*🚩वैशाख शुक्ल 3/4 शके 1948🚩*
_*शुभ सकाळ. राष्ट्र सर्वोपरी. जय हिंद। 🇮🇳🫡*_
लेखिका संध्या बेडेकर यांच्या कथा/ लेख या आयुष्य जगतांना मार्गदर्शक ठरतील अशाच असल्याने दर सोमवारी मी त्यांची कथा किंवा लेख सामायिक करीत असतो. त्यांतील, कौटुंबिक वातावरणाचा आधार घेत जीवनाविषयी सकारात्मक विषयमांडणी व जटील समस्या सहज सुटतील अशी शब्द रचना आपल्याला मार्गदर्शक ठरते असे वाटते. बाकी वाचकांच्या प्रतिक्रिया सांगतीलच.
_'आयुष्य म्हणजे काही पेन ड्राईव्ह नाही की त्यात आपल्याला आवडणारी गाणी/प्रसंग सेव्ह करायचे आणि आपल्या मर्जीनुसार, तीच गाणी ऐकायची. आयुष्य म्हणजे रेडिओ आहे. जे गाणं लागेल ते ऐकावंच लागेल.'-_ आजच्या लघुकथेतून.
_'प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो. मीठ आणि साखरेचा रंग एकच असतो. काही निर्णय नियतीने आधीच ठरविलेले असतातच. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार चातुर्याने जीवन जगत असलो तरी काही निर्णय, यश, अपयश, संकटे, संघर्ष स्विकारावे लागतातच. काही विचित्र घटनाही घडतातच.'_ - हे ही आजच्या लघुकथेतून.
_-मेघःशाम सोनवणे 9325927222._
--*🌼*--
_*आयुष्याचे निर्णय -*_
_लेखिका - संध्या बेडेकर._
आयुष्याचं पुस्तक कितीही जुन झालं तरी आठवणींची पानं तशीच राहतात.
आज अजय आनंदी चा लग्नाचा पाचवा वाढदिवस. पाच वर्षांपूर्वी या दिवशी जे घडलं होतं ते तसच्या तसं आज आठवलं.
त्याही दिवशी अशीच ताईची भिशी पार्टी होती. सर्व जेष्ठ मैत्रीणींसाठी मनोरंजन म्हणा किंवा एकमेकांना भेटायला काही तरी कारणं लागतात ना, त्यातलं हे एक कारण. एकीकडे जमायचं, गप्पा, खाणंपिणं याला उधाण आलेलं असतं. गप्पांचे तर अनेक विषय असतात. त्या गप्पांचा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत क्रम लावायचा विचार केला तर ती एक अशक्यच गोष्ट म्हणता येईल. गप्पा कुठून सुरु झाल्या आणि गप्पांचा प्रवास कसा झाला हे क्रमवार सांगता येणाऱ्यांना बक्षीसच मिळालं पाहिजे. म्हणजे त्याच्या स्मरणशक्तिची दादच द्यायला हवी, नाही का ? बरे असो.
मी ताई पेक्षा तीन वर्ष लहान. ताईंच्या मदतीला नेहमी हजर असते. आज ताईचीच भिशी म्हणजे मी येथे आहेच. मी आपलं स्वयंपाक घरातील कामाबरोबरच मधून मधून गप्पांमध्ये पण भाग घेतच होते.
मागच्याच महिन्यात जाधवताईंकडे त्यांच्या मुलांचे लग्न झाले. त्यामुळे आज तोच विषय प्रामुख्याने बोलण्यात होता. लग्न म्हंटलं तर बायकांच्या अत्यंत आवडीचा विषय. म्हणजे Unlimited गप्पा. त्यावर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, अनुभव, इकडचे तिकडचे ऐकलेले किस्से, सुनांचे प्रकार, फॅशन चे नवनवीन प्रकार, मग ते किस्से रंगवून त्यात तिखट मीठ आणि मिरपूड, मसाल्याची भर पडतेच. लग्नाच्या सध्याच्या विविध पद्धती, फोटो शूट, खरेदी, लग्नात होणारा खर्च म्हणजे, destination weddings, वगैरे वगैरे अशा अनेक गप्पा.
'आमच्या वेळेस असं काही नव्हतं' असं म्हणताना कधी कधी एखादीच्या चेहऱ्यावर थोडी निराशा मी झळकते. बरे असो, 'ऐकावे ते नवलच !!', 'ऐसा भी होता है !!', 'अरे ! हो का ?? बापरे !!', 'कठीणच आहे देवा !!' अशी अनेक उद्गारवाचक वाक्यं ही मधून मधून ऐकू येतातच.आणि ज्यांच्या घरी सून येण्याची तयारी सुरू असते, त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग तर प्रत्येक किस्सा ऐकल्यावर बदलताना दिसतात. म्हणजे 'अशी सुन आपल्या घरी आली तर ?' असा भाव प्रत्येक किस्सा ऐकल्यावर चेहऱ्यावर दिसतो. एखाद्या चांगल्या गुणी सुनेची कथा ऐकताना नकळत देवाजवळ 'हे देवा!! एखादी अशीच आमच्या घरी पण येऊ दे रे बाबा' अशी मनोमन प्रार्थना ही होत असावी बहुतेक.
मी ताई कडे बघत होते. आता अजय साठी पण वधु संशोधन सुरू आहेच. आमची ताई म्हणजे 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे' हा नियम पाळणारी. त्यामुळे ऐकलेल्या गोष्टींमधून न गोंधळता काय घ्यायचे, काय नाही, कुठे केंव्हा सतर्क रहायचे, हा निर्णय तिला सहज घेता येतो. तीचे विचार क्लीअर असतात. आता नवीन जनरेशनच्या मुली वेगळ्या असणारच. त्यांचे विचार, राहणी आपल्या सारखी कशी काय असेल ? काळाप्रमाणे बदल होत असतात. घरच्या ज्येष्ठांना सर्व बदल आवडतातच असं नाही. काही पचतात, काही नाही. काही बदल ते सहर्ष स्वीकार करतात. तेंव्हा काही न आवडणारे नवीन बदलही सहज स्वीकारावे.
या सर्व मैत्रिणींच्या गप्पा ऐकून ताईने आपले होमवर्क केले आहे. त्यामध्ये पहिले काम म्हणजे नवीन येणाऱ्या मुलीला वेळ द्यायचा, तिला कशाची आवड आहे ? काय आवडत नाही ? याकडे लक्ष देणे. स्वयंपाक जमत असेल तर ठीक. नाहीतर हळूहळू शिकविणे. जे जसं करेल त्याला छान म्हणणं. 'मला तरी आजही सगळं कुठे येतं ? किती दा तरी केलेला तोंडली भात, अजूनही प्रत्येक वेळेस यु टयुबवर बघूनच करते, तरी प्रत्येक वेळी चव वेगळीच असते. अजूनही रव्याचे लाडू जमतीलच अशी खात्री असते का?? कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करायची नाही. 'घरच्या बायका नेहमी आनंदी असाव्यात' हा नियम देशमुखांकडे आधीपासूनचाच आहे. तोच पूढे ही चालू ठेवायचा हे ही ठरलेलं आहेच.
Happy wife = Happy Life हे सूत्र ताईला छान कळलंय. Perfect 10 आजपर्यंत कधी कोणी भेटलंय का ? प्रत्येक, जण आपल्या स्वभावानुसार दुसऱ्याला मार्क्स देत असतो. कोणी फक्त रूप बघतं, तर कोणी पैसा, तर कोणी शिक्षण तर कोणी अजून काही.
एखाद्याच्या नजरेला फक्त चांगल्याच गोष्टी दिसतात, तर एखादा missing tyle syndrome या आजाराने ग्रस्त असतो तर तो शोधून शोधून चूकाच काढतो. एखाद्याला अनेक गोष्टी मनोमनी आवडलेल्या असतात, पण कौतुक करणे त्यांच्या स्वभावातच नसतं. असे फक्त तिरक्या नजरेने बघणारे बरेच असतात. असे लोक फक्त स्वतःचेच कौतुक करण्यात विश्वास ठेवतात. थोडक्यात काय ? कोणी कोणाला खुश करू शकत नाही. त्या प्रयत्नात/भानगडीत पडूच नये हे आयुष्याचं साधं सरळ सोपं गणित आहे. ते जेवढ्या लवकर समजेल तेवढं चांगलं. आणि हे सूत्र, हा नियम प्रत्येक ठिकाणी/क्षेत्रात लागू पडतो.
मला आणि माझ्या परिवाराला काय आवडते हे महत्त्वाचे. बाकी अशा चर्चा फक्त enjoy करायच्या.
आयुष्य म्हणजे काही पेन ड्राईव्ह नाही की त्यात आपल्याला आवडणारी गाणी/ प्रसंग सेव्ह करायचे आणि आपल्या मर्जीनुसार, तीच गाणी ऐकायची. आयुष्य म्हणजे रेडिओ आहे. जे गाणं लागेल ते ऐकावंच लागेल.
आपणच सर्व बघून एक मुलगी पसंत करतो. मग तिला सर्व गुणदोषांसकट आपलं म्हणायचं. आपणच आधी पूढाकार घ्यायचा. माझ्या मते मुलांचे लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या चॅप्टरची सुरुवात असते. ती छान करावी ना. आधीच दुसऱ्यांचे ऐकून काही तरी विचार करायचा ? त्यापेक्षा आपल्या पाटीवर 'श्री' लिहून पाटी कोरी करकरीत ठेवावी.
मी म्हंटलं, "ताई !! वधू संशोधन प्रकरण सोपं दिसत नाहिये."
ताई म्हणाली, "हो, खरंय गं. अगं!! प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो. मीठ आणि साखरेचा रंग एकच असतो. काही निर्णय नियतीने आधीच ठरविलेले असतातच. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार चातुर्याने जीवन जगत असलो तरी काही निर्णय, यश, अपयश, संकटे, संघर्ष स्विकारावे लागतातच. काही विचित्र घटनाही घडतातच.
म्हणतात ना, कधी कधी वास्तु तथास्तु म्हणत असते. बोलायला घडायला एकच गाठ पडली की काय माहित नाही. आज अजय ऑफिस मधून आला आणि त्याने एक अनापेक्षित बातमी दिली. वधू संशोधनावर एक प्रश्न चिन्हं ? आणि बरोबर फूलस्टाॅपही लागला बहुतेक.
अजय म्हणाला, "आई, बाबा!! खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायचा विचार करत होतो. तुमची मुलगी शोधण्याची उत्सुकता मी बघत होतो. पण माझा निर्णय झाला आहे."
"अरे व्वा !! छान".
"अरे छान !! आमचे श्रम वाचविलेस तू.
बरं आता सांग, कोण ती ? काय नाव ? गाव ? आडनाव? वगैरे वगैरे."
"आई ! अगं थांब, मी फोटो दाखवतो. माझ्याच ऑफिस मध्ये आहे. आनंदी जोशी."
"अरे व्वा !! फोटो तर छानच आहे."
अजय म्हणाला, "मुख्य गोष्ट सांगायची आहे.आनंदी डायव्होर्सी आहे."
आता मात्र सगळे एकदम गप्प झाले.
बाबा म्हणाले, "अरे ! ही बातमी थोडी धक्कादायक आहे हे नक्की. आपण शांतपणे चर्चा करू. तुझी बाजू समजून घेऊ. एकदम याबाबत आत्ताच काही बोलायचे नाही. घाईघाईत चर्चा करणं बरोबर नाही. आत्ता या घटकेला कोणाचेच मन शांत नाही. गुंतागुंत झालेल्या मनात गुंतलेल्या गोष्टींचा गुंता सोडविणे आवश्यक आहे.
अजय ! तू हुशार मुलगा आहेस. अभ्यासातील हुशारी आणि संसार करताना लागणारी समझदारी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अरे !! अगदी ३६ गुण जुळण्याची गरज नसते, दोन चार महत्वाचे गुण जमले पाहिजेत हे नक्की. सर्वसाधारण केस पेक्षा ही केस वेगळी आहे एवढंच. आपण लवकरच या बाबतीत बोलू. आमचा अनुभव, पूढे येऊ शकणारे प्रश्न, यावर चर्चा करू. तुझा आनंद आमच्या साठी महत्वाचा आहे हे नक्की.
गणपती बाप्पा समोर बसून चर्चा करू. तो नक्कीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल."
बाबांनी गंभीर परिस्थितीला सांभाळलं.
आई बाबांना आज रात्री झोप न येण्याचे कारण वेगळेच आहे. दोघेही अस्वस्थ आणि रात्र भर जागे होते. ताईने आपल्या गृहपाठात या विषयाचा विचार केलाच नव्हता. तिच्या सर्वसाधारण आयुष्यात असाही चॅप्टर असेल, असं तिच्या ध्यानीमनी नव्हतंच. ताईच्या सुने बद्दल केलेल्या होमवर्क मध्ये असं काही घडेल, यावर दूर दूर पर्यंत तिने विचार केला नव्हता. समोर एक मोठं आव्हान होतं.
आज भाऊजींनी 'घर सभा' घेतली. ताईची मुलगी, जावई या अशा सभेत असतातच. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य असते आणि त्यांच्या मताचा विचारही होतो. तसा भाऊंजींनाही प्रश्नच पडला, चर्चा कुठून सुरु करावी ते ?
भाऊजी म्हणाले, "अरे अजय ! आधी तुला या मुलीबद्दल, म्हणजे आनंदी बद्दल जी माहिती आहे ती सर्व सांग. अगदी मनमोकळेपणाने, काहीही न लपवता.
फारकतीचे कारण तर कळलेच पाहिजे."
अजय म्हणाला, "एका दुराचारी व्यक्ती बरोबर तिचे लग्न झाले. ती एक फसवणूक होती. त्या लग्नाचा बेसच खोट्यावर आधारित होता. लग्नानंतर सुधारेल या आशेने त्याचे लग्न आनंदी बरोबर लावून दिले होते. दोन महिन्यातच हे सर्व लक्षात आले. कहर तर तेंव्हा झाला जेंव्हा तिच्यावर त्याने हात उगारला. त्याच दिवशी आनंदी ने डायरव्होर्स चा निर्णय घेतला. या गोष्टीला वर्ष झालं.
आनंदी आणि माझे काही common friends आहेत. वर्षभरापासून मी तिला बघतोय. तिचे वागणे बोलणे, शिस्त चांगली आहे. मी अजून तिला prapose केलेलं नाहीये. उद्या घटस्थापना आहे. तेंव्हा तुम्ही म्हणत असाल तर मी तिला बाकी मित्रांबरोबर घरी बोलवेन. तुम्ही बघा. पूढचा विचार पूढे करू."
त्यानंतर आनंदी घरी आली. सहज वागली. शांत हसमुख आनंदी सर्वांना आवडली. तिला मात्र त्याची कल्पना नव्हती.
त्यानंतर ताई काही तरी कारण काढून अजयच्या मित्रांना घरी, बाहेर भेटली.
खरंतर प्रत्येक भेटीत आनंदी सारख्या मुलीच्या नशीबात असा योग का असावा ? हा प्रश्न प्रखरतेने सर्वांना भेडसावून सोडत होता.
भाऊजींनी अनघाला, म्हणजे अजयच्या मोठ्या बहिणीला आनंदीला भेटून, तिच्या बरोबर बोलून गप्पांमध्ये, झालेल्या घटनेबद्दल चौकशी करायची/ माहिती काढायची जबाबदारी दिली. समवयस्क असल्याने ते सहज होऊ शकेल असा भाऊजींचा समज होता. घडलंही तसंच. हळूहळू दोघींचं फोनवर बोलणं झालं. Shopping ला बरोबर गेल्या. मैत्री वाढली.
सहजच, एक दिवस अनघाने विचारलेच. तेंव्हा आनंदी ने सांगितले ते असे,
'फक्त दोन महिने ते एकत्र होते. तो काळ खूप भयंकर होता. Accepting the situation is the best way to move forward. स्विकार करणे हा जीवनाचा पहिला मंत्र आहे या आशेवर सर्व होईलही पूढे व्यवस्थीत कदाचित, फक्त सध्या ते आपल्या मनासारखे होत नाहिये असं वाटलं मला.. पूढच्या पानावर काही तरी चांगलं लिहिले असेल या आशेने मागची पानं झाकत गेले मी. लग्न म्हणजे भावना आणि वास्तव यात तडजोड तर असतेच. खूपदा भावना बाजूला सारून वास्तव स्विकारावे लागते हे ही समजत होतं मला. तेथे घरच्यांची काहीच साथ नव्हती. situation bad to worse होतं गेली. एका सभ्य घरात कधीही न घडणाऱ्या गोष्टी घडत गेल्या.
एक वेळ अशी आली की मी समोर बघावे की मागे यावर माझे जीवन, सुख दुःख अवलंबून होते. तेंव्हा काही तरी निर्णय घेणं आवश्यक होतं. काही निर्णय विचित्र वाटतात पण आयुष्याला स्थीरता देण्यासाठी घ्यावे ही लागतात..
बहुतेक देवाचा काही तरी इशारा होता तो, नातं जे कधी चांगलं नव्हतंच ते खराबच होत गेलं. बहुतेक पूढचे आयुष्य चांगले असावे, यासाठी तसं होत होत. Self respect comes with lots of goodbyes.I cannot loose my self-respect for someone who don't respect my feelings or emotions.
आज 'डायव्हर्सी' हा शिक्का जरूर लागलाय माझ्या वर, पण मी आनंदी आहे. माझ्या आईवडिलांनी ठेवलेल्या नावानुसार जगतेय मी. अपेक्षा सोडून दिल्यापासून दुःख काय असतं हे मी विसरून गेलेय बघ. माझ्या स्वप्नांना मरण्यापासून वाचविण्यासाठी मी संघर्ष केला. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतल्या आत खूप लढाई लढले मी. आता मात्र मी त्यातून पूर्णपणे बाहेर निघाले आहे..
आता पर्यंत सहज सुरळीत चालू असलेल्या आयुष्यात तो एक ब्रेक होता. काही तरी जून्या कर्माचे भोग असतील. त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला ड्रायव्होर्स लवकर मिळाला.
माझा देवावर विश्वास आहे. तो जो मौसम बदलतो तो माझे नशीब ही बदलू शकतो हा विश्वास आहे माझा. याच आशेवर आहे मी."
"मग आता पूढे काय विचार केला आहेस ? पुन्हा लग्न करणार का ?" अनघाने विचारले .
"माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांची इच्छा आहे. तसे सर्व पुरुष असेच असतात असं माझंही मत नाही. बाबा नेहमी म्हणतात
'Stay strong. Stay positive and Never give up.' आता मात्र तशी वेळ आलीच तर मी काळजीपूर्वक, बघून तपासून अगदी साबण सोडा फिनाईलने धूवून, ब्रशने घासून पूसून, उन्हात वाळवून बघूनच निर्णय घेईन. Always wrong person teaches you the right lesson of life .खरं आहे ना अनघा ?" एवढं बोलून आनंदी छान गोड हसली.
आज अनघाने हा रीपोर्ट घरच्यांना दिला. आनंदीच्या बोलण्यात खूप गोष्टी झळकल्या. तिने सभ्य शब्दात सर्व सांगितले. कुठे ही नकारात्मक नव्हती. guilt नव्हता. निराशा नव्हती. कुठेही लपवाछपवी करतेय, असं वाटलं नाही.
आता next step... आज भाऊजींनी अजयला सांगितले, "अरे आपण अजून सहा महिने घेऊया. तोपर्यंत तू पण विचार कर.
सुरवात positive झाली आहे. अनघाने आनंदीला चागलंच म्हंटलं आहे."
आज अनघाने सहजच आनंदीला फोन करून सांगितले, "अगं !! मी आणि आई येथेच तुमच्या घराजवळ कामाने आलो होतो. येऊ का तु़झ्या घरी चहा घ्यायला ?"
"अरे हो !! या ना."
आज आनंदीच्या आई वडिलांची पण भेट झाली. एक मध्यम वर्गीय सुसंस्कृत परिवार वाटला. फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारून दोघी घरी आल्या.
हळूहळू step by step अजय कडे या दृष्टीने हालचाल सुरू होती. निर्णय पूर्ण विचार करून घ्यायचा होता. अजय आनंदी दोघांच्या दृष्टीने ते आवश्यक होते. अजयची सुरुवात होती तर आनंदी ने याबाबतीत एक भयानक अनुभव घेतला होता.
आज बाबांनी अजयचे काऊन्सिलींग केले. "आनंदीची दया येऊन लग्न करायचे नाही. दुसरं म्हणजे तिच्या भूतकाळाबद्दल घरात, घराबाहेर, कोणाबरोबर, कुठेही चर्चा करायची नाही. कोणी याबाबतीत काही विचारलंच तर तुझ्या उत्तरात आत्मविश्वास असायला हवा, confusion नको. हे सर्वांनाच सांगतोय मी. जर घरच्या सर्वांना हे मान्य असेल तर मी व तुझी आई, आम्ही दोघेही आनंदीच्या घरी जाऊ. तिला या घरात सुनेचा मान मिळाला पाहिजे. आपण आनंदीला सहर्ष स्विकारण्यास तयार आहोत. पण समाजात वावरताना लोकांच्या भुवया उंचावतीलच. अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यायची तयारी ठेवावी लागेल. तेंव्हा जगाबरोबर confidentally लढायची तयारी ठेवा."
हळूहळू एकेक पाऊल पूढे टाकत विचार विमर्श होत गेले. गोष्टी पूढे वाढत होत्या. प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगावर चर्चा होत होती. प्रत्येक वेळेस आनंदीचे मार्क्स वाढत होते.
'डायव्होर्स'. आनंदीच्या आयुष्यातील एक Bad Patch होता. डायव्होर्स होण्यात आनंदीची काहीच चूक नव्हती. हे लग्न म्हणजे काही चूक नसतांना तिला मिळालेली शिक्षाच होती.
खरंतर डायव्होर्स होणे, या गोष्टी आजकाल सहज ऐकू येतायेत. पण जेंव्हा आपल्याच परिवारात अशा गोष्टींचा संबंध येतो, तेंव्हा ती सहज पचविणे कठीण असते.
मला ताईंच्या परिवाराचे कौतुक वाटले. ही बातमी आधी जरी सर्वांना धक्कादायक होती तरी शांतपणे चौफेर विचार करून त्यांनी अजयची इच्छा समजून मान्य केली. या काळात अजयही आपल्या निर्णयावर ठाम होताच.
आज अनघा, आई, बाबा आनंदी कडे गेले. तिच्या आई वडिलांना भेटून रितसर मागणी घातली. बाबा म्हणाले, "जोशी साहेब ! मला सर्व माहीत आहे. आम्ही मागच्या वर्षभरापासून आनंदीला बघतोय. पूर्ण विचार करूनच हा निर्णय आम्ही घेतोय.
वर्षभरापूर्वी अजयने आनंदी बरोबर लग्न करायची इच्छा सांगितली होती. मुख्य म्हणजे अजूनही यातील काहीच आनंदीला माहीत नाही.
जोशी साहेब तुम्ही वेळ घ्या. विचार करा, आनंदी ला विचारा आणि आम्हाला कळवा.
आम्ही आनंदीला आनंदी ठेवू एवढं आश्वासन मी तुम्हाला माझ्या परिवाराकडून देतोय. हा माझा शब्द आहे, आणि माझी जबाबदारी पण."
आज ऑफिसमध्ये अजय आनंदी ने बरोबर लंच घेतला. दोघेही एकदम शांत, फक्त एकमेकांकडे बघत होते. आनंदीच्या डोळ्यासमोर मागच्या वर्ष भरातील अनेक घटना एकानंतर एक आल्या. अजयच्या घरी जाणे, त्याच्या घरच्यांना भेटणे, अनघा बरोबर गप्पा, shopping, अनेक गोष्टी.
अजयने आनंदी ला प्रपोज केले. लवकरच अजय आनंदी चे लग्न होणार आहे.
म्हणतात ना... काही निर्णय नियतीने आधी पासूनच घेतलेले असतात. आयुष्यातील काही गोष्टी या ठरलेल्याच असतात.
_*©®संध्या बेडेकर,*_
वारजे, पुणे, 7507340231.
(आवडल्यास सामायिक करतांना लघुकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. अशा सकारात्मक संदेश असलेल्या कथा, लेख वाचण्यासाठी माझ्या *9325927222* या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधा- मेघःशाम सोनवणे.)
आजची ही लघुकथा स्वतः लेखिका *सौ. संध्या बेडेकर, वारजे, पुणे* यांच्या सौजन्याने.
_*C/P.*_ #☕good morning Friends🌞