⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २० एप्रिल इ.स.१६६५
रात्रीच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळेस पुरंदर दिलेरखान व मिर्झा राजाविरूध्द झुंजत होता. मुघलांच्या नकळत मराठ्यांची एक नवीन तुकडी केदार दरवाजाने पुरंदरावर पोहचली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/1glTxtigMNM
📜 २० एप्रिल इ.स.१६७५
माहिती दडवून ठेवण्याचा कौशल्याचा प्रभावी वापर
हे उदाहरण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून महाराष्ट्राचे महादेव, दस्तुरखुद्द शिवछत्रपतींचे आहे. शिवछत्रपतींनी आपल्या माहिती दडवण्याच्या कौशल्याचा वापर करून आपली मोहीम कशी साध्य केली त्याची ही हकीकत आहे.
ही माहिती आपल्याला इंग्रजांच्या २० एप्रिल १६७५ रोजी राजापूराहुन मुंबईला पाठवलेल्या एका पत्रा वरून समजते. या लेखाचा विषय वेगळा असल्याकारणाने या संबंधीची माहिती थोडक्यात येथे देतो. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले असताना, त्यांना उत्तरेकडून कोणताही धोका स्वराज्यावर यावयास नको होता. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हे शत्रूला कळू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती. दक्षिणेकडून माहिती उत्तरेकडे जाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे व्यापारी, किंवा माहितीची ने आण करणारे हरकारे. दक्षिणेतून परत येई पर्यंत, शिवाजी महाराजांनी उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आपल्या चौक्या-पहारे बसवून व्यापारी, हरकारे किंवा त्यांच्याकडे असलेल्या पत्रांच्या माध्यमातून दक्षिणेतली कोणतीही माहिती उत्तरेत जाणार नाही याचा बंदोबस्त केला ! या वेळी इंग्रज, शिवाजी महाराजांकडून त्यांना अपेक्षित असलेल्या एका फर्मानाची वाट पाहात होते आणि त्यांनी मोहनदास नावाच्या आपल्या एका माणसाला या पत्राची वाट पाहण्यासाठी नेमले होते. परंतु दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणतीही माहिती पोहोचत नसल्याने या मोहनदासला या पत्राची अनेक दिवस वाट पाहावी लागली. इंग्रज लिहितात :-
" The same evening the Rajah (Shivaji Maharaj) went hence and wee dispatched Mohondas to Waite upon him and gets the Phiremaund (Farman) sealed. For him wee waited this many dayes, hourely expecting him, but being lately informed that the Rajah (Shivaji Maharaj) hath sett watches suffering none to pass to the northward of the place where he is, but are searched and what papers found about taken away, shall not keep those any longer, but copy of Phiremaund (Farman) shall send hereafter."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१६७५
शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल !
सामान्य लोकांप्रमाणेच ज्या राजेरजवाड्यांच्या भेटी हे परदेशी लोक घेत, त्यांना देखील असेच कुतूहल या लोकांबद्दल वाटत असेल पाहिजे. शिवाजी महाराजांना देखील या लोकांबद्दल असेच कुतूहल वाटत होते हे आपल्याला इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या हकीगतींवरून समजते. असाच एक प्रसंग "English Factory Records on Shivaji" या पुस्तकात त्या काळी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या इंग्रजांनी नोंदविला आहे. २० एप्रिल १६७५ रोजी केलेल्या नोंदीत या प्रसंगाचे वर्णन आढळते.
शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आलेले काही इंग्रज अधिकारी, राजापूरजवळ एका झाडाखाली आपले तंबू ठोकून महाराजांची वाट बघत बसले होते. काही वेळाने महाराज तेथे आले आणि या इंग्रजाना पाहून त्यांनी आपली पालखी थांबवली. पुढे हा इंग्रज अधिकारी लिहितो," शिवाजी राजाने आम्हाला जवळ बोलावले; आम्ही पालखी जवळ गेलो आणि पालखी पासून थोड्या अंतरावर थांबलो. हे पाहून शिवाजी राजाने आम्हाला हाताच्या खुणेने आणखी जवळ बोलावले. आम्ही त्याच्या अगदी जवळ जाताच, त्याने माझ्या डोक्यावरील पेरीवीग मधील केसांना हात लावून पाहिला व आम्हाला अनेक प्रश्न विचारले."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/1glTxtigMNM
📜 २० एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार मंगळवार)
मोगलांकडून सुरतकर इंग्रजांस उपद्रव !
मोगलांनी सुरत येथील इंग्रज, डच आणि पोर्तुगीज व्यापारी लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. सर्व रयतेप्रमाणे इंग्रजांनीही साडेतीन टक्के कर द्यावा असे मोगली फर्मान आल्याने या सर्वांचे वार्षिक २० हजारचे नुकसान होऊ लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१६८४
औरंगजेबाने शहजादा मुअज्जम व राहुल्लाखान यांच्यासाठी सरंजाम पाठविला. औरंगजेब बादशहाने राहुल्लाखान आणि शहजादा मुअज्जम यांच्यासाठी २०, हजार अश्रफ्या, १०० घोडे, ५०० उंट, २५ खेचरे, व इतर सरदारांसाठी हत्ती, घोडे, जवाहीर आणि खिल्लतीच्या वस्तू पाठविल्या. शहजादा मुअज्जमकडे रवाना झाला. व ताज्या दमाची फौज घेऊन राहुल्लाखान बहादुरखान हासुद्धा औरंगजेब बादशहाच्या हुकुमाप्रमाणे विजापुर जवळील ३५ मैलांवरील (सुमारे ५६, कि. मी. वरील) इंडी या मुक्कामी थांबला. त्याने शहजादा आज्जमला लागणारा सरंजाम दिला. शके १६०६, रक्ताक्षी संवत्सर वैशाख मासी शहाआलम विजापुर जवळ शेक्स म्हणून गाव आहे तेथे बैसला. अशी जेधे शकावलीतील नोंद सापडते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१७४०
रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१७५८
तापी, नर्मदेच्या सलीलाने तहान न भागलेल्या आमच्या अभिमानी अश्वांना आता गंगा, यमुना आणि सिंधू माईचे ते तीर्थ आकंठ प्यावयाचे होते.
साम्राज्य स्वप्नाची इर्ष्या मनी बाळगणारा तो सूर्य आपल्या मध्यान्ही तळपू लागला होता.
दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढणाऱ्या या स्वराज्याला आता नवीन ओळख निर्माण झाली होती आणि त्याला एक नवे नाव मिळाले होते मराठा साम्राज्य !
शिवाजीराजांचे ‘अहत तंजावर ते तहत पेशावर’ चे स्वप्न आज पूर्ण झाले होते.
स्वकर्तुत्ववान अभिमानी मराठी जरीपटका अटकेवर फडकत होता आणि याची जबाबदारी सांभाळत होते अत्यंत हिशेबी आणि चाणाक्ष असणारे बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ थोरले नानासाहेब पेशवे.
नानासाहेब पेशव्यांनी शिवाजीराजांच्या धोरणांचा अवलंब करून स्वराज्याला साम्राज्यात रुपांतरीत करण्याची खटपट केली,यामागे छत्रपतींचे विचार होते, बाजीराव व चिमाजीअप्पांची मेहनत होती आणि साथ होती लाल मातीत अंग घुसळणाऱ्या अन् आपल्या माथी तीच माती अभिमानाने लावणाऱ्या शूर मराठमोळ्या सरदारांची.
नावे तरी किती घ्यावीत नेमाजी शिंदे, मानाजी पायगुडे, राघोबादादा, साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, बळवंतराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव, दामाजी गायकवाड, यशवंतराव पवार, समशेरबहाद्दूर, मल्हारराव होळकर, विसाजी........आणि कित्येक....
हा काळ ठरला सार्थ पराक्रमाचा, मराठा साम्राज्याचे स्वप्न साकारणारा !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१७७५
नारो शंकर यांचे पुत्र "रघुपंत नारायण" यांचा पेशव्यांतर्फे 'जहागिरी' देऊन सत्कार करण्यात आला, नारो शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला व त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला 'जहागिरी' दिली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० एप्रिल इ.स.१८०३
होळकरांनी सातारच्या छत्रपतीकडून १८०२ सालीं पेशवाईचीं वस्त्रें आणून तीं विनायकरावास अर्पण केलीं. परंतु या वस्त्राचा उपभोग अमृतरावाच्या मुलास अवघे दोन महिनेही घेता आला नाहीं. कारण इकडे बाजीरावानें महाडहून इंग्रजांशीं तहाचें बोलणें लावून डिसेंबर १८०२ रोजीं वसई येथे तहनामा ठरवून इंग्रजाच्या साहाय्यानें पेशवाईचीं वस्त्रे पुन्हा मिळविण्याची सिद्धता केली. ता. २० एप्रिल सन १८०३ रोजीं वेलस्ली बाजीरावासह पुण्यास येऊन दाखल झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १९ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांची हुबळीवर स्वारी
अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/s5QibJUoqP8?feature=share
📜 १९ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार सोमवार)
पन्हाळगडावर असंख्य सैन्याची छत्रपती संभाजी महाराजांकडे धाव!
महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी इतकी संवेदनशील बातमी गुप्त राहणे शक्यच नव्हते? शंभुराजेंचेही हेर खाते प्रबळच होते. त्यामुळे कर्णोपकर्णी ही बातमी शंभुराजेंना समजली. इतकच नव्हे तर म्रुत्यूसमयी महाराजांच्या जवळ फारशी मातबर असामी नसून महाराजांचे अंतिम संस्कार साबाजी भोसले यांच्याकडून केल्याचेही कळले! महाराजांच्या महानिर्वाणाच्या बातमीनंतर शंभुराजेंना अतीव दुःख झाले याची कल्पना फक्त "तो काळ" करू शकतो! शंभुराजेंनी किल्ले पन्हाळ्यावरच महाराजांचे श्राद्ध आटोपले आणि शंभुराजेंना दुसरी बातमी समजली की, प्रधान मंडळातील काही जणांनी राजारामराजेंना गादीवर बसवून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे! मात्र प्रजेमध्ये आणि सैन्यामध्ये शंभुराजे प्रचंड लोकप्रिय असून निसर्ग न्यायानुसार महाराजांच्या नंतर राजगादीवर शंभुराजेंचाच हक्क असल्याने किल्ले पन्हाळ्यावरचे असंख्य सैन्य शंभुराजेंकडे धाव घेत होते. आता शंभुराजेंनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकली!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ एप्रिल इ.स.१७३६
मराठे सरदारांमध्ये एकोपा नसल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा पाडाव लांबणीवर पडला. त्यामुळे चिपळूण मधील ब्रह्मेद्रस्वामींचे हबशास जिंकण्याचे टुमणे छत्रपती शाहू महाराजांस सतत जाचू लागले. गोवळकोट आणि अंजनवेल काबीज केल्याशिवाय सिद्दी सात शरण येणार नाही व चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची झालेली हानी भरून येणार नाही हे शाहू महाराजास ठाऊक होते. पण शाहू छत्रपतींच्या हुकूमाने संभाजी आंग्रे यांनी जंजिऱ्याची मोहिम तशीच चालू ठेविली. दरम्यान सिद्दी सातास
फितविण्याचाही उपक्रम शाहू छत्रपती व स्वामी यांनी आपआपल्यापरी चालविला. पण संभाजी व मानाजी आंग्रे या आंग्रे बंधूंच्या तंट्यामुळे जंजिऱ्यावरील मोहिमेचा परिणाम निष्फल होत होता. शाहू छत्रपतींनी उदाजी पवार व पिलाजी जाधव यांस कोंकणात पाठविले. पिलाजींनी बाणकोट फत्ते करून पुढे गोवळकोट व अंजनवेलवर चाल केली. या आक्रमणास आळा घालण्याचा सिद्दी सातने चंग बांधला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चिमाजी आप्पांस मुद्दाम शाहू छत्रपतींनी कोंकणात पाठविले. मानाजी आंग्र्यांनी चिमाजीस साथ दिली. चिमाजी २० मार्च १७३६ रोजी कोंकणात गेले. रेवास नजीक कामारले तर्फ श्रीगांव येथे सिद्दीची व मराठ्यांची लढाई झाली. तीत सिद्दीचे १,३०० व मराठ्यांकडील ८०० लोक पडले. सिद्दी सात स्वतः कामास आला. “राज्य घेईन, नाहीतर मरून जाईन" अशा निकराने सिद्दीसात लढला. त्यास पळून जाण्याची संधी दिली असता त्याने तसे न करता तो लढला व समरांगणी पडला (१९ एप्रिल १७३६). उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूबही वरील लढाईत मारला गेला. या विजयाने मराठा मंडळास मोठा आनंद झाला. हबशांचे दोन प्रबळ सरदार पडल्यामुळे दुसऱ्या पक्षाचा प्रमुख सीद्दी रहमान याने पेशव्यांशी पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले. अंजनवेल व गोवलकोट ही स्थळें तूर्त हबशांकडे राहिली. पैकी अंजनवेल तुळाजी आंग्र्यांनी २३ जानेवारी १७४५ रोजी काबीज केली व लगेच गोवळकोटही घेतले. परशुराम क्षेत्राजवळचा हा किल्ला कबजात आलेला पहाण्याचे भाग्य ब्रह्मद्रस्वामीस लाभले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ एप्रिल इ.स.१७९७
रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा गलेफ तयार केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधिश्वर झालें. पुढें इ.स. १६८९ मध्यें रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३ मध्यें रायगड श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या करवीं छत्रपती शाहू महाराजांकडे आला. तेव्हा पासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली. इ.स. १७३५ पासून १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता. शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता.
छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला. खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले. त्या कापडाचा तपशील असा, १३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जमते. कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.
'सिंहासन' आणि 'तख्त' ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा होय. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. ह्या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रें घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते. सिंहासनावर चौखांबी मंडप होता. ह्या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते. ह्या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी तर झालर ताफत्याची असायची. ह्या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.
रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता. तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. ह्या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा 'तख्त पुजारी' म्हणून 'महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास' असा निर्देश आला आहे.
सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हें कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. ह्या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे. उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.
सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७ पासून नाना फडणीसांनी सुरू केला. ह्यासंबंधीचा उल्लेख - "रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहाण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला." सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. ह्या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १३०० रु. असे. नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये इतकेे होते.
तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळीं गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पाहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अश्या प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १९ एप्रिल इ.स.१९१०
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली.
अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १८ एप्रिल इ.स.१६६०
"अमिर-उल-उमराव नवाबबहादूर मिर्झा अबू तालिब" उर्फ शायिस्ताखान, नात्याने औरंगजेबाचा मामा २८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून आपल्या सैन्या निशी दख्खनेत निघाला. मजल दरमजल करीत खान नगरला ११ फेब्रुवारी १६६० या दिवशी आला. २५
फेब्रुवारीला त्याने नगर सोडले. त्यानंतर खान दौंडनजीक सोनवडीस ३ मार्च १६६० पोहोचला. तिथून खान बारामतीस निघाला, खानची पुण्याच्या दिशेने मजल दरमजल पोहोचत होती. १८ एप्रिल १६६० रोजी खान शिरवळास आला. खान आता राजगड, पुरंदर, सिंहगड यापासून थोड्या अंतरावर होता. मराठे अधूनमधून खानावर छापा घालतच होते. महाराज या वेळी पन्हाळ्यावर अडकले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
📜 १८ एप्रिल इ.स.१६७७
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन.
आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार, सोमवार २० ऑगस्ट १६६६ रोजी फुलौतखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. जर बोलले असते तर छत्रपती संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल छत्रपती शिवाजी महाराज कसे गेले, कुठे गेले, कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल, छळवणूक. या दोघांची सुटका कशी करता येईल, याची चिंता महाराज करीत होते.
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. त्यातील मुख्य विषय असा की, 'मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.'
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्याने त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.
सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल? येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता, ना सांगता, ना दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे! १८ एप्रिल १६७७ रोजी त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१६९९
१८ एप्रिलला औरंग्यास समजले की मराठ्यांचे सहा हजार स्वार गुलबर्याच्या जवळ येऊन त्यांनी कित्येक खेडी लुटून जाळपोळ केली. हीरापेठ लुटली. बादशहाने त्याचे पारिपत्य करण्यासाठी तरबियतचा भाऊ कामयाब यास रवाना केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१७२०
शार्वरीनाम संवत्सर शके १६४२, चैत्र वद्य सप्तमी, दि. १८ एप्रिल १७२० ह्या दिवशी छत्रपती शाहू राजांच्या दरबारात छत्रपतींचा नवनियुक्त बाजीराव पेशवा महाराजांना स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्याचं वचन आत्मविश्वासाने दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स. १७७४
वैशाख शु. ७ शके १७९६ जयनाम संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. १८ एप्रिल सन १७७४ रोजी गंगाबाईच्या पोटी पुरंदरगडावर सवाई माधवरावांचा जन्म झाला आणि अवघ्या चाळीस दिवसांतच त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. इतक्या लहान वयात राज्यकारभाराच्या उच्चस्थानी बसलेली ही जगातील एकमेव व्यक्ती होती. त्यांचे वडील नारायणराव पेशवे यांचा खून होऊन बापाच्या मृत्यूनंतर जन्मलेले हे बाळ. लहान पेशवे हे मराठी राष्ट्राचे आशेचे केन्द्रस्थान होते. त्यांना चुलते माधवराव पेशवे यांचे अवतार असे मानले जाई. बापाच्या पश्चात जन्मलेल्या ह्या बाळाला मातृसुखही फार काळ लाभले नाही. ते तीन वर्षाचे असतानाच आई गेली. त्यामुळे पुढे नानांनी त्यांच्यापुढे सर्व प्रकारची सुखे दत्त म्हणून उभी केली. काही कमतरता भासू दिली नाही. नाना हे त्यांचे पूर्ण आधारस्तंभ बनले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ एप्रिल इ.स.१८५९
तात्या टोपे यांना फाशी दिली गेली
इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबधी दोन भिन्न मते आहेत :
(१) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे.
(२) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले.
त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. ३० वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.
त्याने १८५७ मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली. १८५७ चा उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला.
उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले. जून १८५७ मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली; परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा १६ जुलै १८५७ रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला; परंतु तेवढ्यात १६ ऑगस्ट १८५७ रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्याचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजांचाच जय झाला.
शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यांनी काल्पी येथे छावणी केली. १८५७ च्या नोव्हेंबरमध्ये तात्याने कानपूरवर चढाई करून जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूर शहर ताब्यात घेतले; परंतु थोड्याच दिवसांत सर कोलिन कँबेलने अचानकपणे हल्ला करून तात्याचा पराभव केला. कानपूर जिंकण्याचा तात्याचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्याची जिद्द कमी झाली नाही.
याच सुमारास सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेला; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या.
१० ऑक्टोबर १८५८ रोजी मंग्रौली गावी तात्याचा पराभव झाल्यावर ललितपूर येथे त्याची व रावसाहेबाची गाठ पडली. इंग्रज त्याच्या पाठलागावर असताना त्या दोघांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला. नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात नाहरगढला गेले.
इंद्रगढला त्यांनी १३ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशाहाची भेट घेतली. फिरोजशाह व तात्या देवास येथे थांबले. तेथे इंग्रजांनी छापा घातला. फिरोजशाहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या दोन स्वयंपाकी ब्राम्हण व एक मोतदार यांच्यासह शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेला; परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्याला कैद केले. त्याला प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्याची धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही तो शेवटपर्यंत डगमगला नाही. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच १८५७ चा उठावही समाप्त झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜१७ एप्रिल इ.स.१६७५
फोंड्याच्या सुभेदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील एका व्यापाऱ्याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित यांना दोन हजार अश्वदळ देऊन फोंड्याकडे पाठविले. दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचता न पोहोचता तेच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यंत आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला. हा वेढा चालू असताना छत्रपती बशिवाजी महाराजांनी एक पथक कर्नाटक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली. १७ एप्रिल १६७५ रोजी किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून तसेच शिड्या लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा जिकला. हा महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला, शिवेश्वर इत्यादी किल्ले जिकून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/_aH8V7Qs8uU?feature=share
📜१७ एप्रिल इ.स.१६८२
कारवारचे बंदर छत्रपती शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून छत्रपती संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१७ एप्रिल इ.स.१६८४
छत्रपती संभाजी महाराजां चे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती :-
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) संभाजीची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजीचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे. फर्मानांतील बहुतेक कलमे शिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठविलेल्या एकही फर्मानाची शिकंदरकडून अंमलबजावणी होऊ शकली नाही. तेव्हा औरंगजेबास आदिलशहा संभाजी महाराजांशी मैत्री व सख्यत्व करतो असा संशय आला. मराठ्यांविरुद्ध मोहिमेत १६८४ मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते. संभाजी राजें च्या विरुद्धच्या युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक ३० ऑक्टोबर १६८४ रोजी आदिलशहीविरुद्ध युद्ध पुकारले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१७ एप्रिल इ.स.१६८७
कर्नाटकांत १६८६ नंतर हरजी महाडिकला मुघलांविरुद्ध लढा द्यावा लागला कारण मोगलांच्या तुकड्या त्या प्रदेशात उतरू लागल्या तेव्हा मराठ्यांनीही त्या प्रदेशांत बराच मुलूख काबीज केला. सरदार गोपाळ दादाजी व विठ्ठल पल्लवी यास हरजीराजे यांनी मुघलांचा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. पण त्यांची शक्ती अपुरी पडू नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना तिकडे जाण्याची आज्ञा केली. या आज्ञेनुसार ते दोघे फेब्रुवारी
१६८७ मध्ये १२००० सैन्यासह कर्नाटकांत पोहोचले. इ. स. १६८७ च्या सुरुवातीस औरंगजेबाने कुतुबशाही जिंकल्यानंतर कुत्बशाहीचे कर्नाटकांतील मुलूख व किल्ले घेण्यासाठी सरदार रवाना केले होते. १७ एप्रिल १६८७ पर्यंत मुघली सैन्याने बाळापुरमपर्यंत कूच केले. त्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठे सैनिकांकडून प्रतिकार झाला नसावा. कुत्बशाहीतील महत्त्वाचा किल्ला कोंडापिली हा मुघलांनी फितुरीने काबीज केल्याची बातमी २९ जुलैला मद्रासला पोचली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ एप्रिल इ.स.१७१७
विजयदुर्ग उर्फ घेरिया संग्राम
'पश्चिम किनार्यावर आमच्या अनिरुद्ध संचारास अडथळा करील त्याची मी खोडकीच जिरवणार', असा बून नांवाच्या इंग्रज गव्हर्नरानें आपला निश्चय प्रगट करून दोन वर्षांच्या आंत नऊ उत्कृष्ट लढाऊ जहाजें मुंबईच्या बंदरांत नवीन तयार केलीं. या सर्वांवर मिळून १४८ तोफा व साडेबाराशें लढाऊ खलाशी होते. यांशिवाय जमिनीवरून लढण्यास अडीच हजार यूरोपियन व दीड हजार एतद्देशीय फौज मुद्दाम विजयदुर्ग वगैरे आंग्रयाचे किल्ले पाडाव करण्यासाठी तयार केली. या सुमारास कान्होजीनें इंग्रजांचें एक प्रचंड लढाऊ जहाज (ससेक्स) धरून नेलें (१७१७). त्यामुळें बून इंग्रज फार चिडला व त्यानें ता. १७ एप्रिल स. १७१७ रोजी वरील जंगी आरमार विजयदुर्ग किल्ल्यावर आणलें. तेथें किल्ला हस्तगत करण्याचा त्यानें कसून प्रयत्न केला. परंतु कान्होजी आंग्रयाच्या मारापुढें नामोहरम होऊन मुठींत नाक घेऊन त्याला आरमारासह मुंबईत परत यावें लागलें. इंग्रजांचे दोनशें लोक मेले व तीनशें जखमी झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ एप्रिल इ.स.१७२०
बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावास छत्रपती शाहूमहाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा महादेव, मल्हार तुकदेव ऊर्फ दादा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहू महाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १६ एप्रिल इ.स.१६६२
(वैशाख शुद्ध नवमी, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार बुधवार)
शाहिस्तेखानाचा तळ होळ या गावी निरा नदीकाठी पडला. शाहिस्तेखानाने इंदापुर सोडले. व निरा नदीच्याकाठी अगदी प्रसन्न वातावरण पाहून होळ या गावी श्रमपरिहारासाठी काही दीवस तळ टाकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/w3TWUry8ksI
📜 १६ एप्रिल इ.स.१६७३
(वैशाख शुद्ध दशमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार बुधवार)
सरसेनापती प्रतापराव गुजर यांची हुबळीवर स्वारी !
