#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 . . . [] ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन []
. **************
. .ब्रह्म नित्य, अचल, स्पष्ट, धर्मरूप, सुखरूप, अमर्याद व अद्वितीय आहे. ज्ञान अज्ञानास संपवून शेवटी जेथे पोहोचते ते अखेरचे स्थान म्हणजे ब्रह्म व शेवटी मीच आहे.'
*************************************************
. विवेकु आपले काम । सारुनि ठाकी जे धाम l
निष्कर्माचे निःसीम । किंबहुना मी ll
***************[ ज्ञानेश्वरी-१४/४०७]****************
. ------- llअर्थ ll ------
. ज्ञानरूप विचार आपले अज्ञान नाशाचे काम संपवून जेथे अखेर येऊन पोहोचते ते सिद्धांतनिर्णीत अखेरचे स्थान हे ब्रह्मच होय किंवा मीच ते स्थान समज.
. ll चिंतन ll
. सर्व साधनांचा त्याग करून परमेश्वराची अनन्य भक्ती करणारा भक्त गुणातीत होऊन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेतो असे भगवंतांनी सांगितले असे का होते? हे सांगताना भगवंत म्हणतात, 'कारण अविनाशी आणि निर्विकार ब्रह्माचे सनातन धर्माचे व अखंड सुखाचे स्थान म्हणजे हे सर्व मीच आहे.'
ज्ञानेश्वर महाराज चौदाव्या अध्यायाचा शेवट करताना म्हणतात, 'अर्जुना, ब्रह्म म्हणून जे म्हणतात ते 'मी' असा अर्थ आहे व श्रुती त्याचे जे वर्णन करतात तेही सर्व मीच आहे. ते ब्रह्म नित्य, अचल, स्पष्ट, धर्मरूप, सुखरूप, अमर्याद व अद्वितीय आहे. ज्ञान अज्ञानास संपवून शेवटी जेथे पोहोचते ते अखेरचे स्थान म्हणजे ब्रह्म व शेवटी मीच आहे.'
अनन्य भक्तीने मुक्त असा जो भक्त आहे त्याची ब्रह्मता ही पतिव्रता स्त्री आहे. ज्ञानदृष्टीने जो माझी भक्ती करतो तो ब्रह्मस्वरूप स्थितीचा मुगुटावरील रत्न होतो. या ब्रह्मस्वरूपतेलाच सायुज्य असे म्हणतात. हाच चौथा पुरुषार्थ होय. तो प्रत्येकाने मिळवायचा असतो. माझी आराधना करणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती करून घेणे. धेय कारण मी व ब्रह्म एकच आहोत. गुणातीताला हे सहज शक्य आहे. जो भक्त गुणातीत असून अनन्यभावे माझी भक्ती करतो तो मला येऊन मिळालाच असे समज.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll


