सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २३ जून १५६४ गोंडवानाची महाराणी, राणी दुर्गावती २३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां) नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली ( या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते) जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/YYcrjhwVWhY 📜 २३ जून इ.स.१६६१ हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल इंग्रज आणि डच पोर्तुगीजांना जड जाऊ लागले. इंग्रजानी तर पोर्तुगीांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता. त्यांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजाना कठीण गेल्याने त्याना समेट करावा लागला. इ. स. १६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरिना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला देण्याचे ठरविले. दि. २३ जून १६६१ या दिवशी विवाहाचा करार पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले. शिवाय वीस लक्ष पोर्तुगीज 'कुझादश्' आणि आफ्रिकेतील 'टंजियर' शहरही दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जुन इ.स.१६६९ अटक व बनारस येथे भुकंपाचे उत्पात घडून आले. सुर्यग्रहणाच्या मुहुर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशहाने सोडला. या पाशवी हुकुमाने निसर्गही थराला. अटक व बनारस येथे भुकंपाचे उत्पात घडून आले. या भुकंपामुळे ५० गज लांब जमीन फाटली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जुन इ.स.१६८५ छत्रपती संभाजी महाराजांनी कृष्णाजी कंक यांना बक्षिसाची मोईन करून दिली. फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक हे मराठा पायदळाचे सेनापती होते. येसाजी कंक हे स्वराज्य-निर्मितीचे कामातील महाराजांचे सहकारी. आग्रा भेटीच्या वेळी महाराजांबरोबर होते. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी येसाजी कंक महाराजांबरोबर कर्नाटक मोहिमेतही होते. महाराजांच्या पायदळाचे पहिले सेनापती नूरबेग होते. त्यानंतर शेवटपर्यंत पदाती नायक (पायदळाचे सेनापती) येसाजी कंक होते. 'त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे हजारांचे मनसबदार होते. ते फोंड्याच्या लढाईत धारातीर्थी पडले व येसाजी कंक हे जखमी झाले. "शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर कार्तिक वद्य ७ सप्तमी, छत्रपती संभाजी महाराज इंडियास (बांद्यास) गेले. गावीकर फिरंगी यांनी कोटास वेढा घातला होता. त्यांसी लढाई करून वेढा उठविला. तेथे येसाजी कंक व त्यांचा लेक कृष्णाजी कंक याने युद्धाची शर्त केली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ जून इ.स.१७५७ प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली. ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला. या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जून इ.स.१७६१ ज्येष्ठ वद्य षष्ठी शके १६८३, मंगळवार म्हणजे दिनांक २३ जून १७६१ रोजी पर्वतीच्या वाड्यात श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी देह ठेवला.. मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाचं सुवर्णपान गळून पडलं. जेव्हा कधी आयुष्यात शेवटचा श्वास घेईन त्या आधी शत्रूला “आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य” असं ठणकवणाऱ्या नानासाहेबांस विनम्र अभिवादन✍️ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जून इ.स.१८१७ बेलापूर किल्ला २३ जून १८१७ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती व त्या नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला , इंग्रजांच्या काळात हा किल्ला Bombay Presedinsy अंतर्गत येत होता १८१७ नंतर या किल्ल्याला उतरती कळा लागली आणि आज तो कसा बसा काही बांधकामाच्या अवशेषांच्या स्वरूपात मोडकळीस आलेल्या बुरुजाच्या स्वरूपात सिमेंटच्या जंगलात कसा शेवटच्या स्वरूपात आपल्याला पहायला मिळतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - THE greati Marathuwrriors RC 1V/ शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil २३ जन इःस. १६८५ छत्रपती संभाजी महाराजांनी कृष्णाजी कंक यांना बक्षिसाची मोईन करून दिली॰ Ihe_greal maralha warriors Ihe great marathauarriors The greal marathauarriors THE greati Marathuwrriors RC 1V/ शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil २३ जन इःस. १६८५ छत्रपती संभाजी महाराजांनी कृष्णाजी कंक यांना बक्षिसाची मोईन करून दिली॰ Ihe_greal maralha warriors Ihe great marathauarriors The greal marathauarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 २२ जून इ.स.१६६९ बिकानेरचा राजा रावकर्णाचा मृत्यू बिकानेरचा राजा रावकर्ण याचा मृत्यू औरंगाबाद येथे २२ जून १६६९ रोजी झाला. पण शिवाजी महाराजांनी कर्णाशी जोडलेले संबंध नंतरही एकदा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडले. १६७९ च्या नोव्हेंबर मध्ये महाराजांनी जालना शहरावर हल्ला चढविला. यावेळी जालण्याचा मोगल अधिकारी रणमस्तखान हा होता. "... मोगलांचे सैन्य चालून येत आहेत, सावध राहा.." असा इशारा मोगल सरदार किशनसिंह राठोड याने जालण्याच्या मोहिमेत महाराजांना दिला. म्हणून महाराज अधिक हानी न होता जालन्यातून निघून गेले. याविषयी सभासद बखरकार म्हणतो - ".. त्याचे कुमकेस केसरसिंग व सरदारखान व बाजे उमराव असे वीस हजार फौज तीन कोसांवर राहिली. मग केसरसिंग यांनी अंतरंगे सांगून पाठविले की 'उभयपक्षी भाऊपणा आहे. आमची गाठ पडली नाही तोवर तुम्ही कूच करून जाणे' हे वर्तमान कळताच राजे तेथून निघाले.. " शिवाजी महाराजांना वेळीच सावधगिरीचा इशारा देणारा हा केसरसिंग म्हणजेच राव कर्ण याचा मुलगा होय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜 २२ जून इ.स.१६७० ( आषाढ शुध्द चतुर्दशी, शके १५९२, संवत्सर साधारण, बुधवार ) किल्ले कर्नाळा स्वराज्यात दाखल :- मराठ्यांनी कोकणात रायगड जिल्हयातील पनवेल नजीकचा किल्ले कर्नाळा जिंकला. किल्ले माहुलीच्या बंदोबस्तासाठी १००० सैन्यबळ घेऊन महाराज पुढे निघाले. किल्ले कर्नाळा हा अत्यंत महत्वाचा आणि मोक्याचा दुर्ग. महाराजांनी आता निर्धारच केला होता की, तहात गमावलेले किल्ले परत घ्यायचे. या अंतर्गत आजच्या दिवशी शिवरायांनी किल्ले कर्नाळा जिंकून स्वराज्यात दाखल केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ जून इ.स.१६७६ ( आषाढ वद्य सप्तमी, शके १५९८, संवत्सर अनल, गुरूवार ) चिंचवडच्या गोसावींना ताकीदपत्र :- चिंचवडचे मोरया गोसावीचे नातू नारायण गोसावी यांना आजच्या दिवशी शिवरायांनी ताकीदपत्र लिहून देवास फुकट मीठ नेण्याविषयी मनाई केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ जून इ.स‌.१७०१ औरंगजेबाने वर्धनगड जिंकला वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. मे १७०१ या दिवशी मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फते उल्ला खान याने सल्ला दिला की, बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. औरंगजेबाने मंजुरी दिली. दिनांक ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभाव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज न उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होते, म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील लोकांना आक्रमणाची अगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायकांमुलांना किल्ल्यात नेले. नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखानाकडे पाठवला. त्याने सांगितले की, किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केले. फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्ला खान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पहात राहिला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुद्धा नाही. फतेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण यात अनेक मराठे मारले गेले; अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकली. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी "मीर ए सामान" या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून "सादिकगड" असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 २२ जुन इ.स.१७५६ किल्ले मर्दनगड मराठ्यांकडून घेण्यासाठी व्हिसेरेई कौंट द आल्वा याने बोरी नदी ओलांडली. किल्ले मर्दनगड मराठ्यांनी व्यापल्याची बातमी व्हिसेरेई कौंट द आल्वा याला वाटेतच कळली. तो तसाच मागे परतला. परंतु त्याला काय दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक! त्याने किल्ले मर्दनगड मराठ्यांकडून परत घेण्याचे ठरवून सैन्यास फोंड्याकडे जाण्याचा हुकूम दिला.२२ जुन इ.स.१७५६ भर पावसात त्याने बोरी नदी ओलांडली. त्याची सारी भिस्त त्याने पोर्तुगालकडून गोव्यास येताना बरोबर आणलेल्या आधुनिक तोफांवर होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ जून इ.स.१७९२ फर्मान बाडी ‘चा कार्यक्रम महादजी शिंदे पुण्यात पोहोचल्यावर १२ जून १७९२ ला त्यांनी कारभाऱ्यानच्या भेटी घेऊन बादशाह शाह आलमने दिलेल्या वकील इ मुत्लक बहुमान व त्याच्या बरोबरील मान सन्मान सवाई माधवरावास देण्या विषयी चर्चा केली. पण कारभारी त्याबाबत काही बोलेनासे झाले. तेव्हा महादजींनी सर्व मुत्सद्यांचा विरोध मोडून काढून २२ जून १७९२ रोजी गारपीराजवळ (आताचा ससून हॉस्पिटलच्या आसपासचा भाग) खास शामियाना उभारून सवाई माधवरावना मानाची वस्त्रे देण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘फर्मान बाडी ‘चा कार्यक्रम पार पडला. वकील इ मुतलकी पदामुळे मराठ्यांना बादशाहची मुखत्यारी मिळाली, ते मोगली सत्तेचे अधिकृत कारभारी बनले, हिंदुस्थानच्या सत्तास्पर्धेत इंग्रजांवर मात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 २२ जून इ.स.१९४१ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमधील सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील, आगामी काळातील सशस्त्र घडामोडींविषयी दोघांमध्ये अनेक महत्वाच्या बाबींवर सखोल चर्चा झाली. पुढे १९४३ मध्ये सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या 'आझाद हिंद सेने'चे बीजारोपण ह्याच चर्चेदरम्यान झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - I: Cೈ! ,17 ت HLHA GR E T M A R A T H Al W A RR I 0RS ೧೦೦೬ ortl SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil २२ जन इःस.१६७० मराठ्यांनी कोकणातल्या रायगड जिल्हयातील पनवेल नजीकचा किल्ले कर्नाळा जिंकला. the_great_marathawarriors Ihe greol morolho uorriors the great marathawarriors I: Cೈ! ,17 ت HLHA GR E T M A R A T H Al W A RR I 0RS ೧೦೦೬ ortl SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil २२ जन इःस.१६७० मराठ्यांनी कोकणातल्या रायगड जिल्हयातील पनवेल नजीकचा किल्ले कर्नाळा जिंकला. the_great_marathawarriors Ihe greol morolho uorriors the great marathawarriors - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜२१ जून इ.स.१६६० (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८२, शार्वरी, वार गुरुवार) #संग्रामदुर्ग_म्हणजेच_चाकणच्या_भुईकोट_किल्ल्याला #शाहिस्तेखानाचा_वेढा_पडला. शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मुघल सरदार शाहिस्तेखान याने महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या. पुणे - नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता, हि गडी जिंकल्या शिवाय नाशिक पुणे मार्ग निर्धास्त होऊच शकत नाही याची जाणीव शाहिस्तेखानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली. चाकणचे मराठी किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हालविले. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले, जेणेकरून मोघली सैन्याला धान्याची चण-चण भासेल. २१ जून १६६० रोजी मुघल फौज चाकणला पोहोचली. मुघल सैन्याने पहिलाच जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लीलया परतवून लावला, तेव्हा खानाला कळून चुकले कि हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही. त्याने किल्ल्याला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाणा - गोटा संपला कि किल्ला आपसूक ताब्यात येईल. फिरंगोजींनी अचूक जागी बंदुकधारी आणि तिरंदाज बसविले होते, ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले. खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही. रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मोगल छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत. असे कित्येक दिवस चालू राहिले. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. ३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळा यांनी चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० रोजी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜२१ जून इ.स.१६७४ भारतातील तेजस्वी पुरुषांचे शौर्य काव्य नमूद करणारे पहिलेच कवि भूषण यांनी छत्रपती शिवरायां वर लिहिलेले " शिवराज भूषण " हे काव्य शके १५९६ जेष्ठ व.त्रयोदशी फिरंगी दि.२१ जून इ.स. १६७४ रोजी काव्य पूर्ण केले तसेच त्यांनी 'शिवराज-भूषण' व 'शिवबावनी' यांतून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण स्तोत्र गायले आहे. व 'छत्रसाल-दशक' हे नामक काव्यांत छत्रसाल बुंदेलखंड राजा यांचा पराक्रम वर्णिला आहे. श्रीशिवराजभूषण काव्य पूर्ण. इन्द्र जिमि जंभ पर, वाडव सुअंभ पर । रावन सदंभ पर, रघुकुल राज है ॥१॥ पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर । ज्यों सहसबाह पर, राम व्दि‍जराज है ॥२॥ दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर । भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज है ॥३॥ तेजतम अंस पर, कान्ह जिमि कंस पर । त्यों म्लेच्छ बंस पर, शेर सिवराज है ॥४॥ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२१ जून इ.स.१६९४ हमीदुद्दीनखान हा ठाणी बसविणे आणि कही (घासदाणा, रसद) आणणे या उद्देशाने गढीसंख (जत तालुका) च्या दिशेने गेला होता. ठाणी बसवून व कही बरोबर घेऊन तो परत आला. त्याने आपले पथक मोतीगाव येथील फौजेच्या तळावर ठेवले.. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२१ जून इ.स.१७०० परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २१ जून इ.स.१७३५ श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई ह्या १४ फेब्रुवारी १७३५ रोजी काशी यात्रेसाठी पुण्याहून निघाल्या. २१ जूनला जयपूरला पाहुणचार घेऊन त्यांनी काशीकडे कूच केले. वाटेत फर्रुखाबाद, इटा, कानपूर, मैनपुरी, बदाउन, शहजाहानाबाद वगैरे जिल्ह्यांचा मुलुख होता. हा सर्व प्रदेश महम्मदखान बंगश याचा होता. होय, हा तोच बंगश, ज्याने श्रीमंत बाजीरावांच्या समशेरीचे तेज बुंदेलखंडात चाखले होते. राधाबाईंना ओलीस ठेऊन राऊंना पर्यायाने मराठी साम्राज्याला जेरीस आणण्याची सुवर्णसंधी खरेतर बंगशाकडे चालून आली होती. पण तसा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही किंवा असा विचार मनात आला असेल, तरी तो प्रत्यक्षात उतरवण्याची हिम्मत बंगशात नव्हती. कारण तो चांगलाच जाणून होता, असा कोणताही प्रकार घडला तर गाठ थेट बाजीराव पेशव्यांशी आहे. विस्तवाशी खेळल्याने इजा आपल्यालाच होते, हे त्याला माहित होते. म्हणून त्याने सर्वात सोप्पा आणि सुरक्षित मार्ग निवडला. "बाजीरावांची आई ती आमची आई" असा पवित्रा घेऊन राधाबाईंच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आणि स्वखर्चाने त्यांना यात्रा करून दिली. हा मुद्दा नक्की लक्षात घेण्यासारखा आहे. पुढे बुंदेलखंडात जाऊन छत्रसाल बुंदेले यांचे पुत्र (जे बाजीरावांना त्यांचे भाऊ मानीत) जगतराज व हिर्दोसा यांचा पाहुणचार घेऊन राधाबाई २६ मे १७३६ ला सव्वावर्षाने सुखरूप पुणे प्रांती परतल्या. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २१ जून इ.स.१८५८ इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या टोपे झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेले; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २१ जून २०१० महाराष्ट्र सरकारने २१ जून रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यास महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. महाराजांनी २५ नोव्हेंबर इ.स.१६६४ रोजी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती… 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - ECREDT Narall: Van nions SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष २१ जन इःस. १६६० छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मुघल सरदार शाहिस्तेखानाने चाकणच्या भूईकोट किल्ल्याला वेढा घातला. the qreair maratha warriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors ECREDT Narall: Van nions SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष २१ जन इःस. १६६० छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मुघल सरदार शाहिस्तेखानाने चाकणच्या भूईकोट किल्ल्याला वेढा घातला. the qreair maratha warriors the great marathawarriors the_greal_maratha_warriors - ShareChat
⛳आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २० जून इ.स.१६७७ विजापुरचा सुरमा म्हणून, अब्दुल्लाखानाची ओळख होती . हा किल्ले वेल्लोरचा किल्लेदार. राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले, त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरु झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले. त्यातच, दि. २० जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/a2UAPOZKemM?feature=share 📜 २० जुन इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराजांना व्हिसेरेईने पाठविलेल्या पत्राची नोंद ! "आपल्या दुताने आणलेली प्रमाणपत्रे आम्हाला विश्वासार्ह वाटली नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तहाच्या करारावर सही करण्याचे अधिकार तुम्ही दिले नव्हते. त्यामुळे तुमच्याकडून नवीन हुकुम येईतोवर तहाचा करार तहकूब ठेवावा लागत आहे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराज रायगडावर छत्रपतींच्या मृत्यूनंतर दिनांक २१ एप्रिल १६८० रोजी आनाजी दत्तो यांनी पुढाकार घेऊन रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करविले व संभाजी राज्यांना अटक करण्यास पन्हाळ्याकडे कूच केली, पण त्वरेने हालचाल करून संभाजी राज्यांनी अटकचे फर्मान घेऊन आलेल्या सेनापती हंबीररावांना बरोबर घेतले, याची माहिती पत्ता कटात सामील असलेल्या सूत्रधारांना न्हवता, संभाजी राज्यांना कैद करण्यास गेलेले अनाजी दत्तो यांना हंबीररावांनीच कैद केले आणि सगळी फितुरी मोडीत काढली. संभाजी राज्यांनी पन्हाळ्याहून रायगडाकडे वीस हजार सैन्यानिशी कूच केली, स्वराज्याचे सेनापती संभाजीराज्यांना मिळाल्याने त्यांचे पारडे जड झाले होते, दिनांक २० जून १६८० रोजी रायगड सहजपणे शंभू राज्यांच्या ताब्यात आला, संभाजी राज्यांनी कटात सामील असणाऱ्यांना मोठ्या मनाने आणि मानाने स्वराज्यात सामील करून घेतले, अनाजी दत्तो याना अमात्य पद देण्यात आले, तरीही अनाजीनी आपल्या महत्वकांक्षेवर आवर घालता आला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१६८२ औरंगजेबपुत्र अकबराने छत्रपती संभाजी महाराजांकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे छत्रपती संभाजी महाराजांविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१७३३ छत्रपती शाहुंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना हस्तगत झाला...... पुन्हा रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूने ता. २० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे, घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ. रा. शिवाजीमहाराज व रा. आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराम महाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि. फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे..... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१७९० महादजी शिंदे याचा युरोपिअन सेनापती - डी बॉईन सन १७९० च्या आरंभीं डी बॉइनेच्या हाताखाली सात सातशें शिपायांची एक पलटण अशा आठ पलटणींचें एक ब्रिगेड होतें. त्यांत महादजीनें हळू हळू भर घालून शेवटीं त्या तीन ब्रिगेड केल्या. त्याचा तोफखानाहि वाढतां वाढतां शेवटीं एकंदर दोनशेंवर तोफा झाल्या होत्या. यांतील ६० तोफा सँग्स्टरनें आपल्या कारखान्यांतच ओंतून तयार केल्या होत्या. डी बॉइनेच्या प्रत्येक पलटणीबरोबर सहा पौंड वजनाचा गोळा फेंकणार्‍या दोन, तीन पौंड वजनाचा गोळा फेंकणार्‍या दोन व एक हॉविट्झर एवढा सरंजाम असून प्रत्येक ब्रिगेडला ५०० घोडस्वारांचें एक एक पथक जोडलेलें होतें. डी बॉइनेचा पगार शेवटी दरमहा १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यांत आला होता. याशिवाय त्याच्या पायदळाच्या व तोफखान्याच्या खर्चाकरितां कांहीं जमिनी लावून दिल्या असून त्यांच्या ऐन वसुलावर शेंकडा दोन टक्के नफा घेण्याची परवानगी देण्यांत आली होती. खड्या सैन्याशिवाय डी बॉइनेजवळ कांही निवडक हंगामी पायदळहि असें. यांतील शिपायांजवळ तोड्याच्या बंदुका असत; पण डी बॉइनेनें त्यांनां संगीनी लावण्याची युक्ति काढून या पायदळाची उपयुक्तता बरींच वाढविली होती. इस्मायलबेगशीं झालेल्या पाटणच्या लढाईंत (२० जून १७९०) महादजी शिंद्याचा जो विजय झाला तो मुख्यत: डी बॉइनच्या पलटणीमुळेंच. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - ٧٧٤ ٤٨7 Ilana N೩1 / RI O RS SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patit शिवदिनविशेष २० जन इःस. १६७७ मराठा फौजेने शेरखानावर हल्ला केला व व्हालौर, टेजपठण , भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली. the_greal marathawarriors the great marathauarriors the great marathauarriors ٧٧٤ ٤٨7 Ilana N೩1 / RI O RS SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patit शिवदिनविशेष २० जन इःस. १६७७ मराठा फौजेने शेरखानावर हल्ला केला व व्हालौर, टेजपठण , भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली. the_greal marathawarriors the great marathauarriors the great marathauarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १९ जून इ.स.१६२६ बहामनी शासकाच्या वजीर निजाम मल्लिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलावर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/OPhiee3l5a4?feature=share 📜 १९ जुन इ.स.१६३६ शहाजहान बादशहाचा गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिण्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण-नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:- शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद्रा) राजदेहरे, कोलेर (लोकघेर) कंचना, मंचना, कण्हेर, जवळा, रवळा, मार्कंड्या, अहिवंत, अचलगड, आणि किल्ले रामसेज मात्र नंतर महाराजांनी इ.स.१६७० १६७१ १६७२ या कालावधीत वरिल सर्व किल्ले स्वराज्यात आणले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १९ जुन इ.स.१६७६ (आषाढ वद्य ४, चतुर्थी, शके १५९८, संवत्सर अनल, वार सोमवार) महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंदू करून घेतले. नेतोजी पालकर (मुहम्मद कुलीखान) १० वर्षे काबूलकडे राहिल्यानंतरही नेतोजीराव महाराजांना (स्वराज्याला) विसरू शकले नाहीत. त्यांचे मन सदैव दक्षिणेकडेच धाव घेई. महाराजांकडे परत जाण्याकरिता अनुकूल संधीची वाट ते पहात होते. अखेर तशी संधी त्यांना मे इ.स.१६७६ मिळाली. दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे दक्षिणेची कामगिरी सोपविली गेली. आणि एक दिवस नेतोजीराव महाराजांकडे पळून गेले. महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावरच होता. नेतोजीराव स्वराज्यात परत आल्याचे पाहून महाराजांना अवर्णनीय आनंद झाला. मुहम्मद कुलीखान यांचे "नेतोजी पालकर" मध्ये विधिवत रुपांतर झाले. महाराजांनी त्यांना शास्त्रविधिनुसार पुन्हा हिंदु करून घेतले. महाराजांनी नेतोजीरावांना स्वधर्मात घेऊन सक्तीच्या धर्मांतराला अतिशय चोख उत्तर दिले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १९ जुन इ.स.१६८३ (आषाढ शुद्ध पंचमी, शके १६०५, रुधिरोद्वारी संवत्सर, वार मंगळवार) औरंगजेब बादशहाची मनःस्थिती अतिशय विचलित! औरंगजेब बादशहाची मनःस्थिती अतिशय विचलित झाली होती. याबद्दलचे सुरतकर इंग्रजांचे बोलके "मोगल (पातशहा) अद्यापि येथून हालला नाही. परंतु वदंता अशी आहे की, तो दिल्लीस जाण्याच्या विचारात आहे व छत्रपती संभाजी महाराज यांवरील लढाईची सुत्रे आपले अधिकाऱ्यांकडे सोपविणार आहे. तो अतिशय चिडखोर झाला आहे. त्याच्या मनाची अस्थिरता अतिशय वाढत आहे. त्यामुळे त्याचे सरदार त्याच्यावर नाराज आहेत. जर त्याचे आयुष्य लवकरच संपले नाही तर ते त्याला फार दिवस जगू देणार नाहीत. आम्हाला मात्र भितिदायक वातावरणात रहावे लागत आहे. मात्र औरंगजेब बादशहास मराठे सैन्याने हैराण केले होते हे खरे आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १९ जून इ.स.१७४३ शाहू छत्रपतींच्या दरबारात स. १७२४ मध्ये श्रीपतराव प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. “मराठ्यांनी प्रथम दक्षिण दिग्वजय करावा दक्षिणेत आपली सत्ता प्रस्थापून दक्षिण ताब्यात आणावी आणि मग उत्तरेकडे जावे.” प्रतिनिधीचे कोणीही ऐकले नाही. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यास हिंदु पतपादशाहीचा झेंडा हिमालयापर्यंत घेऊन जाण्यास मुभा दिली. कर्नाटकमामला फत्तेसिंग भोसले याजवर सोंपविला. फत्तेसिंगानी १७२५-२६ मध्ये एक स्वारी कर्नाटकात नेली. दुसरी स्वारी चिंत्रदुर्गची बाजीराव पेशव्यांनी नेली. स. १७३९ मध्ये रघोजी भोसले व फत्तेसिंग या उभयतांनी कर्नाटकावर चाल करून तेथील नबाबास मारीले व तंजावरचा राजा प्रतापसिंग यास अभय दिले. ह्यावेळी रघुजीचा संबंध फ्रेंच सेनापती डुमासशी आला. बाळाजी बाजीराव यांस पेशवाई पद दिल्यावर छत्रपतीनी पेशवे पदासाठी झुंजणाऱ्या बाबुजी नाईकास कर्नाटक मामला दिला. वास्तविक कर्नाटक सुभा, विजापूर, भागानगर आणि तुंगभद्रा व रामेश्वर मधील सर्व प्रदेश हा राजाच्या खाजगीकडचा. त्या सर्व प्रदेशात मुलूखगिरी करण्याचा हक्क बाबुजी नाईक बारामतीकर यांस शाहू महाराजांनी तारीख १९ जून १७४३ च्या हुकूमान्वये दिला. ह्या मोबदल्यात बाबुजी नाईकानी दरसाली महाराजास ७ लाख रुपये द्यावयाचे असून शिवाय ५ लाख रुपये खंडणी तंजावर राजाकडून घेऊन द्यावयाची असे बा. नाईकांनी कबूल केले होते. कर्नाटक क्षेत्र आपल्यास मिळाल्यावर बाबूजी नाईकांनी कर्नाटकात दोन स्वाऱ्या केल्या. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १९ जून इ.स.१८८२ छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी इंग्रजांविरुध्द बंड पुकारले. जानेवारी १८७८ साली ब्रिटीशांनी स्टेट कारभारी म्हणुन महादेव वा. बर्वे याची नेमनुक केली. बर्वे हा फार स्वार्थी लाचार आणि जातीयवादी धूर्त व्यक्ती होता. त्याने स्वजातीचे शंभरच्यावर लोक प्रशासनात घुसवले. त्याने इंग्रजांच्या मदतीने कटकारस्थानाला सुरवात केली. महाराजांना वेड लागले अशी आफवा बर्वे पसरवू लागला. महाराज एकटेच लढत होते त्यांनी हार मानली नव्हती. इंग्रजांच्या मदतीने महादेव बर्व्याने कोल्हापुरमध्येच महाराजांना एकांतत बंदीस्त केले नंतर १९ जून १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणेमार्गानी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर हालवले किल्ल्यात एका ईमारतीत एकांतात ठेवले. कोणीही ओळखीचा चेहरा दिसनार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली. महाराजावर मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता. आडदांड सोल्जर ग्रीन याची महाराजांचा आंगरक्षक म्हणुन नेमनुक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇. 📜 १९ जून इ.स.१९१७ ज्येष्ठ व ३०, शके १८३९ शेवटची वेल सुकली ! शके १८३९ च्या ज्येष्ठ व ३० रोजी दुसन्या बाजीरावाची मुलगी कुसुमावती ( बयाबाई आपटे) वयाच्या सत्तराव्या वर्षी काशी येथें निधन पावली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - IEUnE;   T H E 3 R.5 4P/_IUHA APR -0P8 SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष १९ जून इःस. १६७६ छत्रपती शिवाजी महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंद करून घेतले. the great marathauarriors Ihe qreal maralho uurriors the greal marathawarriors IEUnE;   T H E 3 R.5 4P/_IUHA APR -0P8 SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष १९ जून इःस. १६७६ छत्रपती शिवाजी महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंद करून घेतले. the great marathauarriors Ihe qreal maralho uurriors the greal marathawarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १७ जून इ.स.१६३१ बेगम मुमताज़ हीचा वयाच्या ३८व्या वर्षी मृत्यू वयाच्या १७ व्या वर्षी शहाजहानचे पहिले लग्न इराणी राजवंशातील मुलगी कदाहर महल हिच्याशी झाला. पुढे ३ वर्षांनी शहाजहानचे लग्न असफखानाची मुलगी अर्जुमंद बानु म्हणजेच मुम्ताज महल हिच्याशी झाले. (अर्जुमंद बानु ही जहांगीरच्या पत्नीची म्हणजे महेर उन्नीसाची पुतणी). लग्न सोहळा समारंभ तब्बल महिना भर चालु होते आसे दिल्लीच्या शहाजहान चा इतिहास या पुस्तकात म्हटले आहे. लग्न झाले तेव्हा ती शहाजहान पेक्षा १४ महिन्यांनी लहान होती. मुम्ताज नवऱ्याच्या सहवासात तब्बल १९ वर्षे होती. या १९ वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात मुम्ताजला शहाजहान पासुन १४ वेळा संतती प्राप्ती झाली. मुम्ताज व शहाजहान यांस झालेल्या पुत्रांमद्धे ८ मुले व ६ मुली होत्या. पहिली मुलगी महिरुन्निसा ही केवळ तीन वर्षे जगली. दुसरी मुलगी जहांनारा बेगम हीचा जन्म १६१४ मद्ये होऊन मृत्यू १६८१ मद्ये झाला. तिसरा व चौथा मुलगा दारा शुकोह तसेच शहाशुजा याचा जन्म अजमीर येथे झाला. पाचवी मुलगी रौशनरा बेगम ही बुऱ्हानपूर येथे जन्माला आली. सहावा मुलगा जो पुढे मोघली रियासतीची ओळख बनुन राहिला. तोच आलमगीर औरंगजेब सन १६१८ साली जन्माला आला. पुढील अपत्ये अनुक्रमे उमेदबक्ष, मुलगी सुरय्या बानु बेगम हे वयाचा कमी वयातच दगावले तसेच नववा मुलगाही नाव ठेवण्याआधी मृत्यू पावला. दहावा मुलगा मुराद बक्ष याचे नाव मोघली रियासतीस ठळक पणे वाचायला मिळते. पुढे लुत्फुल्ला व दौलतब्जा हे दोन्ही पुत्र केवळ एक एक वर्षे जगले. सन १६३० मद्ये मुम्ताजला १३ वी मुलगी झाली. जी जन्मताच वारली. सन १६३१ मद्ये शहाजहान व मुम्ताज यांना गौहरारा बेगम ही मुलगी झाली.सन ७ जून १६३१ रोजी १४ व्या मुलीला जन्म देताना बुऱ्हानपूर येथे मुम्ताजचा मृत्यू झाला. १४ व्या कन्येला जन्म देताना प्रसुती वेदनांमुळे मुम्ताज हिचा मृत्यू झाला. तिला तब्बल ३० तास वेदना होत होत्या. आपला मृत्यू समीप आला आहे हे जाणून तिने आपला पति शहाजहान या कडून दोन वचने मागीतली. ती म्हणजे आपल्या पश्चात शहाजहानने परत विवाह करु नये. आपल्या व आपला पति शहाजहान याच्या अपूर्व प्रीतीचे स्मारक उभारले जावे. मुम्ताज च्या मृत्युचे प्रदीर्घ परिणाम शहाजहानच्या जीवनावर झाले. मुम्ताज सोडून इतर दोन बायका देखील होत्या, (एक मुज्फर हुसेन ची मुलगी तर दुसरी शहानवाज खानाची मुलगी) मात्र त्यांच्याशी केलेले विवाह हे केवळ राजकीय हेतु साध्य करण्यासाठी केले होते. त्यात प्रेमाचा अंश न्हवता. शहजहानचा जीव जडला होता तो मुम्ताज बेगम मध्ये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/qh2rTn0crAQ 📜 १७ जून इ.स.१६३३ इ. स. १६३० पासून १६३६ पर्यंत पहिली सहा वर्षे बालशिवाजी राजांसह जिजाबाई शहाजीराजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या. निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी १७ जून १६३३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा शहाजीराजांनी संगमनेर येथील पेमगिरी उर्फ भीमगड (शहागड) येथे निजामशहाची गादी स्थापिली व स्वतः वजीर बनले. ह्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या. आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायांस शिवापुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले.राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव याच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजीराजांसह त्या शहाजीराजियांबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले. व बरोबर जिजाबाई व बाळराजे शिवाजी राज्यांस ठेविले. त्या किल्ल्यासही विजापूरच्या फौजेने वेढा घातला तेव्हा किल्ला लढविण्याची शिकस्त करून वेढा उठेना म्हणून सल्ल्याची बोलणी केली व माहुली किल्ला खाली करून दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ जून इ.स.१६७४ं (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५९६, आनंदनाम संवत्सर, वार बुधवार) #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब_पुण्यतिथी🙏 "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री" "राजमाता जिजाऊ माँसाहेब" यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन. आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले. राजा पोरका झाला, दिशा शुन्य झाल्या, आधार संपला, अंधार उरला, फक्त घनदाट अंधार☝️ आता शिवबाला "बाळ" म्हणणारे जगात कोणीही उरले नाही😔 महाराज एकाएकी प्रौढ झाले. महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि "छत्रपती श्री शिवाजी महाराज" आणि "युवराज शंभुराजे" यांच्या आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज पेरलं, ती आई म्हणजे "जिजाऊसाहेब". त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले. एक स्वाभिमानाची जननी काळाआड गेली, पण स्वाभिमानाच साम्राज्य बघूनच! स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. https://youtu.be/qh2rTn0crAQ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ जून इ.स.१६८१ (आषाढ शुद्ध द्वादशी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार) सरसेनापती नेतोजी पालकर व हिरोजी फर्जंद यांनी शहजादा अकबराची भेट घेतली. छत्रपती संभाजी महाराजांचे शिष्टमंडळ अर्थात सरसेनापती नेतोजी पालकर आणि हिरोजी फर्जंद शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड यांची भेट घेऊन किल्ले रायगडावर आले. हिरोजी फर्जंद मार्फत छोटासा नजराणा आणि खलिता पाठवून शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढच्या हालचालीकडे लक्ष देऊन बसले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ जून इ.स.१७५७ १७ जून च्या सुमारास मराठे यमुनेपलिकडे दुआंबात उतरले. अंताजी माणकेश्वरांनी सिकंदराबादचा प्रदेश कबजात घेतला. पण मुख्य उद्योग दिल्ली ताब्यात घेण्याचा होता. दिल्लीस सर्व अखत्यार नजीबखानाकडे असून अंतर्वेदचा प्रदेश त्याचे ताब्यात होता. गाजीउद्दीन नजीबखानास काढून लावण्यास उत्सूक होता त्याना दादास मी आपला दोस्त, आपण येऊन बंदोबस्त करावा असे पाचारण केले त्यावेळी सिद्ध झाले. नजीबखानास ही बातमी कळताच त्यास आपला अंतर्वेदीचा प्रदेश जाणार याची धास्ती पडून त्याने‌ मल्हाररावातर्फे दादाची मनधरणी करण्यास सुरुवात केली व आपली ६ कलमी शांतता योजना राघोबास सादर केली. त्यापैकी मराठ्यांनी काही अटी मान्य केल्या. अंतर्वेदीत अंताजी माणकेश्वरची फौज उतरली होती. तीने सहारणपूर पासून इटाव्यापावेतोचा तमाम प्रदेश अल्पायासे व्यापला. आता दिल्लीच घेण्याचे काम बाकी राहिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ जून इ.स१८९५ (ज्येष्ठ वद्य दशमी, शके १८१७) आगरकर यांचे निधन ! शके १८१७ च्या ज्येष्ठ व १० रोजी महाराष्ट्रांतील थोर समाजसुधारक, बुद्धिवादी पुरुष, 'सुधारक' पत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन झालें. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ जून इ.स.१९१४ (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १८३६) लोकमान्य टिळक यांची मंडाले येथील दीर्घकालीन कारावासातून मुक्तता होऊन ते पुण्यास येऊन पोहोचले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🙏शिवाजी महाराज वॉलपेपर - THE [REAT7  1818 40)9 G R B A T {02 T H ని शिवा SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil वशष १७ जन इःस. १६७४ राजमाता जिजाऊ dfIleq यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन झाले. Ihe qreal maralhauarriors the qreat marathauarriors Ihe qreal maratha warriors THE [REAT7  1818 40)9 G R B A T {02 T H ని शिवा SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil वशष १७ जन इःस. १६७४ राजमाता जिजाऊ dfIleq यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन झाले. Ihe qreal maralhauarriors the qreat marathauarriors Ihe qreal maratha warriors - ShareChat
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १६ जून इ.स.१६५९ ( आषाढ शुद्ध शष्टी, शके १५८१, संवत्सर विकारी, गुरुवार ) आदिलशहाने (अफजलखान) कान्होजी जेधे यांस फर्मान पाठविले. प्रत्यक्ष आदिलशहाने कान्होजीराव नाईक जेधे यांस फर्मान पाठविले. "महाराजांचा निर्मुळ फडशा पाडण्याची" आज्ञा आदिलशहाने दिली असल्याचे स्पष्टच दिसते. या सर्व साधनांच्या आधाराने अफजलखानाच्या मनात कपट होते व त्याने महाराजांना कपटाने फसवून कैद करावे किंवा ठार मारावे असा स्पष्ट आदेश आदिलशहाने दिलेला होता असे ठामपणे म्हणता येते. अफजलखानाने शिऱ्याचा कस्तुरीरंग याला यापुर्वी असेच कपटाने भेटीचे वेळी वचन बदलून ठार मारले होते. राजे शहाजीराजे यांचा तो कट्टर द्वेष्टा होता. महाराजांचे वडील बंधू राजे संभाजीराजे यांनाही अफजलखानानेच कनकगिरीच्या वेढ्यात असेच विश्वासघाताने ठार मारले होते. तेव्हा अफजलखानाचा उद्देश, त्याचे पुर्वचरित्र व आदिलशहाचा हुकुम हे सारे ध्यानात घेतले तर अफजलखानाच्या हालचाली महाराजांना ठार मारण्यासाठीच सुरू होत्या हे सुर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/19yarUy2kjo?feature=share 📜 १६ जून इ.स.१६६६ (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार) महाराजांचा औरंगजेब बादशहास विनंती अर्ज! कोंडी कशी फोडावी याचा महाराज रात्रंदिवस विचार करीत होते. महाराजांनी औरंगजेब बादशहाला पुन्हा एक अर्ज केला. त्यात म्हटले होते की, "मी फकीर होण्याचे ठरविले असून मला बनारसला जाण्याची मिळावी". औरंगजेब बादशहाने कळविले, "फारच चांगले! महाराजांनी फकीर होऊन प्रयागच्या किल्ल्यात रहावे बहादुरखान तिथला सुभेदार आहे. तो महाराजांवर लक्ष ठेवील". प्रयागचा किल्ला राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी कुख्यात होता. अर्थात महाराजांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे प्रश्न कायमच राहिला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १६ जून इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून मुंबईत पोहोचला. १२ जुन इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडनच्या करारावर प्रधानांच्या सह्या होऊन शिक्कामोर्तब झाले. झालेल्या तहावर महाराजांनी ताबडतोब सही करावी असे टुमणे आक्झेडनने राज्याभिषेकाच्या आधीपासूनच निराजीमार्फत लावले होते. पण महाराजांनी त्याची मुळीच दखल घेतली नाही. राज्याभिषेकानंतरही ४, चार दिवस पर्यंत महाराजांनी आक्झेडनला ताटकळत ठेवले. अखेर ११ जुन इ.स.१६७४ करारावर महाराजांची सही झाली. व १२, जुन इ.स.१६७४ प्रधानांच्या सह्या होऊन करारावर शिक्कामोर्तब झाले. व दुसऱ्या दिवशी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ जून इ.स.१६७३ (आषाढ शु.१२ १५५९) "छत्रपती शिवाजी राजेंची" स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणुन इंग्रजांनी "थॉमस निकल्स" या इंग्रज अधिकार्याला योग्य त्या सुचना व सोबत मोठा 'नजराणा' देवुन मुंबईहून हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड वर रवाना केले. टॉमस निकल्स नावाचा इंग्रज वकील शिवछत्रपतींशी तहाची बोलणी करण्यासाठी १९ मे १६७३ रोजी मुंबईहून रायगडाकडे आला. काही दिवसांत च छत्रपती शिवरायांशी तहाची बोलणी करून व संमती मिळवून दि. १६ जून रोजी मुंबई ला परत आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ जून इ.स.१६८१ (आषाढ शुद्ध एकादशी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांनी सरसेनापती नेतोजी पालकर व हिरोजी फर्जंद यांना शहजादा अकबराच्या भेटीस नजराणा घेऊन पाठविले. शहजादा अकबरास भेटण्याच्या निर्णयास अनुसरून छत्रपती संभाजी महाराजांच्या तर्फे सरसेनापती नेतोजी पालकर व हिरोजी फर्जंद यांना छत्रपती संभाजी महाराजांनी नजराणा घेऊन अकबराच्या भेटीस पाठविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ जून इ.स.१६९५ इज्जतबेग तोफखान्याचा दारोगा, याला उदगीर व कंधार येथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आले. बादशहांनी शहाजादा बेदारबख्त याला आंब्याच्या सहा करड्या पाठविल्या. तसेच शहाजादा मुअजम, गाजिउद्दीनखान बहादुर, जुल्फिकारखान बहादुर व विजापूर कर्नाटकचा फौजदार कासिमखान यांना आंबे पाठविण्यात आले. बादशहांना कळविण्यात आले की गनिमांच्या फौजेने मानवत, अंबड व वाशिम या भागातः घुमाकुळ घातला आहे. बादशहांनी आज्ञा केली की अलीमर्दानखान (वर्हाडचा सुभेदार) याजकडे अलीकुली बेग गुर्जबर्दार याला पाठवावे आणि अलीमर्दानखानाने जागेवर जाऊन गनिमांचे पारिपत्य करावे अशा अर्थाचे हुकुम पाठवावे. बिलरसखान यास मातबरखानाच्या फौजेतून हुजुरात बोलावून घेण्यात आले. हेरकाऱ्यायांच्या तोंडून कळले की बेडरांनी गुलबर्गा भागात उच्छाद मांडला आहे आणि आसपासची खेडी लुटली आहेत. आग्राला अठरा मे १६९५ रोजी पोहोचून आपण सुभेदारीचे काम सांभाळू लागलो अशा अर्थाची मुख्तारखानाची अर्जी आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 - TiE GD SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil १६ जन इःस. १६५९ कान्होजी जेधे यांना अफझल खानाचे आदिलशाहीस मदत करण्याचे फर्मान आले. the_greal_marathawarriors the greal marathauarriors the greal marathauarriors TiE GD SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil १६ जन इःस. १६५९ कान्होजी जेधे यांना अफझल खानाचे आदिलशाहीस मदत करण्याचे फर्मान आले. the_greal_marathawarriors the greal marathauarriors the greal marathauarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १५ जून इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू,वार गुरुवार) महाराज जड अंतःकरणाने किल्ले राजगडी सुखरुप परत! तह स्वीकारल्याचे मनोमन इतके दुःख महाराजांना वाटले की, जड अंतःकरणाने महाराजांनी ते स्वतःच स्वीकारले. मात्र ते कोणाजवळ व्यक्त करण्याचे धाडसही महाराजांना नव्हते. रयतेची, सैन्याची, प्रजेची, स्वराज्याची आधिक नासाडी होऊ नये म्हणून हा तह चाणाक्ष बुद्धीने आणि चातुर्याने स्वीकारून महाराजांनी स्वराज्य साफ बुडण्यापासून वाचविले. हा जगप्रसिद्ध तह आणि तहाचा अभ्यास मुळात संपूर्णपणे केल्यास महाराज काय होते याची खात्रीच पटते मात्र त्यानंतर महाराज किल्ले राजगडी परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/_UNhuoohGII?feature=share 📜 १५ जून इ.स.१६७० मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. कोणा मातब्बराने ही मोहिम फत्ते केली ? ते काही समजायला मार्ग नाही. इतिहास मुका आहे, तिथे तर्कही लंगडा पडतो. सामान्य माणसाने घडविलेला असामान्य इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास लिहून ठेवायची आमच्यात पद्धत नव्हती. पराक्रम करायचा आणि मोकळे व्हायचे. 🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१६८१ (आषाढ शुद्ध दशमी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार) शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक ! जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच प्रथम प्रतिनिधी पाठवून शहजादा अकबराशी चाचपणी करावी असे ठरले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१७०४ सरसेनापती धनाजी जाधवांनी औरंगजेब बादशहाच्या ब्रम्हपुरी च्या छावणी वर हल्ला केला. यावेळी मोगलांच्या वर धनाजी जाधवांनी मोठा बाका आणला होता . औरंगजेब बादशहाची बायको उदेपुरी बेगम, मुलगी झिनतउन्निसा बेगम आणि बादशहाच्या अंत:पुरातील इतर स्त्रिया यांच्या सह संपूर्ण कुटुंब कबीलाच मराठ्यांच्या ताब्यात येण्याची भिती निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळी एका रजपुत सरदारा मुळे ही घटना टळली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१७२१ छत्रपती थोरले शाहू माहाराज यांची सेनापती संताजी घोरपडे यांचे पुत्र पिराजी घोरपडे यांस दिनांक १५ जून सन १७२१ रोजीची सनद घोरपडे घराण्यातील सेनापती संताजी घोरपडे यांचे वडील म्हाळोजी घोरपडे यांच्याविषयीही काही गौरवपूर्ण उल्लेख कागदपत्रांतून आढळून येतात. सेनापती संताजी घोरपडे यांच्याविषयी गौरवपूर्ण उल्लेख छत्रपती थोरले शाहू माहाराज {सातारा} व छत्रपती थोरले संभाजी माहाराज {करवीर} तसेच हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांच्या संताजी पुत्र राणोजी व पिराजी यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातील कागदपत्रांतून आढळतात. वजनदार घोरपडे घराण्यास आपल्या बाजूला राखण्यासाठी स्वराज्याच्या दोन्हीही पातींनी प्रयत्न केल्याचे दिसते. संताजीपुत्र राणोजी व पिराजी यांनीही युध्दभूमीवर स्वराज्याच्या यज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन घोरपडे घराण्याची परंपरा कायम राखली. संताजीरावांच्या अर्धांगी द्वारकाबाई यांनी मुत्सद्दीपणे कारभार करून प्रसंगी थोरले शाहू माहाराज यांच्या वडीलकीचा आशिर्वाद मिळवून अवघ्या पाच वर्षांच्या पिराजी पुत्र राणोजीच्या नावे करवीर छत्रपती यांजकडून सेनापती पदाची वस्त्रे मिळवली आणि घराण्याची "सेनापती" परंपरा कायम राखली. सेनापती घोरपडे घराण्यास एकाच वेळेस दोन्हीही छत्रपतींकडून विविध इनामे होती. त्यातील छत्रपती थोरले शाहू माहाराज यांची सेनापती संताजी घोरपडे यांचे पुत्र पिराजी घोरपडे यांस दिनांक १५ जून सन १७२१ रोजीची सनद पुढीलप्रमाणे.. सनदेवर थोरले शाहू माहाराज आणि थोरले बाजीराव यांच्या मुद्रा आहेत तसेच मोर्तबही आहे. खालील मोडी मजकूराचे देवनागरी लिप्यंतर पुढीलप्रमाणे... स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४८ प्लव संवत्सरे आषाढ शुद्ध व्दितीया गुरूवासरे क्षत्रिय कुलव तंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी मोकदमानी कसबा भाल वणी प्रांत खटाव यास आज्ञा केली ऐसिजे राजेश्री पिराजी बीन संताजी घोरपडे हे स्वामीचे पुरातन सेवक याचे चाल वणे स्वामीस आवश्यक जाणोन स्वामी याजवर कृपा ळू होऊन कसबे मजकूर पेशजीच्या मुकाशीया कडून दूर करू न हल्ली कुलबाबकुलकानु खेरिज इनामदार व हकदार मशार निल्हे यास याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने इनाम करून दिल्हा असे तरी तुम्ही यास रूजू होऊन त्याचे आज्ञेत वर्तोन कसबे मजकूर चा ऐवज आकारप्रमाणे याजकडे पुत्रपौत्रादी वंश परंपरेने वसूल देत जाणे प्रतीवर्षी नुतन पत्रा चा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घे ऊन दुसरे भोगवटीयास या जवली पाठवून देणे लेखनालंकार 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१७५७ श्रीरांगपट्टिची स्वारी (१ जानेवारी १७५७ ते १५ जून १७५७) कर्नाटकात स्वारी करण्यास पेशव्याचे मुख्य दोन हेतू होते.— (१) मराठ्यांची सत्ता वाढतवणे (२) कर्नाटकातील छोट्या मोठ्या संस्थानांकडून खंडण्या गोळा करणे श्रीरंगपट्टणच्या परिसरात मराठा सैन्य येताच दलवाई, म्हैसूरचे दिवाण, नंदा राजा याची घाबरगुंडी उडाली. त्याने म्हैसूरचा सरदार हैदरअल्ली दिडीगढला होता त्यास परत बोलावले. दरम्यान मराठे शहरात घुसले आणि त्यांनी नंदा राजाकडे थकलेल्या खंडणीची मागणी केली. नंदा राजाने एवढा पैसा तिजोरीत नाही तो कुठून देणार असे सांगून आपली अगतिकता प्रगट केली. तेव्हा सदाशिवराव र भाऊंच्या सांगण्यावरून श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यास मराठ्यांनी वेढा दिला. पेशव्यांनी म्हैसूरकरांतर्फे महादेव विरकर याच्याशी मध्यस्थी कली. म्हैसूरच्या दलवाईशी तह करून मराठे परत फिरले (एप्रिल १७५७) आणि विनापट्टण, सिरा, आदी स्थळे घेत-घेत पेशवे १५ जून १७५७ रोजी पुण्यास आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - THE REATI W d 0'V 503 MA R AT H A W A RR T H E G R EA T SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil १५ जन झस. १६८१ ೧  शहजादा अकबरास भटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्री मंडळाची बैठक ঘনলী Ihe qreal moralha uarriors the greal marathawarriors the greal maralhawarriors THE REATI W d 0'V 503 MA R AT H A W A RR T H E G R EA T SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil १५ जन झस. १६८१ ೧  शहजादा अकबरास भटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्री मंडळाची बैठक ঘনলী Ihe qreal moralha uarriors the greal marathawarriors the greal maralhawarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १४ जून इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध द्वादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार) छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंहानी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूनी नाकाबंदी सुरू केली.पुरंदर किल्ल्याला वेढा दिला,आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले.तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना ४ लाख होनांचा मुलुख ,२३किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झाराजेंनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजाना १ हत्ती व २घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाह यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/0I6chM8E0rs?feature=share 📜 १४ जून इ.स.१६८२ (ज्येष्ठ वद्य चतुर्थी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार बुधवार) आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यास औरंगजेब बादशहाने शहजादा मुअज्जमला रवाना केले. आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यासाठी शहजादा मुअज्जमला औरंगजेब बादशहाने रवाना केले. शहजादा मुअज्जम अहमदनगरहून निघाला या मोहिमेत आज्जमने धारवाड काबीज करून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात उतरला त्याने आपला तळ कायम करून तेथे लष्कर प्रमुख म्हणून आपली पत्नी जहांजेब बानू "उर्फ जानी बेगम हिला ठेवले व राव अनिरुद्ध सिंग हाडा यांस राजपूत सैन्यासह ठेवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ जून इ.स.१६८६ विजापूरची आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशाह सोलापूरच्या किल्ल्यातून १४ जून १६८६ ला विजापूरकडे निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ जून इ.स.१६९४ अलमेलाचा बदललेला फौजदार अबुल्हसन हा येऊन बादशहाला भेटला. आबाजी वगैरे दोन मराठे खटाव परगण्यातून येऊन बादशहाला भेटले. सत्रसाल बुंदेला ( राठोड) हा हमीदुद्दीनखान याजपाशी तैनात होता. त्याला तीनशे जात व पाचशे स्वार अशी मन्सब होती. तीत शंभर जात व पाचशे स्वार अशी वाढ करण्यात आली. मामूरखान याने कळविले की हजरत बदुन्निसा या इस्लामपुरीत (ब्रहापुरीत) आल्या आहेत. आज्ञा असेल तर हुजुरात पाठवितो. बादशहांनी परवानगी दिली. रायरी (रायगडचा) फौजदार अब्दुरआकखान याचा अर्ज बादशहाच्या नजरेखालून गेला. ख्वाजा जलाह अल्वली याला लष्करखानाच्या फौजेतून काढून हमीदुद्दीनखानाच्या फौजेत तैनात करण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ जून इ.स.१७०४ छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई" आणि पुत्र "शाहू(थोरले)" यांना औरंगजेबने कैद करून आग्रा येथे नेले होते. तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने "शाहूराजे(थोरले)" यांचं लग्न लावून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ जून इ.स.१७०८ साताऱ्याचा योग्य बंदोबस्त लावून, फंदफितूरी होणार नाही याची नीट काळजी घेऊन छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरास निघाले. वाटेत पंचगंगा नदी ओलांडतानाच त्यांना बातमी समजली की, महाराणी ताराबाई राणीसाहेब पन्हाळा सोडून रांगणा गडावर गेल्या आहेत. ताबडतोब शाहूमहाराजांनी पन्हाळा व पावनगड काबीज केला आणि ते रांगण्याकडे निघाले. इकडे महाराणी ताराबाईंनी आपले सरखेल कान्होजी आंग्रे यांना मदतीसाठी बोलावले, पण काही कारणास्तव आंग्रे रांगण्यावर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराणी ताराबाईंनीच रांगणा सोडला व त्या घाट उतरून सिंधुदुर्गाकडे गेल्या. महाराणी ताराबाईंचे सेनापती पिराजी घोरपडे रांगणा लढवायला मागेच थांबले. शाहूमहाराजांच्या सैन्याने रांगण्याला वेढा घातला. परंतु पिराजी घोरपड्यांनी रांगणा नेटाने झुंजत ठेवला. शेवटी चार महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर रांगणा न घेताच (न मिळताच!) दि. १४ जून १७०८ रोजी छत्रपती शाहूमहाराज पन्हाळगडावर आले व तेथेच मुक्काम ठोकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 - UUHE GRE Jच 1 T H E G? ని 1 7 M4 R4 A W AR R I 0 R 9 शिवदिनविशेषand SHNVDINVSHESH CREATED Bv V@Rahul Borse Patil hiva pay १४ जन इःस. १६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. the_great_marathauarriors the greal marathawarriors Ihe great maratha uarriors UUHE GRE Jच 1 T H E G? ని 1 7 M4 R4 A W AR R I 0 R 9 शिवदिनविशेषand SHNVDINVSHESH CREATED Bv V@Rahul Borse Patil hiva pay १४ जन इःस. १६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. the_great_marathauarriors the greal marathawarriors Ihe great maratha uarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १३ जून इ.स.१६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले.. दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार : १. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. . २. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी.. ३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.) प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल.. ४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी.. ५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा. हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/JBSRnN_JM60 📜 १३ जून इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला.‌ १२ जुन इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडनच्या करारावर प्रधानांच्या सह्या होऊन शिक्कामोर्तब झाले. झालेल्या तहावर‌ महाराजांनी ताबडतोब सही करावी असे टुमणे आक्झेडनने राज्याभिषेकाच्या आधीपासूनच निराजीमार्फत लावले होते. पण महाराजांनी त्याची मुळीच दखल घेतली नाही. राज्याभिषेकानंतरही ४ दिवस पर्यंत महाराजांनी आक्झेडनला ताटकळत ठेवले. अखेर दि. ११ जुन इ.स.१६७४ करारावर महाराजांची सही झाली. व दि. १२ जुन इ.स.१६७४ प्रधानांच्या सह्या होऊन करारावर शिक्कामोर्तब झाले. व दुसऱ्या दिवशी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 १३ जून इ.स.१७४१ पोर्तुगीज सैन्याने सावंतांच्या ताब्यातील बार्देश प्रांत जिंकून घेतला. बार्देश प्रांतावर सावंतांचा उणा पुरा ३, तीन महिने अंमल होता. त्यादरम्यान पोर्तुगीज सेनाधिकारी तो प्रांत घेण्याची तयारी करीत होते. त्यांनी बार्देश मध्ये सैन्य घुसवून सावंतांच्या सैन्याला पिटाळून लावले. पोर्तुगिजांना सावंतांवर सुलभपणे विजय मिळविणे शक्य झाले कारण म्हणजे गोव्याच्या नविन व्हिसेरेईने पोर्तुगालहून येताना बरोबर आणलेल्या नविन पद्धतीच्या प्रभावी तोफा त्या दर मिनिटास ३२०, गोळे टाकीत असत. त्या तोफांच्या माऱ्यासमोर सावंतांच्या जुन्या पुराण्या तोफा टिकाव धरू शकल्या नाहीत यात नवल नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 १३ जून इ.स.१७५७ राज्यपदाच्या लोभापुढे कुराणाची शपथ लटपटली. इंग्रज आपली फौज घेऊन मुर्शिदाबादेवर चाल करून गेले. सिराजउदौला आपली फौज घेऊन प्लासी येथे गेला. (१३ जून १७५७) इंग्रजांची फौज त्यावेळी १००० युरोपियन २१०० हिंदी सैनिक आणी ९ मोठ्या तोफा इतकी होती. याउलट सुभेदार सिराजउदौला जवळ ५०००० पायदळ १०००० घोडेस्वार आणी ५० मोठया तोफा शिवाय फ्रेंचांचा तोफखाना सोबत होता. ठरल्याप्रमाणे लढाई सुरू झाली आणी मिरजाफर बहुतेक सर्व फौज घेऊन इंग्रजांस जाऊन मिळाला. या आकस्मित आपत्तीने सुभेदार घाबरून थोड्या इमानी लोकांसोबत राजवाड्यात पळून गेला. इंग्रजांच्या पाठलागामुळे सुभेदार फकिराच्या दिन वेशात एका खिडकीतून रात्रीत पळून एका बगिच्यात लपून बसला. हि बातमी मिरजाफरला समजली. शेवटी सुभेदाराला पकडण्यात आले.जाफरचा मुलगा सीरन याने सिराजउदौलास ठार केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜 १३ जून इ.स.१८१७ पुणे करार पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली. मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि सिंहगड, पुरंदर, वसई हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टनने वेढा उठवला. यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या. कराराची कलमे खालील प्रमाणे . पुणे तह - १३ जून १८१७ १. वसईचा तह कायम राहील शिवाय , २. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली . ३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील . ४.सरदार , दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून , वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये . काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे . ५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर , सावंतवाडीकर पेशव्याचा काही हक्क सांगू नये . ६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वर , ३००० पायदळ , तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे . त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये . ७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी . इंग्रजी छावणीच्या बाजूची कुरणे कही करी द्यावी . ८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 १३ जून इ.स.१८१७ बाजीरावांनी अखेर त्रिंबकजी डेंगळे ना पकडण्यासाठी 'दोन लक्ष रु. रोख आणि एक हजार रु. उत्पन्नाचा गाव इनाम' देण्याचे बक्षीस जाहीर केले. परंतु तरीही याचा काहीही उपयोग झाला नाही. इंग्रजांना त्रिंबकजींचे नखही दिसत नव्हते. एलफिन्स्टन मात्र दिवसेंदिवस वैतागत होता. त्रिंबकजी बाहेर राहणे हे इंग्रजी सत्तेकरता अत्यंत धोक्याचे होते. अखेरीस दि. ८ मे १८१७ या दिवशी इंग्रज पलटणींनी पुणे शहराला वेढा घातला आणि पेशव्यांना एक खलिता पाठवून दिला. त्यात एलफिन्स्टनने 'एकतर त्रिंबकजीला एकत्र नाहीतर रायगड, पुरंदर, सिंहगड आणि त्रिंबकगड हे चार किल्ले जामीन म्हणून इंग्रजांच्या हवाली करा' असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यावर बाजीरावांनी एलफिन्स्टनला पत्र पाठवले परंतु बाजीरावांच्या या पत्राचा एलफिन्स्टनवर काहीही परिणाम झाला नाही. त्याने त्रिंबकजीला पकडण्याची मागणी सुरूच ठेवली. इंग्रजांच्या ताब्यातून एकदा सुखरूप सुटलेल्या त्रिंबकजींना पुन्हा त्यांच्या हवाली करणे हे मूर्खपणाचे होते. या वेळेस एलफिन्स्टनने त्यांना जिवंतच ठेवले नसते. अखेरीस इंग्रजी पलटणी मागे घेण्याच्या बदल्यात पेशव्यांनी रायगड, सिंहगड, पुरंदर, त्रिंबकगड हे किल्ले अन् त्याशिवाय अहमदनगर, माळवा आणि बुंदेलखंडाचा काही भाग इंग्रजांना देण्याचे मान्य केले. दि. १३ जून १८१७ या दिवशु शनिवारवाड्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हाच तो अत्यंत नामुष्कीचा असा प्रसिद्ध 'पुण्याचा तह' पुण्याच्या तहनाम्यावर स्वाक्षऱ्या करून बाजीराव आषाढीच्या वारीनिमित्त पंढरपूरला निघून गेले. 'वारी' हे एक निमित्त होते. सर्वच 'वार'कऱ्यांना एकत्र बोलवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 📜१३ जून इ.स.१८१८ मालेगावचा भुईकोट ब्रिटिशांच्या ताब्यात १३०० सैनिक व २५० बंदूकधारी घेऊन ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट मॅकडॉवल निकराने लढत होता. पण मालेगावचा भुईकोट किल्ला काही हाती येईना. त्यावेळी किल्ल्यात अरब सैनिक होते. गुप्तहेरांकरवी ब्रिटिशांनी दारूगोळा ठेवलेल्या जागेची माहिती मिळविली व तोफांनी तेथील तटबंदी उडवली. दारूगोळा जळून खाक झाला. १३ जून १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - THE [EಕE 7 RR  29 2 SHIVDINVISHESH CREATED BY Ramul Borse Patil शिवदिनविशेष १३ जन इः्स १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन কিল যাযমভ নফ্ঞন নািঘালা the_greal marathawarriors the great marathauarriors the great marathauarriors THE [EಕE 7 RR  29 2 SHIVDINVISHESH CREATED BY Ramul Borse Patil शिवदिनविशेष १३ जन इः्स १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन কিল যাযমভ নফ্ঞন নািঘালা the_greal marathawarriors the great marathauarriors the great marathauarriors - ShareChat