एकदा शिष्य गुरूंना म्हणाला,
गुरुदेव, मनात इतकं दाटून येतं की कुणासमोर तरी रडावंसं वाटतं. दुःख सांगितलं की हलकं होतं असं वाटतं…
गुरु शांत हसले. म्हणाले,, रडणं चुकीचं नाही. पण प्रश्न आहे कुणासमोर रडतोस?
शिष्य गोंधळला. माणसांसमोर रडलो, तर ते समजून घेतात ना?
गुरु म्हणाले,
काहीजण समजून घेतात, काहीजण समजून घेत असल्याचा आव आणतात, तर काहीजण तुझ्या अश्रूंमध्येही स्वतःचा फायदा शोधतात. माणूस तुझं दुःख ऐकेल, पण ते वाहून नेऊ शकणार नाही. कारण त्याच्याकडेही स्वतःची ओझी असतात.
थोडा विराम घेऊन गुरु पुढे म्हणाले,
समजा, तुझ्या हातात जळता कोळशाचे ओझं आहे. तू ते दुसऱ्याच्या हातात दिलंस, तर त्याचा हातही भाजेल; पण कोळसा तरी विझेल का? तो विझवायचा असेल, तर पाण्यातच टाकावा लागतो. तसंच, तुझं दुःख विझवायचं असेल, तर ते भगवंताच्या चरणीच ठेवावं लागत.
शिष्याच्या डोळ्यात पाणी आल.
मग गुरुदेव, माणसांपुढे कधीच रडू नये का?
गुरु प्रेमाने म्हणाले,
रडायचंच असेल, तर त्या परमेश्वरापुढे रड. कारण तो केवळ ऐकत नाही, तो बदल घडवतो. माणूस तुला सांत्वन देईल..पण भगवंत तुला सामर्थ्य देईल. माणूस तुझ्या जखमेवर फुंकर मारी.. पण भगवंत ती जखम भरून काढेल.
गुरु म्हणाले,आणि जगासमोर? तिथे हस. कारण तुझं हसूही भगवंताचीच देणगी आहे. जगाला तुझी वेदना नाही, पण तुझ्या हसण्यातून त्यांनाही धीर मिळू शकतो.
शिष्य नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, आज कळल रडण.. ही कमजोरी नाही..पण योग्य ठिकाणी रडलं, तर तेच भक्ती बनत.
गुरु म्हणाले, हसायचं-रडायचं ते भगवंतापुढे. जगासमोर ठेवायचं ते फक्त विश्वासाचं हसू. कारण जो अंतःकरणाचा स्वामी आहे, तोच खऱ्या अर्थाने तुझ्या अश्रूंना उत्तर देऊ शकतो.
शिष्याने मनोभावे गुरूंना नमस्कार केला ll
✍️rst
🙏🙏🙏🙏
!! श्री गुरूदेव दत्त!!
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺

