सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१५१० हिंदी महासागरातील व्यापारातून मुसलमानांना हुसकावून लावण्याच्या धोरणानुसार पोर्तुगीज सरदार अफांसो द अल्बुकर्क याने गोवा हस्तगत केले (१६ फेब्रुवारी १५१०). त्यात त्याला विजयानगरचा नौदल प्रमुख तिम्मय्या याची मदत झाली. आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी १५७० पर्यंत गोव्याखेरीज सासष्टी, बारदेश आणि तिसवाडी एवढा प्रदेश बळकावला. त्याचप्रमाणे मोगलांविरुद्ध मदत करण्याच्या मिषाने चौल व वसई हे प्रदेश गुजरातच्या सुलतानांकडून मिळविले आणि दीव-दमणचे किल्ले बांधले (१५३५ व १५५९). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/tGx2Too4ssg 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१५८५ बिरबलाचा मृत्यू काराकार डोंगराळ मुलुखात पुढे जात असताना १६ फेब्रुवारी रोजी 'झैन खान कोका' याने एक धोक्याची सूचना 'बिरबल' याला दिलेली होती की शत्रू रात्री हल्ला करेल परंतु ती सूचना 'बिरबल' याने मान्य केली नाही. 'बिरबल' याचे सैन्य हे एका अरुंद खिंडीजवळ पोहोचले आणि सूर्यास्त झाला. अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी 'बिरबल' आणि 'हकीम अब्दुल फतेह' यांच्या खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. दगड धोंड्याचा मारा संपूर्ण मुघल सैन्यावर चारही बाजूने व्हायला लागला. यामध्ये बिथरलेले सैन्य हे सपाटीच्या बाजूला पळत सुटले या गोष्टीमुळे सैन्याची महत्वाची फळी अस्ताव्यस्त होऊन अजून गोंधळ वाढला. मुघल सैन्यामधले पळत असलेले लोकं मारले गेले. याच दरम्यान बाकीचे सैन्य चुकून एका घळीजवळ पोहोचले तेथे 'युसुफझाई' टोळ्यांनी 'बिरबल' आणि 'हकीम अब्दुल फतेह' यांच्याजवलील ८००० सैनिकांची कत्तल केली. यामध्ये जीवानिशी पळून जाणारा 'बिरबल' मात्र मारला गेला आणि 'झैन खान कोका' व 'हकीम अब्दुल फतेह' हे थोडक्यात बचावले. जेव्हा या 'स्वात' जवळील खिंडीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 'बिरबल' मारला गेल्याचे वृत्त जेव्हा दुसऱ्या दिवशी 'अकबर' याला कळाले तेव्हा त्याला खूप दु:ख झाले. याबाबत 'अबुल फझल' लिहितो की "स्वामिनिष्ठ नोकरांचा मृत्यू त्यातल्या त्यात धार्मिक बाबीमधला त्याचा सहकारी असलेला बिरबल मारला गेल्यामुळे बादशहाला अतिशय वाईट वाटले. दोन दिवस त्याने अन्नपाण्याला स्पर्श देखील केला नाही." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६३५ मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०००० ची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६८४ सुरतकरांच्या पत्राची नोंद! शहजादा मुअज्जमचा माघारी जाण्याचा निर्णय. छत्रपती संभाजी महाराज २२ हजार स्वारांनिशी दमणवर चालून जात आहेत असे म्हटले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६८९ शंभूराजेंना लष्करापासून दोन कोसांवर नेऊन त्यास इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर जसा पोशाख घालतात तसा घालावा आणि विदुषकासारखी लाकडी टोपी चढवावी. त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदुषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी. त्यांना उंटावर स्वार करणे, ढोल बडवीत शिंगे, कण वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे.” त्याप्रमाणे शंभूराजेंची लष्करातून धिंड काढून बादशहासमोर आणण्यात आले. बादशहाने त्याचवेळी आज्ञा केली की, “त्यांना कैदखान्यात घेऊन जा" बादशहासमोर शंभूराजेंना उभे करण्यात आले तेव्हा त्यांनी बादशहाला ताजीम देऊन यत्किंचितही मान लवविली नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी बादशहाने रुहुल्लाखानास आज्ञा केली की त्याने जाऊन शंभूराजेंशी चौकशी करावी, " की तुझे खजिने जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारापैकी कोणकोण तुझ्याशी संबंध ठेऊन पत्रव्यवहार करीत होते. " हे विचारल्यावर शंभूराजेंनी यांनी बादशहासंबंधी अनुद्गार काढले आणि त्यांची निंदानालस्ती केली. जीविताची आशा सुटल्यामुळे शंभूराजेंनी अनुदार उद्गार काढले असणार. शंभूराजेंनी बादशहासंबंधी जे अनुद्गार उच्चारले होते त्यांचा सारांश रुहुल्लाखानाने बादशहास सांगितला. https://youtu.be/tGx2Too4ssg 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१७१९ मराठ्यांची दिल्लीला धडक फर्रुखसियर आणि सय्यद अब्दुल्लाखान यांच्यातील तणाव वाढत गेला. सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले. त्याच्याकडे ५० हजार फौज होती. शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजीपंतांना ५० हजार फौजेनिशी त्याच्या मदतीला दिले. बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे ५० हजार रुपये याप्रमाणे दरमहा १५ लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर, बिदर, वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद आणि हैद्राबाद अश्या ६ प्रांतांची चौथाई-सरदेशमुखी देण्याचेही आश्वासन दिले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोहीमेच्या यशानंतर साक्षात राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले. सर्व बाजूंनी लाभदायी अश्या या मोहीमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते. त्यांचे वय त्यावेळी अगदीच १८-१९ वर्षांचे असेल. परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केलेली होती. अश्या या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी १६ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीदरवाजावर धडक दिली. या वज्राघातापुढे मुघल साम्राज्याचा मत्त हत्ती गडबडला. बादशाहने तहाची बोलणी आरंभली. सय्यद बंधू आणि बाळाजीपंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतया उभा करुन त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या. २८ फेब्रुवारीला जराश्या वादाचे निमित्त होऊन हुसैनअलीने बादशाहचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्याजागी रफ़िउद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले. जवळजवळ ३० वर्षांनंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१७४५ शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी सन १७४५ रोजी सावनूर येथे श्रीमंत माधवराव पेशवे यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दिनांक २० रोजी माधवराव पेशवा झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ फेब्रुवारी इ.स.१८३१ उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते, इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - SHVDNVSHESHCREATED BY Balul Borseuu TIlt ViltlI 2 THE GREAT MARATHA WARRIORS शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६८९ 8& छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेब समोर आणले गेले तेव्हा शंभूराजांनी औरंगजेब बादशहासंबंधी काही अनुद्दार काढले. the the great marathawarriors the great marathawarriors qreot maratha warriors SHVDNVSHESHCREATED BY Balul Borseuu TIlt ViltlI 2 THE GREAT MARATHA WARRIORS शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६८९ 8& छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेब समोर आणले गेले तेव्हा शंभूराजांनी औरंगजेब बादशहासंबंधी काही अनुद्दार काढले. the the great marathawarriors the great marathawarriors qreot maratha warriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६३८ ( फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५५९, संवत्सर ईश्वरी, गुरुवार ) बागलाणचे पाहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले :- नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील परिसरात मुल्हेर हा प्रसिद्ध किल्ला आहे. १०० फूट उंचीची भक्कम तटबंदी असल्याने हा किल्ला अभेद्य बनला आहे. औरंग्याच्या आदेशानुसार मोगली सेनेने मुल्हेरला वेढा देऊन हल्ला केला. ह्या हल्ल्याने बागलाणचा राजा बहिर्जी ढेपळाला व प्रतिकार न करता मुल्हेर किल्ला मोगलांना नजर केला. आजच्या दिवशी ३५० वर्षांची परंपरा असणारे एक हिंदुराष्ट्र औरंग्याच्या राक्षसी वृत्तीने गिळंकृत केले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/GoShm2a2_PA 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६६२ शहजादा अकबर याची सुंता-विधी झाली. पादशहाजादा महमंद अकबर याचा जन्म ११ सप्टेंबर इ.स.१६५७ रोजी झाला. अकबर हा युवराज संभाजीराजेंपेक्षा अवघा ४ महिण्यांनी लहान होता. अकबराच्या मातेचे नाव दिलरसबानू, ती रजपुत कन्या होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६६७ ( फाल्गुन शुद्ध तृतीया, शके १५८८, संवत्सर पराभव, शुक्रवार ) मुहम्मद कुलिखान :- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्र्‍याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्‍याला पाठवायची व्यवस्था केली. दि.१५ मार्च १६६७ रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे ९ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६८४ (फाल्गुन शुद्ध १० दशमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार शुक्रवार) शहजादा मुअज्जमचा माघारी जाण्याचा निर्णय! रागारागात संयम गमावलेल्या मुअज्जमला नियोजनाच्या गलथानपणाचा खूप फटका बसला. ४० हजार घोडेस्वार, ६० हजार पायदळ, ३ हजार उंट आणि १९०० हत्ती एवढ्या प्रचंड फौजेसाठी आता रसद उपलब्ध नव्हती. अन्नाचे हालहाल जाणवू लागले, त्याने स्वतःनेच दक्षिण कोकणची अमानुष जाळपोळ करून बंदरे जाळून टाकल्याचे चटके त्याला जाणवू लागले होते. भरपूर द्रव्य आहे पण अन्न नाही, भरपुर माणके देऊन सुद्धा जनावरांना चारा नाही अशा महाभयंकर परिस्थितीत मुअज्जम सापडला. अखेर मनातून पुर्णपणे खचून जाऊन या शहजाद्याने जाण्याचा निर्णय घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१६८९ औरंगजेब अकलुजहून बहादुरगड येथे आला औरंगजेब बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलासखान व बहादुरखान हे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश व इतर सर्व कैद्यांसह बहादुरगड येथे पोहोचले. बादशहा औरंगजेब अकलुजहून बहादुरगड येथे आला व कैद्यांना आपल्या समोर आणावे अशी औरंगजेबाने आज्ञा दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/GoShm2a2_PA 📜 १५ फेब्रुवारी इ.स.१७३८ धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले. दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil ٢  ٧٢  =1 THE GREATMARATHA WARRIORS SHIVDINVISHESH CREATED BY Ruhul Borse Putil शिवदिनविशेष १५ फेब्रुवारी इ.स. १६६७ प्रतिशिवाजी महाराज असलेले सरसेनापती नेताजी पालकर याचं औरंगजेबाने जबरदरतीने धर्मांतर केले. . ! the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat maratha warriors SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil ٢  ٧٢  =1 THE GREATMARATHA WARRIORS SHIVDINVISHESH CREATED BY Ruhul Borse Putil शिवदिनविशेष १५ फेब्रुवारी इ.स. १६६७ प्रतिशिवाजी महाराज असलेले सरसेनापती नेताजी पालकर याचं औरंगजेबाने जबरदरतीने धर्मांतर केले. . ! the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat maratha warriors - ShareChat
