सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १४ मार्च इ.स.१६४९ छत्रपती शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/p7Ojj7lwz2c 📜 १४ मार्च इ.स.१६६५ (चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार) महाराज किल्ले भिवगडावर मुक्कामी! शेरखानामुळे कारवारचे महाराजांचे संकट टळले. शेरखानाने इंग्रज व इतर व्यापारी यांना समजावून सामुदायिक खंडणी छत्रपती शिवाजी महाराजांना पेश केली. कारवारवरून महाराज सुमारे २५ कि. मी. अंतरावरील भिवगडास जाण्यास निघाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ मार्च इ.स.१७०७ महाराष्ट्र जिंकण्याची इच्छा अपुरी ठेवूनच औरंगजेब फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे मरण पावला. हि बातमी नुकतीच माळव्याच्या सुभेदारपदी नियुक्ती झालेल्या औरंगजेब पुत्र आज्जमशाह यास समजल्यावर तो ताबडतोब अह्मदनगरला आला व ईदचा मुहूर्त साधून १४ मार्च १७०७ ला त्याने आपणास मोगल सल्तनतीचा बादशाह म्हणून जाहीर केले. मोगलान मधील रिवाजाप्रमाणे, अन्य दावेदार भावंडांचा काटा काढल्याशिवाय निरंकुश राजसत्ता लाभत नसल्याने, आज्जमशहा आपला भाऊ शाहा आलम याचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ मार्च इ.स.१७६० अब्दालीने अजून काही हालचाली करायच्या आतच त्याला पायबंद घालावा म्हणून नानासाहेबांनी सदाशिवरावांना तसाच निरोप धाडला. यावेळेस सदाशिवरावभाऊ रघुनाथराव आणि विश्वासरावांसह पैठणच्या जवळ पूर्णा नदीच्या काठी पडदूर येथे होते. नानासाहेबांचा तातडीचा खलिता मिळाल्यावर पडदूर येथे सदाशिवरावांनी आपली फौज तयार केली व कोणी कोणते काम करायचे याच्या नेमणुका करून दिल्या. दि. ७ मार्च १७६० रोजी नानासाहेब पेशवे पडदूर येथे पोहोचले. लष्कराची वर्गवारी सुरू होती. उत्तरेत कोणी जावे, कोणी नाही याबाबत खल सुरू होते. शेवटी सदाशिवरावभाऊ, रघुनाथराव, समशेरबहाद्दर आणि खुद्द नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेत जावे असे ठरले. विश्वासरावांनी पुण्याला जाऊन दख्खन सांभाळावी. परंतु, विश्वासरावांना हे पटले नाही. लढाया आपण माराव्यात व परत विजयश्री खेचून माघारा जावे. आपण माघारी बसून तीर्थरूपांनी युद्धास जावे हे बरे नव्हे. शेवटी मोठ्या मुश्किलीने विश्वासरावांनी सदाशिवरावभाऊ आणि नानासाहेबांचे मन वळवले आणि दि. १४ मार्च १७६० रोजी मराठी फौजांनी पडदूरहून प्रस्थान ठेवले. पडदूरहून नानासाहेब पेशवे पुण्यात परत आले आणि सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वाखालील मराठी फौजा बुऱ्हाणपूरमार्गे हांडियाचा घाट ओलांडून भोपाळ-सिरोंज-नरवरच्या घाटाने ग्वाल्हेर- घौलपूर-मथुरा करत जुलैच्या अखेरीस दिल्लीत पोहोचल्या. दिल्लीत थोडी झटापट झाली. दि. २ ऑगस्ट १७६० या दिवशी दिल्ली काबीज झाली. https://youtu.be/p7Ojj7lwz2c 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ मार्च इ.स.१८१८ घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - SIDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil |     THECREAT VARAAWAARK Keg शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patill मार्च इ.स. १६४९ १४ छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat maratha warriors SIDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil |     THECREAT VARAAWAARK Keg शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patill मार्च इ.स. १६४९ १४ छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the qreat maratha warriors - ShareChat
💐🙏🚩 #🚩🙏🙏 आईसाहेब तुळजाभवानी देवी तुळजापूर 🙏🙏🚩 #🙏तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री तुळजा भवानी देवी🙏 #🚩आई तुळजा भवानी तुळजापूर 🚩 #✨🚩तुळजापूर भवानी माता🚩✨ #तुळजापूर #
🚩🙏🙏 आईसाहेब तुळजाभवानी देवी तुळजापूर 🙏🙏🚩 - ShareChat
00:29
💐🎂🎇🎊🎆👑❤️🥰 # बाप आणि लेक #बाप लेक नात्यामधील प्रेम #बाप लेक 😘😘 #बाप लाडकी लेक# #बाप आणि लेक आणि कन्यादान
बाप आणि लेक - नवे क्षितिज , नवी पहाट फुलाची आयुष्यातील  स्वप्नातील वाट स्मित प्रथरढदिवस ETT तुझ्या चेहऱ्यावर राहो.. व नामॅकरण सोहळा शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी वेळ संध्याकाळी ०७ वाजता आयोजित केलेला आहे, तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून Hope शुभआशीर्वाद द्यावेत. बाळाला 7ౌd క్లే हॉटेल शिवसागर డ్డ 5 g Pigg NH४ नॅशनल हायवे लगत मेन रोड शिरवळ निमंत्रक 4+-~ रंजना सोपान पानसरे शैला संजय पानसरे गौरी सचिन पानसरे व समस्त पानसरे परिवार नवे क्षितिज , नवी पहाट फुलाची आयुष्यातील  स्वप्नातील वाट स्मित प्रथरढदिवस ETT तुझ्या चेहऱ्यावर राहो.. व नामॅकरण सोहळा शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी वेळ संध्याकाळी ०७ वाजता आयोजित केलेला आहे, तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून Hope शुभआशीर्वाद द्यावेत. बाळाला 7ౌd క్లే हॉटेल शिवसागर డ్డ 5 g Pigg NH४ नॅशनल हायवे लगत मेन रोड शिरवळ निमंत्रक 4+-~ रंजना सोपान पानसरे शैला संजय पानसरे गौरी सचिन पानसरे व समस्त पानसरे परिवार - ShareChat
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १३ मार्च इ.स.१६६५ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार सोमवार) स्वराज्य संकटात, मोगली फौजांचा स्वराज्यात धुमाकूळ! संकटाची मालिका सुरू झाली होती. कोटीचंडी यज्ञ करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजे जयसिंगच्या फौजांनी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली किल्ले पुरंदरला वेढा टाकला. आणि सुरू झाला मराठ्यांचा एल्गार 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/V0XKzkthSaQ 📜 १३ मार्च इ.स.१६७५ मोरो त्रिमल व नारो नीळकंठ यांच्या निवाड्यांची पत्रे! "गोपाळ सेट्या तुझ्या सेटेपणाचा निवाडा होऊन सेटेपण तुझे असे. याबद्दल भेट युवराज संभाजीराजे यांस होन ५ व सरकार शेरणी १५० तुज खंड केला". वरीलप्रमाणे निवाड्याचे कामी युवराज संभाजीराजांचा सहभाग होत असे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मार्च इ.स.१६८२ (चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार सोमवार) छत्रपती संभाजी महाराजांचे दिवाकर गोसावी यांना पत्र! "स्वामी सज्जनगडी पुर्णावतार केला ते स्थळी हणुमंताचे देवालय बांधले आहे. स्वामी असता समुदाय होता. तो सेवेसी असो देणे आणि सुबासुबाहून धर्मादाये इनात देवीला तो आणावून देवांस व समुदायांस पाठवीत जाणे यथाविधी उत्सव समारंभ करीत जाणे तसेच श्री. रघुनाथ देवालय चापळी आहे. तेथील नित्यपुजा, रथोत्सव सनेदप्रमाणे मोईन व इनाम आणवून यथासांग करीत जाणे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मार्च इ.स.१७०७ छत्रपती शाहू महाराजांची जुल्फीकारखानाने आज्जमशहाशी (बादशहा) भेट घडविली. "आदमी नहीं भुतखाना है", अशी मराठ्यांना बहुमानाची पदवी देऊन औरंगजेबाने या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहजादा आज्जमने स्वतःस बादशहा म्हणून घोषित केले. बादशहा आज्जमशहाने छत्रपती शाहू महाराजांना पोषाख दिला. छत्रपती शाहू महाराजांच्या सुटकेचा हा पहिला प्रयत्न होय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मार्च इ.स.१७१९ छत्रपती शाहू महाराज आणि हुसेन आली तहास मान्यता १७ फेब्रुवारी १७१२ ला दिल्लीचा बादशहा बहादुरशाह मरण पावला. या सुमारास दिल्ली दरबारात सय्यद अब्दुल्ला व सय्यद हुसेन अली या दोघा भावांनी वर्चस्व स्थापन केले होते. त्यांनी बहादुरशाह च्या बादशहा झालेल्या मोठ्या मुलास-जहानदरशहला व त्यासाठी त्याला मदत करणाऱ्या झुल्फिकार खानास ठार मारून जहंदरशहा चा पुतण्या फर्रुखसियरला दिल्लीच्या तख्तावर बसविले. खरी सत्ता सय्यद बंधुंच्याच हाती होती. सय्यद हुसेनला दक्षिणेकडे पाठवून त्याचा काटा काढण्याचा फर्रुख्सियरचा डाव होता. पण या कटाची माहिती सय्यद हुसेनला आधीच मिळाल्याने त्याला मारण्याचा कट तडीस गेला नाही. इकडे फर्रुखसियारणे दिल्ली दरबारात सय्यद अब्दुल्लाविरोधी फळी तयार केल्याने हुसेन अलीने दिल्लीत क्रांती घडवून आणण्यासाठी शंकराजी मल्हार नरगुंदकर यांच्या मध्यस्थीने मित्रवर्य निमिष थळे ह्यांच्या पोस्ट मध्ये नमूद केलेला करार केला. हुसेन अलीने मराठ्यां बरोबर केलेला तह बादशाह फर्रुखस्यारला आवडला नाही. ह्या कराराचा हेतू आपल्याविरुद्ध कट करण्याचा असल्याचे बादशाहाला वाटले, म्हणून त्याने ह्या कराराला मान्यता दिली नाही व सय्यद बंधूंविरुद्ध युद्धाची तयारी केली. याचा सुगावा लागताच सय्यद हुसेन अलीने १७१८ मध्ये मराठ्यांची मदत घेऊन दिल्लीकडे कूच केले. त्याच्या बरोबर स्वतः बाळाजी विश्वनाथ, त्याचा मुलगा बाजीराव, खंडो बल्लाळ, राणोजी आणि संताजी भोसले, शेख मीरा, नारो शंकर आदी मराठे सरदार दिल्लीस रवाना झाले. २८ फेब्रुवारी १७१९ ला सय्यद बंधूनी मराठ्यांच्या मदतीने सर्व प्रतिकार मोडून दिल्लीवर ताबा मिळवला व फर्रुखसियरला पदच्युत करून प्रथम रफी उद्धराज्त, नंतर रफी उद्धौला व शेवटी औरंगजेबचा पणतू रोशन अख्तर यास मुह्मद्शाह किताब देऊन दिल्लीच्या गादीवर बसवले. फर्रुखसियारणे मराठ्यां बरोबर केलेला तह नाकबूल केला होता, पण सय्यद बंधूनी १३ मार्च १७१९ ला छत्रपती शाहू आणि हुसेन आली यांत झालेल्या तहास मान्यता घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मार्च इ.स.१७६० अब्दालीशी तह सुभेदार मल्हारराव होळकर कर्तबगारीने शुन्यातून झंजावात उभे करणारा पुरुष. ज्या काळात स्त्रीयांना गोशाशिवाय शिवाय घराबाहेर पडणे मुश्किल त्या काळात अहिल्यादेवींना शिक्षण-राजनीति-युद्धनीतिचे संस्कार करत त्यांना घडवणारा द्रष्टा पुरुष. संपुर्ण आयुष्य लढाया करण्यात गेले. राजकीय मुत्सद्देगिरी कोणालाही चकीत करणारी. वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही इंग्रजांशीही विजयी झुंज दिली असा हा योद्धा. पानिपत ही एक शोकांतिका. पण १३ मार्च १७६० साली अब्दालीशी तह करुन त्याला परत वाटेला लावण्याचे मुत्सद्दी कार्य त्यांनी केले होते. युद्ध टळत होते. https://youtu.be/V0XKzkthSaQ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मार्च इ.स.१८०० नाना फडणवीस यांचा मृत्यू (जन्म १२ फेब्रुवारी १७४२) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🙏शिवदिनविशेष📜 - IvlILIII A3 r<na  २ATHAWAIRIORS THE GREA SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil १३ मार्च इ.स. १६६५ मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजाच्या फौजानी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला आणि सूरू झाला मऱ्हाठयांचा एल्गार the qreat maratha warriors the great marathawarriors the great marathauarriors IvlILIII A3 r<na  २ATHAWAIRIORS THE GREA SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil १३ मार्च इ.स. १६६५ मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजाच्या फौजानी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला आणि सूरू झाला मऱ्हाठयांचा एल्गार the qreat maratha warriors the great marathawarriors the great marathauarriors - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳ 📜 १२ मार्च इ.स.१६६४ सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे : "...महाराजांची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात...." या व्यापारार्थ बाहेर पडणाय्रा महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते. महाराजांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी महाराज मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर ( बसनूर ) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर महाराजांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड जिन्नस घेऊन देशास आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/ewbFVO7NyyE 📜 १२ मार्च इ.स.१६८५ विजापुरवर हल्ला! सर्जा वगैरे विजापुरी लोक आणि छत्रपती संभाजी महाराजांचे लोक यांनी लष्करापासून ३० (सुमारे ५० कि.मी.) मैल अंतरावर येऊन ठाण मांडले आहे व लढाईचा हेतू आहे. म्हणून शहजाद्याने रात्री हल्ला केला. लढाई झाली. त्याने अनेकांना ठार मारले. मोगल लोक कामास आले. बादशहाने बक्षिसे दिली. विजापुरच्या किल्ल्याला वेढा पडला. रसलपुरच्या बाजूने (पश्चिमेकडून) बहादुरखान, शहापुरच्या बाजूने राहुल्लाखान बक्षी, नागठाण विजापुरपासूनचे ८ मैलांवरील (सुमारे १३, कि. मी. वरिल) ठिकाणी बहादुरखानाचा तळ पडला. लढाईची सर्व सुत्रे शहजादा आज्जमच्या हातात होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७०१ स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराऊसाहेब बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मत केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा हि रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७०१ स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईंवर बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मात केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा ही रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." १२ मार्च १७०१. बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७६६ दुसरे संभाजीराजे (करवीर) व त्यांची पत्नी राणी जिजाबाई यांनी बुद्धिपुरस्सर पेशव्यांशी (बाळाजी बाजीराव) सलोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने करवीर सरकारकडून सतत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हेतू असा की पेशव्यांनी गुप्तरीत्या केलेल्या कराराचा त्यांना विसर पडू नये. याच संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर (१७४९) जिजाबाईंनी सदाशिवरावभाऊंना लिहिलेल्या पत्रात कराराची आठवण देऊन त्वरा करण्याचे सुचीविले आहे. त्या लिहितात, ‘‘अविलंबे कार्ये दृष्टीस पडावे, लौकिक उत्तम दिसोन, यशास पात्र तुम्ही व्हावे. साहेबी सर्वाविसी येख्तयारी आपणावर टाकावी, ऐसे कित्येक मनोदय साहेबी कल्पून गत वर्षांपासून वेदशास्त्रसंपन्न राजश्री भटजीस लागोपाठ रवाना केले. ऐसे असता साहेबाचे प्रत्ययास गोष्ट दिसू नये. तेव्हा साहेब मध्यस्थ होऊन हुजूर वचन गुंतविले, याचा लौकिक कोणा प्रकारचा होणार? हा अर्थ चित्तात आणून तदनुरूप या उपरी पूर्व संदर्भाच्या (गुप्त कराराच्या) विचारानरूप अंगेजणी करून स्वराज्यकर्तव्यार्थ.’’ जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत. पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काही तरी कुरापत काढून सिंधुदुर्ग मे १७६५ रोजी घेतला. करवीर राज्याचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घलण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोंकणातील अन्य किल्लेदारांना पत्रे लिहून सावधनतेचा इशारा दिला; तरीसुद्धा यानंतर इंग्रजांनी पुन्हा एक किल्ला यशवंतगडही ताब्यात घेतला. या घटनेबद्दल जिजाबाईंनी सावंतवाडीकरांचा कारभारी जिवाजी विश्राम यास दि. १२ मार्च १७६६ रोजी एक पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ‘कोवळा मोड आहे तो मोडल्याने उत्तम, भारी जाहलेने सर्वाचे वाईट होईल,’ असा इशारा दिला आहे. इंग्रजी सत्ता पुढे वरचढ होईल, याची जाण त्यांना होती; म्हणून त्यांनी हा इशारा त्या वेळी दिला. https://youtu.be/ewbFVO7NyyE 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७७३ समशेर बहाद्दर सरदार खंडेराव बर्गे यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला .छत्रपती महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू, लढवय्ये सरदार म्हणून खंडेराव यांचे वर सोपवली होती . त्या बद्दल सातारा चे छत्रपती महाराज यांनी समशेर बहाद्दर हा खिताब दिला तसेच इनाम वतन त्यांना दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७९५ दुसऱ्या दिवशी दि. १२ मार्च १७९५ रोजी मराठी फौजांनी खाला वेढा घातला आणि किल्ल्यावर तोफांचा जबरदस्त मारा सुरू केला. मराठ्यांच्या या भयंकर हल्ल्यामुळे मुळातच भेदरलेल्या निजामाने पेशव्यांकडे तहाची बोलणी करण्यासाठी विनंती केली. वास्तविक पाहता, निजामाच्या आतापर्यंतच्या सर्व कृत्यांना लक्षात घेता त्याला जिवंत ठेवू नये, असेच सर्वांचे मत होते. परंतु नानांनी दूरदर्शीपणा दाखवून त्याला जीवदान देण्याचे ठरवले. मागे जशी इंग्रजांविरुद्ध एकी घडवून आणण्यात निजामाने सहकार्य केले होते, तशीच वेळ पुन्हा आली तर असा विचार यामागे होता. शेवटी निजामाचा दिवाण गुलाम सय्यद याला ताब्यात देण्याची अट घालून नाना फडणवीसांनी तहाकरता मंजुरी दिली. एकूण तह ठरला तो असा- १) मैनुद्दौला गुलाम सय्यद हा पेशव्यांच्या बंदोबस्तात राहील. २) यापूर्वीचे चौथ व सरदेशमुखीचे तीन कोट रु. आणि या मसलतीची भरपाई म्हणून दोन कोट असे एकूण पाच कोट रु. रक्कम तीन वर्षांत सरकारात भरणा करावी. ३) तीस लक्षांचा मुलुख व दौलताबादेचा किल्ला सरकारात द्यावा. ४) नागपूरकर भोसल्यांचे जे महाल व ऐवज घेतला असेल तो परत करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१८३३ वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य यांचा जन्म मोलमपल्लीचा जमीनदार बाबूराव सेडमाके (शेडमाके) यांचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात १२ मार्च १८३३ रोजी झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - IILMIUI( {ೆ EsePEAT MARATHA WAFTOR SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष मार्च इ.स. १६६४ 82 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुरतकरांनी इंग्रजांना पत्र पाठवले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors IILMIUI( {ೆ EsePEAT MARATHA WAFTOR SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष मार्च इ.स. १६६४ 82 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुरतकरांनी इंग्रजांना पत्र पाठवले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - ShareChat
00:25
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 ११ मार्च इ.स.१६७७ दक्षिणदिग्विजय मोहिम दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/toB9kcah57Q 📜 ११ मार्च इ.स.१६७९ (चैत्र शुद्ध दशमी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार,) आनंदरावांनी कोप्पल पाठोपाठ विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. किल्ले पन्हाळा प्रांतापासून जिंजीपर्यंत सलग भुमी स्वराज्यात दाखल करण्याच्या उद्देशाने सतत मोहीमा आखण्यात आल्या होत्या. कुठे हंबीरराव, कुठे मोरोपंत, कुठे आनंदराव यांनी स्वराज्य हेच स्वकार्य मानून यज्ञ आरंभला होता. कोप्पल पाठोपाठ आनंदरावांनी विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ मार्च इ.स.१६८९ (फाल्गुन वद्य अमावस्या शके १६१० सवंस्तर विभव वार सोमवार) #छत्रपती_संभाजी_महाराज_बलिदानदिन... औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजीराज्यांचं मस्तक कलम करा". आणि छत्रपति संभाजीराज्यांचं मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीराज्यांच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "छत्रपती संभाजीराज्यांचं" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" छत्रपती संभाजीराज्यांच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही. "छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं... कसं जगावं !!! आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवंल... कसं मरावं !!!... ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........ या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा मुजरा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ मार्च इ.स.१८१८ कोरीगड किल्ला इंग्रजांकडे ११ मार्च इ.स. १८१८ रोजी इंग्रज कर्नल प्राथरने लूट करण्याच्या उद्देशाने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ मार्च इ.स.१९२४ क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी जन्मदिन जन्म : ११ मार्च १९२४ (मृत्यू : २१ जानेवारी १९४५) हेमू कलाणी यांचा जन्म ११ मार्च १९२४ रोजी कलानी कुटुंबात सक्कर येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण टिळक हायस्कूलमधून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दीक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत तरुणांनी स्वराज्य सेना सक्करमध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलाणींकडे होते. आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. २३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेप्रमाणे हेमू व त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाच्या फिश प्लेट्स काढण्याच्या कामास सुरुवात केली. एवढ्यात संरक्षण पथकाचे शिपाई तेथे आले. हेमू कलाणींनी सर्व सहकार्‍यांना पळण्यास सांगितले. कोणीही पळण्यास तयार नव्हते. तरी हेमू कलाणींनी त्यांना दरडावून पळवून लावले. पण हेमू एकटेच शिपायांच्या हाती सापडले. लष्करी कोर्टापुढे त्यांना आणण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या सहकार्‍यांची नावे सांगितली नाहीत. हेमू कलाणींनी कोर्टाच्या कामात सहभागी होण्याचे नाकारले. बचावासाठी वकीलही दिला नाही. त्यांनी लष्करी कोर्टाला एकच उत्तर दिले, "गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले त्याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची सैनिक गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे." https://youtu.be/toB9kcah57Q लष्करी कोर्टाने हेमू कलाणींना आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली. पण लष्करी कमांडर लॉर्ड रिचर्डसन याने ती बदलून हेमू कलाणींना फाशी देण्याचे फर्मान काढले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - I (IVIII  -00~ TD GREATMARATHA WARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिव वशण मार्च इ॰स. १६८९ 99 शिवपुत्र "छत्रपति संभाजी महाराजांची व कवि कलश" यांची वढु - तूळापूर संगमावर औरंगजेब कडून अमानुष हत्या करण्यात आली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII  -00~ TD GREATMARATHA WARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिव वशण मार्च इ॰स. १६८९ 99 शिवपुत्र "छत्रपति संभाजी महाराजांची व कवि कलश" यांची वढु - तूळापूर संगमावर औरंगजेब कडून अमानुष हत्या करण्यात आली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ShareChat
00:15
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १० मार्च इ.स.१६४९ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५७१, संवत्सर विरोधी, वार शनिवार) स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांना झोपेत बेसावध असताना अटक! एकेकाळी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर पेलून मोगलांना खडे चारणार्‍या राजे शहाजीराजे यांच्यावर अटकेची वेळ यावी हे दुर्दैवी होते. दिलावरखान, बेहलोलखान, अंबरखान, याकुतखान, खैरातखान, मसुदखान, आजमखान या खानावळीसोबतच बाळाजी हैबतराव, सिधोजी पवार, मंबाजी पवार, मंबाजी भोसले, मालोजी पवार, तुळोजी भोसले, बाजी घोरपडे, खंडोजी, मानाजी आणि अंबाजी घोरपडे बंधू यांनी मुस्तफाखानाच्या आज्ञेवरून एका बेसावध क्षणी, झोपेत राजे शहाजीराजे यांना अटक केली. या सर्व घटनेत बाजी घोरपडे याने पुढाकार घेतला होता. त्यानेच महाराजांना बेड्या ठोकल्या. तो दिवस होता. २५ जुलै इ.स.१६४८ जिंजीनजीक राजे शहाजीराजे यांना अटक झाली. सुमारे ६ महिने राजे शहाजीराजे अटकेत होते. पुढे अफजलखानाने बंदोबस्तात राजे शहाजीराजे यांना विजापुर दरबारात पेश करायची जबाबदारी घेतली. यावरून राजे शहाजीराजे यांचे महत्वही लक्षात येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/ZSu1RkHXqY0 📜 १० मार्च इ.स.१६५९ (फाल्गुन वद्य त्रयोदशी, शके १५८०, संवत्सर विकारी नाम, वार गुरुवार) महाराजांनी सिवापट्टण गाव वसविले! महाराज किल्ले राजगडावरून सिवापट्टण येथे आल्याची नोंद आहे. याच दिवशी हे गाव वसविण्याचे कार्य पूर्ण झाले.‌ तसेच वर्षे प्रतिपदा येथेच साजरी करण्याचे महाराजांनी ठरविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६७७ ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवाजी महाराजांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६७९ मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र दिलेर ने दिलेरपणे छत्रपती संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती, तीन घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिला. शिवाय छत्रपती संभाजीराजांना ७००० स्वार आणि ७००० जातीच्या मनसबीचे आलमगीर बादशहाचे फर्मान हाती दिले. छत्रपती संभाजीराजे दिलेरच्या छावनित आल्याने दिलेरला निम्मा दक्षिण देश फत्ते केल्याचा आनंद झाला होता. छत्रपती संभाजीराजांच्या दिलेरखानाला जावून मिळन्याच्या या नवीन आणि अनपेक्षित खेळीने सिद्धिमसूद आणि दिलेरची ८० हजार फौज जी चालून येण्यास तयारच होती, त्या प्रयत्नांच खिळ बसली गेली. याचे वर्णन प्रत्यक्ष इंग्रजांनी करून ठेवले हे बरे. मुंबईहुन सुरतला गेलेले हे पत्र असे होते. " शहजादा दक्षिणेस येवून २ महीने झाले आणि छत्रपती शिवाजींचा मुलगा छत्रपती संभाजी दिलेरखानाकडे पळून गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये ठाणे धरून बसलेले असून मोगल अन आदिलशहा या दोघांनाही ते मोजीत नाहीत. किंवा यापैकी कोणीही त्यांच्यावर चालून जात नाही." या पत्राची तारीख आहे १० मार्च १६७९. आता आपणच विचार करा हे कसे घडले. छत्रपती संभाजीराजे १३ डिसेंबरला दिलेरच्या छावनित गेले. तेव्हा पासून म्हणजे १० मार्च हे पत्र लिहालेले गेले. तोवर सगळे स्तब्ध कसे. ना विजापरकरांनी स्वराज्यावर हमला केला ना दिलेरने स्वराज्याविरोधात मोहिम उघडली या दोन्ही शत्रूंना जागच्या जागी खिळवुन ठेवण्याचे यशस्वी राजकारण कोणी केले! याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजांच्या या अभूतपूर्व खेळीने. छत्रपती संभाजीराजे विशिष्ट उद्देशाने दिलेरला मिळाले असावेत यावर परमानंद यानेही चांगला प्रकाश टाकला आहे. छत्रपती संभाजी राजांनी दिलेरला बहुत किल्ले व बाकीचा मुलुख हस्तगत करून देतो अशी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित केले आणि आश्चर्य म्हणजे दिलेरनेही लगेच विश्वास ठेवून विजापुरकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळवीला. पहा याला म्हणतात की नाही खरा गनिमिकावा?? कालपर्यंत स्वराज्यावर एकत्र चालून जाणारे दोन मित्र छत्रपती संभाजी राजांच्या या वचनामुळे एकमेकांविरुद्ध लढायला तयार झाले. अन हो अजुन एक छत्रपती शिवाजीमहाराजांनी हंबीरमामांना आदेश दिला पाठलाग करा अन पाहा, "छत्रपती संभाजीस वाटेतच पकडून इकडे आणावा. बहुत दौडिने फौजेने पाठलाग करवा." आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाटक पहा कसे बेमालुम. छत्रपती संभाजीराजांच्या जवळ फक्त ३०० स्वार आणि पाठलाग करणार्‍या हंबीरमामा यांच्या जवळ २५००० फौज. हंबीररावांनी महाराजांच्या आदेशाप्रमाने अत्यंत वेगाने पाठलाग केला दरम्यान छत्रपती संभाजी राजांनी वाटेत दोन दिवस मुक्काम केला तरी तरी मोहिते त्यांना पकडू शकले नाही ??? खरोखरच हंबीरराव मोहित्यांनी जर कसूर केली असती तर महाराजांनी त्यांनी कान उघडनी नसती केली का???? बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मोहित्यांनी वर्षभर दरम्यान कोणतीच मोहिम हातात घेतली नाही का?? म्हणजे फक्त छत्रपती संभाजीराजांचा नुसता पाठलाग करत होते का?? अहो खुळे आहोत आपण सगळे, राजे होते ते छत्रपती शिवाजीराजे. पाठलाग करण्याच्या बहान्याने ते छत्रपती संभाजीराजानां बाहेरून संरक्षण पुरवत होते जेव्हा छत्रपती शिवाजीराजांचा आदेश आला अन कामगिरी फत्ते झाली की छत्रपती संभाजीराजांना सुखरूप स्वराज्यात आनने. मला वाटते हे वाचल्यावर तुमच्या डोक्यातले बरेच प्रश्न कायमचे मेले असतील. अहो आम्हाला आमचा इतिहास कधी कळला नाही तेथे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजे काय डांबले कळणार ? 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६७९ छत्रपती शिवरायांचे सरदार "थोरले आनंदराव" यांनी विजापूरच्या आदीलशहाकडून "बाळापूर" जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६८८ (फाल्गुन वद्य तृतीया, शके १६०९, प्रभव संवत्सर, शनिवार) केसो त्रिमल यांचे सरदार सुंदर सुभेदार गड सोडून पळाले आजच्या दिवशी म्हणजे १० मार्च १६८८ रोजी केसो त्रिमल यांचे एक सरदार सुंदर बालाजी सुभेदार कोनिमेरला तैनात होते. त्यास आवश्यक ती कुमक वेळेवर मिळाली नाही. त्यातच मराखान हा मोठी मोगल सेना घेऊन आपल्यावर चाल करून येईल या भीतीने सुंदर बालाजी गड सोडून पळाले. https://youtu.be/ZSu1RkHXqY0 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१७३७ १० मार्च १७३७ मध्ये, उत्तरेत मोहीम करत असताना, शिंदे-होळकर यांच्या फौजेचा, मोगल सरदार सादतखान यांच्यासोबत आग्र्याजवळ सामना झाला. अचानक घडलेल्या या चकमकीमध्ये, नुकसान टाळण्यासाठी मराठा फौजेने माघार घेतली. खरे तर यामध्ये सादतखानाच्या शौर्यापेक्षा, मराठ्यांचा बचावात्मक पवित्राच जास्त होता पण सादतखानाने मोगली सवयीनुसार "आपण मराठ्यांना हरवले" अश्या आशयाचे पत्र लिहिले आणि सर्वजण "फते मुबारकचा जश्न मनवण्यात मग्न झाले." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१७३९ मानाजी आंग्रेंनी द्रोणागिरी उर्फ उरणचा किल्ला जिंकला उरण शहर हे स्थापन झाल्यापासुन चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दिर्घकाल राजवट. देवगिरिचे यादव, पोर्तुगीज, आदिलशाह, इंग्रज व १० मार्च १७३९ ला मानजी आंग्रे यांनी उरणचा कोट, द्रोणागिरी किल्ला व उरणचा परिसर जिंकून घेतला. उरण शहर वसन्यापूर्वी येथे जंगल होते. हे जंगल केगाव, नागांव, द्रोणगिरी, करंजा ते जासई, खोपटे खाडी पर्यंत पसरलेले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१८९७ सावित्री, क्रांतिज्योति, सावित्रीबाई फ़ुले यांची पुण्यतिथी आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करता आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले. ज्या काळात स्त्रीला चूल व मुल या बंधनात अडकवून ठेवले होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १ मे, १८४७ साली त्यांनी दलितवस्तीत शाळा चालू केली व सगुणाऊला शाळा चालवण्यास नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - iIt VIITLII  +-- 0 R FHAWARRIORS FEEEREA SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष १० मार्च इ.स. १६४९ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांना मुस्तफाखानाच्या आज्ञेवरून एका बेसावध क्षणी झोपेत 3য়নানা 3কে কলী the qreat maratha worriors the qreat maratha warriors the great marathawarriors iIt VIITLII  +-- 0 R FHAWARRIORS FEEEREA SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष १० मार्च इ.स. १६४९ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांना मुस्तफाखानाच्या आज्ञेवरून एका बेसावध क्षणी झोपेत 3য়নানা 3কে কলী the qreat maratha worriors the qreat maratha warriors the great marathawarriors - ShareChat