#🙏श्री महालक्ष्मी फाल्गुन शुद्ध तृतीया श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
20/2/26
#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 प्रसन्नतेतून मागू मी काय, मनीचे जाणता तुम्ही सर्व काही...🙏
*ॐ कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ॐ*
आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मनात काय असतं? हात जोडलेले असतात, डोकं झुकलेलं असतं, पण मन मात्र इच्छा-आकांक्षांच्या यादीत अडकलेलं असतं. नोकरी हवी, पैसा हवा, मुलांच्या शिक्षणात यश हवं, आजार बरा व्हावा, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने यावा… जणू काही आपण श्रीगुरूंसमोर उभे राहत नाही, तर एखाद्या इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षासमोर उभे राहतो. आपण देतो ती फक्त फुलं, नारळ, नैवेद्य; पण मागतो मात्र संपूर्ण संसार. ही भौतिक वृत्ती इतकी घट्ट बसलेली आहे की, श्रीगुरूंच्या चरणी उभं राहताना देखील आपलं मन व्यवहारातच अडकलेलं असतं.
आपण असा विचार करतो की, श्रीगुरूंना स्पष्ट सांगितलं तरच ते आपली इच्छा पूर्ण करतील. पण गुरू हे सर्वज्ञ आहेत, अंतःकरणातील सूक्ष्म विचारदेखील त्यांना कळतात. श्री गुरुचरित्र वाचताना हे वारंवार सिद्ध होतं. अठराव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे ते एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले. त्यांची आर्थिक अवस्था श्रीगुरूंना पूर्णपणे माहीत होती. तरीही त्यांनी ब्राह्मण स्त्रीकडून गुरूसेवा करून घेतली. निघताना त्यांनी घरासमोरील घेवड्याचा वेल उपटून टाकला. बाह्यदृष्टीने पाहता हे विचित्र वाटेल; पण त्या वेलाखाली धनाचा हंडा दडलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या भक्तीचा आणि सेवाभावाचा मोबदला श्रीगुरूंनी त्याच्याच घरी, त्याच्याच भूमीतून दिला. त्याने काही मागितलं नव्हतं; पण गुरूंना त्याची गरज ठाऊक होती.
अध्याय १७ मधील कथा तर मन हेलावून टाकणारी आहे. समाजाने नाकारलेला, मानसिकदृष्ट्या दुर्बल समजला गेलेला एक मुलगा. त्याने अंबाभवानीची प्रार्थना केली आणि अज्ञानाच्या वेदनेतून स्वतःची जीभ कापली. अखेर तो श्रीनृसिंहसरस्वती स्वामींच्या चरणी गेला. श्रीगुरूंनी त्याच्या अंतःकरणातील तळमळ ओळखली. शब्द न उच्चारता त्याची वेदना जाणली. त्यांच्या कृपादृष्टीने त्याला ज्ञानप्रकाश लाभला. समाजाने ज्याला “निकामी” ठरवलं, त्याला गुरूंनी तेजस्वी केलं. गुरू बाह्य दोषांकडे दुर्लक्ष करतात; त्यांना दिसते ते आपल्या अंतर्मनातील भक्तीची तेजस्वी ज्वाला.
एकोणिसाव्या अध्यायात तर नावाडी श्रीगुरूंना स्पष्टपणे काहीही मागत नाही. पण त्याच्या मनात राजासारखं जीवन जगण्याची इच्छा होती. श्रीगुरूंनी ती ओळखली आणि त्याला पुढील जन्मात बिदरचा यवन राजा होण्याचा वर दिला. पुढे ५० व्या अध्यायामद्धे त्याच्या राजजीवनाचा उल्लेख येतो. येथेही मागणं नव्हतं, पण मनातील इच्छा गुरूंना कळली. हे दाखवते की, श्रीगुरूंना आपली गरज सांगण्यापेक्षा त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे.
म्हणूनच, श्रीगुरूंच्या चरणी उभे राहिल्यावर आपण काय मागावे हे समजून घेण्यासाठी गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली संदिपकाची कथा नीट समजून घेणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या हृदयात संदिपकासारखी अखंड गुरुभक्ती कशी निर्माण करता येईल, यावर विचार करणेच खरी साधना आहे.
संदीपक नावाच्या एका भक्ताला महादेव आणि विष्णूकडून वर मागण्याची संधी मिळते. संपत्ती, ऐश्वर्य, सिद्धी, कीर्ती… काहीही मागता येऊ शकत होते. पण त्याने केवळ एकच मागितले — अखंड, निष्कलंक गुरुभक्ती.
हेच गुरुचरित्रातील खालील ओव्या उत्तमरित्या वर्णन करतात:
ऐक विष्णु ह्रषीकेशी । निश्चय असो माझे मानसी । वेदशास्त्र मीमांसादिकांसी । गुरु आम्हांसी देणार ॥
गुरूपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां आधीन । आमुचा गुरुचि देव जाण । अन्यथा नाही जाण पा ॥
सर्व देव सर्व तीर्थ । गुरूचि आम्हा असे सत्य । गुरूवांचूनि आम्हां परमार्थ । काय दूर असे सांगा ॥
समस्त योगी सिद्धजन । गुरूवांचूनि न होती सज्ञान । ज्ञान होता ईश्वर आपण । केवी दूर असे सांगा ॥
जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतो काय चोज । याकारणे श्रीगुरुराज । भजतसे परियेसा ॥
संतोषोनि नारायण । म्हणे धन्य धन्य माझा प्राण । तू शिष्य-शिरोरत्न । बाळक तूचि आमुचा ॥
काही तरी माग आता । वर देईन तत्त्वतां । विश्वनाथ आला होता । दुसरेन वर द्यावयासी मी आलो ॥
आमचेनि मन संतोषी । वर माग जो तुझे मानसी । तुज वश्य झालो निर्धारेसी । जे पाहिजे ते देईन आता ॥
दीपक म्हणे विष्णुसी । जरी वर आम्हां देसी । गुरुभक्ति होय अधिक मानसी । ऐसे मज ज्ञान द्यावे ॥
संदीपक म्हणतो, "परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान, ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरू देत नाहीत असे काहीही नाही. म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या. कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो." या शब्दांत संदीपकाच्या मनाचा वेध आणि भक्तीची खोली प्रकट होते. गुरुभक्ती मिळाली की संपूर्ण जगाचे वरदान आपोआप मिळते. देवतांकडून वरदान मिळवता येते, पण गुरूकृपेने देवतादेखील अनुकूल होतात. हेच खऱ्या भक्तीची पराकाष्ठा आहे.
श्रीगुरूंना कसा गुरुभक्त प्रिय असतो? जो त्यांच्याकडे काही मागायला नाही, तर स्वतःला अर्पण करायला येतो. ज्याचं मन “मला काय मिळेल?” या प्रश्नाने भरलेलं नसून “मी गुरुभक्ती कशी दृढ करू?” या भावनेने ओथंबलेलं असतं. ज्याच्या नजरेत गुरू हे केवळ संकटमोचक नाहीत, तर जीवनमार्गदर्शक, आत्मज्ञानाचे दीपस्तंभ आहेत. गुरुभक्ती म्हणजे केवळ नामजप नव्हे, ती आहे संपूर्ण समर्पणाची अवस्था. जिथे आपली अहंकाराची भिंत कोसळते आणि “मी” हा शब्द विरघळून जातो, तिथे खरी गुरुभक्ती सुरू होते.
श्रीगुरुचरित्रात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे भक्तांनी काही मागितलं नाही, तरी गुरूंनी त्यांच्या अंतःकरणातील वेदना, गरज आणि इच्छा ओळखून त्यांचं कल्याण केलं. त्यामुळे प्रश्न असा नाही की आपण काय मागतो; प्रश्न असा आहे की आपण किती श्रद्धेने समर्पित होतो. गुरू हे आपल्या जीवनाचे रक्षक आहेत. ते आपल्या कर्मानुसार, आपल्या हितासाठी योग्य ते देतात.
म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण श्रीगुरूंच्या समोर उभे राहू, तेव्हा भौतिक मागण्यांची यादी थोडी बाजूला ठेवूया. संपत्ती, यश, कीर्ती – हे सर्व क्षणभंगुर आहे. पण गुरुभक्ती शाश्वत आहे. श्रीगुरूंना केवळ एवढंच मागू या – “मला अखंड, निष्कलंक गुरुभक्ती द्या.” बाकी सर्व त्यांच्यावर सोडू या. कारण जेव्हा गुरू आपल्या जीवनाची धुरा हातात घेतात, तेव्हा आपल्याला काही मागण्याची गरजच उरत नाही. ते आपली काळजी घेतात, आपलं रक्षण करतात आणि अखेरीस आपल्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेऊन खऱ्या मुक्तीकडे घेऊन जातात.
॥अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌼🙏🌼
#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺