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - पुष्टिवर्धनम् ऊँ त्र्यम्बकं स्यजामहे सुगन्धिं मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।  उर्वारुकमिव बन्धनान ٦٢ शिवरगी निमित्त आपणास ठार्दिक शुभेच्छा॰॰  सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद््त  गॅस एजन्सी भारत गॅस गॅस मिळतील २४ तास सेवा 9657829035 Sachin dada pansar पुष्टिवर्धनम् ऊँ त्र्यम्बकं स्यजामहे सुगन्धिं मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।  उर्वारुकमिव बन्धनान ٦٢ शिवरगी निमित्त आपणास ठार्दिक शुभेच्छा॰॰  सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद््त  गॅस एजन्सी भारत गॅस गॅस मिळतील २४ तास सेवा 9657829035 Sachin dada pansar - ShareChat
🔱🔱🚩हर हर महादेव 🚩 #महाशिवरात्री #महाशिवरात्री #महाशिवरात्री शुभेच्छा #महाशिवरात्री #महाशिवरात्री शुभेच्छा 🔱🔱
महाशिवरात्री - काळाचा काळही तूच आहेस आणि महाकालही तूच आहेस. तूच जग आहेस आणि तिन्ही जेगाचा स्वामी तूच आहेस. तूच शिव आणि तूच सत्य आहेस. महाशिवरुत्री নিমিনযর্বমাবিকানা মহালময शुभेच्छा.. सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद्स्त मिॅळ ऐजलन्सी भ्तास् सॅसा गॅस मिळतील २४ तास सेवा 9657829035 Sachin dada pansar काळाचा काळही तूच आहेस आणि महाकालही तूच आहेस. तूच जग आहेस आणि तिन्ही जेगाचा स्वामी तूच आहेस. तूच शिव आणि तूच सत्य आहेस. महाशिवरुत्री নিমিনযর্বমাবিকানা মহালময शुभेच्छा.. सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद्स्त मिॅळ ऐजलन्सी भ्तास् सॅसा गॅस मिळतील २४ तास सेवा 9657829035 Sachin dada pansar - ShareChat
🔱🔱🚩हर हर महादेव🚩🔱🔱 https://www.instagram.com/p/DUv2F7ADGrJ/?igsh=ajRiMGwwemwwYjR5 #महाशिवरात्री #महाशिवरात्री #महाशिवरात्री शुभेच्छा #महाशिवरात्री #महाशिवरात्री शुभेच्छा
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१६५८ औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र 'शिवाजीचे मान्यतेसाठीचे विनंती पत्र आपल्या शाहजाद्याला आले, त्यामुळे त्याच्यापासुन आपल्याला संकट नाही',असा विचार करुन असावधानतेने जुन्नरमध्ये बादशाही सैनिक गाढ झोपलेले होते. राजांनी डाव साधला.२३ एप्रिल १६५७ रोजी वरील पत्राचे प्रकरण झाले आणि अवघ्या सात दिवसात ३० एप्रिल १६५७ रोजी राजांनी अचानक जुन्नर वर हल्ला केला. वैशाख कृ. द्वितीयेची ती रात्र मावळ्यांनी जुन्नरच्या परकोटाला दोराच्या शिड्या लावल्या, मावळे आत शिरले. पहारेकऱ्यांना मारुन त्यांनी लुटिस सुरवात केली आणि राजांनी जुन्नर लुटली. ३० एप्रिल १६५७ रोजी जुन्नर लुटून २०० घोडे, ३ लाख होन नगद, कापड, जडजवाहीर घेऊन महाराज स्वराज्यात म्हणजे चाकणला परतले. याच वेळी औरंगजेब बीदर जिंकून कल्याणीस वेढा टाकण्यास निघाला होता. वाटेतच त्याला 'ही' बातमी समजली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कार्तलबखनास जुन्नरच्या बंदोबस्तसाठी व होशेदारखान, रायकरणसिंह, रायसिंह, शाएस्ताखान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना सरहद्दीवर रवाना केले. व त्यांना कडक हुकुम दिले, 'शिवजीच्या मुलुखांतील गावे जमीनदोस्त करा. लोकांच्या कत्तली उडवा! दयामाया दाखवु नका! त्यांचे सर्वस्व लुटून आणा! पुणे व चाकण ही शिवाजीची ठाणी धुळीस मिळवा! आपल्या मुलुखांतील जे कोणी शिवाजीला सामील असतील त्याची सरसहा मुंडकी उडवा!' पण कार्तलबखन जुन्नरकडे पोहचेल तोपर्यंत महाराज लूटिसह निघुन गेले होते. नंतर त्यांनी ४ जुन १६५७ रोजी मुघलांच्या ताब्यातील अहमदनगरवरही हल्ला चढवुन लुटालूट केली व तिथे युद्धही खेळले. हे असे होणार हे महाराजांना माहित होतेच. त्यांनी आपला धूर्त व बिलंदर वकील रघुनाथपंत कोरडे याला औरंगजेबाकडे रवाना केले. कश्यासाठी? तर, जुन्नर व अहमदनगर येथील लूटीबाबत पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी! माफी मागण्यासाठी! पंत औरंगजेबाकडे गेले. अत्यंत पश्चात्तापी मुद्रेने त्यांनी माफी मागितली. पण चुकुनही, 'आम्ही आपली लूट परत करतो' असे शब्द उच्चारले नाहीत! औरंगजेबाने राजांना माफ केले. त्याला कारणही तसेच होते. त्यावेळी मुघल बादशहा शहाजहान हा आजारी होता. आणि मुघलीया सल्तनतीच्या शाही रीवाजाप्रमाणे बाप आजारी पडला, म्हणजे त्याचे मूलं फार काळजी करत. कश्याची ? तर, आपला बाप मरण्याच्या आतच आपल्याला गादी कशी मिळेल याची! त्यामुळे औरंगजेबाला दख्खनमधून आग्र्यात जायचे वेध लागले होते. म्हणून ही माफी! त्याने राजांना पत्रही लिहीले, 'तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांज बरोबर जी पाविलीत ती आम्हास पावली. मजकूर ध्यानांत आला. तुम्हीं केलेलीं कृत्यें विसरण्याजोगीं नाहीत. तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाहीं हे तुम्ही जाणलेत. आता मनात तुमची सर्व नजर निभ्रांतपणे आमचेच ठायी आहे, हे आम्ही जाणून तुमच्या कृत्यांबद्दल कांहीही मनात किल्मिष ठेवीत नाही. तरी तुम्ही याबद्दल संतोष मानुन असावें. आमचे लोभाची पूर्तता समजावी.' या पत्रावर तारीख होती जखर १ हिजरी १०६८ म्हणजेच दि १४ फेब्रुवारी १६५८. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/VOPQ9cVJNuE 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१६६६ औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१६७१ ( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९२, संवत्सर साधारण, मंगळवार ) दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली :- होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवूनच साजरा करीत असत. या वेळेची शिकार होती मेहेरूफ-ए-जंजिरा! याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिऱ्यातच गुंतले होते. जंजिऱ्याच्या आजूबाजूचा दंडाराजापुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम, सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत यांनीसुद्धा दंडाराजापुरी मराठ्यांकडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्रमार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली. या दिवशी दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१७५५ रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८) नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते. वयाच्या बाराव्या वर्षी कान्होजी भोसले (चुलता) याने त्यास सांभाळण्यासाठी वऱ्हाडात नेले. तेथून तो शाहू छत्रपतींच्या चाकरीत साताऱ्यास आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१७५७ इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी ५७ चे इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र पहा - “आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/VOPQ9cVJNuE 📜 १४ फेब्रुवारी इ.स.१७६३ माधवराव निजामाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा मधल्या काळात पुण्यातही काही घटना घडून गेल्या होत्या. फाल्गुन शु. द्वितीया शके १६८४, चित्रभानुनाम संवत्सरी सोमवारी म्हणजेच दि. १४ फेब्रुवारी सन १७६३ रोजी विश्वासराव पेशव्यांच्या विधवा पत्नी लक्ष्मीबाई शनिवारवाड्यात मृत्यू पावल्या. विश्वासराव गेल्यानंतर त्यादेखील पूर्णपणे खचून गेल्या होत्या व अशातच आजारपण येऊन वारल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - I HNI # GRE MARATHANNARRIORS SHVDINNVSHESH CREAEDBY Rahul Borse Patil शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६५८ १४ छत्रपती शिवाजी महाराजांचे धुर्त व बिलंदर वकील खुनाथ पंत औरंगजेबाचे माफी नामक पत्र घेऊन आले 1he- the great marathawarriors the qreat marathauarriors qreat maratha warriors I HNI # GRE MARATHANNARRIORS SHVDINNVSHESH CREAEDBY Rahul Borse Patil शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६५८ १४ छत्रपती शिवाजी महाराजांचे धुर्त व बिलंदर वकील खुनाथ पंत औरंगजेबाचे माफी नामक पत्र घेऊन आले 1he- the great marathawarriors the qreat marathauarriors qreat maratha warriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१५६७ इ.स.१५६७ मध्ये अकबराने चीतोडवर आक्रमण करून चीतोडला मुगली फौजांचा वेढा दिला . मेवाडच्या सर्व सामंतांच्या सल्याने महाराणा उदयसिंह यांना चितोड सोडून अरवली पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात आश्रयास जावे लागले. १३ फेब्रुवारी १५६७ रोजी अकबर व मेवाडी सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले त्यात मेवाडचा पराभव झाला तसेच राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराणा उदयसिंह यांनी कुंभलगडावर आपली राजधानी स्थापन केली परंतु मोगली आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी आपली राजधानी गोगुंदा येथे प्रस्थापित केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१६५८ महाराजांचे वाकनीसांना समर्थांना मदत पाठवण्यासाठी पत्र (ष.१५८० फाल्गुन शु. २, इ.१६५८ फेब्रु.१३) भास्कर गोसावी श्री गुरुमवतपरायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी श्री चे उत्साह होन पनास भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावी बरोबर पाठविले छत्रपती शिवाजीर महाराज यांच्याकडे भिक्षेस गेले. त्यांनी विचारले तुम्ही कुठुन व कोठे असतात त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी, श्री समर्थांचे शिष्य आहोत. मग ते बोलले की कोठे राहतात व मुळ गाव कोणते त्यावरून आम्ही सांगितले की गंगातीरी जांबचे राहणे. चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून महोत्साव चालू करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा. सांगितल्यावरुन असे बोलताच महाराजांनी दत्ताजीपंत वाकनीस यास प्रतिवर्षी श्री उत्साहास दोनशे होन देत जाणे म्हणून पत्र पाठविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/MoVjgXc_7es 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे.. त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो..... "शिवाजी हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१६६० छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१६८४ (फाल्गुन शुद्ध ८ अष्टमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार बुधवार) शहजादा आज्जम व बेदारबक्त बहादुरगडाकडे रवाना! बहादुरगडावर संघर्ष जारी होता. बहादुरगडावर तळ ठोकून बसलेल्या ख्वाजा याकुब सरबुलखानाच्या मदतीसाठी औरंगजेबाने शहजादा आज्जम व त्याचा पुत्र शहजादा बेदारबक्त यांना आपल्या फर्मानासह मोठी मोगली कुमक व खजाना घेऊन बहादुरगडाच्या दिशेने रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१७१२ कान्होजी आणि इंग्रजांत तह कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/MoVjgXc_7es 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१७२२ निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले. या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी बागलाण, खानदेश, नाशीक गोंडवन, वऱ्हाड आणि माळवा येथे तीन स्वाऱ्या करून चौथाई व सरदेशमुखी च्या वसूलासाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांची नियुक्ती केली. उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१७४७ गोव्याच्या विजरईने जुआव द सौज फेर्राज यास लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे जर इंग्रज, डच व आम्ही एकत्र झालो, तर तुळाजी आंग्रे व त्याच्या बंदरात किंवा इतर ठिकाणी हल्ला करू. कारण तो इतका उद्धट (Insolent) झाला आहे की त्याच्यापुढे कन्याकुमारीपर्यंत कोणीच (उभे) राहत नाही ! तुम्ही हा विषय गुप्त रीतीने मुंबई बेटाच्या जनरलच्या कानी घाला. तो ह्या बाबतीत हालचाल करण्यास तयार असला, तर यंदाच्या पावसाळ्यात आम्ही पुढील बेत ठरवू म्हणजे उन्हाळाच्या सुरवातीला सर्व तयारी होईल सर्वत्र आपल्या कर्तुत्वाचा डंका असणाऱ्या आंग्रे घराण्याला शह देण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून या देशावर खरी नामुष्की ओढवली, प्लासीच्या लढाईत हिंदुस्थानचे भवितव्य ठरले असे म्हणतात; परंतु वस्तुतः ते इ. स. १७५६ सालीच - की जेव्हा आंग्र्यांचा दारुण पराभव करण्यात आला; तेव्हाच ठरून गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१७८८ गोव्याच्या राज्य सचिवाने पुणे दरबारातील आपला वकील नारायण शेणवी यांस लिहीलेल्या पत्राची नोंद! आमच्या आरमाराची आणि कोल्हापुरच्या आरमाराची रेडी येथे गाठ पडून कोल्हापुरच्या आरमाराचा धुव्वा उडाला. कोल्हापुरचे सैन्य भोसलेंच्या राजधानीवर हल्ला करण्याच्या बेतात होते. त्याने आता कुडाळपर्यंत माघार घेतली आहे. "सावंतांनी आम्हाला पेडणे प्रांताचा उर्वरित भाग देण्याचे कबूल केले आहे. तसेच डिचोली, साखळी आणि हळदोणे ह्या तिन्ही प्रांतावरील हक्क त्यांनी प्रस्तुतच्या करारान्वये सोडून द्यायचे आहे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१८५६ १८५४ मध्यें डलहौसीनें लखनौ येथील रेसिडेंटाच्या जागीं जनरल औट्रामची नेमणूक केली. यानें त्या प्रांतांत फिरून तेथील कच्ची हकीकत डलहौसीला कळविली. अयोध्येचें राज्य इंग्रजसरकारनें एकदम आपल्या ताब्यांत घ्यावें अशीहि त्यानें डलहौसीला शिफारस केली. तिजवर कौन्सिलदारांचे अभिप्राय होऊन हें प्रकरण डलहौसीपुढें आलें. त्यावर आपलें मत लिहून डलहौसीनें तें प्रकरण विलायतेस पाठविलें. विलायतेहून राज्य खालसा करण्याचा हुकूम आल्यानंतर औट्राग्गच्या हाताखालीं फौज पाठवून तें राज्य डलहौसीनें खालसा केलें (१३ फेब्रुवारी १८५६) व अयोध्येच्या नबाबास सालीना बारा लाखांची नेमणूक करून कलकत्त्यास ठेविलें. अयोध्याप्रकरणाचा निकाल लावणें हेंच डलहौसीचें हिंदुस्थानांतील शेवटचें कृत्य होय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ फेब्रुवारी इ.स.१८९६ वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म - पेण,रायगड छत्रपती संभाजी राजांचे साधार, वास्तववादी, ऐतिहासिक चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ रोजी मुंबई येथे झाला. शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड अतिशय गाजला. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तत्कालीन समाजात असणाऱ्या गैरसमजुतीना धक्का देणार्या त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ १९६० मध्ये प्रसिध्द झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज, मालोजीराजे व शहाजीराजे, गोवळकोंड्याची कुतुबशाही, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरीयड हे त्यांचे इतर ग्रंथ. तर तारीख इ इलाही, राजाराम चरितम हे त्यांनी संपादन केलेले ग्रंथ. इतिहास संशोधकाचा पिंड असणार्या बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा कालखंड व जीवन यावरही प्रकाश टाकला. दंतकथांवर आधारित तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा वेगळे चरित्र लेखन करून तुकारामाविषयीच्या अभ्यासाला त्यांनी शास्त्रशुद्ध बैठक दिली आहे. तुकारामांचे संतसांगाती, तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, संत तुकाराम हे त्यांचे विशेष ग्रंथ. असे या इतिहाचासे भीष्माचार्य यांचे दि. १६ जुलै १९८६ रोजी निधन झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - Il' (apl' +=7-"0~_ ECREATMARA TAW RRORS SHNDINSHESH CREATED BY C Borse Patil शिवदिनविशे फेब्रुवारी इ.स. १६५८ १३ छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री समर्थांच्या शिष्यांना चाफळायेये देवीची स्थापनेसाठी दत्ताजीपंत वाकनीस यास प्रतिवर्षी २०० होन देत जाणे याबाबत पत्र पाठवले . the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors Il' (apl' +=7-"0~_ ECREATMARA TAW RRORS SHNDINSHESH CREATED BY C Borse Patil शिवदिनविशे फेब्रुवारी इ.स. १६५८ १३ छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री समर्थांच्या शिष्यांना चाफळायेये देवीची स्थापनेसाठी दत्ताजीपंत वाकनीस यास प्रतिवर्षी २०० होन देत जाणे याबाबत पत्र पाठवले . the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜१२ फेब्रुवारी इ.स.१५०२ एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/GiD3Zgi4eqU 📜 १२ फेब्रुवारी इ.स.१६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜‌ १२ फेब्रुवारी इ.स. १६८५ सावंताने संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ फेब्रुवारी इ.स.१६८५ (माघ वद्य ३, त्रृतीया, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार गुरुवार) धरण गावाची दुसरी लुट! अखबारातून धरणगाव मराठ्यांनी पुन्हा एकदा लुटल्याची माहिती मिळते. आधी ४ वर्षांपूर्वी सुद्धा मराठ्यांनी धरणगावात धुमाकूळ घातला होता. ४ वर्षांत याची परत पुणराव्रृत्ती होऊन मराठ्यांनी या प्रदेशात धुम माजवली. निळो मोरेश्वर व रंगराव हे ६०० ते ७०० स्वारांनिशी धरणगावला पोहोचले. त्यांनी इंग्रजांची वखार जाळली. मराठे खोलवर घुसून दहशत कशी माजवतात याचा प्रत्यय इंग्रजांना व मोगलांना धरणगावच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ फेब्रुवारी इ.स. १६८९ छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. ! अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ फेब्रुवारी इ.स.१७४२ पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/GiD3Zgi4eqU 📜 १२ फेब्रुवारी इ.स.१७५६ ११ फेब्रुवारी रोजी इंग्रजी आरमार विजयदुर्गवर मोर्चेदाखल झाले. इकडे जमिनीवर रामाजी महादेवांची फौज तयारच होती. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे, हे पाहून आधीच दि. ८ फेब्रुवारी रोजी तुळाजींनी आपल्या मेहुण्यास विजयदुर्गाचा ताबा देऊन ते रामाजीपंतांच्या छावणीत भेटावयास आले. पण पेशवे आणि तुळाजी यांच्यातील इतक्या वर्षांच्या वैमनस्यामुळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी होईना. तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी इंग्रजांचा विजयदुर्गावर भडिमार सुरू झाला. वॉटसनने मुंबईला कळवले, "तुळाजी आंग्र्यांचे व पेशव्यांचे (रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत असल्याचे मला कळले, तेव्हा तुळाजीस याबाबतीत अवकाश द्यायचा नाही, असा निश्चय करून, एकदम किल्ल्या स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या वेळात जबाब न आल्याने व पेशवेही जरा वेळ काढीत आहेत असे पाहून दि. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला." १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा आंग्र्यांच्या एका जहाजाच्या दारूखान्यावर पडून त्या जहाजाने पेट घेतला. या भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटली. आंग्र्यांच्या आरमारातील ७४ तोफांचे एक गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि ६० गलबते उळून खाक झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ फेब्रुवारी इ.स.१७९४ एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस व महादजी शिंदे यांचा समेट झाला. १ जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. नानाही जाऊन आले. हरीपंत तात्या तर एक दोन दिवसाआड नेहमी जात होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ त महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४). मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी ५ सप्टेंबर १७९५ रोजी १ चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते. महादजीबावांनी आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून नऊ लग्ने केली पण त्यांना पुत्र लाभ झाला नाही. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर त्यानी आपल्या चुलत भावाचा १४ वर्षाचा मुलगा दौलतराव यास दत्तक घेतले. दौलतरावाचा जन्म १७८० चा असून त्याच वर्षी त्याचा समकालीन रणजीतसिंग जन्मला. दौलतरावांचे दत्तविधान यथाविधी झाले नव्हते असे दिसते. बावा मरण पावल्यावर तेरावे दिवशी त्याचे दत्तविधान करून पेशव्यांनी त्यास शिंद्यांचे दौलतीवर स्थापन केले. (१० मे १७९४). https://youtu.be/GiD3Zgi4eqU 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - Y MIVIII` VARNORS AMARAAAA HEGREA SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष مر फेब्रुवारी इस. १६८९ 3 राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकारखान यास फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले. the_great_marathawarriors the great marathauarriors the qreat marathauarriors Y MIVIII` VARNORS AMARAAAA HEGREA SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष مر फेब्रुवारी इस. १६८९ 3 राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकारखान यास फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले. the_great_marathawarriors the great marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१६५८ छत्रपती शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता, तेथेच १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, सीद्दी, पोर्तुगीज, इग्रज आणि डच यांच्या पासून स्वराज्याच रक्षण करण हे मराठा आरमाराच मुख्य काम, पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर, आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखिन बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती, अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, त्यामुळे संपूर्ण कोकणामधे असणाऱ्या असंख्य खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसा आसारा होता. तर समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/pYoicOF8mnU 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१६८७ संताजी घोरपडे-केसोपंत त्रिंबक कर्नाटकात! दख्खन जिंकण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाने मराठ्याविरोधात आपली मात्रा चालत नाही असे पाहून आपली दृष्टी गोवळकोंडा आणि विजापूरकडे वळवली आणि अल्पावधीतच ती राज्ये जिंकूनही घेतली. ही बलाढ्य राज्ये हाती आल्यानंतर तो स्वराज्यातील कर्नाटक प्रांतात पुन्हा हल्ले सुरू करणार हे ओळखून छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटकचा प्रांताचा बंदोबस्त करण्याला विशेष प्राधान्य दिले. तिथे मुघल आणि म्हैसूरकरांच्या हल्ल्याला हरजीराजे महाडिक यांना एकट्याला तोंड द्यावे लागू नये म्हणून छत्रपती संभाजीराजेंनी ऑक्टोबर- नोव्हेंबर इ.स.१६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना कर्नाटकात जायची आज्ञा केली. या आज्ञेनुसार केशव त्रिमल व संताजी घोरपडे आपल्या १२ हजार सैन्यासह कर्नाटकात पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१७५६ तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते. कैदेतच पर्वती, पुणे येथे त्यांचे निधन झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१७६० सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला. दिनांक ११ फेब्रुवारी सन १७६० रोजी निजामाशी तह झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१८१८ अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१८१८ छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवर मराठेशाहीतील उत्कर्षाचा परमोच्च बिंदू-फर्मानबाडी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेधे शकावली प्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला.इथपासून मराठेशाहीचा उदय झाला. ह्या नंतर सुमारे १८७ वर्षांनी म्हणजे १७ नोवेंबर १८१७ ला इंग्रजांनी शनिवारवाड्यावर युनियन ज्याक फडकवला व ११ फेब्रुवारी १८१८ रोजी जाहीरनामा काढून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा ह्या अत्यंत छोट्या राज्यावर बसविले.अशा प्रकारे मराठेशाहीचा अस्त झाला. वर नमूद केलेल्या मराठ्यांच्या उदय आणि अस्ता दरम्यानच्या १८७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मराठेशाहीच्या आयुष्यात अनेक चढ उतार,मान,अपमान,जय,पराजयाच्या घटना घडल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला स्वतःस हिंदू पद्पातशहा म्हणून राज्याभिषेक करून घेतला,दक्षिण दिग्विजय करून दक्षिणेकडे मराठी राज्याचा विस्तार केला.त्यानंतर पुण्यश्लोक शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशव्यांनी मराठ्यांचा जरीपटका अटकेपार नेला,जवळपास निम्म्या भारतावर मराठ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्र होते.मराठेशाहीत सगळ्याच काही गोष्टी सुखद घडल्या नाहीत.शिवरायांचा अकल्पित मृत्यू,त्यातून उद्भवलेले वारसा युद्ध,कट कारस्थाने,शंभू राजांची अत्यंत क्रूर तऱ्हेने हत्त्या,छ.राजाराम ,त्यांच्या नंतर ताराराणी व असंख्य मराठे सरदार,सैनिकांचा अपुऱ्या ताकदीनिशी सतत सव्वीस वर्षे मोगलांशी संघर्ष,व १७६१ मध्ये मराठे आजवर विसरू न शकलेली दुःखद घटना,पानिपत संग्राम ह्या काही प्रमुख सुद्धा घडल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ फेब्रुवारी इ.स.१८१८ बाजीराव रघुनाथराव पेशवेंना बंडखोर ठरविण्यात आले बाजीराव रघुनाथराव यांचा युध्दात पाडाव करता येत नाही हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी अखेर बाजीराव रघुनाथराव यांच्या सैनिकांना बिथरविण्यासाठी ११ फेब्रुवारी सन १८१८ रोजी जाहीरनामा काढला. त्याचाही अपेक्षीत परिणाम न दिसल्याने १० एप्रिल सन १८१८ रोजी छत्रपतींना फर्मान काढावयास लावून बाजीराव रघुनाथराव यांना बंडखोर ठरविण्यात आले व तशी व्दाही फिरविण्यात आली. तरीही बाजीराव रघुनाथराव हातात येत नाहीत हे पाहून इंग्रजांनी अनेक मराठा सरदारांशी हातमिळवणी केली. अखेर ३ जून सन १८१८ रोजी बाजीराव रघुनाथराव यांनी ढोलकोठ येथे इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. इंग्रजांनी ज्या बाजीराव रघुनाथराव यांची प्रतिमा "पळपुटा" अशी केली आहे त्याच बाजीराव रघुनाथराव यांनी दिलेल्या विस्मयकारक लढतीने इंग्रजांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आणि म्हणूनच महाराष्ट्रापासून दूर बिठूर येथे त्यांना हलविण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ٥   THEGREA T MARA THAWARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Wahul Borse Pat शिवदिनविशष फेब्रुवारी इ.स. १६५८ ११ छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. इःस. १६५७ ते इःस. १६५८ साली जहाज बांधनीमध्ये कुशल अशा कारागिरांना घेऊन जहाजांची निर्मिति सुरु झाली. the_great_marathauarriors the great marathawarriors the qreat marathauarriors ٥   THEGREA T MARA THAWARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Wahul Borse Pat शिवदिनविशष फेब्रुवारी इ.स. १६५८ ११ छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. इःस. १६५७ ते इःस. १६५८ साली जहाज बांधनीमध्ये कुशल अशा कारागिरांना घेऊन जहाजांची निर्मिति सुरु झाली. the_great_marathauarriors the great marathawarriors the qreat marathauarriors - ShareChat
