#🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६४४
शहाजीराजे व आदिलशाहीतमधे तडे...
रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले १२ मार्च १६४३ ते २८ फेब्रुवारी १६४४ च्या मधे कधीतरी रणदुल्लाखानचा मृत्यू झाला ह्यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफाखानचा दबदवा वाढला मुस्तफाखान बरोबर शाहजीराजेंचे फारसे चांगले संबंध नसावेत शाहजीराजेंला ह्यामुळेच चिंता वाटू लागली...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/xSF5Jp-0JUg
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६७२
( फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९३, विरोधकृत, बुधवार )
साल्हेर मुल्हेर जिंकले :-
दिलेर खानाला कडवा शह प्रतापराव गुजर काकांनी दिला. उघड्या मैदानावरील मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई.
साल्हेर पुन्हा स्वराज्यात दाखल, २०,००० मोगलांना कंठस्नान घालून दिलेर खानास मराठ्यांचे सणसणीत उत्तर!
या युद्धात मराठयांकडून,
मोरोपंत पिंगळे काका
प्रतापराव गुजर काका
मकाजी आनंदराव काका
व्यंकोजी दत्तो काका
कृपाजी काका भोसले
सिधोजी काका निंबाळकर
खंडोजी काका जगताप
गोदाजी काका जगताप
संताजी काका जगताप
नानाजी मोरे काका
विसाजी काका बल्लाळ
सूर्यराव काकडे काका सहभागी झाले होते.
सूर्यराव काकांना ह्या युद्धात वीरमरण आले होते.
आपल्या सैन्याची होणारी दाणादाण पाहून दिलेर खान चांदवडला पळून गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७१४
लोहगडाच्या जवळ पेशवे व आंग्रे यांच्यात लेखी तह झाला. तो तहनामा असा - "थोरातांशी अपक्रिया करू नये. भाकर दिली आहे ती त्यांनी घ्यावी. कोकणची मसलद दसऱ्यापासून मार्गशीर्षापावेतो तुम्ही राहून प्रतिवर्षी करावी. हबशी-फिरंगी मारून गर्देस मिळवावे. राजमाची, श्रीवर्धन, मनरंजन, मृगगड, कोथळा आम्हांकडे (शाहूमहाराजांकडे) द्यावे. लोहगड, तुंग, कोरीगड सामानासहित तुम्हांकडे (आंग्र्यांकडे) घ्यावे. तुम्हांकडील चाकर आम्ही न ठेवावा व आम्हांकडील तुम्ही न ठेवावा. खाजगत गाव तुम्हाकडे आहेत ते चालवावे. १. पणवेली (पनवेल), १ शिरढोण, १ सोमाटणे, १ तळे घरचे किल्ले यास तुम्ही राजकारण करून घेतले तर आमचे स्वाधीन करावे. कुलाब्यास जाताच बहिरोपंत पिंगळे व चिटणिसांना कैदेतून मुक्त करावे. सातारियाहून महाराजांकडून कान्होजींना पूर्वीप्रमाणेच सरखेल किताब बहाल करावा. त्याउपर कान्होजींनी कोल्हापूरकरांचा पक्ष सोडावा. शाहूछत्रपतींनी १६ सबघड (डोंगरी किल्ले) व १० अवघड (जलदुर्ग) असे एकूण २६ किल्ले आंग्र्यांना बहाल करावेत व त्याभवतालचा एकूण २४ लक्ष होनांचा मुलुख कान्होजींना सरंजामाकरता मिळावा. या डोंगरी किल्ल्यांमध्ये कोथळीगड, बहिरवगड (ढाक बहिरी?), रायगड, व्यंकटगड, भिरागड, माणिकगड, रसाळगड, सागरगड, पालगड, खारेपाटण, राजापूर, कामते, अंबरगड, साठवली, श्रीवर्धन व मनरंजन असे १६ गिरीदुर्ग होते तर जलदुर्गांमध्ये खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अवचितगड, देवगड, फत्तेगड, जयगड, यशवंतगड आणि कनकदुर्ग यांचा समावेश होता. कान्होजींकडे हा सारा प्रदेश आल्यावर त्यांची ताकद कैक पटींनी वाढली. याच वेळेस महाराजांनी आंग्र्यांना दिलेल्या काही मुलुखापैकी सुवर्णदुर्ग, श्रीवर्धन व मनरंजन (राचमाची) हे किल्ले जंजिऱ्याच्या सिद्दी याकुतखानाच्या ताब्यात होते. पेशवे व आंग्रे यांच्या संयुक्त फौजांनी हे किल्ले अगदी थोड्या अवधीतच जिंकले. त्यामुळे सिद्दी याकुतखान पुरता घाबरला. आत्तापर्यंत हा कान्होजी एकटाच होता. पण आता साताऱ्याचा पेशवाही त्याच्या बरोबर आहे. आता
आपल्याला काहीही करून त्यांना रोखायलाच हवे, या विचाराने याकुतला ग्रासले. शेवटी दि.३० जानेवारी १७१५ रोजी सिद्दीने कान्होजी आंग्र्यांशी म्हणजेच सातारा दरबाराशी तह केला. कान्होजी आंग्रे व पेशवे बाळाजी विश्वनाथ एकत्र झाले. बाळाजीपंतांनी आपल्या हुशारीने कान्होजींना पुन्हा शाहू महाराजांकडे वळते केले हे पाहून इंग्रज, पोर्तुगीज, मोंगल, सिद्दी या सर्व परकीय सत्तांची पाचावर धारण बसली. हे महत्त्वचे काम केल्याने शाहूंचा बाळाजी पंतांवरचा विश्वास कैकपटीने वाढला व परिणामी दरबारातही बाळाजी विश्वनाथांचे वजन इतर मानकऱ्यांच्या तुलनेत वाढले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७१९
दि. २३ फेब्रुवारीला सैय्यद बंधू व बादशहात वाटाघाटी झाल्या. त्या नेमक्या कोणत्या ते माहीत नाही. परंतु, यानुसार मदनसिंहाला मोंगलांनी मुक्त केले. दि. २८ फेब्रुवारीला हुसेनअलीची फौज दिल्लीत घुसली. यात महम्मद अमीन खान व मराठ्यांची झटापट झाली. दुर्दैवाने या लढाईत बाळाजी महादेव फडणीस (भानू) आणि संताजी भोसले मारले गेले. फर्रुखसियरने पुन्हा आपला शब्द फिरवला. त्याने शाहू महाराजांच्या मातोश्री व इतर परिवाराची सुटका करण्यास नकार दिला. आता मात्र सय्यद बंधू भडकले. त्यांनी लालकिल्ल्यातच सैन्य घुसवले व फर्रुखसियरलाच बेड्या ठोकल्या. सय्यदबंधूंनी फर्रुखसियरचा चुलतभाऊ रफिउदौरजत याला ताबडतोब दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.
https://youtu.be/xSF5Jp-0JUg
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७४०
वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या कराराची नोंद!
तद्नंतर सावंतांनी बार्देश महाल आणि पनाळे बेट पोर्तुगीजांना परत केले, तर पोर्तुगिजांनी खोर्जुवे बेट आणि पिर्ण हे गाव सावंतांच्या ताब्यात दिले. वरील तह छत्रपती शाहू महाराजांचे एक मंत्री नारोराम यांच्या विद्यमाने पार पडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७५७
अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला. काही दिवसांपूर्वीच राघोबादादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरू असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले. यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले. रस्त्यातून प्रेताचे ढीग इतके पडले की, चालावयास वाट मिळेना. भरतपूर, दिग, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता. परंतु सूरजमलने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले. मथुराही प्रदेश जाटांचाच. परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला. आपल्या क्रूरतेचे प्रतीकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७७८
कोल्हापूरकरांचा साताराकरांबरोबर तह
२८ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१८११
इ. स. १८०४ मध्ये एलफिन्स्टनची 'नागपूरकर भोसल्यांचा वकील' म्हणून नागपुरास बदली करण्यात आली. १८०८ पर्यंत तो नागपुरातच होता. त्यानंतर इ. स. १८०८-१० या काळात काबुल-कंदहार प्रांतात इंग्रजांचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. या काळात त्याच्याकडून फारशी काही कामगिरी न होऊ शकल्याने अखेरीस इ. स. १८१० मध्ये त्याला परत बोलवण्यात आले अन् दि. २८ फेब्रुवारी १८११ या दिवशी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने पुण्यात पेशवे दरबाराच्या रेसिडेंट पदाची सूत्रे हातात घेतली. पूर्वी 'तैनाती फौजेच्या करारा'नुसार आता एलफिन्स्टनला पुणे दरबारातल्या कामाबरोबरच मराठी राज्यातल्या परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याचे बंधन होते. मराठी राज्य म्हणजे आता एकसंध राज्य नव्हतेच. मराठा संघराज्य (Maratha Confederacy) मुळे मूळे मालक छत्रपती-पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यात बेबनाव झाला होता. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन, देसाई, पवार असे अनेक सरदार छत्रपतींपासून आणि पेशव्यांपासून फारकत घेऊन आपली 'स्वतंत्र राज्ये' निर्माण करायच्या विचारात होते. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याने एलफिन्स्टनने उभय पक्षांच्या दरम्यान समझोत्यासाठी एक मसुदा तयार केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ फेब्रुवारी इ.स.१९४८
ब्रिटिशांनी भारत सोडले
मुंबईचे आकर्षण असलेले गेट वे ऑफ इंडिया ९२ वर्षाचे झाले बांधकामास १९११ साली सुरवात झाली व ते १९२४ साली बांधून पूर्ण झाले ४ डिसेम्बर ९२४ रोजी त्याचे उदघाटन झाले हिंदू मुस्लिम संस्कृतीचा मिलाफ दाखवणाऱ्या या वास्तूचे संकल्प चित्र George Wittet या वास्तुविशारदाने तयार केले. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश फौजांची तुकडी येथून रवाना झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
#🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
#🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६७६
(फाल्गुन वद्य ९, नवमी, शके १५९७, संवत्सर, राक्षस, वार रविवार)
महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर!
महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले. सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे पुढील ३/४, महीने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जद याने अथणी भुईसपाट केली व बेळगावात अदिलशाहाची मुजोरी मोडून काढली!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/YJrWCWSfb4g
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७१९
लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७३१
छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्हाड येथे एकमेकांची भेट घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७४०
नासिरजंग हा निजाम उल्मुल्काच्या सहा पुत्रांपैकी एक पुत्र. तो सर्व मुलात हुशार व पराक्रमी होता. भोपाळवर निजामाचा कोंडमारा होत असता त्याने लढाईसाठी ज्या फौजा जमविल्या होत्या त्या जवळ औरंगाबादेस होत्या. भोपाळ येथे निजाम पेशवे तह झाल्यावर नासिरजंगाची स्वारी दिल्लीस आली. त्यावेळी निजाम दिल्लीस होता. तेवढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई काबीज केली. भोपाळच्या पराभवाचा वचका श्रीमंत बाजीरावांविरुद्ध छत्रपती शाहू महाराजांचे कान फुकून त्याने त्यांच्यात तेढ निर्माण करून काढावयाचा असे निजामाने ठरवून त्यासाठी आपला हस्तक सुमंत यास साताऱ्यास महाराजांकडे पाठविले. पण बाजीरावाविरुद्ध महाराजांचे मन कलुषित झाले नाही. एवढ्यात निजामाच्या वहाड प्रांतावर रघुजी भोसल्याने हल्ला करून तो प्रांत बळकाविला. ह्याचा सूड घेण्याचे मनात आणून नासिरजंगाने जमविलेल्या फौजेनिशी सन १७३९ च्या अखेरीस गोदावरी नदी ओलांडून मराठ्यांच्या मुलुखावर चढाई केली. थोड्या दिसांनी चिमाजी अप्पा व बाजीराव पेशवे नासिरजंगावर चालून गेले. पुढे काही काळ उभयतांची रेटारेट होऊन बाजीरावांनी नासिरजंगास औरंगाबादेपर्यंत पिटत नेले. तेव्हा तो तहास तयार झाला. निरुपाय होऊन त्याने हंड्या व खर्गोण हे दोन जिल्हे बाजीरावास देऊन त्यांच्याशी तारीख २७ फेब्रुवारी १७४० रोजी मुंगी पैठण येथे तह केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७५८
अहमदाबाद समझौत्याने मराठ्यांच्या ताब्यात आले. अहमदाबाद मराठ्यांच्या ताब्यात आल्यापासून मुसलमानी सत्ता नाहीशी झाली. मराठ्यांची म्हणजे हिंदुंची सत्ता गुजरातेवर सुरू झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/YJrWCWSfb4g
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१८५४
लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली. लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ फेब्रुवारी इ.स.१९३१
चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली बलिदान दिन
(जन्म : २३ जुलै १९०६)
तुम्हारी फांसी तुमको मुबारक,
हम तो आझाद है और आझाद ही रहेंगे...
- क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य क्रांतीवीर,
चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २६ फेब्रुवारी इ.स.१६४७
शहाजी महाराजांनी बेंगलोरमध्ये शिवाजी महाराजांना राजकीय शिक्षण देण्यासाठी काही पंडित व शास्त्री अशा अनेक ज्ञानी व हुशार मंडळीची नेमणूक केली होती. शिक्षण देण्यासाठी, मल्लविद्या व वेगवेगळी शस्त्रे चालविण्याचे कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यातील हुशार व वाकबगार लोकांची नेमणूक केली होती. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पुणे प्रांतावर पाठवताना पूर्ण शिक्षण देऊन परिपूर्ण केले. पुणे येथे जाताना काही हत्ती ,घोडे, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य ,त्याच प्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे ,उंच ध्वज,विपूल द्रव्य त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे सैन्य देऊन चांगला दिवस पाहून शिवाजी महाराजांना पुणे प्रांतावर पाठवले. जाताना प्रभाव, उत्साह व मंत्र या तीन शक्ती, सेनासमूह आणि स्वतःची राजलक्ष्मी हे सर्व घेऊन राजे पुण्यास निघाले होते. ' विख्यात अध्यापक' पाठविल्याचा उल्लेख या ठिकाणी मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण पुणे प्रांतात आल्यावर शिवाजी महाराजांचे विविध विद्धा आणि कला यांमधील शिक्षण याच कुशल अध्यापकांकडून झाले. श्रुती ,स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत ,राजनीतिशास्त्र ,बहुविश्विवभाषा, पद्यरचना ,सुभाषिते, काव्य-शास्त्र ,फलज्योतिष ,सांग, धनुर्वेद, अश्वपरीक्षा, गजपरिक्षा, अश्वारोहण गजारोहन तलवार, पट्टा, भाला ,चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला ,बाहूयुद्ध ,युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रूप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, रत्न परीक्षा इत्यादी सर्व कला व शास्त्रे एकच एक पंडित शिकवू शकले नसते म्हणून शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापक वर्गच शिवाजी महाराजां बरोबर कर्नाटकातून पाठिवला होता. हा सर्व निष्णात आध्यापक वर्ग पुणे जहागिरीत राजमाता जिजाऊंच्या पूर्ण देखरेखी खाली कार्यरत होता. बंगळूरहून पुण्याकडे जाताना शिवाजी महाराजां बरोबर शामराज नीळकंठ यास पेशवा म्हणून ,बाळकृष्ण हणमंते यांना मुझुमदार म्हणून, माणकोजी दहातोंडे यांना सरनौबत म्हणून, रघुनाथ बल्लाळास सबनीस म्हणून, तर सोनोपंतास डबीर म्हणून पाठवले होते. या प्रधान मंडळाचे रूपांतर पुढे अष्टप्रधान मंडळात झाले .अशा प्रकारचे प्रधानमंडळ सैन्य,खजिना, ध्वजमुद्रा अशा जय्यत तयारीनिशी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/VYAIcFINHm4
📜 २६ फेब्रुवारी इ.स.१६६८
किल्लेदार रायाजी गंगादास यांना गोव्याच्या व्हिसेरेईने लिहीलेल्या पत्राची नोंद!
देसायांचे हस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शिरून बंडाळी मारजवित असल्याचे आपण माझ्या निदर्शनास वारंवार आणले आहे. पण ह्या बंडाळीला आळा घालण्यास मी असमर्थ आहे. त्याचे कारण हे की "देसायांची माणसे आमच्या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जात नाहीत. ती इतर ठिकाणाहून कुठून तरी जात असतील तरी पण लखम सावंत, आणि केशव प्रभू ह्या दोघा उपदव्यापी देसायांना मी आमच्या राज्यातून हाकलून देत आहे. असे जर झाले, तर आपण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रजाजन देसायांच्या उपद्रवापासून मुक्त होतील अशी आशा आहे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ फेब्रुवारी इ.स.१७३९
खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ फेब्रुवारीला इ.स.१७८४
पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (१७७७-१७८२) इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहदकर जाट राण्यांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु, नंतर गोहदकर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७८३ मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारे प्रसिद्ध ‘पन्ना' शहरही मराठी फौजांनी काबीज केले. गोहदकर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महादजींच्या प्रचंड फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु, गोहदकर राणीला हे समजताच ती खवळलीच. तिने आपल्याच किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिले. शेवटी पाच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महादजींना त्यांची 'ग्वाल्हेरी' परत मिळाली (दि. २१ जुलै १७८३). यानंतर महादजींनी गोहदच्या किल्ल्यालाही वेढा घातला आणि दि. २६ फेब्रुवारीला १७८४ रोजी गोहदचाही पाडाव झाला. आधीच इंग्रजांविरुद्धचा प्रचंड विजय अन् आता ग्वाल्हेर-गोहदची यशस्वी मोहीम यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. दिल्लीकर मोगलांनाही आता पुन्हा एकदा मराठ्यांचे 'भीती' वाटू लागली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ फेब्रुवारी इ.स. १८०९
फाल्गुन शुद्ध एकादशी शके १७३० म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी सन १८०९ या दिवशी एक भयंकर घटना घडली. चिमाजीअप्पांच्या पत्नी सीताबाई या संध्याकाळच्या सुमारास जवळच असणाऱ्या ओंकारेश्वरला रिवाजानुसार दिवा लावण्यासाठी गेल्या. परंतु हातातील निरांजनाचे तबक निसटून अंगावर आले अन् त्या निरांजनाच्या ज्योतीने सीताबाईंच्या लुगड्याने पेट घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि आसपासच्या लोकांनी सीताबाईंना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, काही वेळातच सीताबाई मृत्यू पावल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ फेब्रुवारी इ.स.१९६६
महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन (जन्म: २८ मे १८८३)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६३७
शहाजीराजे आदिलशाहीत दाखल - फर्जद किताब मिळाला.
फेब्रुवारी १६३७त महाबली शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले. शहाजीराजांनी या सर्वांस आपला स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा, संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्रीसह पुण्यास राहून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे. तिथे ते २५ फेब्रुवारी रोजी आदिलशहाच्या चाकरीत दाखल झाले. आदिलशहाच्या संमतीने शहाजीराजांनी विजापूर जवळच्या कंपिली गावी आपणांस राहण्यासाठी एक वाडा बांधला. मोठा बगिचा केला व तेथे ते राहू लागले. काही दिवसानी कंपिली गावात बांधलेला वाडा आपणासाठी आदिलशहाने द्यावा अशी खटपट घोरपड्यानी अदिलशहापाशी केली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांची बदली बंगरुळास केली व कंपीचा वाडा घोरपड्यास राहण्यासाठी दिला. महमद आदिलशहा तरुण, तल्लख व महत्त्वाकांक्षी होता. मोगलांशी गोडी झाल्याने उत्तरेकडून आपल्यावर स्वारी होणार नाही हे आदिलशहाने लक्षात घेतले आणि कर्नाटक जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजे यांना विजापूर सरदार रणदुल्लाखान याज समवेत नेमले. यावेळी आदिलशहाच्या नजरेसमोर दक्षिणेतील तुंगभद्रा व रामेश्वरपर्यंतचा हिंदूराजांनी व्यापलेला प्रदेश होता. हा प्रदेश आदिलशहा व कुतूबशहा यांनी जिंकणे त्यांच्या फायद्याचे होते. म्हणून ह्या दोन शाह्यांनी करार करून ठरविले की कर्नाटकचा पूर्व भाग कुतूबशहाने व पश्चिम भाग आदिलशहाने जिंकावा.
