सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २८ सप्टेंबर इ.स.१६३६ औरंगजेबाने उदगीर किल्ला जिंकला १४ जुलै १६३६ रोजी बादशाह शाहजहानने शहाजादा औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार नेमलं आणि तो उत्तरेकडे निघून गेला. पुढची दख्खन मोहीम आता औरंगजेब चालवणार होता. औरंगजेबाने औरंगाबाद ही राजधानी केली आणि निजामशहाचे - म्हणजे शहाजीराजांचे - जवळपासचे किल्ले आणि मुलूख जिंकायचा सपाटा लावला. त्याच्या सोबत मदतीला आदिलशाही सैन्य होतेच. २८ सप्टेंबर १६३६ रोजी त्याने उदगिरचा किल्ला जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/gWMstDKOBkA?feature=share 📜 २८ सप्टेंबर इ.स १६५६ ( अश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, सोमवार ) तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यास महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली :- तिमाजी खंडेराव सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळ येथील रहिवासी होता आणि कुलकर्णी देखील होता. दुष्काळात रखमाजी व अंताजी उंडे पणदरकर यांची कुलकर्ण व ज्योतिषवृत्ती २० होणास तिमाजीने विकत घेतली. ३५ वर्षांनी रखमाजी ऊंडेंचे पुत्र विसाजी व रामाजी यांनी संभाजी मामा मोहिते ह्यांना लाच देऊन तिमाजीवर अन्याय करून जबरदस्तीने कुलकर्ण वतन हिसकावून घेतले. तिमाजी कर्नाटकात थोरले महाराज शहाजीराजांकडे मदतीस गेला. शहाजीराजांनी जे पत्र दिले ते घेऊन तिमाजी शिवरायांकडे आला व गोतसभेत महाराजांनी सर्वांना बोलावून निर्णय दिला की, " ३५ वर्षांपूर्वी जर तिमाजी खंडेरायने २० होन दिले नसते तर तुमचे कुटुंब वाचले नसते, यावर बोभाटा ना करणे " आणि अश्या प्रकारे तिमाजीला न्याय मिळाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेंबर इ.स १६८२ संभाजीराजे जेंव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेंव्हा त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी व एक बहीण होती. संभाजीराजे मुघलांच्या तावडीतून निसटले पण त्या दोघी मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. संभाजीराजेंनी राज्यकारभार स्विकारल्यावर त्यांना सोडवण्यासाठी आपल्या सैन्याच्या तुकड्या पाठवायला सुरुवात केली. मराठ्यांच्या या आक्रमक हल्ल्यांनी सावध होऊन औरंगजेबाने त्यांची रवानगी दौलताबादच्या किल्ल्यात केली. तरीसुद्धा मराठ्यांचे नगरच्या किल्ल्यावरील हल्ले थांबले नव्हते. त्यामुळेऔरंगजेबाने शहजादा शाहआलमचा मुलगा महंमद मुईजुद्दीन याला ८ हजार प्यादे आणि ६ हजार स्वारांची मनसब दिली व रत्नजडीत कंठा, एक घोडा व खिलतीची वस्त्रे दिली आणि त्याला अहमदनगर शहर व किल्ल्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. या स्वारीत रणमस्तखान,दाऊदखान व गझनफरखान या सरदारांना त्याने शहजादयाच्या मदतीला दिले.औरंगजेबाच्या या तयारीवरून शंभुराजेंच्या आदेशाने अहमदनगर परिसरात मराठ्यांनी किती आक्रमक हल्ले केले होते ते लक्षात येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेंबर इ.स १६८७ (अश्विन शुद्ध द्वितीया, शके १६०९ प्रभव संवत्सर, वार बुधवार) अकबराच्या बंडाबाबत लंडनचे पत्र! लंडनहून आलेल्या एका पत्रात लोकसमाजाचे एक चांगलेच चित्र रेखाटले गेले आहे. "औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाच्या विरुद्ध शस्त्र धरले असून त्याने त्याच्या बापाची आणि आजोबांची पार वाट लावली हे इतिहासात नमूद आहे अर्थात त्यांच्या मुलाकडून त्यापेक्षा कोणती अधिक चांगली वागणूक मिळणार? बहुतेक सर्व मनुष्यांच्या पापाचे शासन ईश्वर याच जन्मात भोगावयास लावतो. त्यामुळे तुम्ही औरंगजेबाबद्दल काहीही लिहिलेत तरी आमचे मत आहे की, सध्याचा मुघल बादशहा औरंगजेब या जगात शांततेचे फारच थोडे दिवस काढील". घरगुती भांडणाबरोबर औरंगजेबाने इतरत्र चांगले संबंध राखले नव्हते. अदिलशाही, कुतुबशाहिशी वैर करून त्यांची राज्ये खालसा करण्याचा डाव, डच, फ्रेंच यांचेसोबतचे वाद, सुरतेच्या वखारीचे मुघलांनी केलेले नुकसान, त्यामुळे सुरतकर इंग्रजांचे वैर यामुळे खऱ्या अर्थाने आता एकटा पडत चालला होता. इंग्रजांच्या पत्रातून औरंगजेबाच्या स्वभावाचे पदर समोर येतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेंबर इ.स.१७३९ शके १६६१ च्या आश्विन शु. ७ रोजी वसईच्या संग्रामांत रामचंद्र हरि पटवर्धन यांस गोळी लागल्यामुळे मृत्यु आला. पेशव्यांच्या अमदानीत जी धराणा प्रसिद्धीस आली त्यांत हरभट पटवर्धनांचे घराने प्रमुख आहे. यांचीच मुले गोविंदपंत नाना, रामचंद्रपंत व भास्करपंत ही पुण्यास येऊन बजीरावांजवळ राहून पराक्रम गाजवू लागली. पश्चिम किना-यावर पोर्तुगीजांचा धार्मिक जुल्म वाढत चालला होता. त्याला आळा घालण्याचे काम चिमाजीअप्पाने केल. मराठ्यांच्या इतिहासात राष्ट्रप्रेम, शौयें, संघशक्ति, इत्यादि उदात्त गुणांचे दर्शन घडविणारे जे काही थोडे प्रसंग आहेत त्यांत वसईच्या युद्धाची गणना प्रामुख्याने होत असते. या संग्रामातील मोहीम इ.स.१७३७ च्या मार्च-जूनमध्ये होऊन ठाणे व साष्टी काबीज झाली. या लढाईत रामचंद्र पटवर्धन प्रमुखांपैकी एक होते. आता पोर्तुगीजांच्या लढयास चांगले रूप येणार होते. बाजीरावांने रामचंद्र हरीस लिहिले, “साडेबत्तीसशे माणूस केळवे माहिमच्या कार्यभागास तुम्हांकडे नेमिलें आहे.... फिरग्यांच्या लोकांनी वारे घेतले आहे. तुम्हांवरही तोंड टाकतील, त्यांस जपून एकवेळ कापून यानंतर १७३८ मध्ये रामचंद्र हरि यांनी माहिमास मोर्चे लावले, आणि केळव्याकडे सातभाठी माणूस घेऊन रामचंद्रपंत चालुन गेले. रामचंद्रपंतांनी खुद्द दोघे ठार केले आणि गनिम फिरवला. ते समयी रामचंद्रपंतांचे उजव्या हातास गोळी लागली. हातची तलवार सुटून गुडघ्यास लागली ऐसे होतांच मशारनिलहे पिरले त्याबरोबर गनिमाने मोर्चे काबीज केले, आमचे लोकांचा धीर सुटोन निघाले, महादजी केशव व धोंडोपंत, वाघोजी खानविलकर, राजबाराव बुरुडकर, चितो शिवदेव, वगैरे लोक मोचीत होते त्यांस निघावयास फुरसत न होऊन तेथेच झुंजोन कामास आले. अजमासे दोनशें माणूस कामास आले व जखमी शंभरापर्यंत." या लढाईत झालेल्या जखमी मुळेच रामचंद्र हरीचें आश्विन शु. ७ रोजी निधन झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ सप्टेबर इ.स.१८३८ बहादूरशहाच्या आधी तख्तपोशी करून राजा झालेला धाकटा युवराज मिर्झा जहांगीर पुढे अतिमद्यपानाने मेला. त्याच्या निधनानंतर आपल्याला दिल्लीची गादी मिळेल असे बहादूरशहाला वाटत होते. २८ सप्टेबर १८३८ ला जफरला दिल्लीचे तख्त मिळाले देखील ; पण ते राज्य, ती राजवस्त्रे अंगावर जेंव्हा चढली तेंव्हा त्याच्या सत्तेवर अप्रत्यक्षपणे इंग्रजाचाच अंमल होता. धूर्त इंग्रजांनी त्याला बजावले होते की, "तू आता राजा आहेस, पण लक्षात ठेव फक्त आणि फक्त नामधारी राजा !" ज्या मुघल सत्तेच्या सीमा एके काळी चारीदिशांना हजारो किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारल्या होत्या त्या मुघलांच्या अखरेच्या शिलेदाराची सत्तासीमा फक्त लाल किल्ल्य़ाच्या वेशीपर्यंतच राहणार होती. ज्या लाल किल्ल्यात दिवाने खासची शान मुघल बादशहाच्या आगमनाने वाढत होती, तिथे बादशहाच केविलवाणा झाला होता. ज्याच्या मागेपुढे अहोरात्र चवऱ्या ढाळल्या जायच्या त्याच्या मागे आता फक्त त्याची दीनवाणी सावली उरली होती. काळीज विदीर्ण करणारा ही अट बहादूरशहाने डोळ्यात पाणी आणून कबूल केली, कारण त्याच्यापुढे कुठलाही पर्याय बाकी नव्हता.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - THE greAt MATAUIA 1r079LIN 11RR / 0R  م शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Ralul Borse Patil २८ सप्टेंबर इ.स. १६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यास पुण्यात गोतसभा भरवली..! the great marathawarriors the_greal maratha_warriors Ihe greal marathauarriors THE greAt MATAUIA 1r079LIN 11RR / 0R  م शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Ralul Borse Patil २८ सप्टेंबर इ.स. १६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यास पुण्यात गोतसभा भरवली..! the great marathawarriors the_greal maratha_warriors Ihe greal marathauarriors - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २७ सप्टेंबर इ.स.१६६५ ( भाद्रपद वद्य चतुर्दशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, बुधवार ) छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने फर्मान व मानाचा पोशाख पाठविला! मुघलांशी पुरंदर तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणात आदिलशाही सरदार इखलासखानाबरोबर लढा देत होते. या दरम्यान पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजेंच्या छावणीत शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान आले आणि पाठोपाठ पुरंदरच्या तहाला मान्यता देणारे औरंगजेबाचे फर्मानही येत असल्याचे मिर्झाराजेंना समजले. मिर्झाराजेंनी राजगडावर निरोप पाठवून शंभुराजेना बोलवून घेतले. शंभुराजेनी फर्मान स्वीकारले,शंभुराजे मुघली मनसबदार बनले. शंभुराजेंना यावेळी पोशाख व रुप्याचा साज चढवलेला हत्ती भेट देण्यात आला. यानंतर शंभुराजे राजगडावर परतले. पुरंदर तहाला मान्यता देणारे अधिकृत फर्मानही मिर्झाराजेंच्या छावणीत आल्याचे शिवाजी महाराजांना समजले. महाराज यावेळी तळकोकणात होते. फर्मान पोशाख स्वीकारण्यासाठी ते पुरंदरच्या रोखाने निघाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/dCKGW_I7Uyw 📜 २७ सप्टेंबर इ.स.१६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने २२ सप्टेंबर ला फितुरीने जिंकून घेतली.पण त्यापूर्वीच वेढा दिलेला गोवळकोंडा लवकर ताब्यात येत नसल्याचे पाहून औरंगजेबाने कुतुबशहाचा कर्नाटकातील प्रदेश जिंकण्यासाठी आपले सरदार व सैन्य रवाना केले होते. मूळचा कुतुबशाही सरदार असणारा कासीमखान हा नंतर मुघलांना सामील झाला.त्याची नेमणूक कर्नाटक प्रांत जिंकण्यासाठी करण्यात आली.बादशाहाने गोवळकोंडा जिंकण्यापूर्वीच कासीमखानाने जुलै महिन्यात बेंगलोर जिंकले होते.खानाला रोखण्यासाठी हरजीराजे महाडिक व केशव त्रिमल हे मराठे सरदार गेले होते पण ते तिथे पोहोचेपर्यंत खानाने बेंगलोर काबीज केले होते.त्यामुळे ते परत फिरले.मुघल सैन्याने भेद करून पिलकोंडा हा किल्ला घेऊन मच्छलीपट्टणम पर्यंत लूटमार केली होती.मुघल सरदार कासीमखानाने भेद करून पिलकोंडा हा किल्ला घेतला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २७ सप्टेंबर इ.स.१७०७ शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले. रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने परत दिल्याशिवाय देशमुख, कुलकर्णी समजत नाहीत व मुलुख आबाद होत नाही हे जाणून वतने देण्यास सुरुवात केली. मराठेशाही समूळ नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास रामचंद्रपंत - शंकराजी नारायण यांचा मुत्सद्दीपणा व संताजी - धनाजी यांचा गनिमीकावा या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे अखेर नमते घ्यावे लागले आणि त्याच्या पश्चात मराठ्यांनी दिल्लीपावेतो धडक मारून मोगलांनाच आपले अंकित बनवले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २७ सप्टेंबर इ.स.१७२९ सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनास्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन मराठा सरदारांमध्ये कार्यक्षेत्राची वाटणी झाली त्यात खानदेशात बागलाण आणि गुजरातचा सुभा सेनापती दाभाडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता .खंडेराव दाभाडे यांनी भिल्ल कोळी या नव्या वन्य जातीची दोस्ती संपादन करून सैन्याचे संघटन केले.१७१९ मध्ये सुरतेवर स्वारी करून मोगली फौजांचा पराभव केला. सोनगड येथे कायमचे ठाणे स्थापन केले .तेथून पुढे हळूहळू दाभाडे यांनी गुजरात वर चौथाई आणि खंडणी लागू केली. खंडेराव दाभाडे यांनी गुजरात वर अनेक वेळा स्वाऱ्या करून एवढ्या खंडण्या वसूल केल्या की गुजरातमधील मोगलांची सत्ता खिळखिळी होऊन मोडकळीस आली.खंडेराव दाभाडे यांनी गुजरात ची केलेली दुरावस्था पाहून बादशहाने हैदर कुलीखान म्हणून नवीन सुभेदार गुजरातवर पाठवला. त्यानंतरही गुजरातमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर राहिली .राजकीय स्थिरता गुजरातला कधीच प्राप्त होऊ शकली नाही. राजकीय अस्थिरता हा गुजरातचा जणू स्थायीभावच होऊन बसला . खंडेराव दाभाडे एकनिष्ठपणे स्वामी सेवा करत असत. खंडेराव हे स्वामीनिष्ठ तर होतेच पण कायम छत्रपतीच्या आज्ञेचे पालन करीत. वाढत्या स्वार्या आणि दगदगीने खंडेराव दाभाडे आजारी पडले. दिनांक २७ सप्टेंबर १७२९ रोजी सेनापती खंडेराव दाभाडे आजारी पडले व यांचा मृत्यू झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - Vhe great 1718 68841 J41411 ஸARR0R9 शिवदिनविशेण SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil २७ सप्टेंबर इ.स. १६६५ छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने फर्मान व मानाचा पोशाख पाठविला..! the_great_marathawarriors Ihe qreai marathauarriors the greal marathawarriors Vhe great 1718 68841 J41411 ஸARR0R9 शिवदिनविशेण SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil २७ सप्टेंबर इ.स. १६६५ छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने फर्मान व मानाचा पोशाख पाठविला..! the_great_marathawarriors Ihe qreai marathauarriors the greal marathawarriors - ShareChat
केदारेश्वर व्यायाम शाळा या ठिकाणी जमा करावे संपर्क. अमोलदादा कबुले. +91 94039 68312 अमोल जाधव +91 88063 73131 तेजस तळेकर. 8830446802 सूरज राऊत. +91 74987 07698 शुभम गुंजवटे. +91 97674 91104 जितेंद्र मगर. +91 97661 11137 सुमित पानसरे. +91 91 72818 788 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🏛️राजकारण #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #🌹पावसाळी फुले🌹 #😍मान्सून फॅशन टिप्स😍
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
00:15
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७७ ( अश्विन शुद्ध दशमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, बुधवार ) ज्ञछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद करवून त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडीक या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला. त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोन मराठे सरदारांना जिंजीस पाठवून दिले. हरजीराजेंनि आपला जम कर्नाटकात चांगला बसविला होता. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत कर्नाटकातील महसूर, मदुरा, रामनाड, त्रिचनापल्ली एकेरी इत्यादी पाळेगारांची छोटी-छोटी राज्ये होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७९ महाराजांनी शामजी नाईक यांना विजापुरास रवाना केले. विजापुरचा सरदार मसाऊदखान हा दिलेरखानास दाद देत नव्हता, म्हणून विजापुरचे भले भले सरदार व सर्जाखानासही फोडून आपल्या झेंड्याखाली आणले. दिलेरखानाने मोठ्या उत्साहाने भीमा ओलांडली व लगेच सप्टेंबर मध्ये त्याने मंगळवेढे जिंकून घेतले. नाईलाजाने मसाऊदखानाने विजापुरच्या रक्षणार्थ महाराजांना विनवणी केली. महाराजांनी शामजी नाईक यांच्या बरोबर १० हजार स्वार धान्य, आणि सामानसुमानांचे २ हजार बैल आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली विजापुरास पाठविले. वकिल म्हणून विसाजीपंत नीळकंठराव हेपण विजापुरास निघाले. मसुदखानाने विजापुरच्या किल्ल्यावर संरक्षणाची व्यवस्था मजबूत करून ठेवली. महाराजांनी विजापुरवरिल संकट लक्षात घेऊन, मसाउदखानाशी बोलणी करण्यासाठी आपले मुत्सद्दी शामजी नाईक यांना रवाना केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८४ सुर्यकांत इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर झालेल्या त्यासंबंधी लंडनला पत्र पाठवले. सुरतकर इंग्रजांच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून मुंबईकर इंग्रजानी तिथल्या रहिवाश्यांच्या सहाय्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता झुगारून बंड केले आणि इंग्लंडच्या चार्लस राजाने मुंबई बेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजविन ची नेमणूक केली गेली.अधिकार मिळताच केजविनने मराठ्यांशी धरसोडीचे धोरण सोडून तह केला आणि सिद्दीचा बंदोबस्त करून त्याला मुंबईत प्रवेश बंद केला.केजविन ने या तहाची माहिती लंडनला कळवली होती,यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या सुरतकरांनी लंडनला लिहून पाठवले की,"मुंबईच्या बंडखोराकडून संभाजीकडे गेलेल्या कॅ. गॅरीच्या कामाची आम्हाला कारवारकडून काहीच बातमी मिळाली नाही.परंतु संभाजीराजांनी त्यास झिडकारून लावला असून हा कारभार महागात पडला आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८९ छत्रपती राजाराम महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा पडला. रायगडावरील महाराणी येसूबाई आणि मुत्सद्दी मंडळींनी राजाराम महाराजांना स्वराज्याचे वारसदार बनवून त्यांचे मंचकरोहन केले.पुढील धोका ओळखून नियोजित योजनेनुसार राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यासह रायगड सोडून मुघलांना हुलकावणी देत प्रतापगड मार्गे पन्हाळगडावर आले.पण मुघलांनी पन्हाळ्यालाही वेढा दिला.मुघलांशी सुरू असलेली लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आघाड्यावर लढण्यासाठी राजाराम महाराजानी जिंजीला जायचे ठरवले.त्यानुसार वेषांतर करून मानसिंग मोरे,प्रल्हाद निराजी,कृष्णाजी अनंत, निळो व बहीरो मोरेश्वर,खंडो बल्लाळ,बाजी कदम,खंडोजी कदम या व इतर काही सहकाऱ्यासह राजाराम महाराज पन्हाळ्यावरून मध्यरात्री गुप्तपणे निसटून गेले.छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून गेले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१७१५ आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५. तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २६ सप्टेंबर इ.स.१७५९ पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थशेत्र श्रीभीमाशंकर येथील होणारी वृक्षतोड व जंगली प्राण्यांची शिकार यावर बंदी घालावी याकरिता महादजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना २६-०९-१७५९ रोजी पत्रे लिहून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली. जंगल व वन्यप्राणी यांचे संवर्धन याविषयी असलेली जागरूकता याविषयीचे महत्व विषद करणारी हि पत्रे म्हणजे तत्कालीन निसर्गाविषयी असलेली काळजी दर्शविते. श्रीभीमाशंकर क्षेत्राच्या आजूबाजूस तीर्थक्षेत्र व वनराई असून त्यात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात. त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते. त्यासंबंधी ताकीद देण्यात यावी . तीर्थक्षेत्राच्या परिसरातील वृक्षतोड न करता तीर्थक्षेत्राच्या राईबाहेरील झाडांची तोड करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, रामचंद्र कृष्णराव तसेच मुकादम आणि देशमुखांना भीमाशंकरच्या आसपासच्या प्रांतात झाडे न तोडण्याचे आदेश जारी करावेत. श्रीभीमाशंकर क्षेत्रात निरुपद्रवी सांबर व अन्य वन्यजीव आश्रयास असतात. भोवर गावातील गावकरी व कोकण प्रांतातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात. तीर्थक्षेत्राच्या तीन कोस परीसरात शिकार करण्यास मनाई करण्यात यावी . शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत . 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - Jhe Gre at G R E A T + R R I 0 R S 11 0 M शिवदिनविशेण SWUEB உBrsu २६ सप्टेंबर इ॰स. १६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. the_great_marathawarriors Ihe qreat maralha warriors (he greal marathauarriors Jhe Gre at G R E A T + R R I 0 R S 11 0 M शिवदिनविशेण SWUEB உBrsu २६ सप्टेंबर इ॰स. १६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. the_great_marathawarriors Ihe qreat maralha warriors (he greal marathauarriors - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २५ सप्टेंबर इ.स.१६७१ इंग्रजांच्या पत्रात "अत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख पत्रासारसंग्रहातील एकुण तीन पत्रे वाचनाच्या सोयीकरीता एकाखाली एक दिली आहेत. पत्रांचा कालावधी हा सन १६७१ मधील एप्रिल ते सप्टेंबर असा सहा महिन्यांचा आहे. अवघ्या सहा महिन्यात शिवाजी माहाराजांच्या संबधी धुर्त इंग्रजांची तीन वेगवेगळी मते बदललेली दिसतात. दिनांक ८ एप्रिल सन १६७१ रोजीच्या पहिल्या पत्रात इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध मोठे मोगल सैन्य येत असल्यामुळे आनंदात आहेत. दिनांक १ मे सन १६७१ रोजीच्या दुसर्‍या पत्रात इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांचा "दरोडेखोर शिवाजी" असा उल्लेख करत आहेत. दिनांक २५ सप्टेंबर सन १६७१ रोजीच्या तीसर्‍या पत्रात इंग्रज शिवाजीचा " पूर्वेकडीलअत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख करत आहेत. अवघ्या चार महिन्यापूर्वी दरोडेखोर म्हणणार्‍या इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराज "अत्यंत धोरणी राजा" भासू लागले. यातच दडले आहे शिवछत्रपतींच्या कुटनिती, राजनिती, शौर्य, धैर्य, पराक्रम, राज्यव्यवस्था, न्याय आणि दूरदृष्टीचे सार.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/GALP6kCTiTo 📜 २५ सप्टेंबर इ.स.१६७५ ( अश्विन शुद्ध द्वितीया, शके १५९७, संवत्सर राक्षस, शनिवार ) बाकाजी फर्जंद यांना सनद :- बकाजी फर्जद यास पाटीलकी बहाल शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे बकाजी फर्जद शिवरायांची प्रामाणिकपणाने सेवा करुन त्यांना कठीण प्रसंगी साथ देणार्या हिरोजी फर्जद प्रमाणे त्यांचा मुलगा बकाजी फर्जद यांनीही शिवरायांची एकनिष्ठेने सेवा केली. राज्याभिषेक प्रसंगी सेनापती, अष्टप्रधान, सुभेदार, किल्लेदार, नोकर चाकर, ब्राह्मण, पाहुणे प्रजेला शिवरायांनी बक्षिस म्हणून इनामवतनाचा लोभ न करता आयुष्यभर आपली सेवा करण्याची संधी मिळावी अशी ईच्छा व्यक्त केली. स्वराज्याला भरभराटी आली. वैभव प्राप्त झाले. जगभर शिव रायांचा नावलौकिक वाढला. मान सन्मानाची अभिलाषा न बाळगणार्य़ा या दोन निष्ठावंत सेवकांच्या मुलाबाळांना काहीतरी मान द्यावा महाराजांना मनोमन वाटत होते. त्यांनी हिरोजी फर्जद यांचा मुलगा बकाजी फर्जद याला खामगाव मावळ येथील कायमस्वरूपी पाटीलकी दिली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ सप्टेंबर इ.स.१६७९ उत्तर हिंदुस्थानातील प्रबळ हिंदू राज्यापैकी एक म्हणजे मारवाड.त्याचा प्रमुख म्हणजे महाराजा जसवंतसिंह. मिर्झाराजे जयसिंहाच्या मृत्यूनंतर मुघल दरबारातील प्रमुख हिंदू सरदार म्हणजे जसवंतसिंह. १० डिसेंबर १६७८ ला जसवंतसिंह खैबर खिंडीतील मुघल ठाण्याच्या बंदोबस्ताच्या कामावर असताना मरण पावला. ही बातमी समजताच औरंगजेबाने तात्काळ मारवाड ताब्यात घेतले.सगळे राजपूत सैन्य अफगानिस्तानात असल्याने मुघलांना कोणताही प्रतिकार झाला नाही.पुढे जसवंतसिंहाचा वारस अजितसिंग आणि जसवंतसिंहाच्या राण्या यांना घेऊन दुर्गादास राठोड याने बंडाची हालचाल केल्याने औरंगजेबाने त्यांना कैद करण्याचा प्रयत्न केला. पण यातून राठोड निसटून मारवाडला गेले.मारवाड पुन्हा जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहजादा अकबराच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले होते.स्वतः बादशहाहीअजमेरला निघाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ सप्टेंबर इ.स.१७३६ जंजिरेकर सिद्धी व मराठे यांच्यात ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली मराठी फौजा १७३१-३२ पर्यंत विविध कारणास्तव विविध ठिकाणी अडकलेल्या मराठी फौजा इ.स.१७३२-३३ मध्ये मोकळ्या झाल्या. थोरल्या बाजीरावने फेब्रुवारी १७३२ ला कुलाब्याला जाऊन सेखोजी आन्ग्रेशी बोलणी केली. ब्रह्मेंद्र स्वामींच्या सततच्या टोचणीमुळे शेवटी इ.