ShareChat
click to see wallet page
search
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २० मार्च इ.स.१६०२ शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इ. स. १६४६ ते १६८० याकाळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ह्या कालखंडात शिवरायांना मोगलांशी व विजापूर सुलतानाशी लढावे लागले. महाराष्ट्रात व दक्षिण हिंदुस्तानात पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर युरोपियन राष्ट्रांच्या कंपन्यांनी व्यापाराकरिता ठाणी स्थापन केली होती. शिवपूर्व कालात इ. स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को-डी-गामा हिंदुस्तानात आला त्यानंतर भारताशी व्यापार करण्यासाठी २० मार्च १६०२ रोजी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. डचांनी भारताच्या मलबार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वखारी स्थापिल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜 २० मार्च इ.स.१६८० (फाल्गुन अमावस्या, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार शनिवार) मराठा साम्राज्यास ग्रहण! युवराज राजाराम महाराजांचा विवाह उरकला आणि त्यानंतर फाल्गुनी अमावस्येला सूर्यग्रहण आले. पुष्कळदा निसर्ग भावी घटनांचे सुचन करीत असावा असे वाटते. महाराजांनाही पुढच्या अनिष्ट घटनांची चाहूल लागली होती. राजयोगी पुरुष ते! सर्वत्र विजय पताका फडकत असली तरी कुठे तरी अपुर्णत्वाची बोच महाराजांना लागली होती. त्यांच्या वागण्यातून जाणवत होती. महापराक्रमी सुर्य अस्तास जात होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१७१९ #तीन_दशकानंतर_मराठ्यांची_राजमाता_येसूबाई कैदेबाहेर पडल्या मातापुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकांस भेटले. एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे, मराठ्यांचे निशाण नर्मदापार गेलेले पाहण्याचे भाग्य या येसूबाईंना लाभले. छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१७२० दिल्ली स्वारीनंतर एक नवीनच कटकट उद्भवली. कोल्हापूरकर आणि सातारकरांत वारणेचा तह झाला असला तरी वारणा नदीच्या दोन्ही तीरावर थोरात नावाच्या घराण्यातील पाच बंधूंच्या पाटिलक्या होत्या. हे थोरात दोन्ही पक्षांत पुन्हा भांडणे लावून आपला स्वार्थ साधीत होते. याच सुमारास पडदुल्लाखान नावाचा एक मोंगल सरदार बंडाच्या पवित्र्यात क-हाडजवळच तळ देऊन बसला होता. शाहूमहाराजांनी पडदुल्लाखानास क-हाड सोडण्यास सांगितले. परंतु, तो काही केल्या ऐकेना. मग शेवटी महाराजांनी पावसाळ्याच्या अखेरीस बाळाजीपंतांना सोबत घेतले व स्वतः पडदुल्लाखानावर चालून गेले. पडदुल्लाखानाचा पराभव झाला. शाहू महाराजांनी इस्लामपूर व क-हाड आपल्या ताब्यात घेतले. बाळाजीपंतांनी पुढे वारणेवर जाऊन सिधोजी थोरातांचे येळवी गावही ताब्यात घेतले. थोरात कोल्हापूराला पळाले. शाहूमहाराज सातारला परत आले आणि तिकडे कोल्हापूरची फौज घेऊन थोरातांनी बत्तीस शिराळे व अष्टी हे सातारकरांचे प्रदेश हस्तगत केले. इस्मामपूरला असलेल्या बाळाजी विश्वनाथांना थोरातांचा हा बंडावा समजला. त्यांनी ताबडतोब जाऊन थोरातांवर हल्ला केला. शेवटी पंचगंगा ओलांडून पन्हाळ्याकडे जात असता सिधोजी थोरात मारले गेले. बाळाजीपंतांनी मागे साताऱ्यास न फिरता संभाजीराजांच्या कोल्हापूरलाच वेढा घातला. संभाजीराजे कोल्हापूरमध्ये नव्हते. परंतु, त्यांना या वेढ्याची बातमी समजताच ते थेट बाळाजीपंतांवर सैन्यासह चालून आले. शेवटी इस्लामपूरजवळच कृष्णा नदीच्या काठावर उरणबाहे या गावाजवळ दि. २० मार्च १७२० रोजी लढाई झाली. यात संभाजीराजांचा पूर्ण पराभव झाला. शेवटी संभाजीराजांना घेऊन बाळाजीपंत सातारला शाहूमहाराजांच्या भेटीकरिता आले. संभाजीराजे शाहूमहाराजांच्या पाया पडले. शाहू महाराजांनीही त्यांना पोटाशी धरले. माफ केले. पुन्हा एकदा सातारा व कोल्हापूर गादीमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले. शाहूमहाराजांनी सातारा दरबारात बाळाजीपंतांचा यथायोग्य सन्मान केला. यानंतर राजमाता येसूबाई साहेबांचे दर्शन घेऊन बाळाजीपंत सासवडला परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१७३७ दमाजीराव गायकवाड यांचे सरदार रंगोजी व मुमिनखान यांनी अहमदाबाद सर केले. गुजरातचा त्यावेळचा सुभेदार अभयसिंह याने कपटाने पिलाजीराव गायकवाड यांचा खून करवला आणि बडोदा ताब्यात घेतले. शेरखान बाबीला येथे ठाणेदार नेमून अभयसिंह स्वतः तेथे आला. यावर्षी गुजरातेत मोठा दुष्काळ पडला. मुघलांच्या अंतर्गत चढाओढी मुळे दमाजीराव गायकवाड यांना गुजरात मध्ये घुसण्याची संधी मिळाली. मुमिनखानाने दमाजीस गुजरातचे अर्धे वसूल देण्याचेही कबूल केले. दमाजीरावांनी त्यांचा रंगोजी या नावाच्या सरदारांस मदतीस पाठविले. रंगोजी आणि मुमिनखान या दोघांनी अहमदाबाद अर्धे-अर्धे वाटूनही घेतले. आता गुजरातच्या अर्ध्या भागावर मराठे सत्ता सुरु झाली. मराठे अतिशय प्रबळ झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१७५३ मराठ्यांनी श्रीरंगपट्टणची स्वारी पूर्ण करून परत येताना तारीख २० मार्च रोजी होळीहुन्नरचा किल्ला मोर्चे लावून जिंकून घेतला. तिथून निघून धारवाड काबीज केले व तदनंतर कोल्हापूरास येऊन भाऊसाहेबांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१७६० रोजी पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यात मैत्रीचा करार! गोव्याच्या व्हिसेरेईने पेशव्यांच्या बरोबर तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी आपला वकील पाठविला. पुणे दरबाराने त्यांचा चांगला परामर्श केला. ते पुणे दरबाराशी तहाच्या वाटाघाटी करून गोव्यास परतल्यावर, पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये गोवा शहरी मैत्रीचा करार झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१७६१ पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१९१० सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना त्यांच्या साथीदारांसह अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - ٨٥ ٧٣ ٧  T H ని CRR Le VLಹಗ4  R R 1 0 R S SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष २० मार्च इःस. १६८० युवराज राजाराम महयाराजांचा विवाह उरकल्या मराठ्यांची विजय पताका फडकत होती अश्यावेळी oid? अपुर्णत्वाची चाहुल लागली. HథRIuIIoII the great marathawarriors the qreat maratha warriors great marathawarriors the ٨٥ ٧٣ ٧  T H ని CRR Le VLಹಗ4  R R 1 0 R S SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष २० मार्च इःस. १६८० युवराज राजाराम महयाराजांचा विवाह उरकल्या मराठ्यांची विजय पताका फडकत होती अश्यावेळी oid? अपुर्णत्वाची चाहुल लागली. HథRIuIIoII the great marathawarriors the qreat maratha warriors great marathawarriors the - ShareChat