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अत्यंत आक्रमकपणे इंग्रजांची हुबळीची वखार लुटली. आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी यावेळी इंग्रजांची वखार नुसती लुटली नाही तर पुरुषभर खोल खड्डा करून खणत्या लाऊन लुटली. या लुटीत इंग्रजांचे आतोनात नुकसान झाले. इंग्रजी रेकॉर्डनुसार ७८९४ होनांचे केवळ नुकसानच झाले नाही तर लुटीच्या धामधुमीत मराठी सैन्याच्या इंग्रजांच्या स्फोटक दारुसाठ्याला आग लागून प्रचंड भडका उडाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १६ एप्रिल इ.स.१६८३
दि ६ एप्रिल १६८३ रोजी मराठ्यांचा तळ कल्याण-भिवंडीपासून चौदा मैलांवर असताना रुहल्लाखानाचा मुलगा सैफुल्ला खान मराठ्यांवर धावून चढाई करण्यास आला. दोन्ही सैन्यात लढाई झाली. ह्या आक्रमणापुढे मराठ्यांचा निभाव लागला नाही. ह्या सुमारास संभाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी परिसरात मोगल सैन्यास प्रतिकार अत्यंत तीव्र केला होता. तेव्हा दिनांक १९ मार्च ते १६ एप्रिलच्या दरम्यान मोगल सेनानी रोहिला खान कोकणात (कल्याणजवळच्या पौंड खोऱ्यात) उतरून गेला व रणमस्तखान घाटावर येऊन गेला. रुपाजी भोसले याने टिटवाळ्याजवळ (कल्याणच्या ईशान्येस ४ १/२ मैल) त्यांच्याशी लढाई केली. तेव्हा घनघोर रणसंग्रामात मराठ्यांनी मोगलांचे कित्येक सेनाधिकारी ठार केले. कल्याण-भिवंडी येथे झालेल्या लढायात संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांच्या ताब्यातील प्रदेश उजाड केला होता. मराठ्यांनी सातत्याने येणाऱ्या मोगल सेनानीचा अत्यंत तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे मदतीकरता इंग्रजांना पाचारण करणे मोगलांस अपरिहार्य झाले. ऑगस्ट, १६८३ पर्यंत मोठी फौज धाडून आणि कित्येक मातब्बर सेनानी योजूनही मोगलांना कल्याण-भिवंडी परिसरात परिणामकारक प्रगती करता आली नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १६ एप्रिल इ.स.१६९९
१६९९ मध्ये मराठ्यांची आक्रमणे औरंगाबाद, वहाड आणि खानदेश या सुभ्यातून मोठ्या प्रमाणांवर चालू झाली. औरंगजेबास १६ एप्रिल १६९९ रोजी हरकाऱ्याच्या तोंडून कळले की कृष्णा सावंत हे मोठे मराठी सैन्य घेऊन वहाड प्रांतांत हालचाल करीत होता. औरंगजेबास हेरांनी कळविले की जालन्याजवळ मराठे सरदारांनी चार हजार सैन्यांसह बादशाही मुलूख लुटला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १६ एप्रिल इ.स.१७७५
आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १५ एप्रिल इ.स.१६५७
छत्रपती शिवाजी महाराज इंगळे घराण्यातील गुणवंताबाईसाहेब यांच्याशी विवाह संपन्न.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/YRf4Ej_jRRs?feature=share
📜 १५ एप्रिल इ.स.१६४५
(चैत्र वद्य चतुर्दशी, शके १५६७, संवत्सर पार्थिव, वार मंगळवार)
स्वराज्याची शपथ!
लहानपणापासून माँसाहेब जिजाऊंसाहेबांच्या तोंडून श्रीरामांच्या, धणुर्धारी अर्जुनाच्या, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत महाराज वयाच्या १५, पंधराव्या वर्षात आले. महाराजांच्या जीवनातला हा अत्यंत महत्वपूर्ण असा काळ मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प आकारास येण्याचा हा अनुकूल काळ होता. १२ मावळचे अनेक सवंगडी ज्यात तानाजी मालुसरे, सुर्याजी मालुसरे, बाजी पासलकर, चिमणाजी व बाळाजी मुदगल देशपांडे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, भिकाजी चोर, बाजी जेधे, सुर्यराव काकडे, त्र्यंबक सोनदेव, "दादाजी नरसप्रभु देशपांडे ही नव्या दमाची, तरुण तडफदार मंडळी यवनांच्या अन्यायी आक्रमणाविरुद्ध महाराजांचा शब्द झेलायला तयार होती, आणि हाच संकल्प महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या सवंगड्यांनी शंभुमहादेवाच्या साक्षीने रोहिडेश्वराच्या मंदिरात सोडला. भोर तालुक्यातील रोहिडा खोऱ्यातील रायरेश्वर हे सह्याद्रीच्या शिखरावरील गच्च झाडीत असलेल्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून, सर्व सवंगड्यांचे इमान "श्री" पाशी झाले. हिंदवी स्वराज्य संकल्पनेचा नाद इथेच गुंजला. आदिलशाहीच्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षास जणू एक अधिष्ठान प्राप्त झाले. ही शपथक्रिया रायरेश्वराच्या मंदिरात शंभुमहादेवाच्या साक्षीने करंगळी कापून मावळ्यांच्या बरोबर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला गेला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 १५ एप्रिल इ.स.१६७३
पन्हाळा किल्ला मराठ्यांनी काबीज केल्याची बातमी विजापूर दरबारांत धडकल्यावर तेथे खळबळ उडाली. सर्व सरदारांनी विचार करून आपला नामांकित सेनानी बहलोलखान याच्या नेतृत्वाखाली राजांवर सैन्य पाठविले. विजापूर दरबाराचा हा अफझलखानसारखा अतिशय बडा सरदार होता, त्याचे नाव अब्दुल करीम बहलोलखान, हा मूळचा अफगाणिस्थानातील जवान. जातीचा पठाण. तो विजापूर दरबारी आल्यावर त्यास दरबारने मिरज व पन्हाळा सुभ्याचा सुभेदार नेमले होते. खुद्द त्याच्या सुभ्यापैकी महाराजांनी पन्हाळा किल्ला घेतल्यामुळे तो चिडला होता. बहलोलखान विजापुराहून निघून तिकोट्यावरून उंब्राणीवर येऊन पोचला. त्यास रांगणा अद्वानी, कार्नोल आदी ठिकाणाहून आणखी सैन्य येऊन मिळावे म्हणून विजापूर दरबारने हुकूम काढले. शिवाय त्याने मोगल सरदार दिलेरखान याच्याकडेही फौजेची मागणी केली. हे राजांना कळले तेव्हा बहलोलखानास दुसरी सैन्ये येऊन मिळण्यापूर्वीच त्यांच्यावर आपण हल्ला करावा म्हणून राजियांनी प्रतापराव व आनंदराव यांची त्याजवर रवानगी केली. दोनच दिवसांत प्रतापराव उंब्रणीजवळ बहलोलखानाच्या तळाशी आले. उमराणीच्या तलावाचे पाणी बंद करण्याचे हुकूम दिले. पाणी बंद
झाल्याचे समजल्यावर खानाच्या तोंडचे पाणी पळाले, तेव्हा खानाने युद्धास सुरवात केली, तीन तास घनघोर युद्ध चालले. मुंडक्यांचा खच पडला. प्रतापरावांस शरण जाण्याशिवाय खानाकडे दुसरा उपाय नव्हता. खानाने आपला वकील प्रतापरावाकडे पाठविला, शरणागती पत्करली आणि पुन्हा मराठ्यांच्या वाटेस जाणार नाही असे कबूल केल्यामुळे प्रतापरावाने त्यास जाऊ दिले. मराठ्यांच्यापुढे मानाखाली घालून पठाणांची सेना निघून गेली. (दिनांक १५ एप्रिल १६७३) महाराज यावेळी रायगडावर होते. प्रतापरावांनी खानाला शरण आणले, एक खासा हत्ती काबीज केला हे ऐकून शिवराय आनंदले. पण प्रतापरावाने बहलोलखानास सोडून दिल्याचे समजतांच छत्रपती शिवाजीराजे भयंकर रागावले. त्यांनी रावांना लिहिले, “खानाशी सल्ला काय निमित्त केला?"
