⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ३ मार्च इ.स.१६६५
(फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५८६, क्रोधी संवत्सर, वार शुक्रवार)
मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते.
त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/7hT0iKA9GUY
📜 ३ मार्च इ.स.१६८९
(फाल्गुन वद्य ७, सप्तमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)
छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का!
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला, कारण हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे ३२, बत्तीसवे वर्षे होते. आजच औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. योगायोग हा की ३ मार्च इ.स.१६८९ रोजी बरोबर ३२ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला. औरंगजेबाने भिमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना "फतवा" काढला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७००
छत्रपती राजाराम महाराज जिंजी च्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोंगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोंगल अगदी हैराण होऊन गेले होते. संताजी घोरपडे
आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोंगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर आले. महाराष्ट्राची ही 'शिवलंका' अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या, श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच 'शिवराजेश्वर' मंदिराची निर्मिती केली. यानंतर दुर्दैवाने केवळ दोनच वर्षात, गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दि. ३ मार्च १७०० या दिवशी या तरुण राजाचा, वयाच्या केवळ २९ व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७१९
दिल्लीच्या लालकिल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर हसनअली सय्यदाने लहानग्या रफिउदौरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात झाली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहूमहाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफिउदौरजत बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या सनदा जाहीरपणे शाहूमहाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजीपंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व सनदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजीपंतांच्या मनात काय आले असेल? 'हे सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज त्याच सिंहासनावर हे परके तुराणी बसलेत. हा मुजरा या बादशहाला नसून अजातशत्रू युधिष्ठिराला आहे, भगवान श्रीकृष्णाला आहे, प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे ते स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल.' इतर लहान-मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दि. १५ मार्च रोजी परत दरबार भरवून सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या. यानंतर लगेचच पाच दिवसांनी दि. २० मार्च १७१९ रोजी ५० हजार मराठी फौज राजमाता येसूबाईसाहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवरपाशी आल्यानंतर बाळाजीपंत आपले थोरले पुत्र व अंबाजीपंतांना सोबत घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७३९
सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दिनांक ३ मार्च सन १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७८९
दिल्लीवर मराठा भगवा झेंडा
गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्यांच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणेखान, जिवबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले... एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लुट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते..... गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला त्याच्या घोसगडा कडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठयांना तो जिवंत पाहिजे होता.... गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोझा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या... अखेर गुलामाचे डोळे काढून बादशाहाकडे पाठविण्यात आले ३ मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शाहआलम ला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लुट महादजींनी दिल्लीला पाठवली.... "मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशाहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किलल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्ष म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता"...
https://youtu.be/7hT0iKA9GUY
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१७९३
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ मार्च इ.स.१८१८
सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात
गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले गेले. ६ पौंडी अथवा १२ पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज र्न मारा होत होताच.
१ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करायला प्रिट्झलर काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर ३ तासांत गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरु केला गेला. शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
![🚩शिवराय - I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat 🚩शिवराय - I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII -- TD GREATMARATHA WARRIORS SHVDNVISHIESH CREATEDIBY Rahul Borse Patil] विशेष शिव ত| HIశేక K 9628 3 औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_125075_31ccc9f2_1772504109839_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=839_sc.jpg)

