
दोन शब्द कृतज्ञतेचे, आभारीय शब्दसुमनांचे.... आज सकाळीच आ. राहुल दादांचा फोन संदेश "तुमचा फोटो पाठवा "वाचण्यात थोड्या वेळाने आला, पण मनाला सुखावून गेला.. का कुणास ठाऊक माहीत नाही.. परंतु मनोकामना पूर्ण होत राही.. कल्पवृक्षचं जणू हा शिलेदार समूह, त्यास अजून तरी तोड नाही...खुपदा मनी वसे ते स्वप्नी दिसे.. सत्यात प्रत्यक्ष अवतरलेले असे...माझ्या बाबतीत तरी घडत गेले आहे. आणि माझी मनिषा पूर्ण झाली आहे. असेच इतरांच्या बाबतीत ही घडत असावे यात तिळमात्र शंका नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. या सप्ताहात माझ्या या पूर्वी "धाक तो धाक" या वास्तववादी काव्य रचनेलाही ' सर्वोत्कृष्ट रचना' म्हणून सर्वोत्कृष्ट रचनेचे स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आणि काल माझ्या 'बोलू या मराठी' या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बालकाव्यास आजची सर्वोत्कृष्ट रचना या सदरात सन्मानित करण्यात आले आहे. आदरणीय राहुल दादांची दूरदृष्टी आणि मराठी भाषेविषयी असलेले अतोनात प्रेम, भाषा विकास व संवर्धन, अभिजात दर्जा मिळवण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम त्यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांच्या समवेत असलेले सर्व शिलेदार समूहातील सह प्रशासक टीम सदस्य यांचीही तळमळ मोलाची आहे. या सिंधूत माझ्यासारख्या बिंदूला माय मराठीची गोडी निर्माण करून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आज मी कविवर्य म्हणून माझा जो नामोलेख होतो ते केवळ आणि केवळ शिलेदार समूहामुळेचं. त्याबद्द्ल मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक, आधारस्तंभ, कल्पवृक्ष, आदरणीय राहुल दादा, सचिव आदरणीय पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक आ. सविताताई ठाकरे. आ. तारकाताई रुकमोडे , आ, स्वातीताई मराडे, आ. वृंदाताई करमरकर, आ.शर्मिलाताई देशमुख, आ. प्रतीमाताई नंदेश्वर, आ. विष्णू दादा संकपाळ, अशोक लांडगे सर, संग्राम कुमठेकर दादा, अरविंद उरकुडे सर यासह सर्व संकलक, परीक्षक, सहपरिक्षक, सह प्रशासक आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. तसेच काव्य लिखाणासाठी प्रेरक प्रतिक्रिया देऊन लिखाणास प्रोत्साहित करून बळ वाढवणाऱ्या शिलेदार समूहातील सर्व ताई दादांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद देऊन सदैव शिलेदार समूहाच्या ऋणात राहणे पसंत करतो. अशीच प्रेरणा पाठीशी राहावी व माय मराठीची सेवा करण्याची संधी उपलब्ध व्हावी. या मनोकामनेसह ईश्वर चरणी प्रार्थना करतो व माझे लांबलेले मनोगत पूर्णविराम देतो. *बी एस गायकवाड* *पालम, परभणी* *सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*

