विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
_*काही माणसांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची एक विचित्र घाई असते.त्यांना असं वाटतं की,समोरच्याच्या अंगावर चिखल उडवला की आपला पांढरा शुभ्र शर्ट जास्त उठून दिसेल.पण दुर्दैवाने,दुसऱ्याच्या दोषांवर बोट ठेवल्याने आपलं चारित्र्य उजळत नाही,तर आपली संकुचित वृत्ती मात्र जगासमोर उघडी पडते.खरं तर,ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वभावावर पूर्ण विश्वास असतो,त्याला कुणालाही कमी लेखण्याची गरजच उरत नाही.जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या चुका काढण्यात,त्यांचे दोष मोजण्यात आणि ते किती चुकीचे आहेत हे सांगण्यात धन्यता मानते,तेव्हा समजून घ्यावं की त्या व्यक्तीच्या आत कुठेतरी एक मोठी पोकळी आहे.ही पोकळी भरून काढण्यासाठी ती नकारात्मक श्रेष्ठत्वाचा आधार घेते.दुसऱ्याचा दिवा विझवून आपल्या घरात प्रकाश पडेल,हा विचारच मुळात चुकीचा आहे.पण अशा स्वभावाच्या लोकांना हे उमजत नाही की,उंची वाढवायची असेल तर ती स्वतःच्या कष्टाने आणि गुणांनी वाढवायची असते,दुसऱ्याचे पाय खेचून मिळालेली उंची ही आभासी असते आणि ती फार काळ टिकत नाही.खरे मोठेपण हे चंदनासारखं असतं,ज्याला ओरडून सांगावं लागत नाही की;'मी सुगंधित आहे 'त्याचा दरवळ आपोआप आजूबाजूच्या वातावरणात पसरतो.दुसऱ्याला तुच्छ लेखून मिळवलेलं हे तथाकथित मोठेपण म्हणजे केवळ अहंकाराचा एक फुगा असतो,जो सत्याच्या एका टाचणीने कधीही फुटू शकतो.माणसाने हे विसरता कामा नये की,समोरच्याच्या उणिवा दाखवणं सोपं असतं,पण स्वतःच्या चुका मान्य करून त्या सुधारणं हेच खऱ्या मोठ्या मनाचं लक्षण आहे.​आयुष्यात जर खरंच मोठं व्हायचं असेल,तर कुणाला तरी पाडून किंवा मागे सारून पुढे जाण्यात काय अर्थ?त्यापेक्षा कोणाचा तरी आधार बनून,कुणाला तरी सावरून जे समाधान मिळतं,ते कोणत्याही सिद्ध केलेल्या मोठेपणापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असतं.शेवटी इतिहास त्यांचंच नाव लक्षात ठेवतो ज्यांनी इतरांच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रकाश पेरला,ज्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ आणि अहंकार जपला त्यांना काळ कधीच माफ करत नाही.म्हणूनच,दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा स्वतःमधलं माणूसपण शोधण्यात जास्त आनंद आहे.*_ _*"मित्रांनो;काळजी घ्या. ..."*_ #☕good morning Friends🌞
☕good morning Friends🌞 - काही माणसांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची एक विचित्र घाई असते.त्यांना असं वाटतं की समोरच्याच्या अंगावर चिखल उडवला की आपला पांढरा शुभ्र शर्ट जास्त उठून दिसेल.पण दुर्दैवाने दुसऱ्याच्या दोषांवर बोट ठेवल्याने आपलं चारित्र्य उजळत नाही,तर आपली संकुचित वृत्ती मात्र जगासमोर उघडी पडते खरं तर ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असतो त्याला कुणालाही कमी आणि स्वभावावर लेखण्याची गरजच उरत नाही जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या चुका काढण्यात त्यांचे दोष मोजण्यात आणि ते किती चुकीचे आहेत हे सांगण्यात धन्यता मानते, तेव्हा समजून घ्यावं की त्या व्यक्तीच्या आत कुठेतरी एक मोठी पोकळी आहे॰ही पोकळी भरून काढण्यासाठी ती नकारात्मक घेते दुसऱ्याचा दिवा ' fagq श्रेष्ठत्वाचा आधार आपल्या घरात प्रकाश पडेल,हा विचारच मुळात चुकीचा आहे.पण अशा स्वभावाच्या लोकांना हे उमजत नाही की,उंची वाढवायची असेल तर ती स्वतःच्या कष्टाने आणि गुणांनी वाढवायची असते, दुसऱ्याचे पाय खेचून मिळालेली उंची ही आभासी असते आणि ती फार काळ टिकत नाही.खरे ओरडून सांगावं मोठेपण हे चंदनासारखं असतं, ज्याला की;'मी सुगंधित आहे '्त्याचा दरवळ आपोआप लागत नाही पसरतो दुसऱ्याला तुच्छ लेखून आजूबाजूच्या वातावरणात मिळवलेलं हे तथाकथित मोठेपण म्हणजे केवळ अहंकाराचा एक फुगा असतो,जो सत्याच्या एका टाचणीने कधीही फुटू शकतो माणसाने हे विसरता कामा नये की,समोरच्याच्या उणिवा दाखवणं सोपं असतंपण स्वतःच्या चुका मान्य करून त्य़ा सुधारणं हेच खऱ्या मोठ्या मनाचं लक्षण आहे.आयुष्यात जर खरंच मोठं व्हायचं असेल तर कुणाला तरी पाडून किंवा पुढे जाण्यात काय अर्थः्त्यापेक्षा कोणाचा तरी TTT TFT काही माणसांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची एक विचित्र घाई असते.त्यांना असं वाटतं की समोरच्याच्या अंगावर चिखल उडवला की आपला पांढरा शुभ्र शर्ट जास्त उठून दिसेल.पण दुर्दैवाने दुसऱ्याच्या दोषांवर बोट ठेवल्याने आपलं चारित्र्य उजळत नाही,तर आपली संकुचित वृत्ती मात्र जगासमोर उघडी पडते खरं तर ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असतो त्याला कुणालाही कमी आणि स्वभावावर लेखण्याची गरजच उरत नाही जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या चुका काढण्यात त्यांचे दोष मोजण्यात आणि ते किती चुकीचे आहेत हे सांगण्यात धन्यता मानते, तेव्हा समजून घ्यावं की त्या व्यक्तीच्या आत कुठेतरी एक मोठी पोकळी आहे॰ही पोकळी भरून काढण्यासाठी ती नकारात्मक घेते दुसऱ्याचा दिवा ' fagq श्रेष्ठत्वाचा आधार आपल्या घरात प्रकाश पडेल,हा विचारच मुळात चुकीचा आहे.पण अशा स्वभावाच्या लोकांना हे उमजत नाही की,उंची वाढवायची असेल तर ती स्वतःच्या कष्टाने आणि गुणांनी वाढवायची असते, दुसऱ्याचे पाय खेचून मिळालेली उंची ही आभासी असते आणि ती फार काळ टिकत नाही.खरे ओरडून सांगावं मोठेपण हे चंदनासारखं असतं, ज्याला की;'मी सुगंधित आहे '्त्याचा दरवळ आपोआप लागत नाही पसरतो दुसऱ्याला तुच्छ लेखून आजूबाजूच्या वातावरणात मिळवलेलं हे तथाकथित मोठेपण म्हणजे केवळ अहंकाराचा एक फुगा असतो,जो सत्याच्या एका टाचणीने कधीही फुटू शकतो माणसाने हे विसरता कामा नये की,समोरच्याच्या उणिवा दाखवणं सोपं असतंपण स्वतःच्या चुका मान्य करून त्य़ा सुधारणं हेच खऱ्या मोठ्या मनाचं लक्षण आहे.आयुष्यात जर खरंच मोठं व्हायचं असेल तर कुणाला तरी पाडून किंवा पुढे जाण्यात काय अर्थः्त्यापेक्षा कोणाचा तरी TTT TFT - ShareChat
*‼️🙏जीवनाचं कटू सत्य‼️🙏* *आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या इमल्यातून "मेल्यावर" तासात उचलण्याची नातेवाईकांचीच घाई असतें* *माणसाने आपल्या सुखासाठी बांधला कोटी'चा बंगला, त्यात तोंड दिसावं अशी फरशी, फरशीवर मखमली गालीचा नेत्रदिपक रोषणाई आणि झुंबर, डोळ्याचं पारणं फिटणारं फर्निचर, बंगल्यात, झोपायला मास्टर बेडरूम !, त्यावर लुसलुशीत गादी, झगमगीत मँचिंग बेडशीट !* *"शव" दवाखान्यातून घरी आणाल्यावर जुनी-पुराणी लोखंडी खाट, त्यावर फाटकच बेडशीट,कव्हर फाटलेली मळकीच उशी असे वैभव असून सुख मिळाले का?, शेवटी सर्व करून एक दिवस शेवट होऊन मृत्यू होतो.* *बंगल्यातल्या देव्हाऱ्यात चांदीचे निरंजन, सुगंधी अगरबत्ती, सुवासिक धुप असतें हे सारे वैभव तिथेच राहते.* *मात्र मृत्युंनंतर शवाशेजारी शेवटी लावतात जुनं "पितळच" निरांजन, अन् पाच रूपयांचीच "अगरबत्ती"* *आपण बांधलेल्या 2 कोटीच्या, बंगल्यात 5 लाखाचं बाथरूम, त्यात आंघोळीला टबबाथ, गरम पाण्याचा शाँवर, सुंगधी साबण आणि शांपू, चारी बाजूंनी आरशे. महागडी बाथरूम बांधली तरी !, शेवटी तुम्हाला त्याचा उपयोग शून्यच!* *शेवटचा कार्यक्रमी बघा. तुमचं आंघोळीचं पाणीसुध्दा ओलांडू नये असा कारभाऱ्यांचा आदेश असतो. आंघोळीचं पाणी तापतयं उघड्यावर,? "शेवटची" आंघोळ "रस्त्यावर" आंघोळीच्या साबणाची पाच रूपयाचीच वडी! असं कोणी म्हणत नाही की त्याची शेवटची आंघोळ शाँवरखाली होऊ देत !, आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे, शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस, नका महागाईचा आणू, असे होते फर्मान!, मांजरपाटचा तीन बटणी शर्ट, नाडीचाच "लेंगा", आयुष्यभर घातली हँट, तरी गांधी बाबाचीच टोपी. असं कोणाला वाटत नाही की त्यांनी जन्मभर ब्रँडेड कपडे वापरलेत, ब्रँडेडच आणा ! त्यानचं कमावलयं !* *आलिशान बंगल्यच्या दारात 40 लाखाची गाडी, त्यावर चालक ड्रेसधारी, ऐटीत बसून पुढे, लोकांना हात हातवारे करी, ४० लाखाच्या गाडीचा शेवटी तुम्हाला उपयोग शून्य असतो.* *शेवटी स्मशानात जाताना, पालिकेचीच गाडी आणी पालिकेचाच चक्रधारी. असं कोणी म्हणालेलं मी ऐकले नाही की, आयुष्यभर ४० लाखाच्या गाडीत फिरला, त्यातूनच स्मशानात घेऊन जा* *राजा असो वा रंक, गरीब असो वा श्रीमंत, एकसारखीच "वारी" चारच खांदेकरी ! आणि एकच "मडक" धरी!! एखाद्याच्या वाट्याला "चंदन" कोणा मिळे "बाभळ" कुणाच्या नशीबी "तुपाचा" मारा, कोणावर "पडे" राँकेलचा "फवारा" रक्षाचा रंग मात्र राखाडी...!!* *स्मशानातलं ठरलेले "डायलाँग" काय आहे या जीवनात मोकळं यायचयं ! मोकळचं जायचयं !! कोट्यावधी कमावले ! पण बरोबर काय घेऊन गेला !!* *मी एवढ्यासाठी हे मांडतोय की माणसानं जरूर कमवावं, माणसानं जरूर अलिशान बंगले बांधावेत ! माणसानं जीवन, सुखा-समाधानानं जगावं, जीवनातल्या सुखांचा पुरेपुर आनंद लुटावा !, पण सत्तेचा आणी मालमत्तेचा कधीच माज करू नका, तुमच्या जवळ किती पैसा आहे, तुमची कीती इज्जत आहे, तुमच समाजात काय स्टेटस आहे, याच्याशी कोणाला काही घेणे देणे नाही, घेणे देणे आहे, तुमच्या स्वभावाशी, तुमच्या वागणूकीची, तुमच्या स्वभावातील विनम्रतेशी, कधीच पद, पैसा, प्रतिष्ठा याचा गर्व करू नका, आपल्या पेक्षा चांगले चांगले आले व गेले हे लक्षात असु द्या. शेवट सोबत काय नेणार आपण तर आपले चांगले कर्म, बाकी काही नाही!! माझा बंगला झाला, माझ्या मित्राचा व्हावा, अशी विचारधारा ठेवा...!* *अनाथांचे "नाथ" बना ! गोर-गरीबाला मदत करून त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करा !, जीवनात एखादं काम असं करा की तुमची पुढची पिढी ती "आठवण" करील !, परोपकारी बना !, कमावलेल्या रकमेतली ठराविक रक्कम, समाजोन्नतीसाठी खर्च करा !* *ज्याला हे समजले त्याला जीवनातलं रहस्य समजले !, अशा पध्दतीने वागेल तो खरा माणूस !!, असं मला वाटतयं !, तुम्हाला काय वाटतय देव जाणे !! मला जे खारी वस्तुस्थिती आहे वाटले ते मांडले, तुम्हाला जर चांगले वाटले असेल तर मित्रांना पाठवा !चुकीचं वाटत असेल तर मला मुर्ख म्हणून सोडून द्या....!* *मी विव्दान नाही !सरळ-साधा माणूस ! चुकून काय चुकलचं, तर आपुलकीनं माझी जाहीर माफी...!* *ॐ नमःशिवाय* *!!सर्वांना राम कृष्ण हरी!!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *श्री स्वामी समर्थ* *समाजातील प्रामाणिक, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन सावध व दूर रहा, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.* ☘️🌹🍁☘️🌹🍁🌻👍🤝💐 🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #सुप्रभात #☕good morning Friends🌞
#☕good morning Friends🌞 #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️
☕good morning Friends🌞 - *संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या आणि समाधानी असला घरात असू द्या तो फक्त सुखी पाहिजे माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखाच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये कारण सुखाला अंत नाही म्हणूनच माणूस शांत नाही॰ *संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या आणि समाधानी असला घरात असू द्या तो फक्त सुखी पाहिजे माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखाच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये कारण सुखाला अंत नाही म्हणूनच माणूस शांत नाही॰ - ShareChat