#🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ६ मार्च इ.स.१६६६
(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)
औरंगजेबाचे अभयपत्र!
महाराजांना जिविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले. महाराजांनी बिनघोर आग्रा येथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्याखातर आणि मिर्झाराजे जयसिंगच्या शब्दावर विसंबून महाराजांनी जिवाचा धोका पत्करला होता. स्वतःबरोबर युवराज शंभुराजेंना घेऊन जात दुहेरी धोका महाराजांनी स्विकारला होता. नियती मात्र महाराजांची परीक्षा घेत होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/JBUYfYogGv4
📜 ६ मार्च इ.स.१६७२
१६७२ मध्ये घोडबंदरवर स्वारी करून पोर्तुगीझांची वसाहत काबीज करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजी महाराजांची मर्जी संपादण्याच्या उद्योगास लागले. सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरविल. राजापूरलुटीची भरपाई करून घेणे, हा तहाचा एक हेतु होता. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजी महाराजांस स नजराणा देण्यासाठी ६०० रु. व शिवाजीच्या सरकारकुनांसाठी १५० रु. खर्च करावेत. उस्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी, दोन इंग्रज, दोन घोडे, पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी. उस्टिक रायगडावर का जात आहे, या बाबत गुप्तपणा राखावा; जाहीर करणेच झाले, तर राजापूरच्या वखारीची व गलबतांची नुकसानभरपाई करून घेण्यासाठी त्यास पाठवीत आहोत, एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले. उस्टिकने ६ मार्च १६७२ रोजी रायगडवर जाण्यास मुंबईहून निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मार्च इ.स.१६७३
विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठविले. कोंडाजींनी आपल्या बरोबर मर्द मराठे ६० मावळे घेतले. दिनांक ६ मार्च १६७३ रोजी रात्री ते दोऱ्यांवरून किल्ल्यावर चढले. भेद यशस्वी होऊन ते वर जाऊन पोचले, तेव्हा किल्ल्यांतील लोक सावध होऊन त्यांजवर चालून आले. इतकी कडी गस्त ठेऊनही शत्रू आला कसा हेच कोणाला समजेना. शत्रू अफाट असावा असे त्यांस वाटले. भयंकर लढाई जुंपली. कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली. दोघांचे अटीतटीचे तुंबळ युद्ध झाले. कोंडाजींनी किल्लेदाराचे मुंडके उडविले. किल्लेदार गडावरच्या राजवाड्यापुढे ठार होऊन पडला. अवघ्या दोन-तीन तासात पन्हाळा किल्ला मराठ्यांनी जिंकला. स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या ‘पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. महाराज रायगडावर होते. त्यांजकडे जासूद पाठविला. ही आनंदाची बातमी महाराजांस २ दिवसांनी कळली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मार्च इ.स.१७२८
#निजामाचा_पराभव, मराठ्यांबरोबर मुंगी-शेगावचा तह
निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या....
निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे
लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला....
असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली....
निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला....
बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला....
राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते....
आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती....
पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले....
औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली....
अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते....
आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला....
या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला....
त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते -
१.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले....
२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला....
३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या....
४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले....
https://youtu.be/JBUYfYogGv4
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मार्च इ.स.१७३९
चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते... १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....
वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मार्च इ.स.१७७५
रघुनाथरावांनी दि. ६ मार्च १७७५ रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह केला. यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई, साष्टी, ठाणे इ. प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या. हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात 'सुरतेचा तह'!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
❤️❤️❤️❤️ #भारतीय क्रिकेट संघ #टी 20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघ #👑 भारतीय क्रिकेट संघ 👑
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ५ मार्च इ.स.१६५९
#छत्रपती_शिवरायांच्या_तलरीचा_खरा_इतिहास
छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे छत्रपती शिवरायांना आई भवानी ने दिली ??
तस काही नाही. शिवरायांनी हिंदूधर्म नुसार शस्त्र पुजन करून तिचे नाव ठेवले भवानी तलवार
तलवारीचा खरा इतिहास असा......
दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती. या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची. वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये, भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे...
पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी छत्रपती शिवरायांचे दैवीकरण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/kSSOHFnib3M
📜 ५ मार्च इ.स.१६५९
कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -
ता. ५ मार्च १६५९
श्री
सन १०६८ फसली
तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ
प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १
किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १
स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १
प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६६०
पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला तेव्हा इंग्रज अधिकारी हेन्रीने आपल्या बरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. नंतर यांचाच काटा काढण्यासाठी १८५२ च्या फाल्गुन वद्यात महाराजांनी राजापुरावर स्वारी करून ते लुटले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६६६
(फाल्गुन शुद्ध नवमी, शके १५८७, संवत्सर विश्ववसू, वार सोमवार)
महाराज आग्रा येथे जाण्यास निघाले. मिर्झाराजे जयसिंगच्या सवे महाराजांना स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी तह स्विकारावा लागला. हा तह पक्का होण्यासाठी व औरंगजेबाच्या ५०, व्या वाढदिवसानिमित्त हजर राहण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांनी महाराजांना गळ घातली ती आग्रा येथे जाण्याची! धोका ओळखूनही महाराजांनी ती स्वीकारली आणि महाराज अवघ्या ९, नऊ वर्षांच्या युवराज शंभुराजेंसह आग्रा येथे जाण्यास निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६६७
( फाल्गुन शुद्ध नवमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, सोमवार )
महाराज आग्र्याला शंभुराजांसह निघाले :-
मिरझाच्या सवे शिवरायांना स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी तह स्वीकारावा लागला. हा तह पक्के होण्यासाठी व औरंग्याच्या ५०व्या वाढदिवसाला हजर राहण्यासाठी मिरझाने गळ घातली ती आग्र्याला जाण्याची. धोका ओळखूनही महाराजांनी ती स्वीकारली व आजच्या दिवशी अवघ्या ९ वर्षांच्या शंभूराजे ह्यांना घेऊन आग्र्याला निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली. ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६७६
बंगलोरास राहून शहाजीराजे आपल्या कर्नाटकातील जहागिरीचा कारभार पाहत होते. तंजावरचे राज्य प्रथम शहाजी राजांनी विजापूरच्या तर्फेने १६५९ च्या मार्चमध्ये जिंकले. तेव्हापासून दोन वर्ष तो प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर विजापुरी लष्करात तंटे होऊ लागल्यामुळे शहाजी राजे तंजावर सोडून बंगलोरास आले. शहाजी राजांची पत्नी तुकाबाई यांनी एकोजी राजे नावाच्या मुलास जन्म दिला (१६३१). एकोजीराजे अतिशय शूर व कर्तृत्ववान होते. बहुश्रुतही होते. वडलांच्या मृत्यूनंतर बंगळूरच्या जहागिरीची मालकी एकोजीराजाकडे आली. शहाजी राजांचे पहिले कारभारी नारो त्रिमल हणमंते होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र रघुनाथ नारायण हणमंते हे शहाजीराजांचा कारभार पाहू लागले. एकोजी राजे विजापूर दरबारची चाकरी इमाने इतबारे करीत होते. दरबारच्या हुकूमावरून एकोजी राजानी मदुरेच्या चोक्कनाथ नायकाचा पराभव केला व तंजावर शहर जिंकले (दिनांक १२ जानेवारी १६७६). तंजावर ही विजयराघव राजाची राजधानी होती. एकोजीच्या मनांत शिवाजी महाराजांसारखे आपणही स्वतंत्र राजा होऊन राज्याभिषेक करवून घ्यावा असे होते. त्याप्रमाणे एकोजी राजांनी समारंभपूर्वक तंजावरात सिंहासनारोहण केले. (दिनांक ५ मार्च १६७६) तदनंतर कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांजकडून एकोजीराजे यानी कारभार काढून घेतला. हलके आणि सामान्य लोकांना जवळ करून त्यांच्या तंत्राने ते वागू लागले. तेव्हा रघुनाथपंत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांस भेटावयास आले ते कर्नाटकांतील राज्य विस्ताराची मौल्यवान राजकारणे घेऊन. रघुनाथपंत साताऱ्यास आले कारण महाराज सातारा किल्ल्यावर विश्रांती घेत होते. महाराजांना भेटले. काही दिवसांनी ते पन्हाळ्यास महाराजांबरोबर गेले व त्यांजबरोबर ते रायगडास जून १६७६ च्या प्रारंभी आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार सोमवार)
महाराजांनी मादण्णापंतांच्या मातोश्रींची भेट घेतली.
महाराजांना मादण्णापंतांनी आग्रहाने आपल्या घरी नेले. आकण्णापंत व मादण्णापंत यांच्या मातोश्री भागम्मादेवी यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून महाराजांना भोजन वाढले. महाराजांच्या महत्वाच्या मुत्सद्दयांनाही भोजनार्थ निमंत्रित केले गेले होते. त्याचबरोबर साऱ्यांचा अलंकार, वस्त्रे, घोडे देऊन आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सत्कार केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१७०७
शहजादा आझमने स्वतःला बादशहा घोषित केले
औरंगजेबाला जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. मराठ्यांच्या समशेरींनी त्याची झोप उडविली. तब्बल २६ वर्षानंतर, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. आता औरंगजेबाच्या मुलांत यादवी युद्ध होणे अटळ होते. शहजादा आझम याने ५ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. येसूबाई, शाहू राजे व इतर कबिला बरोबर घेऊन तो दिल्लीला जाण्यास सिद्ध झाला. नर्मदा पार केल्यावर सिरोंचे येथे छावणीचा तळ पडला, झीनत बेगमेच्या मध्यस्थीने अखेर आझम शाहूस सशर्त सोडण्यास तयार झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१७७८
कोल्हापूरकरांचा तह
फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ मार्च इ.स.१८७९
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
💐💐🙏🚩🙏💐💐 #तुकाराम बिज #संत तुकाराम महाराज बिज #तुकाराम महाराज बिज सोहळा 🚩 #♦ संत तुकाराम बिज :------------ #संत तुकाराम बिज
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ४ मार्च इ.स.१६६०
छत्रपती शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले. स्वतः शिवाजीराजे पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते. जोवर महाराज पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती महाराज आखणार होते. कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/t7rLDmS3bLs
📜 ४ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार रविवार)
महाराजांच्या भेटीला आकण्णापंत आणि मादण्णापंत!
छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटीस जाताना कुठल्याही प्रकारची लुट न करता शांतपणे येत असल्याचे पाहून कुतुबशहा निष्चितपणे संतोष पावला. आपले पाहुणे म्हणून त्यांच्या अर्थात महाराजांच्या सत्कारार्थ सामोरा येण्याची तयारी करू लागला. कुतुबशहा सामोरा येतोय, लागलीच महाराजांनी निरोप धाडला की, "तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ मी धाकटा भाऊ आपण पुढे न येणे". अर्थात या निरोपाने बादशहा अजून संतोष पावला. त्याने आकण्णापंत आणि मादण्णापंत यांना हुकूम केला की, "खासे आपण जाऊन महाराजांचे स्वागत करावे". त्याबरहुकूम आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सन्मानाने महाराजांना सन्मानपुर्वक शहरात नेले. या पहिल्याच भेटीत महाराजांनी कुतुबशहाचे मन जिंकून एक नवा मित्र जोडला!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१६८७
निळोपंतांनी सर्जेराव जेधे यांस पाठविलेल्या पत्राची नोंद! सर्जेराव जेधे यांस अभय देण्याचे वचन दिले. सर्जेराव जेधे यांसाठी मोरोपंतांच्या पायाची शपथ वाहिली आणि कौल दिला. निळोपंत पेशव्यांनी जेधे घराण्यास माफ करून तुम्ही स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा करावी आणि आमच्यावर पुर्ण भरवसा ठेवावा असे कैलासवासी मोरोपंत पिंगळे यांची शपथ घेऊन आश्वासन दिले. जेधे घराणे किती बहुमोलाचे होते ही गोष्ट यावरून लक्षात येते. त्यांचे स्वराज्यात राहणे किती महत्त्वाचे होते हे यावरुन लक्षात येते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ४ मार्च इ.स.१७०१
पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्र जाहीर केल्याची नोंद!
हिंदुंनी पोर्तुगालच्या राजास अर्जावर अर्ज पाठविण्याचा सपाटा सुरू केला. त्याला यश येऊन पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्रानुसार जाहीर केले की हिंदूंना ४ भिंतीच्या आत होम हवनाधी विधीनुसार लग्ने लावण्याची मुभा राहील. परंतु ही सवलत इंक्विझिशनच्या नियमांना बाधक हीती म्हणून गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास तसे कळविले. पोर्तुगालात इंक्विझिशनचा वरचष्मा असल्याने पोर्तुगालच्या राजास त्याचा विरोध पत्कराने अशक्य होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१७०६
छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करून दिलं.
https://youtu.be/t7rLDmS3bLs
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१७३९
मराठ्यांनी कारंजा (उरण) बेट जिंकले
मानाजी आंग्रे ४ मार्च १७३९ रोजी आपल्या आरमारातील ४० गलबतां मधून २००० हजार शिबंदी सह फिरंगी प्रतिकार मोडून काढत कारंजा बेटावर उतरले. बेटावर अदीच आपले माणसे पेरून मराठ्यांनी जवळ जवळ ७००-८०० स्थानिक आंग्र्यांना आपल्या बाजूस वळवले होते.
हा सर्व प्रकार पाहून पोर्तुगीज कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्याच्या पाचावरच धारण बसली. बघता बघता पूर्ण कारंजा बेट ताब्यात घेत लगेच दुसऱ्या दिवशी मराठे द्रोणागिरी गडास बिलगले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ मार्च इ.स.१८१८
इंग्रजांनी विसापूर जिंकला
जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय






![🚩शिवराय - 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors - ShareChat 🚩शिवराय - 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors 'IMIVIII [ REAT MARATHA WARRTORST THE SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil] मार्च इ॰स.१६५९ कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली॰ अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले. the_great_marathauarriors the qreat marathauarriors the great marathawarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_195285_324be06f_1772675190004_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=004_sc.jpg)
![तुकाराम बिज - দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 - ShareChat तुकाराम बिज - দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 দগমমগ ; @ নুকাম্ম্ণী মীণী কল্ীপাযনাম] तरावया तुकाजम | संत शिरोमणी श्रीतुकाराम महाराज यांना बीजनिमित्त त्रिवार वंदन !! सचिन दादा पानसरे श्री गूरु दत्त गॅस भारत गॅस मिळ तीलन्सी एचपी गॅस 24 777747 Sachin dada pansar 9657829035 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_269990_2ec9680f_1772639263727_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=727_sc.jpg)
![🚩शिवराय - IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat 🚩शिवराय - IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors IL` 11] VII 4 -0ப4= THE GR T MARATHA WARRINS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil | मार्च इ.स.१६६० 8 किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले . आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_935267_2276bf56_1772591929799_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=799_sc.jpg)