स.१७३३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धीस शासन करण्यासाठी कारवाई करण्याचे ठरविले. त्याच दरम्यान फेब्रुवारी १७३३ मध्ये याकुत्खान मरण पावला व त्याचा मोठा मुलगा अब्दुर रहमान मराठ्यांच्या आश्रयाला आला. उन्हाळा सुरु असताना छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्याच्या हाताखाली एक फौज राजपुरी, जंजिऱ्यावर तर प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली दुसरी फौज राजगड व आसपासचा भाग काबीज करण्यासाठी रवाना केली. मराठी लष्कर अचानक चालून आल्यामुळे त्याला फारसा प्रतिकार झाला नाही व सिद्धीचे सरदार किल्ल्यात पळून गेले.पेशव्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या तसेच सिद्धीची रसद तोडण्यासाठी तो सर्वस्वी सेखोजी आंग्रे वर अवलंबून होता ज्याला छत्रपतींनी आपल्या मुलखात हस्तक्षेप करणे आवडले नव्हते. परिणामी तो ताबडतोब पेशव्याच्या मदतीस आला नाही. इकडे सिद्धी सरदारांनी मुंबईकर इंग्रजांशी संधान बांधून इंग्रजी आरमार जंजिऱ्यात आणले. पावसाळा पण जवळ आला होता.पेशव्याने जंजिरा सर करणे अवघड असल्याचे छत्रपतीना कळविले व रायगड तेथील किल्लेदाराला लाच देऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण बातमी फुटून दिलेले पैसे वाया गेले.पुन्हा साताऱ्याहून पैसे मागवि पर्यंत प्रतिनिधीच्या फौजा २५ मे ला रायगडला पोहचल्या व त्यांनी ८ जून ला किल्ला सर केला. प्रतिनिधी व पेश्व्यातील परस्पर स्पर्धा, आकस इ.मुळे त्यांच्या फौजात परस्पर सहकार्य कठीण झाले. पेशव्याने छत्रपतीना पत्र लिहून इंग्रजांच्या मध्यस्थीने युद्धबंदी घडवून आणली व बाजीराव ११ डिसेम्बर १७३३ ला जंजिर्याचा वेढा उठवून निघून गेला. पेशवा परतताच सिद्धीच्या सरदाराना चेव येऊन त्यांनी मराठ्यांनी जिंकलेल्या ठिकाणांवर, रायगडावर हल्ले सुरु केले. छत्रपतींनी धावाधाव करून फौज जमवून कोंकणात रवाना केली. पाचाड जवळ १० जानेवारी १७३४ ला सिद्धी लष्कराला मराठ्यांनी घेरून त्यांचा धुव्वा उडवला, प्रमुख सरदार सिद्धी अंबर अफवानी त्यात मारला गेला. सेखोजी आंग्रे १७३३ मध्ये मृत्यू पावला. त्याच्या नंतर सरखेल झालेला संभाजी पेशवे व सातारा दरबार बरोबर फटकून वागायचा. त्यामुळे अलिबागला पेशव्याने मानाजी अंग्रेस नेमले होते. चिमाजी अप्पा १८ एप्रिल १७३६ ला रेवस जवळ फौज घेऊन दाखल झाला. ह्या फौजेने सिद्धी सात, सिद्धी याकुब, सुभानजी घाटगे आदी सिद्धी सरदाराना ठार केले व सिद्धी चा शेवट केला. शेवटी २५ सप्टेंबर १७३६ ला पूर्वी ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली ‘’युद्धाचे वर्तमान तपशीलवार श्रवण करून राजश्री स्वामी ( छत्रपती शाहू महाराज ) बहुत संतोष पावले.भांडी मारिली,नौबत वाजविली,खुशाली केली.सिद्धी साता सारखा गनीम मारिला,हे कर्म सामान्य ण केले ऐसा स्तुतिवाद वारंवार केला.आप्पास वस्त्रे व पदक व तलवार बहुमान पाठवला.तसाच मानाजी आंग्रे यांचाही बहुमान केला.’’ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ सप्टेंबर इ.स.१७८३ पार्वतीबाई सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा स्मृतिदिन आपले पती भाऊसाहेब हे कधीतरी पाणीपतावरून परत येतील या भाबड्या आशेवर विधवा आणि सधवेच्या सीमारेषेवर पार्वतीबाईंची चातकी होरपळ आयुष्यभर मनाचा ठाव घेणारी ठरली. पार्वतीबाईंनी मराठा साम्राज्यात अनेक चढ-उतार पाहिले .न्युमोनिया मुळे २५ सप्टेंबर १७८३ मधे पार्वती बाईंचे निधन झाले. सदाशिवराव भाऊंची सती म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिवराव भाऊंच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या, पानिपतच्या कोलाहलात शत्रूच्या हाती लागू नये म्हणून व जर लागलोच तर स्वतःची शाखा करू पाहण्यासाठी जवळ जंबिया बाळगणार्या पार्वतीबाई आपल्या पतीला म्हणते," एकदा क्षत्रिय व्रत स्वीकारले की शाका नाकारण्यात काही अर्थ?.... मी तुमची सांगातीन होईन." असे वचन देणारी पार्वती, पानिपतच्या युद्धानंतरही संपूर्ण आयुष्यभर भाऊसाहेबांची वाट पाहत बसल्या होत्या .त्यांना तोतयाच्या बंडालाही सामोरे जावे लागले. अशा या अत्यंत प्रेमळ ,भाबड्या, भावनाशील , करारी,क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या पार्वतीबाई पेशवीन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २५ सप्टेंबर इ.स.१८१५ १८१४ सालीं त्रिंबकजीनें गुजराथेंत सरकारी फौज पाठवून गायकवाडांकडे इजार्‍यानें असलेले प्रांत ताब्यांत घेतले. कारण यावेळीं गायकवाडाचा गुजराथ इजार्‍यांचा करार संपला होता व नवीन करार करवायाची गायकवाडाची इच्छा होती. त्यासाठीं त्यांचा दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन हा पुण्यास पेशव्यांकडे आला. शास्त्री फार हट्टी, हेकट व इंग्रजांच्या बळावर सर्वांस तुच्छ लेखणारा होता. गायकवाडांकडे सरकारची बाकी १ कोटी निघाली. ती देऊन मग वाटल्यास पुन्हा इजारा देण्यांत येईल असें दरबारांत ठरलें; परंतु गायकवाडांनी (शास्त्र्यानें) तें नाकारिलें व हें प्रकरण चिघळत चाललें. इतक्यांत पंढरपुरास शास्त्र्याचा खून झाला. या खुनाचा आरोप इंग्रजांनीं त्रिंबकजीवर केला; परंतु यास स्पष्ट आधार त्यांनीं दिले नाहींत. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीनें केला नाहीं उलट गायकवाडींतील शास्त्रायाच्या विरुद्ध पक्षांतील लोकांनींच केला असें ठरत आहे. त्यावेळीं सिताराम नांवाच्या एकप्रभु माणसाची खटपट शास्त्रयाऐवजीं आपल्याला गायकवाडाची दिवाणगिरी मिळावी अशी होती. त्यासाठीं त्यानें फौज जमविली होती व याच सुमारास इंग्रजांनीं त्याला कैदेतहि ठेविलें होतें; यावरुन त्याच्या पक्षाकडून हा खून झाला असावा. इंग्रज त्याला दिवाणगिरी देत नव्हते. शिवाय शास्त्र्यांचा खून करण्यांत पेशव्यांचा (अर्थांत् त्रिंबकजींचा) मुळीच फायदा नव्हता, कारण त्यामुळें गुजरात हातची जात होती, उलट जिवंत राखण्यांतच फायदा होता असें क.वॉलेस म्हणत. अर्थात् आपल्या मार्गांतील कांटा काढण्यासाठीं इंग्रजांनीं खुनाचा आरोप त्रिंबकजीवर केला. त्रिंबकजीनें आपला खुनाशीं कांही संबंध नाहीं किंवा आपणांस त्यासंबंधीं कांहीं माहितीहि नाहीं असे चक्क सांगितले. तथापि इंग्रज रेसिडेंटानें आपल्या फौजेच्या बळावर त्रिंबकजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयीं बाजीरावाच्या मागें लकडा लावला. पण बाजीराव त्यास इंग्रजांच्या हवालीं करण्यास कांकूं करूं लागला. शेवटीं नाइलाजानें बाजीरांवानें त्रिंबकजीस वसंतगड किल्ल्यांत अटकेंत ठेविलें; तरीहि इंग्रजांचें समाधान न होतां त्यांनीं त्रिंबकजीस आपल्याच हवालीं करण्याचा तगादा लाविला तेव्हां गांगरून (आणि अंगीं धैर्य नसल्यानें) बाजीरावानें त्यास इंग्रजांच्या स्वाधीन केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २५ सप्टेंबर इ.स.१८१९ छत्रपती प्रतापसिंह महाराज व इंग्रजांच्यात अकरा कलमी तह १८०८ मध्ये धाकटे शाहू महाराज मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह याला राज्याभिषेक करण्यात आला. प्रताप सिंह अल्पवयीन असल्याने प्रारंभीची काही वर्षे कारभार मातोश्री माईसाहेब बघत असत. १८११-१२ पर्यंत तरी छत्रपती आणि बाजीराव यांचे संबंध चांगले होते. त्यानंतर हे संबंध उत्तरोत्तर बिघडत गेले,पुणे दरबार कडून छत्रपतींच्या खर्चासाठी देण्यात येणाऱ्या रकमा कमी पडत गेल्या, छत्रपती न साठीचे नजराणे पण साताऱ्या ऐवजी पुण्यात वळवले जात, वगैरे बऱ्याच तक्रारी, गाऱ्हाणी छत्रपतींनी बाजीरावाकडे केल्या होत्या. छत्रपती असूनही कैद्या सारखी अवस्था, पारतंत्र्य, बाजीरावच्या स्वतःच्या स्थानाचा पण भरोसा नाही, अशा स्थितीत प्रतापसिंह महाराजांनी नरसू काकडे व बळवंत मल्हार चिटणीस ह्या विश्वासू लोकांमार्फत इंग्रजांशी-एलफिस्टन -बरोबर बोलणी सुरु केली. हे बाजीरावास कळताच त्याने 'आम्हास अनुकूल असावे' अशी छत्रपती प्रतापसिंह न माहुली मुक्कामी विनंती केली, छत्रपतींचे लढाई च्या काळात महत्व जाणून बाजीरावाने महाराजांना इंग्रजां बरोबरच्या संघर्षात आपल्या सोबतच ठेवले होते. परंतु छत्रपती व इंग्रज ह्यांच्यात आधी ठरल्या प्रमाणे आष्टी मुक्कामी जनरल स्मिथ ने बाजीराव वर छापा टाकला, जनरल स्मिथच्या फौजेत प्रतापसिंह, मातोश्री व अन्य कुटुंबीय मिसळले. यापूर्वीच इंग्रजांनी सातारा शहर व किल्ला काबीज केला होता पण राजा अध्याप हाती आला नव्हता. एल्फिनसटन व प्रतापसिंह यांची प्रथम भेट ४ मार्च १८१८ रोजी बेलसर( सातारा) येथे जनरल स्मिथच्या तळावर झाली. १० एप्रिल १८१८ ला प्रताप सिंह महाराजांनी सातार्यात प्रवेश केला, याच दिवशी इंग्रजांनी त्यांची 'राजा'म्हणून पुनःस्थापना केली. जेम्स ग्रांट डफ ची पोलिटिकल agent म्हणून नेमणूक झाली. छत्रपती प्रतापसिंह गादीवर आरूढ जरी एप्रिल १८१८ मध्ये झाले होते तरी इंग्रजांबरोबर तह होण्यास सप्टेंबर १८१९ उजाडावा लागला कारण तोपर्यंत बाजीराव पूर्णपणे शरण आला नव्हता. कंपनी सरकार व प्रतापसिंह महाराज ह्यांचात २५ सप्टेंबर १८१९ ला अकरा कलमी तह झाला. राज्यकारभारा मध्ये प्रतापसिंह तयार झाल्यावर राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण असे सातारा राज्य प्रतापसिंह ह्यांना ग्रांट डफ ने सोपविले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - vhe great G R El M1R11 F WARRLORs शिवदिनविशेण SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil २५ सप्टेंबर इ.स. १६७५ छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जद यांचा मुलगा बकाजी फर्जद यांना खामगाव मावळ येथील कायमस्वरूपी पाटीलकी दिली. The , qreat maratha warriors the greal maralhawarriors Ihe greal maralhauarriors vhe great G R El M1R11 F WARRLORs शिवदिनविशेण SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil २५ सप्टेंबर इ.स. १६७५ छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जद यांचा मुलगा बकाजी फर्जद यांना खामगाव मावळ येथील कायमस्वरूपी पाटीलकी दिली. The , qreat maratha warriors the greal maralhawarriors Ihe greal maralhauarriors - ShareChat
असेच शेतीत सुरू राहीले तर उद्या...... ‘भारता’ कडे बघत ‘इंडिया’ कळवळून म्हणाला - तुला सारे शेअर्स देतो, एक कप दूध दे तुला कंपन्यांचे बॉन्ड देतो ,एक भाजीची जुडी दे क्रेडिट कार्डचा गठ्ठा देतो ,फक्त कोबीचा गड्डा दे प्लॉट नावावर करून देतो ,फक्त एक भाकर दे ------------------------------------------------ तेव्हा वैतागून शेतकरी म्हणाला.. शेअरच्या ‘बुल’ची करा शेती ‘बॉन्ड’ची भाजी करून खा ‘सेन्सेक्स’ची आज करा उसळ क्रेडिट कार्ड पिळून काढा दूध.. सोने खाणारा मिडास राजा आज इंडियात भेटतो आहे शेतीच्या बांधा बांधावर,भुकेचा अंगार पेटतो आहे .. #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #😍मान्सून फॅशन टिप्स😍 #🌹पावसाळी फुले🌹 #☔मान्सून ब्युटी टिप्स💄 #🏛️राजकारण
🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ - ShareChat
00:15
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६५६ (अश्विन वद्य १ शके १५७८ प्रतिपदा वार बुधवार) सुपे परगणा स्वराज्यात दाखल! महाराजांनी मोहीते मामांना पत्र पाठवले की, "पागा घेऊन पुणे मुक्कामी येणे" पण मोहीते मामांनी महाराजांचे पत्र आणणार्‍या जासुदासमोर उर्मट जाबसाल करताना म्हटले की "शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत. हुकूम करितात आणि राज्यात पुंडावे करून ठाणी बसवितात हे राजांच्या प्रतिष्ठेवरी निभावले होते. याउपरी फैल (=पुंडावा) केला तरी राजांची शोभा राहणार नाही आणि हेही प्राणेकरून वाचणार नाहीत. काही आपले पायाकडे पाहून करावे. म्हणजे मामांनी भाच्यालाच "प्रौढ" उपदेश केला. आपल्याच तोऱ्यात वावरणाऱ्या मामांनी पत्राचा जबाब पेश केला नाही की ते स्वतःही महाराजांच्या भेटीस गेले नाहीत. महाराजांच्या सूचनेकडे त्यांनी सरळसरळ दुर्लक्ष केले. संभाजी मामा हे जसे शहाजीराजेंचे शालक व महाराजांचे मामा होते तसेच ते शहाजीराजेंचे व्याहीही होते. म्हणजे मामाची मुलगी अन्नुबाई ही शहाजीराजेंचे पुत्र व्यंकोजीराजे यांना दिली होती. बहुधा या नाते संबंधांमुळे महाराज आपणास हात लावणार नाहीत असा मोहीते मामांचा अंदाज असावा. पण मामा बऱ्या बोलाने वळत नाहीत हे लक्षात येताच महाराजांनी इ.स.१६५६ च्या अश्विनात दसरा उलटल्यावर अकस्मात सुप्यावर हल्ला चढविला. गढीत फारसे बळ नव्हतेच. सुपे लगेच महाराजांच्या ताब्यात आले. महाराजांनी क्षणार्धात मोहीतेमामांना कैद केले. गढीत बरेच द्रव्य कापडचोपड, वस्तू व पागेत ३०० घोडे होते. हे सर्व महाराजांनी जप्त केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/XSUNBCNI2Zc?feature=share 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७१ छत्रपती शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर १६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७४ ( अश्विन शुद्ध पंचमी, शके १५९६, संवत्सर आनंद, गुरुवार ) शिवरायांचा दुसरा राजाभिषेक :- छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का करून घेतला? तो कोणी व कसा केला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का? स्वराज्य चे स्वप्न २ पिढ्यांनी पाहिले होते. फर्जंद महाराजा शहाजीराजेंनी अथक प्रयत्न करून केलेल्या पायाभरणी वर त्यांच्या पुत्र शिवरायांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत सुवर्ण कळस चढविले आणि ह्या मायभूमीचे पांग फेडले. ई. स. १६७४ साली रायगडावर अवघ्या इतिहासाच्या साक्षीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला. अखेर मराठी मातीला गादी मिळाली. हिंदूंचे तख्त निर्माण झाले. ह्या म्लेंच्छ बादशाही मध्ये एक मऱ्हाटा एवढा पातशहा झाला. ६ जून, १६७४ साली झालेला राज्याभिषेक सोहळा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. परंतु, त्याच्या २-३ महिन्यांच्या नंतर सप्टेंबर महिन्यात शिवरायांनी अजुन एक* *राज्याभिषेक करुवून घेतला , तो म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक. ह्या राज्याभिषेकाबद्दल ची माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे लिखित " शिवराज राज्याभिषेक कल्पतरू " नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा ई. स. १६९९ मध्ये लिहलेला असून तो संस्कृत भाषेत होते. आज ही पोथी Indian Asiatic Society, Calcutta मध्ये ठेवण्यात आली आहे. तांत्रिक राज्याभिषेकाच्या पौरोहित्य हे निश्चल पुरी गोसावी ह्यांनी केले. ते गोसावी पंथाचे असून यजुर्वेदाचे निष्णात अभ्यासक होते. ते मूळचे वाराणशीचे होते. निश्चल पुरींनी हा तांत्रिक राज्याभिषेक " आनंद नाम संवत्सर अश्विन शुद्ध पंचमी " ह्या तिथीला (म्हणजेच २४ सप्टेंबर, १६७४) प्रातःकाळी उठून कलश स्थापन करून राज्याभिषेक विधी सुरू केला. उपलब्ध पोथी मध्ये एकूण ८ शाखा (भाग) आहेत. ह्यातील पहिल्या ४ प्रकरणात निश्चल पुरी आणि गोविंद बर्वे ची झालेली भेट आणि वैदिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. ५ व्या प्रकरणात निश्चल पुरी नी केलेल्या तीर्थ यात्रेचे वर्णन तसेच महाराजांनी निश्चल पुरीस केलेली विनंती, असा गोषवारा आहे. ६ व्या आणि ७ व्या प्रकरणात तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. तसेच ८ व्या प्रकरणात राज्याभिषेकाचा महाराजांवर झालेल्या परिणामाचे वर्णन केलेले आहे. हा विधी फक्त एका दिवसाचा होता. निश्चल पुरींनी प्रातःकाळी उठुन कलश स्थापना केली. त्यानंतर सर्व पूजा विधी तंत्रानुसार केली. नाना रंगानी आकर्षक बनवलेले मेरुयंत्र यंत्र उचलून घेतले. ललित पंचमीच्या योगावर अभिषेकाचा महोत्सव झाला. ते स्थान छतानी आणि खांबानी सुशोभित झाले होते. मंडपानी अलंक्रुत झालेले होते. त्यानंतर सिहासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशांची पुजा करुन भुमी विधीपुर्वक शुद्ध केली. ती पंचरत्नानी पुर्ण केली. त्यानंतर सिंहासाठी बळी अर्पण केले. आसनाच्या पूर्व दिशेस हर्यक्ष नावाच्या सिंहास पशुचा बळी दिला. दक्षिणेला पंचास्य नावाच्या यमाला घाबरविणारा स्थापन केला व बळी दिला. नैऋत्येला केसरी नावाचा बळीचे भरपूर भोजन करणारा स्थापन केला व बळी आर्पण केला. पश्चिम बाजुस मृगेंद्र स्थापन करून बळी दिला. वायव्येला शार्दुल स्थापित करुन त्यास पशुचा बळी दिला. उत्तरेला गजेंद्र स्थापन करून त्यास पशुचा बळी दिला. शंकराच्या दिशेला बळीचे रक्षण करणारा हरी नियुक्त केला. अशाप्रकारे आठ जणाच्या पाठीवर आसन स्थिर केले. निश्चल पूरीनी रत्नमय वेदीवर रुप्याचे मोठे आसन स्थापित केले आणी अभिषेकासाठी महाराजांना त्यावर बसवले. तेथे आठ दिशेला आठ कलश स्थापन केले आणि त्याची रत्नानी पूजा केली. त्यानंतर त्यांनी महाराजांना आसनावर बसविले. स्वजनाना दुर पाठवुन सर्व आवयवाना शुभप्रद अशा महामंत्रानी वेष्टन घातले. त्यावेळी राजसभेत नगारा वगैरेवाद्ये वाजविली जात होती. वेदपारंगत ब्राह्मण साममंत्र गात होते. त्यानंतर महाराजांनी नवीन वस्त्रे परिधान केले व अन्नाच्या पर्वतास नैवेद्य दाखवला.त्यामुळे रायरी पर्वत संतुष्ट झाला.त्यानंतर निश्चलने महाराजाना विद्येचा उपदेश केला. त्यानंतर महाराजानी घरात प्रवेशकेला व भोजन करुन राजसभेकडे आले. या विधीत दहा महामंत्र,राजराजेश्वरी विद्या, ब्रह्मस्त्र महाविद्या व ६४ तंत्र विद्या महाराजाना दिल्या, असे ह्या पोथी मध्ये लिहला आहे. निश्चलपुरी गोसावी नी दुसरा राज्याभिषेक केला.तमाम इतिहासकारांनी संभाजी महाराजांना शाक्त पंथ चे पूजक असल्याचे आरोप केले अन निश्चलपुरी गोसावी हे पण शाक्त पंथांचे होते . शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा वेदिक पद्धतीने गागाभट्ट यांनी केला. गागाभट्ट ने त्यानुसार शिवाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्या शी चर्चा करून राज्यभिषेक रायगड वर करण्याचा निर्णय घेतला. १४ व्या आणि १५ स्या शतकात पैठण हे विद्वानांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते.तिथेच भट्ट आणि शेष नावाचे दोन घर प्रसिद्ध होते.भट्ट यांच्याच घरातील गोविंद भट्ट हा पैठणहून काशीस गेले आणि त्यांच्या च घरात हे गागाभट्ट जन्माला आले होते. अकबर च्या कारकिर्दीत शेष नावाचे यांनी शुद्रचार्शिरोमनी ग्रंथ लिहिला आणि त्यात लीहाले की क्षत्रिय या जगात संपले याचाच समाचार गागाभट्ट यांनी कर्यास्याधर्मपदिप नावाचं एक ग्रंथ लिहिला आहे.त्यात त्यांनी शुद्रचार्शिरोमनी नावाच्या ग्रंथाचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात काही शतके असा राज्यभिषेक झाला नव्हता आणि खिलजी च्या आक्रमण नंतर अशी विद्वान लोक शिल्लक नव्हती.त्यामुळे या शेष घराण्याचे मत शिवाजी महाराजांना मानावल नाही बाळाजीआवाजी, केशावभट्ट , भालचंद्र भट्ट यांनी राजस्थानला जाऊन सर्व महाराजांच्या कुळाची माहिती घेतली. रीतीने ६ जून १६७४ ला पहिला राज्यभिषक झाला. याच राज्यभिषेक ल निश्चलपुरी गोसावी आमंत्रित म्हणून उपस्थित होते. राज्यभिषेक नंतर ते कोकणात सर्व क्षेत्री फिरले तिथे त्यांनी गोविंद या ब्राम्हण विद्वान ना भेटले आणि राज्यभिषेक ची माहिती दिली. त्यात त्यांनी घटना सांगितल्या शिवाय पहिला राज्यभिषेक झाल्यावर निश्चलपुरी नी शिवाजी महाराज ना जाताना सांगितले की राजा १३ व्य, २२ व्यां ,५५ व्यं आणि ६५ दिवशी खेद जनक गोष्टी घडतील. १३ व दिवशी जिजाबाई आऊसाहेबांचे निधन झाले.रायगडवर हत्ती मरण पावला. १) राज्यभिषेक अगोदर राजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले २) राज्यभिषेक आधी सेनापती गुर्जर यांचे पण निधन झाले ३) राज्यभिषेक का वेळी गायोच्युदेश च्यां आदल्या रात्री उल्कापात झाला. ४) राज्यभिषेक च्याच वेळी शिवाजी महाराजांनी पुनः आपल्या पत्नीशी विवाह केला जे अपशकुनी होते असे निश्चलपुरी चे म्हणणे होते ५) सुवर्णतुला वेळीस एक लाकूड पडले आणि गागाभट्ट च्या नाकास लागले ६) गागाभट्ट ने त्याच्या ब्राम्हणांना आहेत दिला याच राग पण निश्चलपुरी ने बोलून दाखविला ७) राज्यभिषेक वेळी बळभट्टाच्या अंगावर लाकडी फुले पडले ८) निश्चलपुरी मात्र राज्याभिषेक हा कुमुहूर्तावर होता ९) स्थानिक देवांचे पूजन आणि बलिदान न दिल्यामुळे निश्चलपुरी बोलले की राज्यभिषेक अपशकुनी झाला आहे.रायगडवर शिकाई देवीची पूजा केली नाही.कोकण रक्षक भार्गव ची पूजा केली नाही.हनुमान आणि वेताळ ल पुजले नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स १६८४ (भाद्रपद वद्य १०, दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर वार बुधवार) फितुरी सुरुच! राअंदाजखानाच्या कौलनाम्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा नोकर भद्रोजी हा चाकरीच्या आशेने आला. त्यास मनसब येईपर्यंत रोजीना दिला जावा असा हुकूम खंडोजी हासुद्धा काझी हैदर याच्या मध्यस्थी मार्फत मुगलांकडे आले त्यांना मनसदी व त्यांचा उत्कर्ष करण्याचा हुकूम देण्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ सप्टेंबर इ.स.१६९० छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात स्वराज्यातील अनेक वतनदार मुघलांच्या सेवेत जायला सुरुवात झाली होती. याला प्रमुख कारण होते वतनदारांची वतनाप्रती असलेली आसक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीला विरोध होता. त्यांनी वतने सरकारजमा केली होती व त्यांच्या सेवेबद्दल रोख रक्कम म्हणजे वेतन द्यायला सुरुवात केली होती. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय बदलावा लागला. वतनदार मंडळी स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी महाराजाना देशमुख, देशकुलकर्णी,मोकदम व इतरांची वतने परत करावी लागली. छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला ते आपल्याला मुठेखोरेच्या हवालदार व कारकून यांना मावळ प्रांताचे सुभेदार महादजी शामराज यांनी पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स.१७०९ "राजा शाहू मोठी फौज घेऊन चंदनगडातून बाहेर पडला ,त्याने मराठे सरदारास आज्ञा केली, बादशाहने सरदेशमुखी वतन आम्हास बहाल केले आहे, तुम्ही उत्तर प्रांतातून त्याचा वसूल आणा , चौथाईचा वसूल यावयाचा तो आला नसेल तर बादशाही "खजिने लुटून " भरपाई करून घ्या ." हे आदेश मोगलांनी नोंदविलेले आहेत व ते उत्तरेशी संबंधित आहेत. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २४ सप्टेंबर इ.स.१७२४ पेशवे बाजीराव यांची निजामाशी दिनांक १८ मे सन १७२४ रोजी नालछा येथे भेट झाली. मुबारिजखान याच्या विरोधात निजामास मदत करण्याचे पेशवा बाजीराव यांनी आश्वासन दिले. चारच महिन्यांनी म्हणजे सन १७२४ च्या सप्टेंबर महिन्यात पेशवा बाजीराव यांनी पातशाही सुभेदार मुबारिजखान याचा सपशेल पराभव केला. हा पराक्रम पाहून निजामाने पेशवा बाजीराव यांना "शहामतपनाह" हा किताब दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ सप्टेंबर इ.स.१८६१ मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ सप्टेंबर इ.स.१८७३ महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. - “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।” जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - (HE greAt Maratha WAPTIUTS MA RA THA WA RR10 R $  ٢ 4 ٥ G R E A T SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेण Rahul Borse Patil २४ सप्टेंबर इ.स. १६७१ छत्रपती शिवाजी महाराजांची कोकणातील दाभोळ येथील अंतर्गत व्यापारावर करडी नजर. Ihe qreal maraihauarriors the greal marathawarriors Ihe greal marathawarriors (HE greAt Maratha WAPTIUTS MA RA THA WA RR10 R $  ٢ 4 ٥ G R E A T SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेण Rahul Borse Patil २४ सप्टेंबर इ.स. १६७१ छत्रपती शिवाजी महाराजांची कोकणातील दाभोळ येथील अंतर्गत व्यापारावर करडी नजर. Ihe qreal maraihauarriors the greal marathawarriors Ihe greal marathawarriors - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २३ सप्टेंबर इ.स.१६४३ अदिलशहाने पोर्तुगीजांना पत्र पाठवले, त्यांच्या चौल किल्ल्याच्या परिसरात याकुतशहा व फत्तेखान हे २ बंडखोर आणि ज्याला ते मलिक म्हणतात असा १ मुलगा अशा तिघांना आश्रय दिला आहे त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या मुलखातून हाकलून द्यावे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/o0iZcQgZJOY 📜 २३ सप्टेंबर इ.स.१६६३ नेतोजीरावांबद्दलचा एक महजर! एक महजर उपलब्ध आहे. त्यानुसार, सावजी बिन धारोजी मोकदम हे दोघे पाटिलकीच्या गर्गश्याबद्दल भांडत होते. त्यावेळी "राजेश्री नेतोजी पालकर वृत्तीचे निवाडे दुरदृष्टीने विचारून करिताती अशी लौकिकातील नेतोजीरावांबद्दलची धारणा ऐकूनच ते दोघे त्यांच्याकडे आले. नेतोजीरावांनी दोघांचीही बाजू नीट ऐकून घेऊन महाबळेश्वरास मनुष्य पाठवून विद्यानेश्वरी आणविली आणि विद्वंस याच्या मुखांतरे विद्यानेश्वरामध्ये वृत्तीच्या विशेष विवंचना ज्या होत्या त्या संपूर्ण मनास आणून धर्मशास्त्राचा मथितार्थ काढून निवाडा केला. तेव्हा अशा दूरदर्शी, विवेकी नेतोजीरावांचे महाराजांना सोडून जाणे सर्वांनाच विलक्षण आश्चर्यकारक वाटले असल्यास नवल नाही. तो महाराजांचा राजकारणी डाव होता. असेल असे वाटते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ सप्टेंबर इ.स.१६६४ छत्रपती शिवाजी राजांना शिक्षा करण्यासाठी आपल्या सर्व दरबारासह औरंगजेब बादशहा दक्षिणेत यायचा विचार करत आहे. तथापि ते घडले नाही कारण म्हणजे खुद्द औरंगजेबाला मनातून वाटणारी शिवाजी राजा बद्दलची भीती. हा राजा हजारो सैनिकांच्या पहाऱ्यात असणाऱ्या आपल्या मामाच्या जनानखान्यात शिरला व त्यास तेथे जखमी केले. तेव्हा आपल्याला तशी वेळ येण्याची शक्यता आहे असे त्यास वाटत होते.डच व्यापार्यांनी आपल्या बातमीपत्रात केलेली नोंद. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ सप्टेंबर इ.स.१६७४ (अश्विन शुद्ध शके १५९६, पंचमी, वार बुधवार) महाराजांचा दुसरा राज्याभिषेक संपन्न! किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ आटोपल्यावर काही दिवसातच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे निधन झाले. राज्याभिषेक समारंभपूर्वीही फेब्रुवारी महिन्यात सरनौबत प्रतापराव गुजर तर मार्च महिन्यात महाराणी काशीबाईसाहेब मरण पावल्या. या अशुभ घटनांच्या पार्श्वभूमीवर शाक्त पंडित निश्चलपुरी गोसावी यांच्या सांगण्यावरून महाराजांनी आपला दुसरा राज्यभिषेक तांत्रिक पद्धतीने करायचा ठरवले. त्यानुसार कुंभ लग्नावर आयुष्यमान योग् असताना, अनुराधा नक्षत्र व वार बुधवार असताना म्हणजे अमृतसिद्धी योगाच्या दिवशी सकाळी कलशपूजन करून भूमी समंत्रक शुद्ध करून सिंहासन मांडले गेले. राज्यसभेच्या द्वारावर तसेच सिंहासनावरील सिंहाना व सिंहासनाला बळी दिले गेले. आणि एका रत्नखचित उच्चासनावर एक रौप्य आसन ठेऊन महाराजाना त्यावर बसवून मुख्य समारंभ संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा तांत्रिक निश्चलपुरी गोसावी कडून राज्याभिषेक झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ सप्टेंबर इ.स.१६८३ छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजाना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या ताब्यातील उत्तर कोकणातील चौलवर हल्ला केला,चौल मराठ्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील फोंडा किल्ल्यावर हल्ला करायचे व मराठी मुलखात लूटमार करायचे ठरवले. कारवारकर इंग्रजांच्या नोंदीनुसार सप्टेंबर महिन्यात व्हाइसरॉय मराठ्यांचे मुलाखत लूटमार करत होता इंग्रजांच्या दुसऱ्या एका नोंदीनुसार पोर्तुगीज अमानुष कृत्य करत असून ते जिवंत माणसे जाळतात व देवळेही पाडत असल्याचे लिहिले आहे. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे त्या भागात त्यांच्या पोर्तुगीजशी सतत चकमकी सुरू होत्या. यासंदर्भातील इंग्रजांची नोंद," लढाया तर जोरात व घोर रक्तपात होऊन चालत आहेत आणि रोजच्या रोज काहीना काही खटके उडतच आहेत". कारवारकर इंग्रजांनी पाठवलेल्या. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ सप्टेंबर इ.स.१७७४ नाना आहे तर पेशवाई आहे - छत्रपती रामराजा महाराज नारायणराव यांच्या खुनानंतर मराठेशाहीचा कारभार नाना फडणवीस यांनी समर्थपणे पेलला. मुत्सद्दीपणाचे जोरावर तब्बल पंचवीस वर्षे राज्य राखले. दरम्यानच्या काळात नानांना अस्तनीतही शत्रू निर्माण न झाले असते तर नवलच.. छत्रपतींचे राज्यावर किती बारीक लक्ष होते व नाना फडणवीस यांच्यावर किती भिस्त होती ते या पत्रातून समजते. छत्रपती रामराजा माहाराज बाबुराव कृष्ण यांचेमार्फत नानांना सतर्कतेने राहावे याबद्दल दिनांक २३ सप्टेंबर सन १७७४ रोजीच्या पत्राने कळवीत आहेत. "माझ्या पेशव्याचे अनाचे सार्थक नानाही केले.." "नाना आहे तर पेशवाई आहे.." असे छत्रपती रामराजा माहाराज गौरवाने म्हणत आहेत. यावरूनच नानांची महती आणि मराठेशाहीतील स्थान लक्षात येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ सप्टेंबर इ.स.१८०३ इंग्रज-मराठे यांची असईची लढाई ! शके १७२५ च्या आश्विन शु.७ या दिवशी इंग्रज-मराठे यांची असई येथे तुंबळ लढाई झाली. एकोणिसाव्या शतकापासूनच इंग्रज आपला 'पांढरा पाय' मराठी राज्यांत रोवीत होते. धनी चाजीराव नालायक निघाल्यामुळे मराठे सरदारांत फुटिर वृत्ति माजून इंग्रजांना चांगलीच संधि साधत होती. इंग्रज सेनानी स्टीव्हन्सन् आणि वस्ली हे दोघे नगर, औरंगाबाद, पैठण, वगैरे ठिकाणे काबीज करून पुण्याकडे येण्याच्या धोरणात होते. सदर ठिकाणे शिंदे-भोसले यांच्या ताब्यात होती. गनिमी काव्याने लढाई करावी हा भोसल्यांचा विचार ; उलट समोरासमोर लढून इंग्रजास नरम करावे असा शिंदेंचा बेत होता. वस्लीसारखा धूर्त सेनानायक मराठ्यांकडे नव्हता. दि. २३ ला नवलनी येथे वस्तीच्या फौजेचा मुक्काम होता. तेथून सहा मैलांवर केळणा नदीच्या आश्रयास शिंदे-भोसल्यांचा तळ होता. आश्विन शु. ७ सप्टेंबरला तुंबळ युद्ध झाले. तीच ही असईची लढाई होय. “ दीड प्रहरपर्यंत मारगीर बहुत झाली. शिंदेंच्या पलटणींनी वस्लीचा काट चालो दिला नाही.... लढाईत टोपीकराचे हजारबाराशे माणूस ठार व जखमी झाले. हिंदूचे शेपन्नास माणूस जाया व जखमी झाले. वस्ली चित्तांत खिन्न आहेत-" अशा प्रकारचे वर्णन मराठी कागदपत्रांत सांपडते. इंग्रज लेखक या संग्रामाचा मोठा बडेजाव करीत असले तरी दोघांची बरोबरी झाली, असे फार झाल्याप्त म्हणता येईल. असावध स्थितीत शिंदे असतांना वल्लीने एकाएकी छापा घातल्यामुळे--शिदेंकडील यादव भास्कर पडले. आणि शेपन्नास माणूस जाग्यावर ठार झाले. नंतर लढाई बिघडली-मराठ्यांचे यश हिरावले गेले ! या काळांत फितुरीमुळे मराठ्यांचे फारच नुकसान झालेले दिसते. ही फितुरी नसती तर शिस्त आणि शस्त्रास्त्रे यांच्या दृष्टीने असईच्या रणांगणावर शिंदेंच्या शिपायांना विजय सद्दज मिळाला असता. पण नुसत्या तोफा आणि नुसता दारूगोळा यांमुळे जय कप्ता मिळणार ? त्याच्या पाठी मागची माणसे ही तितकीच खंबीर असावी लागतात. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ सप्टेंबर इ.स.१८७३ महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. - “ विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होता. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ सप्टेंबर इ.स.१९३२ भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला… २१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे ५ मे १९११ रोजी झाला. ती लहानपणापासून अत्यंत हुशार होती, तिने फिलॉसॉफी विषयामध्ये पदवी प्राप्त केली.तिने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याच गावातील एका शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. पण त्यांना देशासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. १९३२ च्या दरम्यान त्या सुर्यसेन यांना भेटल्या. त्यावेळेस सुर्यसेन हे क्रांतिकरकांचे प्रेरणास्थान बनले होते, ब्रिटिशांकडून शस्त्र लुटण्याचे त्यांचे किस्से लोकांच्या ओठावरच होते. सुर्यसेन यांना भेटल्यानंतर त्यानीं आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतला,पण त्या महिला असल्या कारणाने त्यांना विरोध सुद्धा करण्यात आला. पण त्यांच्या मनात देशभक्ती उसळत होती. अशाप्रकारे त्या क्रांतिकारी गटातील सदस्य बनल्या. क्रांतिकारी गटात असतांना त्यांनी बरेच कारनामे सुद्धा केले होते जसे-टेलिग्राम ऑफिस वरील हल्ला,रिजर्व पोलिस लाईन ताब्यात घेणे अशा कामात त्या नेहमी पुढे असायच्या. जलालाबाद येथील क्रांतिकारी हमल्या दरम्यान त्यांनी स्फोटके नेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच सोपविण्यात आली होती. हल्ल्यासाठी २३ सप्टेंबर १९३२ हा दिवस ठरवण्यात आला होता. हल्ल्यासाठी निवडलेल्या क्रांतीकारकांना पोटॅशिअम सायनाईड देण्यात आलं होतं कारण कुणीही जिवंत पकडल्या जाऊ नये म्हणून. प्रीतीलताने हल्ल्यासाठी एका पंजाबी माणसा सारखी वेशभूषा केली होती. २३ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता यांनी त्या क्लब वर हल्ला केला. हल्ल्याच्यावेळेस क्लब मध्ये ४० इंग्रज अधिकारी आणि काही इंग्रज पोलीस उपस्थित होते. आग लागल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि एक गोळी प्रीतीलता ला लागली,इंग्रजांनी त्यांना घेरले. पण प्रीतीलता वड्डेदार यांनी एका क्षणाचाही विचार न करता सायनाईड ची गोळी घेतली आणि इंग्रजांना फक्त तिचा मृतदेह मिळाला. अशा प्रकारे फक्त २१व्या वर्षी अद्वितीय साहस दाखवत या भारत मातेच्या वीर मुलीने देशासाठी बलिदान दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - THE greatI LLSITaIaI aTTIIS / MARAT H A T H F G R B A1 WAR R 10 R $ शिवदिनविशेण SHVDINVISHESH CREATED BY Rohnl Borse Putil २३ सप्टेंबर इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पंडित निश्चलपुरी गोसावी कडून तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. Theoreol mornthouorriors The ಚreol moroihnuorriors The ಚreol morolhouorrlors THE greatI LLSITaIaI aTTIIS / MARAT H A T H F G R B A1 WAR R 10 R $ शिवदिनविशेण SHVDINVISHESH CREATED BY Rohnl Borse Putil २३ सप्टेंबर इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पंडित निश्चलपुरी गोसावी कडून तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. Theoreol mornthouorriors The ಚreol moroihnuorriors The ಚreol morolhouorrlors - ShareChat
🙇💐🙏🚩🙏💐🙇 #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
🚩शिवराय - ShareChat
00:15
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २२ सप्टेंबर इ.स.१४२२ यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने सप्टेंबर १६३६ मध्ये औसा किल्ला जिंकून घेतला व त्याने मुबारक खानाची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/EaekDChOtpw?feature=share 📜 २२ सप्टेंबर इ.स.१६६० जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले.पण पन्हाळ्याचे किल्लेदार त्र्यंबकपंत मात्र गड अजूनही लढवत होते.जौहरचा वेढा सुरू असतानाही महाराज गडातून निसटून गेल्याचे समजताच आदिलशहाला जौहरने फितुरी केल्याचा संशय आला.शिवाजी महाराज निसटून गेल्यावरही पन्हाळा अजून सिद्दीच्या ताब्यात आला नव्हता,त्यामुळे आदिलशहा स्वतःच मोठे सैन्य घेऊन पन्हाळा जिंकण्यासाठी मिरजेपर्यंत आला.इकडे मुघलांनीही चाकणचा संग्रामदुर्ग जिंकून स्वराज्याची नासाडी सुरू केली होती.दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढायला लागू नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्र्यंबकपंतांना निरोप पाठवला की पन्हाळा जौहरच्या स्वाधीन करून तुम्ही राजगडावर या.महाराजांचा निरोप मिळताच पंतांनी गड जौहरच्या हवाली केला.पन्हाळा किल्ला सिद्दी जौहरच्या ताब्यात गेला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २२ सप्टेंबर इ.स.१६८३ (अश्विन शुद्ध १२, द्वादशी, शके १६०५, रुधिरोद्वारी संवत्सर वार शनिवार) मराठ्यांचा पारसिक किल्ल्यावर हल्ला! मराठ्यांनी वसई येथील उभी पिके कापली. हे पारसीक गडावरील कॅप्टनला समजले. त्याने आपले २५ सैनिक पाठविले. मराठ्यांनी पळ काढण्याचा बहाणा केला. आपल्या पाठीवर पोर्तुगीज सैनिक घेऊन आपल्या तळा जवळ जेथे आपले ५०० सैनिक बसले होते तेथपर्यंत त्यांना आणले. पोर्तुगीज सैन्य पळू लागले. मराठ्यांनी त्यातील १९ लोकांना कापले. फक्त ६ लोकं पारसिकच्या किल्ल्यात पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ सप्टेंबर इ.स.१६८७ हरजीराजे महाडीक व केसोपंतही मुघलांस तोंड देण्यासाठी पुढे गेले होते. कासीमखान हा कुत्बशाहीचा नोकर असता त्याने ११ जुलैला म्हैसूरकरांची मदत घेऊन फौजेनिशी बंगलूर घेतले. तसेच कासीमने २७ सप्टेंबरला किल्लेदाराशी भेद करून पिळघेडे घेतले. केसोपंत, संतोजी व हरजी राजे हे आपल्या राज्यात मुघलांचा शिरकाव होऊ नये म्हणून मुघली सैन्याविरुद्ध जगदुमपर्यंत चालून गेले. केसोपंत सैन्याची आघाडी थोपवून धरण्यासाठी सप्टेंबर (१६८७) पर्यंत उभे होते. कुत्बशहा २२ सप्टेंबरला हवाली होण्यापूर्वीच कुत्बशहाचा अधिकारी कासीमखान हा मुघलांस शरण गेला. औरंगजेबाने त्यास कुत्बशाही मुलखाचा कारभार सांगितला. तेव्हा त्याने मुलूख घेण्यास सुरुवात केली. मुघल अधिकाऱ्याने कुत्बशहाचे पूर्वीचेच अधिकाऱ्यांना त्या त्या जागी ठेविले कारण त्यांना काढून टाकून नवीन अधिकाऱ्यास नेमल्यास काढून टाकलेले अधिकारी छत्रपती संभाजी राजांच्या बाजूस जातील अशी भीती औरंगजेबास वाटत होती. मुघलांनी गोवळकोंड्याच्या सुलतानाच्या राज्यातील सर्व मुलूख ताब्यात घेण्याचे ठरविले. मुघलांचे दहा हजार घोडेस्वार कर्नाटकात चालून गेले तेव्हा केसोपंत सरहद्दीवरून पळून गेला. नंतर हे घोडदळ कासीमखानाच्या नेतृत्वाखाली चंदी प्रदेशात शिरले व लुटमार करू लागले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २२ सप्टेंबर इ.स.१७६२ कोल्हापूर नरेश छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांचा राजाभिषेक सोहळा पन्हाळा किल्ल्यावर महाराणी जिजाबाईंनी पार पाडला होता. छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांना जिजाबाईं राणी साहेब यांनी खानवटकर भोसले घराण्यातून दत्तक घेतले होते . 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ सप्टेंबर इ.स.१८८७ शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊरावअण्णा पाटील यांची आज जयंती. महाराष्ट्रातील बहुजन रयतेला खरया अर्थाने शिक्षणाची द्वारे खुले करून देणारे कर्मयोगी "अण्णा .." महाराष्ट्रातील काणा-कोपऱ्यात शिक्षणाची गंगा पोचवणारे आधुनिक भगीरथ "अण्णा".. आज महारष्ट्रातील खेडोपाड्यात पोचलेल्या रयत शिक्षण संस्था नावाच्या एका अफाट वटवृक्षाचे रोपण करणारे कर्मवीर "अण्णा" चंदनापरी झिजून शिक्षणाचा सुगंध सर्वदूर पसरवणारे "अण्णा" वेळप्रसंगी घरदार इतकेच काय पण पत्नी लक्ष्मीबाईंचे स्त्रीधन हि गहाण ठेऊन "रयत" चा कारभार चालवणारे दानशूर "अण्णा".. अत्यंत बिकट परिस्थितीत सुधा स्वातंत्र्यवीरांचे आधारवड ठरलेले धैर्यवान "अण्णा".. आमच्या सारख्या लाखो जणांना जगण्यास लायक बनवणारे व मायेचे छत्र देणारे आमचे माता व पिता "अण्णा" आज त्यांच्या जन्मदिनानिम्मित त्यांना कोटी कोटी प्रणाम.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - ٥٧ ٥٨7 M;1 Warors G R E A T T H El M A R A T H A R R I 0 R S शिवदिनविशण SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | २२ सप्टेंबर इ.स. १६६० छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे त्र्यंबकपंतांनी किल्ले पन्हाळा सिद्दी जौहरच्या ২নাধীo কলা the great marathawarriors the_greal_maratha_warriors the great marathaWarriors ٥٧ ٥٨7 M;1 Warors G R E A T T H El M A R A T H A R R I 0 R S शिवदिनविशण SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | २२ सप्टेंबर इ.स. १६६० छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे त्र्यंबकपंतांनी किल्ले पन्हाळा सिद्दी जौहरच्या ২নাধীo কলা the great marathawarriors the_greal_maratha_warriors the great marathaWarriors - ShareChat