शहाजी राजे विजापूरच्या चाकरीत हजर झाल्यावर आदिलशहाने रणदुल्ला खानास त्याजबरोबर
देऊन कर्नाटकांतील हिंदू राजांस जिंकण्यास पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/bng1lCTmTZk
📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६६०
बादशहाचे फर्मान ऐकून सर्व मोगल सरदार मराठ्यांवर स्वारी करण्यास तयार झाले. त्यांना आगेकूच करण्याचा हुकूम शायिस्तेखानाकडून मिळाला. तेव्हा नौबतीच्या इशाऱ्यात मोगली फौज निघाली ती औरंगबादला आली. औरंगाबाद ही दक्षिणेच्या सुभेदाराची राजधानी. तिथे आल्यावर शायिस्तेखानाने तेथे काही दिवस राहून तेथील बंदोबस्त केला. औरंगाबादेस त्याने आपला मुलगा अबूलफत्तेखान याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. नंतर तो तेथून निघाला तो अहमदनगरास दिनांक ११ फेब्रुवारी १६६०त फौजेसह येऊन दाखल झाला. दिनांक २५ फेब्रुवारी १६६० रोजी त्याने अहमदनगर सोडले. वाटेत महाराजांना पाण्यात पाहणारे घाटगे, जाधवराव, कोकाटे, गाढे आदी मराठे सरदार खानास येऊन मिळाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २५ फेब्रुवारी इ.स.१७२८
सरदार रायाजीराव जाधवराव यांना वीरमरण
घुमट म्हणजे श्रीमंत सरदार रायाजीराव जाधवराव यांची समाधी होय. भारतीय इतिहासातील गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी "पालखेडची लढाई". पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैद्राबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला. या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छत्रपती शाहूंचे विश्वासु म्हणून सहभागी झाले होते. २५ फेब्रुवारी १७२८ रोजी नाशिकमधिल पालखेड जवळील निपाणी प्रदेशात झालेल्या धुमश्चक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरन आले. परिणामतः २८ फेब्रुवारीला निजाम नाक धरून मराठ्यांना शरण आला. जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून ही प्रशस्त छत्री/समाधी भुईंज(सातारा) गावाच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ फेब्रुवारी इ.स.१७४२
नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथरावही आता जवळजवळ आठ वर्षांचे झालेच होते. त्यामुळे नानासाहेबांनी रघुनाथरावांचे लग्न काढले. राधाबाई या अजूनही 'कर्त्या' असल्यामुळे बहुदा त्यांनी आपल्या 'बर्वे' घराण्यातील एक मुलगी सुचवली असावी, असे वाटते. म्हणून मौजे जळगाव (मूळ शाखा डुबेरे?) येथील गणेशपंत बर्वे सावकारांची कन्या जानकीबाई (माहेरचे नाव?) यांचा दि. २५ फेब्रुवारी सन १७४२, फाल्गुन शुद्ध द्वितीया शके १६६३, दुर्मतीनाम संवत्सरी गुरुवारी नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथराव यांच्याशी करण्यात आला. राधाबाईंची आणखी एक नातसून घरात आली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://youtu.be/bng1lCTmTZk
📜 २५ फेब्रुवारी इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब्रवारीला चाकण उर्फ संग्रामदुर्ग किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा