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 १५ एप्रिल इ.स.१६८०
महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 १५ एप्रिल इ.स.१६८३
छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ एप्रिल इ.स.१७३९
वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १४ एप्रिल इ.स.१६६४
(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार)
जसवंतसिंहाचा सुलतानढवा!
जसवंतसिंहाने सुलतानढवा नावाचा हल्ला करून किल्ले सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र सजग मराठ्यांनी तो पुरता उधळून लावला. जसवंतसिंहाचा किल्ले सिंहगड वेढा बादशाही थाटात सुरूच होता. सुमारे ६ महिने झाले तरी मराठे जसवंतसिंहास दाद देत नव्हते. अखेर "सुलतानढवा" म्हणजे निर्वाणीचा हल्ला केला. तोफांसह मोगलांनी निकराचा हल्ला करून, गड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चिवट मराठ्यांनी अतिशय तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल आणि राजपूत कापून काढले, अनेक मोगल सैनिक दारुगोळ्याच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत ठार झाले. त्यामुळे जसवंतसिंहाचे माथे पार भडकून गेले. जसवंतसिंह व रावसिंह हाडा यांच्यातच वाद सुरू झाले. मात्र सुलतानढवा अयशस्वी झाल्यामुळे जसवंतसिंह पुरता निराश झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/7euoCKwtAyw?feature=share
📜 १४ एप्रिल इ.स.१६६५
(वैशाख शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार शुक्रवार)
किल्ले वज्रगड मोगलांच्या ताब्यात!
मुरारबाजींच्या हौतात्म्यानंतर किल्ले पुरंदरचा जुळा भाऊ असलेल्या किल्ले वज्रगडावर दिलेरखानाने हल्ला करून किल्ले वज्रगड ताब्यात घेतला. परंतु मराठी मनगटाची ताकद काय असते, किती चिवट असते हे मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांस कळून आले. ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ जर एक किल्ला घेण्यास लागत असेल तर स्वराज्य घेण्यास किती वेळ लागेल हाच विचार मिर्झाराजे जयसिंग यांनी केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६६७
रांगणा किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा
१४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून किल्ले रायगडाच्या दिशेने आले. हुबळीवर स्वारी करून प्रतापराव गुजरकाकांनी अथनीवर धाड टाकली. कारवार प्रांतात प्रतापरावांनी मांडलेली धूम पाहून बेहलोलखान कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून प्रतापरावांना दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसळाही जवळ असल्याने खानाने जास्त हालचाल केली नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६८५
विजापुरचा वेढा सुरू असल्याचे औरंगजेब बादशहाला कळविण्यात आले. शके १६०७, क्रोधेन संवत्सरे, रहिमखान बबुरखान (बहादुरखान) रणमस्तखान येऊन विजापुरास वेढा घातला. औरंगजेब बादशहा अहमदनगरलाच होता, त्यास जमादिलावल महिन्याच्या २०, वीस तारखेस म्हणजे आज विजापुरचा वेढा सुरू असल्याचे कळविण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१८९१
#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 १३ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८५, संवत्सर शोभन, वार सोमवार)
महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले.
महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दवडत नसत. अफजलखानाचा (३२ दाताच्या राक्षसी बोकडाच्या) कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाहीस सळो की पळो करून सोडले. आजही महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली. ४ हजार घोडदळ, आणि १० हजार पायदळासह महाराज राजापुर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले. मात्र महाराजांच्या आगमनाच्या भितीमुळे पोर्तुगिजांची चांगलीच धावपळ झाली. डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले. महाराज मात्र, राजापुरास जाऊन तीरथे राहुजी सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/oe-GErXDYrI?feature=share
📜 १३ एप्रिल इ.स.१६६५
दिलेरखानाने मोठ्या जिद्दीने अबदुल्लाखान, फतेलष्कर आणि हाहेली ह्या तोफा टेकड्यांवर चढवल्या. दि. १३ एप्रिल १६६५ ला मध्यान्हीं दिलेरखानाने या वज्रगडावर निर्णायक आक्रमण केले.
शेवटी तोफांच्या माऱ्याने वज्रगड ढासळू लागला व मावळ्यांना आतल्या बाजला जावे लागले. संध्याकाळपर्यंत मुरारबाजीच्या मूठभर मावळ्यांनी निकराने युद्ध केले पण संख्याबळ व सामग्री यांच्या समोर त्याचें काही न चालून त्यांना शेवटी शस्त्र खाली ठेवावे लागले. ८० लोकांचे बळी देऊन व १०९ लोकांच्या जखमांकडे पाहत दिलेरखानाने वज्रगड जिंकला आणि मोगली ध्वज फडकू लागला.
शरण आलेल्या मावळ्यांना निशस्त्र केले गेले पण त्यांना जयसिंगाने अभयदान दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ एप्रिल इ.स.१७००
छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला,
तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ एप्रिल इ.स.१७३१
छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकर यांचेमध्ये दि.१३ एप्रिल १७३१ रोजी तह झाला. हाच तह "वारणेचा तह" म्हणून ओळखला जातो. या तहामध्ये एकूण नऊ कलमे आहेत. ती पुढीलप्रमाणे :
"तहनामा चिरंजीव राजेश्री संभाजीराजे यांसी प्रती शाहूराजे यांनी लिहून दिले सुll
१) इलाखा वारुण महाल तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलुख दरोबस्त देखील व किल्ले तुम्हास दिले असत.
२) तुंगभद्रेपासून तहत रामेश्वरदेखील निम्मे आम्हाकडे ठेऊन तुम्हाकडे करार दिला असे.
३) किल्ले कोप्पल तुम्हाकडे दिला. त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाला दिला.
४) वडगावचे ठाणे पाडून टाकावे.
५) तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी.
६) वारणा व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहद निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हांकडे दिली असत.
७) कोकण प्रांत साळशीपलीकडे तहद पंचमहाल अंकोलेपावेतो दरोबस्त तुम्हांस दिली असत.
८) इकडील चाकर तुम्ही ठेवू नये. तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये.
९) मिरज प्रांत, विजापूर प्रांताची ठाणी देखील अथणी, तासगाव वगैरे तुम्ही आमचे स्वाधीन करावी.
एकूण कलमे नऊ करार करुन तहनामा दिला असे. सदरहूप्रमाणे आम्ही चालू. यास अंतराय होणार नाही."
या कराराप्रमाणे सर्वच गोष्टी पुढे प्रत्यक्षात आल्या असे नाही. कलम एक व दोननुसार संपूर्ण दक्षिण व तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश संभाजीराजेंस मिळाला मात्र तुंगभद्रेच्या पलीकडे शाहू महाराज व पेशव्यांच्या अनेक मोहिमा झाल्या. त्यामध्ये संभाजीराजेंनी सहभाग घेतला नाही. कलम तीन व चार पूर्णतः पाळले गेले. कलम पाचसुद्धा सामान्यतः पाळले गेले. कलम सहाप्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलुख सोडून उर्वरीत काहीसा मुलुख शाहू महाराज व पेशव्यांनी जिंकून घेतला. त्यातील हिस्सा संभाजीराजेंना दिला नाही. कलम सात पूर्णतः पाळला गेला नाही. कलम आठ काही अंशी पाळला गेला. कलम नऊप्रमाणे मिरज, अथणी तासगाव वगैरे भाग संभाजीराजेंनी शाहू महाराजांच्या स्वाधीन केला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ एप्रिल इ.स.१७३९
सावंतांनी गोव्याच्या जनरलला पाठविलेल्या पत्राची नोंद!
पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते, कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने, पोर्तुगिजांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते. ह्या संदर्भात जयराम सावंत व रामचंद्र सावंत या दोघांनी गोव्याच्या गव्हर्नर जनरलला पाठविलेले पत्र बोलके आहे. त्यात ते दोघे म्हणतात, "व्यंकटराव यांची फौज वरघाटी जाईस्तोवर बार्देश आम्हाकडे असावा, तद्नंतर ते तुमचे स्वाधीन करू".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/oe-GErXDYrI?feature=share
📜 १३ एप्रिल इ.स.१९१९
जालियनवाला बाग हत्याकांड
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या उल्लेखाने आजही भारतीयांचे रक्त सळसळते. निशस्त्र शेतक-यांवर ब्रिटिशांनी अमानुष हल्ला केला होता, या घटनेने आजही अंगावर काटा उभा राहतो.
जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या निदर्शनाला १५ ते २० हजार नागरिक जमले होते. जेव्हा नेते भाषण करत होते तेव्हा, ब्रिगेडीअर जनरल रेजीनॉल्ड डायर सैनिकांसह तिथे दाखल झाला. त्या सर्वांच्या हातात रायफल होत्या. शांत आणि निशस्त्र लोकांवर शस्त्र चालवले जाणार नाही अशी नेत्यांची भाबडी आशा पुढच्या काही क्षणात धुळीस मिळाली. ब्रिगेडियर जनरल रेनाल्ड डायर याने ५० बंदुकधारी शिपायांना या नागरिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सैनिकांनी बागेला चारही बाजूने वेढा टाकला आणि कोणतीही पूर्व सुचना न देता बंदूकीच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. डायर याने दहा मिनिटे गोळीबार सुरूच ठेवण्यास सांगितले होते. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर हा गोळीबार बंद करण्यात आला. यावेळी बंदुकांच्या सुमारे १६५० फैरी झाडण्यात आल्या आणि यात सुमारे एक हजार निष्पाप नागरिक बळी गेले तर एक हजार १०० जण जखमी झाले होते. हा आकडा विविध ठिकाणी कमी अधिक दिसतो, मात्र त्यामुळे घटनेचे महत्व आणि क्रूरता कमी होत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 १२ एप्रिल इ.स.१६६३
शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे :
त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले. आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/U01qa_1GoCA
📜 १२ एप्रिल इ.स.१६६५
पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला
पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते, अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ती तारीख होती १२ एप्रिल १६६५....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१६७३
(वैशाख शुद्ध षष्ठी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार शनिवार)
महाराज पन्हाळगड मुक्कामी!
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथणी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले. हुबळीची लुट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धुम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फारशी हालचाल केली नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१६८३
व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहास पाठविलेल्या पत्राचा आशय!
"आपल्या प्रजेला उपद्रव देणार्या छत्रपती संभाजी महाराजांस शासन करण्यासाठी आपण युवराज अहमद आझमशहा यांना मोठे सैन्य देऊन इकडे पाठविले आहे व नबाब कर्नलखान हेही मोठे आरमार घेऊन येत आहेत हे आपल्या पत्रावरून कळते. आपण माझ्याकडे मागणी केली आहे की, आपल्या पुरवठ्याच्या नौकांना मी आमच्या आरमारी जहाजांचे संरक्षण द्यावे व छत्रपती संभाजी महाराजांचे निर्दालन करण्यासाठी आपले जे सरदार इकडे येत आहेत त्यांना मदत करावी. एक काब्रा घोडा आणि टेहाळणीच्या ६ तोफा आपण मला नजराण्यादाखल पाठविल्या आहेत. मोठ्या प्रेमाने पाठविलेल्या ह्या नजराण्याची मला अप्रुकता वाटते.""आपले पत्र येण्यापूर्वी माझे स्वामी पोर्तुगालचे महाराज यांनी मला पत्र पाठवून आपणास मदत करण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेस अनुसरून मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल तसेच चौल, वसई आणि दमण या तिन्ही कॅप्टनना पत्रे पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्याच्या हद्दीतून वाट देण्यास व ह्या सैन्याला आमच्या राज्यात जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्यासाठी आमच्या अधिकार्यांना सुचना पाठविल्या होत्या. शिवाय आपल्या आरमाराच्या सामोरा जाण्यासाठी दारुगोळ्याने भरलेल्या ६ नौकांना हुकूम केला होता". औरंगजेब बादशहाचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी गोव्यास आला तेव्हा व्हिसेरेई त्याला म्हणाला होता की, छत्रपती संभाजी महाराजांशी पोर्तुगीजांचा तह झाल्याने त्याचा भंग होण्यासारखे क्रृत्य आपण होऊ देणार नाही. परंतु वरील पत्र वाचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी असलेल्या तहास हरताळ फासून पोर्तुगिजांनी मोगलांना मदत केल्याचे दिसून येते. गोव्याचे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब बादशहा या दोघांना खूश ठेवण्याचे संधिसाधूपणाचे राजकारण कसे खेळत होते त्याचा प्रत्यय व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहाला पाठविलेल्या वरील पत्रावरून येतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/U01qa_1GoCA
📜 १२ एप्रिल इ.स.१६८९
छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना १२ एप्रिल १६८९ रोजी पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की, “सरदार गोळे यांना आपल्या अनुयायांसहित चरितार्थाकरता योग्य ती व्यवस्था इनाम गांवे जोडून केली जाईल. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठे सरदार, सैनिक राखण्यासाठी निश्चित सहाय्यकारी झाली. हे औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की, मोगल बादशहाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते (सरदार गोळे) तयार असतील तर बादशहा त्यांना चार गांवे इनाम देऊन सातगावांची जहागीरही देतील जी निरंतर त्यांना उपभोगावयास मिळेल. परंतु देवदयेने ह्या मसलतीमध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या प्रयत्नास यश आले. गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशहाने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली. गोळे घराणे हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१७०३
मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१७३७
मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१७५२
१७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने
फार महत्वाचे होते.
१२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार (अहमदनामा) केला.
त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ११ एप्रिल इ.स.१६६७
(चैत्र वद्य त्रयोदशी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, वार गुरुवार)
किल्ले रांगणा व परिसर आदिलशाहीकडे!
महाराजांनी याच काळात रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. महाराज आग्रा येथील जीवघेण्या प्रसंगातून सुटून आले होते. सततच्या साऱ्या, लढाया, मोहिमा, युद्धे, जाळपोळ यामुळे रयतदेखील त्रस्त झाली होती. त्यामुळे महाराजांना काही वर्षे शांतता हवी होती. कारण राज्यकारभाराची घडी विस्कळीत झाली असल्याने ती सर्व प्रथम स्थिरस्थावर करून, जनतेच्या मनात स्थैर्य निर्माण करणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व प्रथम आग्रा येथून निघून आल्याबद्दल औरंगजेब बादशहास दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहून काही अटींवर तह केला. औरंगजेबानेही नाइलाजास्तव हा तह मान्य मान्य केला. कारण इराणच्या स्वारीच्या शक्यतेने औरंगजेब बादशहाची डोकेदुखी वाढली होती. त्याचबरोबर पेशावरी लोकांनी बंड केल्यामुळे, औरंगजेब बादशहाने महाराजांशी संघर्ष टाळून तहास मान्यता दिली. मात्र मोगलांशी तह झाल्यामुळे विजापुरकरांचे पित्त खवळले. त्यामुळे आदिलशाहीने किल्ले रांगणा परत मिळविण्यासाठी बेहलोलखान आणि व्यंकोजीराजे यांना महाराजांच्यावर पाठविले. मात्र महाराजांनी त्वरित तो हल्ला मोडून काढून या दोघांना पिटाळून लावले. मात्र, महाराजांनाही संघर्ष नको होता. तर सध्या शांती हवी होती. त्यामुळे महाराजांनी यावेळी किल्ले रांगणे याचा वेढा स्वतःहून उठविला. आणि विजापुर आघाडी शांत करण्यासाठी हा किल्ला तहांअतर्गत आदिलशाहीस दिला. मात्र, त्याच वेळी दक्षिण कोकण याच तहांअतर्गत स्वतःकडे ठेवण्यास महाराजांना यश आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/_g9xakmrZps?feature=share
📜 ११ एप्रिल इ.स.१६८०
राजापूरकर इंग्रजांनी सुरतला पाठवलेल्या पत्रात म्हणतात."छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले, त्यांच्या मरणामुळे या भागात पुष्कळ घोटाळा माजेल असे दिसते."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ एप्रिल इ.स.१६९१
११ एप्रिल १६९१ रोजी नागोजी मान्यास छत्रपती राजाराम महाराजांनी सरदेशमुखाच्या वतनाची सनद दिली. त्यात महाराज म्हणतात, “तुम्ही पूर्वी तांब्रांकडे (मोगलांकडे) होते. ऐसियास स्वामीचे राज्य म्हणजे देवताभूमी. या राज्यास तांब्रांचा उपद्रव न व्हावा, मराठा धर्म रहावा, स्वामीच्या राज्यांची अभिवृद्धी व्हावी या उद्देशाने स्वामींच्या पायापाशी एकनिष्ठा धरून कर्नाटकांत चंदीचे मुक्कामी स्वामीपाशी आले. तिथे येऊन विनंती केली की आपणांस देशात सरदेशमुखीचे वतन करून दिले पाहिजे तेवी तपशील त्यापुढे १२ महालांची नावे दिली आहेत. ऐसियासी तुम्ही स्वामी सेवेवरील एकचित्त वर्तीत आहात म्हणून स्वामी तुम्हांवर कृपाळू होऊन नूतनवतन
सरदेशमुखींचे बारा महालांचे करून दिले आहे" नागोजी मानेंचे पिताश्री रतनोजी माने हे पराक्रमी व राजकारणी होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडचा रणसंग्राम
मराठ्यांकडून बाळाजी विषवनाथ व मोगलांकडून तोफखाण्याचा प्रमुख तरबीयतखंन व त्याचा भाऊ कमियाबखान ह्यांच्या नेतृत्वात सिंहगड हस्तांतरणाची चर्चा झाली. १३ एप्रिल रोजी मोगलांनी ५० हजार रुपये च्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ एप्रिल इ.स.१७३८
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ एप्रिल इ.स.१८२७
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या !
ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे.
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले.
जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले.
लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर १८४० मध्ये जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून ५ किमी.वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला.
सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असताना जोतीरावांनी अनेक मित्र मिळविले.
सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले. जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/_g9xakmrZps?feature=share
📜 ११ एप्रिल इ.स.१८२७
जोतीराव गोविंदराव फुले जन्म.
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
महात्मा जोतीबा फुले
(एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०)
हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली.
त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली.
आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀













![🚩शिवराय - _3 095.]5` GRE Al W A M A R A T SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष ११ एप्रिल इःस. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. the qreat maratha warriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors _3 095.]5` GRE Al W A M A R A T SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष ११ एप्रिल इःस. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. the qreat maratha warriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors - ShareChat 🚩शिवराय - _3 095.]5` GRE Al W A M A R A T SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष ११ एप्रिल इःस. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. the qreat maratha warriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors _3 095.]5` GRE Al W A M A R A T SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष ११ एप्रिल इःस. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रांगण्याचा वेढा स्वतःहून उठविला. the qreat maratha warriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_656357_79420cb_1775885644093_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=093_sc.jpg)