⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 १३ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)
रामसिंह महाराज व युवराज शंभुराजेंच्या डेऱ्यात!
कुंवर रामसिंहाकडे औरंगजेब बादशहाने महाराजांच्या तब्बेतिची विचारपूस केली. महाराजांचा राग निवळावा म्हणून सायंकाळी दरबारात युवराज शंभुराजेंना बोलावून त्यांना भरजरी वस्त्रे, मोत्याची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/fnjIXf-ZBhY?feature=share
📜 १३ मे इ.स.१६७१
महाराजांचे एक पत्र :
"चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी क लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा."
वरील पत्रावरून दिसून येईल की शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ मे इ.स.१६७४
इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कैरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एकुण ८ माणसे होती व त्यात एक श्यामजी नावाचा "गुजराथी व्यापारी" होता. आगरकोट हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील "रेवदांडा" येथे आहे. "राज्याभिषेकाचा" मुहूर्त होता दि. ६ जुन १६७४ मग "हेन्री अॉक्झिंडेन" लवकर निघाला होता का ? नाही तर त्याला "ईस्ट इंडिया कंपनीच्या" व्यापार हिताच्या काही कामांची मंजुरी "महाराजांकडून" करवुन घ्यायची होती. "हेन्री" आगरकोटला आला तेव्हा दिवस मावळला होता व 'प्रवेशद्वार' बंद झाले होते. त्याने 'पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला' सहज विचारले कि, "अजुन दिवस पूर्ण मावळला नाही तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ?" त्यावर गव्हर्नरने उत्तर दिले "अहो तशी काळजी आम्हाला घ्यावी लागते कारण ते "छत्रपती शिवाजी" केव्हा आमच्यावर झडप घालील अन आमच्या आगरकोटात शिरेल याचा नेम नाही म्हणून हि दक्षता घेत आहोत". यातच "छत्रपती शिवाजी महाराजांचा" दरारा आणी दहशत केवढी होती हे दिसून येते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇
📜 १३ मे इ.स.१६७५
भूमीपुत्रांबद्दल १६७५ च्या एका पत्रात इंग्रज काय म्हणतात...
१३ मे १६७५ ला मुंबईहुन एका इंग्रज अधिकाऱ्याकडुन राजापुरच्या अधिकाऱ्याला एक पत्र गेलं. हे पत्र जाण्यामागील पार्श्वभुमी अशी होती की अण्णाजी पंडिताद्वारे इंग्रजांना ५००० होन किंमतीचा माल विकला जाणार होता. या मालात नारळ आणि सुपारीचा समावेश होता. त्याकाळी नारळाचा दर अडिच लारी खंडी तर सुपारीचा दर ८० लारी खंडी असा होता. छत्रपती शिवाजी महाराज फक्त उत्तम प्रशासक नाही तर ते एक अत्यंत कुशल व्यापारी देखील होते. वेळेचा फायदा घेणे शिवरायांना चांगलेच ठाऊक होते. इ.स. १६६१ ला राजापुर लुटल्यानंतर महाराजांनी त्याची भरपाई देण्यास कबुल केले खरे पण त्यातील कीती पैसे वास्तविक इंग्रजांना मिळाले हा प्रश्नच आहे. त्यावर कधितरी सविस्तर लिहीला येइल. माझा हे सांगण्याचा उद्देश हा की होइल तेवढा नफा इंग्रजांकडुन महाराज कमवत होते. पैशाच्या बाबतीत तर महाराज अत्यंत दक्ष होते. वर सांगितल्या प्रमाणे ५००० होनाचा माल इंग्रज घेणार होते पण महाराजांनी त्या मालाची किंमत नारळाला ५ लारी खंडी तर सुपारीला १०० लारी खंडी लाउन त्यांना माल विकला. खरं तर हे लोक आपल्याला फ़सवत आहेत याची इंग्रजांना कल्पना आलीच असेल पण इंग्रज त्यावर फार काही बोलु शकत नव्हते. कारण पुढे महाराजांना भेटुन काही मागण्या त्यांना पुर्ण करुन घ्यायच्या होत्या. हि सर्व हकिकत १६७५ च्या एप्रिल महिन्यात घडली. राजापुरहुन ‘शिवाजी महाराज आम्हाला फसवत आहेत’ हि वार्ता मुंबई ला पोहोचली. मुंबई ला पत्र अधिकाऱ्याने वाचले. विचार करुन अधिकाऱ्याने राजापुर ला पुन्हा एक पत्र लिहिले त्या पत्रात अधिकारी लिहीतो,
‘महाग दरात नारळ आणि सुपारी देउन अण्णाजी आपल्यावर अन्याय करीत आहेत हे खरे आहे, पण इतरही व्यापाऱ्यांना हा माल अशाच किमतीत विकल्या जातो का हे आपल्याला तपासायला पाहिजे, शिवाजी राजांचा असा प्रघात असेल तर आपल्याला तक्रारीला जागा राहत नाही. पण तुम्ही अण्णाजीचा योग्य मान ठेवा.’ यापुढे अधिकारी जे लिहीतो ते या भुमिपुत्रांचे यश आहे. तो लिहीतो ‘ज्यांच्याशी तुम्हाला वागायचे आहे ते मराठे लोक चतुर आणि चौकस आहेत. त्यांच्याशी व्यवहार करतांना विचाराने करावा. भावनाप्रधान किंवा फाजील घमेंडखोर लोकांची केवळ कुचेष्ठा करुनच न थांबता ते त्यांच्यापासुन शक्य तितका आपला फायदा करुन घेतात’.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ मे इ.स.१६८१
(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार)
किल्ले औरंगजेब बादशहाकडे अनेक सरदारांचे खोटे अर्ज!
खान बहादुराचा अर्ज डाक चौकीने दरबारात आला. त्यात त्याने लिहिले होते की, "गनिमांची फौज औरंगाबादच्या भोवतालचा प्रदेश लुटण्यासाठी आली होती म्हणून खानजान, मुजफ्फरखान, रणमस्तखान, दाऊदखान वगैरे बादशाही सरदार स्वार होऊन तेथे पोहोचले. तर्फेची लढाई झाली. बादशाही सुदैवाने त्यांनी शत्रूंचे १५०० लोक मारले व अनेकांना जखमी केले. शत्रूने पळ काढला. बादशाही फत्ते झाली". ."औरंगजेब बादशहाचा दुसरा सरदार अनुपसिंग हाडा याने अब्दुल रहिमखान यास कळविले की, "मी छत्रपती संभाजी महाराजांशी औरंगाबादेस झालेल्या लढाईत अत्यंत कष्ट घेतले आहेत. हुजूरास त्याचा पुर्ण अर्ज देत आहे, कृपेची आशा करतो. खान जहानबहादूर याने त्याचे ५०० जात ५००, पाचशे स्वार कमी केले होते. त्याच्या वाढीबाबत तजवीज केली आहे. असा अब्दुल रहिमखानाने बादशहाकडे अर्ज केला व त्याप्रमाणे त्यास वाढ देण्यात आली. आशा आशयाची बढाई मारणारी पत्रे, खोटा आशय असणारी पत्रे लिहून, पाठवून बादशाही कृपा होण्यास लाळघोटेपणा करणारे हे सरदार औरंगजेबाच्या पदरी होते, म्हणूनच औरंगजेब मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवू शकला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ मे इ.स.१६९९
१३ मे १६९९ ला हेरकाऱ्याकडून बादशहास समजले की धनाजी जाधव यांनी पिठूरच्या गढीला वेढा घातला. तेथील देशमुखाने ७ दिवस गढी लढविली. शेवटी धनाजीन जाधव यांनी देशमुखास कैद केले आणि त्याजकडून ४० हजार रुपये चौथ म्हणून घेतले. हे बादशहास कळताच त्याने चीनकुलीजखान बहादूर यांस धनाजी जाधवांचे पारिपत्य करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो जाधवाच्या पारिपत्यासाठी परंडा भागात पोहोचला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ मे इ.स.१७९०
इस्माईल बेग नारनोळाहून पाटणास आला!
पाटण हे जयपूरच्या उत्तरेस सुमारे ८० मैलावर आहे. नारनोळ हे ठिकाण पाटणचे उत्तरेस ३० मैलावर आहे. त्याच्या उत्तरेस २० मैलावर कानोड आहे. ही ठिकाणे जयपूरच्या शेखावत परगण्यात आहेत. इस्माईल बेग १३ मे इ.स.१७९० रोजी नारनोळाहून पाटणास आला. तेथे चोहोबाजूला पहाड आहेत. तो पाटणास मुक्काम करून राहीला. जयपुर आणि जोधपूरची फौज त्याच्या दिमतीला येणार होती. मराठ्यांच्या फौजा पाटणास नदीच्या अलीकडे होत्या. गोपाळराव रघुनाथ, अंबुजी इंगळे, काशीराव होळकर, नजफकुलीखान, रावराजा प्रतापसिंह, द वुआन्य याचे कंपू अशा लोकांच्या फौजा होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १३ मे इ.स.१८०३
सेनापती वेल्स्ली पुण्यास आल्यावर त्याने क्लोझला निरोप पाठवून बाजीरावास घेऊन पुण्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार क्लोझ पेशव्याला घेऊन ता. १३ मे १८०३ रोजी पुण्यात आला व शनिवारवाड्यात मोठ्या समारंभाने इंग्रजांनी ‘ हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादूर ‘ यांची मसनदीवर स्थापना केली. या निमित्ताने पेशव्याने अधिकार धारण केल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. खेरीज इंग्रजांनी पुण्यातील आपल्या तळावर तसेच मुंबई, कलकत्ता, मद्रास, सुरत व श्री रंगपट्टण येथे खुशालीच्या तोफांची सरबत्ती करून हिंदुस्थानची अप्रत्यक्ष मालकी आपणांकडे आल्याचे सर्वांना जाहीर केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 १२ एप्रिल इ.स.१६६३
शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे :
त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले. आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/U01qa_1GoCA
📜 १२ एप्रिल इ.स.१६६५
पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला
पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते, अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ती तारीख होती १२ एप्रिल १६६५....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१६७३
(वैशाख शुद्ध षष्ठी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार शनिवार)
महाराज पन्हाळगड मुक्कामी!
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथणी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले. हुबळीची लुट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धुम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फारशी हालचाल केली नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१६८३
व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहास पाठविलेल्या पत्राचा आशय!
"आपल्या प्रजेला उपद्रव देणार्या छत्रपती संभाजी महाराजांस शासन करण्यासाठी आपण युवराज अहमद आझमशहा यांना मोठे सैन्य देऊन इकडे पाठविले आहे व नबाब कर्नलखान हेही मोठे आरमार घेऊन येत आहेत हे आपल्या पत्रावरून कळते. आपण माझ्याकडे मागणी केली आहे की, आपल्या पुरवठ्याच्या नौकांना मी आमच्या आरमारी जहाजांचे संरक्षण द्यावे व छत्रपती संभाजी महाराजांचे निर्दालन करण्यासाठी आपले जे सरदार इकडे येत आहेत त्यांना मदत करावी. एक काब्रा घोडा आणि टेहाळणीच्या ६ तोफा आपण मला नजराण्यादाखल पाठविल्या आहेत. मोठ्या प्रेमाने पाठविलेल्या ह्या नजराण्याची मला अप्रुकता वाटते.""आपले पत्र येण्यापूर्वी माझे स्वामी पोर्तुगालचे महाराज यांनी मला पत्र पाठवून आपणास मदत करण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेस अनुसरून मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल तसेच चौल, वसई आणि दमण या तिन्ही कॅप्टनना पत्रे पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्याच्या हद्दीतून वाट देण्यास व ह्या सैन्याला आमच्या राज्यात जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्यासाठी आमच्या अधिकार्यांना सुचना पाठविल्या होत्या. शिवाय आपल्या आरमाराच्या सामोरा जाण्यासाठी दारुगोळ्याने भरलेल्या ६ नौकांना हुकूम केला होता". औरंगजेब बादशहाचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी गोव्यास आला तेव्हा व्हिसेरेई त्याला म्हणाला होता की, छत्रपती संभाजी महाराजांशी पोर्तुगीजांचा तह झाल्याने त्याचा भंग होण्यासारखे क्रृत्य आपण होऊ देणार नाही. परंतु वरील पत्र वाचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी असलेल्या तहास हरताळ फासून पोर्तुगिजांनी मोगलांना मदत केल्याचे दिसून येते. गोव्याचे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब बादशहा या दोघांना खूश ठेवण्याचे संधिसाधूपणाचे राजकारण कसे खेळत होते त्याचा प्रत्यय व्हिसेरेई कौंट द आल्वोर याने औरंगजेब बादशहाला पाठविलेल्या वरील पत्रावरून येतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/U01qa_1GoCA
📜 १२ एप्रिल इ.स.१६८९
छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना १२ एप्रिल १६८९ रोजी पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की, “सरदार गोळे यांना आपल्या अनुयायांसहित चरितार्थाकरता योग्य ती व्यवस्था इनाम गांवे जोडून केली जाईल. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठे सरदार, सैनिक राखण्यासाठी निश्चित सहाय्यकारी झाली. हे औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की, मोगल बादशहाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते (सरदार गोळे) तयार असतील तर बादशहा त्यांना चार गांवे इनाम देऊन सातगावांची जहागीरही देतील जी निरंतर त्यांना उपभोगावयास मिळेल. परंतु देवदयेने ह्या मसलतीमध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या प्रयत्नास यश आले. गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशहाने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली. गोळे घराणे हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१७०३
मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१७३७
मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ एप्रिल इ.स.१७५२
१७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने
फार महत्वाचे होते.
१२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार (अहमदनामा) केला.
त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ११ मे इ.स.१६६१
इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली. पोर्तुगीझांनी त्यावेळी साल्सेट, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, आणि वडाळा स्वतःकडे ठेवून उरलीसुरली मुंबई इंग्रजांना देऊन टाकली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/TYMTXizrySA?feature=share
📜 ११ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य तृतीया, शके १५८८, पराभव संवत्सर, वार शुक्रवार)
महाराज शंभुराजेंसह आग्रा येथील सीमेवर!
५ मार्च इ.स.१६६६ महाराज अन् युवराज शंभुराजे यांनी (श्रीनृप शालिवाहन शके १५८७, फाल्गुन शुद्ध ९, नवमी, वार सोमवार) स्वराज्य माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्या स्वाधीन करून, माँ साहेब जिजाऊंचे शुभाशिर्वाद घेऊन किल्ले राजगड सोडला आणि आग्र्याकडे कूच केले. महाराजांचे वय त्यावेळी ३६, छत्तीस वर्षाचे होते तर युवराज शंभुराजे यांचे ९, नऊ वर्षे. शेरास सव्वाशेर म्हणजे काय हे पुढे औरंगजेब बादशहास नक्की समजले. मात्र पिता-पुत्र आयुष्यात प्रथमच नर्मदापार करून शाही राजधानीचे वैभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार होते. युवराज शंभुराजे यांच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे उभ्या आयुष्यात त्यांना महनीय पित्याच्या सलग व प्रदीर्घ सहवास घडला तो फक्त याच प्रवासात महाराजांच्या महनीय व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे, कठिण परिस्थितीतून मार्ग कसा काढावा इथपासून ते कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन ढळू न देता राजकारणाचे डावपेच याच काळात शिकता आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सेनापती जिवावरच्या संकटांनी घेतला असतानाही मृत्यूला वाकवून कसा ताठ मानेने जगतो हे प्रत्यक्ष डोळ्यांनी युवराज शंभुराजे यांना पहाता आले. महाराज युवराज शंभुराजे आग्र्याच्या सीमेवर पोहोचले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१६७८
महाराज किल्ले रायगडी परतले.
महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानीच्या दर्शनार्थ आले. श्रीभवानीची पुजा बांधून महाराज किल्ले रायगडी परतले. सुमारे १६ ते १७ महिने किल्ले रायगडापासून तसेच स्वराज्यापासून ते दूर होते..
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१६८१
(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार)
शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
औरंगजेब बादशहाच्या कपट कारस्थानामुळे शहजादा अकबराचा पुरता बिमोड झाला होता. त्याच्या बरोबर आता फक्त ३०० ते ४०० स्वार आणि चाणाक्ष दुर्गादास राठोड होता. औरंगजेब बादशहाने त्याच्या सर्व वाटा बंद केल्याने दुर्गादास राठोडच्या सल्ल्याने शहजादा अकबराने शेवटी दक्षिणेची वाट धरली. ९ मे इ.स.१६८१ त्याने अकबरपुर येथे नर्मदा नदी ओलांडली अन् शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना पत्र पाठविले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१७०१
गदगचा फौजदार शेरखान हा रसद आणित होता , राणोजी घोरपडे हे मोठे सैन्य घेऊन शेरखान वर चालून गेला . ही बातमी ऐकताच शहजादा बेदरबख्त हा त्वरीत निघाला . त्याने २५ कोसाची दौड केली , त्या मुळे एक हत्ती व काही घोडी वाटेत मागे राहिले . विजापूर प्रांतात लक्ष्मेश्वर जवळ युद्ध झाले . या युद्धात संताजी घोरपडे यांचा पुतण्या व बहिर्जीचा मुलगा भुजंगराव घोरपडे मारले गेले. मोगलांच्या कडील बरीच माणसे ठार झाली .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ मे इ.स.१७३९
मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १० मे इ.स.१६३४
(वैशाख वद्य अष्टमी, शके १५५६, संवत्सर भाव, वार शुक्रवार)
थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. यावरून राजे शहाजीराजे यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची ऊंची काय असेल याची कल्पना येते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/KgUziDpgXlI?feature=share
📜 १० मे इ.स.१६३५
दक्षिणेच्या सुभ्यावर औरंगजेबाची नेमणूक केली. शहाजहान दक्षिणेतील यशस्वी मोहीम संपवून इ.स.१६३५ पावसाळ्यात परत उत्तरेकडे गेला. तेव्हा त्याने दक्षिणचा सुभा औरंगजेबाच्या ताब्यात दिला. त्या सुभ्याचा विस्तार बादशहानाम्यात दिला आहे. दक्षिणेच्या सुभ्यावर औरंगजेबाची नेमणूक केली. या सुभ्याखाली ६४ किल्ले असून त्यातील सत्तावन्न गड व बाकीचे कोट होते. अहमदनगर, इतर प्रांत व दौलताबाद याला दख्खन सुभा म्हणत. या सुभ्याची राजधानी पुर्वी अहमदनगर व प्रांत व्यापतो व याची राजधानी नांदेड व कंधार येथे होती. तिसरा सुभा खानदेशाचा. या सुभ्यात आसिरगड हा एक महत्त्वाचा किल्ला असून राजधानीचे ठिकाण बऱ्हानपुर आहे. हे आसिरगडापासून ४, चार कोसांवर आहे. चवथा सुभा वऱ्हाडचा. राजधानीचे शहर म्हणजे एलिचपुर असून महत्वाचा गड म्हणजे गोविलचा किल्ला होता. तिसरा सुभा व चवथ्याचा काही भाग पाइनघाटाखाली येतो. या चारही सुभ्यांचा एकंदर वसूल २ अरब दाम किंवा ५ कोटी रुपयांचा आहे".
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १० मे इ.स.१६६५
(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार)
दाऊदखान किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी!
दाऊदखान राजा रायसिंगसह पुन्हा किल्ले पुरंदराच्या मुख्य तळावर दाखल झाला. दाऊदखानाचा सहकारी कुतुबूद्दीनखान याने पुण्यातच तळ ठोकला होता. मोगली सरदारांकडून स्वराज्याच्या नासाडीचे सत्र सुरूच होते. मात्र तरीही किल्ले पुरंदरचा वेढाही सुरू होता. किल्ले वज्रगड पडल्यावर पुरंदर लगेचच ताब्यात येईल ही मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखानाची अटकळ होती. मात्र दाऊदखानाचा जागोजागी झालेला पराभव व चिवट मराठी सैनिकांची झुंजार वृत्ती मिर्झाराजे जयसिंग यांची चिंता वाढवत होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १० मे इ.स.१७८५
शिखांचा बंदोबस्त-श्रीमंत महादजी शिंदे
इ.स.१७८५ च्या जानेवारी महिन्यात अंबुजी इंगळे यांना दिल्ली आणि उत्तरेकडील प्रातांच्या बंदोबस्ताकरिता महादजींनी रवाना केले,शिखांचा दिल्ली प्रातांत नेहमी उपद्रव होत असे . शिवाय बादशहाच्या गैरहजेरीत शिखांची धाड येण्याची शक्यता होती ,अफ्रासियाबखानाच्या वेळेपासून दिल्ली शहराचा बंदोबस्त नजीबखानाकडे होता,अंबूजी इंगळे ह्यांनी दि. ११ फेवारी १७८५ रोजी त्याच्याकडून ताबा काढून आपले सैन्य दिल्लीच्या बंदोबस्ताकरिता उभे केले,
नजीबखानाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात जो गोंधळ निर्माण झालेला होता, त्याचा फायदा घेऊन दिल्लीच्या आसपासच्या मुलखात,गुजर लोक लुटमार करीत होते. त्यामुळे त्या प्रांतातील लोकात खूप असंतोष निर्माण झाला होता.अंबूजी इंगळेंनी गुजर लोकांचा बंदोवस्त करून त्या प्रांतातील लोकांना दिलासा दिला. त्यामुळे साहजिकच तेथील लोकांना आनंद झाला. त्यानंतर अंबूजी इंगळेंनी आपले सर्व लक्ष शिखांकडे वळविले,
मार्च १७८५ रोजी अंबूजी इंगळे ह्यांनी दिल्लीच्या उत्तरेस तेरा मैलावर असलेल्या भक्तावरपूर येथील आपल्या छावणीत काही शिख सरदाराच्या भेटी घेतल्या . ह्या शिख सरदारात बघेलसिंग, करमसिंग, दुलजासिंग, भागसिंग, दिवाणसिंग, मोहनसिंग, गोहरसिंग, ह्यांचा समावेश होता. ह्या भेटीमध्ये मोहनसिंग आणि दुलजासिंग ह्या प्रमुख सरदारांनी महादजींना भेटून मैत्रीच्या करारावर सह्या करावे असे ठरले.
ह्यानंतर अंबूजी इंगळेनी मथुरेला येऊन एप्रिल १७८५ मध्ये महादजींची भेट घेतली, दि.१० मे १७८५ रोजी शिख प्रामुख्य सरदार मोहनसिंग, दुलजासिंग आणि महादजी शिंदे ह्यांच्यात मैत्रीच्या करारावर मथुरा मुक्कामी सह्या झाल्या,
ह्या कराराच्या काही अटी अशा होत्या -
१) शिखांनी बादशहाच्या प्रदेशात लुटमार करू नये.
२) कोणत्याही प्रदेशातून राखी(महसूल) वसूल करू नये.
३) जयपूरच्या प्रदेशात आपण दिलेल्या ठिकाणीच जहागिरी घ्याव्या, आणि पाच हजार सैन्यासह महादजींची चाकरी करावी.
४) दिल्ली किंवा महादजींच्या प्रदेशात तसेच इंग्रजांच्या व नवाब वजीर ह्यांच्या प्रदेशातही बंडाळी करू नये.
ह्या करारानंतर महादजींना शिखांकडून कधीही त्रास झाला नाही. महादजींनी शिखांच्या केलेल्या बंदोबस्तातून त्यांचे बुद्धिकौशल्य आणि शत्रुवरप्रेमाने मात करण्याची त्यांची विलक्षण चातुर्याचा प्रत्यय येतो.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १० मे इ.स.१८१८
रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.
https://youtube.com/shorts/KgUziDpgXlI?feature=share
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १० मे इ.स.१८५७
स्वातंत्र्यसमराची सुरुवात
१० मे १८५७, रविवारचा दिवस होता. उत्तर भारतातील मीरतच्या छावणीतले काही इंग्रज अधिकारी चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत होते आणि काही इंग्रज शिपाई सुट्टीवर होते. भारतीय शियाई आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात उठाव करण्याची संधीच शोधत होते आणि हा १० मे चा मुहूर्त त्यांनी साधला. जवळजवळ पन्नास पुरुष, स्त्रिया आणि मुलांची भारतीय शिपाई आणि त्यांच्यात सामील झालेल्या संतप्त स्थानिकांनी तिथे कत्तल केली.
हा उठाव काही अचानक घडलेली घटना नसून अनेक वर्षांपासून हिंदुस्थानच्या भूमीवर असलेला परसत्तेचा डाग कायमचा पुसून काढण्यासाठी केलेला एक पूर्वनिश्चित प्रयत्न होता. गाय आणि डुक्कर यांच्या चरबीचे वंगण असलेल्या कडातुसंचा भाग सर्वांना ज्ञातच आहे, पण उठावाचे केवळ काडतूस हेच एकमेव कारण नवते. केवळ धार्मिक भावना दुखावल्याबद्दल केलेला विरोध नसून, इंग्रजांनी ज्या पारतंत्र्याच्या बेड्या लादल्या होत्या आणि त्यायोगे जे अनन्वित आत्यचार केले होते त्या विरुद्ध एक महाभयंकर विस्फोट होता. भारतीयांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध जो निखारा धगधगत होता तो धडधडून पेटवण्यासाठी काडतूस ही केवळ एक ठिणगी होती.
१९ मार्च १८५७ ला बंगालच्या बराकपूरमध्ये मंगल पांडेला अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव केल्याबद्दल फाशी देण्यात आली. २४ एप्रिल ला भारतीय शिपायांनी नवीन काडतुसंचा विरोध केला आणि ८५ शिपायांना ९ मे रोजी नोकरीवरून काढून १० वर्षांची कोठडी सुनावली. हे निमित्त साधून भारतीय शिपायांनी १० मे रोजी उठाव केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ९ मे इ.स.१५४०
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म
(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/UrTro1K0wcA?feature=share
📜 ९ मे इ.स.१६६०
शाहिस्तेखान पुण्यास पोहोचला!
शाहिस्तेखानाने औरंगाबाद ते पुणे हा प्रवास सर्व लवाजम्यासह सव्वातीन महिण्यात मुंगीच्या वेगाने पुर्ण केला. पुणे एकाच तडाख्यात शाहिस्तेखानाच्या हाती आले. मुठेच्या किनाऱ्यावर शाहिस्तेखानाची औरस चौरस छावणी पडली. खासा खान महाराजांच्या लाल महाली डेरा देऊन राहीला. पुणे प्रदेश उद्ध्वस्त होऊ लागला. व्यापारी पळून गेले. लोक प्राणभयाने परांगदा झाले. गावे बेचिराख होऊ लागली. माँसाहेब जिजाऊसाहेबांची तगमग सारखी सुरू होती. त्यांचे अर्धे लक्ष होते स्वराज्यातील गांजल्या जाणाऱ्या निष्पाप प्रजेकडे तर, अर्धे लक्ष लागले होते पन्हाळ्यात वेढल्या गेलेल्या शिवबा राजेंकडे !
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१६६६
आग्रा प्रकरण - महाराज नरवरला पोहचले
महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबास सतत कळत होते की , शिवाजीराजे कसे कसे आपल्या जवळ येत आहेत ! या वर्षी त्याचा पन्नासावा वाढदिवस आग्ऱ्याच्या दिवाणे आममधल्या शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजीराजे हजर व्हावेत अशी त्याची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखा वागलेला सीवा मरहट्टा कसा आदबीने मुजरे करीत येतो ते त्याला जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांनाही मोगल साम्राज्याचा तळपता दिमाख दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली होती. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले दि. ९ मे १६६६ या दिवशी. दि. १२ मे १६६६ या दिवशी बादशाहाची पन्नासावी सालगिरा होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्यांना आदेश
"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना. शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर सूचना आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१६८१
(ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार सोमवार)
शहजादा अकबराने नर्मदा नदी ओलांडली!
शहजादा अकबराने आपल्या जन्मदात्या बापाविरुद्ध बंड केले. औरंगजेब बादशहाच्या सामर्थ्याला हा फार मोठा धक्का नव्हता तर आव्हानच होते. दुर्गादास राठोड व शहजादा अकबर आपल्या ३०० ते ४०० सैन्यदलासह रानोमाळ भटकत असतानाच महाराष्ट्रात यायचा निर्णय घेतला व अकबरपुर येथे त्याने नर्मदा नदी ओलांडली. दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार शहजादा अकबर पळून जाण्यात यशस्वी झाला. जर शहजादा अकबर यावेळेस औरंगजेब बादशहाच्या हाती लागला तर शहाजहान, दारा शुकोह मुराद आधीप्रमाणे त्याचीही हत्या नक्कीच झाली असती यात शंका नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१६८२
(वैशाख शुद्ध त्रयोदशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार)
इंग्रजांचे दुटप्पी धोरण!
१९ एप्रिल इ.स.१६८२ पत्रातून मुंबईकर इंग्रज, सुरतकर इंग्रजांना कळवतात की, सिद्दीसारख्या दुष्ट आणि माजोरी, खुनशी वृत्तीच्या लोकांना आपण जवळ राहू दिल्यास छत्रपती संभाजी महाराज आपणास विचारणा केल्यावाचून राहणार नाहीत. आपल्या जवळ मुंबईत पुरेसे सैन्य साधनसामुग्रीही नाही. शिवाय छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील ते वेगळेच त्यामुळे सिद्दीला पावसाळ्यापुर्वी मुंबई बंदरातून हलवणे योग्य होईल तशी तजवीज करावी असे मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना कळवितात. मात्र सुरतेच्या इंग्रजांची इतकी दंडेली की, त्यांनी मुंबईकरांना पत्रात सिद्दीला मुंबई बंदरात घेण्याची सक्ती केली. पुढे जाऊन मराठी आरमाराने योग्य ती कारवाई केलीच. मात्र इंग्रज कसे दुटप्पी वागत होते, याचा हा ढळढळीत पुरावा आहे.
https://youtube.com/shorts/UrTro1K0wcA?feature=share
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१७०३
छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मांतराचे प्रयत्न
९ मे १७०३ या तारखेची नोंद पुढीलप्रमाणे आहे: बादशहाने हमीदोद्दीनखान यास म्हटले, “तुम्ही शाहुकडे जा, त्याला म्हणावे--तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदोद्दीनखान शाहूकडे गेला. त्याने शाहूला बादशहाचा निरोप सांगितला. शाहूने त्या सूचनेला निर्धाराने नकार दिला परत येऊन हमीदोद्दीनखानाने शाहूचा नकार बादशहाला कळविला. हे ऐकून बादशहा इतकेच म्हणाला "शाहूवर कडक नजर ठेवा."
ही बातमी मोगल दरबाराच्या अखबारामध्ये सहजपणे नोंदली गेली आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१८२३
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांनी १८१८ मध्ये पकडले. १८१९ मध्ये कलकत्त्यात चौकशी पूर्ण होऊन त्यांना उत्तरेत वाराणसीजवळ चुनारच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवलेले होते. ९ मे १८२३ ला बंगालला पाठवलेल्या ह्या वृत्तांतात (बनारसमधल्या एजंटने) लिहिलेले आहे की "...१४ एप्रिलला आम्ही तुमच्याकडे त्रिंबकजी डेंगळ्यांनी लिहिलेला सुटकेचा अर्ज पाठवला होता, जो स्पष्ट कारणांमुळे नाकारला गेला. बंदी (त्रिंबकजी) तुरुंगावरच्या पहारेकऱ्यांशी संगनमत करून काहीतरी संधान साधायच्या तयारीत आहे.एजंटाला ह्या बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी त्याच वेळी बोलावणे पाठविलेले आहे. ..."
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ९ मे इ.स.१९५९
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतीदिन...
"एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेल,पण
कॉलेजला दिलेले छत्रपती शिवरायांचे नाव कदापीही बदलणार नाही"
- कर्मवीर भाऊराव पाटील
स्मृतीदिनी कर्मवीरांस विनम्र अभिवादन...
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🚩शिवराय
💐💐💐💐 #दहावी परीक्षा शुभेच्छा #दहावी परीक्षा #दहावी बोर्ड परीक्षा शुभेच्छा
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ८ मे इ.स.१६६३
( वैशाख शुद्ध द्वादशी, शके १५८५, संवत्सर शोभन, शुक्रवार )
शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ‘ तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ‘ बडफुकन ‘ या शब्दाचा अर्थ ‘ बडा सेनापती ‘ मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ‘ शाहिस्तेखानकी बुरंजी ‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.
‘ अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?
शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती याचे हे उदाहरण आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/lq18N5sct60?feature=share
📜 ८ मे इ.स.१६६४
अजीजखान यांनी बालाघाट उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेला. आदिलशहाने पुन्हा महाराजांविरुद्ध हालचाल सुरू केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजापुराहून सेनापती अजीजखान ४ हजार घोडदळ व पायदळ घेऊन चौलपर्यंतचा मुलूख परत घेण्यासाठी कुडाळकडे निघाला. दि. ८ मे इ.स.१६६४ रोजी त्याचे सैन्य बालाघाटातून उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेले. परंतु विजापुरी सैन्याच्या आगमनाची वार्ता कळताच राहुजी कुडाळ सोडून राजापुरला परतले व तेथे त्यांनी स्वसंरक्षणाची तयारी आरंभिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ मे इ.स.१६७५
महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेतला. फोंडा किल्ला घेतल्यामुळे फोंड्याच्या अंकीत असलेले तिसवाडी, चंद्रमहल, केले, बाल्ली आणि काणकोण हे आदिलशाही महाल महाराजांच्या अंमलाखाली आले. त्यानंतर महाराजांनी दक्षिणेकडे चाल करून, सांप्रतच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवा, कद्रा, आणि अंकोला हा गंगावळी अथवा गंगावती नदीपर्यंतचा आदिलशाही प्रदेश काबीज केला. महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१६८०
(वैशाख वद्य पंचमी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शनिवार)
गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद यांनी कोकण प्राताचे सरसुभेदार रायाजी पंडीत यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!
छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणचे सरसुभेदार म्हणून आपली निवड केल्याचे पाहून खूप समाधान झाले. "महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी कळताच मी आमच्या साष्टी प्रांताचा कॅप्टन जनरलला युद्ध बंद करण्याची आज्ञा दिली. हाच प्रकार फोंड्याच्या सरहद्दीवर सुद्धा आहे. युद्ध बंदीचा एकतर्फी निर्णय आम्ही घेत असून जो राजा आता सिंहासनावर येईल त्याने आमच्याशी युद्ध चालू ठेवावे की बंद करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. भूतकाळाच्या गोष्टी विसरून जाऊन नवीन राजाशी, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१६८२
(वैशाख शुद्ध द्वादशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार)
सिद्दीची लुटालूट सुरूच!
छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांबरोबर केवळ बोलणीच केली नाही. तर इंग्रजांशी जरबेचे बोलणे करून इंग्रजांची कोंडी करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी सिद्दीशी बोलणे केले आणि एकंदर परिस्थितीचा आढावा इंग्रजांनी घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१६९९
मराठ्यांनी ८ मे १६९९ रोजी सिद्धगड काबिज केला व एक हजार पायदळ सैनिक व किल्ला चढून जाण्याची सामग्री (दोराच्या शिड्या वगैरे) माहुलीकडे पाठविली. बादशहाला हे कळताच त्याने माहुली किल्ला लढविण्याची कामगिरी कल्याण-भिवंडीचा ठाणेदार मातबरखान याजवर सोपविली. याच सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शेगांव परगण्यांतील खेडी मराठा सरदार हणमंतराव यांनी लुटली. त्याचे पारिपत्य तेथील मोगली फौजदार इल्तिफातखान याजकडे पथके नसल्यामुळे झाले
नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ८ मे इ.स.१७०७
शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज मुगल कैदेतून स्वराज्यात परतले
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खानास रायगड लढवण्यास पाठवून दिले.महाराणी येसूबाई राणीसाहेब यांनी तब्बल दहा महिने रायगड लढवला . रायगड वाचवण्यासाठी व स्वराज्यासाठी येसूबाई राणीसाहेबांनी वैधव्याचे दुःख सहन करत आटोकाट प्रयत्न करत केला. परंतु प्रचंड मोगली सैन्यापुढे येसूबाई राणीसाहेब यांना हार पत्करावी लागली व त्या आपल्या पुत्रासह मोगलांच्या स्वाधीन झाल्या.
औरंगजेबाच्या मृत्यू पूर्वी त्यांच्या मुलांना आपल्या भवितव्याचे वेध लागले होते.औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील 27 वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यानंतर अहमदनगर येथे निधन झाले. शहाजादा आजम याला आपल्या पित्याच्या मृत्युची बातमी समजताच तो अहमदनगरला आला व
स्वतःस बादशहा घोषित करून तो दिल्लीकडे जाण्यास तयार झाला. जाताना बरोबर येसूबाई राणीसाहेब व शाहुराजांना बरोबर घेण्यास तो विसरला नाही.झुल्फिकारखानाला बरोबर घेऊन त्याला संपूर्ण दक्षिणेचा मुख्य अधिकारी नेमले. येसूबाई व शाहू राजांची काळजी घेणारी झीनतबेगमही बरोबर होती.
पुढे बुर्हाणपुरजवळ मुक्काम पडला असता शाहूराजे व आझम यांची भेट झाली. आजमने पोषाख देऊन त्यांचा गौरव केला.छत्रपती शाहूला सोडण्याचे त्याच्या विचारात नव्हते. कारण मराठ्याचा राजा सोडून तो परत डोईजड होईल याची आजमला भिती होती. परंतु रजपूत सरदार ,काही मनसबदार, या सर्वांच्या मध्यस्थीने शाहुराजांना दोहरा येथून17 वर्षे 7 महिन्यानंतर कैद मुक्त केले गेले. यावेळी शाहूराजांची सुटका केल्यास मराठी राज्यात वारसासाठी भांडणे सुरू होतील ,हा सुज्ञ विचार करून आजमने छत्रपती शाहूंमहाराजांची सुटका केली होती. शाहूमहाराजांवर काही अटी घालण्यात आल्या. तुम्ही दिल्लीच्या बादशहाच्या अंकीत म्हणून राज्य करावे.तुमची आई ,भाऊ, व बायका यास आम्हापाशी ठेवावे. तसेच तुम्ही राज्यात बंदोबस्त करावा .बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात ठेवून वागावे. इकडील मुलखास उपद्रव देऊ नये.तुम्ही याप्रमाणे वागता अशी खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे पाठवून देऊ
वरील ठरावाने शाहूराजे मोगलांचे मांडलिक होऊन मोगली मनसबदार म्हणून कैदेतून निसटले व 8 मे 1707 मधे ते महाराष्ट्राकडे वळले .परंतु येसूबाई राणीसाहेब मात्र यावेळी महाराष्ट्रापासून हजारो मैल महाराष्ट्रापासून दूर दिल्लीकडे गेल्या. कैदेत का होईना परंतु आत्तापर्यंत येसूबाईराणी मराठी राज्यात होत्या. आता मात्र दिल्लीसारख्या अत्यंत दूर परकीय राज्यात त्यांना पुढील काळ घालवायचा होता.छत्रपती शिवाजीराजांच्या वेळेपासून ते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना त्यातील येसूबाई राणी यांचा सहभाग, त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार यांचे एक महत्त्वाचे पर्व येथे संपले.
इकडे शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आले .छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस, त्यांचा नातू, छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांचा पुत्र असूनही शाहू महाराजांनी मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून जीवन व्यतीत केले. औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे मराठ्यांचे वारस म्हणून किंवा छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय शिक्षण मिळाले नव्हते.जोत्याजी केसरकर व येसूबाईराणीसाहेब यांच्या सहवासामुळे थोडेफार शिक्षण मिळाले तेवढेच काय ते. बाहेरच्या जगाचा कोणताही आणि कसलाही संबंध शाहुराजांना आला नाही. तरीही शाहू महाराजांनी मोठ्या हुशारीने मराठी सरदारांशी, मनसबदारांशी गुप्तपणे नाते जोडून संपर्क ठेवला होता .तब्बल 17 वर्षे 6 महिन्यांनी स्वराज्याचा खरा वारसदार मोगली कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले.याच शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तब्बल 42 वर्षे अत्यंत हुशारीने राज्यकारभारून करून आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांची 29 वर्षांनी मुगल कैदेतून सुटका करून घेतली.
https://youtube.com/shorts/lq18N5sct60?feature=share
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ मे इ.स.१८१७
इंग्रजांच्या फौजांनी ८ मे १८१७ रोजी सकाळी पुण्यास वेढा घातला. हे कळताच बाजीरावाने (दुसरे) इंग्रजाशी युद्ध पुकारण्याचा निश्चय केला. परंतु लागलीच इग्रजांकडे शरणागतीची याचना केली व त्रिंबकजी डेंगळेस पकडून देण्याबद्दल २ लाखाचे बक्षिस व गाव इनाम देण्याचे जाहीरनामे लावले. त्यावरच काम निभावले नाही. एलफिस्टनने बाजीरावाची भेट घेऊन नवीन तहाच्या कलमाची वाटाघाट केली. हा तह गव्हर्नर जनरलच्या हुकुमावरून पेशव्यांवर लादला गेला. त्यातील मुख्य मतलब म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पेशव्यांचे ३४ लाख वसुलाचे सर्व प्रदेश इंग्रजांनी आपल्या कबजात घेतले आणि इतर मराठे सरदारांशी त्यांचा सबंध कायमचा तोडून लावला. तदनुसार बाजीरावाजवळ असलेले शिंदे, होळकर आदींचे वकिल पुण्यातून काढून बाहेर असलेले त्यांचे वकिल यास परत बोलवावे लागले. शेवटी हो ना करता दिनांक १३ जून १८१७ रोजी पेशव्यांने ह्या तहावर मोठ्या नाखुशीने सही केली. नंतर तो गव्हर्नर जनरलकडे पाठविण्यात येऊन दिनांक ५ जुलै १८१७ रोजी मंजूर होऊन आला. ह्या तहाने बाजीरावाचे राज्य जाऊन तो एक लहानसा संस्थानिक बनला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ७ मे इ.स.१४९८
पोर्तुगीज गोव्यात आले. पाल्बाव हा पाद्री गोव्यात आला आणि त्याने बाटवाबाटवीच्या छळाचा अतिरेक केला. व त्यांनी इ.स.१९६१ रोजी पर्यंत हिंदुस्थानात चाचेगिरी निर्भयपणे केली. अल्फान्सो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या. गोव्यातील हिंदू बांधवांनी त्याला फार सोशिकपणाने तोंड दिले. पुढे पोर्तुगिजांनी वसई, ठाणे, तारापूर, वांद्रे, माहीम, मुंबई येथे सत्ता स्थापन केली. दीव घेतले. दमण घेतले. गोवा, दीव, दमण यांवर त्यांची सत्ता आली. इक्विझिशनचा छळवाद संपूर्ण जगात चालू होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/f6EpMnIOkS4?feature=share
📜 ७ मे इ.स.१६६०
(ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार सोमवार)
शाहिस्तेखान पुण्याच्या दिशेने!
शाहिस्तेखान पुण्याच्या दिशेने सरकत असल्याची बातमी चलाख हेरांनी दिली होती. शाहिस्तेखानालाही मग इंगा दाखवायचा ह्या हेतूने मराठ्यांची एक तुकडी शाहिस्तेखानाच्या सैन्याची अन्नधान्याची रसद तोडण्यासाठी रवाना केली. या तुकडीने आपले काम चोख बजावले. पिछाडीवर हल्ला करून शाहिस्तेखानाची रसद तोडल्याने, शाहिस्तेखानाच्या सैन्याला काही दिवस उपवासही घडला. महाराजांच्या फौजा शाहिस्तेखानाच्या सैन्याला चावा घेत त्रस्त करतच होत्या. महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ मे इ.स.१६७२
विलायती वकीलांशी इंग्रजीत चर्चा-
इ.स.१६७२ मध्ये शिवाजीराजांनी संभाजीराजांना जाणीवपूर्वक परकीय वकीलांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून संभाजीराजांना दरबारातील शिष्टाचाराचा व परकीय दूतांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ मे इ.स.१६८०
(वैशाख वद्य ४, चतुर्थी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शुक्रवार)
छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा !
महाराजांच्या महानिर्वाणानंतर अनेक घटना वेगात घडल्या. अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सल्ल्याने, सहकार्याने छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगडावरूनच राज्यकारभार सुरू केला. प्रल्हाद निराजी यांचे न्यायदानाचे व न्यायधीश हे पद आधीप्रमाणे सुरू राहिले. हंबीरराव मोहिते हे सरलष्कर म्हणून तर बाळाजी आवजी हे चिटणीस पदावर कायम राहीले. काळ भराभर पुढे सरकत होता. मंचकारोहण होण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी आधी किल्ले पन्हाळगडावरून तर मंचकारोहण झाल्यावर किल्ले रायगडावरून प्रशासकीय कारभार सुरू केला. छत्रपती संभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांना पत्र लिहिले. त्या पत्रावर छत्रपती संभाजी महाराजांची पिंपळपानी, १६ बुरजी, षोडशावली राजमुद्रा प्रथम आढळते.
ती अशी:
श्री शंभो: शिव जातस्य मुद्राद्यौ। रिव राजते यदं। कसे विनो लेखा। वर्तते कस्यनो। परि।
अर्थ:
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा सुर्याप्रमाणे शोभते. त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता गाजविते.
छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा "मर्यादेयं विजयते" अशी होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ मे इ.स.१८१८
पेशव्यांची शरणागती आणि प्रतापसिंह महाराजांस चिमुकले राज्य देऊन त्यांची मांडलीक राजे म्हणून स्थापना या दोन गोष्टी इंग्रजांनी १८१८ च्या युद्धाने झालेल्या मराठ्यांच्या ताब्यात असलेले मजबूत किल्ले सिंहगड, पुरंदर, वासोटा हे एप्रिल १८१८ च्या आरंभीच इंग्रजांनी जिंकले. हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड प्रिटल्झरच्या स्वाधीन करण्यात आला. (दिनांक ७ मे १८१८) त्याचवेळी इ. स. १६८९ च्या मोगलाने घातलेल्या वेढ्यांतून जे काही कागदपत्रे शिल्लक होते ते इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यामुळे नष्ट झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ६ मे इ.स.१४५२
सेंट झेविअर गोव्यात आला!
व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो. ६ मे इ.स.१४५२ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी सेंट झेविअरचे पाय गोव्यास लागले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/lK_dgkCmKpE?feature=share
📜 ६ मे इ.स.१६३२
शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजी राजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६३६
आदिलशहा व मोगल बादशहा यांच्यामध्ये तह ठरला. त्यानुसार विजापुरकरांनी दिल्लीपतीचे प्रभुत्व मान्य करावे, निजामशाहीचा मुलुख दोघांनी वाटून घ्यावा, आदिलशहाने मोगल बादशहाची सरहद्द ओलांडू नये, या तहानुसार प्राप्त झालेल्या मुलूखाचा ताबा मोगलांना बिनतक्रार घेऊ द्यावा. निजामशाहीतील पश्चिमेकडील भीमा व सीना या दोन नद्यांमधील सोलापूर परिंडा किल्ल्यासह सोलापूर व वांगणी महाल, निजामशाही कोकण, पुणे व चाकण परतणे ईशान्येकडील भालकी व चिडगुपा हे परगणे हा सर्व मुलूख मिळून (दरसाल २०, वीस लक्ष होण वसुलीचा) "विजापुरकरांकडे तर उर्वरित मोगलांकडे जोडला जावा असे ठरले. + याशिवाय राजे शहाजीराजे यांच्या निजामशाहीस मान्यता न देता त्यांनी बळकावलेले जुन्नर, त्रिंबक, भीमगड इत्यादी किल्ले ते मोगलांना जोपर्यंत परत करीत नाहीत तोपर्यंत आदिलशहाने त्यांना थारा देऊ नये. अथवा आपल्या नोकरीत ठेऊ नये. आल्यास कैद करावे असेही एक कलम तहात होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६५५
( वैशाख अमावस्या, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार )
मराठी फौज आणि रयतेचा चिवट प्रतिकार :-
आजच्या दिवशी दाऊद खानाने पुढे कूच करून टेहाळणी पथक लोहगड परिसरात पाठवले आणि आकस्मात मराठे मोगलांवर तुटून पडले. मोगलांची ताकद कमी पडते आहे असे समजताच दाऊद खानाने मिरझा जयसिंग, अचल सिंग, कुतुबुद्दीन खानला पाठवले. मात्र चिवट मराठे आणि रयत शर्थीने प्रतिकार करत होते. हाच प्रतिकार आणि गरीब रयतेची चिवट झुंज पाहून दाऊद खान मेटाकुटीला आला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मे इ.स.१६५६
रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी शिवरायांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मे इ.स.१६६७
औरंगजेब बादशहाने महाराजांच्या वकिलास बोलावून सांगितले की, "तुमचे मालकास कळविने की, तुमचे अपराध आम्ही माफ केले आहेत आणि तुमच्या मुलाला म्हणजेच युवराज शंभुराजे यांना चाकरीस ठेवून घेतले आहे. जो विजापुरी मुलूख तुम्ही जिंकाल तो तुम्हालाच देऊ आणि तुम्ही स्वतःचेच ठिकाणी कायम राहा. तुमच्याकडील प्रत्येक महाल तुम्ही शहजादा मोहम्मद मोअज्जमकडे रुजू करा". जुम्दतुलमकास हुकुमकेला. महाराजांच्या वकिलास कैदेतून सोडावे. महाराजांस सुद्धा लिहावे, विश्वासू जामीन दिल्यास आणि स्वतःच्या मुलास हजर ठेवले तर तुमचे अपराध माफ होतील. औरंगजेब बादशहाने महाराजांशी त्यांच्या म्हणण्यानुसार तह केला. महाराजांचा वकिल दिल्ली दरबारात राहीला. औरंगजेब बादशहाने विजापुरवरील स्वारीची लुट आणि ऐवज स्वतःकडे ठेवण्यास परवानगी दिली आणि युवराज शंभुराजे यांना पुन्हा "मनसबदारी" मिळाली. महाराज दक्षिणेत राहीले. महाराजांकडील सर्व महाल शहजादा मुअज्जमकडे देण्यात आले. महाराजांच्या मुळ जहागिरी व सरदेशमुखी या महाराजांकडे राहील्या.,
📜 ६ मे इ.स.१६८८
(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)
शहजादा अकबरासंदर्भात इंग्रजांचे पत्र !
शहजादा अकबराने इराणला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जहाजांची वगैरे सर्व तयारी होऊन, राजापुराहून ती येईपर्यंत व इराणच्या शहाचे फर्मान मिळेपर्यंत तो भडोचला सुरक्षित राहीला. पुढे राजापुरच्या फ्रेंच व व वेंगुर्ल्याच्या डच व्यापाऱ्यांकडून जहाजाची योजना करून दिल्यानंतर शहजादा अकबर इराणला गेला. शहजादा अकबराचा उद्देश सफल झाल्यासारखा होता कारण इराणच्या शहाने त्याला मदत केली. त्या संदर्भात एक पत्र उपलब्ध असून त्या पत्रानुसार जर सुलतान अकबराला ६० हजार स्वारांची केलेली मदत पुरली नाही, तर इराणच्या शहा त्याच्या पाठोपाठ मोठे सैन्य घेऊन निघणार आहे. इराणच्या शहाने शहजादा अकबराला दिल्ली तख्तावर स्थापन करण्याचे दाढीची शपथ घेऊन वचन दिले आहे. या आशयाचे हे पत्र आहे. अशा पत्रातून शहजादा अकबराच्या इ.स.१६८८ रोजी नंतरच्या हालचालींवर प्रकाश पडतो.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१९२२
राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले. महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली. इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀




![🗿शिवकालीन पुराणवस्तू - IHE GPET MIATIIIII WTTTuI] T H F MA R A R R10 R $ G SHIVDINVISHESH CREATED BU Ralul Borse Patil शिवदिनविशेष १३ मे इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रजांचा वकिल हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला तो थेट कैरलई जवळच्या " आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला. the great marathauarriors the great marathawarriors the qreol moratho warriors IHE GPET MIATIIIII WTTTuI] T H F MA R A R R10 R $ G SHIVDINVISHESH CREATED BU Ralul Borse Patil शिवदिनविशेष १३ मे इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रजांचा वकिल हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला तो थेट कैरलई जवळच्या " आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला. the great marathauarriors the great marathawarriors the qreol moratho warriors - ShareChat 🗿शिवकालीन पुराणवस्तू - IHE GPET MIATIIIII WTTTuI] T H F MA R A R R10 R $ G SHIVDINVISHESH CREATED BU Ralul Borse Patil शिवदिनविशेष १३ मे इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रजांचा वकिल हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला तो थेट कैरलई जवळच्या " आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला. the great marathauarriors the great marathawarriors the qreol moratho warriors IHE GPET MIATIIIII WTTTuI] T H F MA R A R R10 R $ G SHIVDINVISHESH CREATED BU Ralul Borse Patil शिवदिनविशेष १३ मे इ.स. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रजांचा वकिल हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला तो थेट कैरलई जवळच्या " आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला. the great marathauarriors the great marathawarriors the qreol moratho warriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_421464_8833e2f_1778637413585_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=585_sc.jpg)






![🚩शिवराय - 5 3 ][[ H1A 7 G { 0/2 SHIVDINIESHREAEDB Ruul Borse Patll शिवदिनविशे &মব্তমং৪৩9 छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. the qreat maratha warriors the greal maratha uarriors the greal marathawarriors 5 3 ][[ H1A 7 G { 0/2 SHIVDINIESHREAEDB Ruul Borse Patll शिवदिनविशे &মব্তমং৪৩9 छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. the qreat maratha warriors the greal maratha uarriors the greal marathawarriors - ShareChat 🚩शिवराय - 5 3 ][[ H1A 7 G { 0/2 SHIVDINIESHREAEDB Ruul Borse Patll शिवदिनविशे &মব্তমং৪৩9 छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. the qreat maratha warriors the greal maratha uarriors the greal marathawarriors 5 3 ][[ H1A 7 G { 0/2 SHIVDINIESHREAEDB Ruul Borse Patll शिवदिनविशे &মব্তমং৪৩9 छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. the qreat maratha warriors the greal maratha uarriors the greal marathawarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_993847_24541726_1778210987080_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=080_sc.jpg)

![🚩शिवराय - ]ப3 G}5 ]7 1 TH E 4 R _A G R E A +A1 (Cಲ SHIVDINVISHESH CREATED B7 Rahul Borse Patil शिवदिनविशेष ६ मे इःस. १६५६ रायरी ह्या किल्ला जावळीच्या मौरे यांच्याकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the great marathauarriors ]ப3 G}5 ]7 1 TH E 4 R _A G R E A +A1 (Cಲ SHIVDINVISHESH CREATED B7 Rahul Borse Patil शिवदिनविशेष ६ मे इःस. १६५६ रायरी ह्या किल्ला जावळीच्या मौरे यांच्याकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the great marathauarriors - ShareChat 🚩शिवराय - ]ப3 G}5 ]7 1 TH E 4 R _A G R E A +A1 (Cಲ SHIVDINVISHESH CREATED B7 Rahul Borse Patil शिवदिनविशेष ६ मे इःस. १६५६ रायरी ह्या किल्ला जावळीच्या मौरे यांच्याकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the great marathauarriors ]ப3 G}5 ]7 1 TH E 4 R _A G R E A +A1 (Cಲ SHIVDINVISHESH CREATED B7 Rahul Borse Patil शिवदिनविशेष ६ मे इःस. १६५६ रायरी ह्या किल्ला जावळीच्या मौरे यांच्याकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले. the_great_marathawarriors the qreat marathauarriors the great marathauarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_582839_4120bd1_1778034574031_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=031_sc.jpg)