#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_जानेवारी_१६४५
शिवरायांचा निकाल उभ्या दक्खन देशातील लोकांनी पाहिला
'हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापुर्वीच स्वराज्याचा कडक नियम काय आहे हे लोकांना कळले.
बालशिवबा संतापले ! त्याना ते सहनच झालं नाही.
पुण्यातील खेड-शिवापुराजवळच्या रांझाच्या पाटलाने बदअमल केला !
बदअमल म्हणजे एका परस्त्रीवर बलात्कार केला !
त्या पाटलाचे नाव बाबाजी भिकाजी गुजर आणि शिवबांना हें समजलें !
परस्त्रीला केवळ आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलखांत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्यांने हा रावणशाही गुन्हा केलेला समजतांच शिवबा संतापले, स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर मग काय काय करतील ?
स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातिधर्माची असो, आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीजातीला आहे, ती आई आहे !
शिवबानी ताबडतोब ढालाईत हशम रांझ्यावर रवाना केले,
हुकूम केला, बाबाजी पाटलाला जेरबंद करा !
पाटील गिरफ्तार झाला, लोकांना लाल महालातल्या न्यायी सदरेची ओळख पटली, पाटलाला शिवबाच्या पुढे हाजीर करण्यांत आलें शिवबाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली,
गुन्हा शाबीत झाला आणि शिवबाने कडकडून हुकूम सोडला ,
'कोपरांपासून पाटलाचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाका , याची पाटीलकी जप्त करा !!'
तो दिवस होता..
२८ जानेवारी १६४५☝️
यावेळी शिवबाराजांचे वय होते फक्त १५ वर्षे☝️
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_जानेवारी_१६८१
छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरावर छापा टाकला.
उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजे मुघलांची सर्वात वैभवसंपन्न नगरे, होय राजांनी राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसात हा छापा टाकला.
रायगड ते बुऱ्हाणपूर हे अंतर त्यांनी अवघ्या ५ ते ६ दिवसात कापून, छापा टाकून मोठी दौलत स्वराज्यात आणली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_जानेवारी_१८५१
दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त
येथे निधन.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩


