⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २ जून इ.स.१६६५
(ज्येष्ठ वद्य चतुर्दशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार शुक्रवार)
किल्ले पुरंदरावर मोगलांचे निकराचे हल्ले!
याप्रमाणे पुरंदर माची व ५ बुरुज मोगलांच्या ताब्यात गेले. आतापावेतो विजय मोगलांचा झाला असला तरी पराक्रम गाजविला. तो मात्र मराठ्यांनीच. सैन्यसंख्या अनेक पटींनी जास्त असूनही मोगलांना एक-एक दिवस एक-एक वर्षांसारखा वाटत होता. शिवाय अजून किल्ले पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर मराठ्यांचेच निशान दिमाखात फडकत होते. मुरारबाजी देशपांडे आपल्या शुर साथीदारांसह बालेकिल्ल्याचे रक्षण करीत होते. प्रत्येक पावलासाठी मिर्झाराजे जयसिंगना भरपूर किंमत चुकवावी लागत होती. तरीही किल्ले पुरंदरचा आता त्यांच्या दृष्टिक्षेपातज्ञ येऊ लागला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/lA55wcfZCxE
📜 २ जुन इ.स.१६७३
टॉमस निकल्सची रोजनिशी!
मीठ व लाकूड या बाबतीत युवराज शंभुराजे यांचा हुकुम घेण्यासाठी मी शामजीला युवराज शंभुराजे यांच्याकडे पाठविले. परंतु संध्याकाळी शिवाजी महाराज १ मैलावरील आपल्या मातोश्रींच्या किल्ल्यावर (पाचाड) आल्याची पक्की बातमी आली. रात्री टेकडीवर चढताना आम्ही त्यांना पाहीले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇
📜 २ जून इ.स.१६७४
विविध विधी पार पडल्या :-
आजच्या दिवशी नक्षत्रशांती, गृहशांती, ऐंद्रियशांती, पौरंदरीशांती अशा विविध विधी पार पडल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇
📜 २ जुन इ.स.१६८२
(ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, शके १६०४, दुदुंभी नाम संवत्सर, वार शुक्रवार)
छत्रपती संभाजी महाराजांचे किल्ले सज्जनगडाचे किल्लेदार, मुद्राधारी जिजोजी काटकर यांस पत्र !
संभाजी महाराजांनी किल्ले सज्जनगडाचे किल्लेदार मुद्राधारी जिजोजी काटकर यांना खासा पत्र लिहून समर्थांच्या महानिर्वाणानंतर चाफळच्या उत्सवास तसेच किल्ले सज्जनगडास कुठल्याही प्रकारची मदत न थांबवता सुरू रहावी या आशयाचे पत्र पाठविले. या पत्रावरून छत्रपती संभाजी महाराज किती धार्मिक प्रवृत्तीचे होते अन धार्मिक स्थानांना मदतीसाठी किती तत्पर होते हे यावरुन समजते. हे पत्र इतिहासात उपलब्ध आहे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇
📜 २ जून इ.स.१७४०
सातारा व कोल्हापूरकर छत्रपति या एका झाडाच्या दोन फांद्या. ह्या दोन गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता. त्यास चिमाजीअप्पांची संमति होती. कोल्हापूरकर संभाजी राजे शाहू
महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख २ जून १७४० ते ३० मार्च १७४१ पर्यंत साताऱ्यास राहिले. ह्या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजी राजांशी वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी ह्या बद्दल एक गुप्त करार संभाजी राजांशी केला. हा करार शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली. करार नानासाहेब व चिमाजी अप्पा ह्या उभयतांनी संभाजी राजे यास लिहून दिला. त्यातील मुख्य बाब अशी “सातारचे राज्य स्वामींचे आणि एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजी राजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे सेवक परंतु अंतर्यामी स्वामींचे, शाहू महाराज ह्यांनी कैलासवास केल्यावर दोन्ही राज्ये स्वामींची व आम्ही सेवक स्वामींचे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करू”. शाहू महाराज निवर्तल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली की हा करार मागे पडला आणि दोन्ही राज्यांचा समेट घडवून आणण्याचे काम तसेच राहून दोघांच्या भांडणामुळे राष्ट्राची हानी व्हावयाचे टळले नाही कारण शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपत्रात रामराजे यांस गादीवर बसवावे, संभाजी राजांना वारस करू नये असे स्पष्ट लिहिले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ जून इ.स.१७६०
पानिपतचा महासंग्राम
२ जून रोजी मराठे ग्वालीयरला पोहोचले. पुढे मराठे धवळपुरा, मथुरा असे अंतर पार करत, मराठे दिल्लीला पोहोचले. गारदयांच्या तोफांमूळे दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली. दिल्ली सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ जून इ.स.१७६१
पुरंदरच्या जानू भिंताडेंचा सत्कार
पार्वतीबाईच्या (सदाशिवभाऊंची दुसरी पत्नी) रक्षणासाठी होळकरांनी विसाजी जोगदेव याची नेमणूक केली होती. पण तो इमानाला जागला नाही. तेव्हा जानू भिंताडा याने घोड्यावर स्वत:मागे बांधून सुखरूप घेऊन आला. त्याकामी वीरसिंगराव बारावकर व पिराजी राऊत यांनी मदत केली. जानू भिंताडा याचं मूळ गाव भिवडी, तालुका पुरंदर. बाईस वाचवून आणल्याबद्दल २ जून १७६१ रोजी १००० रुपये रोख व एक गाव बक्षिस म्हणून लावून दिला.
https://youtu.be/lA55wcfZCxE
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २ जून इ.स.१८१८
दि. १६ मे १८१८ या दिवशी बाजीरावांनी (दुसरे) इंदूरजवळ महू या ठिकाणी आपला वकील माल्कमच्या छावणीत पाठवला आणि माल्कमला, 'आपण आजपर्यंत अनेकांचा सांभाळ करून त्यांस पदरात घेतले आहे. तर या संकटसमयी मलाही हात देऊन माझा निभाव करावा' अशा आशयाचे पत्र पाठवले. वास्तविक बाजीरावांचा (दुसरे) पाठलाग करून माल्कमही फार थकला होताच. परंतु, बाजीराव स्वतःहून तहाची मागणी करत आहेत हे पाहून माल्कमने आपली झाकली मूठ तशीच झाकून ठेवली आणि मागणी मात्र सव्वा लाखांची केली. त्याने बाजीरावांना 'संपूर्ण शरणागती'ची अट कळवली. बाजीरावांनी (दुसरे) प्रथम ते मानले नाही. परंतु, २ जून रोजी माल्कमने बाजीरावांना निर्वाणीचा निरोप पाठवला. अखेरीस बाजीरावांनी (दुसरे) माल्कमच्या सर्व अटी मान्य करण्याचे ठरवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 ३१ मे इ.स.१६६६
फौलादखानाने औरंगजेब बादशहाकडे अर्ज केला. आग्र्यास महाराजांच्या निवासस्थानाभोवती फौलादखानाच्या चौक्या बसलेल्या होत्या. या चौक्यांबद्दल महाराजांसोबतची मंडळी फौलादखानाजवळ विनंतीवजा तक्रार करू लागली. स्वतः महाराजही या कैदेबद्दल फौलादखानाजवळ नापसंती व्यक्त करू लागले. तेव्हा दि. ३१ मे इ.स.१६६६ फौलादखानाने औरंगजेब बादशहाकडे अर्ज केला की, शिवाजी राजांकडील लोक तक्रार करीत आहेत व शिवाजी राजाही याचना करून सांगत आहे की माझ्याकडून काही एवढी मोठी चूक झाली नाही की औरंगजेब बादशहांनी माझ्यावर एव्हढी अवकृपा करावी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/vdyQCsYf5pA
📜 ३१ मे इ.स.१६७४
एंद्रीशांतीचा मुहूर्त...
या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ मे इ.स.१६७६
बहादुरखानाने सोलापूर जवळ भिमा ओलांडली. औरंगजेब बादशहाने आज्ञा केली की, विजापूर बळकावून बसलेल्या अब्दुल करीम बहलोलखानास कैद करावे वा त्याचा वध करावा. औरंगजेब बादशहाने विजापुरवर चढाई करण्याचा आदेश बहादुरखानाला दिला. एव्हढेच नव्हे तर, बादशाही सैन्याचा बिनीवरील आधिकारी म्हणून दिलेरखानाची पुन्हा दक्षिणेत नेमणूक केली. तो यावेळी उत्तरेस होता. औरंगजेब बादशहाची आज्ञा होताच तो दक्षिनेत रवाना झाला. त्याने सोलापूर जवळ भिमा ओलांडली. विजापुरचे दक्षिणी पक्षाचे सरदार शेख मीनहाज व शेख महंमद जुनैदी हेही मोगलांना येऊन मिळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ मे इ.स.१७२५
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड नजीकच्या चौंडी या छोट्याशा गावी झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे अतिशय विद्वान आणि दूरचा विचार करणारे होते त्या काळात शिक्षणाच्या फारश्या सोयी उपलब्ध नसतानादेखील त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचनास शिकवले कुशल प्रशासक, प्रजानिष्ठ, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....💐💐
त्यांच्या कार्यास, विचारास विनम्र अभिवादन....
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३१ मे इ.स.१७६३
किल्ले मर्दनगडावरील मराठी सैन्याने पोर्तुगिजांपुढे शरणागती पत्करली. पेशव्यांच्या आरमाराचा दर्यासारंग आनंदराव धुळप यांनी माकावहून गोव्यास निघालेले एक पोर्तुगीज जहाज पाठलाग करून पकडले. ह्या आगळीकेबद्दल मराठ्यांना शासन करण्यासाठी व्हिसेरेई कौंट द एगा हा ७०० सैनिक घेऊन फोंड्यावर चालून गेला. सावंताचा कारभारी जिवाजी सबनीस याने मराठ्यांच्या रोषाची पर्वा न करता पोर्तुगिजांना ५०० सैनिकांची कुमक केली. किल्ले मर्दनगडावर मराठ्यांची फक्त ७०० सैनिकांची शिबंदी होती. मराठ्यांनी आक्रमकांचा कसून प्रतिकार केला. तब्बल १३ दिवस मराठ्यांनी किल्ला जोमाने लढविला. परंतु नंतर किल्ल्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने, दि. ३१ मे इ.स.१७६३ रोजी त्यांनी शरणागती पत्करली. पोर्तुगिजांनी किल्ला ताब्यात घेऊन मराठ्यांना त्यांच्या हत्यारासह जाऊ दिले. त्यांनी किल्ला खाली केल्यावर पोर्तुगिजांनी तोफा डागून तो जमिनदोस्त करून टाकला. किल्ले मर्दनगड गेल्याने अंतरुज महालही मराठ्यांच्या हातचा गेला. पोर्तुगिजांनी तो आपल्या राज्यास जोडला. परंतु तो नंतर त्यांनी सोंधेच्या राजास करार करून दिला. मात्र आपल्या सैन्याची एक शिबंदी सोंधेच्या राजाच्या खर्चाने फोंड्यास ठेवण्याची शर्थ घातली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 ३० मे इ.स.१६६४
(ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार सोमवार)
महाराज किल्ले सिंहगडावर!
ज्ञजसवंतसिंह किल्ले सिंहगडाचा वेढा उठवून निघून गेल्याचे कळताच तिसऱ्याच दिवशी खासे महाराज किल्ले सिंहगडावर आले. आपल्या शुर मावळ्यांची त्यांनी पाठ थोपटली आणि मोगली संकटाचे सावट दूर झाल्याचा आनंद लगेच अहमदनगर वर धाड घालून साजरा केला. मराठी फौजांची सर्वत्र विलक्षण दहशत बसली होती. महाराजांचे विजयी अश्व रोखायला आता कुणीच धजत नव्हता. महाराजांची स्वारी दौलताबादकडे झुकणार अशाही वार्ता याच सुमारास सर्वत्र पसरलेल्या होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/QIPgAYXrbkc
📜 ३० मे इ.स.१६६५
किल्ले पुरंदरावर मोगली सैन्याने सफेद बुरूजाच्या उंचीएवढा लाकडी फळ्यांचा दमदमा उभा केला. किल्ले पुरंदर मोगलांच्या हाती येण्याचे कुठलेच चिन्ह दिसेना. मराठे सफेद बुरूजाच्यावरून प्रभावी उत्तर देत होते. हा बुरुज नष्ट केल्याविना पाऊल पुढे पडणे अशक्य आहे हे दिलेरखानाच्या लक्षात आले. त्याची मती गुंग झाली. मिर्झाराजे जयसिंगही विचारात पडले. अखेर सफेद बुरूज उध्वस्त करण्यासाठी एक युक्ती त्यांना सापडली. या बुरुजाच्याच उंचीचा लाकडे व फळ्यांचा एक दमदमा उभारून त्यावरून सफेद बुरुजावर तोफा डागायच्या! लगेच असा दमदमा उभारण्यासाठी हुकुम सुटला. हा दमदमा उभारला जाऊ नये म्हणून मराठे सफेद बुरुजावरून जबरदस्त मारा करीत होते. पण मोगलांनी चिवटपणे व नुकसानीची पर्वा न करता अखेर दि. ३० मे इ.स.१६६५ रोजीच्या सायंकाळी सफेद बुरूजाच्या उंचीएवढा लाकडी फळ्यांचा दमदमा उभा केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० मे इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार शनिवार)
शिवराज्ञी सोयराबाईसाहेब यांच्याशी समंत्रक विवाह लावण्यात आला.
गागाभट्टांच्या मार्गदर्शनानूसार समंत्रक मुंज झाल्यानंतर महाराजांचे सोयराबाईसाहेब यांच्याशी विधीवत पुन्हा लग्न लावण्यात आले. आणि सोयराबाईसाहेब यांना ज्येष्ठ राणीसाहेब हा किताब मिळाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० मे इ. स.१६८८
छत्रपती संभाजी महाराजांचा संकराजी जुंझारराऊ देशमुख कानदखोरे यांस कौलनामा!
ज्येष्ठ शुद्ध. ११ मोगलांकडून परत स्वराज्यात आलेल्या लोकांना अभय देऊन त्यांना परत आपली शेतीवाडी करावी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आज्ञा दिल्या. उदा.- संकराजी जुंझारराऊ देशमुख-कानदखोरे यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कौलनामा दिला. हा कौलनामा इतिहासात उपलब्ध आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० मे इ.स.१८०८
बापु गोखलेंनी वासोटा ताब्यात घेतला...
"बापू विरुद्ध प्रतीनिधी व ताई तेलीण...
प्रतिनिधी पद :- मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रतिनिधी हे पद नाही. १६८९ ते १७०० या दरम्यान छत्रपती राजाराम जिंजीस आश्रयास गेलेला असताना हे पद निर्माण करण्यात आले. राजारामच्या अनुपस्थितीत प्रतिनिधीच्या आज्ञेत सर्वांनी राहावे व राज्य कारभार चालवावा असा संकेत ठरला. त्यामुळे प्रतिनिधी हा पेशवे व इतर मंत्र्यांच्या ही वरच्या हुद्द्याचा होता. रावबाजीचा संबंध प्रतिनिधीशी आला त्याचे नाव परशुराम पंत. हा अत्यंत हूड प्रवृत्तीचा असल्याने नाना फडणीसाने त्याला पुण्यास आपल्या नजरेखाली ठेवले होते. १७९५ मध्ये हा परशुराम १८ वर्षाचा झाला व स्वतः काभार पाहू लागला. त्यानेच नेमलेला कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतः ची आई यांच्या सल्ल्याने कारभार चालू झाला. पण पुढे परशुरामाचे त्यांच्याशी पटेना. कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतःची आई रावबाजीकडे परशुरामाच्या तक्रारी करत असत. तेव्हा रावबाजीने शिंद्यांच्या मदतीने त्याच्या वाड्याला वेढा घातला व कारभारी बळवंतराव आणि आई यांच्या आज्ञेतच राहीन असे परशुरामाकडून वचन घेऊनच उठवला. मात्र आपले वचन पाळले नाही व पुन्हा आपले रंग तो दाखू लागला (१८०३). त्याला वठणीवर आणण्यासाठी पेशव्याने बापूस पाठवले. बापूचे प्रत्यक्षात प्रतिनिधीशी काही वैयक्तिक वैर नव्हते. बहुदा नाईलाजास्तव ही कामगिरी स्वीकारली. १८०४ ते १८०८ अशी प्रलंबित हि कारवाई होती. १८०७ मध्ये ताई तेलीण हिने स्वतःची फौज जमवली व प्रतिनिधीच्या जहागिरीचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उपसले. वासोटा हा दुर्गम दुर्ग तिने आपली लष्करी राजधानी केली. शिवाय आजूबाजूच्या ३०-४० मैलाचा प्रदेश हि ताब्यात घेतला. बापूने तिच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि वासोटा सोडून बहुतेक सर्व प्रदेश मुक्त केला.
मार्च १८०८ पासून बापूने वासोट्या वर कारवाई तीव्र केली. ताई तेलीणीने कडवा प्रतिकार करीत किल्ला लढवला. अखेर उपासमारीने हतबल होऊन ३० मे १८०८ रोजी तिने शरणागती पत्करली आणि वासोटा बापूच्या ताब्यात आला.
https://youtu.be/QIPgAYXrbkc
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २९ मे इ.स.१६६६....
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे कैदेत असताना, मोगल सरदार रामसिंग यांची महाराजांवर देखरेख होती रामसिंगाचा कारभारी परकालदास यांनी इ.स २९ मे १६६६ ला डिंगल भाषेत लिहले आहे...,
अर सेवोजी डील तो हकीर छेटोसो ही देखता दीस जी।
अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपूछो राजवी दिसौजी।
हिम्मती मरदानगी ने देखतां असौ दिसौजी बहुत मरदानो
हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी दाढी छै ।।
शिवाजी महाराज मध्यम उंचीचे आहेत त्यांच्या वर्ण आश्चर्यकारक गोरा आहे हिंमत व वीरवृत्तीने युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी आहे...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/bhJ8rPEB2gg
📜 २९ मे इ.स.१६७१
पानोली येथे व्हिसेरेई आणि हिंदुस्थानचे कॅप्टन जनरल कौंट द लाउरादीव यांनी राज्य सल्लागार मंडळाची बैठक पाचारण केली. त्यांनी राज्य सचिव डॉ. आंद्रे फ्रेअरी द आताईद यांना बैठकीसमोर ठरावाचे वाचन खड्या आवाज करण्यास सांगितलेल्या सूचनेनुसार त्यांनी ठरावाचे वाचन करण्यास प्रारंभ केला: "दांड्याच्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा घालून पुष्कळ दिवस झाले आहेत. आमच्या चौल येथील किल्ल्याचे कॅप्टन नुनू द मेलू द सिल्व यांनी वारंवार पत्रे पाठवून दांड्याच्या वेढ्याचा वृत्तांत आम्हाला कळविला आहे. आम्ही त्यांना मागे सुचना केली होती की, सिद्दीस शक्य ती मदत करावी. त्या सूचनेनुसार ते सिद्दीला मदत करीत आहेत. या मदतीमागील आपला उद्देश उघड आहे. दांड्याचा किल्ला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज वरचढ झालेले आम्हाला नको आहे. या वेढ्यापायी सिद्दी इतका डबघाईस आला आहे की, सैन्याचा पगार घालण्यास त्याच्यापाशी पैसा नाही. या अडचणीतून निभावणी व्हावी म्हणून त्यानी आमच्यापाशी मदतीची याचना केली. आम्ही त्याला मदत केली तर त्याच्या बदली तो आमचे मांडलिकत्व पत्करण्यास तयार आहे". राज्य सल्लागार मंडळाने सिद्दीस मदत पाठविण्याचा निर्णय एकमताने घेतला. महाराजांचा व पोर्तुगिजांचा मैत्रीचा आणि शांततेचा करार झाला परंतु पोर्तुगिजांकडून त्या कराराचे कटाक्षाने पालन होत नव्हते. त्यांच्या हितसंबंधांच्या आड तो करार येत असल्यास त्याचा भंग करावयास ते मागे पुढे पहात नसत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१६७४
(श्रीनृपशालिवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध ४, चतुर्थी, वार शुक्रवार)
महाराजांची समंत्रक मुंज!
"राजश्रींची मुंज झाली". उपनयन संस्कारामुळे महाराज आता "द्विज" झाले होते. "उत्तरेस क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे व्रतबंध करावा हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राजियाचा क्षेत्री व्रतबंध केला. शुद्ध क्षत्रिय आधी केला. मौजीबंधनानंतर त्याच दिवशी दुपारी म्हणजेच (यावेळी पंचमी सुरू झालेली होती.) तुलादान व तुलापुरुषदान विधी करून महाराजांनी उशीरा मुंज झाल्याबद्दल व आजवर कळत-नकळत घडलेल्या हत्यांबद्दल प्रायश्चित्त घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१६८०
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शनिवार)
पोर्तुगीज आधिकारी व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद !
तो म्हणतो की, "आपले पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता कळली. आम्हास फार दुःख झाले. मृत्यू कोणालाच चुकत नाही. दैवी इच्छेसमोर कुणाचीच मात्रा चालत नाही". आपणासारखा शांततेने राज्य करणारा राजा प्रजेस लाभला याबद्दल आपली प्रजा आभिनंदनास पात्र आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१६८७
(ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार रविवार)
शेखनिजाम हैद्राबादी उर्फ मुकर्रबखान (तकरीबखान) कुतुबशाहीतून फितूर !
कुतुबशाहीवर जेव्हा औरंगजेब बादशहाचे आक्रमण झाले, त्यावेळी खरे तर याने औरंगजेब बादशहा विरुद्ध पराक्रमाची शर्थ केली. जेव्हा एखादा शूर सरदार युद्धात पराजित होत नसतो. तेव्हा त्याला बुद्धिबळाच्या पटावर पराजित करण्यात औरंगजेब बादशहा माहीर होता! साम-दाम-दंड-भेद वापरून शेख निजाम यांस औरंगजेब बादशहाने प्रलोभने दाखवून अखेर फितूर केलेच.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ मे इ.स.१७३७
मनोरवर विजय...
तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...
https://youtu.be/bhJ8rPEB2gg
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २८ मे इ.स.१६७४
हेन्री ऑक्झेंडनने निराजीपंतांचा नजराणे देण्याबद्दल सल्ला घेतला. "मोरोपंतांकडे स्वतः जावे व इतरांकडे नारायण शेणवी मार्फत नजराणे पोहोचवावेत". "मोरोपंतांना २ पामऱ्या योग्य नसून ४ पाम दिल्या पाहिजेत. दत्ताजीपंत वाकेनिवीस (Public Intelligence) यांस १२५ रुपये, एक अंगठी, डबीर किंवा फारसी लेखकाला ४ पामऱ्या, शामजी नाईक मुद्राधिकारी (Samgee Naikee Keeper of the Seal) यांस व आबाजी पंडित यांस प्रत्येकी ४ पामऱ्या दिल्या म्हणजे काम त्वरेने होईल. प्रल्हाद निराजीपंत यांना बरोबर घेऊन मी मोरोपंतांस नजराणा दिला". हेन्री ऑक्झेंडनने आपल्या रोजनिशीत असे वर्णन करून ठेवले आहे.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/R6EUUuRvVGI?feature=share
📜 २८ मे इ.स.१६७७
महाराजांबद्दल पोर्तुगिजांच्या वसई प्रांताच्या कॅप्टन जनरल मानुएल लोबू द सिल्हैरा याने पाठविलेले बोलके पत्र!
"दमनचे कॅप्टन मानुएल फुर्ताद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संदर्भ लावून कोळी राजास शासन करण्याची त्याला विनंती केली. त्या विनंतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आमची जी बोलणी झाली त्यास अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजाच्या राज्यात इ.स.१६७२ रोजीच्या एप्रिल अथवा मे महिन्यात सैन्य घुसविले". "छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथवर दावा आहे. परंतु ते आमचे शेजारी असून देखील आमच्या प्रदेशात त्यांनी चोऱ्यामाऱ्या किंवा आक्रमणाचे प्रकार केलेले नाहीत. इतकेच नव्हे तर चौतियाच्या राजाप्रमाणे त्यांनी खिंडी आणि रस्ते रोखून चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे त्यांना चौथचा कर देण्यास हरकत नसावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजा आणि चौतिया राजा या दोघांनाही गप्प बसविले आहे, इतकेच नव्हे तर बलसाड पोवेतो मोगल प्रदेशात पाचर मारली आहे. ते श्रीमंत आणि बलाढ्य आहेत. त्यामुळे त्यांना चौथचा कर देण्यास हरकत नसावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी राजा आणि चौतिया राजा या दोघांनाही गप्प बसविले आहे, इतकेच नव्हे तर बलसाड पोवेतो मोगल प्रदेशात पाचर मारली आहे. ते श्रीमंत आणि बलाढ्य आहेत. त्यांच्या सामर्थ्याच्या मानाने आमचे सामर्थ्य मर्यादित आहे. आमचा आधिकार शहर आणि किल्ला या पलीकडे जात नसल्याने आम्हाला सगळीकडे धावाधाव करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडचा सर्व प्रदेश घेतला तर आश्चर्य करण्याचे कारण नाही. * ते ज्याअर्थी आमची कोणतीच नुकसानी करीत नाहीत त्याअर्थी त्यांना चौथचा कर देण्यास हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडे जीवनोपयोगी वस्तूंची मागणी करीत आहे. ते या शहराचा आणि किल्ल्याचा प्रामाणिक मीत्र असल्याने त्यांना थोडे धान्य पुरविण्यास हरकत नसावी. नाही तरी मागच्या काळात आपण खंबायत, सुरत वगैरे बंदरांना जीवनोपयोगी वस्तू विकत होतोच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी भाताची जी मागणी केली आहे ती आमची परीक्षा पहाण्यासाठी की काय न कळे". महाराजांना पोर्तुगीज कसे वचकून होते, ते, व त्यांच्याशी संघर्षाचे प्रसंग उदभवले असता ते कसे टाळीत होते, या घटनांवरून सिद्ध होते.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ. स. १६८०
छत्रपतीसंभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांस दुसरे पत्र लिहिल्याची नोंद ! यापूर्वी वैशाख वद्य ४, चतुर्थी, शके १६०२, म्हणजेच ७ मे इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांस पहिले पत्र लिहिले होते. त्या पत्रावर छत्रपती संभाजी महाराजांची षोडशावली मुद्रा दिसून येते.
● श्री शंभो: शिव। जातस्य मुद्राद्यौ। रिव राजते यदं। कसे विनो लेखा। वर्तते कस्यनो। परि।
छत्रपती संभाजी महाराजांच्या काही सनदांवरून कळून येते.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१६८६
छत्रपती संभाजी महाराजांचे बाजी जेधे (सर्जेराव) यांस पुन्हा स्वराज्यात येण्याचे आवाहन!
इ. स. १६८३ पासून महाराष्ट्रात फितुरीचे पेव फुटलेले दिसतात. कान्होजीराव जेधे महाराजांच्या प्रतापगड रणसंग्रामाच्या वेळी त्यांच्या पाठीशी प्रति सह्याद्री म्हणून उभे राहिले. आपल्या बरोबर अनेक देशमुखांना त्यांनी वळविले. आदिलशाही फर्मान लाथेने तुडविले आणि महाराजांजवळ येऊन ते महाराजांस बोलिले (महाराजांनी) राजे शहाजीराजे यांनी आपली क्रिया घेऊन तुमच्या हाती दिली. तेच क्रिया व इमान आपला शाबूत आहे. वतन साहेबांच्या पायावरी ठेविले. आपण व आपले ६ लेक व आपला जमाव देखील साहेबांपुढे खस्त होऊ. जे होणे ते होईल. आम्ही इमानास अंतर करणार नाही". कान्होजीराव नाइकांना बाजी, संभाजी, शिवजी, चांदजी, नाईकजी, सयाजी असे एकूण ६, पुत्र होते. यांतील मोठा मुलगा बाजी याने फतेहखानाच्या लढाईत आपल्या जिवाची पर्वा न करता झेंडा परत आणण्याची कामगिरी केली होती. म्हणून त्याबद्दल महाराजांनी या बहाद्दरास "सर्जेराव" हा किताब दिला होता. तो महाराजांपेक्षा सव्वा वर्षाने मोठा होता. कारीचे बाजी जेधे (सर्जेराव) व शिवजी जेधे हे दोन्ही बंधू मोगलांस फितूर झाल्यानंतर, छत्रपती संभाजी महाराजांनी पत्रे लिहून त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि आपण असे करू नये म्हणून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना अभयपत्र लिहील्याची तारीख होती. ५ ऑक्टोबर इ.स.१६८५ या पत्रावरून लक्षात येते की, सर्जेराव जेधे यांस परत स्वराज्यात येण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज करीत होते.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१७०१
शहाजादा मुइजुद्दीने इ.स.१६९२ ला पन्हाळा गडाला वेढा घातला होता पण तो ८ मार्च १६९४ रोजी वेढा सोडून निघाला होता. हे समजल्याबरोबर बादशहाने शहाजादा आजमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेब बादशहाने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यांस ३१ ऑक्टोबर १६९९त पत्र लिहिले, “किल्ला हवाली केल्यास आमच्याकडून मोठी मनसब मिळेल न ऐकिल्यास तुम्हास व तुमच्या कुटुंबांतील लहानथोर बायकामुलांस पकडून ठार मारण्यात येईल.” ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक यांनी भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला. ता. २१ जानेवारी १७०१ रोजी धनाजी जाधवांची व समस्त मोगल फौजेची पन्हाळ्याचे जवळ मोठी लढाई झाली. तशाच आणखी लढाया वारंवार चालूच होत्या. शेवटी २८ मे १७०१ रोजी बादशहाने तर्बियत खानातर्फे किल्लेदारास द्रव्य ५५ हजार रुपये देऊन किल्ला आपलासा केला. याच बरोबर पावनगड पण मोगलांच्या घश्यात गेला. पन्हाळ्यास बादशहाने नबीशाहदुर्ग व पावनगडास बानीशाह दुर्ग अशी नावे दिली. पन्हाळगड पुढे सन १७०५ साली मराठ्यांकडे आला. त्यानंतर महाराणी ताराबाई व शिवाजी राजे यांचे वास्तव्य तिथे झाले.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ मे इ.स.१८८३
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती
भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ मे इ.स.१९४८...
ग्वालियर मधील शिंदेशाहीची ह्यांचं नाणं Coin Of Maharaja JivajiRao Shinde...
मराठ्यांचे सिंधिया राजवंश महाराजा जिवाजीराव शिंदिया (२६ जून १९१६-१६ जुलै १९६१) हे मध्य भारतातील ग्वाल्हेर राज्याचे महाराजे जिवाजीरावांनी जवळच्या रियासतांच्या शासकांसोबत एक करार केला ज्यावर त्यांचे अनेक राज्य एकत्र झाले व ते मध्य भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत संघात एक नवीन राज्य बनले हा नवीन करार केलेला राज्य राजप्रामुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकांच्या नेतृत्वाखालील परिषदेद्वारे शासित होता मध्य भारताने १५ जून १९४८ ला प्रभावीपणे भारत सरकारशी एक तात्पुरती वाहिनीवर स्वाक्षरी केली आणि जिवाजीराव सिंधिया २८ मे १९४८ रोजी राज्यप्रमुख म्हणून आणि राज्यपाल म्हणून नियुक्त झाले....
शिंदेशाही सरकार जयते....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २७ मे इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी पत्राद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदीलशहाशी बोलणी करूण त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/Bgbtjfsacw4?feature=share
📜 २७ मे इ.स.१६७४
हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेले पत्र
राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ मे इ.स.१६७६
(ज्येष्ठ वद्य दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार शनिवार)
मोरोपंत पेशवे यांची मोगली साम्राज्याला धडक !
मोरोपंत पेशवे यांनी रामनगरच्या राजाला त्याच्या साम्राज्यातून पूर्णपणे हाकलून लावत, मोगलांची पिडौल व पैनेका ही तत्कालीन ठाणी घेतली. या ठाण्यांपासून सुरत अवघ्या ३, तीन दिवसांच्या अंतरावर असल्याने सुरतेत पुन्हा एकदा महाराजांचे सैन्य धडक मारणार अशी अफवा पसरली. व सुरतेत पुन्हा एकदा गोंधळ माजला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ मे इ.स.१७३९
तारापुरचा रणसंग्राम
मराठ्यांनी तारापुर किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी जिंकला. पाठोपाठ सर्व वसई प्रांत आणि साष्टि प्रांत मराठ्यांचे ताब्यात आला. दि. २७ मे १७३९ रोजी तारापूर किल्ल्याची हवालदारी मोरो नारोसिंह यांस तर फडनिशी महादजी दत्ताजी यांस सोपवण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ मे इ.स.१८१८
परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेविषयी तह
दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यूनंतर (२२ मार्च १८१६) त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला. कार्यकारी शासक (रिजंट) कोण असावा म्हणून बाकाबाईसाहेब व दुसऱ्या रघुजीराजांचा पुतण्या आप्पासाहेब यांच्यात स्पर्धा सुरू झाली. बाकाबाईसाहेब या दुसऱ्या रघुजीराज्यांच्या तिसऱ्या पत्नी होय. परसोजी यांना १४ एप्रिल १८१८ रोजी समारंभपूर्वक सिहासनावर बसवण्यात आले. परंतु, २७ मे १८१८ रोजी परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला आणि नागपूर राज्याचे स्वतंत्र गमावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२७ मे इ.स.१८२५
'डॉ. बरनाडी पेरेस डिसोल्वा' या गोमंतकाला पोर्तुगीजांनी "गव्हर्नर" बनवले, ह्यानेच "तेरेखोलच्या किल्ल्यातुन" पोर्तुगीज सत्तेविरुध्द उठाव केला पण हा उठाव जास्त टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड "हत्याकांड" करुन पोर्तुगीजांनी हा उठाव हानून पाडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २६ मे इ.स.१६६५
( जेष्ठ वद्य सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार )
महाराजांची मिरझाला वेगळी गळ :-
मिरझाला महाराजांनी आत्मचिंतन करायला भाग पाडणारे ऐतिहासिक पत्र पाठवले व त्याच वेळी विजापुरकरांशी संधान बांधण्याचे प्रयत्न सुरू केले. जर आदिल शाही, निजाम शाही व मराठे एकत्र आले तर मोगली सत्ता उलथवून टाकण्याचा मनसुबा होता. मात्र पुढे विजापूरकरांनी काहीच प्रतिसाद दिला नाही व कालांतराने मोगलांनी आदिलशाही व निजामशाही नेस्तनाबूत केली.
मराठी राज्य मात्र या धामधुमीत सन्मानाने टिकून होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/638IPqQ_Lsg
📜 २६ मे इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, शके १५९६, संवत्सर आनंद, वार मंगळवार)
महाराजांनी हेन्री ऑक्झेंडनला भेट दिली!
हेन्री ऑक्झेंडनने आणलेला नजराणा महाराजांना व युवराज शंभुराजेंना दिला. नजराण्यात एक खुर्चीही ऐनवेळी हेन्री ऑक्झेंडनने महाराजांना दिली. महाराजांनी नजराण्याचा आनंदाने स्वीकार केला व इंग्रजांनी खुशाल बिनधोक व्यापार करावा असे सांगितले. आपण त्या द्रुष्टीनेच तह करण्यासाठी आलो असे सांगून हेन्री ऑक्झेंडनने इतर देशात मिळतात तशा सर्व सवलती आपल्याही देशात आम्हाला मिळाव्यात अशी महाराजांना विनंती केली. त्यावेळी या संदर्भात हेन्री ऑक्झेंडनने मोरोपंत पेशव्यांशी बोलणी करावी असे महाराजांनी सांगितले व युवराज शंभुराजेंसह ते उठून महालात परत गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१७२७
टिपू सुलतान हा रॉकेटचा शोध लावणारा भारतातला पहिला माणूस होता वगैरे हास्यास्पद थापा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. वास्तवामध्ये टिपूच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून हिंदुस्थानात दारूचे बाण ( रॉकेट्स ) वापरात होती. याचं एक ठळक उदाहरणे म्हणजे १६५८ साली औरंगजेब आणि दारा-शुकोह यांच्यामध्ये झालेल्या युद्धात अशा दारूच्या बाणांचा वापर झाला होता. मराठेशाहीत देखील दारूच्या बाणांचा वापर होत असे आणि यातली काही उदाहरणे टिपूच्या जन्माच्या आधीची आहेत.
सातारच्या शाहू छत्रपतींच्या २६ मे १७२७ च्या पत्राचे. या पत्राद्वारे शाहू छत्रपतींनी नागपूरकर भोसल्यांकडून काही शस्त्र सामग्री मागवली होती, त्यात दारूच्या बाणांचा उल्लेख आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१७३३
पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले. पत्रात ते म्हणतात,"-
सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजनवेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे.
सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१७५४
मराठे आणि जाट यांच्यात तह झाला. "माधवराव पेशवे यांनी गृहकलह मिटवून विरोधक संपुष्टात आणले होते. पुण्यात राज्य कारभाराची घडी नीट बसवून आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला होता. पानिपतचा पराभव मात्र त्यांना डाचत होता. तो कलंक धुवून काढण्यासाठी त्यांनी परत एकदा उत्तरेकडे लक्ष वळविले. त्यांनी एक मोठी मराठी फौज उत्तरेत पाठविली. मराठे व जाट यांच्यात जो तह झाला.
https://youtu.be/638IPqQ_Lsg
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मे इ.स.१८१७
ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे दुसरे बाजीराव ह्यांच्याकडून त्रिंबकजीच्या निषेधाचा जाहीरनामा काढून घेतला. कंपनीने रायगड, सिंहगड, आणि पुरंदरचा ताबापण घेतला. (हा नावापुरताच ताबा ठरला कारण पुढे पुन्हा इंग्रजांना हे किल्ले जिंकून घ्यावे लागले!)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩🚩 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २५ मे इ.स.१६४२
महाराजांनी रोहिडेश्वराला एक गाव इनाम व जुना पुजारी बदलून सिवा जंगम नावाचा दुसरा पुजारी ठेवला. बंगळूरहून येताच महाराजांच्या नावे पहिली हालचाल किल्ले रोहिड्याच्या भागात झालेली दिसते. एका पत्रानुसार रोहिडेश्वराला एक गाव महाराजांनी इनाम दिल्याचे व जुना पुजारी बदलून सिवा जंगम नावाचा दुसरा पुजारी ठेवल्याचे कळते. याच कारणामुळे रोहीडेखोऱ्याच्या दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना आदिलशहाने जाब देण्यासाठी त्वरीत बोलाविलेले दिसते. दादाजी यांनी बहुधा जाण्याचे टाळले असावे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 २५ मे इ.स.१६६२
(ज्येष्ठ वद्य द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार रविवार)
पुणे येथे सुप्या जवळ सरनौबत नेतोजी पालकर यांची नामदारखान, सर्फराजखान यांच्याशी चकमक!
सुपे येथे सरनौबत नेतोजी पालकर यांची सर्फराजखान आणि नामदारखान यांच्याशी चकमक उडाली. मराठी फौज काय असते याचा प्रत्यय नामदारखानाला चांगलाच आला. या लढाईत शेवटी सरनौबत नेतोजी पालकर यांना पराभव पत्करावा लागला. मोगलांना थोडी फार लुटही मिळाली. या लुटीची यादी उपलब्ध असून तीत एकूण ६५ वस्तू नोंदविलेल्या आहेत. त्यात १५३ बैल, ८ घोड्या व शिंगरे, ३४ तोळे, ३ मासे रुपे व ७ मासे सोने नमूद केलेले आहे. मोगलांनी आभिमानपुर्वक ही लुट औरंगजेब बादशहाकडे पाठवून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ मे इ.स.१६६५
माची पुरंदराची वज्रगडाकडील तटबंदी थोडी ढासळून दोन भगदाडे पडली. व एक बुरूज उध्वस्त झाला. दि. १४ एप्रिल इ.स.१६६५ किल्ले वज्रगडाचा पाडाव झाला. दिलेरखानाने आपला मोर्चा किल्ले पुरंदराकडे वळविला. दिलेरखान व मिर्झाराजे जयसिंग किल्ले पुरंदर लवकरात लवकर ताब्यात यावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. पण किल्ले पुरंदर अजूनही दाद देत नव्हता. वज्रगडावरून पुरंदरची माची माऱ्यात सापडत होती. त्यामुळे पुरंदरच्या माचीवर मोगली तोफांचा मारा सुरू झाला. माचीला मजबूत तटबंदी होती. तसेच सफेद बुरूज, काळा बुरूज आणखी चार ते पाच बलदंड बुरूज या भागाकडून मोगली मारा सहन करीत उभे होते. विशेषतः सफेद बुरूज व काळा बुरूज उध्वस्त केल्याविना माची पुरंदरावर प्रवेश मिळणे कठीण होते. परंतु २०, वीस दिवस उलटून गेले तरी एक बुरूज व थोडीशी तटबंदी किंचीत ढासळण्यापलीकडे फारशी प्रगती झाली नाही. मराठ्यांचा जोरदार प्रतिकार मोगलांना एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हता. दिलेरखान जीवाचा आटापिटा करीत होता. त्याच्या तोफा प्रचंड आग ओकित होत्या. परंतु मराठ्यांनी रुद्रावतार धारण केला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ मे इ.स.१६६६
(ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, ४, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)
महाराज नजर कैदेत!
राजश्रीस चौक्या बसविल्या. औरंगजेब बादशहाच्या आज्ञेनूसार सिद्दी फौलादखान १०००, सैनिकांसह महाराजांच्या डेऱ्याजवळ आला. महाराजांचे निवासस्थान चहूबाजूंनी पक्के वेढले गेले. ठिकठिकाणी चौक्या बसविल्या. महाराज, शंभुराजे व मुत्सद्दी आता सुन्न झाले. सिंहासन प्राप्तीसाठी ज्या औरंगजेब बादशहाने प्रत्यक्ष बाप व अन्य भाऊबंदांचे दयामाया न दाखविता एकून ३६, बळी घेतले होते तो आता महाराजांना जीवंत सोडणे असंभवनीय होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ मे इ.स.१६८०
कोकणचे सरसुभेदार रायाजी पंडीत यांस व्हिसेरेईने लिहीलेल्या पत्राची नोंद !
"आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीस जात असल्याचे कळले. त्यांचे दुत रामजी नाईक ठाकूर यांच्याशी माझी जी मुलाखत झाली तिच्या पासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयीची व आपणाविषयीची माहिती मला कळली". "रामजी नाईक ठाकूर यांनी माझ्या समोर जी तहाची कलमे मांडिली त्यांची उत्तरे मी त्यांच्या कडे पाठविली आहेत. त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांनी काय तो निर्णय घ्यायचा आहे त्यांनी माझ्या उत्तरांना संमती दिली की तहाच्या करारावर मी माझे स्वामी पोर्तुगालचे राजे यांच्या वतीने सही करेन"!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ मे इ.स.१७३३
प्रतिनिधींनी रायगडाला वेढा घातला
सिद्धी रसूल १७३३ फेब्रुवारीत मरण पावला, त्याच्या अब्दुल्ला नामक वडील मुलाचा खून झाला. अब्दुल्लाच मुलगा म्हणजे सिद्धीचा नातू अब्दुर्ररहमान घाबरून मराठ्यांच्या आश्रयास आला. सिद्धीवर हल्ला करण्यास ह्या वेळेसारखी दुसरी वेळ पुन्हा येणार नाही हे चाणाक्ष शाहू महाराजांनी ओळखले. लष्करी मोहिमांचा हंगाम संपला होता तरी पण भर उन्हाळ्यात शाहू महाराजांनी दोनफौजा सिद्धीवर रवाना केल्या-एक बाजीराव पेशव्याच्या हाताखाली जंजीरयावर व दुसरी श्रीपतराव प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली रायगडावर पाठवली. मध्यंतरीच्या काळात पेशव्याने रायगडच्या किल्लेदाराला लाच देऊन किल्ला हस्तगत करण्याचा प्रयत्न करून पहिला, पण बातमी फुटून पाठवलेला पैसा लुटला गेला. साताऱ्याहून पुन्हा पैसे मागवण्यापुर्वीच २५ मे ला श्रीपतराव प्रतिनिधी आपली फौज घेऊन रायगडी दाखल झाला व ८ जूनला त्याने रायगड पुन्हा स्वराज्यात आणला.
रायगड मोहिमेवरून बाजीराव व श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यात वादविवाद होऊन काही काळ त्यांचे संबंध बिघडले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 २४ मे इ.स.१६४९
#विर_"#बाजी_पासलकर" #स्मृतीदिन
छत्रपती शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे रणझुंझार बाजीकाका पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार. निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखानाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले. मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/OZEhfIp15FM?feature=share
📜 २४ मे इ.स.१६७३
( जेष्ठ वद्य चतुर्थी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, शनिवार )
इंग्रज वकील थॉमस निकल्स आणि शंभुराजांची भेट :-
सरनौबत प्रतापराव गुजर काकांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटल्यामुळे ते विलक्षण खवळले. त्यामुळे राजापूर आणि हुबळीच्या त्रुटीबाबत भरपाईची मागणी करण्यासाठी थॉमस निकल्स आला होता.
पण शिवराय गडावर नसल्याने भेटीची परवानगी नाकारली मात्र शंभुराजांना भेटण्याची परवानगी मिळाली.
आजच्या दिवशी निकल्स रायगडावर आला असता रायगडाचे आणि शिवरायांचे जे वर्णन त्याने करून ठेवले आहे ते अतिशय सुंदर असून तो एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.
तो म्हणतो, "२३ मे रोजी सकाळी आम्ही त्या उंच टेकडीवर गेलो. वाटेत दगडातच पायऱ्या खोदलेल्या आहेत. दरवाजावरील पायऱ्या देखील पक्क्या दगडात खोदलेल्या असून, जेथे टेकडीला नैसर्गिक अभेद्यता नाही तेथे २४ फूट उंचीचा तट बांधलेला आहे. ४० फुटांवर लगेचच दुसरी भिंत बांधून हा किल्ला खूप अभेद्य बनवला आहे. अन्नाचा पुरवठा झाल्यास अल्प शिबंदीसह हा किल्ला सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. पाण्याकरता मोठे तलाव असून पावसाळ्यात ते भरल्यावर पाणी पुरून उरेल. टेकडीच्या माथ्यावर मोठे सुंदर शहर वसलेले असून घरे सामान्य प्रतीची आहेत. अत्युच्च जागी शिवरायांचा चौसोपी वाडा असून त्याच्या मध्यभागी मोठी इमारत असून त्यात बसून ते कारभार पाहतात."
पुढे निकल्स म्हणतो की, "माझे म्हणणे पूर्ण ऐकूण घेऊन सध्या महाराज गडावर नसल्याने आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत खात्रीने पोचवीन असे आश्वासन शंभुराजांनी मला दिले".
या आशयाचे वर्णन त्याने आपल्या रोजनिशीत करून ठेवले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ मे इ.स.१६८५
(ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, शके १६०७, क्रोधन संवत्सर, वार रविवार)
औरंगजेब बादशहा अहमदनगरहून सोलापूरला पोहोचला.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्या दरम्यानच्या काळात आदिलशाही व कुतुबशाही तरी आपण गिळंकृत करू शकू म्हणजे किमान सांगायला होईल की, दोन्ही शाह्या औरंगजेब बादशहाने संपवल्या. हातात काही नसण्यापेक्षा हे निश्चितच बरे होते. कारण मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा कुठपर्यंत चालेल हे आता दस्तुरखुद्द औरंगजेब बादशहालाच उमजत नव्हते! छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाचे मराठी साम्राज्य गिळंकृत करण्याचे मनसुबे लावले होते. दस्तुरखुद्द औरंगजेब बादशहा अहमदनगरहून कूच करून सोलापुरात दाखल झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ मे इ.स.१७०२
२४ मे इ.स.१७०२ च्या एका पत्रानुसार बाळाजीपंत हे सरसेनापती धनाजी जाधवरावांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख येतो. अस्सल मोडीतले देवनागरीत रूपांतर पुढीलप्रमाणे अज स्वारी राजेश्री बालाजी विश्वनाथ दिम्मत राजेश्री सेनापती ताा मोकादमानी कसबा सासवड प्राा पुणे सुरू सलास मया अलफ कसबे मजकूर पैकी घासदाणा स्वार दिले स्वारी मजकूर देणे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀










![🗿शिवकालीन पुराणवस्तू - SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] THE GreAT Van :lU:W:l inr ಕ = शिवदिनविशेष २६ मे इःस. १६७४ छत्रपती शिवाजी महाराज व हेत्री ऑक्झेंडन यांची किल्ले रायगडावर भेट॰ श्री शिवराज्याभिषेक॰सो हळा २० २२ the_greal_maratha warriors the greal marathauarriors the greal marathauarriors SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] THE GreAT Van :lU:W:l inr ಕ = शिवदिनविशेष २६ मे इःस. १६७४ छत्रपती शिवाजी महाराज व हेत्री ऑक्झेंडन यांची किल्ले रायगडावर भेट॰ श्री शिवराज्याभिषेक॰सो हळा २० २२ the_greal_maratha warriors the greal marathauarriors the greal marathauarriors - ShareChat 🗿शिवकालीन पुराणवस्तू - SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] THE GreAT Van :lU:W:l inr ಕ = शिवदिनविशेष २६ मे इःस. १६७४ छत्रपती शिवाजी महाराज व हेत्री ऑक्झेंडन यांची किल्ले रायगडावर भेट॰ श्री शिवराज्याभिषेक॰सो हळा २० २२ the_greal_maratha warriors the greal marathauarriors the greal marathauarriors SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] THE GreAT Van :lU:W:l inr ಕ = शिवदिनविशेष २६ मे इःस. १६७४ छत्रपती शिवाजी महाराज व हेत्री ऑक्झेंडन यांची किल्ले रायगडावर भेट॰ श्री शिवराज्याभिषेक॰सो हळा २० २२ the_greal_maratha warriors the greal marathauarriors the greal marathauarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_379490_15dfef2d_1779762370242_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=242_sc.jpg)

