❤️❤️❤️❤️ #भारतीय क्रिकेट संघ #टी 20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघ #👑 भारतीय क्रिकेट संघ 👑
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ५ मार्च इ.स.१६५९
#छत्रपती_शिवरायांच्या_तलरीचा_खरा_इतिहास
छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे छत्रपती शिवरायांना आई भवानी ने दिली ??
तस काही नाही. शिवरायांनी हिंदूधर्म नुसार शस्त्र पुजन करून तिचे नाव ठेवले भवानी तलवार
तलवारीचा खरा इतिहास असा......
दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती. या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची. वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये, भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे...
पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी छत्रपती शिवरायांचे दैवीकरण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/kSSOHFnib3M
📜 ५ मार्च इ.स.१६५९
कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -
ता. ५ मार्च १६५९
श्री
सन १०६८ फसली
तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ
प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १
किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १
स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १
प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६६०
पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला तेव्हा इंग्रज अधिकारी हेन्रीने आपल्या बरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. नंतर यांचाच काटा काढण्यासाठी १८५२ च्या फाल्गुन वद्यात महाराजांनी राजापुरावर स्वारी करून ते लुटले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६६६
(फाल्गुन शुद्ध नवमी, शके १५८७, संवत्सर विश्ववसू, वार सोमवार)
महाराज आग्रा येथे जाण्यास निघाले. मिर्झाराजे जयसिंगच्या सवे महाराजांना स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी तह स्विकारावा लागला. हा तह पक्का होण्यासाठी व औरंगजेबाच्या ५०, व्या वाढदिवसानिमित्त हजर राहण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांनी महाराजांना गळ घातली ती आग्रा येथे जाण्याची! धोका ओळखूनही महाराजांनी ती स्वीकारली आणि महाराज अवघ्या ९, नऊ वर्षांच्या युवराज शंभुराजेंसह आग्रा येथे जाण्यास निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६६७
( फाल्गुन शुद्ध नवमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, सोमवार )
महाराज आग्र्याला शंभुराजांसह निघाले :-
मिरझाच्या सवे शिवरायांना स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी तह स्वीकारावा लागला. हा तह पक्के होण्यासाठी व औरंग्याच्या ५०व्या वाढदिवसाला हजर राहण्यासाठी मिरझाने गळ घातली ती आग्र्याला जाण्याची. धोका ओळखूनही महाराजांनी ती स्वीकारली व आजच्या दिवशी अवघ्या ९ वर्षांच्या शंभूराजे ह्यांना घेऊन आग्र्याला निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली. ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६७६
बंगलोरास राहून शहाजीराजे आपल्या कर्नाटकातील जहागिरीचा कारभार पाहत होते. तंजावरचे राज्य प्रथम शहाजी राजांनी विजापूरच्या तर्फेने १६५९ च्या मार्चमध्ये जिंकले. तेव्हापासून दोन वर्ष तो प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर विजापुरी लष्करात तंटे होऊ लागल्यामुळे शहाजी राजे तंजावर सोडून बंगलोरास आले. शहाजी राजांची पत्नी तुकाबाई यांनी एकोजी राजे नावाच्या मुलास जन्म दिला (१६३१). एकोजीराजे अतिशय शूर व कर्तृत्ववान होते. बहुश्रुतही होते. वडलांच्या मृत्यूनंतर बंगळूरच्या जहागिरीची मालकी एकोजीराजाकडे आली. शहाजी राजांचे पहिले कारभारी नारो त्रिमल हणमंते होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र रघुनाथ नारायण हणमंते हे शहाजीराजांचा कारभार पाहू लागले. एकोजी राजे विजापूर दरबारची चाकरी इमाने इतबारे करीत होते. दरबारच्या हुकूमावरून एकोजी राजानी मदुरेच्या चोक्कनाथ नायकाचा पराभव केला व तंजावर शहर जिंकले (दिनांक १२ जानेवारी १६७६). तंजावर ही विजयराघव राजाची राजधानी होती. एकोजीच्या मनांत शिवाजी महाराजांसारखे आपणही स्वतंत्र राजा होऊन राज्याभिषेक करवून घ्यावा असे होते. त्याप्रमाणे एकोजी राजांनी समारंभपूर्वक तंजावरात सिंहासनारोहण केले. (दिनांक ५ मार्च १६७६) तदनंतर कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांजकडून एकोजीराजे यानी कारभार काढून घेतला. हलके आणि सामान्य लोकांना जवळ करून त्यांच्या तंत्राने ते वागू लागले. तेव्हा रघुनाथपंत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांस भेटावयास आले ते कर्नाटकांतील राज्य विस्ताराची मौल्यवान राजकारणे घेऊन. रघुनाथपंत साताऱ्यास आले कारण महाराज सातारा किल्ल्यावर विश्रांती घेत होते. महाराजांना भेटले. काही दिवसांनी ते पन्हाळ्यास महाराजांबरोबर गेले व त्यांजबरोबर ते रायगडास जून १६७६ च्या प्रारंभी आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार सोमवार)
महाराजांनी मादण्णापंतांच्या मातोश्रींची भेट घेतली.
महाराजांना मादण्णापंतांनी आग्रहाने आपल्या घरी नेले. आकण्णापंत व मादण्णापंत यांच्या मातोश्री भागम्मादेवी यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून महाराजांना भोजन वाढले. महाराजांच्या महत्वाच्या मुत्सद्दयांनाही भोजनार्थ निमंत्रित केले गेले होते. त्याचबरोबर साऱ्यांचा अलंकार, वस्त्रे, घोडे देऊन आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सत्कार केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१७०७
शहजादा आझमने स्वतःला बादशहा घोषित केले
औरंगजेबाला जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. मराठ्यांच्या समशेरींनी त्याची झोप उडविली. तब्बल २६ वर्षानंतर, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. आता औरंगजेबाच्या मुलांत यादवी युद्ध होणे अटळ होते. शहजादा आझम याने ५ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. येसूबाई, शाहू राजे व इतर कबिला बरोबर घेऊन तो दिल्लीला जाण्यास सिद्ध झाला. नर्मदा पार केल्यावर सिरोंचे येथे छावणीचा तळ पडला, झीनत बेगमेच्या मध्यस्थीने अखेर आझम शाहूस सशर्त सोडण्यास तयार झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१७७८
कोल्हापूरकरांचा तह
फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१८७९
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
💐💐🙏🚩🙏💐💐 #तुकाराम बिज #संत तुकाराम महाराज बिज #तुकाराम महाराज बिज सोहळा 🚩 #♦ संत तुकाराम बिज :------------ #संत तुकाराम बिज
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ४ मार्च इ.स.१६६०
छत्रपती शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले. स्वतः शिवाजीराजे पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते. जोवर महाराज पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती महाराज आखणार होते. कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/t7rLDmS3bLs
📜 ४ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार रविवार)
महाराजांच्या भेटीला आकण्णापंत आणि मादण्णापंत!
छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटीस जाताना कुठल्याही प्रकारची लुट न करता शांतपणे येत असल्याचे पाहून कुतुबशहा निष्चितपणे संतोष पावला. आपले पाहुणे म्हणून त्यांच्या अर्थात महाराजांच्या सत्कारार्थ सामोरा येण्याची तयारी करू लागला. कुतुबशहा सामोरा येतोय, लागलीच महाराजांनी निरोप धाडला की, "तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ मी धाकटा भाऊ आपण पुढे न येणे". अर्थात या निरोपाने बादशहा अजून संतोष पावला. त्याने आकण्णापंत आणि मादण्णापंत यांना हुकूम केला की, "खासे आपण जाऊन महाराजांचे स्वागत करावे". त्याबरहुकूम आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सन्मानाने महाराजांना सन्मानपुर्वक शहरात नेले. या पहिल्याच भेटीत महाराजांनी कुतुबशहाचे मन जिंकून एक नवा मित्र जोडला!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१६८७
निळोपंतांनी सर्जेराव जेधे यांस पाठविलेल्या पत्राची नोंद! सर्जेराव जेधे यांस अभय देण्याचे वचन दिले. सर्जेराव जेधे यांसाठी मोरोपंतांच्या पायाची शपथ वाहिली आणि कौल दिला. निळोपंत पेशव्यांनी जेधे घराण्यास माफ करून तुम्ही स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा करावी आणि आमच्यावर पुर्ण भरवसा ठेवावा असे कैलासवासी मोरोपंत पिंगळे यांची शपथ घेऊन आश्वासन दिले. जेधे घराणे किती बहुमोलाचे होते ही गोष्ट यावरून लक्षात येते. त्यांचे स्वराज्यात राहणे किती महत्त्वाचे होते हे यावरुन लक्षात येते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ४ मार्च इ.स.१७०१
पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्र जाहीर केल्याची नोंद!
हिंदुंनी पोर्तुगालच्या राजास अर्जावर अर्ज पाठविण्याचा सपाटा सुरू केला. त्याला यश येऊन पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्रानुसार जाहीर केले की हिंदूंना ४ भिंतीच्या आत होम हवनाधी विधीनुसार लग्ने लावण्याची मुभा राहील. परंतु ही सवलत इंक्विझिशनच्या नियमांना बाधक हीती म्हणून गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास तसे कळविले. पोर्तुगालात इंक्विझिशनचा वरचष्मा असल्याने पोर्तुगालच्या राजास त्याचा विरोध पत्कराने अशक्य होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१७०६
छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करून दिलं.
https://youtu.be/t7rLDmS3bLs
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१७३९
मराठ्यांनी कारंजा (उरण) बेट जिंकले
मानाजी आंग्रे ४ मार्च १७३९ रोजी आपल्या आरमारातील ४० गलबतां मधून २००० हजार शिबंदी सह फिरंगी प्रतिकार मोडून काढत कारंजा बेटावर उतरले. बेटावर अदीच आपले माणसे पेरून मराठ्यांनी जवळ जवळ ७००-८०० स्थानिक आंग्र्यांना आपल्या बाजूस वळवले होते.
हा सर्व प्रकार पाहून पोर्तुगीज कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्याच्या पाचावरच धारण बसली. बघता बघता पूर्ण कारंजा बेट ताब्यात घेत लगेच दुसऱ्या दिवशी मराठे द्रोणागिरी गडास बिलगले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१८१८
इंग्रजांनी विसापूर जिंकला
जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
#🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ३ मार्च इ.स.१६६५
(फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५८६, क्रोधी संवत्सर, वार शुक्रवार)
मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते.
त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/7hT0iKA9GUY
📜 ३ मार्च इ.स.१६८९
(फाल्गुन वद्य ७, सप्तमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)
छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का!
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला, कारण हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे ३२, बत्तीसवे वर्षे होते. आजच औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. योगायोग हा की ३ मार्च इ.स.१६८९ रोजी बरोबर ३२ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला. औरंगजेबाने भिमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना "फतवा" काढला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७००
छत्रपती राजाराम महाराज जिंजी च्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोंगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोंगल अगदी हैराण होऊन गेले होते. संताजी घोरपडे
आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोंगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर आले. महाराष्ट्राची ही 'शिवलंका' अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या, श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच 'शिवराजेश्वर' मंदिराची निर्मिती केली. यानंतर दुर्दैवाने केवळ दोनच वर्षात, गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दि. ३ मार्च १७०० या दिवशी या तरुण राजाचा, वयाच्या केवळ २९ व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७१९
दिल्लीच्या लालकिल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर हसनअली सय्यदाने लहानग्या रफिउदौरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात झाली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहूमहाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफिउदौरजत बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या सनदा जाहीरपणे शाहूमहाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजीपंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व सनदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजीपंतांच्या मनात काय आले असेल? 'हे सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज त्याच सिंहासनावर हे परके तुराणी बसलेत. हा मुजरा या बादशहाला नसून अजातशत्रू युधिष्ठिराला आहे, भगवान श्रीकृष्णाला आहे, प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे ते स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल.' इतर लहान-मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दि. १५ मार्च रोजी परत दरबार भरवून सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या. यानंतर लगेचच पाच दिवसांनी दि. २० मार्च १७१९ रोजी ५० हजार मराठी फौज राजमाता येसूबाईसाहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवरपाशी आल्यानंतर बाळाजीपंत आपले थोरले पुत्र व अंबाजीपंतांना सोबत घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७३९
सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दिनांक ३ मार्च सन १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७८९
दिल्लीवर मराठा भगवा झेंडा
गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्यांच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणेखान, जिवबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले... एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लुट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते..... गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला त्याच्या घोसगडा कडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठयांना तो जिवंत पाहिजे होता.... गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोझा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या... अखेर गुलामाचे डोळे काढून बादशाहाकडे पाठविण्यात आले ३ मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शाहआलम ला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लुट महादजींनी दिल्लीला पाठवली.... "मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशाहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किलल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्ष म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता"...
https://youtu.be/7hT0iKA9GUY
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७९३
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१८१८
सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात
गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले गेले. ६ पौंडी अथवा १२ पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज र्न मारा होत होताच.
१ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करायला प्रिट्झलर काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर ३ तासांत गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरु केला गेला. शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
*असत्य आणि दुष्ट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पौर्णिमा आपल्याला श्रद्धा, संयम आणि सदाचाराची शिकवण देते. होळीच्या दहनातून नकारात्मक विचारांचा त्याग करून नैतिकता आणि नवचैतन्याचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया..!🙏😊💞*
*माझ्या सर्व मित्र परिवाराला होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊*
🎨🧡❤️💛💚🩷💙💜
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सचिन दादा पानसरे मित्र परिवार शिरवळ शहर
https://www.instagram.com/p/DVXzVuLDHTs/?igsh=MXJ0d214OWZxOTJtbg== #✨सोमवार स्पेशल✨ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹प्रेमरंग #🃏रंगीत नेम आर्ट




![🚩शिवराय - 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors - ShareChat 🚩शिवराय - 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_195285_324be06f_1772675190004_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=004_sc.jpg)
![तुकाराम बिज - দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 - ShareChat तुकाराम बिज - দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_269990_2ec9680f_1772639263727_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=727_sc.jpg)
![🚩शिवराय - IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat 🚩शिवराय - IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_935267_2276bf56_1772591929799_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=799_sc.jpg)
![🚩शिवराय - I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat 🚩शिवराय - I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_125075_31ccc9f2_1772504109839_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=839_sc.jpg)
