला. २३ फेब्रुवारी १६३० ला ह्या सैन्याने लोदी वनिजामशाहीविरूद्ध मोहिम सुरू केली. त्यानंतर १ मार्च १६३० रोजी शाहजहान बुऱ्हाणपूरला पोहोचला. इथे रावरतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले. वाशीमची बाजू धरून ठेवणे व तेलंगाण नियंत्रणाखाली आणणे ही दोन उद्दिष्टे त्यांना दिली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ मार्च इ.स.१६३३ महाबतखानाने "दौलताबाद (किल्ले देवगिरी) ला वेढा दिला. महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला. १ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले. निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते. या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला. मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले. शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती. पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याशी शहाजीराजानी ६ मे १६३६ ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली. त्यामुळे शहाजी राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ मार्च इ.स.१६४१ (फाल्गुन अमावस्या शके १५६२, संवत्सर विक्रम, वार सोमवार) महाराज जिजाऊ साहेबांसह बंगळूरला. छत्रपती शिवरायांना व माँ साहेब जिजाऊंना स्वराज्य सकल्पक राजे शहाजीराजे यांनी बंगळूरला बोलाऊन घेतल्यामुळे महाराज आणि जिजाऊ मॉसाहेब वर्षभर बंगळूर मुक्कामी. राजे शहाजीराजे यांनी इथे मात्र, शिवरायांच्या शिक्षणाची व युद्धकलेच्या प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. राजे शहाजीराजे यांच्या तालमीत ्तयार होत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/WNzkjcKEXPg 📜 १ मार्च इ.स.१६८० औरंगजेब दक्षिणेत उतरताच त्याने मराठी राज्यावर आक्रमण सुरू केले. औरंगजेब बादशहा आपला नाश करण्यासाठी दक्षिणेत येत आहे हे संभाजी महाराजांना समजले होते म्हणून त्यांनी युद्धाची तयारी केली. मोठमोठ्या गडावर साठे करून ठेविले. नाशिक जिल्ह्यातील बागलणांचा प्रदेश मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचे औरंगजेब बादशहाने ठरविले आणि आपले लक्ष बागलणांकडे वळविले. त्यासाठी औरंगजेब ने दिनांक १ मार्च १६८० रोजी खानजहान बहादूर यास छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले किल्ले ताबडतोब मोगलांच्या ताब्यात घेण्याचा हुकूम दिला. लगेच त्याने अहिवंत किल्ल्यास वेढा घातला. पण मराठ्यांनी तो वेढा मारून काढला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ मार्च इ.स.१७७९ बारभाई कारस्थान - पुरंदरचा तह उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ उभा राहिला होता.[१] नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, "रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले." यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.[२] ह्यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून ठेवावे असे ठरले हो. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असे उघड राजकारण सुरू झा. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. या लढाईत त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला. रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - lv (IVI 007= SDNYSHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष मार्च इ.स.१६३० 9 मुघल बादशहा शाहजहान हा मोठ्या फौजेसह बुऱ्हानपूर येथे येऊन दाखल झाल्याची बातमी शहाजीराजे यांना समजताच मॉसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबांची शिवनेरी वर चोख व्यवस्था लावुन आदीलशाहीत हजर झाले. the great marathawarriors the great marathauarriors the_great_maratha uarriors lv (IVI 007= SDNYSHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष मार्च इ.स.१६३० 9 मुघल बादशहा शाहजहान हा मोठ्या फौजेसह बुऱ्हानपूर येथे येऊन दाखल झाल्याची बातमी शहाजीराजे यांना समजताच मॉसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबांची शिवनेरी वर चोख व्यवस्था लावुन आदीलशाहीत हजर झाले. the great marathawarriors the great marathauarriors the_great_maratha uarriors - ShareChat
#🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - ShareChat
00:15
