#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #🙏भक्ती सुविचार📝*II मनोमन देवाचे आभार मानावे II*
*मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे.*
*पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील.*
*श्री गुरुदेव दत्त*
#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 ❗२५ ऑक्टोबर❗
‼️जय हरि विठ्ठल‼
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟥ईश्वरप्राप्तीचा मार्ग:खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती.🟥
💮नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही; बायकोचा त्याग करून होत नाही; जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही, की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यांपैकी काय करीत नाहीत❓ काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून काय, की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते❓तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे, ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले.💮
💠ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही; आणि हे व्हायला भाग्य लागते.💠
⭕तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही. आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे; आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे; म्हणजे त्याचे झाले पाहिजे. असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का❓⭕
🔸️आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का❓ तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही❓🔸️
♦️तसे, आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो; कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते.♦️
❄बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले.तरी पण रामाने सांगितले की, "जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे."❄
🔹शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की, जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते.माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी 'रामाची प्राप्ती करून द्या' म्हणून विचारले का ? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी❓🔹
🛟समजा, एकजण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की,"मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन'" तर आता सांगा, त्याला मारुतीने काय द्यावे❓ त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का❓जर नाही, तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता❓🛟
💠आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, "मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे, आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये."💠
🎄 #बोधवचन :साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे,आणि मग'भगवंत किंवा गुरू पाहून घेतील' असे म्हणून आनंदात राहावे.🎄
🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री महालक्ष्मी कार्तिक शुद्ध तृतीया श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
24/10/25
#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 . .ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. ------------------------------------------
'भक्ताच्या ठिकाणी असलेले दोष भक्तीने नाहीसे होतात. भगवंत अनन्य भक्तीला भुललेला आहे तो जाती, वर्ण, कूळ इत्यादी पाहात नाही. ब्रजगोपी या स्त्रियांचा उद्धार भगवंतांनी केला व तुलाधार वैश्याचा उद्धार भगवंतांनी केला आहे.
*************************************************
. म्हणोनी कुळ जातीचे वर्णं l.हे अघावेचिया अकारण l
. एथ अर्जुना माझेपण l सार्थक एथ ll
***************[ ज्ञानेश्वरी-९/४५६]*****************
. ------- अर्थ ------
. . म्हणून कुळ, जाति वर्ण हे सर्व निष्फळ असून एक माझ्या भक्तीच सार्थकता आहे..
. ------विश्लेषण -----. .
. अनन्य भक्तीने पालटलेल्या धर्मात्म्याला जो पारमार्थिक लाभ होतो ते सागताना भगवत म्हणतात, तो लवकरच पुण्यात्मा होतो व नित्यशांतीला प्राप्त होतो. तो कधीही नाश पावत नाही. स्त्रिया, वैश्य आणि शूद्र अथवा दुसरेही ने अन्य पापयोनी असतील तेही माझ्या उपासनेने परमगतीला प्राप्त होतात.
. भोजन करताना प्रत्येक घासाबरोबर तुष्टी, पुष्टी व क्षुधाशमन होते त्याप्रमाणेच भगवंताची भक्ती केल्यावर प्रेयाभक्ती, अनुभूती व विषय वैराग्य या तीनही गोष्टींचा लाभ होतो.
. भक्तांचा विनाश होत नाही हे भगवंतांचे वचन आहे. भक्ताच्या ठिकाणी असलेले दोष भक्तीने नाहीसे होतात. भगवंत अनन्य भक्तीला भुललेला आहे तो जाती, वर्ण, कूळ इत्यादी पाहात नाही. ब्रजगोपी या स्त्रियांचा उद्धार भगवंतांनी केला व तुलाधार वैश्याचा उद्धार भगवंतांनी केला आहे.
. भक्त प्रल्हादाचा जसा उद्धार केला तसाच अजामेळ याचा. गणिकांचा उद्धारही भगवंतांनी केला आहे.
. या सर्वांचा उद्धार होण्याचे कारण म्हणजे त्यांची भगवंताच्या ठिकाणी असणारी अनन्यता होय. ते हीन कुळातील होते म्हणून त्यांचा उद्धार भगवंतांनी केला नसून त्यांच्या शुद्ध भावामुळेच झाला.
. पापयोनीत जन्मलेल्यांचाही उद्धार होऊ शकतो मग ब्रह्मर्षी व राजर्षीचा होईल यात शंका ती काय असे भगवंत म्हणतात.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll