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १० फेब्रुवारी इ.स.१६६५ शिवाजीराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला सुरूवात केली. सुरुवातीची बरीच वर्षे त्यांच्या ताब्यात जास्त करून आदिलशाहीचेच किल्ले आले. १६५७ साली त्यांचा प्रथमच मुघलांशी थेट संबंध आला कारण त्यांनी मुघलांच्या ताब्यातील सधन शहर जुन्नर लुटले. तसेच, १६३६च्या मुघल-आदिलशहा तहानुसार जे किल्ले मुघलांकडे असायला हवेत त्यातले बरेचसे शिवाजीराजांनी जिंकून घेतले होते. पुढे १६६३ मधे शाहिस्तेखानावर हल्ला, १६६४मधे सुरतेची लुट, जसवंतसिंगाची फजिती या कारणांमुळे औरंगजेब चिडुन गेला व सप्टेंबर १६६४ मधे त्याने मिर्झाराजा जयसिंग या महापराक्रमी, मुत्सद्दी रजपुत मुघल मनसबदाराची स्वराज्यावरच्या मोहिमेवर नियुक्ती केली. भलीमोठी फौज, तोफखाना तसेच, सरकारी व खाजगी खजिना बरोबर घेऊन मिर्झाराजा स्वराज्याकडे निघाला. सोबत दिलेरखान हा पराक्रमी मुघल मनसबदार व इतरही नावाजलेले मनसबदार होते. १० फेब्रुवारी रोजी हे मुघल सैन्य औरंगाबादला पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/zFuKcRTsJic 📜 १० फेब्रुवारी इ.स.१६७१ सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती. १६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० फेब्रुवारी इ.स.१६८२ (फाल्गुन शुद्ध १३ त्रयोदशी शके १६०३ दुर्मती संवत्सर वार शुक्रवार) सुरतकर इंग्रजांचे दुटप्पी धोरण! इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांना दारूगोळा (तोफेचा) विकल्याची तक्रार सिद्धी करत होता. ही तक्रार खोटी असल्याचे सुरतकर सांगतात. पण छत्रपती संभाजी महाराजांना मदत करताना, ती गुप्तपणे करा. असे ते पत्रातून कळवितात. शिवाय औरंगजेबाच्या मोहिमांची व छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळील अफाट सेनेची कल्पना देतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० फेब्रुवारी १७५६ १० फेब्रुवारी १७५६ रोजी वॉटसनला अशी खबर लागली की तुळाजी आंग्रे घेरिया किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे (म्हणजे नानासाहेबांकडे) देण्याच्या वाटाघाटी करण्यासाठी गेलेले आहेत. हे समजताच वॉटसनने आंग्र्यांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किल्ला स्वाधीन करून शरण यायचा खलिता पाठवून दिला. त्याचे उत्तर न आल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता आरमाराच्या २ डिव्हिजन्स घेऊन वॉटसन घेरियाकडे गेला आणि त्याने हल्ला सुरु केला. किल्ल्यावर तोफगोळे डागणे सुरु झाले. असाच एक गोळा आंग्र्यांच्या ताब्यात असणाऱ्या मूळचे इंग्रजी जहाज 'रिस्टोरेशन' ह्याच्यावर पडला आणि आंग्र्यांचे सर्व आरमार जळून खाक झाले. (आंग्र्यांकडे इंग्रजांची पकडलेली शार्लोट, विलियम, स्वेर्न, रिस्टोरेशन, डार्बी, पायलट, ऑगस्टा इत्यादी जहाजे होती!) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/zFuKcRTsJic 📜 १० फेब्रुवारी इ.स.१७६१ पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा.. तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे. आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते... अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच. सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० फेब्रुवारी इ.स.१७७१ महादजी शिंदे यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला. मराठ्यांचा तोफखाना दिल्लीच्या किल्ल्यावर धडधडू लागला. असद बुरूजाला खिंडार पडले. कासीमअलीचे धाबे दणाणले. आणि त्यांनी मराठ्यांच्या पुढे मुकाट्याने शरणागती पत्करून किल्ल्याचा ताबा मराठ्यांच्याकडे दिला. ५ हजार स्वारांनी दिल्ली व्यापून टाकली. मराठ्यांच्या जयघोषाने यमुणातीर दणाणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० फेब्रुवारी इ.स.१८१८ अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - IN(IUI  ೦ THE GREAT MAPATHA WARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष १० फेब्रुवारी इ.स. १६७१ रिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी होळीच्या दिवशी मराट्यांकडून दंडराजपुरी जिंकून घेतली the great maratha warriors the qreat marathauarriors the great marathawarriors | IN(IUI  ೦ THE GREAT MAPATHA WARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष १० फेब्रुवारी इ.स. १६७१ रिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी होळीच्या दिवशी मराट्यांकडून दंडराजपुरी जिंकून घेतली the great maratha warriors the qreat marathauarriors the great marathawarriors | - ShareChat