#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#२६_एप्रिल_१६७५
दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी "कारवार" वर स्वारी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२६_एप्रिल_१६८४
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटीकेग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणाय्रा तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.संभाजी राजांचे केग्विनला पत्र :- "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच. तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.... कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे. तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत. तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो. अधिक काय लिहणे."यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते,"वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."मुंबईसाठी दिलेल्या कलमामध्ये एक कलम असे होते की, :- "माझे आणि मुघलांची गलबते समुद्रात वावरतात तरी मुघलांचे एखादे जहाज माझ्या लोकांनी धरले आणि त्यात जर इंग्रजांचा माल असला व त्याच्यावर त्यांच्या खुणा वगैरे असल्यास आणि त्या पटवून दिल्यास त्यांना त्यांचा माल परत मिळेल. इंग्रजांनी धरलेल्या जहाजात माझ्या प्रजेचा माल आढळल्यास तो त्यांनी परत करावा."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#२५_एप्रिल_१६६५
सुमारे ७००० घोडदळ घेऊन मुघल सरदार दाऊदखान किल्ले पुरंदर च्या पायथ्यापासून निघाला ते थेट स्वराज्याच्या नासाडीकरता.त्याने रोहीड खोरे, हीरडस मावळ आणि गुंजन मावळ मध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_एप्रिल_१६७४
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी ३२ मण (१२८० कीलो) सोनं वापरून सुवर्णसिंहासन रामजीप्रभू चित्रे या सोनाराने तयार केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_एप्रिल_१६९०
सातारला अजिंक्यताराच्या पायथ्याशी सर्जाखान संताजीकडून पराभूत व कैद.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_एप्रिल_१८१८
इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला तोफगोळे डागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#२४_एप्रिल_१६२८
शाहजहानने खानजहानच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून महातबखानाची नेमणूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता शिवरायांचा दोन महिन्यांनी राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण महाराजांनी तसे केले नाही व जिजाऊ साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१७१७
खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१७३९
"वसईचा पाठीराखा... जंजिरे धारावी"
साष्टीचे उत्तर टोक म्हणजे धारावी. वसई किल्याच्या समोरील खाडीच्या दुसर्या तीरावरील लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणजे धारावी. मराठा सरदार धारावीचे लष्करी महत्व किती जाणत होते ते त्यांनी चिमाजीअप्पांना लिहिलेल्या पत्रांतून स्पष्ट होते. पत्रांतील काही मजकूर पुढीलप्रमाणे -
"धारावी समुद्रामुळें व बंदरामुळें दुसरा जंजिराच! शिवाय दाणागल्ला तेथून चांगला लवकर वसईस पोचवितां येतो. शिजले अन्न निवलें नाही तोंच तेथे पोचवितां येतें.""सर्वांच्या विचारें, धारावीस ठाणे बसवून खाडी बंद होते तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील.""धारावीची बंदिस्त म्हणजे बंदोबस्त पाथरवट आणून चहुबुरूजी आधीं सत्वर बांधवावी मग पुढें मोठा कोट बांधवावा तेंव्हाच कार्यास येईल." - शंकराजीपंत फडके.
"धारावीवर मोर्चा हजार माणसांचा ठेवून वसईवर इभ्रत पाडावी." - बरवाजी तापकीर
सन १७३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.
दिनांक ३ मार्च सन १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते. दिनांक २४ एप्रिल सन १७३९ रोजी कौल घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करली. पोर्तुगीजांचा एकूण एक सैनिक जखमी झाला होता. मुख्य अधिकार्यांपैकी मार्टिन आणि अल्फेरिस एस्तव्हो मार्टिन्स हे दोन अधिकारी ठार झाले.अशा रितीने धारावी दिनांक २४ एप्रिल सन १७३९ काबीज झाली. वसईची चावी हातात आल्यानंतर लगेचच उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांची जणू राजधानी वसई मराठ्यांनी काबीज करून पोर्तुगीज सत्ता उत्तर फिरंगाणातून उखडून काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१७५२
मोगल बादशहाने कन्होज येथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह
या तहा मुळेच पानिपतचा महासंग्राम झाला, मराठा आणि अफगाण यांच्यात युद्ध झालं.
वास्तविक मराठा आणि अफगाण ह्यांच्यात वैर नव्हतं , मराठी साम्राज्याच्या व अफगाणी साम्राज्य एकमेकांपासून कोसोदूर, मग ह्यांच्यात युद्ध का झालं;कारण २४ एप्रिल १७५२ रोजी, तत्कालीन मोगलबादशहा याने, कन्होजयेथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह केला, त्याबदल्यात मोगल बादशहाने मराठयांना खालील गोष्टी दिल्या होत्या :(१) ५० लक्ष असरफिया दरवर्षी,(२) अजमेर व आग्रा ही दोन शहर महसूल म्हणून दिले,(३) सगळ्या मोगल प्रांतावर चौथाई दिली.म्हणून अफगाणांचा पाडाव करण्यासाठी आणि राष्ट्राच्या सौरक्षणासाठी मराठयांनी अब्दालीशी युद्ध केलं होतं.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#२३_एप्रिल_१६५७
मराठ्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे समवेत दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१६५७
अहमदनगरचा मुघल सुभेदार "मुलफत खान" यास छ्त्रपती शिवरायांनी पत्र रवाना केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१६६७
मराठ्यांनी कोकणातील "दाभोळ" व आसपासची ठाणी जिंकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१८१८
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२२_एप्रिल_१६६७
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी औरंगजेबास पत्र पाठवले. या पत्राद्वारे शिवरायांनी पुढची रणनिती आखण्यासाठी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट होते.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२२_एप्रिल_१६६८
"गुंजन मावळ" स्वराज्यात दाखल.
⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
#२२_एप्रिल_१८१८
इंग्रज अधिकारी कर्नल मॅक्डोवेल ला "त्र्यंबकगड" घेण्यात अपयश आले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२१_एप्रिल_१६५६
वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल झाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२१_एप्रिल_१६६८
छत्रपती शिवरायांनी विठोजी हैबतराव यास अभय दिले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२१_एप्रिल_१७००
सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्ल्यावर मुठभर मराठ्यांच्या मदतीने किल्लेदार प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दीली आणि अखेर गडावरचा दारूगोळा आणि इतर कुमक संपली.तेव्हा २१ एप्रिल १७०० रोजी मराठ्यांनी शरणागती पत्करली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२०_एप्रिल_१६६३
किल्ले सिंहगड ताब्यात घेण्यासाठी शाहीस्तेखानाने रचलेली चाल छत्रपती शिवरायांना आधीच समजली. यात फीतुरी करण्यामध्ये मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत हे असल्याचे कळल्याने शिवरायांनी या प्रकरणाचा खुलासा करणारे पत्र रवाना केले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२०_एप्रिल_१६६५
या रात्री छत्रपती शिवरायांनी किल्ले पुरंदरवर रसद पाठवली. यावेळी पुरंदर किल्ला मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण या दैत्यांशी झुंजत होता.कशी कोणास ठाऊक पण केदार दरवाज्याने ही रसद गडावर पोचली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#२०_एप्रिल_१७४०
रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.
⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
#२०_एप्रिल_१७७५
नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहागीर देऊन सत्कार करण्यात आला.नारो शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता, त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला जहागिरी दीली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#१९_एप्रिल_१९१०
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली.
अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणिस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठीजवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळझाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्नहोत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतीलपिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६०
मराठ्यांनी अकोला जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते,
फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती.
भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत.
इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की
"इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे"
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या
(दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.)
हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती.
तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या,
परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६१
शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६७
आऊसाहेबांचे न्यायदान :-
महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता.
कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६८०
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:-
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:-
शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे.
२४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,
(हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.)
कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन,
तो लिहितो:✍️
(महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१७३९
अशेरीगड मराठ्यांनी जिंकला
संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला
🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩













