विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - *माझं आणि आमचं या दोन शब्दात जमीन आस्मानचा फरक आहे माझं या शब्दात स्वार्थ दडलेला असतो तर आपुलकी असते...!!*** आमचं या शब्दात *शुभ सकाळ* *माझं आणि आमचं या दोन शब्दात जमीन आस्मानचा फरक आहे माझं या शब्दात स्वार्थ दडलेला असतो तर आपुलकी असते...!!*** आमचं या शब्दात *शुभ सकाळ* - ShareChat
*🙌रावणाने लक्ष्मणाला सांगितलेले ज्ञान🌹* रामायणातील एक अत्यंत अर्थपूर्ण प्रसंग माझ्या मनाला नेहमी अंतर्मुख करतो. रणांगणावर पराभूत होऊन मृत्युपंथाला लागलेला रावण , आणि त्याच्याकडून अंतिम क्षणी ज्ञान घेण्यासाठी गेलेला लक्ष्मण. हा प्रसंग रामायण या महाकाव्यातील केवळ युद्धकथा नाही; तो जीवनतत्त्वज्ञानाचा दीपस्तंभ आहे. ज्ञानाचा स्रोत कोणताही असो, आपण रावणाला नेहमी दुष्ट, अहंकारी म्हणून पाहतो; परंतु तो वेदांचा अभ्यासक, शिवभक्त आणि महान पंडित होता. श्रीरामांनी लक्ष्मणाला त्याच्याकडून ज्ञान घेण्यास सांगितले. यातून मला जाणवते, ज्ञानाला शत्रू-मित्र असा भेद नसतो; सत्य जिथे असेल तिथून ते स्वीकारावे. नम्रतेशिवाय विद्या नाही, लक्ष्मण प्रथम रावणाच्या मस्तकाजवळ उभा राहिला. रावण मौन राहिला. श्रीरामांनी सांगितले, “विद्या घेण्यासाठी गुरुच्या चरणी जावे.” लक्ष्मण नम्रतेने चरणाशी उभा राहिला आणि तेव्हाच उपदेश मिळाला. हा प्रसंग मला शिकवतो, अहंकाराच्या उंचीवरून ज्ञान मिळत नाही; नम्रतेच्या भूमीवर उभे राहावे लागते. *रावणाचे तीन अमूल्य उपदेश...* *१. शुभ कार्य कधीही पुढे ढकलू नये...* रावण म्हणाला— “मी श्रीरामांच्या शरण जाण्याचा विचार पुढे ढकलला; त्याच विलंबामुळे माझा नाश झाला.” जीवनातील सत्कर्म, सत्यस्वीकार, क्षमा, हे तत्काळ करावे. *२. दुष्कर्म करताना घाई करू नये...* सीतेचे अपहरण हा क्षणिक अहंकाराचा परिणाम होता. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभराची शिक्षा देतो. *३. कोणालाही तुच्छ समजू नये...* रावणाने वानरसेनेला दुर्बल मानले. परंतु लहान वाटणाऱ्यांनीच लंकेचा पराभव केला. आध्यात्मिक चिंतन, माझ्या मननात, रावण म्हणजे अहंकार, लक्ष्मण म्हणजे विवेक, आणि राम म्हणजे आत्मतत्त्व. जेव्हा अहंकाराचा अंत होतो, तेव्हा विवेकाला आत्मज्ञान प्राप्त होते. हा प्रसंग आपल्याला बाह्य शत्रू नव्हे तर अंतर्मनातील दोष जिंकण्याची प्रेरणा देतो. उपसंहार रावणाचा देह नष्ट झाला, पण त्याचे उपदेश अमर झाले. आज आपण प्रत्येकाने स्वतःला विचारावे... मी सत्कर्म पुढे ढकलतो आहे का? मी रागात निर्णय घेतो आहे का? परिवर्तनाची सुरुवात आजच करावी. नम्रता, संयम आणि समयाचे भान यांतच जीवनाचे खरे यश दडलेले आहे. ॥ श्रीराम ॥🌹🙏 #सुप्रभात #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️
एकदा प्रेमात धोका मिळाला की माणूस तुटत नाही फक्त, तो बदलतो. आधी जो मनमोकळेपणाने हसायचा, विश्वास ठेवायचा, स्वप्न रंगवायचा… तो अचानक सावध होतो. कारण त्याने अनुभवलेली वेदना त्याला शिकवते – प्रेम सुंदर असतं, पण चुकीच्या व्यक्तीबरोबर ते खूप खोल जखम देऊ शकतं. पहिल्यांदा प्रेमात पडताना मनात भीती नसते. विश्वास सहज ठेवला जातो. “तो/ती कधीच असं करणार नाही” असं मन ठामपणे मानतं. पण जेव्हा तोच विश्वास तुटतो, तेव्हा फक्त नातं संपत नाही – स्वतःवरचा विश्वासही थोडासा डळमळतो. मग दुसऱ्यांदा कोणीतरी आयुष्यात येतं तेव्हा मन लगेच पुढे सरकत नाही. ते थांबतं… विचार करतं… तपासतं. दुसऱ्यांदा प्रेमात पडणं म्हणजे पुन्हा एकदा स्वतःला उघडं करणं. पुन्हा भावना व्यक्त करणं. पुन्हा अपेक्षा ठेवणं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे – पुन्हा दुखावलं जाण्याची शक्यता स्वीकारणं. त्यामुळे तो किंवा ती पटकन “हो” म्हणत नाही. प्रत्येक शब्दात अर्थ शोधतो, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा पाहतो. कधी कधी समोरची व्यक्ती म्हणते, “तू इतका/इतकी संशयी का आहेस?” पण त्यामागे संशय नसतो, ती फक्त भीती असते. कारण ज्याने एकदा तुटण्याचा आवाज ऐकला आहे, तो पुन्हा तसाच आवाज ऐकायला तयार नसतो. दुसऱ्यांदा प्रेम करताना माणूस जास्त परिपक्व होतो. तो आता फक्त आकर्षण बघत नाही; तो स्वभाव, समजूतदारपणा, जबाबदारी आणि सातत्य बघतो. त्याला फक्त “आय लव्ह यू” नको असतं, तर “मी आहे तुझ्यासोबत” ही खात्री हवी असते. हो, तो थोडा उशिरा विश्वास ठेवतो. थोडं जास्त विचार करतो. कधी कधी अनावश्यक भीतीही बाळगतो. पण याचा अर्थ तो प्रेम करायला तयार नाही असा नसतो. उलट, तो यावेळी अधिक जपून, अधिक प्रामाणिकपणे प्रेम करायला इच्छुक असतो. कारण त्याला माहिती असतं की प्रेम खेळ नाही – ते आयुष्याचा भाग आहे. दुसऱ्यांदा प्रेमात पडणं म्हणजे धाडस. जखमा असूनही हृदय पुन्हा उघडणं म्हणजे ताकद. आणि जो/जी व्यक्ती एखाद्याच्या भूतकाळातील वेदना समजून घेते, त्याला वेळ देते, त्याच्या भीतीला हळुवारपणे हात धरते – तीच खरी व्यक्ती असते. म्हणूनच, जर कोणी दुसऱ्यांदा प्रेमात पडताना थोडं घाबरत असेल, तर त्याला दोष देऊ नका. त्याने फक्त खूप काही सहन केलं आहे. आणि तरीही तो पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय – यापेक्षा मोठं धाडस काय असू शकतं? कारण शेवटी… धोका प्रेमाला संपवत नाही, तो प्रेमाची निवड अधिक सावध बनवतो. आणि कधी कधी, दुसऱ्यांदा केलेलं प्रेम पहिल्यापेक्षा जास्त खरं, जास्त खोल आणि जास्त कायमचं असतं. @manik uchit, nashik. #सुप्रभात #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️
*उगवतीचे रंग* *गेले द्यायचे राहूनी...* ( माझ्या *अजूनही चांदरात आहे* या पुस्तकातील लेख ) कवी आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे. गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्राचे देणे माझ्यापाशी आता कळ्या आणि थोडी ओली पाने. कधी कधी असं सुंदर, आवश्यक असलेलं नक्षत्रांचं देणं राहून जातं. हातात फार काही उरत नाही. काळ हातातून निसटून गेलेला असतो. राहून गेलेल्या गोष्टींची बोच मात्र मनाला लागून राहते. कधी कधी मला वाटतं की आपलं आयुष्य एखाद्या क्रेडिट कार्डसारखं आहे. काय हवं ते आपल्याला आधी देऊन टाकलेलं असतं. नंतर आपल्याला ते फेडायचं असतं. आपण ते ऋण कसं फेडतो यावर पुढील सगळा व्यवहार अवलंबून असतो. आईवडील आपल्याला शिकवतात, मोठं करतात. गुरुजन ज्ञान देतात. शेतकऱ्याने शेतात अन्न पिकवल्याने आपल्याला खायला मिळतं. मित्र, समाज, आप्तेष्ट या साऱ्या साऱ्यांचं आपल्यावर ऋण असतं. ते जमेल तसं आपल्याला परत करायचं असतं. त्याच्यासाठी मुदत दिलेली नसते, ठराविक असं व्याज नसतं आणि फेडलं नाही तर काही गुन्हा दाखल होण्याची शक्यता फारशी नसते. पण परत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. आपल्यावरचे संस्कार किती प्रभावी आहेत त्यावर हे ठरतं. माझं ज्यांच्यावर खूप प्रेम होतं असे माझे वडील शेवटी शेवटी थकले होते. त्यांचं वय बरंच झालं होतं. मी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होतो. मी शाळेत जायला निघालो की त्यांचं लक्ष माझ्याकडे असायचं. माझ्या चेहऱ्याकडे नजर लावून असायचे. ' बाबा, येतो मी...' असं म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचं. असं वाटायचं की त्यांच्या डोळ्यातल्या दोन ज्योती माझ्या शरीराभोवती एक आशीर्वादरुपी कवच बनून माझं रक्षण करताहेत. बऱ्याचदा त्यांना सांगूनच जायचो मी. पण कधी कधी धावपळीत असताना माझ्याकडून तेवढंही सांगणं व्हायचं नाही. मी गर्दीत निघून जायचो. त्यांचे डोळे आशेने माझ्याकडे लागलेले असायचे. मग मलाच अपराध्यासारखं वाटायचं. काय विशेष असं हवं असायचं त्यांना... ? जाताना आपल्या मुलानं त्यांच्याकडे प्रेमभराने पाहावं, सांगून जावं एवढीच त्या प्रेमळ पित्याची अपेक्षा असायची. शाळेत प्रचंड काम असायचं. वर्गात मोठमोठ्यानं शिकवणं, घसा दुखायचा. मुलांची सारखी कलकल. शाळेतून आलो की डोकं भणाणून गेलेलं असायचं. मग असं वाटायचं की कोणाशी काहीच बोलू नये. काही काळ अगदी शांत बसून राहावं. तसा प्रयत्न करायचो देखील. पण त्यावेळी पुन्हा वडिलांची अपेक्षा असायची की मी क्षण दोन क्षण त्यांच्याजवळ बसावं. त्यांची थोडी मायेनं चौकशी करावी. पण त्या परिस्थितीत कधी कधी तेही नाही व्हायचं माझ्याकडून. बाबा तर आता नाहीत. पण आता ते क्षण आठवले की वाटतं आपलं चुकलंच. आपण कितीही थकलेलो असलो, काही असलं तरी त्यांच्याजवळ बसायला हवंच होतं. त्यांची आस्थेनं विचारपूस करायला हवी होती. त्यांना वेळच्या वेळी जेवणखाण, औषधे सगळं काही मिळत होतं. पण तेवढंच पुरेसं होतं का ? पुढे पुढे जसजसं त्यांचं शरीर थकत गेलं तसतशा शारीरिक तक्रारी वाढू लागल्या. रात्री अनेकदा त्यांना लघुशंकेसाठी उठावं लागायचं. वयानुसार नजर कमी झाल्याने रात्री दिसायचं नाही. दिवा सुरु ठेवावा लागायचा. त्यांना तहानही खूप लागायची. पण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे... तसेच झाले माझे. मी उगीचच त्यांना म्हणायचो की बाबा, रात्री जास्त पाणी पिऊ नका. पण मला कळले की म्हातारपणी तोंडात लाळेची निर्मिती कमी होत असल्याने तोंडाला कोरड पडते. बऱ्याच वृद्ध लोकांना रात्री उठून लघुशंकेसाठी जावेच लागते. आता हे सगळे कळले आहे. पण बाबा राहिले नाहीत. आठवणींनी डोळे भरून येतात. वडील माझ्यासाठी आदर्श होते. प्रेमळ होते. त्यांनी माझ्यासाठी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. मी देखील त्यांची कधी आज्ञा मोडली नाही. माझ्याकडून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य होते ते ते केले. त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील वर उल्लेख केलेल्या काही काही गोष्टींची बोच माझ्या मनाला लागून राहिली. कुठेतरी हे ' नक्षत्रांचे देणे ' द्यायचे राहून गेले. असं काही खरं तर आपल्या हातून राहून जाऊ नये. कारण ते करण्याची संधी पुन्हा येत नाही. माझे बाबा मला खूप आवडायचे. माझं त्यांच्यावर प्रेम होतं पण ते असताना मी कधी म्हटलं का की बाबा तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही मला हवे आहात ? ते मला आवडत होते, हवे होते हे तर खरंच पण त्यांना जर मी तसं जवळ बसून बोललो असतो तर त्यांना किती छान वाटलं असतं ! आता मला त्यांना तसं सांगावं असं लाख वाटलं तरी आता माझ्या हातात काही नाही. बाबा, तुमचं हेही देणं माझ्याकडे बाकी आहे. आपली आई सारखी आपल्यासाठी राबत असते. आपल्याला वाढवताना तिने किती खस्ता खाल्ल्या असतील हे ती कधी सांगते का ? कवी माधव ज्युलियन यांची ' प्रेमस्वरूप आई ' कविता ऐकताना, राजा और रंक चित्रपटातील ' तू कितनी अच्छी हैं ' ऐकताना, तारे जमीपर या चित्रपटातील ' तुझे सब हैं पता मेरी माँ ' ऐकताना मी खूप रडलो आहे. अजूनही ती गाणी लागली की डोळ्यात अश्रू उभे राहतातच. पण मी किती वेळा आईजवळ बसलो ? तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपलो ? तिला किती वेळा म्हटले की आई तू मला खूप आवडतेस ! तू मला हवी आहेस ! आई आहे, मातृछत्र आहे, अजून आहे हे माझे केवढे भाग्य ! अजूनही मी तिच्याजवळ गेलो की लहान होतो. मांडीवर डोके ठेवून काही क्षण पडून राहतो. तीही प्रेमळपणे माझ्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवते. जगातली सर्व दुःख, ताप हरण करण्याचं सामर्थ्य तिच्या त्या प्रेमळ हातात आहे. पण पूर्वी मी असे काही क्षण फुकट दवडलेच ना...! जीवनात असे अनेक प्रसंग येतात. त्या प्रसंगी नियती तुमच्याकडून परतफेडीची अपेक्षा करत असते. तुम्ही नाही दिले तर त्यावेळी काही फारसे बिघडत नाही. पण ते ऋण तुमच्यावर, तुमच्या नावावर जमा असते. त्याचे व्याजही वाढत जाणारे असते. परवा एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो. त्यांच्यासाठी एक पुस्तक भेट म्हणून दिले. काहीतरी खायला म्हणून घेऊन गेलो. पण गेलो तेव्हा अचानक कळले की त्या दिवशी त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे. त्यांनी त्याला बोलावून मला नमस्कार करण्यास सांगितले. तो मुलगाही मोठा गोड आणि आज्ञाधारक होता. त्याने लगेच नमस्कार केला. मीही त्याला ' आयुष्यमान हो, खूप मोठा हो...' म्हणून आशीर्वाद दिला. मुलगा निघून गेला. पण नंतर मला लक्षात आले की त्या मुलासाठी आपण काही आणू शकलो नव्हतो तरी काहीतरी पैसे त्याला वाढदिवसाची भेट म्हणून देता आले असते. पण वेळ निघून गेली होती. आता मी पुन्हा कधीतरी जाईन तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी घेऊन जाईनच हा भाग वेगळा पण ती वेळ, तो दिवस आता पुन्हा थोडाच येणार आहे ! इथेसुद्धा गेले द्यायचे राहून... असे खूप प्रसंग घडतात. कधी कधी रस्त्याने एखादी भिकारीण कडेवर असलेल्या मुलासह आपल्याकडे दीनवाणेपणाने याचना करीत असते. पण आपल्यातला व्यवहारी माणूस आपल्याला सांगतो, ' अरे यांचे हेच उद्योग असतात. काही काम करत नाहीत. वगैरे वगैरे. ' मग आपण सराईतासारखे त्याकडे दुर्लक्ष करतो. नंतर मला वाटत राहतं की आपण दवाखान्यात डॉक्टरांनी मागितले तेवढे पैसे दिले, मेडिकलवर सांगतील तेवढ्या पैशांची औषधे घेतली. हजार दोन हजार हॉटेलचं बिल दिलं, शे दोनशे रुपये आईस्क्रीमवर खर्च केले. पण दोन पाच रुपयांसाठी आपला हात खिच्याकडे गेला नाही. विंदा करंदीकर आपल्या ' माझ्या मना बन दगड ' या कवितेत म्हणतात हा रस्ता अटळ आहे ! अन्नाशिवाय, कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको, डोळे शिव! नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास छातीमधे अडेल श्वास, विसर यांना दाब कढ माझ्या मना बन दगड! तसं तर झालं नाही ना...! खरंच दगड बनलं का माझं मन ! नाही व्हायचं मला दगड नाही व्हायचं व्यवहारी देऊन टाकायचं हे देणं नको जिणं कर्जबाजारी किती राहिली वर्षे बाकी नाही कुणाला ठाऊक देऊन टाकावं नक्षत्रांचं देणं एवढंच आता ठाऊक...! *© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२* ( *कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा* ) #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #☕good morning Friends🌞 #सुप्रभात
_*स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल ना तर चार चौघांमध्ये कौशल्य दाखवा..! लायकी नाही..!*_ _*परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरू आहे. कारण आयुष्यात जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोण शिकवू शकत नाही..!*_ 🌹 शुभ सकाळ 🌹 #सुप्रभात #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
सुप्रभात - aR [ *परद यष्यात परिस्थिती 33 aR [ *परद यष्यात परिस्थिती 33 - ShareChat
. *🌹विचार सुमने🌹* *©️®️ राजश्री (पूजा),* *कोल्हापूर : ०१.०३.२०२६* *कधी कधी वाटतं की आपल्या आजूबाजूचा आसमंत आपल्याला अलग न ठेवता त्याच्यामध्ये मिसळून जाण्यासाठी हात पसरून खुणावतोय... त्याच्याशी जुळणाऱ्या व्हाइब्ज शोधण्याचे आवाहन करतोय... आणि असं वाटत असतानाच अचानक एखादी वाऱ्याची हलकीशी झुळूक आपल्याशी खेळून जाते आणि सर्वांगावर शिरशिरी येते. मनातली सगळी भीती, शंका- कुशंका कुठल्या कुठे विरघळून जातात आणि मग आपल्याही नकळत आपण या निसर्गाचा भाग होऊन त्याच्याशी संवाद साधतो.* *या वाऱ्याच्या झुळकी सारखीच काही माणसं अशीच अलगदपणे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या जीवनाचा एक भागच बनून जातात. कळत नकळत त्यांची आपली केमिस्ट्री छान जुळते. ती इतकी सुंदर असते ना की जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत की काय असं वाटायला लागतं..!!! अक्षरशः एखाद्या आयसीयू मधल्या पेशंटला अचानक ऑक्सिजन मिळून त्याला जीवदान मिळतं तशी असतात ती माणसं... अगदी ऑक्सिजन सारखी..!!!* *अशी जी माणसं मनात खोलवर रुजतात, त्यांचे फोटो मनाच्या कॅमेऱ्यात कैद होतात.* *©️®️ राजश्री (पूजा)* . #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #☕good morning Friends🌞 #सुप्रभात
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🕉ओम नमः शिवाय #🙏महादेव भक्त #🙏केदारनाथ मंदिर🛕 #🙏महाकाल
☘️हर हर महादेव🙏🏼 - श्री कपालेश्वर भगवान की जय श्री कपालेश्वर भगवान की जय - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ - ೪೦೬ಲ 3 श्री कपालेश्वर भगवान की जय ೪೦೬ಲ 3 श्री कपालेश्वर भगवान की जय - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺
☀️गुड मॉर्निंग☀️ - 16 Saturdoy उचक्यान। पण TRUECAULER शिस्टिम अत्ायल। पाहिज़े होती म्हणंजे निदान कळल अ्षत नेमकं कोण आ्रषवण काढतंय =5 C 0074 16 Saturdoy उचक्यान। पण TRUECAULER शिस्टिम अत्ायल। पाहिज़े होती म्हणंजे निदान कळल अ्षत नेमकं कोण आ्रषवण काढतंय =5 C 0074 - ShareChat