विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
*उगवतीचे रंग* *मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १२* मना मानसी दुःख आणू नको रे| मना सर्वथा शोक चिंता नको रे| विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी| विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२| *अर्थ* : हे मना ( मानवा ) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा ( आनंदाचा ) भोग घे. *विवेचन* : आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु 'गतं न शोच्यम्' म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे. देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात.आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का ? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो. जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते 'बरे झाले देवा, निघाले दिवाळे...' असे म्हणू शकले. समर्थ या श्लोकात आपल्याला ' विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी' असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच ! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी. *स्वसंवाद* • मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का? • भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का? • देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का? • विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का? • माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का? ( क्रमशः ) © *विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव* दि. ०४/०३/२०२६ *प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२* ( *कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा* ) #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞
#☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ - *नशिबाच्या* सगळ्याच *सोंगट्या* आपल्या মনাসমাতা* * पडतीलच असं नाही, पण *जशा* पडतील *तशाही* परिस्थितीत आयुष्याचा* *जिद्द* ही असावीच लागते...! ভাব তিব্ধ0যানী शुभ सकाळ *नशिबाच्या* सगळ्याच *सोंगट्या* आपल्या মনাসমাতা* * पडतीलच असं नाही, पण *जशा* पडतील *तशाही* परिस्थितीत आयुष्याचा* *जिद्द* ही असावीच लागते...! ভাব তিব্ধ0যানী शुभ सकाळ - ShareChat
🌅 *" आजचा सुंदर विचार "* _*1) किंमत आणि वेळ यांची गंमतच असते. ज्यांच्या बद्दल मनात किंमत असते ते आपल्यासाठी वेळ देतीलच असे नसते. तर.. ज्यांना आपण वेळ देतो ते आपली किंमत ठेवतीलच याची खात्री नसते.*_ _*2) एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात कारण दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे.*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞* *🙏🏻वैचारिक सकाळ😊* •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• #☕good morning Friends🌞 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