⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ८ जानेवारी इ.स.१०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण.
महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते..सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू,हीरे,माणके यानी सजवले होते.त्यामुले ते शिव लिंग अक्षरशः लखलखत होते.डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला.३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्त सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे,कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!!
मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली.यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती.तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले.वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले.तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/7QM3eJUDIZE
📜 ८ जानेवारी इ.स.१६६४
( पौष वद्य षष्टी, शके १५८५, संवत्सर शोभन, शुक्रवार )
वकिलाची आश्चर्यकारक सुटका
कालच्या मानाने आजची सकाळ काहीशी शांत होती. तेवढ्यात फायदा घेऊन इनायतखानाने डचांकडे "किल्ल्याच्या आतून काही दारुगोळा पाठवून देतो" असा निरोप पाठवला. याशिवाय ४० घोडेस्वारही लुट करणार्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवून त्या स्वारांमध्ये डचांच्याही सैनिकांनी सामील व्हावे असा आग्रह धरला. पण दूरदर्शी डचांनी ते साफ नाकारले. न्यायकचेरीचा एक कारकून किल्ल्यात लपून बसलेला होता. त्याचे घर डच वखारी जवळच होते. त्याने आपल्या घरची एक महत्त्वाची पेटी डचांनी आपल्या वखारीत सुखरूप आणून ठेवावी म्हणून कळविले. त्यालाही डचांनी नकार दिला. लुटीचे प्रकार सकाळी कमी होते. निराधार लोक उध्वस्त रस्त्यांवरून फिरत होते. डचांचा एक शिपाईही (हेर) फकिराच्या वेषांत सर्वत्र फिरून आला. तो थेट महाराजांच्या छावणीपावेतो गेला होता. महाराजांची छावणी, लुट वाहून नेणारे मजूर, बैल, शिपाई, कैदी यांनी गजबजून गेलेली होती. शिपाई लुटीचा ऐवज महाराजांच्या जवळ रिता करीत. त्यापैकी सोने, रुपे, हिरे, मोती यांसारखे मौल्यवान जिन्नस तेवढे स्वराज्य कोषासाठी महाराज ठेऊन घेत. अन्य वस्तू आपले बाजूला उभे असलेले गोर-गरीब, फकीर यांना वाटून दिल्या जात. इनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहारांत आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती, त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडतांच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती ट्रॉय" शहरासारखी झाली होती. प्रचंड आग! गुरूवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसा धुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते. शुक्रवारीहि आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लूटीला तर खंड नव्हता. लूटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही ते चालूच राहिले. रात्री मात्र लुटीचे काम जवळ जवळ संपत आले; तरीहि उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहानमोठी घरे पेटत होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ जानेवारी इ.स.१६८९
(पौष वद्य चतुर्दशी शके १६०२ संवत्सर रौद्र वार शनिवार)
किल्ले त्र्यंबक मोगलांच्या ताब्यात!
मातबरखानाने त्रंबकच्या किल्ल्याला वेढा दिला होता. तेथील अधिकारी तेलंगराव व शामराज यांना वश करून त्यांना इनामाची व बक्षीसांची आश्वासने देऊन किल्ला ताब्यात घेतला. हे दोन्ही अधिकारी किल्ल्याच्या खाली उतरले व किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. त्रंबकचा किल्ला घेतल्याबद्दल बादशहाने मातबरखानाची स्तुती केली व त्याच्या मनसबीत वाढ केली. इ.स.१६८९ रोजीच्या फेब्रुवारीनंतर मातबरखानाने बागलाण-नाशिक मधील बहुतेक किल्ले मिळविले आणि माहुलीचा किल्ला जिंकला व त्यास कल्याण-भिवंडी कडे पाठविण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ जानेवारी इ.स.१६९७
छत्रपती राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव सरदार खंडाराव दाभाडेंना इनाम दिला. पुढे खंडाराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापतीपद दिलं. इंदोरीचं वतन त्यांना राजाराम महाराजांकडून आधीच देण्यात आलं होतं. पुन्हा शाहू महाराजांकडूनही इंदोरी गाव दाभाडे घराण्यास वतनात मिळालं. त्यानंतर इंदोरी गावात नऊ बुरूजांचा भुईकोट प्रकारातला गड खंडेराव दाभाडे यांनी नदीकाठी बांधून घेतला. इंदोरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, पश्चिम तटबंदी इंद्रायणी नदीला समांतर रेषेत बांधलेली आहे. त्यामुळे हा गड चौकोनी किंवा एकसलग काटकोनात दिसणाऱ्या शनिवारवाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रमाणात त्रिकोणी आकारात दिसतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ जानेवारी इ.स.१८८४
शके १८०५ च्या पौष शु. ११ रोजी उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले.
यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होतें; यांच्या आजाचे नांव रामकमल असून प्यारीमोहन व शारदासुंदरी हीं यांच्या मातापितरांची नांवें होतीं, शाळेत असतांना बायबलाच्या वाचनाचा परिणाम यांच्या मनावर विशेष झाला आणि सन १८५७ मध्ये कुलामध्यें रूढ असणाच्या वेष्णव सांप्रदायाची दीक्षा न घेतां ब्राह्मसमाजाची त्यांनीं दीक्षा घेतली आणि या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले व 'इंडियन मिरर' नांवाचें इंग्रजी साप्ताहिक सुरू केलें. सन १८६४ मध्ये त्यांनी प्रचारासाठी मुंबई-मद्रासकडे जो दौरा काढला तो त्यांच्या प्रभावी इंग्रजी वक्तृत्वाने फार यशस्वी झाला; परंतु शेवटी मतभेद झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपूणे ' भारतवर्षीय ब्राह्मसमाज' नांवाची संस्था सन १८६६ मध्ये काढली. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले. तेथे त्यांचा समाजसुधारक म्हणून अत्यंत गौरव झाला. तेथून परत मायदेशी आल्यावर समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या. 'सुलभ समाचार' यासाररवी नियतकालिके त्यांनी काढली. शेवटी कांहीं खाजगी गोष्टींवरून यांचे सहकारी फुटून दूर निवाले. त्यांनी केशवचंद्रावर टीकेचा गहजब केला.
या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला; आणि त्रस्त झालेल्या मनास विश्रांति मिळावी म्हणून यांनी ध्यानधारणेसाठी ' साधनकानन नांवाची बाग तयार केली, परंतु येथेंहि त्यांना म्हणावी अशी शांति लाभली नाही. यांच्या परि- वारांतील लोकांनी स्वतंत्रपणे ' साधारण ब्राह्मसमाज' काढला. त्यामुळे यांच्या मनावर चमत्कारिक परिणाम झाला. तेव्हां यांनी ' नवविधान' नांवाच्या पंथाची स्थापना केली. * यांच्याइतका प्रचंड व्याप करणारा, रोज नव्या कल्पना काढणारा, नव्या संस्था काढून त्यांच्याकडून कामे करून घेणारा समाजसुधारक अलीकडच्या काळांत क्कचितच सांपडेल." जीवनवेद (आत्भचरित्र) व ब्राह्मधर्मा - धिष्ठान हे यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ होत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀