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६४४ शहाजीराजे व आदिलशाहीतमधे तडे... रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले १२ मार्च १६४३ ते २८ फेब्रुवारी १६४४ च्या मधे कधीतरी रणदुल्लाखानचा मृत्यू झाला ह्यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफाखानचा दबदवा वाढला मुस्तफाखान बरोबर शाहजीराजेंचे फारसे चांगले संबंध नसावेत शाहजीराजेंला ह्यामुळेच चिंता वाटू लागली... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/xSF5Jp-0JUg 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६७२ ( फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९३, विरोधकृत, बुधवार ) साल्हेर मुल्हेर जिंकले :- दिलेर खानाला कडवा शह प्रतापराव गुजर काकांनी दिला. उघड्या मैदानावरील मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई. साल्हेर पुन्हा स्वराज्यात दाखल, २०,००० मोगलांना कंठस्नान घालून दिलेर खानास मराठ्यांचे सणसणीत उत्तर! या युद्धात मराठयांकडून, मोरोपंत पिंगळे काका प्रतापराव गुजर काका मकाजी आनंदराव काका व्यंकोजी दत्तो काका कृपाजी काका भोसले सिधोजी काका निंबाळकर खंडोजी काका जगताप गोदाजी काका जगताप संताजी काका जगताप नानाजी मोरे काका विसाजी काका बल्लाळ सूर्यराव काकडे काका सहभागी झाले होते. सूर्यराव काकांना ह्या युद्धात वीरमरण आले होते. आपल्या सैन्याची होणारी दाणादाण पाहून दिलेर खान चांदवडला पळून गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७१४ लोहगडाच्या जवळ पेशवे व आंग्रे यांच्यात लेखी तह झाला. तो तहनामा असा - "थोरातांशी अपक्रिया करू नये. भाकर दिली आहे ती त्यांनी घ्यावी. कोकणची मसलद दसऱ्यापासून मार्गशीर्षापावेतो तुम्ही राहून प्रतिवर्षी करावी. हबशी-फिरंगी मारून गर्देस मिळवावे. राजमाची, श्रीवर्धन, मनरंजन, मृगगड, कोथळा आम्हांकडे (शाहूमहाराजांकडे) द्यावे. लोहगड, तुंग, कोरीगड सामानासहित तुम्हांकडे (आंग्र्यांकडे) घ्यावे. तुम्हांकडील चाकर आम्ही न ठेवावा व आम्हांकडील तुम्ही न ठेवावा. खाजगत गाव तुम्हाकडे आहेत ते चालवावे. १. पणवेली (पनवेल), १ शिरढोण, १ सोमाटणे, १ तळे घरचे किल्ले यास तुम्ही राजकारण करून घेतले तर आमचे स्वाधीन करावे. कुलाब्यास जाताच बहिरोपंत पिंगळे व चिटणिसांना कैदेतून मुक्त करावे. सातारियाहून महाराजांकडून कान्होजींना पूर्वीप्रमाणेच सरखेल किताब बहाल करावा. त्याउपर कान्होजींनी कोल्हापूरकरांचा पक्ष सोडावा. शाहूछत्रपतींनी १६ सबघड (डोंगरी किल्ले) व १० अवघड (जलदुर्ग) असे एकूण २६ किल्ले आंग्र्यांना बहाल करावेत व त्याभवतालचा एकूण २४ लक्ष होनांचा मुलुख कान्होजींना सरंजामाकरता मिळावा. या डोंगरी किल्ल्यांमध्ये कोथळीगड, बहिरवगड (ढाक बहिरी?), रायगड, व्यंकटगड, भिरागड, माणिकगड, रसाळगड, सागरगड, पालगड, खारेपाटण, राजापूर, कामते, अंबरगड, साठवली, श्रीवर्धन व मनरंजन असे १६ गिरीदुर्ग होते तर जलदुर्गांमध्ये खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अवचितगड, देवगड, फत्तेगड, जयगड, यशवंतगड आणि कनकदुर्ग यांचा समावेश होता. कान्होजींकडे हा सारा प्रदेश आल्यावर त्यांची ताकद कैक पटींनी वाढली. याच वेळेस महाराजांनी आंग्र्यांना दिलेल्या काही मुलुखापैकी सुवर्णदुर्ग, श्रीवर्धन व मनरंजन (राचमाची) हे किल्ले जंजिऱ्याच्या सिद्दी याकुतखानाच्या ताब्यात होते. पेशवे व आंग्रे यांच्या संयुक्त फौजांनी हे किल्ले अगदी थोड्या अवधीतच जिंकले. त्यामुळे सिद्दी याकुतखान पुरता घाबरला. आत्तापर्यंत हा कान्होजी एकटाच होता. पण आता साताऱ्याचा पेशवाही त्याच्या बरोबर आहे. आता आपल्याला काहीही करून त्यांना रोखायलाच हवे, या विचाराने याकुतला ग्रासले. शेवटी दि.३० जानेवारी १७१५ रोजी सिद्दीने कान्होजी आंग्र्यांशी म्हणजेच सातारा दरबाराशी तह केला. कान्होजी आंग्रे व पेशवे बाळाजी विश्वनाथ एकत्र झाले. बाळाजीपंतांनी आपल्या हुशारीने कान्होजींना पुन्हा शाहू महाराजांकडे वळते केले हे पाहून इंग्रज, पोर्तुगीज, मोंगल, सिद्दी या सर्व परकीय सत्तांची पाचावर धारण बसली. हे महत्त्वचे काम केल्याने शाहूंचा बाळाजी पंतांवरचा विश्वास कैकपटीने वाढला व परिणामी दरबारातही बाळाजी विश्वनाथांचे वजन इतर मानकऱ्यांच्या तुलनेत वाढले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७१९ दि. २३ फेब्रुवारीला सैय्यद बंधू व बादशहात वाटाघाटी झाल्या. त्या नेमक्या कोणत्या ते माहीत नाही. परंतु, यानुसार मदनसिंहाला मोंगलांनी मुक्त केले. दि. २८ फेब्रुवारीला हुसेनअलीची फौज दिल्लीत घुसली. यात महम्मद अमीन खान व मराठ्यांची झटापट झाली. दुर्दैवाने या लढाईत बाळाजी महादेव फडणीस (भानू) आणि संताजी भोसले मारले गेले. फर्रुखसियरने पुन्हा आपला शब्द फिरवला. त्याने शाहू महाराजांच्या मातोश्री व इतर परिवाराची सुटका करण्यास नकार दिला. आता मात्र सय्यद बंधू भडकले. त्यांनी लालकिल्ल्यातच सैन्य घुसवले व फर्रुखसियरलाच बेड्या ठोकल्या. सय्यदबंधूंनी फर्रुखसियरचा चुलतभाऊ रफिउदौरजत याला ताबडतोब दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले. https://youtu.be/xSF5Jp-0JUg 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७४० वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या कराराची नोंद! तद्नंतर सावंतांनी बार्देश महाल आणि पनाळे बेट पोर्तुगीजांना परत केले, तर पोर्तुगिजांनी खोर्जुवे बेट आणि पिर्ण हे गाव सावंतांच्या ताब्यात दिले. वरील तह छत्रपती शाहू महाराजांचे एक मंत्री नारोराम यांच्या विद्यमाने पार पडला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७५७ अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला. काही दिवसांपूर्वीच राघोबादादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरू असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले. यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले. रस्त्यातून प्रेताचे ढीग इतके पडले की, चालावयास वाट मिळेना. भरतपूर, दिग, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता. परंतु सूरजमलने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले. मथुराही प्रदेश जाटांचाच. परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला. आपल्या क्रूरतेचे प्रतीकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७७८ कोल्हापूरकरांचा साताराकरांबरोबर तह २८ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१८११ इ. स. १८०४ मध्ये एलफिन्स्टनची 'नागपूरकर भोसल्यांचा वकील' म्हणून नागपुरास बदली करण्यात आली. १८०८ पर्यंत तो नागपुरातच होता. त्यानंतर इ. स. १८०८-१० या काळात काबुल-कंदहार प्रांतात इंग्रजांचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. या काळात त्याच्याकडून फारशी काही कामगिरी न होऊ शकल्याने अखेरीस इ. स. १८१० मध्ये त्याला परत बोलवण्यात आले अन् दि. २८ फेब्रुवारी १८११ या दिवशी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने पुण्यात पेशवे दरबाराच्या रेसिडेंट पदाची सूत्रे हातात घेतली. पूर्वी 'तैनाती फौजेच्या करारा'नुसार आता एलफिन्स्टनला पुणे दरबारातल्या कामाबरोबरच मराठी राज्यातल्या परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याचे बंधन होते. मराठी राज्य म्हणजे आता एकसंध राज्य नव्हतेच. मराठा संघराज्य (Maratha Confederacy) मुळे मूळे मालक छत्रपती-पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यात बेबनाव झाला होता. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन, देसाई, पवार असे अनेक सरदार छत्रपतींपासून आणि पेशव्यांपासून फारकत घेऊन आपली 'स्वतंत्र राज्ये' निर्माण करायच्या विचारात होते. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याने एलफिन्स्टनने उभय पक्षांच्या दरम्यान समझोत्यासाठी एक मसुदा तयार केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ फेब्रुवारी इ.स.१९४८ ब्रिटिशांनी भारत सोडले मुंबईचे आकर्षण असलेले गेट वे ऑफ इंडिया ९२ वर्षाचे झाले बांधकामास १९११ साली सुरवात झाली व ते १९२४ साली बांधून पूर्ण झाले ४ डिसेम्बर ९२४ रोजी त्याचे उदघाटन झाले हिंदू मुस्लिम संस्कृतीचा मिलाफ दाखवणाऱ्या या वास्तूचे संकल्प चित्र George Wittet या वास्तुविशारदाने तयार केले. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश फौजांची तुकडी येथून रवाना झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - IY IVI( T GREATMARA THAARRIORS SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६७२ 26 प्रतापराव गुजर व मराठा सरदारांनी दिलेरखानाला व त्याच्या २० हजार मोगलांना कंठस्नान घालुन मराठ्यांनी साल्हेर मुल्हेर जिंकले. the_great_maratha_uarriors the great marathawarriors Ihe qreal maralhauarriors IY IVI( T GREATMARA THAARRIORS SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६७२ 26 प्रतापराव गुजर व मराठा सरदारांनी दिलेरखानाला व त्याच्या २० हजार मोगलांना कंठस्नान घालुन मराठ्यांनी साल्हेर मुल्हेर जिंकले. the_great_maratha_uarriors the great marathawarriors Ihe qreal maralhauarriors - ShareChat
#🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - ShareChat
00:15