#संत तुकाराम महाराज बीज 💐💐 #🙏श्री संत तुकाराम महाराज बीज🙏 #संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम बीज 🚩🙏🚩 #🙏श्री संत तुकाराम महाराज बीज🚩
तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.
संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते.
तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.
जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते.
देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
वैकुंठगमनाचा दिवस. नतमस्तक होत महाराजांना माझे कोटी कोटी वंदन !
आह्मी जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! "जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏


