Radha Divakar jogdand
8K views 6 months ago
अपघातात ५ लोक गेले. पण जग थांबलं फक्त एका नावासाठी. उरलेले चार जण बातमीच्या शेवटच्या ओळीत हरवून गेले. पण त्यांच्या घरात आजही वेळ थांबलेली आहे. कुणाच्या घरात रिकामी पडलेली चप्पल आहे, कुणाच्या घरात अर्धवट ठेवलेली जबाबदारी आहे, कुणाच्या घरात “आता पुढे काय?” हा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कुणाकडेच नाही. त्या चार जणांचा ना फोटो फिरला, ना RIP लिहिलं गेलं, ना दोन शब्द सहवेदनेचे. कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता, पद नव्हतं, नाव नव्हतं. पण त्यांच्याकडे कुटुंब होतं, स्वप्नं होती, आणि उद्याची भीतीही होती — जी आता खरी झाली आहे. मरण सगळ्यांचं सारखंच असतं, पण इथे दुःखालाही वर्ग असतो. मोठं नाव मेलं तर देश हळहळतो, सामान्य माणूस मेला तर त्याच्या घरच्यांना “सावर” असं सांगून जग पुढे निघून जातं. हा फरक अपघाताचा नाही… हा फरक आपल्या संवेदनशीलतेचा आहे. आपण कुणासाठी रडतो आणि कुणाला विसरतो हे आपलं समाज म्हणून अपयश आहे. आज RIP एका माणसासाठी आहे, पण उद्या आपण, आपले त्या “उरलेल्या चारांपैकी” कोणीही असू. म्हणून प्रश्न मृत्यूचा नाही… प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा. कारण मृत्यू सगळ्यांना समान आहे, पण माणुसकी अजूनही समान नाही. #🥳अजित पवार👉 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
81 likes
47 shares

More like this