ShareChat
click to see wallet page
search
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, " आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !" नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस "तिथीने" साजरा झालेला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/krFMMxc3Qyk 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७० ( फाल्गुन पौर्णिमा, शके १५९१, संवत्सर सौम्य, गुरुवार ) शिवरायांना पुत्ररत्न :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी "सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब" यांना राजगडावर पुत्र लाभ झाला,"रामराजे" नाव ठेवण्यात आले, रामराजे पालथे उपजले, राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले... राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले - "रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालती.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७४ #म्यानातून_उसळे_तरवारीची_पात #वेडात_मराठे_वीर_दौडले_सात कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपणांस स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. अंगावर शहारे आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांनी स्फूर्तीगीतातून जिवंत केला. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४. बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल. महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. दगडात दिसतील अजुन्बी तेथल्या टाचा , ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचे त्या सात योद्धांची नावे…. १) विसाजी बल्लाळ. २) दीपोजी राउतराव. ३) विट्ठल पिलाजी अत्रे. ४) कृष्णाजी भास्कर. ५) सिद्धि हिलाल. ६) विठोजी शिंदे ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७४ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या. ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६८२ (फाल्गुन वद्य द्वादशी शके १६०३ दुर्मती संवत्सर वार शुक्रवार) हसनअलीखान, रणमस्तखान कल्याण येथे आले. छत्रपती संभाजी महाराज याचवेळी जंजिऱ्यास धडका देत होते. दादाजी रघुनाथ व विसाजी प्रभु हेही वेढा चालवीत होते. याच वेळी संभाजी महाराजांना हसनअलीखान कोकणात उतरल्याची बातमी दरम्यान समजली आणि त्यांनी जंजीरा किल्ल्याची जबाबदारी दादाजी प्रभुंवर सोपवली. त्यांना कल्याण भिवंडी कडे जावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर जंजीरा मोहिमेत शहाजादा अकबर होता. तो शहापुरला गेला. व छत्रपती संभाजी महाराज गांगोलिला गेले. जेधे शकावली प्रमाणे शके १६०३ माघमासी हसनअलीखान कल्याण भिवंडी जाळून फिरोन गेला. अशी नोंद आढळते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/krFMMxc3Qyk 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१७३९ मोगल आणि नादिरशहा यांच्यात कर्नाल येथे मोठे युद्ध झाले त्यात मोगलांचा मोठा पराभव झाला, नादीर च्या सैन्याने दिल्ली आणि उत्तर हिंदुस्तानात हैदोस घालत सुमारे २ लाख लोक कत्तल केले, अनेक स्त्रिया गुलाम म्हणून ताब्यात घेतल्या ,अनेक शहरे जाळली, मंदिरे जमीनदोस्त केली. दरम्यान नादीर ने मोठा दरबार भरवत स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह घोषित केले, नादीरला हिंदुस्थानात पाचारण करणाऱ्यांनी त्याला मराठ्यांच्या राजधानीवर म्हणजे साताऱ्यावर चालून जाण्याचे आणि छत्रपती शाहूंना संपवण्याचे सल्ले दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१७८३ सालबाईच्या तहावर नाना फडणीसांची स्वाक्षरी पेशवेपदी आरूढ होण्याचे राघोबादादाचे स्वप्न इंग्रज व मराठे यांच्यात झालेल्या सालबाई च्या तहाने कायमचे धुळीस मिळाले. मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात चंचुप्रवेश करण्याच्या इंग्रजांच्या प्रयत्नांना राघोबा दादाच्या पेशवेपदी आरूढ होण्यासाठी त्यांची मदत मागण्याने बळ मिळाले ज्याची इंग्रज वाटच बघत होते. नारायणराव पेशव्याच्या खुनामुळे पेशवायीत माजलेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याच्या हेतूने इंग्रजांनी राघोबा दादास पेशवे पद मिळण्यासाठी साह्य करण्याचे कबुल केले. मराठे व इंग्रज यांच्यातील प्रथम युद्धास डिसेंबर १७७४ पासून सुरुवात झाली. हा संघर्ष सुमारे सात वर्षे चालला. वेगवेगळ्या आघाड्यांवर दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच लहान मोठ्या चकमकी, लढाया, तह झाले. झालेले तह दोन्ही पक्षांनी पाळले नाहीत. निर्णायक स्वरूपात जय पराजय कुणाचाही होत नव्हता. इंग्रजांना हैदर अली भारी पडत होता, नागपूरकर भोसले पण इंग्रजांच्या बाजूने मध्यस्थी करत होता. हैदर अलीने इंग्रजांविरुद्ध मोठे विजय मिळवल्याने तो त्यांचाशी कुठलाही तह करण्याच्या विरुद्ध होता व तसे त्याने नाना, महाद्जीस बजावले पण होते. नाना हैदरच्या भूमिकेशी सहमत होता तर महादजी हैदर तयार नसल्यास त्याला सोडून तह करावा अशा मताचा होता. नाना व महादजी ह्या दोघांना इंग्रजांशी करावयाच्या तहाची सूत्रे आपल्याच हातात असावी असे वाटत होते. शेवटी नानांनी नमते घेतले व महाद्जीने १७ मे १७८२ रोजी ग्वाल्हेर पासून वीस मैलावर असलेल्या सालबाई येथे इंग्रजांशी तह ठरवला. हैदर आली १७८२ च्या डिसेंबर मध्ये मरण पावल्यावर २४-२-१७८३ ला नानांनी या तहास मान्यता दिली. या तहानुसार इंग्रजांनी राघोबास आश्रय देऊ नये,भडोच, साष्टी व ठाणे इंग्रजांकडे राहावी, इंग्रजांनी व मराठ्यांनी एकमेकांच्या दोस्तांस त्रास देऊ नये, मराठ्यांनी फ्रेंच वा अन्य कुठल्याही युरोपियन सत्तेशी संधान बंधू नये, पेशव्याने हैदर ने इंग्रजांचा घेतलेला मुलुख परत करण्यास त्याला भाग पडावे, इ. या तहास महाद्जीने हमीदार राहून शर्ती मोडणाऱ्या पक्षाचा बंदोबस्त करावा असे पण ठरले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ फेब्रुवारी इ.स.१८२४ नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचे हे पहिले बंड मानले जाते. इंग्रजांची आर्थिक नाडी आवळण्याचा त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला. २४ फेब्रुवारी १८२४ या दिवशी इंग्रजांचा ‘भांबुडा' येथील कडेकोट बंदोबस्तात असणारा खजिना उमाजींनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या साहाय्याने लुटला आणि इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - !|][{;[1![|[_ FECPEATMVARATHA WARRIORS SHIVDURBAD BV R Boseavai शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६७४ 28 छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजविले. the qreat maratha warriors the great marathawarriors the qreai maratha uarriors !|][{;[1![|[_ FECPEATMVARATHA WARRIORS SHIVDURBAD BV R Boseavai शिवदिनविशेष फेब्रुवारी इ.स. १६७४ 28 छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजविले. the qreat maratha warriors the great marathawarriors the qreai maratha uarriors - ShareChat