#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#६_मार्च_१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली.
कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळा घेतला.
महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची
अस्मानी फत्ते झाली.
मोहिमेसाठी २००० तरी याने मागणं अपेक्षित होतं पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने?
कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं
राजे, ३०० गडी द्या फक्त...!!
राजे अचंबित झाले!
कोंडाजी फक्त ३००? पुरतील ?
कोंडाजी म्हणला, राजे, ६० च पुरेत,
पण अगदीच मोजके नको म्हणून ३००.
राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं,
कोंडाजी खुश झाले😀
किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू,
कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो?
पहारे कुठं कमी आहेत आणि नेमकी माहिती कळली.
दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके१५९५,
६ मार्च १६७३....!!!!!!
कोंडाजी ६० जण घेऊन पुढं गेले आणि बोलले गड घेतो,
गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या🔥
त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते तो नियोजनाचा भाग होता.
सर्वजण गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले.
तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले,
पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.
इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले.
किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.
आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या.
किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.
कील्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता.
नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला?!!!
सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला.
पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती
तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला☝
गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले🚩
तोफांना बत्त्या दिल्या🔥
एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला🏇
तो किल्ल्यावर गेला तो दिवस☀️
चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा😀
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#५_मार्च_१६५९
कोकणामध्ये शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले.
लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली.
या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी राजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#५_मार्च_१६६६
औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज शिवाजीराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत.
आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ?
केवळ कल्पनाच केलेली बरी !
आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन
दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले.
त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते.
मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला.
त्याचे नाव तेजसिंह कछवा.
औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता.
त्याचे नाव गाझीबेग तवझुक.
महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक लाख रुपये मंजूर केले होते.
शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!!
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#५_मार्च_१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली,
ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता☝️
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩
#४_मार्च_१६६०
सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला, शिवराय वेढ्याच्या पेचात सापडले.
स्वतः शिवाजीराजे पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.
जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती महाराज आखणार होते.
कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.
अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मार्च_१६६७
छत्रपती शिवाजी महाराजांनी कलबरगा परगण्यातील हिरापूर वर छापा टाकला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#४_मार्च_१६७७
दक्षिण दिग्विजय मोहीम🏇
छत्रपती शिवाजी महाराज हैद्राबाद शहरातील गोवळकोंडा किल्ल्याजवळ दाखल.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩
#४_मार्च_१८१८
दक्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी बहुतेक सर्व किल्यांची तोडफोड केली, त्यात विसापूरचा किल्ला कर्नल पर्थारणे तोफा डागून उध्वस्त केला. आज किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे .
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१६६०
शाहीस्तेखान स्वराज्यात घुसला, त्याचा पहिला मुक्काम किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सोनवडी या गावात.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१६६०
सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळा ला घातलेल्या वेढ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिलशहाने छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना छत्रपती शिवरायांना मदत न करण्यासाठी धमकीचे पत्र पाठवले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१६६५
मोगल सरदार मिर्झाराजे १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल.
मागील ३ वर्षात शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहिस्तेखानाची बोटे कापली, सुरत बेसुरत केली आणि त्यावर पत्र पाठवून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळविले,
आता औरंगजेबाला सर्वात जिगरबाज सरदार दख्खन मध्ये पाठवणे भाग होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१६७९
मोरोपंत पेशव्यांनी विजापूरकरांकडून कोप्पळ जिंकले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१६८९
मुघल फौजा हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजेंना कैद करून कोरेगाव भीमा येथे घेऊन आल्या, पुढे छत्रपती संभाजी राजांना घेऊन मुघली फौजानी तुळापुरात तळ ठोकला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१७००
हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना सिंहगडावर देवाज्ञा .
फाल्गुन वद्य नवमी, प्रमाथी नाम संवत्सर, शके १६२१ रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांनी देह ठेवला.
छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर देवाज्ञा झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली.
मराठ्यांचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩
#३_मार्च_१८१८
सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात
गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला.
उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले गेले. १ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले.
तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला.
शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला.
गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१६६०
अफझल वधानंतर राजांनी कोल्हापूर, सांगली , कराड ताब्यात घेऊन मिरजेच्या वेढ्यावर चालून गेले पण सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून
शिवाजीराजे मिरजेचा वेढा तसाच ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१६८७
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता, तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१७९५
खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व गडांची तोड़फोड़ केली.
त्यात २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहग़डावर तोफा डागायला सुरवात केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१६६०
अफझल वधानंतर राजांनी कोल्हापूर, सांगली , कराड ताब्यात घेऊन मिरजेच्या वेढ्यावर चालून गेले पण सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून
शिवाजीराजे मिरजेचा वेढा तसाच ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१६८७
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता, तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१७९५
खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मार्च_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व गडांची तोड़फोड़ केली.
त्यात २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहग़डावर तोफा डागायला सुरवात केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१६५९
कोकणातील सावंत आणि भोसले यांच्याबरोबर छत्रपति श्री शिवरायांचा करार झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१५७२
#प्रतापसिंह_महाराणा_झाले🔥
प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापासिंह यांस १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१६३०
मुघल बादशहा "शाहजहान" हा मोठ्या फौजेसह "बुऱ्हानपूर" येथे येऊन दाखल झाला, यावेळी थोरले महाराज "शहाजीराजे" हे आदीलशाहीत सरदार होते.
त्यांना ही बातमी समजताच ते "राजमाता जिजाऊ" व १० दिवसाच्या बाल शिवबांची "किल्ले शिवनेरी" वर चोख व्यवस्था लावून आदीलशाही दरबारात हजर झाले.
खानजहान लोदी व निजामशाहीविरूद्ध मोहिमेसाठी शाहजहानने १४ डिसेंबर १६२९ ला आग्रा सोडले.
बुऱ्हाणपूरजवळच्या असीरगढला त्याचा तळ होता.
दख्खनचासुभेदार इरादतखानकडे त्याने पन्नास हजारांचे सैन्य दिले, त्याला आझमखान हाकिताब देण्यात आला.
२३ फेब्रुवारी १६३० ला ह्या सैन्याने लोदी वनिजामशाहीविरूद्ध मोहिम सुरू केली.
त्यानंतर १ मार्च १६३० रोजी शाहजहान बुऱ्हाणपूरला पोहोचला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१६३३
महाबतखानाने "दौलताबाद (किल्ले देवगिरी) ला वेढा दिला.
महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला.
१ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले.
निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते.
या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला.
मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले.
शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला.
मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१६५९
कोकणातील सावंत आणि भोसले यांच्याबरोबर छत्रपति श्री शिवरायांचा करार झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१५७२
#प्रतापसिंह_महाराणा_झाले🔥
प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापासिंह यांस १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१६३०
मुघल बादशहा "शाहजहान" हा मोठ्या फौजेसह "बुऱ्हानपूर" येथे येऊन दाखल झाला, यावेळी थोरले महाराज "शहाजीराजे" हे आदीलशाहीत सरदार होते.
त्यांना ही बातमी समजताच ते "राजमाता जिजाऊ" व १० दिवसाच्या बाल शिवबांची "किल्ले शिवनेरी" वर चोख व्यवस्था लावून आदीलशाही दरबारात हजर झाले.
खानजहान लोदी व निजामशाहीविरूद्ध मोहिमेसाठी शाहजहानने १४ डिसेंबर १६२९ ला आग्रा सोडले.
बुऱ्हाणपूरजवळच्या असीरगढला त्याचा तळ होता.
दख्खनचासुभेदार इरादतखानकडे त्याने पन्नास हजारांचे सैन्य दिले, त्याला आझमखान हाकिताब देण्यात आला.
२३ फेब्रुवारी १६३० ला ह्या सैन्याने लोदी वनिजामशाहीविरूद्ध मोहिम सुरू केली.
त्यानंतर १ मार्च १६३० रोजी शाहजहान बुऱ्हाणपूरला पोहोचला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मार्च_१६३३
महाबतखानाने "दौलताबाद (किल्ले देवगिरी) ला वेढा दिला.
महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला.
१ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले.
निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते.
या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला.
मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले.
शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला.
मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६०
मराठ्यांनी अकोला जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते,
फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती.
भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत.
इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की
"इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे"
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या
(दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.)
हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती.
तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या,
परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६१
शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६७
आऊसाहेबांचे न्यायदान :-
महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता.
कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६८०
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:-
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:-
शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे.
२४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,
(हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.)
कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन,
तो लिहितो:✍️
(महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१७३९
अशेरीगड मराठ्यांनी जिंकला
संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला
🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩













