⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २ मे इ.स.१६५६
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.
शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/edelcH3kEew?feature=share
📜 २ मे इ.स.१६६५
(वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, मंगळवार)
दाऊद खान किल्ले कोंढाण्याच्या दिशेने :-
राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला. राजगड परिसरातून २ कोस मागे हटल्यानंतर त्याने आपला तळ गुंजन घेऱ्याजवळ दिला व तिथून एक दिवस विश्रांती घेऊन खेड शिवापुरच्या दिशेने स्वराज्याची नासधूस करत कोंढण्याच्या दिशेने सरकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१६८३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन. शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास उघड झाला. आजही मराठीतील प्रचिलित असलेले शब्द शिवराज्यकोशात असल्याचे पाहून आनंद होतो . .🙏
सचिव , मंत्री , सभासद , न्यायधीश ,
दुर्ग , कोशागार , शस्त्रागार , चषक ,
सभा , लेखा , आय - व्यय (जमाखर्च ) , वेतन , ऋण , पतिभु (जामिन ) , कारागृह , आयपत्र , सहकारी , अनुक्रमणिका , सवांद , गणना. असे अनेक असंख्य शब्द आजही आपल्या वापरात आहे.
राज्यव्यवहारकोश विविध आठ
नावांनी ओळखला जातो .
१) राज्यव्यवहारकोश
२) राजकोश
३) शिवचरित्रप्रतीप
४) राजकोश नीघुन्तु (#ट)
५) व्यवहारकोश
६) शिवराजकोश
७) श्री छत्रपती राजकोश
८) श्री छत्रपती राज्यव्यवहारकोश
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१७३९
गोव्याचे पोर्तुगीज आणि व्यंकटराव घोरपडे यांच्यात तह!
या तहात खोर्जुवे बेट आणि पनाळे बेट ही पोर्तुगिजांनी घेतलेली सावंतांची दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु मी दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु ती दोन्ही बेटे पोर्तुगिजांनी सावंतांना परत केली नाहीत. तत्पूर्वी पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते. कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने त्यांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१७३९
छत्रपती शाहू महाराजांचे सरदार व्यंकटराव घोरपडे व दादाजी भावे नरगुंदकर या दोघांनी गोव्याच्या पोर्तुगिजांच्या तहाच्या करारावर सह्या केल्याची नोंद!
दादाजी भावे यांस पोर्तुगिजांकडून भरपूर लाच मिळाल्याने त्याने रायतूरच्या किल्ल्यावर हल्ला करण्यास चालढकल केली. नंतर मराठा सरदारांच्या डोळ्यास पाणी लावण्यासाठी लुटूपुटूचा हल्ला केला. पण त्यात दम नव्हता. दादाजी भावे व्यंकटराव घोरपडे आणि पोर्तुगीज आधिकारी यांच्यामधील तहाच्या वाटाघाटीचे एरंडाचे गुऱ्हाळ पुष्कळ दिवस चालले. व्यंकटराव यांचा दिवाण गोविंदपंत ठाकूर याने एक अट घातली की, पोर्तुगिजांनी त्यांच्या अमलाखालच्या हिंदुंकडून शेंडी कर वसूल करू नये व त्यांना त्यांनी संपूर्ण धर्मस्वातंत्र्य द्यावे. भावे यांचा दिवाण महादजी शेणवी याने "इंक्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी हिंदूंच्या वाटेस जाऊ नये". अशी शर्त घातली. परंतू त्या दोन्हीही अटी पोर्तुगिजांनी मान्य केल्या नाहीत. त्यांनी सबब सांगितली की हा प्रश्न धार्मिक असल्याने त्यात ढवळाढवळ करण्याचा आपणास आधिकार नाही. व्यंकटराव घोरपडे आणि दादाजी भावे या दोघांनी पोर्तुगिजांकडून लाच घेतल्याने "ते त्यांचे मिंघे बनले होते. त्या दोघांनी तहाच्या करारावर दि. २ मे इ.स.१७३९ या दिवशी मुकाट्याने सह्या केल्या. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या लांछणास्पद करारावर छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्कामोर्तब केले नाही. पोर्तुगिजांनी युद्ध नुकसानी म्हणून मराठ्यांना ७ लक्ष रुपये द्यावे अशी अट तहाच्या कलमात होती. ह्या रकमेपैकी एक लक्ष रुपये आपणा स्वतःला मिळण्याची व्यवस्था दादाजीने अगोदरच करून ठेवली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१८१८
त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईज मनी अॅक्शन नुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नास्सक हिराही इंग्लंडला गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ मे इ.स.१८४८
क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी.
या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या १७३ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/edelcH3kEew?feature=share
📜 २ मे इ.स.१९२१
स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या अंधार कोठडीतून
दि.२ मे १९२१ रोजी सुटका झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १ मे इ.स.१६६०
स्वराज्यावर चालून आलेला मुघल सरदार शाहीस्तेखान सासवडहून राजेवाडीला आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/CYUluVaA-ow?feature=share
📜 १ मे इ.स.१६६५
दाऊदखान शिवापुरास आला!
दाऊदखानाचे सैन्य किल्ले राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले पण येथे महाराजांच्या समोर त्यांची मात्रा चालली नाही. किल्ले राजगडावरून तोफा, बंदुका आणि बाणांचा जबरदस्त मारा सुरू झाला. किल्ले राजगडाच्या पद्मावती माचीवरही मराठे युद्धाच्या पावित्र्यात जय्यत तयार होते. किल्ले राजगडाचा दुर्गम डोंगराळ टापू मराठ्यांच्या मदतीला होता. डोंगरांच्या मदतीने किल्ले राजगड चांगलाच भांडता. मराठ्यांच्या रेट्यापुढे मोगली सैन्य टिकेनासे झाले. अखेर दाऊदखान २, दोन कोस माघारा हटला. त्याने आपला तळ गुंजण घेऱ्याजवळ दिला व दुसऱ्या दिवशी शिवापुरला आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ मे इ.स.१६६५
पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ मे इ.स.१६७५
फोंड्याच्या २ दोन माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात!
कुडाळ वरून महाराज फोंड्यावर चालून गेले. रुस्तमेजमानचा पुत्र महमदखान हा फोंड्यावरून महाराजांशी सलोख्याचे अटितटीने झुंजू लागला. युद्धाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंची बरीच प्राणहानी होऊ लागली. महाराजांनी ४, चार वेळा फोंड्याला सुरूंग लावले पण महमदखानानेही तेवढेच सुरूंग लाऊन महाराजांना प्रत्युत्तर दिले. अखेर महाराजांनी तटापासून १२ फुटांवर सैनिकांसाठी संरक्षक भिंत बांधली व फोंडा घेण्याचा निर्धार करून, (दि. ८ एप्रिल इ.स.१६७५ रोजी २ हजार घोडदळ व ७ हजार पायदळानिशी फोंड्याला वेढा दिला. पावसात देखील वेढा सुरू ठेवण्याचे महाराजांनी ठरविले. महाराज स्वतःही फोंड्यालाच तळ ठोकून बसले होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्यांना आदिलशाही हद्दीतील एटगिरी व गोवलकोंड्याच्या हद्दीतील २ शहरांकडे लुट करण्यासाठी रवाना केले. मराठ्यांनी सर्व ठिकाणी प्रचंड लूट करून ती सर्व संपत्ती व काही कैद केलेले सावकार फोंड्याला महाराजांजवळ आणले. पोर्तुगीज गुप्तपणे महमदखानाला मदत करत होते. त्यांची कुकली व वरुडे ही गावेही मराठ्यांनी लुटली. महमदखानाजवळ फक्त ४ महिने पुरेल एवढीच रसद होती. त्याच्या कुमकेस रुस्तमेजमान १५ हजार पाचशे घोडदळ व काही पायदळ घेऊन आला. महमदखान नेटाने तोंड देत होता. महाराजही चिवटपणे वेढा घालून बसले होते. फोंड्याच्या २ माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात आल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ मे इ.स.१७३९
१ मे रोजी नादिरशहाने मोठा दरबार भरवून महमदशहास दिल्लीच्या तख्तावर बसविले आणि सुमारे एक अब्ज रुपये एवढी संपत्ती आणि सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन जाताना सुप्रसिद्ध मयूर सिंहासन व कोहीनूर हिरा घेऊन तो इराणला परत गेला. नादिरशहाच्या स्वारीमुळे दिल्लीत हाहाकार उडाला. त्यावेळी मराठ्यांचा वकील बाबूराव मल्हार हे जयपुरास गेले. तिथून त्यांनी पेशव्यास पत्र लिहिले ते असे “चकतियांची पातशाही बुडाली, इराणी जाली, यास्तव सवाईजीनी आपले व लोकांचे कबिले उदेपुरास पाठवून सडे जाले आहेत. इकडील दक्षिणच्या मातबर फौजा जातील तेव्हा नादिरशहाशी प्रसंग पडेल”. यावरून बादशहास मदत करून नादिरशहास घालवून द्यावा अशी मराठा मंडळाची इच्छा होती. छत्रपती शाहू महाराजांनी व श्रीमंत बाजीराव पेशवे यांचाही हाच बेत ठरला. मोगली फौज जमा करून नादिरशहा दक्षिणेत येणार अशी बातमी आली. तेव्हा वसईची मोहीम आटोपताच श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या सरदारासह त्याजवर निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ मे इ.स.१७७३
इंग्रज आणि पेशव्यांच्यात पुरंदरचा तह झालेला पाहताच फ्रेंचांनाही पेशव्यांशी सलोखा व्हावा असे वाटू लागले. फ्रेंचांनी आपला वकील ल्युबिन्सन बाला पुण्यात पाठवले. ल्युबिन्सनने नानांची सन्मानाने भेट घेतली. १ मे १७७३ नंतर लगेच नानांनीही त्याची चांगली बडदास्त ठेवली. पेशवे आणि फ्रेंचांमध्ये तह आणि सलोखा निर्माण झाल्याचे पाहताच इंग्रज चिडले. कारण याच सुमारास अमेरिकेत तिथल्या नेटीव्ह लोकांचे फ्रेंचांच्याच मदतीने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते. तसंही पेशव्यांशी झालेला तह इंग्रज कधी ना कधीतरी मोडणारच होते. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज याने ताबडतोब पेशव्यांविरुद्ध झुंज घेण्याची तयारी चालवली. एकंदरीतच या साऱ्या प्रकरणात नाना फडणवीसांना आता अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ मे इ.स.१८१८
प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/CYUluVaA-ow?feature=share
📜 १ मे इ.स.१८१८
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ मे इ.स.१९६०
"महाराष्ट्र दिन"
अखंड संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ३० एप्रिल इ.स.१६६४
सुरत लुटीचे पडसाद...
इस १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरंतर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला (जहांआरा बेगम) मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्याकाळी सुरत व्यापाराची राजधानी होती परंतु शिवाजी महाराजांच्या दणक्याने अनेक व्यापारी सुरत सोडून चालले होते. यावर तोडगा म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदारपणे एक वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकुम काढला. एवढेच नाही तर पुढेही एक चतुर्थांश जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. बंगालला लिहलेल्या ३० एप्रिल १६६४ च्या पत्रात "आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून एक वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहले आहे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/LlgmJxX6G4E?feature=share
📜 ३० एप्रिल इ.स.१६६५
(वैशाख वद्य एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार)
दाऊदखानाचा किल्ले राजगडावर हल्ला!
मिरझाजयसिंगच्या नेतृत्वाखाली सुमारे ७००० स्वार स्वराज्य बेचिराख करण्यास पाठवून दिले. महाराज याच सुमारास राजगडावर असताना राजगडला मोगली वेढा पडल्यावर मराठ्यांचा प्रतिकार कसा होईल? मराठयांनी असा काय तिखट प्रतिकार केला की, मोगल सैन्य जेवढे पुढे आले होते तेवढेच मागे सरकले. राजगडावरून पद्मावती, संजीवनी माचीवरून आग ओकणाऱ्या तोफा, बाणांचा अचूक वेध, बंदुकीच्या माऱ्यांचा पाऊस अश्या मराठी रेट्यासमोर मोगली सैन्य टिकेनासे झाले. निरुपाय होऊन दाऊदखान २ कोस मागे हटला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० एप्रिल इ.स.१६७४
एप्रिल १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खालील खणखणीत निरोप पाठविला की, “सिद्दीला बंदरात जागा दिल्यास मी तुमच्याशी युद्ध करून बादशाही आरमार जाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन आणि मुंबई बेट घेण्याकरिता डचांना १० हजार सैन्याची कुमक करीन” याकरता आपण सिद्दीला प्रवेश मुळीच देता कामा नये. छत्रपती बशिवाजी महाराजांच्या या धमकीमुळे मुंबईकर इंग्रज भयभीत झाले. त्यांनी ३० एप्रिल १६७४ रोजी सुरतेस पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज कशा रीतीने इंग्रजांस त्रास देणार आहेत याबद्दल कळविले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहीचे करारनामे इंग्रजांस पाठविले. त्याचे भाषांतर केल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अटी जाचक आहेत. त्यानंतर हेन्री ऑक्झिंडेनला छत्रपती शिवाजी महाराजांशी तहाचे बाबतीत सूचना देऊन रायगडी राज्याभिषेक समारंभास जाण्यास निरोप दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० एप्रिल इ.स.१६८४
(वैशाख वद्य एकादशी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार बुधवार)
औरंगजेब बादशहाचे आदिलशाहीवर आक्रमण!
औरंगजेब बादशहाचे आज्ञापत्र स्थानिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून शहाजहानने आदिलशाही व कुतुबशाही ही मांडलीक राज्ये खालसा न करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगजेब बादशहाने एकदा, ही राज्ये खालसा करण्याचा प्रयत्न करून पाहीला पण तो अयशस्वी ठरला! कारण शहाजहानची औरंगजेबास अडचण येत होती. नंतर महाराज छत्रपती झाल्याने औरंगजेब बादशहाची अजूनच अडचण झाली. कारण विजापुरचा प्रदेश जिंकून महाराज हद्द वाढवून राज्याचा विस्तार करीत होते. मात्र महाराजांच्या महानिर्वाणानंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली. धर्माचे वेड औरंगजेब बादशहास स्वस्त बसू देत नव्हते. अशातच औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर, छत्रपती संभाजी महाराजांकडे येऊन राहिल्याने औरंगजेब बादशहाच्या अडचणीत अजून भर पडत होती! या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सिकंदर अदिलशहास औरंगजेबाने आज्ञापत्र लिहीले. सिकंदर हा वयाने लहान असल्याने सिकंदरचा कारभारी रुस्तमखान यास औरंगजेब बादशहाने आज्ञापत्र लिहीले त्यानुसार,
१ स्वारी खर्च व रसद काही सबब न सांगता पोहोचविणे.
२ आपल्या मुलूखातून रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
३ गरज असेल तेव्हा मोगलांची मदत करणे.
४ छत्रपती संभाजी महाराजांची मित्रता सोडून त्यांचा समूळ फडशा पाडण्यासाठी तयारी करणे.
५ सर्जाखान यास आपल्या मुलूखातून हाकलून देणे. • या कलमांसह त्याने विजापुरकरांना बांधून ठेवले आणि चांगलाच अंकुश ठेवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० एप्रिल इ.स.१७००
सातारा हस्तगत झाला त्याच दिवशी बादशहाने फतुल्लाखानास ‘परळीचा किल्ला’ (सज्जनगड) काबीज करण्यासाठी पाठवले व मागून म्हणजेच आजच्या दिवशी बादशाहा जातीने तिथे पोहचला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० एप्रिल इ.स.१७८४
इतिहासातील राखीपौर्णिमा
अहिल्याबाई होळकरांनी जोधपुरच्या राजाशी मैत्रीचे व स्नेहाचे संबंध वाढवण्यासाठी राखी पाठवली होती. राजा मानसिंहाने राखीबंधभाई याचे प्रतीक म्हणून होळकर घराण्यातील राण्यांना अनेक प्रकारे मदत केलेली आढळते. भेट म्हणून ३० एप्रिल १७८४ च्या मकाराणा येथिल सनदेनुसार अहिल्याबाईंना मंदिरासाठी जोधपुरच्या राजाने पांढराशुभ्र संगमरवरी दगड उपलब्ध करुन दिला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० एप्रिल इ.स.१९०८
राजद्रोहाचा खटला
प्रफुल्लचंद्र चक्रवर्ती आणि खुदिराम बोस या तरुणांनी मुझ्झफरपूर येथे युरोपियन क्लब समोर कलकत्याचा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याच्या बग्गीवर हातबॉम्ब टाकला. पण बग्गीमध्ये किंग्जफोर्ड नव्हताच, दुर्दैवाने त्यात बॅरीस्टर र्प्रिंगल केनेडी याची पत्नी व कन्या मारल्या गेल्या. गाडीवानही ठार झाला. पोलिस पकडायला येताच मोकामे स्टेशनवरतीच प्रफुल्लचंद्रांनी आत्महत्या केली, खुदिराम पकडले गेले व चौकशी - खटला वगैरे कायदेशीर सोपस्कार पार पाडून त्यांना ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशी दिली. जबानी व न्यायालयात झाल्याप्रकाराची सगळी जबाबदारी खुदिराम बोसांनी घेतली. अत्यंत शांतपणे वंदे मातरम्चा घोष करत ते फासावरती गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 २७ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५८ साली उत्तर
कोकणवर स्वारी केली. तेव्हा पोर्तुगिजांच्या चौल आणि दमण ठाण्यांना मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१ साली दक्षिण कोकणवर स्वारी केली. त्यावेळी त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीपर्यंत आले. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा पराभव केल्यावर त्याचे अभिनंदन पोर्तुगिजांनी दिनांक २७ एप्रिल १६६३ च्या पत्राने केले. ही वेळपावेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे डिचोली आणि साखळी हे दोन प्रांत जिंकून घेतले, तेव्हा पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/_1LMx4pYPpo?feature=share
📜 २७ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखान किल्ले रोहिडा जवळ पोहचला. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ तारखेस, म्हणजेच दि.२७एप्रिल इ.स.१६६५ दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)
राजापुरकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद !
"छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार आपल्या हातात घेऊन राजपदवीही घेतली आहे. सुभेदार, हवालदार इ. आधिकारी लोकांना त्याने आपल्याकडे बोलावले. कित्येकांना कैद केले. कित्येकांना कामावरून दुर केले. छत्रपती संभाजी महाराजांचा नवा सुभेदार येथे आला. तेव्हा त्याला आम्ही जाऊन भेटलो. तेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने व स्नेहाने आमची भेट घेतली"."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)
छत्रपती संभाजी महाराजांचे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आणि अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे अटकेत!
स्वराज्याचे वारसदार युवराज शंभुराजे यांना पकडण्यासाठी किल्ले रायगडला झालेल्या कटाचा सुगावा युवराज शंभुराजे यांना लागलेला होता. आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी शंभुराजे यांनी योग्य ती पावले टाकली. राजापुरास माणसे पाठवून धनधान्यांची तजवीज केली. रावजी पंडित यांस बोलावून कारवारच्या सर्व सुभेदारांना आर्थिक आय व्यय देण्यासाठी बोलावले संपूर्ण कारभार आपल्याच हाती घेऊन राजपदवी घेतली. सुभेदार, हवालदार, लष्करी अधिकारी व दस्तुरखुद्द सरलष्कर शंभुराजेंच्या बाजूने असल्याने शंभुराजेंनी बिनघोर पावले उचलली. याच सुमारास अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी जासुदांना पन्हाळ्याच्या आधिकारी यांना देण्यासाठी पत्रे पाठविली त्यांना आजच्या दिवशी अटक करण्यात आली. पुढे मात्र सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडून दस्तुरखुद्द अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना अटक केली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१६८३
गोव्याचा विजरई कोंट द आल्चोर सालसेट प्रांतातील सचोल या ठिकाणी गेला. तेथे त्याचे वास्तव्य २ महिने होते. जुन महिण्यात पाऊस सुरू झाला. पाऊस इतका पडला की, समुद्राप्रमाणे शेते भरून गेली. बाहेरून अन्नपुरवठा बंद पडला. लोक उपाशी मरू लागले. इ.स.१६८१ मध्ये कोंद दी आल्वोर हा गोव्याचे विजरईपदी विराजमान झाला. त्यावेळी गोव्यात पटकीची साथ होती. इ.स.१६८२ ला अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडला. आणि इ.स.१६८३ मध्ये त्याने आपल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण ओढवून घेतले. कोंट द आल्वोर हा अतिशय शूर योद्धा होता. स्पेनमधील अनेक लढ्यांत आघाडीवर होता. त्यास युद्ध मोहिमांचा चांगला अनुभव होता. गोव्यात हजर होण्यापूर्वी तो अंगोल्याचा गव्हर्नर होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१८५८
वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य
क्रिश्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागवून घेतली. नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज २७ एप्रिल १८५८ रोजी बामनपेट येथे बाबुराव सेडमाकेच्या सैन्याशी भिडली. दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली. परंतु ह्या खेपेससुद्धा बाबुरावच्या सैन्याने कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ एप्रिल इ.स.१९०९
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांची जयंती
अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी श्री. तुकडोजी महाराजांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️||हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 २६ एप्रिल इ.स.१६७५
मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला. फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. ३ हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/kYim2jy-SAA?feature=share
📜 २६ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)
संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला.
छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर अंमल बसवून आपले सुभेदार रावजी पंडितांकरवी हुकूम जारी केला की, सर्वांनी किल्ले पन्हाळ्यास येऊनहिशेब द्यावेत. किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ एप्रिल इ.स.१६८४
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार शनिवार)
छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी.
१६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;-
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा.
त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले.
✍️
"वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्यता पाठवली.
तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच, तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे.
आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे, दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.
कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे.
तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत.
तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो, अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते✍️
➡️वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
➡️मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.
करार / तहातील प्रमुख अटी:
१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी
२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.
३) बालकामगार
४) आयात व निर्यात यावर जकात.
५) धर्मांतर बंदी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ एप्रिल इ.स.१६८५
अहमदनगरहून प्रयाण!
औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ एप्रिल इ.स.१७४०
२० एप्रिल रोजी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची तब्येत अतिशय बिघडली. दि. २३ एप्रिलपासून रावेरखेडी व आसपास अनेक दाने व धर्मकृत्ये।करण्यास सुरुवात केली होती. दि. २६ एप्रिल रोजी काशिबाई (बाजीराव पेशव्यांच्या पत्नी) आपले पुत्र जनार्दन आणि महादजीपंत पुरंदांसोबत रावेरखेडीला पोहोचल्या. याच दिवशी पहाटे बाजीराव बेशुद्धावस्थेत गेले. काशिबाईंना तर आपल्या पराक्रमी पतीला असे अंथरूणावर पाहून बळच
गेल्यागत झाले. त्यांनी जवळच्याच रामेश्वराच्या मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी बसायला सांगितले. अहोरात्र मृत्युंजयाचा घोष चालू होता. परंतु, त्याने बाजीरावांच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ एप्रिल इ.स.१७५१
छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी राजसबाइंचे निधन
राजाराम महाराजांना जानकीबाई,ताराबाई,राजसबाई व अहल्याबाई अशा चार भार्या होत्या.राजसबाई हि कागलकर घाटगे घराण्यातील असून छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर इ.स.१६८७ साली तिचा आपले धाकटे बंधू राजाराम यांजबरोबर विवाह लावून दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २५ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखानाची तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली. मिर्झाराजे जयसिंग यांनी दाऊदखानाच्या नेतृत्त्वाखाली सुमारे ७ हजार स्वार महाराजांचा मुलूख ताराज करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. या तुकडीत दाऊदखानाच्या मदतीला राजा रायसिंह, सर्झाखान, अमरसिंह चंद्रावर, मुहम्मद सालीहर्तखान, सय्यिद झैनुल आबीदीन बुखारी, अचलसिंह कछवाह व स्वतःचे चारशे स्वार मिर्झाराजे जयसिंग यांनी दिले. ही तुकडी रवाना करण्यात मिर्झाराजे जयसिंग यांचा "तिहेरी" उद्देश होता. पहिला , " उद्देश म्हणजे, आदिलशहा महाराजांना दाखवून द्यायचे होते की, मोगली सैन्य केवळ एकाच वेढ्यात गुंतून राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी सुसज्ज आहे". दुसरा" उद्देश म्हणजे, आजवर महाराजांची सैन्ये बादशाही मुलखात घुसून उच्छाद मांडीत असत. आता मोगली सैन्ये त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते. असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्याची जमवाजमव करू शकणार नाहीत हे उघड होते". "आणि तिसरा उद्देश म्हणजे, या निमित्ताने दाऊदखानाला वेगळी कामगिरी देऊन न दुखावता किल्ले पुरंदर वेढ्याबाहेर काढता येत होते". मिर्झाराजे जयसिंग यांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले. दाऊदखानाची ही तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली,
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/WybtVr01svs?feature=share
📜 २५ एप्रिल इ.स.१६७४
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती.
आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.
त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.
२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला ११.७५ ग्रामचा होता)
१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.
१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.
असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ एप्रिल इ.स.१६८९
स्वराज्याचे दूसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करुन ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसूबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणुन बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी पाठविलेले पत्र. (दि.२५ एप्रिल १६८९)
खान बहादुर-हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा-
या वेळी (बादशहाचा) हुकुम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहचला आहे आणि (तेथून) पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरुर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरीत खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होतील. म्हणुन इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू (रामराजाला) अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावे. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहचवावी म्हणजे हल्ला करुन त्याला कैद केले जाईल.
जर खबर पोहचविण्यात कुचराई करशील व शत्रु तुमच्या हद्दीतुन निघुन जाईल तर ते चांगले नाही. अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करु नये व सक्त ताकिद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य परायणता जाण. (समासात) दिरंगाई करु नकोस.
तारीख १४ रजब, (जुलूस) सन ३२
स्वतःच्या वकीलाला त्वरित पाठवा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ एप्रिल इ.स.१६९३
संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.
२५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि, " अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत.
अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत
आहेत."
ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये."
अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले. मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/WybtVr01svs?feature=share
📜 २५ एप्रिल इ.स.१८०९
कुप्रसिद्ध “अमृतसर संधी”
१८०७ मध्ये त्यांनी सतलज पार केले. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना ही महत्वाची शहरे देखील याच काळात जिंकून घेतली. रणजितसिंग यांची ही विजयपताका बाकीच्या लहान शीख संस्थानिकांना पाहवेना.
त्यांच्याबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली आणि म्हणूनच सतलज पार करून तेथील गावे जिंकल्यानंतर तिथल्या स्थानिक शीख संस्थानिकांनी रणजितसिंग विरुद्ध इंग्रजांकडे मदत मागितली. त्यानुसार इंग्रजांनी रणजितसिंग यांच्याकडे संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
महाराजाला हा प्रस्ताव अर्थात मान्य नव्हता मात्र इंग्रजांचा दबाव वाढत चालल्याने २५ एप्रिल १८०९ ची कुप्रसिद्ध “ अमृतसर संधी” झाली पण जरी संधी झाली तरी रणजितसिंग यांचा विजय वारू रोखण्यास त्यावेळी कोणीही समर्थ नव्हते. १८०९ साली जेव्हा “कांगडा” प्रांतावर अमरसिंह थापा या शीख संस्थानिकाने हल्ला केला तेव्हा तेथील शासक संसारचंद्र याने रणजितसिंग याची मदत घेतली.
परिणामस्वरूप कांगडा शत्रूमुक्त झाला आणि त्यावर रणजितसिंग याचं वर्चस्व देखील प्रस्थापित झालं.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ एप्रिल इ.स.१८१८
इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला डागले तोफगोळे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
२४ एप्रिल इ. स. १६६६
(चैत्र अमावास्या, शके १५८८, संवत्सर पराभव, वार मंगळवार)
रुस्तम-ए जमानने महाराजांचे डिचोलीचे ठाणे घेतले.
रुस्तम-ए-जमानने हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांचे डिचोलीचे ठाणे जे संकलेश्वर या नावाने ओळखले जात होते ते घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/PtKaeTGM3hQ?feature=share
📜 २४ एप्रिल इ.स.१६६७
व्यंकोजीराजे व दीपाराजे सर्व लवाजम्यासह जिजाऊमाता शिवराय व शंभूराजे यांचे भेटीसाठी रायगडावर आले. सुमारे दोन महीने महाराष्ट्रात राहून, स्वराज्याचा अभ्यास करून राजनीतीचे अनेक दाखले ऐकून व्यंकोजी राजे परत निघाले. शिवाजीराजांनी त्यांना थोरल्या महाराजांनी घालून दिलेल्या वाटेचाच अवलंब करावा हे सांगितले. आम्ही उत्तरेपर्यंत जाऊन आलो तुम्ही दक्षिण पुर्ण सांभाळावे, स्वतंत्र राजे व्हा. आपण दोघे मिळून भारताला समतेचे शिवराज्य देऊ. जिजाऊ व शिवरायांचे दर्शन घेऊन व्यंकोजी राजे मार्गस्थ झाले होते. आदिलशहा व कुतुबशहा यांना मोगलांपासून दूर ठेवण्यात व्यंकोजी राजांनी दाखविलेले राजनैतिक कौशल्याबाबत महाराजांनी त्यांचा विशेष गौरव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१६७४
( चैत्र वद्य चतुर्दशी, शके १५९६, संवत्सर आंनद, शुक्रवार )
किल्ले केंजळगड स्वराज्यात दाखल :-
राज्याभिषेकासारखा मंगल विधी जवळ येऊन ठेपला तरी महाराजांची कार्यव्यग्रता व मानसीक ताण जराही कमी झालेला नव्हता दि २४ फेब्रुवारी १६७४ रोजी सरनोबत प्रतापराव गुजर मारले गेले या प्रसंगाने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरत नाही तोच २० मार्चच्या सुमारास महाराजांची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू झाला...
त्यानंतर राजे लष्कर पाहणीसाठी व सरनोबत नियुक्तीसाठी चिपळूणला आले लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकास खजीना फोडून महाराजांनी वाटणी केली याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या नव्या नेमणुका करून टाकल्या सरनोबताची वस्त्रे हंसाजी मोहिते यांना दिली...
चिपळूनला राजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता याचं काळात मराठ्यांनी सुलतानढवा करून वाईजवळील केळंजा किल्ला जिंकून घेतला किल्ल्यावर गंगाजी विश्वासराऊ नाईकवाडी कीरदत हा नाईक होता मराठ्यांचा अकस्मात आलेल्या हल्ल्याला त्याने हिमतीने तोंड दिले चार मराठ्यांना त्याने ठार केले पण पण अखेर गंगाजीही पडला केळंजा स्वराज्यात दाखल झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१६८३
(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार मंगळवार)
कल्याण भिवंडीला छत्रपती संभाजी महाराजांचा एल्गार !
रणमस्तखान, राहुल्लाखान या नामांकित मोगली सरदारांनी सर्व शक्तीनिशी कल्याण-भिवंडी ताब्यात घेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. कारण त्याकाळात कल्याण-भिवंडी जलमार्गे वाहतूक होत असल्या कारणाने हे बंदर फार महत्त्वाचे होते! शिवाय कल्याण-भिवंडी ही स्वराज्याची एक संपर्क रेषा असल्याने कल्याण-भिवंडी एक अत्यंत महत्त्वाचे ठाणे होते. त्यामुळे ज्यावेळी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांना कळले, त्यावेळी खाशा फौजेसह महाराज चालून गेले. अन् राहुल्लाखान आणि रणमस्तखान यांना गनिमी काव्याचा असा काही तगडा झटका दिला की, मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे मोगली सैन्याचा टिकाव लागेनासा झाला. शेवटी रहुल्लाखान व रणमस्तखान दोघांनाही माघार घ्यावी लागली. सुरतकरांनी लंडनला लिहीलेल्या पत्रातून "औरंगजेब बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकाराला आणि त्यांच्या फौजेच्या पराभवाला संतापून भिवंडीची सेना काढून घेतली" असा उल्लेख आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडविले आणि तडफेने औरंगजेब बादशहाची कल्याण-भिवंडी मोहीम बंद केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१६८३
(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार मंगळवार)
सुरतकर इंग्रजांनी लंडनला लिहीलेल्या पत्राची नोंद!
या पत्रातून औरंगजेब बादशहाने भिवंडीची सेना काढून घेतली असा उल्लेख सापडतो. अशा तऱ्हेने कल्याण-भिवंडीच्या मोहीमेत छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडविले आणि ही मोहीम चुरगाळून टाकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७००
छत्रपती राजाराम महाराज निवर्तल्यावर परशुरामपंताने व सुभानजी भांडवलकर या सातारा किल्लेदारांनी अजिंक्यतारा किल्ला लढवला पण नाईलाजाने मोगलांशी तहाची वाटाघाटी केली. शहाजाद्याच्या साहाय्याने या वाटाघाटीस औरंग्याने मान्यता दिली व किल्ल्यावरील लोक उतरून किल्ला मोगलांचे हवाली केला. किल्ल्याचे नाव २४ एप्रिल १७०० रोजी अजमतारा असे ठेवण्यात आले. छत्रसाल राठोड तेथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगड ताब्यात आल्यानंतर किल्ल्याचे बक्षीदाबक्ष असे नामकरण करून २४ एप्रिल रोजी औरंगजेब बादशाह सिंहगड च्या असमनतातून पुढील पावसाळ्या साठी पुण्याकडे रवाना झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७०५
(वैशाख शुद्ध सप्तमी, वार गुरुवार, ११, मोहरम सन म्हणजे सन ४५, औरंगजेबास जुलूस ४९)
शंभुराज्ञी येसुबाईसाहेब यांनी अहमदनगरच्या छावणीत कैदेत असताना चिंचवडचे देव यांना लिहिलेल्या पत्राची नोंद. अहमदनगरच्या छावणीत असताना शंभुराज्ञी महाराणी येसुबाईसाहेब यांना बरोबरच्या सर्वांचा खर्च भागविणे कठीण पडू लागले. औरंगजेब बादशहाला या गोष्टी सांगणे व भीक मागणे हे महाराणी येसुबाईसाहेब यांना पसंत पडले नसावे म्हणून महाराणी येसुबाईसाहेब यांनी चिंचवडचे देव यांचेकडे पैशाची मागणी केली. त्या पत्रात त्या लिहीतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७३९
"वसईचा पाठीराखा... जंजिरे धारावी"
साष्टीचे उत्तर टोक म्हणजे धारावी. वसई किल्याच्या समोरील खाडीच्या दुसर्या तीरावरील लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणजे धारावी. मराठा सरदार धारावीचे लष्करी महत्व किती जाणत होते ते त्यांनी चिमाजीअप्पांना लिहिलेल्या पत्रांतून स्पष्ट होते. पत्रांतील मजकूर पुढीलप्रमाणे - "धारावी समुद्रामुळें व बंदरामुळें दुसरा जंजिराच! शिवाय दाणागल्ला तेथून चांगला लवकर वसईस पोचवितां येतो. शिजले अन्न निवलें नाही तोंच तेथे पोचवितां येतें." "सर्वांच्या विचारें, धारावीस ठाणे बसवून खाडी बंद होते तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील." "धारावीची बंदिस्त म्हणजे बंदोबस्त पाथरवट आणून चहुबुरूजी आधीं सत्वर बांधवावी मग पुढें मोठा कोट बांधवावा तेंव्हाच कार्यास येईल." - शंकराजीपंत फडके.
"धारावीवर मोर्चा हजार माणसांचा ठेवून वसईवर इभ्रत पाडावी." - बरवाजी तापकीर
मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजीअप्पांच्या फौजेने त्वरीत १७३७ च्या मध्यात "धारावी" हे ठाणे हस्तगत केले.
१९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर २२ फेब्रुवारी १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर २६ फेब्रुवारी १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला २७ फेब्रुवारी १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.
३ मार्च १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते. २४ एप्रिल १७३९ रोजी कौल घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करली. पोर्तुगीजांचा एकूण एक सैनिक जखमी झाला होता. मुख्य अधिकार्यांपैकी मार्टिन आणि अल्फेरिस एस्तव्हो मार्टिन्स हे दोन अधिकारी ठार झाले.
अशा रीतीने धारावी २४ एप्रिल १७३९ काबीज झाली. वसईची चावी हातात आल्यानंतर लगेचच उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांची जणू राजधानी वसई मराठ्यांनी काबीज करून पोर्तुगीज सत्ता उत्तर फिरंगाणातून उखडून काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२४ एप्रिल इ.स.१७५२
मोगल बादशहाने कन्होज येथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह
या तहा मुळेच पानिपतचा महासंग्राम झाला, मराठा आणि अफगाण यांच्यात युद्ध झालं. वास्तविक मराठा आणि अफगाण ह्यांच्यात वैर नव्हतं, मराठी साम्राज्याच्या व अफगाणी साम्राज्य एकमेकांपासून कोसोदूर, मग ह्यांच्यात युद्ध का झालं;
कारण दि. २४ एप्रिल १७५२ रोजी, तत्कालीन मोगल
बादशहा याने, कन्होजयेथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह केला, त्याबदल्यात मोगल बादशहाने मराठ्यांना खालील गोष्टी दिल्या होत्या :
(१) ५० लक्ष असरफिया दरवर्षी,
(२) अजमेर व आग्रा ही दोन शहर महसूल म्हणून दिले,
(३) सगळ्या मोगल प्रांतावर चौथाई दिली.
म्हणून अफगाणांचा पाडाव करण्यासाठी आणि "राष्ट्राच्या सौरक्षणासाठी" मराठयांनी अब्दालीशी युद्ध केलं होतं.
🚩 अहमदशहा अब्दालीला भारतात कोणी बोलविले ?
मराठ्यांच वाढतं वर्चस्व पाहून, भारतीय उपखंडा तील रोहिलाखंडाचे शासक 'नजीबखान', जयपूरचा राजा माधवसिंह, ह्यांनी दिल्लीची ५ व्यांदा लूट करण्यासाठी, परिणामी मराठ्यांचाही पाडाव होईल, हे इच्छुन अब्दालीला भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
🚩 अब्दालीचे दिल्लीवर स्वारी करण्याचे प्रमुख कारण : -
सन १७५८ पर्यंत , स्वराज्याच्या सीमा ह्या उत्तरेकडे, अटक, लाहोर, मुलतान, आणि पेशावरला पोहोचल्या. जवळच अब्दालीच्या राज्याच्या सीमा होत्या, एकप्रकारे भविष्यात अहमदशहाला आव्हानच होते, त्यामुळेच अब्दालीने दिल्लीवर स्वारी करून मराठ्यांवर मात करण्याचे ठरविले असेल.
🚩 अब्दालीचा काबूल ते हिंदुस्थान प्रवास : -
काबूल - जालनाबाद - पेशावर - लाहोर - पंजाब - अनुप शहर.
जुलै १७६० रोजी, अहमदशहा अब्दाली उत्तरप्रदेशातील
अनुप शहराजवळ पोहचले. अब्दाली कडे एक मोठं लष्कर होतं आणि प्रभावी तोफखाना होता.
🚩 मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास : -
काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी, पेशव्यांनी (नानासाहेबांनी), एक मोहीम आखली, आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं . दि. ७ मार्च १७६० ला, सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह, फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या सौरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं.
🚩 मराठ्यांची पडती बाजू : -
मराठ्यांच्या लवाजम्यात, ५० हजार इतर लोकं म्हणजे सैन्याचा कुटुंबकबिला, बाजार-बुंदगे होते. मराठयांनी रसद पुरेशी बरोबर घेतली नव्हती, मोहीम खर्चासाठी २० लाखाची गरज होती आणि बरोबर फक्त ६ लाखच घेतले होते. उदगीर ते दिल्ली जवळपास १००० मैल होते आणि आहे.
🚩 मराठ्यांचे प्रमुख सरदार : -
या नवीन मोहिमेसाठी, नेतृत्व तर सदाशिवरावभाऊंकडे होते आणि या मोहिमेचा संपूर्ण कारभार नानासाहेब पेशव्यांनी, आपला पुत्र विश्वासरावास दिला होता.
(१) मल्हारराव होळकर
(२) सुरजमल जाट
(३) विठ्ठल शिंदे
(४) इब्राहिम गारदी (मराठ्यांचा तोफप्रमुख)
(५) समशेर बहाद्दर
(६) अंताजी माणकेश्वर
(७) यशवंतराव पवार
दि. २ जून १७६० रोजी, मराठे ग्वालीयरला
पोहोचले. पुढे मराठे धवळपुरा, मथुरा असे अंतर पार
करत, मराठे दिल्लीला पोहोचले. गारद्यांच्या तोफांमूळे
दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली. दिल्ली
सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला;
परंतु नजीबखान अब्दालीचे सांत्वन करत होता. या मध्ये
नजीबखान एक गोष्ट करत होता, अब्दालीविरुद्ध मराठ्यांना कोणीही चांगला शासक न मिळून देणे. त्यावेळीएक शासक असा होता, शुजाउद्दोला. हा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची स्थिती मजबूत होईल, सैन्यबळ व रसद वाढेल. दोन्ही पक्षांनी आपापले प्रयत्न सुरू केले ,परंतु यश मात्र नजीबखानामुळे अब्दालीस मिळाले, शुजाउद्दोला अब्दालीस जाऊन मिळाला.
🚩 अगर नजीबखान न होता, तो पानिपत न होता |
मराठ्यांना आर्थिक चणचण भासू लागली, तेव्हा दिल्ली मधील, दिवाण-ए-खास ह्या दरबारातील छता वर लावलेली चांदी, भाऊंनी काढावयास सांगितली, व त्याची नाणी पाडली, त्यातून काही दिवस खर्च भागला.
१ सप्टेंबर १७६०ला, सदाशिवरावभाऊंनी
नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात,
"माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत,
कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत
आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी".
दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहाअब्दाली, नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं. अब्दाली आपल्या सैन्यासह, यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता, तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते.
🚩 कुंजपुऱ्यावरील अधिपत्य :-
ऑक्टोबर १७६० मध्ये, मराठ्यांनी कुंजपुरा लुटले, कुंजपुरा मध्ये १५ हजार अफगाण होते, १६ ऑक्टोबर ला मराठ्यांनी कुंजपुराला वेढा घातला. इब्राहिम खानाने, कुंजपुरावर तोफांचा मारा केला. दुसऱ्याच दिवशी युद्ध झालं, मराठयांनी ८ हजार अफगाण कापले काहीच अवधीत उर्वरीत ४ हजार अफगाण तोंडात गवत घालून बाहेर आले. समादखान, कुतुबशहा हे कुंजपुऱ्याच्या किल्ल्यात मराठ्यांना सापडले, यांनी जसं सरदार दत्ताजी शिंदे यांना जसं मारलं होतं, तसंच महादजींनी त्यांना ठार मारले. कुंजपुरा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आल्यामुळे, मराठ्यांना धन मिळाले आणि १० हजार खिंडी गहू व उपयुक्त खाण्याचेसामान मिळाले आणि दारूगोळाही मिळाला; यामुळे मराठ्यांची खाण्याची अबाल टळली. पुढे मराठे कुरुक्षेत्रावर गेले. कुरूक्षेत्राकडे जाण्यापूर्वी कुंजपुरा, हा गोविंदपंत बुंदेले यांच्या ताब्यात दिला होता.
🚩 यमुनेचा पूर आणि अब्दालीची प्रबळ महत्वकांक्षा : -
अब्दाली सर्व सैन्यासह, दि. २३ ऑक्टोबर
१७६० रोजी, रात्री यमुनेच्या किनाऱ्यावर पोहचला.
दुसऱ्या बाजूस भाऊंनी ३ हजाराची फौज ठेवली होती.
यमुनेचं पाणी खूप अधिक प्रमाणात होत, दि. २७ ऑक्टोबरला अब्दालीने अगदी सहज यमुना नदी, त्याच्या सर्व सैन्यासह पार केली. भाऊंना ही खबर, हेरांनी लगेचच कळविली, इतक्या कमी वेळेत अब्दाली नदी पार करेल हे भाऊंनी ठरविलच नव्हतं, "आता अब्दाली भाऊ आणि दिल्ली यांच्यामध्ये येऊन, सैन्यासह थांबला". पुढे भाऊ लवकरात लवकर दिल्लीकडे यावयास निघाले. पुढे भाऊ, आपल्या फौझेसह पानिपता जवळ आले. (यमुना नदी अब्दालीने गुलाबसिंग गुजर या स्थानिक मनुष्याच्या मदतीने ओलांडली.)
🚩 पानिपत : -
नोव्हेंबर १७६० ला दोन्ही पक्ष पानिपतच्या विस्तीर्ण रणांगणात आले होते. मराठयांनी आपल्या बाजुने १० फूट खोल खंदक तयार केले आणि माचे बांधले. दोन्ही पक्ष एकच काम करत होते, एकमेकांची रसद तोडत होते. मेरठमध्ये, गोविंदपंत बुंदेलेंच्या सेनेने अब्दालीची रसद मारायला सुरुवात केली, हा आदेश भाऊंनीच दिलेला होता ! अब्दालीने अताईखानास , कुंजपुरावर चालून गेला, कुंजपुरा ताब्यात घेतला आणि नंतर मेरठ जवळील एका गावात जेतसिंह गुजरांच्या (ह्याने पंतांस सांगितले , की मी तुम्हांस खंडणी देतो, त्यामुळे पंत थांबले, गुजरने अताईखानास ही बातमी पाठविली, अताईखान गोविंदपंतांवर चालून आला) फितूरीमुळे गोविंदपंत बुंदेले याना खानाने पकडले, खानाने पंतांची अमानुष हत्या केली. कुंजपुरा ताब्यात घेऊन, अब्दालीने मराठ्यांची रसद तोडली. आता नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये मराठ्यांच्या छावणीत भुखमरी झाली, लोकं मरायला लागली. हजारोंच्या संख्येत माणसं व जनावर मेली, बिमारी निर्माण झाली. जानेवारी महिना उगविला, ३ दिवसातून एकदाच जेवण मिळत असे. आलासिंग जाट, पटीयाला संस्थानाचा प्रमुख हा मराठ्यांना रसद पाठवीत असे. अब्दालीला रसद ही रोहिलखंड व अवध या प्रदेशातून येत होती. (अताईखानाने गोविंदपंतांच शीर कलम केलं, आणि अब्दालीकडे पाठविले, पुढे अब्दालीने ते शीर सदाशिवभाऊंकडे पाठविले व एक पत्र पाठवून दिले, त्या पत्रात अब्दाली म्हणतो, "तुमचं स्वागत करण्यासाठी हा वरती
गेला आहे , तुम्हालाही तेथेच जायचं आहे". हा प्रसंग, २० डिसेंबर १७६० रोजी घडला. नंतर भाऊंनी, पंतांच्या मस्तकावर व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार केले.)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७८८
हा नजीब उदौल्याचा पुत्र झाबिताखान याचा मुलगा. शिद्यांच्या व यांच्यामधील हाडवैर वंशपरंपरेने चालत आलेलें होते. जोपर्यंत महादजी शिद्यांची सरशी होत होती, तोपर्यंत हा मुकाट्यानें बसला, पण सन १७८७ साली जयपूर प्रकरणांत महादजीचा मोड झालेला पाहतांच यानें प्रथम दिल्लीला येऊन तेथील मराठ्यांच्या शिबंदीस हांकून लाविले व तिच्या जागी आपले लोक ठेविले. मग त्यानें अलीगडास येऊन किल्ल्यास वेढा देऊन तो हस्तगत केला. नंतर तो आग्य्राला इस्मायल वेगच्या मदतीस गेला (१७८८). ता. २४ एप्रिल रोजी जाटाच्या व शिद्यांच्या सैन्याचा इस्मायल बेग व गुलामकदर यांनी भरतपूरजवळ पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१८१८
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश, त्या आधी दोनच दिवस म्हणजे २२ एप्रिल १८१८ त्याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २३ एप्रिल इ.स.१६५७
महाराजांची स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवात
आदिलशाहाच्या ताब्यातील एकेक प्रदेश अतिशय झापाट्याने काबिज करून घेतला पण महाराजांनी आणखी एक डाव टाकला तो म्हणजे,
आदिलशाहीच्या जिंकलेल्या मुलुखाला मान्यता मिळवण्यासाठी आपल्या वकीलाला, सोनोपंत डबीर या शहाजीराजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी वकीलाला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण महाराजांनी मुलुख तर जिंकला होता आदिलशाहाचा, आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची !
बिचार्याच औरंगजेबाला वाटले, शिवाजीराजे आपल्याशी लढण्याआधीच आपल्याला वचकून राहतायेत, त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले,
“… सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले, जो मुलुख तुम्हांकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तूमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे…”
हे पत्र होते दि.२३ एप्रिल १६५७ चे पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे.
सोनोपंतांनी औरंगजेबाला गोड बोलून झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोंगलांच्या ‘आतल्या’ बातम्या काढून आणल्या आणि बरोबर एका आठवड्यानंतर दि. ३० एप्रिल १६५७ रोजी महाराजांनी आपल्यासोबत पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन मोंगलांचे एक अतिशय महत्त्वाचे ठाणे, पेठ जुन्नर इथे छापा टाकला व लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/-Ifk-YVwvl4?feature=share
📜 २३ एप्रिल इ.स.१६५७
(वैशाख वद्य षष्ठी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)
महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफखानास पत्र !
औरंगजेबाचे शिवाजीराजांना मेहेरबानीचे पत्र
शिर्षक वाचुन कदाचित आश्चर्य वाटले असेल परंतु, असे खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल.
अगदी लहान वयातच शिवाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याद्रुष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. हळुहळु काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकुन घेतले. इस १६३६ मधे मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर, कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात शिवाजीराजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढुन जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या १६३६ च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व शिवाजीराजांनी ते स्वराज्यात आणले याचे कारण नेमके समजत नाही पण बादशहा शहाजहानचे दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आदिलशहाने तह न पाळणे या दोन गोष्टी संभवतात. इस १६५२-५३ मधे शहाजहानने शाहजादा औरंगजेबाला दुसर्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणुन पाठवले. नोव्हेंबर १६५६ मधे विजापुरचा मोहंमद आदिलशहा वारला त्यावेळी आदिलशाहीत अंतर्गत कलह चालु होता. सत्तेवर कोणाला बसवायचा यावरून मारामारी सुरु होती. औरंगजेबचे लक्ष आदिलशाहीकडे वळाले. त्यानुसार त्याने शहाजहानच्या परवानगीने युद्ध आरंभले व आदिलशहाच्या ताब्यातील बीदरचा किल्ला जिंकला.
त्याच सुमारास शिवाजीराजांनी नगरचा मुघल अधिकारी मुल्तफतखान याला पत्र लिहिले की, 'माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मी शाही फौजेत (मुघलांच्या) दाखल होयला तयार आहे'
त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यावर शिवाजीराजांनी औरंजेबाकडे आपले वकील सोनोपंत डबीर पाठवले व आपलै म्हणणे मांडले ते असे "विजापुरकरांकडील जो मुलुख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी"
या वेळेपर्यंत 'शिवाजी' म्हणजे काय पाणी आहे हे औरंगजेबाला बहुदा नीटसे माहीत नव्हते. म्हणुनच त्याने ही वरची महाराजांची 'मागणी' मान्य केली व तसे मान्यतादर्शक व मेहेरबानीचे पत्र २३ एप्रिल १६५७ रोजी महाराजांना पाठवले त्यात तो लिहितो "......सांप्रत जे किल्ले व मुलुख (आदिलशहाचा) तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलुखाचा महसूल तुम्हास दिला असे." म्हणजे बघा, मुलुख कोणाचा तर आदिलशहाच्या ताब्यातील , जिंकला कोणी तर शिवाजीराजांनी आणि त्याची मान्यता घेतली औरंगजेबाकडून म्हणजेच मुघलांकडुन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२३ एप्रिल इ.स.१६८३
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार सोमवार)
सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना प पत्राची नोंद!
"मोगल पातशहा अजून औरंगाबादेतच आहे. सुलतान अकबर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पाठविलेली सेनादले काढून घेतली आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाची फजिती अवघ्या काही वर्षांतच कशाप्रकारे केली होती याचे दर्शन होते. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचेच छावे कसे होते याचे यथार्थ दर्शन या सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून होते. वरील पत्रावरून मराठे सैन्य औरंगजेब बादशहाशी किती निकराने सामना देत होते. आणि औरंगजेब बादशहास निर्विवाद विजय कसा प्राप्त होत नव्हता हे सिद्ध होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २३ एप्रिल इ.स.१६९४
छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला इ.१६९४ एप्रिल २३ काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगांव या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देगांवच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २३ एप्रिल इ.स.१७५२
मोगल बादशहा आलमगीर याचे मराठ्यांस प्रथम मुखत्यारपत्र
मराठे व दिल्लीकर बादशाह यांच्यात कनोज मुक्कामी बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण मराठ्यांनी करण्यासंबंधी अहदनामा ( करार ) झाला.
या "अहदनामा" नामक तहान्वये -
१) अब्दालीसारखा परकीय आक्रमक असो किंवा पठाण आणि रजपूत जाट असो, सर्व शत्रूपासून या डळमळीत साम्राज्याचं रक्षण करण्याच पेशव्यांनी मान्य केल आहे पेशवे बादशहाचा गेलेला मुलुख जिंकून त्याला परत करतील.
२) अब्दालीची हकालपट्टी करण्याकरता तीस लाख आणि इथल्या बंडखोरांच्या बदोबस्ताकरता वीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये पेशव्यांना मिळावेत.
३) पंजाब आणि सिंधची चौथाई (यात सियालकोट, पसरूर, गुजरात आणि अब्दालीला दिलेलं औरंगाबाद) तसंच हिसार, बदाऊं, संभळ आणि मुरादाबाद हे जिल्हे पेशव्यांना देण्याचं बादशहानं मान्य केलं आहे.
४) बादशहानं पेशव्यांची अजमेरची सुभेदारी (यात नारनौलची फौजदारी येते) आणिआग्र्याची सुभेदारी (यात मथुरेची फौजदारी येते) बहाल केली आहे. पेशव्यांनी तिथवसुली करून ह्या मुलुखातल्या असलेल्या हक्कांचा उपभोग घेणे आहे.
५) परंपरागत चालत असलेल्या चालीरीति आणि नियम सांभाळून ह्या मुलुखांचा कारभार पेशव्यांनी बघावा.
६) मोगल मनसबदारांप्रमाणे पेशव्यांच्या सरदारांनी दरबारात यावं आणि बादशहाच्या मोहिमांत भाग घ्यावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २३ एप्रिल इ.स.१८१८
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २२ एप्रिल इ.स.१६६७
महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले
“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे”
हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला - “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर”
अश्या प्रकारे छत्रपती संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले. औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर छत्रपती संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/JqikxGzTqcg?feature=share
📜 २२ एप्रिल इ.स.१६७५
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार)
भागानगरची लुट !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने गोवळकोंडा हद्दीतील भागानगर जवळील २, दोन संपन्न शहरे लुटून पुष्कळ संपत्ती मिळवली. त्याचबरोबर काही सावकारदेखील पकडून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे करण्यात आले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २२ एप्रिल इ.स.१७३७
मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला
पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २२ एप्रिल इ.स.१८१८
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २१ एप्रिल इ.स.१६५६
वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल!
१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्यांच्या तुर्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते –मुरारबाजी देशपांडे महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्यांकडे काम करायचे.शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/wxKFHWyAvnU?feature=share
📜 २१ एप्रिल इ.स.१६७२
बहामनी राज्याच्या पाच शाह्या झाल्यावर कुत्बशाहीची स्वतंत्र सल्तनत इ. स. १५१२त सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपादनास सुरूवात केली त्यावेळी अब्दुल्ला कुत्बशहा राज्य करीत होता. तो २१ एप्रिल १६७२ रोजी निवर्तला. त्याच्यानंतर अबुल हसन ऊर्फ तानाशहा कुत्बशहा झाला. त्याने इ. स. १६७५ च्या अखेरीस मुसाफरखानास दिवाण पदावरून दूर केले. त्यावेळी राज्याचा सर्व कारभार मादण्णाकडे आला. मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा यांनी कर्नाटकाची व्यवस्था लाविली. छत्रपती बशिवाजी महाराजांची भेट तानाशहाशी घडवून आणिली. हिंदू-मुसलमान धर्म भेदास गौणत्व देऊन जीवनात समरस झालेल्या सर्व दक्षिणियांस संघटित करण्याचे काम शिवाजी महाराज व तानाशहा यांनी घडवून आणिले. आदिलशाहीचा मोगल बळी घेऊ पाहताच छत्रपती संभाजी महाराजांनी शक्य ती मदत देऊन आदिलशाही मोगलांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ एप्रिल इ.स.१६८०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित होते. परंतु, छत्रपती संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच महाराणी सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक केला नाही!). याचवेळी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी यांनी छत्रपती संभाजीराजे पुन्हा बंड करू नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगडाकडे सैन्यासह कूच केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ एप्रिल इ.स.१७४३
सवाई जयसिंगानी आपले वचन बिनचूक पाळले. त्यांच्या सांगण्यावरून बादशहाने माळव्याच्या सुभेदारीच्या सनदा मराठ्यास देण्याचे ठरवून तारीख ७ सप्टेंबर १७४१ रोजी माळव्याचा संपूर्ण कारभार दिवाणी व फौजदारीसुद्धा पेशव्यांचे हवाली केल्याचे फर्मान बादशहाने काढिले. त्या फर्मानात बादशहाने माळव्याची सुभेदारी शहाजादा अहमद ह्याचे नांवे करून पेशव्यास त्याची नायब सुभेदारी देण्यात आली. ह्यासंबंधी बादशहा व पेशव्यांमध्ये जो करार झाला त्या करारास जामीन म्हणून राणोजी शिंदे, मल्हारराव
होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव यांजकडून बादशहाने तारीख २१ एप्रिल १७४३ रोजी कबुलायत लिहून घेतली. मराठ्यांना हे फर्मान मिळाल्यावर माळवा, बुंदेलखंड यातील लहान मोठ्या सत्ताधिशांचे पूर्वीचे बादशहाशी असलेले संबंध तुटून त्याची पुनर्घटना पुण्यास होऊ लागली. खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले. उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांची सत्ता स्थिरावण्यास माळव्याचा ताबा मराठ्यास मिळणे आवश्यक होते. ते मराठ्यांनी साधल्यामुळे इथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/wxKFHWyAvnU?feature=share
📜 २१ एप्रिल इ.स.१७५८
मराठा सरदार हरी रघुनाथ याने लिहीलेल्या पत्राची नोंद!
"मुक्काम ऐरावती (रावीतीर) नदीतीर, अब्दुस्समदखान सरहिंद होते, त्यांचे पारपत्य श्रीमंतांनी करून सरहिंद व दुआब दोनही तालुके आदिनाबेग मोगलांचे स्वाधीन खंडणी ठरवून केले. तद्नंतर जहानखान व अब्दालीचा पुत्र २० हजार फौजेनिशी लाहोरात होता. त्याजवर चालोन गेले. बिपाशा (व्यास) नदीतून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश रवाना केले. त्यांनी जाऊन गाठ घातली. घाबरा होऊन बुनगे, तोफखाना, फौज मागे टाकून सडा ३ हजार ते ४ हजार फौजेनिशी चिनाब नदी उतरून जीवन रक्षणासाठी पळाला. आपल्या फौजेने नदीपर्यंत पाठलाग करून फौज व तोफखाना लुटून घेतला. चिनाब नदीवर उपाय चालला नाही. म्हणून भगवंते रक्षीला. एरवी श्रीमंतांचा प्रताप विस्तार पावला. या प्रांती आपली सलाबत भारी पडली. दक्षीनी फौज पुर्वी दिल्लीपलीकडे आली नव्हती ते चिनाबपर्यंत पोहोचली.चिनाबेस पाणी थोडके असते तरी अटकेपर्यंत जाती. पुढे पुल बांधोन फौजा पाण्यास अडचण भारी पडेल. छावणी इकडे करावी लागेल. इतक्या दूर छावणी करिता नये. त्यात लोकही कष्टी करून लाहोर प्रांताचा बंदोबस्त करून श्रीमंत मागे फिरणार. यादिवशी भगवत्सत्ता प्रमाण".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #📜इतिहास शिवरायांचा













